* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 0
  • Language : MARATHI
  • Discount : Individual(Login to get best discount offers.)
Quantity
Sr.No.Book NamePriceISBN
11960 NANTARCHI SAMAJIK STHITI ANI SAHITYATEEL NAVE PRAVAH200.009788177661019
2AADITAL170.009788171612864
3AATMACHARITRA MIMANSA160.009788171617722
4BHUMIKANYA180.009788177660456
5DAVARNI210.009788171612734
6DR. ANAND YADAV EK SAHITYIK PRAVAS400.009789387319905
7GHARBHINTI600.009788177665932
8GHARJAWAI180.009788171618729
9GOTAVALA180.009788184984101
10GRAMIN SAHITYA : SWARUP ANI SAMASYA195.009788171612680
11GRAMINTA SAHITYA ANI VASTAV150.009788171612697
12GRAMSANSKRUTI170.009788171619764
13KACHVEL360.009788177662887
14KHALAL190.009788171612635
15LALIT GADYACHE TATVIK SWARUP AANI MARATHI LAGHUNIBANDHACHA ITIHAS120.009788171614769
16MAI LEKARA100.009788171617432
17MALAVARCHI MAINA180.009788177664034
18MALYACHI MATI100.009788171612642
19MARATHI SAHITYA, SAMAJ ANI SANSKRUTI195.009788171612703
20MATIKHALCHI MATI140.009788184983388
21MAULI195.009788177666090
22NANGARNI370.009788177665178
23NATRANG230.009788177665130
24PANBHAVARE150.009788177662115
25SAHITYACHI NIRMITI PRAKRIYA295.009788177662603
26SAHITYIK JADAN-GHADAN150.009788184983272
27SAHITYIKACHA GAON90.009788177661002
28SAINIK HO TUMACHYASATHI60.009788177667660
29SHEVATCHI LADHAI160.009788177661026
30SPARSHKAMALE195.009788171618989
31UGVATI MANE160.009788177661088
32UKHADLELI ZADE195.009788177664393
33ZADVATA160.009788177660463
34ZOMBI420.009788177663921
  7010.00 
N/A
N/A
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
Customer Reviews
  • Rating StarDipak Manjarekar

    डाॅ.आनंद यादव : (३० नोव्हेंबर १९३५ – २७ नोव्हेंबर २०१६). आज त्यांचा जन्म दिवस...! डाॅ. आनंद यादव हे नाव मराठी साहित्याशी मैत्री असणाऱ्या वाचकाला नवीन नाही. महाराष्ट्रातल्या ग्रामीण जीवनाचं यथार्थ दर्शन घडवणाऱ्या कथा, कादंबरी आणि कवितांचे लेखक म्हून त्यांचं कर्तुत्व वादातीत आहे. कथा, कविता, कादंबरी, ललितगद्य, समीक्षा इ. अनेक साहित्यप्रकारांमध्ये लक्षणीय स्वरूपाचे लेखन त्यांनी केले आहे. ललित साहित्यातील त्यांच्या कसदार लेखनामुळे आणि समीक्षात्मक लेखनात दिसणाऱ्या व्यासंगी वृत्तीमुळे आजच्या मराठी साहित्यातल्या यशस्वी लेखकांत डाॅ. आनंद यादव या नावाचा अंतर्भाव सहजपणाने होतो. आजच्या नव्या पिढीला त्यांच्या नावाची ओळख `नटरंग` या लोकप्रिय चित्रपटामुळे होते. ग्रामीण तमाशा कलावंताच्या उपेक्षित जीवनाचा आविष्कार करणारी त्यांची `नटरंग` ही कांदबरी समकालीन समाजजीवनाचा वाङ्‌मयीन दस्तऐवज ठरली. तमाशा कलावंत गुणा कागलकर याची शोकांतिका थोडक्यात सर्व तमाशा कलावंतांची प्रातिनिधिक कथा ठरते. याच कादंबरीवर बेतलेला आणि त्यांची पटकथा असणारा ‘नटरंग’ चित्रपटही तुफान लोकप्रिय ठरला. आणि त्यांच्या बावनकशी सोन्यासारख्या वाड़मयीन गुणवत्तेला जगमान्यता मिळाली. झोंबी, नांगरणी, घरभिंती आणि काचवेल या कादंबऱ्यांच्या निमित्ताने डाॅ. आनंद यादव यांनी आत्मचरित्रात्मक कादंबरीचा नवा मानदंड निर्माण केला. कारण या स्वरूपाचे कादंबरीलेखन यापूर्वी मराठी साहित्यात कधीही झालेले नव्हते. पण सर्वथा या चार पुस्तकापलिकडे त्यांच्या इतर साहित्यसंपदेकडे जिज्ञासू वाचकां शिवाय कुणी ही सरकत नाही.वस्तूतः गोतावळा किंवा खळाळ , नटरंग हे इतर साहित्य तितकेच उत्कृष्ट आहे..! डाॅ. आनंद यादव याचा जन्म 30 नोव्हेंबर 1935 साली कोल्हापूर जिल्ह्यातील कागल या गावी झाला. "झोंबी" ही त्यांची संपूर्ण आत्मकथा दहावी पर्यंत शिक्षण घेण्यासाठी लेखकाला खाव्या लागलेल्या खस्ता ह्या भोवती फिरते. दारिद्र्य,अंधश्रद्धा आणि वडिलांचा शिक्षणाला असलेला प्रखर विरोध ह्या विरुद्ध ठामपणे उभे राहत आनंद यादव आपले शिक्षण पूर्ण करतात. पुढे रत्नागिरी मध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेताना पु.ल. देशपांडे यांच्याशी झालेल्या परिचयानंतर त्यांच्या `हिरवे जग`मधली नववळणाची अस्सल ग्रामीण कविता कुठेही प्रकाशित न होता त्यावेळेच्या ख्यातनाम साहित्यिकांपर्यंत पोहोचली.त्यांची वाड़मयीन गुणवत्ता उजळून निघाली. पुढे डाॅ. आनंद यादव यांनी प्रांजळपणे आपल्या साहित्यिक आणि वैयक्तिक आयुष्यात पु.ल. व सुनिताताई देशपांडे यांचे योगदान नांगरणी, घरभिंती आणि काचवेल या चरित्र-खंडात उल्लेखलेलं आहे. त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर...1955 च्या संप्टेंबर-ऑक्टोबरात भाई (पु.ल. देशपांडे) आणि सुनिताताई माझ्या जीवनात अनपेक्षितपणे आले आणि त्यांनी माझ्या व्यक्तीत्वाच्या मूळ कंदाला हात घातला. तोपर्यंत मी माझ्या आवडीसाठी वाचन करत होतो. मनाला बरं वाटतं म्हणून भावनाप्रधान कविता करत होतो. त्या पलीकडे त्या लेखनात काही नव्हतं, पण भाईंनी नि सुनिताताईंनी नकळत माझ्या मनावर हळुवार फुंकर घातली. माझ्या साहित्यिक गुणांविषयी माझ्यात दाट विश्वास निर्माण केला. त्यामुळे परिस्थितीच्या टाचे खाली चुरगळून गेलेल्या माझ्या वाड़मयीन गुणांना एकाएकी खतपाणी मिळालं. मनाला चैतन्यपूर्ण जोमदारपणा आला. ते वाढू विकासू लागलं.अनावरपणे वाड़मयीन गुण माझ्या इतर गुणांवर मात करू लागले. त्यांना मागं लोटून आपण पुढं येण्यासाठी धडपड करू लागले. `तुझं शिक्षण पूर्ण करण्यास मदत केली तर उद्याच्या महाराष्ट्राला एक चांगला साहित्यिक मिळू शकेल, या विचाराने आम्ही तुझ्यासाठी धडपडत आहोत.` हे सुनिता ताईंच्या पत्रातील वाक्य मी मनावर संगमरवरात कोरावं तसं कोरून ठेवलेलं...त्यामुळे माझी जीवनविषयक महत्वाकांक्षा अधिक स्पष्ट झाली होती. प्राध्यापक आणि साहित्यिक दोन्ही व्हायचं असं मी ठरवलं होतं. माझ्या मते डाॅ. आनंद यादव ही मराठी साहित्याला पु.ल. आणि सुनिताताई यांनी दिलेली अनमोल भेट म्हणता येईल! 1950 नंतरचा काळ सत्यकथेच्या उत्कर्षाचा आणि अत्युच्च प्रतीष्ठेचा होता. रत्नागिरी, कोल्हापूर, पुणे या शहरात वाड़मयीन संस्कार घडल्यानंतर सत्यकथा आणि मौज यांनी त्यांच्यावर ग्रामीण कथाकार, कवी म्हणून प्रतीष्ठेचा पहिला शिक्का 1961 साली दिवाळी-पाडव्याच्या मुहूर्तावर मारला.हा शिक्का मिरवत ते झपाट्याने लिहीत राहिले.. आनंद यादव यांच्या १९६० पासून ५०-५५ वर्षांच्या साहित्यिक कारकिर्दीचा एक परिपूर्ण आढावा घेताना त्यांच्या साहित्यातून नवीन प्रवाह आणण्यासाठी त्यांनी यशस्वी पणे केलेली धडपड ठळकपणे जाणवते. आत्मचरित्र ही सर्वमान्य रूढ संकल्पना त्यांच्या ‘झोंबी’, नांगरणी’, ‘घरभिंती’, ‘काचवेल’ हे अनोख्या पद्धतीनं आलेल्या आत्मचरित्रात्मक कादंबरीला लागू होत नाही. हे चार खंड मराठी साहित्याला नवे मापदंड देणारे वाटतात. यापूर्वी अशा पद्धतीने आत्मचरित्र कुणी ही लिहिलं असेल वाटत नाही. झोंबी किंवा नांगरणी पासून माझ्यासारख्या आयुष्यात दिशा हरवलेल्या कितीतरी जणांनी प्रेरणा घेतली असेल, या पुस्तकांची किती तरी पारायणे केली असतील. डॉ. आनंद यादव त्यांनी निर्माण केलेल्या आशयघन, प्रयोगशील, भरघोस साहित्यकृतींमुळे मराठी साहित्यातले एक महत्त्वाचे नाव आहेच ; परंतु तितकेच ते महत्त्वाचे आहे कारण त्यांनी ग्रामीण साहित्य लेखनाची, ग्रामीण साहित्याकडे बघण्याची एक नवी वाट शोधली आणि ती वाट पाठीमागून येणाऱ्या नव्या ग्रामीण साहित्यिकांसाठी खुली केली. त्यांनी नव्या लेखकांना जी दिशा, जो विचार, जो दृष्टिकोन दिला, त्यातूनच ग्रामीण साहित्याची चळवळ निर्माण झाली. `काचवेल` या त्यांच्या आत्मचरित्रात्मक शेवटच्या खंडामध्ये मध्ये यावर सविस्तर माहिती आली आहे. 1960 पुर्वी ग्रामीण साहित्यातील लेखक, कवी आणि सर्वसामान्य वाचकांच्या मनावर एक सवंग लोकप्रिय पण दिशाभूल करणारी कल्पनारम्य प्रतिमा रेखाटत असत. त्यांचं ग्रामीण जीवन आणि तिथला माणूस, त्याच्या आशा-आकांक्षा, सुख-दु:खं, आशा-निराशा ह्या समग्रपणे मांडल्या गेल्या नाहीत हा त्यांचा मुळ मुद्दा! या व्यतिरिक्त पुर्वीच्या ग्रामीण साहित्यात लेखकांनी बहुतांशी तृतीय पुरूषी भाषा वापरल्याने लेखक त्यांच्या साहित्यातील पात्रांना आपलं मनोगत पुरेसे मांडू न देता स्वतःची मतं ही त्यामध्ये बेमालूम पणे मिसळून देतो हा त्यांचा एक मोठा आक्षेप.त्यांच्या मते या काळात ग्रामीण लोकांकडे बघण्याचा सांप्रत लेखकांचा साहित्यिक दृष्टीकोन हा करूणदायी, सहानुभूती दाखवणारा किंवा त्यांच्यावर इरसाल विनोदी कथा लिहून वेंधळटपणाचा शिक्का मारणारा होता. हे सगळं पुसून टाकून तिथे वास्तवाची धग पेरणे हे काम सोपे नव्हते; परंतु डाॅ. आनंद यादव यांच्या साहित्यप्रेरणांची मुळं ग्रामीण भागात घट्ट रोवलेली होती. त्यामुळे अशी भ्रामक प्रतिमा घट्ट करणारं लेखन त्यांच्या हातून होणं अशक्यच होतं. कदाचित यातूनच त्यांच्यातील प्रयोगशीलतेने उसळी मारून जुन्याला नकार देत नवी वाट चोखाळण्याला त्यांना प्रवृत्त केलं असावं. त्यांच्या समग्र लेखनाच्या गाभ्यात आपल्याला ग्रामीण जीवन आणि तिथला माणूस त्याच्या आशा-आकांक्षा, सुख-दु:खं, आशा-निराशेच्या प्रहरांसकट भेटतो. कारण तोच त्यांच्या जीवनास्थेचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळेच अस्सल ग्रामीण जीवनदर्शन हे त्यांच्या संपूर्ण साहित्याचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले.ग्रामीण जीवनाचे खरे दर्शन बोलीभाषेतूनच घडवणे शक्य आणि योग्य आहे. अशा आग्रही विचाराने स्वत:ला बोलीभाषेतूनच प्रकट केले. त्यांच्या कथा-कादंबऱ्यांतील पात्रे तर बोलीभाषेतून बोलतात; परंतु निवेदकही बोलीभाषेतून संवादी होतो हे त्यांचे वैशिष्ट्य ठरले. त्याचबरोबर विविध लेखांतून बोलीभाषेचे समर्थन केले. मराठी साहित्यात एक वेगळा प्रवाह त्यांनी निर्माण केला. त्यांनी ग्रामीण भागातील लेखनाचे अंकुर जपणाऱ्या नव्या, तरुण लेखकांना लिहिण्यासाठी एक पायवाट तयार करून दिली. त्यांच्या प्रेरणेने खेड्यापाड्यातील अनेक तरुण कवी, लेखकांना लेखनाची ऊर्जा मिळाली. ग्रामीणतेचे खरे निकष त्यांनी स्पष्टपणे मांडले. डाॅ.आनंद यादव यांनी विपुल आणि कसदार लेखन केलं. त्यांनी वेगवेगळे वाङ्मय प्रकार कुशलतेने हाताळले, ते केवळ सगळ्या साहित्यप्रकारात हात मारायचा या हौसेपोटी नव्हे, तर त्या-त्या साहित्यप्रकाराच्या स्वीकारामागे त्यांचा एक स्पष्ट दृष्टिकोन दिसतो. त्यातूनच कविता, कथा, कादंबरी, आत्मचरित्रात्मक कादंबऱ्या, समीक्षा असे त्यांचे बहुआयामी लेखन निर्माण होत राहिले. ‘हिरवे जगे’, ‘मायलेकरं’ सारखे कवितासंग्रह, ‘गोतावळा’सारखी मराठी कादंबरीला नवे रूप देणारी कादंबरी, ‘नटरंग’सारख्या कादंबरीतून मांडलेली कलावंताची फरपट, बहाल करणारे समीक्षात्मक ग्रंथ अशी एकूण चाळीस ग्रंथांची समृद्ध संपदा त्यांनी निर्माण केली. त्यांच्यातील प्रगल्भ साहित्य-जाणिवांचे दर्शन त्यातून घडले. डाॅ.आनंद यादव यांनी महाराष्ट्रातील विविध साहित्य संमेलनांची अध्यक्षपदे भूषविली आहेत. त्यात, जुन्नर, असोदा, विटा, बेळगाव, भंडारा, नाशिक, औदुंबर, जळगाव, पुणे, मुंबई अशा अनेक ठिकाणी भरलेल्या साहित्य संमेलनांचा उल्लेख करता येईल. 2009 साली महाबळेश्वर इथे झालेल्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांना मिळाले असतांना काही वादांमुळे ते संमेलन त्यांच्या अनुपस्थितीत पार पडले.आजपर्यंतच्या साहित्य संमेलनाच्या इतिहासातील ही एकमेव खंत देणारी घटना. वस्तूतः त्यांच्या संपन्न वाड़मयीन साहित्यप्रवासात हा एक दुर्भाग्य योगच!. पुढे त्यानी 2013 मध्ये साहित्यनिर्मितीमधून सुद्धा जाहीर निवृत्ती स्विकारली. त्यांना मिळालेल्या अनेक पुरस्कारांचीही नोंद घेणे आवश्यक ठरेल. त्यांच्या झोंबी या आत्मचरित्रात्मक कादंबरीला १९९० मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. तसेच या कादंबरीला अन्य आठ पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांना शिवाजी सावंत पुरस्कार, पु. य. देशपांडे स्मृती पुरस्कार, आचार्य अत्रे पुरस्कार, लाभसेटवार पुरस्कार असे अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांच्या साहित्याला महाराष्ट्र राज्य सरकारची एकूण दहा पारितोषिके मिळाली आहेत. राष्ट्रीय हिंदी अकादमीचा (कोलकाता) उत्कृष्ट साहित्य निर्मिती बद्दलचा पुरस्कार त्यांना १९९४ मध्ये प्राप्त झाला आहे. यादवांचे साहित्य महाराष्ट्रासह महाराष्ट्राबाहेरील विद्यापीठांमधूनही अभ्यासले गेले आहे. त्यांच्या साहित्यावर अनेक संशोधकांनी एम. फिल. आणि पीएच. डी. चे संशोधन केले आहे. तसेच त्यांच्या साहित्याची कन्नड, तेलगु, हिंदी, इंग्रजी, जर्मन इ.भाषांमध्ये भाषांतरे झाली आहेत. त्यांच्या `गोतावळा` या कादंबरीने ग्रामीण कथात्मक साहित्याला आणि ग्रामीण बोलीभाषेच्या आविष्कार माध्यमाला महत्त्व मिळवून दिले. हे गोतावळाचे ऐतिहासिक महत्त्वाचे कार्य आहे. कथात्मक लेखनाबरोबरच आनंद यादव यांनी ललितगद्यलेखनही केले आहे. या लेखनात प्राधान्याने ग्रामीण अनुभवांचा आविष्कार आहे. ललितलेखन करीत असताना ते साहित्य व्यवहाराशी निगडित असलेल्या अनेक प्रश्नांचे चिंतन करीत होते. त्यातून त्यांचे समीक्षालेखन आणि वैचारिक स्वरूपाचे लेखन निर्माण झाले. अशाप्रकारे एकाच वेळी ललितलेखन आणि समीक्षालेखन या दोन्ही आघाड्या यादवांनी यशस्वीपणे सांभाळल्या आहेत. या संदर्भात यादवांच्या रूपाने ग्रामीण साहित्याला चांगला भाष्यकार मिळाला आहे असा निर्देश गो. म. कुलकर्णी यांनी केला आहे. शाळेत असताना मराठी बालभारती पुस्तकातील `पाटी आणि पोळी` किंवा झोंबी हे धडे वाचताना त्यांच्या साहित्या विषयी मनात अनावर ओढ निर्माण झाली होती. व्यक्तीशः मला आवडलेली किंवा माझं आयुष्य बदलून टाकणारी झोंबी आणि नांगरणी ही पुस्तकं मला खुप प्रेरणादायी वाटतात . #झोंबी.... "आजच्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीत अस्वस्थ होऊन धुमसणे हाच ग्रामीण जीवनाचा स्थायीभाव आहे. त्या अस्वस्थपणाचा स्फोट मराठी साहित्यात सुरू झालाच आहे. हे व्हायला हवेच होते. शिवाय, साऱ्या जगातलं साहित्य समृद्ध केलं आहे. ते या `झोंबी`सारख्या वाचकाला अस्वस्थ करणाऱ्या ग्रंथांनीच!" - पु. ल. देशपांडे #नांगरणी... कणखर सकसता आणण्यासाठी... भूमीनं स्वत:वर धारदार अवजारांनी आडवे उभे घाव घालून घेणे.. आणि सूर्यभट्टीत अंतर्बाह्य होरपळणे म्हणजे नांगरणी. उत्तम पिकांच्या समृद्धीसाठी शेतमळ्यांवर हिरवीगार साय साकळावी; अंगाखांद्यावरच्या गाईगुरांना, माणसाकाणसांना, किड्यामुंग्यांना, चिमण्यापाखरांच्या इवल्या चोचींना मूठमूठ-चिमूटचिमूट चारचणा मिळावा; म्हणून भूमीनं स्वत:ची सोशिकपणे केलेली उरस्फोड म्हणजे नांगरणी. इच्छाआकांक्षाची पूर्तता करणारा पाऊस, कृपावंत होऊन पडावा म्हणून... तहानलेल्या पृथ्वीनं वासलेली चोच... म्हणजे नांगरणी. नांगरणी म्हणजे... हिरव्या चैतन्याला जन्म देऊ पाहणाऱ्या, सर्जनोत्सुक भूमीची घुसमटणारी.. निर्मितिपूर्व करुणावस्था. झोंबी सुंदर आहेच पण नांगरणीत जकातेंचा `आंदा` महाराष्ट्राच्या कोन्या कपारीत जात `आनंद यादव` नावाचा लेखक होण्याचा हा प्रवास अतिशय सुंदर आहे...झोंबीमध्ये जकातें च्या आंदा चा दहावी पर्यंतचा प्रवास तर नांगरणी मध्ये आंदा ते लेखक आनंद यादव बनण्यापर्यंतचा प्रवास अधोरेखीत केलेला आहे. परिस्थितीसोबत दोन हात करायला शिकवणारे हे आत्मचरित्र, अतिशय सुंदर. नांगरलेलं शेत जसं सुंदर दिसावं तसं हे नांगरणी लेखन ही सुरेख उतरवलं आहे. प्रत्येकाची आपली अशी एक वाट असते. काहींची सरळ, धोपट, काहीची वळणावळणांची अडीअडचणींची लेखकाचीही आपली एक वाट काट्याकुट्यांनी भरलेली. दगडधोंडे आडवे येणारी. तरीही पुढे जायला प्रवृत्त करणारी. पुढे जायचंच या कल्पनेने झपाटलेला जीव काटेरी मार्गाची वाट त्या झपाटलेपणामुळं सहज पार करतो. आणि इच्छा आकांक्षांची पूर्ती; हवं ते मिळवल्याचं मनभरून राहिलेल्या समाधानानं, तृप्तीनं मागं वळून बघतानाचा क्षण, आयुष्याच्या वळत्या वाटेवरचं उमलण्याच्या कल्पनेनं झपाटणं, फुलार, बहरणं, आठवणींचे दवबिंदू पानावरून ओघळले तरी पानांच्या अंगोपांगी असलेलं ओलेपण जपणार्‍या स्मृतीची सहज उलगड जाणारी मालिका म्हणजे नांगरणी. एस. एस. सी. पूर्वीचा काळ यादवांच्या `झोंबी’मध्ये चित्रित झाला आहे. मध्ये त्या पुढील कॉलेज शिक्षणाचा काळ आला आहे. व्यक्तीत्वाचं रोपटं बहरावं म्हणून परिस्थितीच्या मातीची मशागत करताना, संकटाची तण उपटून फेकताना आलेले कडू गोड अनुभव, सहज सुलभ शैलीत मांडण्याचा यशस्वी प्रयत्न लेखकाने केलेला आहे. झोंबीपेक्षा नांगरणीतला लेखकाचा दृष्टीकोन अधिक व्यापक आहे. प्रतिकूल परिस्थितीच्या विरोधात उभा असलेला लेखक हा नांगरणीचा गाभा आहे. सहजसुलभतेने उलगडत जाणारी उत्कट आत्मकथा.....! ‘नांगरणी’तील आंदोलने ही,आपल्या कुटुंबासह आपल्याला माणसासारख्र जगता यावे म्हणून खालच्या सामाजिक स्तरातून वरच्या सामाजिक स्तरात जाऊ पाहणाऱ्यासंवेदनशील तरूण मनाची आहेत. ता.क. त्यांचा आयुष्यप्रवास इतका संघर्षमय पण प्रेरणादायी आहे की त्याच्यावर सुरेख चित्रपट, मालिका अथवा वेबसिरीज बनवता येईल. मध्यंतरी झोंबीवर मराठी चित्रपट ही येणार असल्याची चर्चा ऐकण्यात आली होती. ते खरं असेल तर तो जीवनपट भविष्यातील पुढच्या पिढ्यांना तो एका दिपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक म्हणून पुढे कार्यरत राहिल. डाॅ.आनंद यादव यांची साहित्यसंपदा. कथासंग्रह : खळाळ (१९६७), घरजावई (१९७४), माळावरची मैना (१९७६), आदिताल (१९८०), डवरणी (१९८२), उखडलेली झाडे (१९८६), झाडवाटा (२०००), भूमिकन्या (२००१), शेवटची लढाई (२००२), उगवती मने (२००३). कादंबरी: गोतावळा (१९७१), नटरंग (१९८०), एकलकोंडा(१९८०), माऊली (१९८५), कलेचे कातडे (२००१). आत्मचरित्रात्मक कादंबरी : झोंबी (१९८७), नांगरणी (१९९०), घरभिंती (१९९२), काचवेल (१९९७) , कविता संग्रह: हिरवे जग (१९६०), मळ्याची माती (१९७८) , मायलेकरं(१९८९) हा दीर्घ कवितासंग्रह, ललित साहित्य माती खालची माती (१९६५) - व्यक्तिचित्रसंग्रह स्पर्शकमळे (१९७८), पाणभवरे (१९८२), साहित्यिकाचा गाव(२००४) हे ललित लेखसंग्रह. समीक्षा आणि वैचारिक साहित्य : ग्रामीण साहित्य : स्वरूप आणि समस्या (१९७९), ग्रामीणताः साहित्य आणि वास्तव (१९८१), मराठी साहित्य, समाज आणि संस्कृती (१९८५), साहित्याची निर्मिती प्रक्रिया (१९८९), ललित गद्याचे तात्त्विक स्वरूप आणि मराठी लघुनिबंधाचा इतिहास(१९९५) आत्मचरित्रमीमांसा (१९९८), ग्रामसंस्कृती (२०००) आणि १९६० नंतरची सामाजिक स्थिती आणि साहित्यातील नवे प्रवाह (२००१) अशा अनेक ग्रंथांची नोंद घ्यावी लागेल. मातीतले मोती (निवडक ग्रामीण कथा, १९७०), निळे दिवस (प्रभाकर पाध्ये यांच्या कथा, १९७६), तिसऱ्या पिढीची ग्रामीण कथा (बाबा पाटील यांच्या सहकार्याने, १९८१), बाबुराव जगताप यांच्या आठवणी, माझ्या आठवणी आणि अनुभव (विठ्ठल रामजी शिंदे, १९९९), मराठी ग्रामीण कथा (सहकार्याने, २००२) हे त्यांचे संपादित ग्रंथही लक्षणीय ठरले आहेत. या व्यतिरिक्त महाराष्ट्र साहित्य पत्रिका आणि विचारभारती या नियतकालिकांचे संपादनही त्यांनी केले आहे. संदर्भ : मराठी शब्दकोश , डाॅ. आनंद यादव साहित्य-संपदा. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more

I HAVE A DREAM
I HAVE A DREAM by RASHMI BANSAL Rating Star
Krishna Diwate

‘स्टे हंग्री स्टे फूलीश’ आणि ‘कनेक्ट द डॉटस’ या बेस्ट सेलर पुस्तकाच्या लेखिका ‘समाजातल्या परंपरागत समस्या सोडवण्याचा नवा मार्ग शोधून काढणार्‍या वीस सामाजिक उद्योजकांच्या प्रेरणादायी कहाण्या’ हे वाक्य पुस्तकाचे पहिले पान उघडले आणि दिसले. त्यामुळे माझ कुतुहल चाळवले आणि ते पुस्तक वाचायला सुरुवात केली. मनोगतात लेखिका म्हणतात की, आता नव्या दमाचे, डोक्याने आणि मनाने ही विचार करणारे काही जण एखाद्याच्या नजरेतील दुःख ओळखतात, पेटून उठतात; पण ते त्याच्यावर विचार एखाद्या उद्योजकाप्रमाणे करतात. म्हणून ते ‘सामाजिक उद्योजक.’ नफा मिळविण्याचा हव्यास नसला तरी ते बिझनेस मधील तत्वे वापरून ती गोष्ट साध्य करतात. हे काही तरी वेगळे आपण वाचत आहोत असे मला वाटले. त्यामुळेच ते पुस्तक वाचायला घेतले. ह्या मध्ये वीस लोकांची चरीत्रे आहेत. ते सर्व भारतीय, उच्चशिक्षित तरूण तरूणी आहेत. कोणी त्यातील शास्त्रज्ञ आहेत तर कोणी मरिन बायोलॉजिस्ट, आयआयटी, आयआयएम ग्रॅज्युएट आहेत पण कोणत्या कोणत्या सामाजिक प्रश्नाने ते अस्वस्थ झाले आणि नेहमीच्या मार्गाने न जाता वेगळीच वाट पकडली. पुस्तकात ‘रेनमेकर्स,’ ‘चेंजमेकर्स’ व ‘स्पिरिच्युअल कॅपिटॅलिस्ट’ असे तीन भाग आहेत. प्रत्येकात अनुक्रमे अकरा,सहा व तीन व्यक्तीमत्वांची ओळख करून दिली आहे. ‘सुलभ’ ही आधुनिक टॉयलेटस उभारणारे बिंदेश्वर पाठक ह्याच्या चरित्राने पुस्तकाची सुरुवात होते. जातीने बिहारमधील ब्राह्मण. पण लहानपणी टॉयलेटस साफ करणार्‍याला हात लावला त्यामुळे आजीने अक्षरशः शेण, गोमुत्र खायला लावले. पण त्याच बिंद्रेश्वरांनी अगदी योगायोगाने ह्याच क्षेत्रात काम करण्याचे ठरविले. अर्थात ही वाट निश्चितच सोपी नव्हती. अनेक हालअपेष्टा सोसत, जगाचे धक्के खात, अनेक समस्यांना तोंड देत आपले स्वप्न ‘सुलभ शौचालयाच्या’ माध्यमातून सुरु केले. तो सगळा खडतर प्रवास अर्थात पुस्तकातूनच वाचायला हवा. त्यासाठी त्यांनी केवळ ती यंत्रणा तयार केली नाही तर ती टॉयलेटस बांधून, त्यासाठी लागणारी प्रेरणा, शिक्षण, संभाषण, ट्रेनिंग, पाठपुरावा अशा सर्वच गोष्टी ‘सुलभ’ तर्फेच संभाळल्या जातात. सध्या ही संस्था स्वबळावर चालते. 100 ते 125 कोटी इतके तिचे वर्षाचे उपन्न आहे. इतकेच नाही पूर्वी जे लोक सफाईचे काम करत असत त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च संस्था करत आहे. ‘सुलभ पब्लिक स्कूल’ नावाने शाळा सुरु केली आहे. तरूणांसाठी व्होकेशनल क्लासेस चालवले जातात. म्हणजे मिळालेला नफा पुन्हा त्याच सफाई कामगारांच्या कल्याणासाठी वापरला जातो. टॉयलेटस बांधून भरपूर पैसा मिळवता येतो हे वाक्य पचायला जरा जडच जाते. अनिता आहुजा ही दिल्लीत सुखवस्तू कुटूंबात रहाणारी सामान्य स्त्री. पण कचरा वेचणार्‍या मुलांचे हाल पाहून त्यांच्यासाठी काही तरी करावे असे तिने ठरविले. तिने 1998 मध्ये कॉन्झर्व्ह नावाची संस्था उभी केली. व त्यातून पहिला प्रोजेक्ट सुरु केला तो म्हणजे आजुबाजूच्या परिसरातील कचरा उचलून त्याचे कंपोस्टखत तयार करणे. कचरा गोळा करण्यासाठी चांगल्या ढकलगाड्या आणल्या, युनिफॉर्म, आय कार्डची सोय केली. 2002 पर्यंत एक पूर्ण वेळ काम करणारी मोठी संस्था बनली. त्याचवेळी त्यांनी प्लॅस्टीकच्या कचर्‍यावर प्रयोग सुरु केले. तिचे पती शलभ ह्यांनी बिटस पिलानी मधून इंजिनिअरींग केले आहे. त्यांच्या मदतीने तिने फॅक्टरी सुरु करण्याचे ठरविले. शलभने मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक शीटस निर्मिती करू शकेल असे मशीन तयार केले. त्यासाठी अर्थातच अनेक प्रश्न समोर उभॆ राहिले. चुका झाल्या, ठोकरा खाल्या पण त्यातून वाट काढत त्यांनी चिकाटीने प्रयत्न सुरुच ठेवले. आज दोघे मिळून कचर्‍यातील प्लॅस्टिक पिशव्या वापरून आकर्षक अशा हॅडबॅगस तयार करण्याचा कारखाना चालवतात. जे लोक सुरुवातीला केवळ कचरा उचलण्याचे काम करत होते, त्यांच्या काही कौशल्य दिसले की त्यांना वेगळे काढून ट्रेनिंग दिले जाते. मशीनवर असिस्टंटचे काम करू लागतात त्यातून काही लोक तर ग्रुप लिडर ही झाले आहेत. कटींग करणॆ, क्वालिटी तपासणॆ, फिनिंशींग, पॅकिंग अशी सर्व महत्वाची कामे ते करतात. आता ते कामगार झाल्यामुळॆ त्यांना चांगला पगार, प्रॉव्हिडंट फंड, ओव्हरटाईम अशा सुविधा मिळू लागल्या त्यापेक्षा ही जास्त त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळाली. त्यांच्या साठी हे नवीनच आहे. अनिता व शलभ दोघॆही मेहनत घेतात पण एनजीओ असून ही भरपूर पैसा कमावणे त्यांना चुकीचे वाटत नाही. कारण आज ह्या एका उद्योगामुळे कित्येक कुटूंबाची आर्थिक स्थिती बदलून गेली आहे. अशीच अजून एक प्रेरणादायी कथा दिल्लीतील रंगसूत्र कंपनी चालविणार्‍या सुमिता घोस ह्यांची. स्वतः ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यावर मास्टर इन इकॉनॉमिक्स ची पदवी घेतल्यावर संजॉय घोस ह्या या आय आर एम मधून शिक्षण घेतलेल्या ध्येयवादी तरूणाशी लग्न केले. पण दुर्दैवाने आसाममध्ये काम करत असताना त्यांची 1998 मध्ये उल्फाच्या अतिरेक्यांनी हत्या केली. त्यानंतर अनेक टक्केटोणपे खात, दोन लहान मुलांचा संभाळ करत सुमिताने ‘रंगसूत्र’ नावाची कंपनी काढली. त्याच्या मार्फत ती खॆडॆगावातल्या लोकांकडून कापड, शोभॆच्या वस्तू, बनवून घेते आणि त्या फॅब ईंडीयासारख्या प्रसिध्द कंपन्यांना विकते. जैसलमेर, बारमेर जिल्ह्यातले कारागिर तिच्यासोबत काम करत आहेत. अजून एक अशीच ध्येयवादी तरूणी म्हणजे इशिता खन्ना. डेहराडून मध्ये जन्म झालेली एक सर्वसामान्य मुलगी. पण निसर्गसंवर्धन आणि भूगोल या विषयांची आवड असलेली. म्हणूनच तिने आपल्या ग्रॅज्युएशन नंतर टाटा इंन्स्टीट्यूट मधून मास्टर्स केले. पर्यावरण क्षेत्रातच काम करायचे आहे हे निश्चित ठरवून तिने काही वर्षे नोकरी केली. त्यानंतर 2002 मध्ये नोकरी सोडून आपल्या दोन मित्रांसोबत स्पिती व्हॅलीमध्ये मूस नावाची एन्जीओ सुरु केली. तेथील स्थानिक महिलांचे ग्रुपस करून त्यांना तिथे असणार्‍या सीबक थॉर्न ह्या फळांच्या लागवडीचे ट्रेनिंग दिले. त्यावर प्रक्रिया करायला शिकवले. ही झाडॆ मातीला धरून ठेवतात त्यामुळे धूप रोखली जाते, शिवाय नायट्रोजन ही धरून ठेवत असल्याने जमिनीचा पोत सुधारतो. त्यामुळे ह्या फळांवर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे तिथल्या बायकांना चांगला रोजगार मिळू लागला. त्याचबरोबर तिने स्थानिक तरूणांना पर्यटकांना ट्रेक किंवा जीप सफारीसाठी नेणे, कॅम्प लावणे, गरज पडल्यास प्रथमोपचार करणे ही कामे ही करायला शिकवले. कारण हळूहळू तिथे पर्यटन वाढू लागले. ते इको-फ्रेंडली करण्याकडॆ तिच्या इकोस्पियर संस्थेचा भर आहे. आता दरवर्षी पर्यटनातून 35 ते 40 लाखाचे उत्पन्न मिळते.आणि त्यातून नफा ही मिळतो. इकोस्पियर संस्थेने शेजारच्य़ा ‘लाहुल’ व्हॅलीमध्ये ही विकास कामे सुरु केली आहेत. पर्वतावर तयार होणार्‍या कचर्‍याच्या समस्येवरही तिला काहीतरी करायचे आहे. तिची संस्था लोकांना मुद्दाम तिथले लोक किती अवघड परिस्थितीत रहातात हे दाखवते. अतिशय थंडीत तिथे तापमान मायनस 35 पर्यंत खाली गेल्यावर हॅंडपंपने पाणी काढणे सुध्दा किती कठीण होते हे सांगितले जाते. तेव्हा आपल्यासारख्य़ा पर्यटकांना काय काय करता येईल याबद्दल ती जागरूकता निर्माण करते. मूळात हे पुस्तक 2012 साली लिहिलेले आहे. त्यामुळे आता ह्या वेगवेगळ्या प्रकारचे काम करणार्‍या संस्थेचे काम या दहा वर्षात खूपच वाढले असेल यात काही शंका नाही. दीनबंधू साहू हे मरिन बायोलॉजिस्ट आहेत पण ते प्रयोगशाळेतून बाहेर पडून समाजासाठी काम करतात. ‘प्रोजेक्ट चिलका’ ह्या त्यांच्या संस्थेमार्फत ओरिसातील लोकांना समुद्राची शेती करायला शिकवतात. ओरिसा मधील पुरी येथे जन्म झालेल्या दीनबंधूनी अतिशय हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेतल्यानंतर दिल्लीत एमएसीला ॲडमिशन घेतली. परंतु योगायोगाने १९८७ मध्ये अंटार्क्टिक वर जाण्याची संधी मिळाली. नंतर पीएचडी पूर्ण केल्यानंतर अनेक देशांमध्ये नोकरी निमित्ताने फिरले. पण तरीही शेवटी दिल्ली युनिव्हर्सिटी मध्ये प्रोफेसर म्हणून काम सुरू केले. त्यांना समुद्री वनस्पती बद्दल विशेष आस्था होती; पण त्या बद्दल आपल्या देशात फारशी जागरूकता नव्हती. ही लागवड पर्यावरण पूरक असते शिवाय त्यातून स्थानिक लोकांना उत्पन्नाचे साधन मिळते. त्यासाठी डिएसटीने निधी मंजूर केला. मग त्यांनी चिल्का सरोवराची पहाणी केली, त्यामध्ये वाढू शकतील अशा चार जातींची निवड करून स्थानिक लोकांना समजेल अशा सोप्या भाषेत माहिती दिली. प्रात्यक्षिके दाखवली, वर्कशॉप्स घेतली. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना रोजगार मिळू लागला. यातूनच पर्यावरण संरक्षण ही होऊ लागले. यातून त्यांना प्रत्यक्ष कांहीं आर्थिक फायदा होत नसला तरी ते म्हणतात, की आम्हाला दोघांना दिल्लीत चांगली नोकरी आहे. त्यामुळे पैसे कमावणे हा उद्देश नाही; पण अजून तीस वर्षांनंतर मला मी काही तरी काम केलेले दिसेल. असे जर काहीच तुम्हाला दिसणार नसेल तर जगायचे कशाला? भूषण पुनानी हे असेच अत्यंत बुध्दीमान विद्यार्थी. मेडीकलची ॲडमिशन हुकल्यामुळे डेअरी कोर्ससाठी ॲडमिशन घेतली. तिथे ही विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविला. नंतर पीएचडी केले. ग्रामविकास शिकण्यासाठी आयआयएम मध्ये एमबीए केले. हे झाल्यावर 1979 मध्ये ब्लाईंड स्कूल मध्ये दोन वर्षांसाठी नोकरी सुरु केली ती सुधा ह्याच हेतूने की मॅनेजमेंट शिकताना जी थेअरी शिकलो ती विकासाच्या क्षेत्रात वापरता येईल का? हळूहळू त्यांना अनेक लोक मिळत गेले. सर्वांनी मिळून आज संस्था खूप मोठी केली आहे.त्यांनी काम सुरु केले तेव्हा फक्त एक कॅपस होता, आज गुजरात मध्ये आठ कॅपस आहेत. दहा लाख मूल्य असलेली संस्था आज दोन कोटी रुपयांची आहे. अपंग लोकांनी स्वावलंबी व्हावे ह्यासाठी संस्था काम करते. दृष्टीहीन मुली ब्यूटी पार्लरसारखे कोर्स चालवतात, फिजिओथेरपी शिकून सेंटर मध्ये काम करतात. विकास साधण्यासाठी योग्य व्यवस्थापनेची गरज असते हे त्यांनी दाखवून दिले आहे. हजारो लोकांच्या आयुष्यात नवा प्रकाश निर्माण करून त्यांना सामान्य आयुष्य जगण्याची संधी मिळवून दिली आहे. अशी ही एकापेक्षा एक वेगवेगळ्या प्रकारची माणसे. कोणत्या तरी ध्येयाने पछाडलेली . सामाजिक कार्य करत असतानाच त्या लोकांचे कल्याण कसे होईल असा विचार करणारी. लेखिकेने त्या सर्वांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या आहेत, त्यांचे काम प्रत्यक्ष पाहून जाणून घेतले आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित गोळा करून आपल्यासमोर मांडली आहे. त्यामुळेच त्या मनोगतात म्हणतात, ‘तुमचं आयुष्य कसे ही असले तरी इतरांसाठी एखादा क्षण द्या. इतरांना प्रेम, आनंद, चांगुलपण द्या. जितकं द्याल तितकं तुम्हाला परत मिळेल.’ हेच वाक्य मलाही अतिशय उर्जा देऊन गेले. माझ्याकडे जे आहे, जे मला देणे शक्य आहे ते निरपेक्षपणे ज्यांना गरज आहे त्याला देणे ह्या सारखा आनंद अजून काय असणार? ह्याच वाक्याने मी आपली ह्या आठवड्यात रजा घेते. उद्या पासून सुरु होणार्‍या नवीन सत्रासाठी सारिका ताईंना हार्दिक शुभेच्छा. ...Read more