* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: GHARBHINTI
  • Availability : Available
  • ISBN : 9788177665932
  • Edition : 9
  • Publishing Year : AUGUST 1992
  • Weight : 500.00 gms
  • Pages : 552
  • Language : MARATHI
  • Category : AUTOBIOGRAPHY
  • Available in Combos :ANAND YADAV COMBO SET-33 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS IS AN EXCLUSIVE PIECE OF LITERATURE IN THE MARATHI WORLD. IT INCISIVELY REVEALS THE CUTTHROAT COMPETITION AND THE CAMPAIGN DURING THE DAYTO DAY LIFE, REMINDING ABOUT THE MILITANCY OF `MAHABHARAT`. THIS IS A REPRESENTATIVE YET PECULIAR STORY OF A RURAL MIDDLE CLASS FAMILY.THIS IS A STORY OF THE DESPERATE FIGHT OF A YOUNG, SENSITIVE MIND AGAINST THE INESCAPABLE, RELENTLESS FINANCIAL SUFFERINGS.IT IS A STORY OF HIS EFFORTS TO COME OUT OF THE LABYRINTH SUCCESSIVELY WITH THE HELP OF SCANTY EDUCATIONAL FACILITIES. THIS IS YET ANOTHER NOVEL AFTER `ZOMBI`, WOVEN WITH THE STRONG WEFTS AND WARPS, PRESENTING THE UNBELIEVABLE WORST RURAL ADVERSITIES.IT IS VERY GENUINE. THIS IS AN AUTOBIOGRAPHY, YET IT PERFECTLY REVEALS THE DIRECTION IN WHICH THE FUTURE RURAL LITERATURE IS LEADING.IT SUCCESSFULLY EXPLORES THE INS AND OUTS OF THE RURAL LIFE.
मराठी साहित्याचा मोलाचा ठेवा ठरावा, अशी ही साहित्यकृती! आजच्या जनसामान्यांच्या दैनंदिन जीवनातही महाभारतसदृश संघर्षपूर्ण घटना केवळ अस्तित्वासाठी घडत असतात, याचे वास्तवपूर्ण, भेदक दर्शन म्हणजे घरभिंती. ग्रामीण समाजाच्या सर्वसाधारण स्तरातील कुटुंबाची ही प्रातिनिधिक तरीही वैशिष्ट्यपूर्ण कहाणी. जन्मप्राप्त, अटळ, जीवघेण्या आर्थिक हलाखीचा चक्रव्यूह भेदून बाहेर पडण्यासाठी केवळ काही शैक्षणिक सुविधांच्या तुटपुंज्या आधारावर एका तरुण, संवेदनशील मनाने दिलेला निकराचा पण यशस्वी लढा, हा या घरभिंतीचा गाभा! ‘झोंबी’ ते ‘घरभिंती’ या प्रवासपटातून प्रभावीपणे ग्रामीण जीवनाचे उभेआडवे ताणेबाणे प्रथमच त्यांतील खया छेदाभेदासकट विस्तृत प्रमाणात साहित्यरूपाने साकार होतात. त्यामुळे अंतर्बाह्य विस्तृतपणे वेध घेणारी ही आत्मचरित्रकथा ग्रामीण साहित्याच्या उद्याच्या प्रवासाची अचूक दिशा प्रभावीपणे दाखविते. – गो. म. कुलकर्णी

No Records Found
No Records Found
Keywords
#झोंबी #(महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार १९८८-८९) #(महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार १९८८-८९) #(दि फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स -उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार १९८९) #(मारवाडी संमेलन पुरस्कार १९९०) # (साहित्य अकादमी पुरस्कार १९९०) #(प्रवरानगर - विखेपाटील पुरस्कार १९९१) #(संजीवनी साहित्य पुरस्कार, कोपरगाव १९९४) # नांगरणी # (रोहमारे ग्रामीण पुरस्कार १९९०) #घरभिंती #काचवेल #माऊली # (कालीमाता साहित्य पुरस्कार १९८६ #परिमल लेखन पुरस्कार १९८६ # नटरंग #(महाराष्ट्र राज्य पुरस्कार १९८२) # गोतावळा # शेवटची लढाई #(राज्य पुरस्कार २००१-०२) #भूमिकन्या #झाडवाटा # उगवती मने #(राज्य पुरस्कार २००२-०३) # आदिताल # डवरणी #माळावरची मैना # घरजावई #खळाळ #उखडलेली झाडं #सैनिक हो, तुमच्यासाठी... #मळ्याची माती #मायलेकरं #साहित्यिकाचा गाव #मातीखालची माती #स्पर्शकमळे #पाणभवरे #साहित्यिक जडण-घडण # ग्रामसंस्कृती #(रा. ना. सबनीस वाङ्मयपुरस्कार २००२) # मराठी लघुनिबंधाचा इतिहास #साहित्याची निर्मिती प्रक्रिया #ग्रामीणता : साहित्य आणि वास्तव आत्मचरित्र मीमांसा #"ग्रामीण साहित्य : स्वरूप व समस्या #(राज्य पुरस्कार १९८३) # मराठी साहित्य - समाज आणि संस्कृती #१९६० नंतरची सामाजिक स्थिती आणिसाहित्यातील नवे प्रवाह # डॉ. आनंद यादव - एक साहित्यिक प्रवास #ZOMBI #NANGARNI #GHARBHINTI #KACHVEL #MAULI #NATRANG #GOTAVALA #SHEVATCHI LADHAI #BHUMIKANYA #ZADVATA #UGVATI MANE #AADITAL #DAVARNI #MALAVARCHI MAINA #GHARJAWAI #KHALAL #UKHADLELI ZADE #SAINIK HO TUMACHYASATHI #MALYACHI MATI #MAI LEKARA #SAHITYIKACHA GAON #MATIKHALCHI MATI #SPARSHKAMALE #PANBHAVARE #SAHITYIK JADAN-GHADAN #GRAMSANSKRUTI #MARATHI LAGHUNIBANDHACHA ITIHAS #SAHITYACHI NIRMITI PRAKRIYA #GRAMINTA SAHITYA ANI VASTAV #AATMACHARITRA MIMANSA #GRAMIN SAHITYA : SWARUP ANI SAMASYA #1960 NANTARCHI SAMAJIK STHITI ANI SAHITYATEEL NAVE PRAVAH #DR. ANAND YADAV EK SAHITYIK PRAVAS
Customer Reviews
  • Rating StarSambhaji Sadamate

    झोंबी, नांगरणी नंतरचे आनंद यादव यांचे आत्मचरित्र म्हणजे घरभिंती .... खरतर.... मध्यम वर्गीय माणसाच्या सुखाच्या संकल्पना काय असतात? चांगलं शिक्षण घेऊन उत्तम नोकरी मिळावी... भौतिक सुख सुविधांनी युक्त टुमदार घर बांधावं... सुंदर मुलीशी विवाह करून घ बाळगोपाळांनी भरून जावं... बहुतांशी हीच मध्यमवर्गीय माणसांची सुखाची संकल्पना असते.. याच सुख स्वप्नांच्या परिपूर्ती साठी माणूस रात्रंदिवस शारीरिक किंवा बौद्धिक काम करीत असतो. या योगाने माणूस आपले जीवन समृद्ध बनवून समाजात आपले वेगळे अस्तित्व सिद्ध करत असतो.. अशी स्वप्न उराशी बाळगून सुखदुःखाचे चटके खात परिस्थितीशी दोन हात करीत कागल सारख्या खेड्यात लहानाचे मोठे झालेल्या या गाव खेड्याच्या शेती मातीची नाळ मराठी साहित्याशी जोडून शेती मातीत राबणाऱ्यांच्या वेदना.. संवेदना.. ग्रामीण मराठी साहित्य या नवप्रवाह द्वारे मांडून दुर्लक्षित गाव खेड्यातील माणसांच्या जगण्याला बळ देणारे एकमेवादित्य ग्रामीण साहित्यिक म्हणजे.आनंद यादव.... यांच्या आत्मचरित्राचा तिसरा भाग म्हणजे घरभिंती लौकिकार्थाने एम. ए.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या पंढरपूर कॉलेजमधून प्राध्यापकाच्या नोकरीची सुरुवात कशी झाली यानंतर कागल मधील घराच्या गळणाऱ्या छताला.. भग्न घरभिंतीला.. कसं नवरूप दिलं या घरातील आई-दादा चार बहिणी तीन भाऊ यांना मळा पिकवण्यासाठी कशी मदत केली आणि याच दरम्यान पंढरपूरची नोकरी सोडून सारस्वतांच् माहेरघर तथा साहित्य पंढरी म्हणून सर्व परिचित असणाऱ्या पुण्यामध्ये प्राध्यापकाची नोकरी स्वीकारून आपली वाड़मयीन आवड कशी जोपासली व वाढवली याचं समर्पक सुंदर वर्णन या आत्मचरित्रा मध्ये त्यांनी केले आहे नोकरी लागल्यानंतर फक्त दहावीपर्यंत शिकलेल्या स्मिताशी त्यांनी विवाह केला, कागलातील कुटुंबाची जबाबदारी सांभाळत स्मिताला पुढील शिक्षण देऊन पुण्यामध्ये स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी त्यांनी केलेल्या अपार मेहनतीचे समर्पक वर्णन यामध्ये आहे. त्यांची वांडंमयीन आवड पुण्यातील व गावाकडील घरप्रपंचाची जबाबदारी त्यातून ते करीत असलेले प्राध्यापकाची नोकरी पुण्यामध्ये लहानाच्या मोठ्या होत असलेल्या मुली स्वाती व कीर्ती यांच्या पालकत्वाची जबाबदारी.. स्मिताला नोकरी लागल्यानंतर त्यांच्या पुण्यातील कुटुंबाची होत असलेली परवड.. राखेतून फिनिक्स पक्ष्याप्रमाणे उंच भरारी घ्यावी त्याप्रमाणे साहित्य पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्याच्या साहित्य क्षेत्रामध्ये स्वतःचं साहित्यिक वलय निर्माण करून गोतावळा, पाचोळा ,नटरंग, खळाळ या व अन्य साहित्य कृती कशा निर्माण केल्या याच भावस्पर्शी वाचकांना भावनाप्रधान बनवून वाचण्यास भाग पाडणारे हे आत्मचरित्र आहे खरं तर माणसाचं जीवन सुखाने भरलेला पेला नसून कर्तव्याने भरलेले माप आहे.. हे वास्तव सिद्ध करणारे हे आत्मचरित्र आहे धनधान्यान मोटचाड्यांन आणि गाडीबैलांन नांगर कुळवन भरलेलं घर.. दादाच्या ,आईच्या, लहान भावंडांच्या राबणाऱ्या हातांनी फुललेला त्यांचा मळा..तोंडचा घास काढून घ्यावा तसा शासनाने केलेले नवीन कुळ कायद्यामुळे हातचा निघून जातो हे दादांना सहन होत नाही तो सर्व काम धंदा सोडून निराश होऊन बसून राहतो... सर्वांवर मोलमजुरी ची वेळ येते, याही स्थितीमध्ये उंचआकाशात घिरट्या घालणाऱ्या घारीचे लक्ष घरट्यातील तिच्या पिल्लांकडे असते त्याच प्रमाणे घराची वाताहात झाली असता पुण्यात नोकरी करीत असताना लेखकांनी दुसरा मळा कसा खरेदी केला व घराला उभारी देण्यासाठी त्यांची झालेली परवड सुंदर रीतीने यामध्ये मांडली आहे. खेडवळ वळणाची आई व उच्च शिक्षित लेखकांमध्ये उडणारे शाब्दिक खटके यांचे वर्णन समर्पक ग्रामीण बोलीचा वापर करून केलेले असल्याने यामध्ये एक प्रकारची वातावरण निर्मिती लेखकांनी सुंदर साधली आहे वादळात ज्याप्रमाणे दिवा तेवत राहावा त्याप्रमाणे लेखकांनी या प्रतिकूल जीवन संघर्षांमध्ये सुद्धा आपली साहित्यिक आवड जोपासून बेजोड साहित्यकृती निर्माण केल्या त्याचं बरोबर शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पीएचडी पदवी कशी संपादन केली याच समर्पक वर्णन या आत्मचरित्रात असल्याने हे आत्मचरित्र म्हणजे घराला घरपण प्राप्त करून देणाऱ्या एका गाव खेड्यातील बुद्धिजीवी तरुणाची यशोगाथा म्हणल्यास वावगे ठरणार नाही... ...Read more

  • Rating StarAaditya Vishwasrao

    गेले ४ दिवस ही ५४५ पाने अक्षरशः मनाची घालमेल करील होती. ` झोंबी ` मधला आंदु एस.एस.सी पुढे नांगरणी मध्ये एम.ए पर्यंत शिक्षण पूर्ण करत प्राध्यापक होतो आणि प्रसंगी रक्ताच पाणी करून कष्टणाऱ्या आंदूचा प्राध्यापक पदी आनंदराव होतो. ` घरभिंती ` हे नंद यादव ह्यांच्या आत्म चरित्राचा ३ रा भाग . झोंबी व नांगरणी वाचून झाल्यावर नकळतच लेखकाच्या पुढील जीवनाची अनामक हुरहूर लागली त्यामुळे नांगरणी वाचून झाल्यावर लगेच घरभिंती ला हात घातला . झोंबी मध्ये आनंद यादव ह्यांच्या एस.एस.सी पर्यंत चा काळ आलेला , पुढे नांगरणी मध्ये एम.ए होऊन पंढरपूर ल प्राध्यापक पदी नियुक्त होण्यापर्यंत काळ अनुभवला. घरभिंती मध्ये लेखक आनंद यादव ह्यांच्या संसाराची वेल बहरून आली आहे आणि लेखकांचा वाङमयीन विकास व साहित्यिक होण्यापर्यंत चा सुख- दुःख मिश्रित असा काळ आला आहे . स्वतःचा संसार फुलवण्या बरोबरच , गावाकडे २४ तास हाडं उगळून कष्ट सोसत संसाराचा गाडा ओढणारी आई, नुकताच तारुण्यात पदार्पण केलेला शिवा , शिक्षणासाठी धडपडणारे आप्पा आणि दौलत , लग्न होऊन सुद्धा नवऱ्यानं सोडली म्हणून माहेरी आलेली हिरा , मनात नवी स्वप्न उमलू पाहणारी धोंडू बाई या सर्वांचा संसार कसा सुरळीत करायचा याची स्वप्न बघणारा आनंद मनाला भिडतो. आई - वडील ह्यांच्यातील सततची भांडणं , तारुण्यापायी भान गमावून व्यसनात अडकलेला शिवा ह्यांची चीड येते तर दुसरीकडे आई चं दुसरं लग्न झाल्यामुळे आजोळी येऊन पडलेली फुला , नवऱ्यानं सोडल तरीही त्याच्या नावाचं कुंकू लावणारी नाळरोगी, सुजरी - फुगरी हिरा अस्वस्थ करून सोडते. हिराची आत्महत्या , वडिलांचा मृत्यु तर नकळतपणे डोळ्यांच्या पाणकडा ओलावून जाते इतक्या कठीण प्रसंगात सुद्धा लेखकांचा घराला आवरण्याचा प्रयत्न परंतु प्रत्येक वेळी आलेली निराशा वाचकाला च हतबल करते. एवढ्यात ही पुण्यात उमलू पाहणारी लेखकांची संसार वेल त्यावर फुलंनारी फुलं, आप्पा , दौलत ह्यांचं होणारं शिक्षण मनाला सुखकर करून जात. हे पुस्तक खरं तर एक Roller Coaster ची राईड आहे. क्षणात सुखाचे चढाव तर क्षणार्धात दुःखाची खोलच खोल दरी वाचकाला ग्रामीण जीवनातील समस्यांचा घडवून देते. ग्रामीण जीवनाचा पडदा डोळ्यांसमोर उभं करून जाणारं हे पुस्तक कठीण काळातसुद्धा जगण्याची उमेद न सोडता कसं लढत राहावं ह्यांची शिकवण देऊन जातं ...Read more

  • Rating StarSambhaji Desai

    4 hi part khupch chaan aahet ..... mi vachalet ....aanand yadav -jakate tyanch purn naav ....he atmcharitra ek jaganyachi navi umed deun jaat....khupch chaan aahe . jarur wacha

  • Rating StarPopatrao Yamgar

    आवर्जून वाचावे असे पुस्तक

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more

I HAVE A DREAM
I HAVE A DREAM by RASHMI BANSAL Rating Star
Krishna Diwate

‘स्टे हंग्री स्टे फूलीश’ आणि ‘कनेक्ट द डॉटस’ या बेस्ट सेलर पुस्तकाच्या लेखिका ‘समाजातल्या परंपरागत समस्या सोडवण्याचा नवा मार्ग शोधून काढणार्‍या वीस सामाजिक उद्योजकांच्या प्रेरणादायी कहाण्या’ हे वाक्य पुस्तकाचे पहिले पान उघडले आणि दिसले. त्यामुळे माझ कुतुहल चाळवले आणि ते पुस्तक वाचायला सुरुवात केली. मनोगतात लेखिका म्हणतात की, आता नव्या दमाचे, डोक्याने आणि मनाने ही विचार करणारे काही जण एखाद्याच्या नजरेतील दुःख ओळखतात, पेटून उठतात; पण ते त्याच्यावर विचार एखाद्या उद्योजकाप्रमाणे करतात. म्हणून ते ‘सामाजिक उद्योजक.’ नफा मिळविण्याचा हव्यास नसला तरी ते बिझनेस मधील तत्वे वापरून ती गोष्ट साध्य करतात. हे काही तरी वेगळे आपण वाचत आहोत असे मला वाटले. त्यामुळेच ते पुस्तक वाचायला घेतले. ह्या मध्ये वीस लोकांची चरीत्रे आहेत. ते सर्व भारतीय, उच्चशिक्षित तरूण तरूणी आहेत. कोणी त्यातील शास्त्रज्ञ आहेत तर कोणी मरिन बायोलॉजिस्ट, आयआयटी, आयआयएम ग्रॅज्युएट आहेत पण कोणत्या कोणत्या सामाजिक प्रश्नाने ते अस्वस्थ झाले आणि नेहमीच्या मार्गाने न जाता वेगळीच वाट पकडली. पुस्तकात ‘रेनमेकर्स,’ ‘चेंजमेकर्स’ व ‘स्पिरिच्युअल कॅपिटॅलिस्ट’ असे तीन भाग आहेत. प्रत्येकात अनुक्रमे अकरा,सहा व तीन व्यक्तीमत्वांची ओळख करून दिली आहे. ‘सुलभ’ ही आधुनिक टॉयलेटस उभारणारे बिंदेश्वर पाठक ह्याच्या चरित्राने पुस्तकाची सुरुवात होते. जातीने बिहारमधील ब्राह्मण. पण लहानपणी टॉयलेटस साफ करणार्‍याला हात लावला त्यामुळे आजीने अक्षरशः शेण, गोमुत्र खायला लावले. पण त्याच बिंद्रेश्वरांनी अगदी योगायोगाने ह्याच क्षेत्रात काम करण्याचे ठरविले. अर्थात ही वाट निश्चितच सोपी नव्हती. अनेक हालअपेष्टा सोसत, जगाचे धक्के खात, अनेक समस्यांना तोंड देत आपले स्वप्न ‘सुलभ शौचालयाच्या’ माध्यमातून सुरु केले. तो सगळा खडतर प्रवास अर्थात पुस्तकातूनच वाचायला हवा. त्यासाठी त्यांनी केवळ ती यंत्रणा तयार केली नाही तर ती टॉयलेटस बांधून, त्यासाठी लागणारी प्रेरणा, शिक्षण, संभाषण, ट्रेनिंग, पाठपुरावा अशा सर्वच गोष्टी ‘सुलभ’ तर्फेच संभाळल्या जातात. सध्या ही संस्था स्वबळावर चालते. 100 ते 125 कोटी इतके तिचे वर्षाचे उपन्न आहे. इतकेच नाही पूर्वी जे लोक सफाईचे काम करत असत त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च संस्था करत आहे. ‘सुलभ पब्लिक स्कूल’ नावाने शाळा सुरु केली आहे. तरूणांसाठी व्होकेशनल क्लासेस चालवले जातात. म्हणजे मिळालेला नफा पुन्हा त्याच सफाई कामगारांच्या कल्याणासाठी वापरला जातो. टॉयलेटस बांधून भरपूर पैसा मिळवता येतो हे वाक्य पचायला जरा जडच जाते. अनिता आहुजा ही दिल्लीत सुखवस्तू कुटूंबात रहाणारी सामान्य स्त्री. पण कचरा वेचणार्‍या मुलांचे हाल पाहून त्यांच्यासाठी काही तरी करावे असे तिने ठरविले. तिने 1998 मध्ये कॉन्झर्व्ह नावाची संस्था उभी केली. व त्यातून पहिला प्रोजेक्ट सुरु केला तो म्हणजे आजुबाजूच्या परिसरातील कचरा उचलून त्याचे कंपोस्टखत तयार करणे. कचरा गोळा करण्यासाठी चांगल्या ढकलगाड्या आणल्या, युनिफॉर्म, आय कार्डची सोय केली. 2002 पर्यंत एक पूर्ण वेळ काम करणारी मोठी संस्था बनली. त्याचवेळी त्यांनी प्लॅस्टीकच्या कचर्‍यावर प्रयोग सुरु केले. तिचे पती शलभ ह्यांनी बिटस पिलानी मधून इंजिनिअरींग केले आहे. त्यांच्या मदतीने तिने फॅक्टरी सुरु करण्याचे ठरविले. शलभने मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक शीटस निर्मिती करू शकेल असे मशीन तयार केले. त्यासाठी अर्थातच अनेक प्रश्न समोर उभॆ राहिले. चुका झाल्या, ठोकरा खाल्या पण त्यातून वाट काढत त्यांनी चिकाटीने प्रयत्न सुरुच ठेवले. आज दोघे मिळून कचर्‍यातील प्लॅस्टिक पिशव्या वापरून आकर्षक अशा हॅडबॅगस तयार करण्याचा कारखाना चालवतात. जे लोक सुरुवातीला केवळ कचरा उचलण्याचे काम करत होते, त्यांच्या काही कौशल्य दिसले की त्यांना वेगळे काढून ट्रेनिंग दिले जाते. मशीनवर असिस्टंटचे काम करू लागतात त्यातून काही लोक तर ग्रुप लिडर ही झाले आहेत. कटींग करणॆ, क्वालिटी तपासणॆ, फिनिंशींग, पॅकिंग अशी सर्व महत्वाची कामे ते करतात. आता ते कामगार झाल्यामुळॆ त्यांना चांगला पगार, प्रॉव्हिडंट फंड, ओव्हरटाईम अशा सुविधा मिळू लागल्या त्यापेक्षा ही जास्त त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळाली. त्यांच्या साठी हे नवीनच आहे. अनिता व शलभ दोघॆही मेहनत घेतात पण एनजीओ असून ही भरपूर पैसा कमावणे त्यांना चुकीचे वाटत नाही. कारण आज ह्या एका उद्योगामुळे कित्येक कुटूंबाची आर्थिक स्थिती बदलून गेली आहे. अशीच अजून एक प्रेरणादायी कथा दिल्लीतील रंगसूत्र कंपनी चालविणार्‍या सुमिता घोस ह्यांची. स्वतः ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यावर मास्टर इन इकॉनॉमिक्स ची पदवी घेतल्यावर संजॉय घोस ह्या या आय आर एम मधून शिक्षण घेतलेल्या ध्येयवादी तरूणाशी लग्न केले. पण दुर्दैवाने आसाममध्ये काम करत असताना त्यांची 1998 मध्ये उल्फाच्या अतिरेक्यांनी हत्या केली. त्यानंतर अनेक टक्केटोणपे खात, दोन लहान मुलांचा संभाळ करत सुमिताने ‘रंगसूत्र’ नावाची कंपनी काढली. त्याच्या मार्फत ती खॆडॆगावातल्या लोकांकडून कापड, शोभॆच्या वस्तू, बनवून घेते आणि त्या फॅब ईंडीयासारख्या प्रसिध्द कंपन्यांना विकते. जैसलमेर, बारमेर जिल्ह्यातले कारागिर तिच्यासोबत काम करत आहेत. अजून एक अशीच ध्येयवादी तरूणी म्हणजे इशिता खन्ना. डेहराडून मध्ये जन्म झालेली एक सर्वसामान्य मुलगी. पण निसर्गसंवर्धन आणि भूगोल या विषयांची आवड असलेली. म्हणूनच तिने आपल्या ग्रॅज्युएशन नंतर टाटा इंन्स्टीट्यूट मधून मास्टर्स केले. पर्यावरण क्षेत्रातच काम करायचे आहे हे निश्चित ठरवून तिने काही वर्षे नोकरी केली. त्यानंतर 2002 मध्ये नोकरी सोडून आपल्या दोन मित्रांसोबत स्पिती व्हॅलीमध्ये मूस नावाची एन्जीओ सुरु केली. तेथील स्थानिक महिलांचे ग्रुपस करून त्यांना तिथे असणार्‍या सीबक थॉर्न ह्या फळांच्या लागवडीचे ट्रेनिंग दिले. त्यावर प्रक्रिया करायला शिकवले. ही झाडॆ मातीला धरून ठेवतात त्यामुळे धूप रोखली जाते, शिवाय नायट्रोजन ही धरून ठेवत असल्याने जमिनीचा पोत सुधारतो. त्यामुळे ह्या फळांवर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे तिथल्या बायकांना चांगला रोजगार मिळू लागला. त्याचबरोबर तिने स्थानिक तरूणांना पर्यटकांना ट्रेक किंवा जीप सफारीसाठी नेणे, कॅम्प लावणे, गरज पडल्यास प्रथमोपचार करणे ही कामे ही करायला शिकवले. कारण हळूहळू तिथे पर्यटन वाढू लागले. ते इको-फ्रेंडली करण्याकडॆ तिच्या इकोस्पियर संस्थेचा भर आहे. आता दरवर्षी पर्यटनातून 35 ते 40 लाखाचे उत्पन्न मिळते.आणि त्यातून नफा ही मिळतो. इकोस्पियर संस्थेने शेजारच्य़ा ‘लाहुल’ व्हॅलीमध्ये ही विकास कामे सुरु केली आहेत. पर्वतावर तयार होणार्‍या कचर्‍याच्या समस्येवरही तिला काहीतरी करायचे आहे. तिची संस्था लोकांना मुद्दाम तिथले लोक किती अवघड परिस्थितीत रहातात हे दाखवते. अतिशय थंडीत तिथे तापमान मायनस 35 पर्यंत खाली गेल्यावर हॅंडपंपने पाणी काढणे सुध्दा किती कठीण होते हे सांगितले जाते. तेव्हा आपल्यासारख्य़ा पर्यटकांना काय काय करता येईल याबद्दल ती जागरूकता निर्माण करते. मूळात हे पुस्तक 2012 साली लिहिलेले आहे. त्यामुळे आता ह्या वेगवेगळ्या प्रकारचे काम करणार्‍या संस्थेचे काम या दहा वर्षात खूपच वाढले असेल यात काही शंका नाही. दीनबंधू साहू हे मरिन बायोलॉजिस्ट आहेत पण ते प्रयोगशाळेतून बाहेर पडून समाजासाठी काम करतात. ‘प्रोजेक्ट चिलका’ ह्या त्यांच्या संस्थेमार्फत ओरिसातील लोकांना समुद्राची शेती करायला शिकवतात. ओरिसा मधील पुरी येथे जन्म झालेल्या दीनबंधूनी अतिशय हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेतल्यानंतर दिल्लीत एमएसीला ॲडमिशन घेतली. परंतु योगायोगाने १९८७ मध्ये अंटार्क्टिक वर जाण्याची संधी मिळाली. नंतर पीएचडी पूर्ण केल्यानंतर अनेक देशांमध्ये नोकरी निमित्ताने फिरले. पण तरीही शेवटी दिल्ली युनिव्हर्सिटी मध्ये प्रोफेसर म्हणून काम सुरू केले. त्यांना समुद्री वनस्पती बद्दल विशेष आस्था होती; पण त्या बद्दल आपल्या देशात फारशी जागरूकता नव्हती. ही लागवड पर्यावरण पूरक असते शिवाय त्यातून स्थानिक लोकांना उत्पन्नाचे साधन मिळते. त्यासाठी डिएसटीने निधी मंजूर केला. मग त्यांनी चिल्का सरोवराची पहाणी केली, त्यामध्ये वाढू शकतील अशा चार जातींची निवड करून स्थानिक लोकांना समजेल अशा सोप्या भाषेत माहिती दिली. प्रात्यक्षिके दाखवली, वर्कशॉप्स घेतली. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना रोजगार मिळू लागला. यातूनच पर्यावरण संरक्षण ही होऊ लागले. यातून त्यांना प्रत्यक्ष कांहीं आर्थिक फायदा होत नसला तरी ते म्हणतात, की आम्हाला दोघांना दिल्लीत चांगली नोकरी आहे. त्यामुळे पैसे कमावणे हा उद्देश नाही; पण अजून तीस वर्षांनंतर मला मी काही तरी काम केलेले दिसेल. असे जर काहीच तुम्हाला दिसणार नसेल तर जगायचे कशाला? भूषण पुनानी हे असेच अत्यंत बुध्दीमान विद्यार्थी. मेडीकलची ॲडमिशन हुकल्यामुळे डेअरी कोर्ससाठी ॲडमिशन घेतली. तिथे ही विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविला. नंतर पीएचडी केले. ग्रामविकास शिकण्यासाठी आयआयएम मध्ये एमबीए केले. हे झाल्यावर 1979 मध्ये ब्लाईंड स्कूल मध्ये दोन वर्षांसाठी नोकरी सुरु केली ती सुधा ह्याच हेतूने की मॅनेजमेंट शिकताना जी थेअरी शिकलो ती विकासाच्या क्षेत्रात वापरता येईल का? हळूहळू त्यांना अनेक लोक मिळत गेले. सर्वांनी मिळून आज संस्था खूप मोठी केली आहे.त्यांनी काम सुरु केले तेव्हा फक्त एक कॅपस होता, आज गुजरात मध्ये आठ कॅपस आहेत. दहा लाख मूल्य असलेली संस्था आज दोन कोटी रुपयांची आहे. अपंग लोकांनी स्वावलंबी व्हावे ह्यासाठी संस्था काम करते. दृष्टीहीन मुली ब्यूटी पार्लरसारखे कोर्स चालवतात, फिजिओथेरपी शिकून सेंटर मध्ये काम करतात. विकास साधण्यासाठी योग्य व्यवस्थापनेची गरज असते हे त्यांनी दाखवून दिले आहे. हजारो लोकांच्या आयुष्यात नवा प्रकाश निर्माण करून त्यांना सामान्य आयुष्य जगण्याची संधी मिळवून दिली आहे. अशी ही एकापेक्षा एक वेगवेगळ्या प्रकारची माणसे. कोणत्या तरी ध्येयाने पछाडलेली . सामाजिक कार्य करत असतानाच त्या लोकांचे कल्याण कसे होईल असा विचार करणारी. लेखिकेने त्या सर्वांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या आहेत, त्यांचे काम प्रत्यक्ष पाहून जाणून घेतले आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित गोळा करून आपल्यासमोर मांडली आहे. त्यामुळेच त्या मनोगतात म्हणतात, ‘तुमचं आयुष्य कसे ही असले तरी इतरांसाठी एखादा क्षण द्या. इतरांना प्रेम, आनंद, चांगुलपण द्या. जितकं द्याल तितकं तुम्हाला परत मिळेल.’ हेच वाक्य मलाही अतिशय उर्जा देऊन गेले. माझ्याकडे जे आहे, जे मला देणे शक्य आहे ते निरपेक्षपणे ज्यांना गरज आहे त्याला देणे ह्या सारखा आनंद अजून काय असणार? ह्याच वाक्याने मी आपली ह्या आठवड्यात रजा घेते. उद्या पासून सुरु होणार्‍या नवीन सत्रासाठी सारिका ताईंना हार्दिक शुभेच्छा. ...Read more