* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177665932
  • Edition : 9
  • Publishing Year : AUGUST 1992
  • Weight : 500.00 gms
  • Pages : 552
  • Language : MARATHI
  • Category : AUTOBIOGRAPHY
  • Available in Combos :ANAND YADAV COMBO SET-33 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS IS AN EXCLUSIVE PIECE OF LITERATURE IN THE MARATHI WORLD. IT INCISIVELY REVEALS THE CUTTHROAT COMPETITION AND THE CAMPAIGN DURING THE DAYTO DAY LIFE, REMINDING ABOUT THE MILITANCY OF `MAHABHARAT`. THIS IS A REPRESENTATIVE YET PECULIAR STORY OF A RURAL MIDDLE CLASS FAMILY.THIS IS A STORY OF THE DESPERATE FIGHT OF A YOUNG, SENSITIVE MIND AGAINST THE INESCAPABLE, RELENTLESS FINANCIAL SUFFERINGS.IT IS A STORY OF HIS EFFORTS TO COME OUT OF THE LABYRINTH SUCCESSIVELY WITH THE HELP OF SCANTY EDUCATIONAL FACILITIES. THIS IS YET ANOTHER NOVEL AFTER `ZOMBI`, WOVEN WITH THE STRONG WEFTS AND WARPS, PRESENTING THE UNBELIEVABLE WORST RURAL ADVERSITIES.IT IS VERY GENUINE. THIS IS AN AUTOBIOGRAPHY, YET IT PERFECTLY REVEALS THE DIRECTION IN WHICH THE FUTURE RURAL LITERATURE IS LEADING.IT SUCCESSFULLY EXPLORES THE INS AND OUTS OF THE RURAL LIFE.
मराठी साहित्याचा मोलाचा ठेवा ठरावा, अशी ही साहित्यकृती! आजच्या जनसामान्यांच्या दैनंदिन जीवनातही महाभारतसदृश संघर्षपूर्ण घटना केवळ अस्तित्वासाठी घडत असतात, याचे वास्तवपूर्ण, भेदक दर्शन म्हणजे घरभिंती. ग्रामीण समाजाच्या सर्वसाधारण स्तरातील कुटुंबाची ही प्रातिनिधिक तरीही वैशिष्ट्यपूर्ण कहाणी. जन्मप्राप्त, अटळ, जीवघेण्या आर्थिक हलाखीचा चक्रव्यूह भेदून बाहेर पडण्यासाठी केवळ काही शैक्षणिक सुविधांच्या तुटपुंज्या आधारावर एका तरुण, संवेदनशील मनाने दिलेला निकराचा पण यशस्वी लढा, हा या घरभिंतीचा गाभा! ‘झोंबी’ ते ‘घरभिंती’ या प्रवासपटातून प्रभावीपणे ग्रामीण जीवनाचे उभेआडवे ताणेबाणे प्रथमच त्यांतील खया छेदाभेदासकट विस्तृत प्रमाणात साहित्यरूपाने साकार होतात. त्यामुळे अंतर्बाह्य विस्तृतपणे वेध घेणारी ही आत्मचरित्रकथा ग्रामीण साहित्याच्या उद्याच्या प्रवासाची अचूक दिशा प्रभावीपणे दाखविते. – गो. म. कुलकर्णी

No Records Found
No Records Found
Keywords
#झोंबी #(महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार १९८८-८९) #(महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार १९८८-८९) #(दि फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स -उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार १९८९) #(मारवाडी संमेलन पुरस्कार १९९०) # (साहित्य अकादमी पुरस्कार १९९०) #(प्रवरानगर - विखेपाटील पुरस्कार १९९१) #(संजीवनी साहित्य पुरस्कार, कोपरगाव १९९४) # नांगरणी # (रोहमारे ग्रामीण पुरस्कार १९९०) #घरभिंती #काचवेल #माऊली # (कालीमाता साहित्य पुरस्कार १९८६ #परिमल लेखन पुरस्कार १९८६ # नटरंग #(महाराष्ट्र राज्य पुरस्कार १९८२) # गोतावळा # शेवटची लढाई #(राज्य पुरस्कार २००१-०२) #भूमिकन्या #झाडवाटा # उगवती मने #(राज्य पुरस्कार २००२-०३) # आदिताल # डवरणी #माळावरची मैना # घरजावई #खळाळ #उखडलेली झाडं #सैनिक हो, तुमच्यासाठी... #मळ्याची माती #मायलेकरं #साहित्यिकाचा गाव #मातीखालची माती #स्पर्शकमळे #पाणभवरे #साहित्यिक जडण-घडण # ग्रामसंस्कृती #(रा. ना. सबनीस वाङ्मयपुरस्कार २००२) # मराठी लघुनिबंधाचा इतिहास #साहित्याची निर्मिती प्रक्रिया #ग्रामीणता : साहित्य आणि वास्तव आत्मचरित्र मीमांसा #"ग्रामीण साहित्य : स्वरूप व समस्या #(राज्य पुरस्कार १९८३) # मराठी साहित्य - समाज आणि संस्कृती #१९६० नंतरची सामाजिक स्थिती आणिसाहित्यातील नवे प्रवाह # डॉ. आनंद यादव - एक साहित्यिक प्रवास #ZOMBI #NANGARNI #GHARBHINTI #KACHVEL #MAULI #NATRANG #GOTAVALA #SHEVATCHI LADHAI #BHUMIKANYA #ZADVATA #UGVATI MANE #AADITAL #DAVARNI #MALAVARCHI MAINA #GHARJAWAI #KHALAL #UKHADLELI ZADE #SAINIK HO TUMACHYASATHI #MALYACHI MATI #MAI LEKARA #SAHITYIKACHA GAON #MATIKHALCHI MATI #SPARSHKAMALE #PANBHAVARE #SAHITYIK JADAN-GHADAN #GRAMSANSKRUTI #MARATHI LAGHUNIBANDHACHA ITIHAS #SAHITYACHI NIRMITI PRAKRIYA #GRAMINTA SAHITYA ANI VASTAV #AATMACHARITRA MIMANSA #GRAMIN SAHITYA : SWARUP ANI SAMASYA #1960 NANTARCHI SAMAJIK STHITI ANI SAHITYATEEL NAVE PRAVAH #DR. ANAND YADAV EK SAHITYIK PRAVAS
Customer Reviews
  • Rating StarSambhaji Sadamate

    झोंबी, नांगरणी नंतरचे आनंद यादव यांचे आत्मचरित्र म्हणजे घरभिंती .... खरतर.... मध्यम वर्गीय माणसाच्या सुखाच्या संकल्पना काय असतात? चांगलं शिक्षण घेऊन उत्तम नोकरी मिळावी... भौतिक सुख सुविधांनी युक्त टुमदार घर बांधावं... सुंदर मुलीशी विवाह करून घ बाळगोपाळांनी भरून जावं... बहुतांशी हीच मध्यमवर्गीय माणसांची सुखाची संकल्पना असते.. याच सुख स्वप्नांच्या परिपूर्ती साठी माणूस रात्रंदिवस शारीरिक किंवा बौद्धिक काम करीत असतो. या योगाने माणूस आपले जीवन समृद्ध बनवून समाजात आपले वेगळे अस्तित्व सिद्ध करत असतो.. अशी स्वप्न उराशी बाळगून सुखदुःखाचे चटके खात परिस्थितीशी दोन हात करीत कागल सारख्या खेड्यात लहानाचे मोठे झालेल्या या गाव खेड्याच्या शेती मातीची नाळ मराठी साहित्याशी जोडून शेती मातीत राबणाऱ्यांच्या वेदना.. संवेदना.. ग्रामीण मराठी साहित्य या नवप्रवाह द्वारे मांडून दुर्लक्षित गाव खेड्यातील माणसांच्या जगण्याला बळ देणारे एकमेवादित्य ग्रामीण साहित्यिक म्हणजे.आनंद यादव.... यांच्या आत्मचरित्राचा तिसरा भाग म्हणजे घरभिंती लौकिकार्थाने एम. ए.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या पंढरपूर कॉलेजमधून प्राध्यापकाच्या नोकरीची सुरुवात कशी झाली यानंतर कागल मधील घराच्या गळणाऱ्या छताला.. भग्न घरभिंतीला.. कसं नवरूप दिलं या घरातील आई-दादा चार बहिणी तीन भाऊ यांना मळा पिकवण्यासाठी कशी मदत केली आणि याच दरम्यान पंढरपूरची नोकरी सोडून सारस्वतांच् माहेरघर तथा साहित्य पंढरी म्हणून सर्व परिचित असणाऱ्या पुण्यामध्ये प्राध्यापकाची नोकरी स्वीकारून आपली वाड़मयीन आवड कशी जोपासली व वाढवली याचं समर्पक सुंदर वर्णन या आत्मचरित्रा मध्ये त्यांनी केले आहे नोकरी लागल्यानंतर फक्त दहावीपर्यंत शिकलेल्या स्मिताशी त्यांनी विवाह केला, कागलातील कुटुंबाची जबाबदारी सांभाळत स्मिताला पुढील शिक्षण देऊन पुण्यामध्ये स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी त्यांनी केलेल्या अपार मेहनतीचे समर्पक वर्णन यामध्ये आहे. त्यांची वांडंमयीन आवड पुण्यातील व गावाकडील घरप्रपंचाची जबाबदारी त्यातून ते करीत असलेले प्राध्यापकाची नोकरी पुण्यामध्ये लहानाच्या मोठ्या होत असलेल्या मुली स्वाती व कीर्ती यांच्या पालकत्वाची जबाबदारी.. स्मिताला नोकरी लागल्यानंतर त्यांच्या पुण्यातील कुटुंबाची होत असलेली परवड.. राखेतून फिनिक्स पक्ष्याप्रमाणे उंच भरारी घ्यावी त्याप्रमाणे साहित्य पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्याच्या साहित्य क्षेत्रामध्ये स्वतःचं साहित्यिक वलय निर्माण करून गोतावळा, पाचोळा ,नटरंग, खळाळ या व अन्य साहित्य कृती कशा निर्माण केल्या याच भावस्पर्शी वाचकांना भावनाप्रधान बनवून वाचण्यास भाग पाडणारे हे आत्मचरित्र आहे खरं तर माणसाचं जीवन सुखाने भरलेला पेला नसून कर्तव्याने भरलेले माप आहे.. हे वास्तव सिद्ध करणारे हे आत्मचरित्र आहे धनधान्यान मोटचाड्यांन आणि गाडीबैलांन नांगर कुळवन भरलेलं घर.. दादाच्या ,आईच्या, लहान भावंडांच्या राबणाऱ्या हातांनी फुललेला त्यांचा मळा..तोंडचा घास काढून घ्यावा तसा शासनाने केलेले नवीन कुळ कायद्यामुळे हातचा निघून जातो हे दादांना सहन होत नाही तो सर्व काम धंदा सोडून निराश होऊन बसून राहतो... सर्वांवर मोलमजुरी ची वेळ येते, याही स्थितीमध्ये उंचआकाशात घिरट्या घालणाऱ्या घारीचे लक्ष घरट्यातील तिच्या पिल्लांकडे असते त्याच प्रमाणे घराची वाताहात झाली असता पुण्यात नोकरी करीत असताना लेखकांनी दुसरा मळा कसा खरेदी केला व घराला उभारी देण्यासाठी त्यांची झालेली परवड सुंदर रीतीने यामध्ये मांडली आहे. खेडवळ वळणाची आई व उच्च शिक्षित लेखकांमध्ये उडणारे शाब्दिक खटके यांचे वर्णन समर्पक ग्रामीण बोलीचा वापर करून केलेले असल्याने यामध्ये एक प्रकारची वातावरण निर्मिती लेखकांनी सुंदर साधली आहे वादळात ज्याप्रमाणे दिवा तेवत राहावा त्याप्रमाणे लेखकांनी या प्रतिकूल जीवन संघर्षांमध्ये सुद्धा आपली साहित्यिक आवड जोपासून बेजोड साहित्यकृती निर्माण केल्या त्याचं बरोबर शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पीएचडी पदवी कशी संपादन केली याच समर्पक वर्णन या आत्मचरित्रात असल्याने हे आत्मचरित्र म्हणजे घराला घरपण प्राप्त करून देणाऱ्या एका गाव खेड्यातील बुद्धिजीवी तरुणाची यशोगाथा म्हणल्यास वावगे ठरणार नाही... ...Read more

  • Rating StarAaditya Vishwasrao

    गेले ४ दिवस ही ५४५ पाने अक्षरशः मनाची घालमेल करील होती. ` झोंबी ` मधला आंदु एस.एस.सी पुढे नांगरणी मध्ये एम.ए पर्यंत शिक्षण पूर्ण करत प्राध्यापक होतो आणि प्रसंगी रक्ताच पाणी करून कष्टणाऱ्या आंदूचा प्राध्यापक पदी आनंदराव होतो. ` घरभिंती ` हे नंद यादव ह्यांच्या आत्म चरित्राचा ३ रा भाग . झोंबी व नांगरणी वाचून झाल्यावर नकळतच लेखकाच्या पुढील जीवनाची अनामक हुरहूर लागली त्यामुळे नांगरणी वाचून झाल्यावर लगेच घरभिंती ला हात घातला . झोंबी मध्ये आनंद यादव ह्यांच्या एस.एस.सी पर्यंत चा काळ आलेला , पुढे नांगरणी मध्ये एम.ए होऊन पंढरपूर ल प्राध्यापक पदी नियुक्त होण्यापर्यंत काळ अनुभवला. घरभिंती मध्ये लेखक आनंद यादव ह्यांच्या संसाराची वेल बहरून आली आहे आणि लेखकांचा वाङमयीन विकास व साहित्यिक होण्यापर्यंत चा सुख- दुःख मिश्रित असा काळ आला आहे . स्वतःचा संसार फुलवण्या बरोबरच , गावाकडे २४ तास हाडं उगळून कष्ट सोसत संसाराचा गाडा ओढणारी आई, नुकताच तारुण्यात पदार्पण केलेला शिवा , शिक्षणासाठी धडपडणारे आप्पा आणि दौलत , लग्न होऊन सुद्धा नवऱ्यानं सोडली म्हणून माहेरी आलेली हिरा , मनात नवी स्वप्न उमलू पाहणारी धोंडू बाई या सर्वांचा संसार कसा सुरळीत करायचा याची स्वप्न बघणारा आनंद मनाला भिडतो. आई - वडील ह्यांच्यातील सततची भांडणं , तारुण्यापायी भान गमावून व्यसनात अडकलेला शिवा ह्यांची चीड येते तर दुसरीकडे आई चं दुसरं लग्न झाल्यामुळे आजोळी येऊन पडलेली फुला , नवऱ्यानं सोडल तरीही त्याच्या नावाचं कुंकू लावणारी नाळरोगी, सुजरी - फुगरी हिरा अस्वस्थ करून सोडते. हिराची आत्महत्या , वडिलांचा मृत्यु तर नकळतपणे डोळ्यांच्या पाणकडा ओलावून जाते इतक्या कठीण प्रसंगात सुद्धा लेखकांचा घराला आवरण्याचा प्रयत्न परंतु प्रत्येक वेळी आलेली निराशा वाचकाला च हतबल करते. एवढ्यात ही पुण्यात उमलू पाहणारी लेखकांची संसार वेल त्यावर फुलंनारी फुलं, आप्पा , दौलत ह्यांचं होणारं शिक्षण मनाला सुखकर करून जात. हे पुस्तक खरं तर एक Roller Coaster ची राईड आहे. क्षणात सुखाचे चढाव तर क्षणार्धात दुःखाची खोलच खोल दरी वाचकाला ग्रामीण जीवनातील समस्यांचा घडवून देते. ग्रामीण जीवनाचा पडदा डोळ्यांसमोर उभं करून जाणारं हे पुस्तक कठीण काळातसुद्धा जगण्याची उमेद न सोडता कसं लढत राहावं ह्यांची शिकवण देऊन जातं ...Read more

  • Rating StarSambhaji Desai

    4 hi part khupch chaan aahet ..... mi vachalet ....aanand yadav -jakate tyanch purn naav ....he atmcharitra ek jaganyachi navi umed deun jaat....khupch chaan aahe . jarur wacha

  • Rating StarPopatrao Yamgar

    आवर्जून वाचावे असे पुस्तक

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

KHULBHAR DUDHACHI KAHANI
KHULBHAR DUDHACHI KAHANI by SUNANDA AMRAPURKAR Rating Star
श्रीपाद ब्रह्मे

नुकतंच असंच वेगानं वाचून संपवलेलं दुसरं पुस्तक म्हणजे सुनंदा अमरापूरकर यांचं ‘खुलभर दुधाची कहाणी’. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या त्या पत्नी. अर्थात ही काही त्यांची एकमेव ओळख नव्हे. एक चांगल्या अभिनेत्री, उत्तम अनुवादक म्हणूनही त्या ्रसिद्ध आहेत. त्यांनी ‘खुलभर दुधाची कहाणी’ या आत्मचरित्रवजा लेखनातून त्यांच्या जगण्याचा व्यापक पट अतिशय प्रांजळपणे उलगडला आहे. मला हे पुस्तक विशेष भावण्याचं कारण म्हणजे त्यात आलेलं नगरचं वर्णन. मी स्वत: नगरला फार प्रदीर्घ काळ राहिलो नसलो, तरी ते शेवटी माझ्या जिल्ह्याचं गाव. आणि वयाच्या १३ ते २२ अशा महत्त्वाच्या कुमार व तरुण वयातला माझा तिथला रहिवास असल्यानं नगरच्या आठवणी विसरणं शक्य नाही. सुनंदाताई माझ्या आईच्या वयाच्या. त्यामुळं त्यांच्या लहानपणच्या आठवणी जवळपास माझ्या जन्माच्या २०-२५ वर्षं आधीच्या. असं असलं तरी मी त्या वर्णनाशी, त्या काळातल्या नगरशीही रिलेट होऊ शकलो, याचं कारण मुळात गेल्या शतकात बदलांचा वेग अतिशय संथ होता. नगरसारख्या निम्नशहरी भागात तर तो आणखी संथ होता. त्यामुळं एकूण समाजजीवनात १९६० ते १९९० या तीस वर्षांत तपशिलातले फरक सोडले, तर फार मोठा बदल झाला नव्हता. सुनंदाताई माहेरच्या करमरकर. त्यांचं आजोळ‌ सातारा असलं, तरी त्या जन्मापासून नगरमध्येच लहानाच्या मोठ्या झालेल्या. अगदी पक्क्या ‘नगरी’ म्हणाव्यात अशा. ( आजही त्या स्वत:ला अभिमानानं ‘नगरकर’च म्हणवून घेतात.) सुनंदाताईंचे वडील त्या दहा वर्षांच्या असतानाच गेले. त्यांना मामांचा आधार होता, पण आईनंच लहानाचं मोठं केलं. तेव्हाचं त्यांचं निम्न मध्यमवर्गीय जगणं, नगरमधले वाडे, तिथलं समाजजीवन, तिथल्या शाळा, शिक्षक, नगरमधील दुकानं, दवाखाने, तिथल्या गल्ल्या, बाजार हे सगळं सगळं सुनंदाताई अतिशय तपशीलवार उभं करतात. नगरसारख्या मध्यम शहरात वाढलेल्या महाराष्ट्रातील कुठल्याही शहरातील त्या काळातील व्यक्तीला अतिशय सहज रिलेट होईल, असं त्यांचं हे जगणं होतं. त्यात सुनंदाताईंचं लेखन अतिशय सहज, सोपं आणि प्रांजळ असल्यामुळं ते आपल्याला अगदी भिडतं. एका प्रख्यात अभिनेत्याची पत्नी असल्यानं त्यांचं जीवन इतर सर्वसामान्य स्त्रियांपेक्षा वेगळं झालं असेल, अशी आपली अपेक्षा असते. सुनंदाताईंच्या लेखनातून या ‘वेगळ्या जीवना’ची काही तरी झलक मिळेल, अशीही आपली एक भूमिका तयार झालेली असते. सदाशिव अमरापूरकरांसारख्या मनस्वी अभिनेत्याशी लग्न झाल्यानंतर सुनंदाताईंचं जगणं बदललंही; मात्र ते वेगळ्या पद्धतीनं. सदाशिव अमरापूरकर ऊर्फ नगरकरांचा लाडका बंडू त्यांना नगरमध्ये शाळेपासून कसा भेटला, नंतर कॉलेजमध्ये दोघांनी एकाच ग्रुपमधील नाटकं कशी सादर केली, त्यात अगदी नकळतपणे त्यांचं प्रेम कसं जमलं आणि नंतर नगर सोडून त्या पतीच्या कारकिर्दीसाठी मुंबईत कशा आल्या हा सर्व नाट्यमय प्रवास सुनंदाताई अतिशय तन्मयतेनं मांडतात. अमरापूरकर मंडळींच्या घराविषयीचे तपशील त्यात येतात. अमरापूरकरांचे वडील दत्तोपंत हे नगरमधलं मोठं प्रस्थ. श्रीमंत घराणं. मोठा वाडा, नोकरचाकर वगैरे. त्या तुलनेत सुनंदाताईंची माहेरची परिस्थिती जेमतेम म्हणावी अशी. अशा परिस्थितीत हे लग्न झालं आणि त्या अमरापूरकरांची सून झाल्या, इथपर्यंत पुस्तकाचा निम्मा प्रवास (मध्यंतरच) होतो. पुढल्या दोनशे पानांत आपल्याला खऱ्या अर्थानं सदाशिव अमरापूरकर हे काय व्यक्तिमत्त्व होतं, हे उलगडत जातं. अमरापूरकरांनी शेवटपर्यंत त्यांची मध्यमवर्गीय राहणी व मध्यमवर्गीय मूल्यं सोडली नाहीत. ‘अर्धसत्य’सारख्या सिनेमामुळं एका रात्रीतून ते भारतभरात प्रसिद्ध झाले. या एका ओळखीमुळं अमरापूरकरांचं जीवन पूर्ण बदलून गेलं. तोपर्यंत असलेली आर्थिक ओढगस्तीही संपली. हिंदी चित्रपटसृष्टीत अगदी स्वप्नवत अशा रीतीनं ते मोठे स्टार झाले. एकापाठोपाठ एक खलनायकी भूमिका त्यांच्याकडं येऊ लागल्या. पैसा येऊ लागला. अशा परिस्थितीत एक मध्यमवर्गीय कुटुंब या सगळ्या धबधब्याला कसं तोंड देतं आणि आपली मूल्यं कायम जपत राहतं, हे सुनंदाताईंनी फार हृद्यपणे लिहिलं आहे. सुनंदाताईंनी अनेक वर्षं एलआयसीत नोकरी केली. पतीचं अस्थिर क्षेत्र असल्यानं त्यांनी सुरुवातीला नोकरी केलीच; पण नवरा हिंदी चित्रपटसृष्टीत सुपरस्टार व्हिलन झाल्यावरही त्यांनी ही नोकरी सोडली नाही. त्यांच्या तिन्ही मुलींवर त्यांनी उत्तम संस्कार केले. एका सिनेमाच्या प्रीमियरनंतर हे सगळे कुटुंबीय कसे घरी जाऊन पिठलं-भाकरीचं जेवण तयार करून जेवले हे त्यांनी एका प्रसंगात अतिशय खेळकरपणे सांगितलं आहे. अमरापूरकरांचं नाटकवेड, भौतिक सुखांविषयीची काहीशी विरक्त वृत्ती, त्यांचा मित्रांचा गोतावळा, अनेक माणसांचा घरात राबता असा एकूण ‘देशस्थी’ कारभार यावर सुनंदाताई कधी गमतीत, तर कधी काहीसं वैतागून टिप्पणी करतात. अर्थात त्यांचं सदाशिव अमरापूरकरांवर अतिशय प्रेम होतं आणि त्यांनी हे शेवटपर्यंत उत्तम निभावलं. अशा आत्मचरित्रांत अनेकदा ‘आहे मनोहर तरी... गमते उदास’ असा सूर लागण्याचा धोका असतो. सुनंदाताईंच्या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणजे, एखादा अपवाद वगळता, त्यांच्या या संपूर्ण पुस्तकात असा रडवा सूर कधीही लागलेला नाही. आपल्याला जे काही मिळालं, ते आपणच निवडलं आहे आणि त्यामुळं त्याविषयी तक्रार करण्याचा आपल्याला काही अधिकार नाही, अशी एक भूमिका त्यांनी घेतलेली दिसते. त्यांच्या या पुस्तकातून विसाव्या शतकातील मध्यमवर्गीय ब्राह्मण घरातील एका तरुणीच्या आशा-आकांक्षांचा, आयुष्यानं दिलेल्या आश्चर्याच्या धक्क्यांचा आणि त्याला सामोरं जाण्यातील धीट दिलदारपणाचा लोभस प्रवास दिसतो. आपली मध्यमवर्गीय मूल्यं जपत, प्रामाणिकपणे व उमेदीनं आयुष्य जगणाऱ्या अनेक महिलांना या पुस्तकात आपल्या जगण्याचं प्रतिबिंब सापडेल. तेच या ‘खुलभर दुधाच्या कहाणी’चं यश आहे. ...Read more

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
प्रभाकर गावंडे, अमरावती

मी विकत घेऊन वाचले आहे हे पुस्तकं, चांगले आहे, नवीन माहिती वाचायला मिळाली.