* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: MALYACHI MATI
  • Availability : Available
  • ISBN : 9788171612642
  • Edition : 4
  • Publishing Year : 1978
  • Weight : 100.00 gms
  • Pages : 120
  • Language : MARATHI
  • Category : POEMS
  • Available in Combos :ANAND YADAV COMBO SET-33 BOOKS
    KISAN DIWAS OFFER
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
LIKE SIMILES AND METAPHORS, YADAVS POEMS SPEAK THE LANGUAGE OF IMAGERY. THENCE IS BORN A ROBUST POEM LIKE SAPNA PADTYAAT. CLODS OF EARTH FIND FEET, TURN THEIR BACKS AND START WALKING. THEY ACQUIRE EYES LIKE THE LUSTROUS, MOIST ONES OF BULLOCKS. WITHIN HIDES A STORY. THE CLODS CANNOT SPEAK, SO THEY SHED SILENT TEARS THROUGH SHUT EYES. YADAVS POETRY DOES NOT REVEAL THE ANGST BROUGHT ON BY HARDSHIPS AND POVERTY; NOR HAS IT TAKEN BIRTH TO DISPLAY THE PENURIOUS AND POVERTYSTRICKEN VILLAGE LIFE FOR ALL TO SEE, IN THE NAME OF SOCIAL AWARENESS. RATHER, THE TRAVAILS AND TRAGEDIES OF THAT LIFE ARE AS MUCH A PART OF HIS EXPERIENCES, AS ARE THE BEAUTY OF THE LUSCIOUS, SWAYING FIELDS FULL OF GRAIN, AND THE FEELINGS AND LIVES OF THOSE HARDWORKING FOLK. AND THEREFORE ONE GETS A GENUINE AND PROPER INSIGHT INTO RURAL LIFE THROUGH THIS SMALL COLLECTION OF POEMS. ANURADHA POTDAR.
उपमारूपकांप्रमाणे यादवांची कविता प्रतिमांच्या भाषेत बोलू लागते. आणि मग ‘सपनं पडत्यात’ सारखी समर्थ कविता निर्माण होते. रानातल्या ढेकळांना पाय फुटून ती गुमान पाठमोरी होऊन चालू लागतात. त्यांनाही बैलाच्या पाण्याने भरलेल्या डोळ्यांसारखे डोळे फुटतात. त्यात एक कहाणी भरलेली असते. जिभा पुटत नाहीत म्हणून बापडी ढेकळंही डोळे मिटून पाणी गाळतात. खडतर दारिद्र्याच्या अनुभवानेही यादवांची कविता जशी विखारलेली नाही, तशीच सामाजिकतेच्या सहेतुक वाटेने, खेड्यातील दैन्यदारिद्र्याचं दुखणं वेशीवर टांगण्यासाठीही ती जन्मलेली नाही. शेतमळ्यातील तरारून वर आलेल्या पिकाच्या रसरसत्या सौंदर्याप्रमाणेच, त्यात जगणाऱ्या, राबणाऱ्या माणसांच्या भावभावना, सुखदु:ख आणि त्याचं दारिद्र्य हेही सारं त्यांच्या अनुभवाचं अविभाज्य अंग आहे. म्हणून या छोटेखानी संग्रहातही ग्रामीण जीवनाचं एक अस्सल आणि सम्यक्दर्शन घडत आहे. –अनुराधा पोतदार

No Records Found
No Records Found
Keywords
#झोंबी #(महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार १९८८-८९) #(महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार १९८८-८९) #(दि फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स -उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार १९८९) #(मारवाडी संमेलन पुरस्कार १९९०) # (साहित्य अकादमी पुरस्कार १९९०) #(प्रवरानगर - विखेपाटील पुरस्कार १९९१) #(संजीवनी साहित्य पुरस्कार, कोपरगाव १९९४) # नांगरणी # (रोहमारे ग्रामीण पुरस्कार १९९०) #घरभिंती #काचवेल #माऊली # (कालीमाता साहित्य पुरस्कार १९८६ #परिमल लेखन पुरस्कार १९८६ # नटरंग #(महाराष्ट्र राज्य पुरस्कार १९८२) # गोतावळा # शेवटची लढाई #(राज्य पुरस्कार २००१-०२) #भूमिकन्या #झाडवाटा # उगवती मने #(राज्य पुरस्कार २००२-०३) # आदिताल # डवरणी #माळावरची मैना # घरजावई #खळाळ #उखडलेली झाडं #सैनिक हो, तुमच्यासाठी... #मळ्याची माती #मायलेकरं #साहित्यिकाचा गाव #मातीखालची माती #स्पर्शकमळे #पाणभवरे #साहित्यिक जडण-घडण # ग्रामसंस्कृती #(रा. ना. सबनीस वाङ्मयपुरस्कार २००२) # मराठी लघुनिबंधाचा इतिहास #साहित्याची निर्मिती प्रक्रिया #ग्रामीणता : साहित्य आणि वास्तव आत्मचरित्र मीमांसा #"ग्रामीण साहित्य : स्वरूप व समस्या #(राज्य पुरस्कार १९८३) # मराठी साहित्य - समाज आणि संस्कृती #१९६० नंतरची सामाजिक स्थिती आणिसाहित्यातील नवे प्रवाह # डॉ. आनंद यादव - एक साहित्यिक प्रवास #ZOMBI #NANGARNI #GHARBHINTI #KACHVEL #MAULI #NATRANG #GOTAVALA #SHEVATCHI LADHAI #BHUMIKANYA #ZADVATA #UGVATI MANE #AADITAL #DAVARNI #MALAVARCHI MAINA #GHARJAWAI #KHALAL #UKHADLELI ZADE #SAINIK HO TUMACHYASATHI #MALYACHI MATI #MAI LEKARA #SAHITYIKACHA GAON #MATIKHALCHI MATI #SPARSHKAMALE #PANBHAVARE #SAHITYIK JADAN-GHADAN #GRAMSANSKRUTI #MARATHI LAGHUNIBANDHACHA ITIHAS #SAHITYACHI NIRMITI PRAKRIYA #GRAMINTA SAHITYA ANI VASTAV #AATMACHARITRA MIMANSA #GRAMIN SAHITYA : SWARUP ANI SAMASYA #1960 NANTARCHI SAMAJIK STHITI ANI SAHITYATEEL NAVE PRAVAH #DR. ANAND YADAV EK SAHITYIK PRAVAS
Customer Reviews
  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    अस्सल मराठी जीवनाचे चित्र... नुसत्या अनुकरणांतच अडकून बसलेल्या आणि वाढ खुंटलेल्या आजकालच्या अनेक कविता वाचताना मनाला जाणवणारा शिळेपणा आनंद यादव ह्यांच्या ताज्यातवान्या दमदार कवितेने क्षणार्धात दूर झाल्यावाचून राहणार नाही. एकाएकी शेतमातीच्या गंधाने गंगवून सोडणारी, बोराबाभळींन्या रानांतून भुलवत नेणारी त्यांची ग्रामीण कविता मळ्याची माती हे सार्थ नाव धारण करून नव संग्रहरूपाने एकत्रित झाली आहे. शेतात रात्रंदिस राबणारा, निढळाच्या घामाने काळी आई भिजविणारा, आपले इमान खडतर दारिद्र्यांतही सांभाळणारा शेतकरी, त्याची प्रेमळ, भोळी, कष्टाळू घरधनीण आणि त्यांच्या भोवतालचे हिरवे जग हेच आनंद यादव ह्यांच्या कवितेचे विश्व. त्यांची रांगडी बोली हीच यादवांच्या कवितेची भाषा. त्या बोलींतला खडेपणा त्यांनी जसाच्या तसा उचलून आपल्या कवितेसाठी एक मुक्त, धावती, पण लयबद्ध रचना स्वीकारली आहे. तिच्यांत गद्याचा कणखरपणा आहे आणि काव्यांतले माधुर्यही आहे. बोली भाषेतला जिवंतपणा गद्याचा कणखरपणा आहे आणि काव्यांतले माधुर्यही आहे. बोली भाषेतला जिवंतपणा आला आहे. इतका की प्रत्येक कविता जणु श्री. यादव स्वत: आपणाला ऐकवताहेत की काय असा भास व्हावा. प्रत्येक कविता तिला लाभलेल्या गतीमुळे, तिच्या आटोपशीरपणामुळे, तिच्यातल्या जिव्हाळ्यामुळे, वाचतांक्षणीच मनाचा ठाव घेणारी झाली आहे. श्री. यादव ह्यांना जे जीवन रंगवावयाचे आहे ते जीवन म्हणजे अविरत श्रमाची एक हृदयस्पर्शी कहाणी आहे. अर्धपोटी राहून पोराच्या पोटासाठी घाम काढून ठेवणाऱ्या कंगाल शेतकरी राजाचे ते जीवन आहे. तिथे धनी धनिणीला सांगतो- मला नगं अता भाकरी आताच प्यालोय मी पाणी तूंच खा पोट भरूनशान धानचं मूल हाय सोन्यावाणी गुढीपाडव्याच्या सणाला घरांत गोडधोड करायला गहू डाळ नसते. अशावेळी शेतातली वांगी चोरून ती भटा-बामणाच्या घरी विकायला धनी धनिणीकडे देतो आणि म्हणतो - ‘आज हाच गुडीचा पाडवा येतील त्या पैशांची आण गहू-डाळ कर हुतील त्या चार पोळ्या खाईल तेवढंच पोर-बाळ’ धण शेवटी आपण मात्र कणीकोंडाच खाऊन दिवस काढू असेही तिला सांगायला विसरत नाही. (आणि केलेल्या चोरीचा पस्तावाही व्यक्त केल्याशिवाय राहू शकत नाही.) शेतकऱ्यालाही वाटते की आपल्या मुलाबाळांना शिकवावे, ‘पर मागं पोटापाण्याचं सदा न कदा लागतंय पिस’ जो तो पोट भरायच्या कामी लागला म्हणजे तेवढीच चिंता मिटली. कारण ‘न्हेतावं दीस कसंतरी ढकलत आहो, आमच्या नशिबी शेणाचीच पाटी.’ आपला बाळ शिकला सवरला तरी त्यानं पटका धोतरच नेसावे असं शेतकऱ्याला वाटत असते. ‘कुळवाडी आम्ही लोक कशाला रं ते इजार ? थोडक्याच डोसक्यानं रूप दिसतंय मुंडरं’ गौरीच्या सणाला एखादा खण कारभारणीला घ्यायचा हवा असतो ती उरल्यासुरल्या पैशांचा हिशोब अण्याआण्याने करून नवऱ्याची विनवणी करून म्हणते, ‘असा हाय दीड रुपया ठेवल्याला उतरंडीला सोन्यासारखा सण आलाय चोळी एक घे ये दंडाला ! अशा आपत्तींतून दिवस ढकलीत नेत असतांना एकच वैभव ह्या दरिद्री शेतकरी राजाच्या झोपडीत शिल्लक उरलेले असते आणि ते म्हणजे नवराबायकोचे एकमेकांवरचे प्रेम. तेवढ्यातल्या तेवढ्यांत ती एकमेकांन जपत असतात. एकमेकांनी असेल तो कणीकोंडा पोटभर खावा म्हणून एकमेकींची आर्जवे करतात. धनीण धन्याला म्हणते - ‘हळूंच उचला तळची भाकर आणि तिच्या पापडाखालचं लोणी, सांडगं खावा अगुदर. -ठावं नाही कुणाला गुपीत’ त्या उभयतांच्या ‘गावरान’ प्रेमाचं वर्णन श्री. यादव किती मिठास शब्दांत करतात पहा- ‘पेंगणाऱ्या आंब्याच्या सावलीत घोंगड्यावर बसल्यात राजा-राणी दोघांच्या पुढ्यांत हाय पडल्याली धोतराच्या फडक्यांत भाकरी चटणी बसल्यात घेत जणू रामसीता वनवासातले मनाजोगे सूख जुंधळया-मिरचीच्या कोरड्या कोंढ्यांत तरण्या प्रीतीचं मिसळलेल अमृत’ ‘पानाचा इडा’, ‘पातळ’, ‘नाद मोटंचा ऐकून’, ‘उसटं पाणी’ ह्या कवितांतून असा प्रीतीचा गोडवा प्रत्ययाला येतो तर ‘व्रत’सारख्या कवितेंतून त्या प्रीतीच्या व्रतांतली आगही चटका लावीत जाते. ‘वाटंवरल्या जुंधळ्यांत’ ह्या कवितेंत आणीबाणीचा प्रसंग येताच पायाची वहाण उचलून कडाडत उठणारी बाणेदार शेतकरीण विजेसारखी चमकून जाते. ज्या हिरव्या जगाच्या पार्श्वभूमीवर श्री. यादव ह्यांचा कुळवाडी उभा आहे ते हिरवे जग कसे आहे ? ‘कसं हाय हे हिरवं जग ! किती दिसतंय गुलजार ! लांबनंच बघताना डोळं भरून जीव हुतोय सुखानं बेजार !’ पण त्या हिरव्या जगाची जोपासना शेतकऱ्यांना आपलं रक्त आणि घाम गाळून केलेली आहे हेही बजावून सांगायला ते विसरत नाहीत. ‘भूईमुगाच्या गार गार जाळया, ही रसरसलेली गाजरे ही पिकवितांना जाव्यात तोंडात मातीचं तोबरं’ कधी चांदणे पडते, कधी कणसे धरतात, कधी थंडीतली पहाट उगवते, कधी उन्हाळ्यांत जमीन सुकू लागते आणि शेतकऱ्याला पावसाची ओढ लागते - ते सारे दिवस श्री. यादव ह्यांच्या कवितेत मूर्तिमंत उभे राहिलेले दिसतात. पावसाच्या आणभाकेंतले कारूण्य आणि शेतं पिकल्यावर फुललेला आनंद ते सारख्याच सराईतपणे टिपून घेतात. त्यांचा निसर्गही शेतकऱ्याचे जीवन जगत असताना दिसतो. दमू घरी परत आलेली रात्र काळ्या पदराआडून चांदचिमणी आणते. मातीच्या घागरीतल्या गार गार पाण्यासारखी थंडी पडते आणि नदीकाठावर पांढरी पहाट धोतर नेसून न्हालेल्या गरतीसारखी उपसांत असलेली आढळते. हिरवी झालेली धरणी पावणा यायच्या वेळी ठेवणीतले लुगडे नेसल्यासारखी दिसते. थंडीच्या दिवसांतल्या एका टिपूर चांदण्या रात्रीचे वर्णन तर नुसते वाचतच रहावे. ‘ढामणं गत वाट पडलीया सरळ हिरव्या उंच गवतातनं काजूकड लिकलिकत्यांत चमचकीच्या ठिगण्यागत वरनं’ श्री. यादव ह्यांच्या कवितेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या कवितेत निव्वळ कारूण्य किंवा निव्वळ आनंद नाही तर दोहोंची सरमिसळ होऊन संपन्न झालेले अस्सल जीवनाचे संपूर्ण चित्र उभं केलेलं दिसते. तेही अस्सल मराठी चित्र ! मराठी कवितेच्या वैभवात आनंद यादव ह्यांनी नि:संशय श्रेयस्कर भर घातली आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

A-AMITABHCHA
A-AMITABHCHA by G.B. DESHMUKH Rating Star
प्रा. डॉ . वैशाली रवी देशमुख, अमरावती

वाचनाचे फायदे सांगताना प्रसिद्ध इंग्रजी लेखक फ्रान्सिस बेकन म्हणतो `रीडिंग मेकेथ अ फुल मॅन`. वाचनामुळे माणूस परिपूर्ण होतो. क्वचित एखादं असं पुस्तक हाती येतं जे वाचल्यानंतर ह्या परिपूर्णतेची , आत्यंतिक समाधानाची जाणीव होते . नुकतंच जी. बी. देशुख यांचं `अ- अमिताभचा` हे पुस्तक हाती पडलं एका बैठकीत ते वाचून संपवलं आणि काहीतरी माहितीपर तरीही दर्जेदार आणि साहित्यिक मूल्य असणारं पुस्तक वाचण्याचा आनंद प्राप्त झाला. सीमा आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात काम करून निवृत्त झालेल्या जीबी देशमुखांनी २०२० मध्ये अमिताभ बच्चनच्या कारकिर्दीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त त्यांच्या विविध ५० सिनेमातील भूमिकांचे विश्लेषण करणारे साप्ताहिक सदर दैनिक सकाळ मध्ये प्रकाशित केले. कोरोना काळात लिहिलेल्या या लेखमालेला त्यावेळी प्रचंड प्रतिसाद मिळाला. केवळ ज्येष्ठच नाही तर तरुण वाचकांनीही या लेखमालिकेला पसंतीची पावती दिली. २०२२ मध्ये मेहता पब्लिकेशनने अमिताभ बच्चनच्या एकूण ६२ सिनेमांवर आधारित लेख `अ अमिताभचा` या पुस्तक रूपाने प्रकाशित केले. १९६९ पासून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीला पाच दशकांपेक्षा अधिक काळ लोटला तरीही त्याचे सिनेरसिकांच्या भावविश्वावर असलेले अधिराज्य कायम आहे. ती जादू कमी ओसरण्याचं नावच घेत नाही तर ती दिवसेंदिवस वाढत आहे . किरकोळ शरीरयष्टी, भरमसाठ उंची आणि सौंदर्याच्या साचेबंद व्याख्येत न बसणारा चेहरा असलेला अमिताभ आणि त्याला मिळालेली अफाट लोकप्रियता याची सांगड घालणे सर्वसामान्य व्यक्तीच्या आकलनापलीकडचे आहे. अमिताभ बच्चनचे प्रचंड चाहते असलेले जी . बी देशमुख यांच्यासाठी `अ` हा अमिताभचाच आहे. परंतु केवळ एक चाहते म्हणून त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं नाही तर अमिताभ बच्चनचे जे गारुड कित्येक दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर आहे त्यामागची नेमकी कारणे कोणती असू शकतात हे अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने शोधण्याचा प्रयत्न त्यांनी या पुस्तकात केलेला आहे. एक रसिक, चोखंदळ प्रेक्षक, अभ्यासक आणि समीक्षक म्हणून या पुस्तकात लेखक आपल्या समोर येतात. `बेमिसाल` पासून `झुंड` या चित्रपटा पर्यंत अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीतील उत्तमोत्तम ६२ सिनेमांचा लेखकांनी या पुस्तकात परामर्ष घेतलेला आहे. या चित्रपटांमधील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित सर्व बाबींचे अत्यंत अभ्यास पूर्वक रसग्रहण केलेले आहे. `अमिताभ बच्चन चांगला कलाकार आहे` किंवा `अमुक अमुक चित्रपट चांगला आहे` असं जेव्हा एखादा सर्वसामान्य प्रेक्षक म्हणतो त्यावेळेस हे आवडणं किंवा चांगलं असणं नेमकं का आहे याची उत्तरं देण्याचा प्रयत्न लेखकाने प्रत्येक लेखात केलेला आहे. प्रत्येक चित्रपटातील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित हायलाइट्स जसे की, एखादा उत्कट प्रसंग, गाणे, नृत्य, मारामारीचे दृश्य यावर लेखकाने प्रकाश टाकलेला आहे. आपण जर तो चित्रपट पाहिला असेल तर लेखकाने वर्णन केलेले प्रसंग जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहतात आणि बघितला नसेल तर तो चित्रपट आपण पाहिलाच पाहिजे अशी तीव्र इच्छा मनात निर्माण होते. उदाहरणार्थ, शोले या चित्रपटातील रसग्रहणात ,चेहऱ्यावरचे रेषाही ढळू न देता अमिताभने फेकलेले वन लाइनर्स, बुद्धीची चमक दाखवणारे शांतपणे केलेले विनोद, हळुवार प्रेमासाठी त्याचं आतल्या आत झुरणं , मित्राच्या मांडीवर प्राणत्यागाचे उत्कट दृश्य, आणि पिढ्यानपिढ्या लक्षात राहिलेला मावशी लीला मिश्रा सोबतचा विनोदी संवाद यांचे परिणामकारक वर्णन करून त्यांनी अमिताभची उत्तुंग अभिनय क्षमता उलगडून दाखवली आहे. या पुस्तकाला वाचनीय बनवणारा एक घटक म्हणजे लेखकाने वापरलेली भाषा. अत्यंत साध्या, सोप्या आणि अनुभवातून आलेल्या शब्दातून लेखकाने अमिताभ बच्चन भूमिकांचा उत्तरोत्तर चढत जाणारा आलेख शब्दांकित केला आहे. लेखकाच्या भाषा प्रभुत्वाचे साक्ष देणारी अनेक वाक्य पुस्तकांमध्ये जागजागी आढळतात. एका ठिकाणी ते लिहितात, `अमिताभने सिनेमातील विनोदाची सूत्र हाती घेतली तेव्हापासून विनोदी कलाकारांवर जणू बेकारीचं संकट कोसळलं होतं. प्रेक्षकांना दिलेल्या मनोरंजनाच्या वचनाशी `नमक हलाली` करणाऱ्या प्रकाश मेहरा आणि अमिताभ या जोडीने प्रेक्षकांना `और हम नाचे बिन घुंगरू के` असा आनंद दिला होता. असेच एक सुंदर वाक्य- `अमिताभचा उंट मनोरंजनाचा अख्खा तंबू व्यापून बसला होता`. लेखकाच्या ओघवत्या आणि मनाला भिडणाऱ्या भाषा शैलीचं एक उदाहरण मिली चित्रपटाच्या रसग्रहणातील या परिषदेतून दिसून येत: "शेखरच्या मनावर चढलेली उदासीची पुटं अमिताभच्या कसदार अभिनयामुळे आपल्याला अस्वस्थ,उदास करून सोडतात. दारूच्या नशेतील अमिताभचं एक दृश्य मस्त जमलं होतं . मोबाईल, टीव्ही इत्यादी आधुनिक साधनं व्यवहारात येण्याच्या आधीचा तो काळ होता. मिली आजारामुळे घरात बंदिस्त झाल्यानंतर त्या दोघात नोकराच्या माध्यमातून जो पत्र व्यवहार होतो तो आजच्या मोबाईल चॅटिंग पेक्षाही प्रभावी वाटतो. रोज मिलीला वरच्या मजल्यावरून खालच्या मजल्यावर गुलदस्ता पाठवणारा अमिताभ एका चिठ्ठीत लिहितो `जो गुलदस्ता बनके खुद आ जाऊ तो कहा रखुं . ` हे रोमँटिसिझम खूप वरच्या स्तराचं होतं. अमर्याद दुःखाची वीण घट्ट करत जाताना किशोर कुमारच्या दर्दभऱ्या स्वरात `बडी सुनी, सुनी है जिंदगी ये जिंदगी` आणि `आये तुम याद मुझे गाने लगी हर धडकन` ही दोन गाणी वातावरण औदासिन्यानं भरून टाकतात. मनाचा चांगला पण लहानपणी आई वडिलांच्या बाबतीत घडलेल्या घटनेने आणि लोकांनी त्याकरिता डिवचल्यानं कच खाल्लेला, प्रेमाची आस लागलेला एक तरुण अमिताभने लाजवाब रंगवला होता. या पुस्तकाच्या रंजकतेत भर टाकणारा आणखी एक घटक म्हणजे लेखकाचे आत्मचरित्रात्मक निवेदन. प्रत्येक चित्रपटाच्या बाबतीत तो चित्रपट त्यांनी केव्हा पाहिला, कुणाबरोबर पाहिला,त्यावेळी ते किती वर्षांचे होते आणि त्या चित्रपटाचा त्यांच्या भावविश्वावर कसा परिणाम झाला याचा उल्लेख जागजागी केलेला आहे. लेखकाच्या पिढीतील वाचकांना यातून पुनः प्रत्ययाचा आनंद मिळतो. आणि आजच्या पिढीतील इतर वाचकांसाठीही ही बाब रंजक ठरते. पुस्तकाच्या मलपृष्ठावर लेखक म्हणतात, `1973 साली आम्ही पाचवीत असताना आम्हाला प्रथमच हिंदी सिनेमातील नायकाची `ये पोलीस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नही`, अशी आगळीवेगळी मिजास पडद्यावर बघायला मिळाली आणि आता निवृत्तीला आलो तर हाच अद्भुत माणूस आम्हाला `पिंक` या महिलाप्रधान सिनेमात `ना का मतलब सिर्फ ना होता है`, असं ठणकावतो, `बदला` ह्या रहस्यपटात तितक्याच जोरकसपणे `सबका सच अलग अलग होता है ,` असं तत्वज्ञान मांडतो आणि अगदी अलीकडच्या `झुंड` मध्ये झोपडपट्टीतील धटिंगण मुलांच्या घोळक्याला `झुंड नाही, टीम... `म्हणायची शिकवण देतो तेव्हा आजही त्याचं म्हणणं आमच्या हृदयात थेट उतरतं .` पुस्तक वाचत असताना लेखकाच्या अफाट निरीक्षणशक्तीचे आणि अभ्यासू वृत्तीचे दर्शन घडते . विविध दिग्दर्शकांनी अमिताभच्या अभिनयक्षमतेचा केलेला वापर , अमिताभच्या डोळ्यातून सशक्तपणे व्यक्त झालेले हृदयस्पर्शी भाव, वेगवेगळ्या चित्रपटात त्याने केलेला लाथेचा उपयोग, त्याची वैशिष्ट्यपूर्ण नृत्य, आणि भारदस्त आवाजातील संवाद आणि गाणी यांचं वर्णन वाचत असताना लेखकाची संशोधक वृत्ती तर जाणवतेच परंतु आपणही हे चित्रपट पाहून हा रसास्वाद घ्यायलाच हवा ही इच्छा वाचकांच्या मनात प्रकर्षाने निर्माण होते.यातच या पुस्तकाचे फार मोठे यश सामावले आहे हे नक्की! ...Read more

SAAD GHALATO KALAHARI
SAAD GHALATO KALAHARI by MARK & DELIA OWENS Rating Star
मोहन देशपांडे नागपुर

cry of kalahari ह्या पुस्तके अनुवाद हिंदी सर्वोत्तम (RD) मध्ये कित्येक वर्षापूर्वी वाचले होते. माझ्याजवळ, जपून ठेवलेल्या पुस्तकामधे ते पुस्तक गहाळ झाले. मग 4 वर्षापूर्वी हे पुस्तक मिळाले व विकत घेतले. ते अनेक वेळा वाचून काढले, तरी प्रत्येकवेळी वेगळा नंद होतो. ती तुमची रसाळ भाषेची किमया. ह्या मुळेच Deceiption valley एकदा तरी बघता यावी ही इच्छा तुमचे अभिनंदन व धन्यवाद... ...Read more