* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177665932
  • Edition : 9
  • Publishing Year : AUGUST 1992
  • Weight : 500.00 gms
  • Pages : 552
  • Language : MARATHI
  • Category : AUTOBIOGRAPHY
  • Available in Combos :ANAND YADAV COMBO SET-33 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS IS AN EXCLUSIVE PIECE OF LITERATURE IN THE MARATHI WORLD. IT INCISIVELY REVEALS THE CUTTHROAT COMPETITION AND THE CAMPAIGN DURING THE DAYTO DAY LIFE, REMINDING ABOUT THE MILITANCY OF `MAHABHARAT`. THIS IS A REPRESENTATIVE YET PECULIAR STORY OF A RURAL MIDDLE CLASS FAMILY.THIS IS A STORY OF THE DESPERATE FIGHT OF A YOUNG, SENSITIVE MIND AGAINST THE INESCAPABLE, RELENTLESS FINANCIAL SUFFERINGS.IT IS A STORY OF HIS EFFORTS TO COME OUT OF THE LABYRINTH SUCCESSIVELY WITH THE HELP OF SCANTY EDUCATIONAL FACILITIES. THIS IS YET ANOTHER NOVEL AFTER `ZOMBI`, WOVEN WITH THE STRONG WEFTS AND WARPS, PRESENTING THE UNBELIEVABLE WORST RURAL ADVERSITIES.IT IS VERY GENUINE. THIS IS AN AUTOBIOGRAPHY, YET IT PERFECTLY REVEALS THE DIRECTION IN WHICH THE FUTURE RURAL LITERATURE IS LEADING.IT SUCCESSFULLY EXPLORES THE INS AND OUTS OF THE RURAL LIFE.
मराठी साहित्याचा मोलाचा ठेवा ठरावा, अशी ही साहित्यकृती! आजच्या जनसामान्यांच्या दैनंदिन जीवनातही महाभारतसदृश संघर्षपूर्ण घटना केवळ अस्तित्वासाठी घडत असतात, याचे वास्तवपूर्ण, भेदक दर्शन म्हणजे घरभिंती. ग्रामीण समाजाच्या सर्वसाधारण स्तरातील कुटुंबाची ही प्रातिनिधिक तरीही वैशिष्ट्यपूर्ण कहाणी. जन्मप्राप्त, अटळ, जीवघेण्या आर्थिक हलाखीचा चक्रव्यूह भेदून बाहेर पडण्यासाठी केवळ काही शैक्षणिक सुविधांच्या तुटपुंज्या आधारावर एका तरुण, संवेदनशील मनाने दिलेला निकराचा पण यशस्वी लढा, हा या घरभिंतीचा गाभा! ‘झोंबी’ ते ‘घरभिंती’ या प्रवासपटातून प्रभावीपणे ग्रामीण जीवनाचे उभेआडवे ताणेबाणे प्रथमच त्यांतील खया छेदाभेदासकट विस्तृत प्रमाणात साहित्यरूपाने साकार होतात. त्यामुळे अंतर्बाह्य विस्तृतपणे वेध घेणारी ही आत्मचरित्रकथा ग्रामीण साहित्याच्या उद्याच्या प्रवासाची अचूक दिशा प्रभावीपणे दाखविते. – गो. म. कुलकर्णी

No Records Found
No Records Found
Keywords
#झोंबी #(महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार १९८८-८९) #(महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार १९८८-८९) #(दि फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स -उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार १९८९) #(मारवाडी संमेलन पुरस्कार १९९०) # (साहित्य अकादमी पुरस्कार १९९०) #(प्रवरानगर - विखेपाटील पुरस्कार १९९१) #(संजीवनी साहित्य पुरस्कार, कोपरगाव १९९४) # नांगरणी # (रोहमारे ग्रामीण पुरस्कार १९९०) #घरभिंती #काचवेल #माऊली # (कालीमाता साहित्य पुरस्कार १९८६ #परिमल लेखन पुरस्कार १९८६ # नटरंग #(महाराष्ट्र राज्य पुरस्कार १९८२) # गोतावळा # शेवटची लढाई #(राज्य पुरस्कार २००१-०२) #भूमिकन्या #झाडवाटा # उगवती मने #(राज्य पुरस्कार २००२-०३) # आदिताल # डवरणी #माळावरची मैना # घरजावई #खळाळ #उखडलेली झाडं #सैनिक हो, तुमच्यासाठी... #मळ्याची माती #मायलेकरं #साहित्यिकाचा गाव #मातीखालची माती #स्पर्शकमळे #पाणभवरे #साहित्यिक जडण-घडण # ग्रामसंस्कृती #(रा. ना. सबनीस वाङ्मयपुरस्कार २००२) # मराठी लघुनिबंधाचा इतिहास #साहित्याची निर्मिती प्रक्रिया #ग्रामीणता : साहित्य आणि वास्तव आत्मचरित्र मीमांसा #"ग्रामीण साहित्य : स्वरूप व समस्या #(राज्य पुरस्कार १९८३) # मराठी साहित्य - समाज आणि संस्कृती #१९६० नंतरची सामाजिक स्थिती आणिसाहित्यातील नवे प्रवाह # डॉ. आनंद यादव - एक साहित्यिक प्रवास #ZOMBI #NANGARNI #GHARBHINTI #KACHVEL #MAULI #NATRANG #GOTAVALA #SHEVATCHI LADHAI #BHUMIKANYA #ZADVATA #UGVATI MANE #AADITAL #DAVARNI #MALAVARCHI MAINA #GHARJAWAI #KHALAL #UKHADLELI ZADE #SAINIK HO TUMACHYASATHI #MALYACHI MATI #MAI LEKARA #SAHITYIKACHA GAON #MATIKHALCHI MATI #SPARSHKAMALE #PANBHAVARE #SAHITYIK JADAN-GHADAN #GRAMSANSKRUTI #MARATHI LAGHUNIBANDHACHA ITIHAS #SAHITYACHI NIRMITI PRAKRIYA #GRAMINTA SAHITYA ANI VASTAV #AATMACHARITRA MIMANSA #GRAMIN SAHITYA : SWARUP ANI SAMASYA #1960 NANTARCHI SAMAJIK STHITI ANI SAHITYATEEL NAVE PRAVAH #DR. ANAND YADAV EK SAHITYIK PRAVAS
Customer Reviews
  • Rating StarSambhaji Sadamate

    झोंबी, नांगरणी नंतरचे आनंद यादव यांचे आत्मचरित्र म्हणजे घरभिंती .... खरतर.... मध्यम वर्गीय माणसाच्या सुखाच्या संकल्पना काय असतात? चांगलं शिक्षण घेऊन उत्तम नोकरी मिळावी... भौतिक सुख सुविधांनी युक्त टुमदार घर बांधावं... सुंदर मुलीशी विवाह करून घ बाळगोपाळांनी भरून जावं... बहुतांशी हीच मध्यमवर्गीय माणसांची सुखाची संकल्पना असते.. याच सुख स्वप्नांच्या परिपूर्ती साठी माणूस रात्रंदिवस शारीरिक किंवा बौद्धिक काम करीत असतो. या योगाने माणूस आपले जीवन समृद्ध बनवून समाजात आपले वेगळे अस्तित्व सिद्ध करत असतो.. अशी स्वप्न उराशी बाळगून सुखदुःखाचे चटके खात परिस्थितीशी दोन हात करीत कागल सारख्या खेड्यात लहानाचे मोठे झालेल्या या गाव खेड्याच्या शेती मातीची नाळ मराठी साहित्याशी जोडून शेती मातीत राबणाऱ्यांच्या वेदना.. संवेदना.. ग्रामीण मराठी साहित्य या नवप्रवाह द्वारे मांडून दुर्लक्षित गाव खेड्यातील माणसांच्या जगण्याला बळ देणारे एकमेवादित्य ग्रामीण साहित्यिक म्हणजे.आनंद यादव.... यांच्या आत्मचरित्राचा तिसरा भाग म्हणजे घरभिंती लौकिकार्थाने एम. ए.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या पंढरपूर कॉलेजमधून प्राध्यापकाच्या नोकरीची सुरुवात कशी झाली यानंतर कागल मधील घराच्या गळणाऱ्या छताला.. भग्न घरभिंतीला.. कसं नवरूप दिलं या घरातील आई-दादा चार बहिणी तीन भाऊ यांना मळा पिकवण्यासाठी कशी मदत केली आणि याच दरम्यान पंढरपूरची नोकरी सोडून सारस्वतांच् माहेरघर तथा साहित्य पंढरी म्हणून सर्व परिचित असणाऱ्या पुण्यामध्ये प्राध्यापकाची नोकरी स्वीकारून आपली वाड़मयीन आवड कशी जोपासली व वाढवली याचं समर्पक सुंदर वर्णन या आत्मचरित्रा मध्ये त्यांनी केले आहे नोकरी लागल्यानंतर फक्त दहावीपर्यंत शिकलेल्या स्मिताशी त्यांनी विवाह केला, कागलातील कुटुंबाची जबाबदारी सांभाळत स्मिताला पुढील शिक्षण देऊन पुण्यामध्ये स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी त्यांनी केलेल्या अपार मेहनतीचे समर्पक वर्णन यामध्ये आहे. त्यांची वांडंमयीन आवड पुण्यातील व गावाकडील घरप्रपंचाची जबाबदारी त्यातून ते करीत असलेले प्राध्यापकाची नोकरी पुण्यामध्ये लहानाच्या मोठ्या होत असलेल्या मुली स्वाती व कीर्ती यांच्या पालकत्वाची जबाबदारी.. स्मिताला नोकरी लागल्यानंतर त्यांच्या पुण्यातील कुटुंबाची होत असलेली परवड.. राखेतून फिनिक्स पक्ष्याप्रमाणे उंच भरारी घ्यावी त्याप्रमाणे साहित्य पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्याच्या साहित्य क्षेत्रामध्ये स्वतःचं साहित्यिक वलय निर्माण करून गोतावळा, पाचोळा ,नटरंग, खळाळ या व अन्य साहित्य कृती कशा निर्माण केल्या याच भावस्पर्शी वाचकांना भावनाप्रधान बनवून वाचण्यास भाग पाडणारे हे आत्मचरित्र आहे खरं तर माणसाचं जीवन सुखाने भरलेला पेला नसून कर्तव्याने भरलेले माप आहे.. हे वास्तव सिद्ध करणारे हे आत्मचरित्र आहे धनधान्यान मोटचाड्यांन आणि गाडीबैलांन नांगर कुळवन भरलेलं घर.. दादाच्या ,आईच्या, लहान भावंडांच्या राबणाऱ्या हातांनी फुललेला त्यांचा मळा..तोंडचा घास काढून घ्यावा तसा शासनाने केलेले नवीन कुळ कायद्यामुळे हातचा निघून जातो हे दादांना सहन होत नाही तो सर्व काम धंदा सोडून निराश होऊन बसून राहतो... सर्वांवर मोलमजुरी ची वेळ येते, याही स्थितीमध्ये उंचआकाशात घिरट्या घालणाऱ्या घारीचे लक्ष घरट्यातील तिच्या पिल्लांकडे असते त्याच प्रमाणे घराची वाताहात झाली असता पुण्यात नोकरी करीत असताना लेखकांनी दुसरा मळा कसा खरेदी केला व घराला उभारी देण्यासाठी त्यांची झालेली परवड सुंदर रीतीने यामध्ये मांडली आहे. खेडवळ वळणाची आई व उच्च शिक्षित लेखकांमध्ये उडणारे शाब्दिक खटके यांचे वर्णन समर्पक ग्रामीण बोलीचा वापर करून केलेले असल्याने यामध्ये एक प्रकारची वातावरण निर्मिती लेखकांनी सुंदर साधली आहे वादळात ज्याप्रमाणे दिवा तेवत राहावा त्याप्रमाणे लेखकांनी या प्रतिकूल जीवन संघर्षांमध्ये सुद्धा आपली साहित्यिक आवड जोपासून बेजोड साहित्यकृती निर्माण केल्या त्याचं बरोबर शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पीएचडी पदवी कशी संपादन केली याच समर्पक वर्णन या आत्मचरित्रात असल्याने हे आत्मचरित्र म्हणजे घराला घरपण प्राप्त करून देणाऱ्या एका गाव खेड्यातील बुद्धिजीवी तरुणाची यशोगाथा म्हणल्यास वावगे ठरणार नाही... ...Read more

  • Rating StarAaditya Vishwasrao

    गेले ४ दिवस ही ५४५ पाने अक्षरशः मनाची घालमेल करील होती. ` झोंबी ` मधला आंदु एस.एस.सी पुढे नांगरणी मध्ये एम.ए पर्यंत शिक्षण पूर्ण करत प्राध्यापक होतो आणि प्रसंगी रक्ताच पाणी करून कष्टणाऱ्या आंदूचा प्राध्यापक पदी आनंदराव होतो. ` घरभिंती ` हे नंद यादव ह्यांच्या आत्म चरित्राचा ३ रा भाग . झोंबी व नांगरणी वाचून झाल्यावर नकळतच लेखकाच्या पुढील जीवनाची अनामक हुरहूर लागली त्यामुळे नांगरणी वाचून झाल्यावर लगेच घरभिंती ला हात घातला . झोंबी मध्ये आनंद यादव ह्यांच्या एस.एस.सी पर्यंत चा काळ आलेला , पुढे नांगरणी मध्ये एम.ए होऊन पंढरपूर ल प्राध्यापक पदी नियुक्त होण्यापर्यंत काळ अनुभवला. घरभिंती मध्ये लेखक आनंद यादव ह्यांच्या संसाराची वेल बहरून आली आहे आणि लेखकांचा वाङमयीन विकास व साहित्यिक होण्यापर्यंत चा सुख- दुःख मिश्रित असा काळ आला आहे . स्वतःचा संसार फुलवण्या बरोबरच , गावाकडे २४ तास हाडं उगळून कष्ट सोसत संसाराचा गाडा ओढणारी आई, नुकताच तारुण्यात पदार्पण केलेला शिवा , शिक्षणासाठी धडपडणारे आप्पा आणि दौलत , लग्न होऊन सुद्धा नवऱ्यानं सोडली म्हणून माहेरी आलेली हिरा , मनात नवी स्वप्न उमलू पाहणारी धोंडू बाई या सर्वांचा संसार कसा सुरळीत करायचा याची स्वप्न बघणारा आनंद मनाला भिडतो. आई - वडील ह्यांच्यातील सततची भांडणं , तारुण्यापायी भान गमावून व्यसनात अडकलेला शिवा ह्यांची चीड येते तर दुसरीकडे आई चं दुसरं लग्न झाल्यामुळे आजोळी येऊन पडलेली फुला , नवऱ्यानं सोडल तरीही त्याच्या नावाचं कुंकू लावणारी नाळरोगी, सुजरी - फुगरी हिरा अस्वस्थ करून सोडते. हिराची आत्महत्या , वडिलांचा मृत्यु तर नकळतपणे डोळ्यांच्या पाणकडा ओलावून जाते इतक्या कठीण प्रसंगात सुद्धा लेखकांचा घराला आवरण्याचा प्रयत्न परंतु प्रत्येक वेळी आलेली निराशा वाचकाला च हतबल करते. एवढ्यात ही पुण्यात उमलू पाहणारी लेखकांची संसार वेल त्यावर फुलंनारी फुलं, आप्पा , दौलत ह्यांचं होणारं शिक्षण मनाला सुखकर करून जात. हे पुस्तक खरं तर एक Roller Coaster ची राईड आहे. क्षणात सुखाचे चढाव तर क्षणार्धात दुःखाची खोलच खोल दरी वाचकाला ग्रामीण जीवनातील समस्यांचा घडवून देते. ग्रामीण जीवनाचा पडदा डोळ्यांसमोर उभं करून जाणारं हे पुस्तक कठीण काळातसुद्धा जगण्याची उमेद न सोडता कसं लढत राहावं ह्यांची शिकवण देऊन जातं ...Read more

  • Rating StarSambhaji Desai

    4 hi part khupch chaan aahet ..... mi vachalet ....aanand yadav -jakate tyanch purn naav ....he atmcharitra ek jaganyachi navi umed deun jaat....khupch chaan aahe . jarur wacha

  • Rating StarPopatrao Yamgar

    आवर्जून वाचावे असे पुस्तक

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more