* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: GRAMSANSKRUTI
  • Availability : Available
  • ISBN : 9788171619764
  • Edition : 3
  • Publishing Year : JANUARY 2000
  • Weight : 200.00 gms
  • Pages : 212
  • Language : MARATHI
  • Category : LITERATURE
  • Available in Combos :ANAND YADAV COMBO SET-33 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
DURING THE 50 YEARS AFTER INDEPENDENCE, THE RURAL LIFE AND CULTURE HAS UNDERGONE A TOTAL CHANGE. THIS CHANGE ALMOST DESTROYED THE VILLAGES PRIOR TO INDEPENDENCE. A FEW TRACES OF THESE PREINDEPENDENT PERIOD VILLAGES ARE NOW SEEN IN THE REMOTEST "ADIVASI` PART OF THE HILLY REGIONS OF MAHARASHTRA. ANAND YADAV HAS TRIED TO PICTURIZE THE SOCIAL, FINANCIAL, EDUCATIONAL, PHYSICAL, CULTURAL SIDE OF THESE CHANGED VILLAGES IN THIS BOOK. HE HIMSELF HAS WITNESSED THE TRANSFORMATION INTO THIS NEW ERA. THE READERS REALIZE THIS AS THROUGHOUT THE BOOK YADAV`S EXPERIENCES COME TO MEET US. THIS CAN BE THE FIRST MARATHI BOOK TO GUIDE THE MARATHI PHILOSOPHERS, REFORMERS, LITTERATEURS, PROFESSORS, ACTIVISTS, AND THE YOUNG GENERATION. IT WILL IGNITE ALL THE MINDS; YOUNG OR OLD.
स्वातंत्र्योत्तर काळातील पन्नास वर्षांत ग्रामजीवन आणि ग्रामसंस्कृती यांच्यात मूलगामी स्थित्यंतरे झाली. त्यांतून स्वातंत्र्यपूर्वकाळातील खेडे जवळजवळ नष्ट झाले. त्याचे फार थोडे अवशेष महाराष्ट्राच्या पार आंतरिक भागात, डोंगरकपारींच्या आदिवासी मुलखात शिल्लक राहिले. महाराष्ट्राच्या या बदलत्या खेड्याचे एकूणच सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, प्राकृतिक, सांस्कृतिक अंतरंग प्रस्तुत ग्रंथात उकलून दाखविण्याचा आनंद यादवांनी प्रयत्न केला आहे. आनंद यादव या नवयुगसदृश स्थित्यंतराचे प्रत्यक्ष साक्षी आहेत. त्यांनी महाराष्ट्राचे बदलते खेडे प्रत्यक्ष अनुभवल्याचा प्रत्यय या ग्रंथात पानोपानी येतो. मराठी विचारवंत, सुधारक, साहित्यिक, प्राध्यापक, कार्यकर्ते, संस्कृतिउपासक, चळवळकर्ती तरुण पिढी, सामाजिक शास्त्रांचे अभ्यासक आणि जाणकार वाचक या सर्वांनाच मार्गदर्शक व प्रेरक ठरेल अशा योग्यतेचा हा पहिलाच मराठी ग्रंथ आहे.
रा.ना. सबनीस वाङ्मय पुरस्कार २००२
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#झोंबी #(महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार १९८८-८९) #(महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार १९८८-८९) #(दि फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स -उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार १९८९) #(मारवाडी संमेलन पुरस्कार १९९०) # (साहित्य अकादमी पुरस्कार १९९०) #(प्रवरानगर - विखेपाटील पुरस्कार १९९१) #(संजीवनी साहित्य पुरस्कार, कोपरगाव १९९४) # नांगरणी # (रोहमारे ग्रामीण पुरस्कार १९९०) #घरभिंती #काचवेल #माऊली # (कालीमाता साहित्य पुरस्कार १९८६ #परिमल लेखन पुरस्कार १९८६ # नटरंग #(महाराष्ट्र राज्य पुरस्कार १९८२) # गोतावळा # शेवटची लढाई #(राज्य पुरस्कार २००१-०२) #भूमिकन्या #झाडवाटा # उगवती मने #(राज्य पुरस्कार २००२-०३) # आदिताल # डवरणी #माळावरची मैना # घरजावई #खळाळ #उखडलेली झाडं #सैनिक हो, तुमच्यासाठी... #मळ्याची माती #मायलेकरं #साहित्यिकाचा गाव #मातीखालची माती #स्पर्शकमळे #पाणभवरे #साहित्यिक जडण-घडण # ग्रामसंस्कृती #(रा. ना. सबनीस वाङ्मयपुरस्कार २००२) # मराठी लघुनिबंधाचा इतिहास #साहित्याची निर्मिती प्रक्रिया #ग्रामीणता : साहित्य आणि वास्तव आत्मचरित्र मीमांसा #"ग्रामीण साहित्य : स्वरूप व समस्या #(राज्य पुरस्कार १९८३) # मराठी साहित्य - समाज आणि संस्कृती #१९६० नंतरची सामाजिक स्थिती आणिसाहित्यातील नवे प्रवाह # डॉ. आनंद यादव - एक साहित्यिक प्रवास #ZOMBI #NANGARNI #GHARBHINTI #KACHVEL #MAULI #NATRANG #GOTAVALA #SHEVATCHI LADHAI #BHUMIKANYA #ZADVATA #UGVATI MANE #AADITAL #DAVARNI #MALAVARCHI MAINA #GHARJAWAI #KHALAL #UKHADLELI ZADE #SAINIK HO TUMACHYASATHI #MALYACHI MATI #MAI LEKARA #SAHITYIKACHA GAON #MATIKHALCHI MATI #SPARSHKAMALE #PANBHAVARE #SAHITYIK JADAN-GHADAN #GRAMSANSKRUTI #MARATHI LAGHUNIBANDHACHA ITIHAS #SAHITYACHI NIRMITI PRAKRIYA #GRAMINTA SAHITYA ANI VASTAV #AATMACHARITRA MIMANSA #GRAMIN SAHITYA : SWARUP ANI SAMASYA #1960 NANTARCHI SAMAJIK STHITI ANI SAHITYATEEL NAVE PRAVAH #DR. ANAND YADAV EK SAHITYIK PRAVAS
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKSATTA 25-06-2000

    ग्रामीण महाराष्ट्रातील परिवर्तनांचा मागोवा... १९६० पासून ग्रामीण साहित्याचा जो प्रवाह मराठी साहित्यात जोर धरु लागला त्याचे आघाडीचे शिलेदार होते डॉ. आनंद यादव. ग्रामीण जीवनाचं वास्तव दर्शन त्यांनी आपल्या ‘गोतावळा’, ‘झोंबी’ आणि इतर कादंबऱ्यांतून तसेच थांतून घडवले. विशेष म्हणजे ग्रामीण साहित्याची संकल्पना मांडून, परंपरा दाखवून, समिक्षेसाठी उपयुक्त असे निकषही त्यांनी रुजवले, त्यांच्या ललित लेखनातून आणि समिक्षेतून त्यांची ग्रामजीवनाबद्दलची ओढ, ग्रामीण संस्कृतीत होणाऱ्या विघटनाबद्दलची खंत सातत्याने दिसते. ‘ग्रामसंस्कृती : दशा आणि दिशा’ या त्यांच्या लेख-संग्रहात आनंद यादव भारताचा कणाच असणाऱ्या एकेकाळच्या ‘ग्रामसंस्कृती’त होत गेलेली स्थित्यंतरे वाचकांसमोर मांडतात. मुळात हे लेख म्हणजे ‘दैनिक सकाळ’ च्या रविवार आवृत्तीत (१९९८ मध्ये) प्रसिद्ध झालेले सदर आहे. सर्वसामान्य वाचकवर्ग डोळ्यांसमोर असल्यानेच बहुधा सोप्या, सुटसुटीत भाषेत ग्रामीण संस्कृतीची निर्मिती कशी झाली येथपासून ते आज ग्रामीण संस्कृतीचा ऱ्हास का होतो आहे येथपर्यंतचा मागोवा यादवांनी घेतला आहे. प्रकृती, विकृती आणि संस्कृती या शब्दांतील नाते स्पष्ट करीत संस्कृती हा मानवी मूळ स्वभावाचाच एक भाग कसा आहे हे आनंद यादव स्पष्ट करतात. संस्कृती चांगल्या कृतींची आणि गतिमान असते. स्वास्थ्य मिळाल्यावरच माणूस संस्कृती निर्माण करु शकतो हे पहिल्या लेखातून स्पष्ट होते. ‘अंतरंगातील एकता’ या लेखात भारतात ग्रामसंस्कृतीचा आत्मा आहे आणि भारतात शेती कधीच संपुष्टात येणार नाही हे ठसवलं गेलं आहे. याच लेखात, भारतात ऐक्य राखणाऱ्या हिंदू धर्माच्या लवचिकतेबद्दलही थोडे विवेचन येते. पूर्वापार हिंदूंनी मुसलमान व खिश्चनांना सोबत घेऊनच विकास केला आहे. ‘अंतरंगातील एकात्मता हाच भारतीय संस्कृतीचा गाभा आहे’ असे विधान यादवांनी केले आहे. भारतीय संस्कृतीत अंतरंगात एकात्मता असली तरी बहिरंगात विविधता कशी आहे त्याबद्दल लगेचच पुढल्या लेखात लेखकाने सांगितले आहे. विशेषत: महाराष्ट्रात कोकण, विदर्भ आणि मराठवाडा या भागातील प्राकृतिक वैशिष्टये वेगळी असल्याने तेथील माणसांची घरे, शेतीतील उत्पादने, पोशाख, राहणी या सगळ्यांतच फरक पडला आहे. याखेरीज त्या-त्या गावाची म्हणून काही वैशिष्टये असतात. (उदा. कोल्हापूरच्या तालमी) आणि त्यामुळेही ते गाव सांस्कृतिकदृष्टया इतर गावांहून कसे वेगळे ठरते याचे सोदाहरण विवेचन आनंद यादवांनी केले आहे. शेतकऱ्याची निसर्गाबद्दलची जाण कशी असते, दिवसाचा कोणता प्रहर आहे हे त्याला कसे चटकन समजते, नुसत्या आवाजावरुन तो पक्षी कसा ओळखतो हे सांगत शेतकरी ‘निसर्गाचं लेकरुच’ असतो, असे यादव सांगतात. सुशिक्षितांपेक्षा शेतकऱ्यांची भाषाही कशी वेगळी असते याचेही नमुने त्यांना दिले आहेत. कष्टाचं, साधं पण सुखी-समाधानी आयुष्य जगणाऱ्या शेतकऱ्याचं एक आदर्श चित्रच यादवांनी वाचकांच्या डोळ्यांसमोर उभं केलं आहे. ‘ग्रामसंस्कृती’ या पुस्तकाचं स्वरुप बरंचसं माहितीवजा आहे. क्वचित लेखकाने स्वत:चे व्यक्तिगत अनुभव सांगितले आहेत, त्यामुळे शेतकऱ्याचा एकूण दिनक्रम कसा असतो, मोट जुंपून शेताला पाणी कसे दिले जाते, भांगलण-खुरपण सतत कशी करावी लागते, त्यासाठी कोणती साधने वापरतात याबद्दल बारकाईने माहिती आणि निरीक्षणे लेखकाने नोंदवली आहेत. प्रतिभावंत कवी ‘पावसाची गाणी’ लिहितात पण त्यांना पावसाने शेतकऱ्याची केलेली दैना दिसत नाही. तसेच ग्रामीण साहित्य लिहिणारे प्रारंभीचे लेखक इनामदार, पाटील, कुलकर्णी यांच्याच घरांची चित्रणे कशी करीत याबद्दलही यादव उपरोधाने लिहितात. गावाची जीवनसरणी कशी असते, विशेषत: बलुतेदारी पद्धत कशी चालत होता, गावात पूर्वापार सहकाराने कामे कशी चालत, लग्नसोहळे गावकऱ्यांच्या मदतीनेच कसे पार पडत, जत्रेच्या दिवसात गावातला उत्साह कसा असे, सणांचा फराळ बायका एकत्र येऊन कसा करीत याबद्दल लेखक सांगतो. एकंदर, पूर्वीचा गाव व्यक्तिवादी संस्कृती मानत नव्हता, तरीही गावातच व्यक्तीचा, कुटुंबाचा आणि गावाचाही सर्वांगीण विकास कसा होत असे, याबद्दलची रोचक माहिती यादवांनी दिली आहे. पूर्वी ग्रामसंस्कृतीवर निसर्गाचे निरंकुश नियंत्रण कसे असे याबद्दलही यादव सांगतात. शेती करण्यापूर्वी शेतकरी पाच मावल्यांची पूजा करी, शेतावर कीड, टोळधाडी कशा येत, उंदीर कसे नुकसान करीत, शेतकऱ्याची अर्थव्यवस्था प्रत्यक्ष चलनाखेरीजच कशी चाले, पैसे घेऊन धान्य विकणे शेतकऱ्याला कमीपणाचे कसे वाटे, लोकसंख्येवर कोणाचेच नियंत्रण कसे नसे, रोगराईत माणसे कशी मरत, अशा अनेक गोष्टींबद्दलची माहिती या पुस्तकात आहे. शेतकऱ्याचं काम हे निर्मितीचं आणि सृजनाचं कसं असतं हे काम किती हळुवारपणे, दक्षतेनं करावं लागतं या संदर्भातला एक लेख सदर पुस्तकात आहे. विहिरींचेही वेगवेगळे प्रकार कसे असतात याबद्दलची माहिती जिज्ञासूंना मजेशीर वाटेल. ‘मातीत उगवणारी मुलं’ या लेखात यादव ग्रामीण संस्कृती आणि शहरी संस्कृतीची तुलना करताना दिसतात. गावातील मुलं ‘मातीत पेरलेल्या बियाणासारखी’ सहज कशी वाढतात याबद्दल यादव सांगतात. शहरी व ग्रामीण घरांची तुलना एका लेखात येते. शहरातली घरं म्हणजे बंद ब्लॉक्स अगदी ‘छानदार घरकुलं’ असतात, परंतु शेतकऱ्याचं रानातलं घर कसं सामान-सुमानाने भरलेलं, उंदीर, घुशींनाही आसरा देणारं असतं याचं चित्र डोळ्यांसमोर उभं राहतं. मात्र घरात लग्न ठरलं की मग मात्र गावातली घरं कशी रुप पालटतात तेही कळतं.’ गावातली अस्वास्थ्याचीही कारणमीमांसा आनंद यादवांनी केली आहे. वाढत जाणाऱ्या लोकसंख्येमुळे गावातील शेतजमिनीवर खाणाऱ्या तोंडाचा भार अधिक पडू लागला, कुटुंबं मोडली, जमिनीच्या वाटण्या झाल्या. गावातल्या अस्वास्थ्याचं हे पहिलं कारण होतं, चातुर्वण्र्य व्यवस्थेमुळे कनिष्ठ जाती, भरडल्या जाऊ लागल्या हे अस्वास्थ्याचं दुसरं कारण सांगितलं आहे. व्यवसाय बदलण्याचे स्वातंत्र नसल्याने, गावगाड्यात उपाशी राहणाऱ्या जमाती चोऱ्या करु लागल्या हेही गावातील अस्वस्थतेला कारण ठरलं, अज्ञान, अंधश्रद्धा, संशयीपणा, वैर यामुळेही गावाचं स्वास्थ्य नेहमीच बिघडताना दिसतं. या अस्वास्थ्यामुळे, असुरक्षिततेमुळेच गावकरी खूप श्रद्धाळू बनतात आणि अघोरी शक्तींवरही विश्वास ठेवताना दिसतात. ‘अवनतीचा काळ’ या लेखापासून पुढचे सुमारे वीस -- महाराष्ट्रातील ग्रामजीवन कसे विस्कळीत, विघटित आणि उध्वस्त होत गेले ते सांगणारे आहेत. इंग्रजांच्या आगमनामुळे गावांची स्वयंपूर्णता नष्ट झाली, वस्तुविनिमय पद्धत मागे पडून चलनाला महत्व आले. औद्योगिक क्रांतीचे परिणाम म्हणून आगगाडी, मोटारी आल्या आणि गाव हळूहळू बदलू लागला. गुजराती, मारवाडी व्यापारी महाराष्ट्रात येऊन लुबाडू लागले, इंग्रज तर कच्चा माल त्यांच्या देशात पाठवून गावांची लुबाडणूक करीतच होते. फायदे झाले ते एवढेच की गावात आरोग्यसोयी वाढल्या आणि शिक्षण दिले जाऊ लागले. लोकशाही, व्यक्तिस्वातंत्र्य यासारख्या नव्या मूल्यांमुळे एकंदर भारताचे चित्रच बदलू लागले. भौतिकवाद, प्रवृत्तीवादाला महत्व आले. समाजसुधारणा चळवळी सुरू झाल्या. बहुजन समाजातूनही सुधारक मतांचे नेतृत्व पुढे येऊ लागले. म. फुले यांनी पहिल्यांदा शेतकऱ्याच्या दु:स्थितीकडे लक्ष वेधले. आनंद यादव तर त्यांना नव्या ग्रामसंस्कृतीचे आद्य प्रवर्तक म्हणतात. ते महाराष्ट्राचे मार्क्स होते असेही त्यांना वाटते. त्याखालोखाल शाहू राजांनी केलेल्या समाजसुधारणेच्या प्रयत्नांचाही ते गौरवाने उल्लेख करतात. भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेने शेतकऱ्यांना काम करता-करता शिकण्याची संधी दिली हेही महत्वाचे होते. महात्मा गांधींनी ‘खेड्याकडे चला’ ही घोषणा केल्याने खेड्यापाड्यातील शेतकऱ्यांना ते कसे ‘आपले’ वाटले आणि त्यांचा काँग्रेसकडे ओढा कसा राहिला याबद्दलही यादव सांगतात. दुसऱ्या महायुद्धाची झळ भारतीय खेंड्यांना कशी लागली, रेशनिंग आले आणि शेतकरी मोठ्या संख्येने शहराकडे कसे धावू लागले हे सांगून ‘‘गांधीजी आणखी काही वर्षे राहिले असते तर ग्रामीण समाजात आणि संस्कृतीत मूलभूत परिवर्तने झपाट्याने घडली असती... आता ते स्वप्न फार दूर गेले आहे,’’ अशी खंत आनंद यादवांनी व्यक्त केली आहे. पंचवार्षिक योजना आल्या, पण त्याचे फायदे बडे शेतकरीच खाऊन गेले आणि सामान्य शेतकरी मात्र भुके, कंगाल झाले हे वास्तव पुढे मांडले आहे. ग्रामीण जनतेची पिळवणूक स्वातंत्र्योत्तर काळात गावागावांत सतावणारा अस्पृश्यतेचा प्रश्न धसाला लागला. डॉ. आंबेडकरांच्या अथक प्रयत्नांमुळे अस्पृश्यांची स्थिती थोडीफार सुधारली पण आज लोकसंख्यावाढीमुळे सगळीकडेच बेकारी दिसते आहे. ‘कूळ कायदा’ ही आणखीन एक सकारात्मक गोष्ट स्वातंत्र्योत्तर काळात आली, पण इथेही बड्या जमीनदारांनी स्वतःचा फायदा करून घेऊन गरीब शेतकऱ्यांना नागवले. ही वस्तुस्थिती सांगून ‘‘देशाच्या विकास योजनांच्या माध्यमातून ग्रामीण विभागात जाणारे एस.टी.चे धूळमार्ग किंवा रेल्वेचे रुळमार्ग खेड्यांच्या विकासासाठी न जाता प्रत्यक्षात शोषणासाठीच गेले,’’ अशी खंत आनंद यादव व्यक्त करतात. नव्या काळात शेतीसाठी नवी बियाणं, नवी खतं आली, पण त्याने उत्पादन वाढलं तरी चव गेली. मोट जाऊन आज विहिरींवर विजेचा पंप आला, पण त्याचा कारभार वीजपुरवठ्याच्या मर्यादेवर अवलंबून. तो बिघडला तर शेतकऱ्याला नवा खर्च. ट्रॅक्टर, मळणी यंत्रे आली आणि बैलांचं महत्व कमी झालं, पण या सगळ्यामुळे नैसर्गिक जीवनचक्रापासून शेती दूर गेली आणि आत्मनिर्भर असलेला शेतकरी परावलंबी झाला. शहरात आहे ते आपल्याकडेही हवं या ईर्षेपोटी शेतकऱ्याचा आत्माच हरवला. मोटरसायकल, रेडिओ, टी.व्ही. इ. गोष्टींमुळे गावात वरवरची आधुनिकता आली. सहकाराच्या नावाखाली बड्या शेतकऱ्यांनी राजकीय सत्ता राखल्या आणि छोट्या शेतकऱ्यांना लुबाडून स्वत: गब्बर झाले. ही परिवर्तने ग्रामीण संस्कृतीला विघातक ठरली. जातीव्यवस्था हे ग्रामसंस्कृतीचे वैशिष्टय आणि आधुनिकतेतील अडचण. आज वरवर जाती विसरल्या गेल्या आहेत, पण त्या आहेतच ! फरक एवढाच की राजकारण आता जातीपेक्षा पैसा पणाला लावून खेळलं जातंय ! आज ग्रामीण कलांचा ऱ्हास होतो आहे, शिक्षणसंस्था राजकीय सत्ता टिकविण्याच्या नादात पैसे खेचण्याची केंद्रे बनल्या आहेत. ग्रामीण तरुणाला कुठेच काम मिळत नसल्याने तो गोंधळला आहे, नेतृत्व बहुजन समाजातलं असलं तरी भ्रष्टाचार, लाचलुचपतीने डागाळलेलं आहे. चळवळींमुळे थोडा आशावाद आहे. या साऱ्यांची कारणमीमांसा आनंद यादवांनी शेवटच्या काही प्रकरणांतून दिली आहे आणि यातूनही कसा मार्ग काढता येईल हे सांगणारे काही उपायही नोंदवले आहेत. ‘ग्रामसंस्कृती’ हा माहिती देणारा लेखसंग्रह असल्याने काही वैशिष्टयपूर्ण शब्द आनंद यादव वापरतात. त्यांचं स्पष्टीकरणही ते देतात. कित्येक ठिकाणी यादवांची भाषा लालित्यपूर्ण होते. उदा. ‘या वाटा किंवा रस्ते लेकुरवाळे वाटतात’, ‘पेहलवानांचे कळप हत्तीच्या कळपासारखे दिसत’, फताड्या शिंगांच्या म्हशींना ‘ओव्हरटेक’ करणं ट्रक ड्रायव्हरलाही महाकठीण!’ लेखांना दिलेली शीर्षकही बोलकी आहेत. उदा. ‘निसर्गाचं लेकरु’, ‘मोकळे राज्य’,‘मातीत उगवणारी मुलं’, दूर गेलेले स्वप्न’, ‘रस निघून गेलेला ऊस’, ‘नासलेल्या शिक्षणसंस्था’ इत्यादी. एकंदर, ग्रामीण समाजशास्त्राच्या आणि ग्रामीण साहित्याच्या अभ्यासकाला उपयुक्त वाटणारा आणि जिज्ञासू वाचकाला नव्या - जुन्या ग्रामसंस्कृतीद्दल बरीच माहिती देणारा असा हा आनंद यादव यांचा हा लेखसंग्रह आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more

I HAVE A DREAM
I HAVE A DREAM by RASHMI BANSAL Rating Star
Krishna Diwate

‘स्टे हंग्री स्टे फूलीश’ आणि ‘कनेक्ट द डॉटस’ या बेस्ट सेलर पुस्तकाच्या लेखिका ‘समाजातल्या परंपरागत समस्या सोडवण्याचा नवा मार्ग शोधून काढणार्‍या वीस सामाजिक उद्योजकांच्या प्रेरणादायी कहाण्या’ हे वाक्य पुस्तकाचे पहिले पान उघडले आणि दिसले. त्यामुळे माझ कुतुहल चाळवले आणि ते पुस्तक वाचायला सुरुवात केली. मनोगतात लेखिका म्हणतात की, आता नव्या दमाचे, डोक्याने आणि मनाने ही विचार करणारे काही जण एखाद्याच्या नजरेतील दुःख ओळखतात, पेटून उठतात; पण ते त्याच्यावर विचार एखाद्या उद्योजकाप्रमाणे करतात. म्हणून ते ‘सामाजिक उद्योजक.’ नफा मिळविण्याचा हव्यास नसला तरी ते बिझनेस मधील तत्वे वापरून ती गोष्ट साध्य करतात. हे काही तरी वेगळे आपण वाचत आहोत असे मला वाटले. त्यामुळेच ते पुस्तक वाचायला घेतले. ह्या मध्ये वीस लोकांची चरीत्रे आहेत. ते सर्व भारतीय, उच्चशिक्षित तरूण तरूणी आहेत. कोणी त्यातील शास्त्रज्ञ आहेत तर कोणी मरिन बायोलॉजिस्ट, आयआयटी, आयआयएम ग्रॅज्युएट आहेत पण कोणत्या कोणत्या सामाजिक प्रश्नाने ते अस्वस्थ झाले आणि नेहमीच्या मार्गाने न जाता वेगळीच वाट पकडली. पुस्तकात ‘रेनमेकर्स,’ ‘चेंजमेकर्स’ व ‘स्पिरिच्युअल कॅपिटॅलिस्ट’ असे तीन भाग आहेत. प्रत्येकात अनुक्रमे अकरा,सहा व तीन व्यक्तीमत्वांची ओळख करून दिली आहे. ‘सुलभ’ ही आधुनिक टॉयलेटस उभारणारे बिंदेश्वर पाठक ह्याच्या चरित्राने पुस्तकाची सुरुवात होते. जातीने बिहारमधील ब्राह्मण. पण लहानपणी टॉयलेटस साफ करणार्‍याला हात लावला त्यामुळे आजीने अक्षरशः शेण, गोमुत्र खायला लावले. पण त्याच बिंद्रेश्वरांनी अगदी योगायोगाने ह्याच क्षेत्रात काम करण्याचे ठरविले. अर्थात ही वाट निश्चितच सोपी नव्हती. अनेक हालअपेष्टा सोसत, जगाचे धक्के खात, अनेक समस्यांना तोंड देत आपले स्वप्न ‘सुलभ शौचालयाच्या’ माध्यमातून सुरु केले. तो सगळा खडतर प्रवास अर्थात पुस्तकातूनच वाचायला हवा. त्यासाठी त्यांनी केवळ ती यंत्रणा तयार केली नाही तर ती टॉयलेटस बांधून, त्यासाठी लागणारी प्रेरणा, शिक्षण, संभाषण, ट्रेनिंग, पाठपुरावा अशा सर्वच गोष्टी ‘सुलभ’ तर्फेच संभाळल्या जातात. सध्या ही संस्था स्वबळावर चालते. 100 ते 125 कोटी इतके तिचे वर्षाचे उपन्न आहे. इतकेच नाही पूर्वी जे लोक सफाईचे काम करत असत त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च संस्था करत आहे. ‘सुलभ पब्लिक स्कूल’ नावाने शाळा सुरु केली आहे. तरूणांसाठी व्होकेशनल क्लासेस चालवले जातात. म्हणजे मिळालेला नफा पुन्हा त्याच सफाई कामगारांच्या कल्याणासाठी वापरला जातो. टॉयलेटस बांधून भरपूर पैसा मिळवता येतो हे वाक्य पचायला जरा जडच जाते. अनिता आहुजा ही दिल्लीत सुखवस्तू कुटूंबात रहाणारी सामान्य स्त्री. पण कचरा वेचणार्‍या मुलांचे हाल पाहून त्यांच्यासाठी काही तरी करावे असे तिने ठरविले. तिने 1998 मध्ये कॉन्झर्व्ह नावाची संस्था उभी केली. व त्यातून पहिला प्रोजेक्ट सुरु केला तो म्हणजे आजुबाजूच्या परिसरातील कचरा उचलून त्याचे कंपोस्टखत तयार करणे. कचरा गोळा करण्यासाठी चांगल्या ढकलगाड्या आणल्या, युनिफॉर्म, आय कार्डची सोय केली. 2002 पर्यंत एक पूर्ण वेळ काम करणारी मोठी संस्था बनली. त्याचवेळी त्यांनी प्लॅस्टीकच्या कचर्‍यावर प्रयोग सुरु केले. तिचे पती शलभ ह्यांनी बिटस पिलानी मधून इंजिनिअरींग केले आहे. त्यांच्या मदतीने तिने फॅक्टरी सुरु करण्याचे ठरविले. शलभने मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक शीटस निर्मिती करू शकेल असे मशीन तयार केले. त्यासाठी अर्थातच अनेक प्रश्न समोर उभॆ राहिले. चुका झाल्या, ठोकरा खाल्या पण त्यातून वाट काढत त्यांनी चिकाटीने प्रयत्न सुरुच ठेवले. आज दोघे मिळून कचर्‍यातील प्लॅस्टिक पिशव्या वापरून आकर्षक अशा हॅडबॅगस तयार करण्याचा कारखाना चालवतात. जे लोक सुरुवातीला केवळ कचरा उचलण्याचे काम करत होते, त्यांच्या काही कौशल्य दिसले की त्यांना वेगळे काढून ट्रेनिंग दिले जाते. मशीनवर असिस्टंटचे काम करू लागतात त्यातून काही लोक तर ग्रुप लिडर ही झाले आहेत. कटींग करणॆ, क्वालिटी तपासणॆ, फिनिंशींग, पॅकिंग अशी सर्व महत्वाची कामे ते करतात. आता ते कामगार झाल्यामुळॆ त्यांना चांगला पगार, प्रॉव्हिडंट फंड, ओव्हरटाईम अशा सुविधा मिळू लागल्या त्यापेक्षा ही जास्त त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळाली. त्यांच्या साठी हे नवीनच आहे. अनिता व शलभ दोघॆही मेहनत घेतात पण एनजीओ असून ही भरपूर पैसा कमावणे त्यांना चुकीचे वाटत नाही. कारण आज ह्या एका उद्योगामुळे कित्येक कुटूंबाची आर्थिक स्थिती बदलून गेली आहे. अशीच अजून एक प्रेरणादायी कथा दिल्लीतील रंगसूत्र कंपनी चालविणार्‍या सुमिता घोस ह्यांची. स्वतः ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यावर मास्टर इन इकॉनॉमिक्स ची पदवी घेतल्यावर संजॉय घोस ह्या या आय आर एम मधून शिक्षण घेतलेल्या ध्येयवादी तरूणाशी लग्न केले. पण दुर्दैवाने आसाममध्ये काम करत असताना त्यांची 1998 मध्ये उल्फाच्या अतिरेक्यांनी हत्या केली. त्यानंतर अनेक टक्केटोणपे खात, दोन लहान मुलांचा संभाळ करत सुमिताने ‘रंगसूत्र’ नावाची कंपनी काढली. त्याच्या मार्फत ती खॆडॆगावातल्या लोकांकडून कापड, शोभॆच्या वस्तू, बनवून घेते आणि त्या फॅब ईंडीयासारख्या प्रसिध्द कंपन्यांना विकते. जैसलमेर, बारमेर जिल्ह्यातले कारागिर तिच्यासोबत काम करत आहेत. अजून एक अशीच ध्येयवादी तरूणी म्हणजे इशिता खन्ना. डेहराडून मध्ये जन्म झालेली एक सर्वसामान्य मुलगी. पण निसर्गसंवर्धन आणि भूगोल या विषयांची आवड असलेली. म्हणूनच तिने आपल्या ग्रॅज्युएशन नंतर टाटा इंन्स्टीट्यूट मधून मास्टर्स केले. पर्यावरण क्षेत्रातच काम करायचे आहे हे निश्चित ठरवून तिने काही वर्षे नोकरी केली. त्यानंतर 2002 मध्ये नोकरी सोडून आपल्या दोन मित्रांसोबत स्पिती व्हॅलीमध्ये मूस नावाची एन्जीओ सुरु केली. तेथील स्थानिक महिलांचे ग्रुपस करून त्यांना तिथे असणार्‍या सीबक थॉर्न ह्या फळांच्या लागवडीचे ट्रेनिंग दिले. त्यावर प्रक्रिया करायला शिकवले. ही झाडॆ मातीला धरून ठेवतात त्यामुळे धूप रोखली जाते, शिवाय नायट्रोजन ही धरून ठेवत असल्याने जमिनीचा पोत सुधारतो. त्यामुळे ह्या फळांवर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे तिथल्या बायकांना चांगला रोजगार मिळू लागला. त्याचबरोबर तिने स्थानिक तरूणांना पर्यटकांना ट्रेक किंवा जीप सफारीसाठी नेणे, कॅम्प लावणे, गरज पडल्यास प्रथमोपचार करणे ही कामे ही करायला शिकवले. कारण हळूहळू तिथे पर्यटन वाढू लागले. ते इको-फ्रेंडली करण्याकडॆ तिच्या इकोस्पियर संस्थेचा भर आहे. आता दरवर्षी पर्यटनातून 35 ते 40 लाखाचे उत्पन्न मिळते.आणि त्यातून नफा ही मिळतो. इकोस्पियर संस्थेने शेजारच्य़ा ‘लाहुल’ व्हॅलीमध्ये ही विकास कामे सुरु केली आहेत. पर्वतावर तयार होणार्‍या कचर्‍याच्या समस्येवरही तिला काहीतरी करायचे आहे. तिची संस्था लोकांना मुद्दाम तिथले लोक किती अवघड परिस्थितीत रहातात हे दाखवते. अतिशय थंडीत तिथे तापमान मायनस 35 पर्यंत खाली गेल्यावर हॅंडपंपने पाणी काढणे सुध्दा किती कठीण होते हे सांगितले जाते. तेव्हा आपल्यासारख्य़ा पर्यटकांना काय काय करता येईल याबद्दल ती जागरूकता निर्माण करते. मूळात हे पुस्तक 2012 साली लिहिलेले आहे. त्यामुळे आता ह्या वेगवेगळ्या प्रकारचे काम करणार्‍या संस्थेचे काम या दहा वर्षात खूपच वाढले असेल यात काही शंका नाही. दीनबंधू साहू हे मरिन बायोलॉजिस्ट आहेत पण ते प्रयोगशाळेतून बाहेर पडून समाजासाठी काम करतात. ‘प्रोजेक्ट चिलका’ ह्या त्यांच्या संस्थेमार्फत ओरिसातील लोकांना समुद्राची शेती करायला शिकवतात. ओरिसा मधील पुरी येथे जन्म झालेल्या दीनबंधूनी अतिशय हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेतल्यानंतर दिल्लीत एमएसीला ॲडमिशन घेतली. परंतु योगायोगाने १९८७ मध्ये अंटार्क्टिक वर जाण्याची संधी मिळाली. नंतर पीएचडी पूर्ण केल्यानंतर अनेक देशांमध्ये नोकरी निमित्ताने फिरले. पण तरीही शेवटी दिल्ली युनिव्हर्सिटी मध्ये प्रोफेसर म्हणून काम सुरू केले. त्यांना समुद्री वनस्पती बद्दल विशेष आस्था होती; पण त्या बद्दल आपल्या देशात फारशी जागरूकता नव्हती. ही लागवड पर्यावरण पूरक असते शिवाय त्यातून स्थानिक लोकांना उत्पन्नाचे साधन मिळते. त्यासाठी डिएसटीने निधी मंजूर केला. मग त्यांनी चिल्का सरोवराची पहाणी केली, त्यामध्ये वाढू शकतील अशा चार जातींची निवड करून स्थानिक लोकांना समजेल अशा सोप्या भाषेत माहिती दिली. प्रात्यक्षिके दाखवली, वर्कशॉप्स घेतली. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना रोजगार मिळू लागला. यातूनच पर्यावरण संरक्षण ही होऊ लागले. यातून त्यांना प्रत्यक्ष कांहीं आर्थिक फायदा होत नसला तरी ते म्हणतात, की आम्हाला दोघांना दिल्लीत चांगली नोकरी आहे. त्यामुळे पैसे कमावणे हा उद्देश नाही; पण अजून तीस वर्षांनंतर मला मी काही तरी काम केलेले दिसेल. असे जर काहीच तुम्हाला दिसणार नसेल तर जगायचे कशाला? भूषण पुनानी हे असेच अत्यंत बुध्दीमान विद्यार्थी. मेडीकलची ॲडमिशन हुकल्यामुळे डेअरी कोर्ससाठी ॲडमिशन घेतली. तिथे ही विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविला. नंतर पीएचडी केले. ग्रामविकास शिकण्यासाठी आयआयएम मध्ये एमबीए केले. हे झाल्यावर 1979 मध्ये ब्लाईंड स्कूल मध्ये दोन वर्षांसाठी नोकरी सुरु केली ती सुधा ह्याच हेतूने की मॅनेजमेंट शिकताना जी थेअरी शिकलो ती विकासाच्या क्षेत्रात वापरता येईल का? हळूहळू त्यांना अनेक लोक मिळत गेले. सर्वांनी मिळून आज संस्था खूप मोठी केली आहे.त्यांनी काम सुरु केले तेव्हा फक्त एक कॅपस होता, आज गुजरात मध्ये आठ कॅपस आहेत. दहा लाख मूल्य असलेली संस्था आज दोन कोटी रुपयांची आहे. अपंग लोकांनी स्वावलंबी व्हावे ह्यासाठी संस्था काम करते. दृष्टीहीन मुली ब्यूटी पार्लरसारखे कोर्स चालवतात, फिजिओथेरपी शिकून सेंटर मध्ये काम करतात. विकास साधण्यासाठी योग्य व्यवस्थापनेची गरज असते हे त्यांनी दाखवून दिले आहे. हजारो लोकांच्या आयुष्यात नवा प्रकाश निर्माण करून त्यांना सामान्य आयुष्य जगण्याची संधी मिळवून दिली आहे. अशी ही एकापेक्षा एक वेगवेगळ्या प्रकारची माणसे. कोणत्या तरी ध्येयाने पछाडलेली . सामाजिक कार्य करत असतानाच त्या लोकांचे कल्याण कसे होईल असा विचार करणारी. लेखिकेने त्या सर्वांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या आहेत, त्यांचे काम प्रत्यक्ष पाहून जाणून घेतले आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित गोळा करून आपल्यासमोर मांडली आहे. त्यामुळेच त्या मनोगतात म्हणतात, ‘तुमचं आयुष्य कसे ही असले तरी इतरांसाठी एखादा क्षण द्या. इतरांना प्रेम, आनंद, चांगुलपण द्या. जितकं द्याल तितकं तुम्हाला परत मिळेल.’ हेच वाक्य मलाही अतिशय उर्जा देऊन गेले. माझ्याकडे जे आहे, जे मला देणे शक्य आहे ते निरपेक्षपणे ज्यांना गरज आहे त्याला देणे ह्या सारखा आनंद अजून काय असणार? ह्याच वाक्याने मी आपली ह्या आठवड्यात रजा घेते. उद्या पासून सुरु होणार्‍या नवीन सत्रासाठी सारिका ताईंना हार्दिक शुभेच्छा. ...Read more