* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: PANBHAVARE
  • Availability : Available
  • ISBN : 9788177662115
  • Edition : 3
  • Publishing Year : DECEMBER 1982
  • Weight : 160.00 gms
  • Pages : 168
  • Language : MARATHI
  • Category : LITERATURE
  • Available in Combos :ANAND YADAV COMBO SET-33 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS IS AN AUTOBIOGRAPHICAL TYPE BUT STILL THE `ME` IN IT IS NEVER HARSH UPON US. THIS OFTEN HAS HAPPENED IN MANY AN AUTOBIOGRAPHICAL WRITINGS LATELY. YADAV IS AN EXCEPTION TO THIS RULE. THE PERSONALITY OF HIS `ME` DOES NOT RANKLE IN OUR EYES. ON THE CONTRARY, THE `ME` IS VERY SHY, BASHFUL, VIRTUOUS. IT LOVES OTHER PEOPLE WITHOUT ANY EXPECTATIONS. IT HAS A LONGING FOR THE NATURE. THE WRITER DOES NOT IGNORE THE CURRENT ACTUALITY. THERE IS A FEELING OF BEING UNSAFE IN THIS MODERN WORLD IN SPITE OF ALL THE PRECAUTIONS, THERE IS TERRIBLE MENTAL TANGLING. THE COMMON MAN IS DUBIOUS ABOUT HIS LIFE. HIS LIFE IS FULL OF ARTIFICIAL AND MECHANICAL FEELINGS. HIS MIND IS AT TWO ENDS WHILE TRYING TO BALANCE HIS VIRTUOUSNESS. HIS LIFE STILL POSSESSES THE CULTURAL VALUES INCULCATED SO DEEPLY AND SO THOROUGHLY PRACTICED. HE HAS EYESIGHT WHICH IMMEDIATELY FINDS THE REALITY. HE HAS THE WEFTS AND WARPS WEAVE TIGHTLY TOGETHER WITH THE EMOTIONS. THESE ARE ALL THE DIFFERENT ASPECTS OF AN URBANITE, THEY MAKE THE MAN REALIZE THAT HE IS A MERE PUPPET IN THE HANDS OF FATE. THESE ARTICLES SHOW THE AUTHOR`S COMMAND OVER HANDLING DIFFERENT SENSATIONS, POETIC SENSE, AND THE EXPERIENCES WITH SUBTLE IMAGINATION.
‘पाणभवरे’ मधील ‘मी’चे लक्षात घेण्याजोगे वैशिष्ट्य हे की, हा ‘मी’ आत्मचरित्रात्मक असूनही तो आपल्या नजरेत कधीच खुपत नाही. जे उघडउघड आत्मचरित्रात्मक, ते आत्मप्रदर्शनात्मक होण्याची भीती असते. अलिकडच्या आत्मचरित्रात्मक लेखनातून अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. यादवांच्या लेखनात आत्मप्रदर्शनाचा हा भाव किंचितही आढळत नाही. या ‘मी’चे व्यक्तित्व भडक नाही. ते लाजरे, बुजरे, पापभीरू, माणसांवर नितांत प्रेम करणारे, निर्सगाची विलक्षण ओढ असणारे आहे. यादव जीवनानुभवाचे दर्शन घडवीत असताना कलार्थाने ‘मी’ला विसरतात. शिवाय लेखनात बदलत्या वास्तवाचे भान आहे. आधुनिक जीवनातील मानसिक गुंतागुंत आहे. सुरक्षिततेची सर्व खबरदारी घेतल्यावरही क्षणोक्षणी जाणवणारी असुरक्षितता आहे, धपापलेपण आहे. सामान्य माणसाची दैनंदिन जीवनातली साशंक भीती आहे. यांत्रिक जीवनातली कृत्रिमता आहे. पांढरपेशी प्रतिष्ठा जपताना होणारी मनाची तगमग आहे. संस्कारांची गिरवलेली, न पुसली जाणारी वलये आहेत. वास्तवाचे निदान करणारी शोधदृष्टी आहे. तरल, भावस्पर्शी संवेदनेची वीण आहे. यांत्रिकतेने जखडलेल्या शहरातील हे विविध अनुभव, आज माणसाला प्राप्त झालेल्या ‘प्रलयपुरातील बाहुली’च्या स्वरूपाची जाणीव करून देतात... संवेदना, काव्यात्मता, तरलता, अनुभवातील चैतन्य यादवांची भाषा उत्तमपणे पेलू शकते, असा अनुभव या लेखनामधून येतो. (आलोचना)

No Records Found
No Records Found
Keywords
#झोंबी #(महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार १९८८-८९) #(महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार १९८८-८९) #(दि फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स -उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार १९८९) #(मारवाडी संमेलन पुरस्कार १९९०) # (साहित्य अकादमी पुरस्कार १९९०) #(प्रवरानगर - विखेपाटील पुरस्कार १९९१) #(संजीवनी साहित्य पुरस्कार, कोपरगाव १९९४) # नांगरणी # (रोहमारे ग्रामीण पुरस्कार १९९०) #घरभिंती #काचवेल #माऊली # (कालीमाता साहित्य पुरस्कार १९८६ #परिमल लेखन पुरस्कार १९८६ # नटरंग #(महाराष्ट्र राज्य पुरस्कार १९८२) # गोतावळा # शेवटची लढाई #(राज्य पुरस्कार २००१-०२) #भूमिकन्या #झाडवाटा # उगवती मने #(राज्य पुरस्कार २००२-०३) # आदिताल # डवरणी #माळावरची मैना # घरजावई #खळाळ #उखडलेली झाडं #सैनिक हो, तुमच्यासाठी... #मळ्याची माती #मायलेकरं #साहित्यिकाचा गाव #मातीखालची माती #स्पर्शकमळे #पाणभवरे #साहित्यिक जडण-घडण # ग्रामसंस्कृती #(रा. ना. सबनीस वाङ्मयपुरस्कार २००२) # मराठी लघुनिबंधाचा इतिहास #साहित्याची निर्मिती प्रक्रिया #ग्रामीणता : साहित्य आणि वास्तव आत्मचरित्र मीमांसा #"ग्रामीण साहित्य : स्वरूप व समस्या #(राज्य पुरस्कार १९८३) # मराठी साहित्य - समाज आणि संस्कृती #१९६० नंतरची सामाजिक स्थिती आणिसाहित्यातील नवे प्रवाह # डॉ. आनंद यादव - एक साहित्यिक प्रवास #ZOMBI #NANGARNI #GHARBHINTI #KACHVEL #MAULI #NATRANG #GOTAVALA #SHEVATCHI LADHAI #BHUMIKANYA #ZADVATA #UGVATI MANE #AADITAL #DAVARNI #MALAVARCHI MAINA #GHARJAWAI #KHALAL #UKHADLELI ZADE #SAINIK HO TUMACHYASATHI #MALYACHI MATI #MAI LEKARA #SAHITYIKACHA GAON #MATIKHALCHI MATI #SPARSHKAMALE #PANBHAVARE #SAHITYIK JADAN-GHADAN #GRAMSANSKRUTI #MARATHI LAGHUNIBANDHACHA ITIHAS #SAHITYACHI NIRMITI PRAKRIYA #GRAMINTA SAHITYA ANI VASTAV #AATMACHARITRA MIMANSA #GRAMIN SAHITYA : SWARUP ANI SAMASYA #1960 NANTARCHI SAMAJIK STHITI ANI SAHITYATEEL NAVE PRAVAH #DR. ANAND YADAV EK SAHITYIK PRAVAS
Customer Reviews
  • Rating StarTARUN BHARAT 22-05-1983

    संवेदनाशील मनाच्या महापुरातील ‘पाणभवरे’… अंत:करणात उफाळणाऱ्या भावनांना शब्दरूप करताना गतकालातील घटनांना नेमक्या शब्दात, नेटक्या आणि नेमस्त संस्कारीत भाषेत वाचकांपुढे उभे करण्याचे सामर्थ्य हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य. जवळ जवळ सहा वर्षांच्या काळात अलग अग लिहिलेल्या लेखांचे हे संकलन असूनही त्यात एक विलक्षण सातत्य आहे. सुसुगतता आहे. जीवनिष्ठा आणि तर्कसंगत, प्रामाणिक आचार यांची जाणीवपूर्वक जपणूक आहे. ग्रामीण आणि नागर संस्कृती यांच्यातील प्रवाशांना संस्कारक्षम मनाने इथे डोळसपणे अभ्यासलेले आहे. आयुष्यात जे जे घडले ते ते न्यायबुद्धीने स्वीकारलेले आहे. मानसिक द्वंद्व प्रामाणिकपणे रेखाटले आहे. आणि कुठेतरी मध्येच अनुभवातून शिकलेली समृद्ध झालेली विरक्तीही दिसते. ‘हातपाय थकले की छानपैकी चटकन मरून जायचे...’ (पृष्ठ ८८) असे एखादे उदास वाक्य लेखक लिहितो; परंतु ही क्षणिक मरगळ आहे हे वाचक समजतो. आशा-निराशा यांचे हेलकावे आणि त्यातून होणारी मानसिक जडणघडण यांचे एक अभावित, अनपेक्षित असे आगळे रूप या पुस्तकात दडले आहे. समचित्र वाचकाला ते आपोआप जाणवले. एकोणीस कथांमधून मन:चक्षूंसमोर उभा राहणारा ‘आनंद’ रसिक वाचकाला आनंद दिल्याशिवाय राहणार नाही. शब्द मेळवून चाले नेमक्या शब्दांत प्रसंग, घटना उभं करण्याचं विलक्षण सामर्थ्य आनंद यादवांच्या लेखणीत आहे. त्याचे प्रत्यंतर पुस्तकात जागोजाग येते. ‘घराकडचा रस्ता वाचताना’ ह्या वत्सल घरांमधून आणि प्रेमळ रस्त्यांवरून मी खूप हुंदडलो आहे. धुळीच्या कणांसारखा प्रत्येक घराच्या अंत:करणापर्यंत जाऊन आलो आहे. घर निरनिराळ्या मनाची, पण रस्त्यानं ती एकाच जागी सांभाळली आहेत. दहा मुलांच्या पित्याच्या अनुभवाने त्यानं त्या सर्वांना उराशी धरलं आहे.’ (पृष्ठ ७) इथं वाचक थबकला नाही तरच नवल. वडलांच्या धाकामुळं ढोरं राखणारं बालमन ‘मारत असला तरी मास्तर बरा’ असं म्हणत आणि ‘माणूस शिकून शाणंबी हुतय म्हण’ असा तर्क करत तेव्हा विनोदाची सुप्त लहर जाणवून जाते. नवे कायदे येतात आणि जन्मभर पोटच्या पोराप्रमाणे जपलेली जमीन हातची जाताच दादाची-वडलांची होणारी जीवघेणी उलघाल लिहिताना यादवांनी उभे केलेले शब्द सहृदय वाचकाला स्तब्ध करतात. ट्रॅन्झिटर गळ्यात अडकवून ‘वानरांच्या गावाला गेलेल्या आनंदा मामीच्या हातची शिणकुटासारखी जाड ज्वारीची भाकरी खातो आणि शहरी मोठेपणाची ग्रामस्थांना वाटणारी गंमत कशी निर्लेपपणे पाहतो ते वाचायलाच हवे.’ आंबा घाटात वर उभं राहावं आणि खाली कोकणातून बाव नदीच्या खोऱ्यातून गगनाच्या गाभाऱ्याकडे निघालेल्या धूम्रशलका पाहव्या म्हणजे जो दैवी आनंद वाटतो तोच किंवा तसाच आनंद या पुस्तकातीन वळविलेल्या शब्दामुळे होतो. सौंदर्यस्थळे दक्षिण महाराष्ट्रातले विशेषत: पूर्वीच्या कोल्हापूर संस्थानातील ग्रामीण जीवन त्याच्या गुणदोषांसह अभावितपणे या पुस्तकात पुढे आले आहे. या ग्रामीण भागात वाढून पुढे शहरात रमलेला, पोटासाठी शहरात शिरलेला ‘आन्दा’ क्रमाक्रमानं पण ठामपणे विकसित झाला आहे. ढोरांमागे फिरणारा गावंढळ’ पोरगा पुण्यात पोरांसमोर ‘शहरी’ प्राध्यापक म्हणून उभा राहतो. स्वत:च्या बळावर, बुद्धीवर. ‘जरासंध’मध्ये अगदी सुरुवातीलाच मित्रांचा एक प्रश्न येतो. ‘सध्या गावाकडं कधी जाता की नाही ?’ ‘जातो ना !’ आपल्याविषयी घेतलेली ही शंका लेखकाला पार अस्वस्थ करते कारण पुण्यात रमणारा जीव नाही. ग्रामीण जीवनाची ओढ आणि आपद् धर्म म्हणून स्वीकारलेले शहरी जीवन यांच्या मानसिक संघर्षातून स्फुरलेली कथाबीजे म्हणजे ‘शेवटची माती’, ‘आभाळगळ’, ‘ममी’, ‘पाटी आणि पोळी’, ‘बावीस एकरी’ ही अतिशय विलोभनीय सौंदर्य स्थळे आहेत. ‘पाटी आणि पोळी’त लेखकानं एक विलक्षण बोच उघड केली आहे. ... मला तिनं (पाटीनं) प्राध्यापक केल. माझ्या दोन भावांना कारकून करून रोज दोन वेळ पोटाला दिलं... ह्या स्वतंत्र भारतात एवढं पोटाला मिळतं, कुणी कार्यकर्ता अजून ताटातलं पळवून नेत नाही, हे का थोडं झालं ? (पृष्ठ १५०) यावर भाष्य हवेच का ? आत्मकथनाचा एक सुंदर प्रकार म्हणून या पुस्तकाकडे पहायला हवे. ग्रामीण आणि शहरी जीवनाकडे पाहण्याचा लेखकाचा दृष्टिकोन मूलत: स्वच्छ आणि निरामय आहे. जे अनुभवले ते शब्दरूप केले यामुळे कुठेही कृत्रिमतेचा लवलेशही नाही. ‘एक स्वदेशी प्रवास’ व ‘राष्ट्रीय महारस्ता’ या प्रकरणात शहरी जीवनातील अगतिगता फार प्रकर्षाने जाणवते. ‘मी आताशा निर्दय समंजस होत चाललो आहे’ (पृष्ठ १९३) आणि ‘उगाच तग धरून राहिलेली नि काल बाह्य झालेली आपली माणुसकी जागी होते आणि दिवस चांगला जात नाही’ ही दोन वाक्ये या संदर्भात फार बोलकी आहेत. लेखकाच्या सेखणीचे सामथ्र्य सर्वत्र जाणवते. कुणाचे अनुकरण नाही. सारे स्वत:चे ! सारे स्पष्ट ! मन:प्रवाहाचे हे भवरे फार खोल आहेत. प्रचंड ओढ असूनही ते तालबद्ध आहेत. हा मनाचा महापूर गुरुकृपेसारखा कल्लोळाने येत आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more