* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: PANBHAVARE
  • Availability : Available
  • ISBN : 9788177662115
  • Edition : 3
  • Publishing Year : DECEMBER 1982
  • Weight : 160.00 gms
  • Pages : 168
  • Language : MARATHI
  • Category : LITERATURE
  • Available in Combos :ANAND YADAV COMBO SET-33 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS IS AN AUTOBIOGRAPHICAL TYPE BUT STILL THE `ME` IN IT IS NEVER HARSH UPON US. THIS OFTEN HAS HAPPENED IN MANY AN AUTOBIOGRAPHICAL WRITINGS LATELY. YADAV IS AN EXCEPTION TO THIS RULE. THE PERSONALITY OF HIS `ME` DOES NOT RANKLE IN OUR EYES. ON THE CONTRARY, THE `ME` IS VERY SHY, BASHFUL, VIRTUOUS. IT LOVES OTHER PEOPLE WITHOUT ANY EXPECTATIONS. IT HAS A LONGING FOR THE NATURE. THE WRITER DOES NOT IGNORE THE CURRENT ACTUALITY. THERE IS A FEELING OF BEING UNSAFE IN THIS MODERN WORLD IN SPITE OF ALL THE PRECAUTIONS, THERE IS TERRIBLE MENTAL TANGLING. THE COMMON MAN IS DUBIOUS ABOUT HIS LIFE. HIS LIFE IS FULL OF ARTIFICIAL AND MECHANICAL FEELINGS. HIS MIND IS AT TWO ENDS WHILE TRYING TO BALANCE HIS VIRTUOUSNESS. HIS LIFE STILL POSSESSES THE CULTURAL VALUES INCULCATED SO DEEPLY AND SO THOROUGHLY PRACTICED. HE HAS EYESIGHT WHICH IMMEDIATELY FINDS THE REALITY. HE HAS THE WEFTS AND WARPS WEAVE TIGHTLY TOGETHER WITH THE EMOTIONS. THESE ARE ALL THE DIFFERENT ASPECTS OF AN URBANITE, THEY MAKE THE MAN REALIZE THAT HE IS A MERE PUPPET IN THE HANDS OF FATE. THESE ARTICLES SHOW THE AUTHOR`S COMMAND OVER HANDLING DIFFERENT SENSATIONS, POETIC SENSE, AND THE EXPERIENCES WITH SUBTLE IMAGINATION.
‘पाणभवरे’ मधील ‘मी’चे लक्षात घेण्याजोगे वैशिष्ट्य हे की, हा ‘मी’ आत्मचरित्रात्मक असूनही तो आपल्या नजरेत कधीच खुपत नाही. जे उघडउघड आत्मचरित्रात्मक, ते आत्मप्रदर्शनात्मक होण्याची भीती असते. अलिकडच्या आत्मचरित्रात्मक लेखनातून अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. यादवांच्या लेखनात आत्मप्रदर्शनाचा हा भाव किंचितही आढळत नाही. या ‘मी’चे व्यक्तित्व भडक नाही. ते लाजरे, बुजरे, पापभीरू, माणसांवर नितांत प्रेम करणारे, निर्सगाची विलक्षण ओढ असणारे आहे. यादव जीवनानुभवाचे दर्शन घडवीत असताना कलार्थाने ‘मी’ला विसरतात. शिवाय लेखनात बदलत्या वास्तवाचे भान आहे. आधुनिक जीवनातील मानसिक गुंतागुंत आहे. सुरक्षिततेची सर्व खबरदारी घेतल्यावरही क्षणोक्षणी जाणवणारी असुरक्षितता आहे, धपापलेपण आहे. सामान्य माणसाची दैनंदिन जीवनातली साशंक भीती आहे. यांत्रिक जीवनातली कृत्रिमता आहे. पांढरपेशी प्रतिष्ठा जपताना होणारी मनाची तगमग आहे. संस्कारांची गिरवलेली, न पुसली जाणारी वलये आहेत. वास्तवाचे निदान करणारी शोधदृष्टी आहे. तरल, भावस्पर्शी संवेदनेची वीण आहे. यांत्रिकतेने जखडलेल्या शहरातील हे विविध अनुभव, आज माणसाला प्राप्त झालेल्या ‘प्रलयपुरातील बाहुली’च्या स्वरूपाची जाणीव करून देतात... संवेदना, काव्यात्मता, तरलता, अनुभवातील चैतन्य यादवांची भाषा उत्तमपणे पेलू शकते, असा अनुभव या लेखनामधून येतो. (आलोचना)

No Records Found
No Records Found
Keywords
#झोंबी #(महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार १९८८-८९) #(महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार १९८८-८९) #(दि फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स -उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार १९८९) #(मारवाडी संमेलन पुरस्कार १९९०) # (साहित्य अकादमी पुरस्कार १९९०) #(प्रवरानगर - विखेपाटील पुरस्कार १९९१) #(संजीवनी साहित्य पुरस्कार, कोपरगाव १९९४) # नांगरणी # (रोहमारे ग्रामीण पुरस्कार १९९०) #घरभिंती #काचवेल #माऊली # (कालीमाता साहित्य पुरस्कार १९८६ #परिमल लेखन पुरस्कार १९८६ # नटरंग #(महाराष्ट्र राज्य पुरस्कार १९८२) # गोतावळा # शेवटची लढाई #(राज्य पुरस्कार २००१-०२) #भूमिकन्या #झाडवाटा # उगवती मने #(राज्य पुरस्कार २००२-०३) # आदिताल # डवरणी #माळावरची मैना # घरजावई #खळाळ #उखडलेली झाडं #सैनिक हो, तुमच्यासाठी... #मळ्याची माती #मायलेकरं #साहित्यिकाचा गाव #मातीखालची माती #स्पर्शकमळे #पाणभवरे #साहित्यिक जडण-घडण # ग्रामसंस्कृती #(रा. ना. सबनीस वाङ्मयपुरस्कार २००२) # मराठी लघुनिबंधाचा इतिहास #साहित्याची निर्मिती प्रक्रिया #ग्रामीणता : साहित्य आणि वास्तव आत्मचरित्र मीमांसा #"ग्रामीण साहित्य : स्वरूप व समस्या #(राज्य पुरस्कार १९८३) # मराठी साहित्य - समाज आणि संस्कृती #१९६० नंतरची सामाजिक स्थिती आणिसाहित्यातील नवे प्रवाह # डॉ. आनंद यादव - एक साहित्यिक प्रवास #ZOMBI #NANGARNI #GHARBHINTI #KACHVEL #MAULI #NATRANG #GOTAVALA #SHEVATCHI LADHAI #BHUMIKANYA #ZADVATA #UGVATI MANE #AADITAL #DAVARNI #MALAVARCHI MAINA #GHARJAWAI #KHALAL #UKHADLELI ZADE #SAINIK HO TUMACHYASATHI #MALYACHI MATI #MAI LEKARA #SAHITYIKACHA GAON #MATIKHALCHI MATI #SPARSHKAMALE #PANBHAVARE #SAHITYIK JADAN-GHADAN #GRAMSANSKRUTI #MARATHI LAGHUNIBANDHACHA ITIHAS #SAHITYACHI NIRMITI PRAKRIYA #GRAMINTA SAHITYA ANI VASTAV #AATMACHARITRA MIMANSA #GRAMIN SAHITYA : SWARUP ANI SAMASYA #1960 NANTARCHI SAMAJIK STHITI ANI SAHITYATEEL NAVE PRAVAH #DR. ANAND YADAV EK SAHITYIK PRAVAS
Customer Reviews
  • Rating StarTARUN BHARAT 22-05-1983

    संवेदनाशील मनाच्या महापुरातील ‘पाणभवरे’… अंत:करणात उफाळणाऱ्या भावनांना शब्दरूप करताना गतकालातील घटनांना नेमक्या शब्दात, नेटक्या आणि नेमस्त संस्कारीत भाषेत वाचकांपुढे उभे करण्याचे सामर्थ्य हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य. जवळ जवळ सहा वर्षांच्या काळात अलग अग लिहिलेल्या लेखांचे हे संकलन असूनही त्यात एक विलक्षण सातत्य आहे. सुसुगतता आहे. जीवनिष्ठा आणि तर्कसंगत, प्रामाणिक आचार यांची जाणीवपूर्वक जपणूक आहे. ग्रामीण आणि नागर संस्कृती यांच्यातील प्रवाशांना संस्कारक्षम मनाने इथे डोळसपणे अभ्यासलेले आहे. आयुष्यात जे जे घडले ते ते न्यायबुद्धीने स्वीकारलेले आहे. मानसिक द्वंद्व प्रामाणिकपणे रेखाटले आहे. आणि कुठेतरी मध्येच अनुभवातून शिकलेली समृद्ध झालेली विरक्तीही दिसते. ‘हातपाय थकले की छानपैकी चटकन मरून जायचे...’ (पृष्ठ ८८) असे एखादे उदास वाक्य लेखक लिहितो; परंतु ही क्षणिक मरगळ आहे हे वाचक समजतो. आशा-निराशा यांचे हेलकावे आणि त्यातून होणारी मानसिक जडणघडण यांचे एक अभावित, अनपेक्षित असे आगळे रूप या पुस्तकात दडले आहे. समचित्र वाचकाला ते आपोआप जाणवले. एकोणीस कथांमधून मन:चक्षूंसमोर उभा राहणारा ‘आनंद’ रसिक वाचकाला आनंद दिल्याशिवाय राहणार नाही. शब्द मेळवून चाले नेमक्या शब्दांत प्रसंग, घटना उभं करण्याचं विलक्षण सामर्थ्य आनंद यादवांच्या लेखणीत आहे. त्याचे प्रत्यंतर पुस्तकात जागोजाग येते. ‘घराकडचा रस्ता वाचताना’ ह्या वत्सल घरांमधून आणि प्रेमळ रस्त्यांवरून मी खूप हुंदडलो आहे. धुळीच्या कणांसारखा प्रत्येक घराच्या अंत:करणापर्यंत जाऊन आलो आहे. घर निरनिराळ्या मनाची, पण रस्त्यानं ती एकाच जागी सांभाळली आहेत. दहा मुलांच्या पित्याच्या अनुभवाने त्यानं त्या सर्वांना उराशी धरलं आहे.’ (पृष्ठ ७) इथं वाचक थबकला नाही तरच नवल. वडलांच्या धाकामुळं ढोरं राखणारं बालमन ‘मारत असला तरी मास्तर बरा’ असं म्हणत आणि ‘माणूस शिकून शाणंबी हुतय म्हण’ असा तर्क करत तेव्हा विनोदाची सुप्त लहर जाणवून जाते. नवे कायदे येतात आणि जन्मभर पोटच्या पोराप्रमाणे जपलेली जमीन हातची जाताच दादाची-वडलांची होणारी जीवघेणी उलघाल लिहिताना यादवांनी उभे केलेले शब्द सहृदय वाचकाला स्तब्ध करतात. ट्रॅन्झिटर गळ्यात अडकवून ‘वानरांच्या गावाला गेलेल्या आनंदा मामीच्या हातची शिणकुटासारखी जाड ज्वारीची भाकरी खातो आणि शहरी मोठेपणाची ग्रामस्थांना वाटणारी गंमत कशी निर्लेपपणे पाहतो ते वाचायलाच हवे.’ आंबा घाटात वर उभं राहावं आणि खाली कोकणातून बाव नदीच्या खोऱ्यातून गगनाच्या गाभाऱ्याकडे निघालेल्या धूम्रशलका पाहव्या म्हणजे जो दैवी आनंद वाटतो तोच किंवा तसाच आनंद या पुस्तकातीन वळविलेल्या शब्दामुळे होतो. सौंदर्यस्थळे दक्षिण महाराष्ट्रातले विशेषत: पूर्वीच्या कोल्हापूर संस्थानातील ग्रामीण जीवन त्याच्या गुणदोषांसह अभावितपणे या पुस्तकात पुढे आले आहे. या ग्रामीण भागात वाढून पुढे शहरात रमलेला, पोटासाठी शहरात शिरलेला ‘आन्दा’ क्रमाक्रमानं पण ठामपणे विकसित झाला आहे. ढोरांमागे फिरणारा गावंढळ’ पोरगा पुण्यात पोरांसमोर ‘शहरी’ प्राध्यापक म्हणून उभा राहतो. स्वत:च्या बळावर, बुद्धीवर. ‘जरासंध’मध्ये अगदी सुरुवातीलाच मित्रांचा एक प्रश्न येतो. ‘सध्या गावाकडं कधी जाता की नाही ?’ ‘जातो ना !’ आपल्याविषयी घेतलेली ही शंका लेखकाला पार अस्वस्थ करते कारण पुण्यात रमणारा जीव नाही. ग्रामीण जीवनाची ओढ आणि आपद् धर्म म्हणून स्वीकारलेले शहरी जीवन यांच्या मानसिक संघर्षातून स्फुरलेली कथाबीजे म्हणजे ‘शेवटची माती’, ‘आभाळगळ’, ‘ममी’, ‘पाटी आणि पोळी’, ‘बावीस एकरी’ ही अतिशय विलोभनीय सौंदर्य स्थळे आहेत. ‘पाटी आणि पोळी’त लेखकानं एक विलक्षण बोच उघड केली आहे. ... मला तिनं (पाटीनं) प्राध्यापक केल. माझ्या दोन भावांना कारकून करून रोज दोन वेळ पोटाला दिलं... ह्या स्वतंत्र भारतात एवढं पोटाला मिळतं, कुणी कार्यकर्ता अजून ताटातलं पळवून नेत नाही, हे का थोडं झालं ? (पृष्ठ १५०) यावर भाष्य हवेच का ? आत्मकथनाचा एक सुंदर प्रकार म्हणून या पुस्तकाकडे पहायला हवे. ग्रामीण आणि शहरी जीवनाकडे पाहण्याचा लेखकाचा दृष्टिकोन मूलत: स्वच्छ आणि निरामय आहे. जे अनुभवले ते शब्दरूप केले यामुळे कुठेही कृत्रिमतेचा लवलेशही नाही. ‘एक स्वदेशी प्रवास’ व ‘राष्ट्रीय महारस्ता’ या प्रकरणात शहरी जीवनातील अगतिगता फार प्रकर्षाने जाणवते. ‘मी आताशा निर्दय समंजस होत चाललो आहे’ (पृष्ठ १९३) आणि ‘उगाच तग धरून राहिलेली नि काल बाह्य झालेली आपली माणुसकी जागी होते आणि दिवस चांगला जात नाही’ ही दोन वाक्ये या संदर्भात फार बोलकी आहेत. लेखकाच्या सेखणीचे सामथ्र्य सर्वत्र जाणवते. कुणाचे अनुकरण नाही. सारे स्वत:चे ! सारे स्पष्ट ! मन:प्रवाहाचे हे भवरे फार खोल आहेत. प्रचंड ओढ असूनही ते तालबद्ध आहेत. हा मनाचा महापूर गुरुकृपेसारखा कल्लोळाने येत आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RAZOR SHARP
RAZOR SHARP by ASHWIN SANGHI Rating Star
सुनील माने, पुणे

लेखक अश्विन सांघी “द रोझाबल लाइन” या पहिल्याच कादंबरीने खूप लोकप्रिय झाला. प्राचीन भारतीय दंतकथा/ऐतिहासिक संदर्भ घेऊन त्याच्याभोवती आजच्या काळात रहस्यपूर्ण कथा लिहिणारा अश्विन. Chanakya’s Chant, The Krishna Key, The Sialkot Saga, Keepers of the Kalacakra, The Vault of Vishnu, The Magicians of Mazda अशा एकापेक्षा एक सुंदर रहस्य कादंबर्या “भारत सिरीज़” नावाने खूप प्रसिद्ध झाल्या. या सर्व कादंबऱ्या मी इंग्लिश मधेच वाचल्या. यांचा मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाउस यांच्याकडे उपलब्ध आहे. अश्विन सांघीने या भारत सिरीज शिवाय एक नवीन थ्रिल्लर सिरीज (कुत्ता कदम) सुरू केली आहे. त्यांतील पहिली कादंबरी Razor Sharp. एक सिरियल किलर मुंबईत एकानंतर एक खून पाडतोय. पोलिस चक्रावले आहेत. 1. रविवार दि २ फेब्रुवारी , गोरेगाव पश्चिममधे रवि मेहराचा खून होतो. त्याची बायको खुशी कॅाल सेंटरचा जॅाब करून रात्री ११.३० ला परत येते. खूप वेळा बेल वाजवून दार न उघडल्यामुळे ती उघडून आत येते तर रवि रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलेला असतो. त्याचे हात पाठीमागे नायलॅान दोरीने बांधलेले असतात. त्याच्या छातीत सुरा खुपसलेला असतो. त्याच्या तोंडात काहीतरी खाद्य पदार्थ असतो. 2. सोमवार दि १० फेब्रुवारी , लोअर परळमधे सुचंद्रा अग्रवालचा खून. तिची कामवाली आल्यावर दार न उघडल्यामुळे सोसायटीवाले दार तोडतात. आत सुचंद्राचा खून झालेला. हात नायलॅान दोरीने मागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात काहीतरी खाद्यपदार्थ. पोलिस चक्रावलेले. मग पोलिसखाते जागे होते. त्यांचा नावाजलेला अधिकारी जो सस्पेंड झालेला आहे, त्या प्रकाश कदम, DCP याला बोलावले जाते. राज्याचे गृहमंत्री ओंकार लोखंडे, त्यांचा माणूस कमिशनर चव्हाण आणि उपगृहमंत्री जयंत गायकवाड व त्यांचा माणूस SCP राणे, मुंबईचा डॅान भाऊ पाटील जो लोखंडेचाच माणूस असतो, हे सर्व या केसच्या मागावर लागतात. कदम हा राणेंच्या ओळखीचा खास ऑफिसर असतो म्हणून त्यालाही इन्व्हेस्टीगेशनला बोलावले जाते. 3. मंगळवार दि १८ फेब्रुवारी , ठाणे येथे मंगला शहाचा खून. तिच्या शेजारणीमुळे हे कळते. मंगलाचे हात नायलॅान दोरीने पाठीमागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात खाद्यपदार्थ. पोलिस अधिकारी शिंदे कदमबरोबर येतात. मंगलाच्या चेहऱ्याजवळ कदमला पेस्टिसाईडचा वास येतो. चेहरा निळसर झालेला. खून झाल्यावर बॅाडीला हलवलेले दिसते. तो ऑफिसमध्ये जुन्या खूनांचे फोटो तपासतो. त्यांचीही बॅाडी खून केल्यावर हलवलेली दिसते. चेहऱ्यावर निळसर झाक दिसते. तिन्ही खून “फिनेक” ब्रॅंडच्या चाकूने केलेले असतात. हे समान धागे कदम त्याची मुलगी केतुल बरोबर चर्चा करतो. केतुलची आई काही वर्षांपूर्वी कदमला सोडून गेलेली असते. ती भाऊ पाटीलची सावत्र बहीण असते. पण सध्या ती कुठे आहे व काय करते हे माहित नसते. केतुल कोर्टात काम करत असते तसेच ती “शक्ती” या NGO मधेही काम करते. शक्ती हे सोनापूरमधुन सुटका केलेल्या वेश्यांचे पुनर्वसन करत असते. निर्मल नावाचा तिचा मित्र एथिकल हॅकर असतो. तिच्यावर प्रेम करत असतो. कदमला हार्ट अटॅक येऊन गेलेला व स्टेंट बसवलेला असतो. Depression मुळे त्याची सायकॅालॅाजिस्टकडे ट्रिटमेंट चालू असते. कदमला या तिन्ही केसमधे आणखी एक धागा सापडतो. हे खून आठ दिवसांच्या अंतरावर झालेले असतात. म्हणजे पुढचा खून बुधवारी होणार असल्याचे तो राणे व शिंदेला सांगतो. 4. बुधवार दि २६ फेब्रुवारी, कांदिवली पश्चिम, लक्ष्मी बुधीराजाचा खून. तोच पॅटर्न. 5. गुरुवार दि ५ मार्च, खार पश्चिम, गुरुराज अदवानीचा खून सेम पॅटर्न. गुरूराज हा युट्युबवरचा प्रसिद्ध सिंगर असतो. 6. शुक्रवार दि १३ मार्च, ताडदेव, दिव्या शुक्रपाणीवर खूनी हल्ला होतो. पण ती जबर जखमी होते. ती फिटनेस ट्रेनर असल्यामुळे खुन्याबरोबर झटापट करते. पण चाकू पोटात घुसल्यामुळे ती जबर जखमी होते. हात बांधलेले असतानाही ती फोनवर “सिरी” ला तिच्या भावाला, ध्रुवला फोन लावायला सांगते. फोन लागतो व ती “हेल्प हेल्प” एव्हढेच बोलून बेशुद्ध होते. म्हणून खुनी पळून जातो. ध्रुव तिथे पोहोचून तिला हॅास्पिटलमधे ॲडमिट करतो. पोलिसांना तिथे खुन्याची बॅग सापडते. त्यांत नायलॅानची दोरी, बेगॅान स्प्रे व राजमाच्या बिया सापडतात. तिसऱ्या खुनाआधी पोलिस संशयित म्हणून राजू दाभाडेला अटक करतात. पण चौथ्या खूनाच्या वेळेस तो कस्टडीतच असतो. मग खूनी कोण? 7. शनिवार दि २१ मार्च, बान्द्रा पश्चिम, शनिया डिसौजाचा खून होतो. सेम मोडस ऑपरेंडी . 8. शनिवार दि २८ मार्च, चेंबूर, ७१ वर्षांच्या राहुल सिंह नावाच्या सिख व्यक्तिचा खून होतो. तीच पध्दत. यानंतर एक दिवस कदम KBC बघत असताना अमिताभ बच्चन एका सिनेमाचं गाणं लावून त्याचा पिक्चर ओळखायला सांगतात. ते गाणं असते- “सोमवार को हम मिले मंगलवार को नयन बुध को मेरी निंद खुली जुम्मेरात को चैन अरे शुक्र शनी कटे मुश्किलसे आज है इतवार सात दिनों में हो गया जैसे सात जनम का प्यार” आणि कदमच्या डोक्यात एकदम प्रकाश पडतो… अरे, हे सर्व खून असेच रविवार ते शनिवार एक एका वारी घडलेत! पण शनिवारी दोन खून कसे? याच्या मागे काही खगोलशास्त्र किंवा भविष्याचा तर संबंध नाही? कदमला आठवतं की शेजारी राहणारा डॉ. देसाईला पण भविष्य-खगोलशास्त्राची आवड व माहिती आहे. ( डॅाक्टर कडे सापडलेल्या नायलॅानचे रंगीत दोर व फिनेक कंपनीचा चाकू यामुळे एक संशयित म्हणून कदमने त्याला अटक करून पुछताछ केलेली असते) कदम लगेच डॅाक्टरांकडे जातो. त्यांची माफी मागून त्यांना या प्रश्नांत मदत करायला सांगतो. तो या सर्व खुनांचा सिक्वेन्स सांगतो. ते प्रत्येक वारी का घडले? मग शनिवारी दोन का? यापुढे कोणता वार? कुणाचा खून? डॅाक्टर सांगतात की भारतीय भविष्य व खगोल शास्त्रात नवग्रहांना खूप महत्व आहे. रवि, सोम(चंद्र), मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि, राहू आणि केतु. यांचे रंग व धान्य वेगवेगळे असतात. त्या त्या ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी ते वापरले जातात. कदम ही माहिती लिहून घेतो. त्यावरून प्रत्येक खुनात वापरण्यात आलेले फिनेक कंपनीचे चाकू, वेगवेगळ्या रंगांचे नायलॅान दोर व तोंडातील पदार्थ यांचा संबंध जोडून एक तख्ता तयार करतोः- “रवि मेहरा-रविवार-सोनेरी दोर- तोंडात गहू-दिशा पूर्व सुचंद्रा-सोमवार-चंदेरी दोर-तोंडात तांदूळ-दिशा पश्चिम मंगला शाह-मंगळवार-लाल दोर-तोंडात तूर डाळ- दिशा दक्षिण लक्ष्मी बुधीराजा-बुधवार-हिरवा दोर-तोंडात हिरवे मूग-दिशा उत्तर गुरुराज अदवानी-गुरूवार-पिवळा दोर-तोंडात हरबरा डाळ-दिशा उत्तर पूर्व(ईशान्य) दिव्या शुक्रपाणी-शुक्रवार-पांढरा दोर-राजमा-दिशा दक्षिण पूर्व शनिया डिसौजा-शनिवार-काळा दोर-तोंडात काळे तिळ-दिशा उत्तर पश्चिम राहुल सिंग-शनिवार-निळा दोर-तोंडात उडीद दाळ-दिशा दक्षिण पश्चिम” आता उरला एकच ग्रह-केतु. केतुचा वार मंगळवार. ग्रे रंग, चना दाळ, दिशा दक्षिण पश्चिम. “केतु”म्हणजे कदमची मुलगी केतुलचा नंबर लागणार? आज तर मंगळवारच आहे! कदम घाबरून जातो! तो केतुलला फोन करतो पण तो बंद लागतो. ती सध्या कुठे आहे? कोर्टात? कदम आपल्या मुलीला वाचवतो का? खरा खुनी कोण असतो? तो पकडला जातो का? त्याचे यामागचा उद्देश काय असतो? याच्यामध्ये अजून कोण सामिल असतं का? याची उत्तरे मिळण्यासाठी वाचावी लागेल अश्विन सांघी यांची कादंबरी Razor Sharp. ...Read more

BANGARWADI
BANGARWADI by VYANKATESH MADGULKAR Rating Star
Sameer Kazi

सुंदर अशी कादंबरी माणदेशी बनगरवाडी तशी कोरडी रखरखती पण, यातील पात्रात मायेचा करुणेचाओलावा मनात घर करुन जातो