* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: SPARSHKAMALE
  • Availability : Available
  • ISBN : 9788171618989
  • Edition : 7
  • Publishing Year : OCTOBER 1978
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 176
  • Language : MARATHI
  • Category : LITERATURE
  • Available in Combos :ANAND YADAV COMBO SET-34 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
ADORNMENT HAS A PECULIAR PLACE IN OUR LIFE. BUT MANY A TIMES, IT PORTRAYS WOMAN AS A MEDIUM TO SATISFY HEDONISM AND NOT AS A PERSON. THIS IS NOT TRUE. A WOMAN HAS SOME SPECIAL PLACE. SHE HAS AN EXISTENCE BEYOND THE LUST, SHE HAS ETERNAL BEAUTY, WHICH CAN BE SAVOURED WITHOUT INTERMINGLING IT WITH LUST. THE ARTICLES INCLUDED UNDER THIS BOOK ARE WRITTEN WITH THIS ANGLE, TO DESCRIBE HER BEAUTY BEAUTIFULLY. TO SHOW HER AESTHETICNESS. THROUGHOUT THE ARTICLES SHE MEETS US IN VARIOUS FORMS, SOMETIMES SHE IS A CHARMING BABY ANGEL, SOMETIMES SHE IS AN INNOCENT GIRL, SOMETIMES A FULLY GROWN LADY, SOMETIMES AS AN ELITE LADY OF NOBLE BLOOD IN A 9 YARD SAREE, SOMETIMES AS A CONFIDENT URBAN LADY IN A 6 YARD SAREE. SOMETIMES, SHE IS THE `ADIMAYA`, A CLOSE FRIEND, A LOVER, A WIFE, A MOTHER, AND ALL THE TIMES A DIVINE POWER CARING FOR THE MANHOOD.
शृंगारिक वाङ्मयात स्त्रीला भोगलालसेच्या पलीकडे आणखी एक नितान्तसुंदर अस्तित्व असते. आस्वादाच्या पातळीवर तिच्या अस्तित्वाचे रूपसौंदर्य अनुभवता येते. आस्वादाच्या पातळीवर स्त्रीचे विविध रूपांतील सौंदर्य आविष्कृत करावे, या प्रेरणेने या संग्रहातील ललितलेख लिहिले आहेत. कधी ती बालअप्सरेच्या रूपात भेटेल, तर यौवनमुग्ध, ललितगात्रा मदनिकेच्या स्वरूपात जाणवेल, कधी ती नऊवारीतील खानदानी, कुलीन स्त्री होऊन येईल, तर कधी सहावारीतील धीट, नागर ललना होऊन भेटेल; आणि कधी आदिमायेच्या मूलभूत रूपात सखी, प्रिया, पत्नी, जननी यांसारख्या विविध नात्यांनी पुरुषाचा सांभाळ करणारी दैवी शक्तीही असेल. स्त्रीची अशी अनेकविध रूपे जेव्हा रसिक पुरुषमनाला सामोरी येतात, तेव्हाच असे ‘स्पर्शकमळे’ मधील शृंगारसमृद्ध ललित लेख घडतात.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#झोंबी #(महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार १९८८-८९) #(महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार १९८८-८९) #(दि फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स -उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार १९८९) #(मारवाडी संमेलन पुरस्कार १९९०) # (साहित्य अकादमी पुरस्कार १९९०) #(प्रवरानगर - विखेपाटील पुरस्कार १९९१) #(संजीवनी साहित्य पुरस्कार, कोपरगाव १९९४) # नांगरणी # (रोहमारे ग्रामीण पुरस्कार १९९०) #घरभिंती #काचवेल #माऊली # (कालीमाता साहित्य पुरस्कार १९८६ #परिमल लेखन पुरस्कार १९८६ # नटरंग #(महाराष्ट्र राज्य पुरस्कार १९८२) # गोतावळा # शेवटची लढाई #(राज्य पुरस्कार २००१-०२) #भूमिकन्या #झाडवाटा # उगवती मने #(राज्य पुरस्कार २००२-०३) # आदिताल # डवरणी #माळावरची मैना # घरजावई #खळाळ #उखडलेली झाडं #सैनिक हो, तुमच्यासाठी... #मळ्याची माती #मायलेकरं #साहित्यिकाचा गाव #मातीखालची माती #स्पर्शकमळे #पाणभवरे #साहित्यिक जडण-घडण # ग्रामसंस्कृती #(रा. ना. सबनीस वाङ्मयपुरस्कार २००२) # मराठी लघुनिबंधाचा इतिहास #साहित्याची निर्मिती प्रक्रिया #ग्रामीणता : साहित्य आणि वास्तव आत्मचरित्र मीमांसा #"ग्रामीण साहित्य : स्वरूप व समस्या #(राज्य पुरस्कार १९८३) # मराठी साहित्य - समाज आणि संस्कृती #१९६० नंतरची सामाजिक स्थिती आणिसाहित्यातील नवे प्रवाह # डॉ. आनंद यादव - एक साहित्यिक प्रवास #ZOMBI #NANGARNI #GHARBHINTI #KACHVEL #MAULI #NATRANG #GOTAVALA #SHEVATCHI LADHAI #BHUMIKANYA #ZADVATA #UGVATI MANE #AADITAL #DAVARNI #MALAVARCHI MAINA #GHARJAWAI #KHALAL #UKHADLELI ZADE #SAINIK HO TUMACHYASATHI #MALYACHI MATI #MAI LEKARA #SAHITYIKACHA GAON #MATIKHALCHI MATI #SPARSHKAMALE #PANBHAVARE #SAHITYIK JADAN-GHADAN #GRAMSANSKRUTI #MARATHI LAGHUNIBANDHACHA ITIHAS #SAHITYACHI NIRMITI PRAKRIYA #GRAMINTA SAHITYA ANI VASTAV #AATMACHARITRA MIMANSA #GRAMIN SAHITYA : SWARUP ANI SAMASYA #1960 NANTARCHI SAMAJIK STHITI ANI SAHITYATEEL NAVE PRAVAH #DR. ANAND YADAV EK SAHITYIK PRAVAS
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAKAL (YUVA)

    ‘स्त्री-पुरुष लैंगिक संबंध हा फार फार पूर्वीपासून साहित्यातला एक प्रमुख भाग राहिला आहे. जसजसं समाजातील स्त्री-पुरुषांवरील लैंगिक बंधने शिथिल होत गेली. तसतशी साहित्यात लैंगिक संबंधातले चित्रण खूप धिटाईने, उघडपणे येऊ लागले. मुळात लैंगिक भावनेबद्दल कसं िहावं, किती प्रमाणात लिहावं आणि किती लिहिले तरी ते अश्लील होऊ न देता संदर्भासकट लिहून शृंगारिक होईलस, हे बघणे लेखकाचे काम आहे. असे कितीतरी लेखक मराठीत आहेत, पण मला खास करून तुला सांगावेसे वाटते असे नाव आहे आनंद यादव यांचे ‘स्पर्शकमळे’ हे पुस्तक. शृंगाराचे वर्णन प्रियकराने प्रेयसीला हळुवार स्पर्श करावेत, तसे येते. जणू प्रत्येक शब्द हा लेखकाचा स्वत:चा शृंगार भासावा. स्त्री-पुरुष लैंगिक आचार-विचारांचा ‘निसर्ग’ इथे लेखक उभा करतो. इथं तू लेखक विचारात घेऊ नकोस. त्याचे लेख घे. शृंगार हाच जीवनाच्या स्थायीभावाच्या रूपात वावरतो. तुला वात्सायन माहीत असेल, पण इथं वात्सायनाचे दर्शन घडत नाही. प्रत्यक्ष लैंगिक संबंधाचे वर्णन नाही. पण यात संपूर्ण शरीरच शृंगारिक सौंदर्याने नटल्यानंतर डोळे, कान, हात, पाय अगदी चालणेसुद्धा कसं मोहक आणि शृंगारिक होते. ते दिसते. वाचकांना उत्तेजित करणाऱ्या पुस्तकासारखं हे पुस्तक नाही, तर वाचकांच्या मनात स्वत:चीच एक नैसर्गिक माणूस म्हणून प्रतिमा तयार करण्याचे काम हे पुस्तक करते. मुळात या पुस्तकात शृंगार ह भोगलोलूप म्हणून येत नाही तर एक आस्वादक म्हणून येतो. स्वत:च्या नैसर्गिक रसांना तृप्त करणारा म्हणून येतो. शृंगार स्पर्शकमळातून व्यक्त होत असताना तो कोणालाही दुखावत नाही, तर उलट तो मातेच्या ममतेने, आपुलकीने स्वत:च्या हाताने चार घास भरवावे तसा भरणपोषाण करतो. हा शृंगार शरीर भोगाच्या पातळीवरून एका आंतरिक नितांत सुंदर अशा जगात घेऊन जातो. इथं स्त्री-पुरुष हा भेद तसाच ठेवून, त्याला कोणतीही आध्यात्मिक किंवा आदर्शाची कल्पना न चिकटवता भावनिक पातळीवर हा शृंगार घडताना दिसतो. मुळात येथे अनेक लेख आहेत, पण या लेखांची जी माळ आहे. त्यातील धागा एकच आहे तो म्हणजे शृंगार, प्राकृत शृंगार. शृंगाराबद्दल अनेक कवी, लेखक, नाटककार आणि समाजातल्या इतर व्यक्तींकडून मी खूप काही ऐकले होते, वाचले होते, पण फक्त शृंगारावर ललित गद्य उपलब्ध आहे, हे मला या ‘मेहता पब्लिशिंग हाऊस’च्या पुस्तकाने सांगितले. कोणताही आडपडदा न ठेवता. ...Read more

  • Rating StarDAINIK KESRI 08-07-1979

    मनाला व्याकुळ करणारी ‘स्पर्शकमळे’… प्रत्येक संवेदनशील पुरुष बालपणापासून स्त्रीविषयक अनुभव कणाकणाने गोळा करीत असतो, आपली जाणीव संस्कारित करीत असतो आणि जीवन समृद्ध करीत असतो. निरनिराळ्या वेळी, वेगवेगळ्या वस्त्रांत आणि भिन्न-भिन्न भावावस्थेतील तिची दर्ने, तिचे शब्द विविध निमित्तांनी झालेले तिचे स्पर्श सारे काही कृपणपणाने तो साठवीत असवतो. एकांतात त्यांची उजळणी करून आपला अनुभवांचा ठेवा तो वाढवीत असतो. अशा वेळी त्याचे मन कातर होते, हळवे होते, उत्कंट बनते. पण आपल्या या आनंदाच्या ठेव्याबद्दल सगळ्याच पुरुषांना काही बोलता येत नाही. मनावर सगळ्या प्रकारचे दबाव असतात. स्त्रणपणापासून आत्ममैथुनात्मक विकृतीपर्यंतचे सर्व प्रकारचे आरोप येण्याची भीती असते. शिवाय, आपल्या नाजूक थरार असलेल्या अनुभवांच्या तुलनेने सुचणारे सगळे शब्द भडक, भणंग, फत्तरासारखे जडशिळ आणि उष्टेशिळे वाटायला लागतात. वाचकही व्याकूळ ! अशा या पार्थिव-अ पार्थिवाच्या सीमारेषेवरील अनुभवांना डॉ. आनंद यादव यांनी ‘स्पर्शकमळे’मध्ये शब्दरूप दिले आहे. या लेखनात कुठे अट्टाहास नाही की शब्दांमधून शिल्प उभे करण्याचा प्रयत्न नाही. आपल्या अनुभवांकडे, त्या अनुभवांनी निर्माण केलेल्या भाववृत्तींकडे निखळपणाने पाहण्याच्या आत्ममग्न वृत्तीमुळे यादवांचे शब्द पारदर्शक होतात. त्यांचे अनुभव वाचकांच्या अनेक विस्मृत अनुभवांनी जागृती आणतात, त्यांच्याशी संवाद साधतात. झंकारलेल्या तारांच्या नुस्त्या जवळ असण्याने दुसरे वाद्य झंकारू लागावे तशी वाचकाची अवस्था होते. यादवांच्या अनुभवातील नाजूक थरार वाचकाच्या अनुभवांना प्राप्त होते आणि एखाद्या कातरवेळेसारखा तोही उत्कंट, हळवा आणि व्याकूळ होऊन जातो. अर्थात् हे दुष्प्राप्य श्रेय यादवांना या संग्रहातील प्रत्येक ललित लेखांत साध्य होतेच असे नाही. त्यांच्यावरही व्यक्त-अव्यक्त असे दबाब येतात. संभाव्य प्रतिक्रियांबद्दल तेही सावध असतात आणि ‘आपली’ अशी एक बाजू वकिली कौशल्याने मांडून ठेवतात हे या संग्रहाला जोडलेल्या ‘‘मराठी शृंगारिक गद्यवाङ्मय आणि ‘स्पर्शकमळे’ ! ’’ या काहीशा बटबटीत असलेल्या प्रास्ताविकावरून दिसून येते. यादवांची तक्रार या प्रास्ताविकांत मराठीतील स्त्रीविषयक व शृंगाराविषयक अनुभव व्यक्त करणाऱ्या लेखनाविषयी यादवांनी दोन तक्रारी केल्या आहेत. हे लेखन ‘विकारविवश’ असते आणि असे अनुभव ‘मी’च्या नावे व्यक्त करण्यास मराठी लेखक कचरतात. यादवांच्या मते भोगाच्या नव्हे तर आस्वादाच्या पातळीवर स्त्रीच्या नितांत सुंदर अस्तित्वाचे रूपसौंदर्य अनुभवास येते आणि असे अनुभव ‘मी’च्या नावे व्यक्त करण्याच्या बाबतीतला सोवळेपणा सोडून द्यायला हवा, कारण प्रत्यक्षांत ‘मी’ला आलेल्या अनुभवांच्या आविष्कारामुळेच ललित गद्याला आत्मचरित्रस्पर्शी वास्तवाचे वेगळे परिणाम लाभत असते. यादवांच्या या दोन्ही तक्रारींमध्ये तथ्य असले तरी वास्तविक त्या दोन्ही तक्रारीचे मूळ एकाच वाङ्मयीन मूल्यात आहे. हे मूल्य म्हणजे लेखनपूर्व व लेखनगर्भ आत्मनिष्ठेचे ! त्यामुळे यादवांनी हे प्रास्ताविक लिहून भलत्याच गोष्टींवर म्हणजे त्यांच्या विषयावर लक्ष केंद्रित करायला मदत केली आहे, त्यामुळे यादवांचे चुकीच्या कारणांसाठी कौतुक होण्याचा किंवा तितक्याच चुकीच्या कारणांसाठी त्यांच्यावर हल्ला होण्याचा धोका संभवतो. अनुभवांचा कस व आवाका विषयावर नव्हे तर आविष्काराच्या सच्चेपणावरून कळतो. सुदैवाने स्वत: यादवांच्या लेखनात हा सच्चेपणा भरपूर प्रमाणात दिसतो. वाढाळ वयापासून प्रौढ वयापर्यंतचे स्त्रीविषयक व स्त्रीशीसंबंधित असे अनुभव त्यांनी येथे आस्वाद्य स्वरूपात सादर केले आहेत. त्यात वहिनी, प्रिया, पत्नी, मैत्रीण अशी पुरुषाची स्त्रीबरोबर निर्माण होणारी, विविध नाती आहेत, त्याचप्रमाणे गाठीची चोळी, स्कर्ट, नऊवारी असे स्त्रीचे वस्त्रविशेष आहेत. डोळे, आवाज, हाताची बोटे असे स्त्रीच्या सौंदर्याचे घटक आहेत, त्याचप्रमाणे तिच्या आठवणी, तिच्याविषयी मन जी चित्रे उभी करते तेही आहे. एकूण एका संवेदनशील, हळव्या, उत्कंट, आत्ममग्न पुरुषाच्या स्त्रीच्या संबंधातील विविध भावावस्था व अनुभव यांचे मनोज्ञ चित्रण म्हणजे ही ‘स्पर्शकमळे’ ‘वैनी’ मानदंड ठरणार ? या संग्राहतील ‘वैनी’ हा पहिलाच लेख यादवांच्या लेखन म्हणून असणाऱ्या थोरवीचा प्रत्यय देण्यास समर्थ आहे. करंदीकरांचा ‘स्पर्शाची पालवी’ किंवा इरावती कर्व्यांचा ‘मामंजी’ अशा काही थोड्या लेखांप्रमाणे यादवांचा हा लेख मराठी ललित निबंधाच्या क्षेत्रात मानदंडाची मान्यता पावेल यात शंका नाही. वैनीच्या आगमनामुळे व प्रेमळपणामुळे अडाणी वयाच्या मुलामध्ये निर्माण होणारी धूसर, अनामिक व हुरहूर लावणारी भाववृत्ती यादवांनी या लेखात हळुवारपणाने व सर्व बारकावे टिपणाऱ्या सूक्ष्मतेने व्यक्त केले आहे. वैनीनं सगळ्या घराचं रूप पालटून टाकलं हे सांगताना यादव लिहितात : ‘(वैनीनं) एक नात घरात आणलं. अरेतुरे सगळे अहोजाहो झाले. एका माणसामुळे सगळे मानाचे झाले.’ या लेखातला मी म्हणतो : ‘कधी आईनं वैतागून मला बडवायला सुरुवात केली की, वैनी सोडवून घेई. रट्ट्याला धरून बाजूनला घेऊन जाई. हृदयाबरोबर गच्च घरी. मला तिची ऊब मिळे. अशी कुणाची मिळत नसे. तिच्या उबीत उत्कंट होऊन रडतानाही बरं वाटे. ती आपल्या मऊ मऊ तळव्यांनी माझे डोळे पुसे. ओठांवरून हात फिरवे. ‘नाई, गप माझ्या सोन्या. भांडणं करू नयेत...’ असं दाटदाट सायीगत असलेल्या प्रेमानं ती बोले... बरेच दिवसात असं काही झालं नाही तर मला चुटपूट लागून राही. वैनीच्या कुशीत शिरायला मिळत नसे.’ निवेदकाचा लहानपणचा अनुभव आणि त्या अनुभवाचा त्याने आज लावलेला अन्वयार्थ यांचा एकजीव मिलाप अशा ठिकाणी दिसतो, त्यामुळे हे लेखन केवळ स्मृती जागवणारे व चाळवणारे राहात नाही तर त्या स्मृतींच्या संदर्भातील लेखकाची आजचा भावनिक अनुभूती व्यक्त करते. यादवांच्या शैलीचीही सर्व वैशिष्ट्ये वरील उताऱ्यात व्यक्त झालेली दिसतात. प्रमाणबोली, प्रादेशिकबोली, व संवादबोली यांचे मिश्रण करून (‘हृदयाबरोबर’, ‘उत्कंट’, ‘रट्ट्याला’, ‘न्हाई’, ‘करू नेत’, ‘उबीत’, ‘वैनी’) यादव वाचकाला विश्वासात घेतात, कृत्रिमतेची व प्रयत्नपूर्वकतेची आशंका पुसून टाकतात. लेखाच्या शेवटी तात्पर्य सांगितल्याप्रमाणे यादव लिहितात. ‘‘वैनीचं असं हे रक्ताचं आणि प्रेमाचं दुहेरी नातं पुरुषाला मिळालं तर तो पूर्ण पुरुष होईल !’’ या वाक्यात दिसणारी सुलभीकरणाची, ‘मध्यवर्ती कल्पना’ स्पष्ट करून सांगण्याची प्रवृत्ती इतरही काही लेखांत अधूनमधून डोकावते. फडके-खांडेकर प्रणीत लघुनिबंधामध्ये कल्पनाविस्ताराच्या प्रकाराचे व शब्दाने शब्द वाढवीत नेण्याच्या तंत्राचे दर्शन होई. ते वैशिष्ट्य यादवांच्या काही लेखात आपसूक येत असलेले आढळते. उदाहरणार्थ, डोळ्यांबद्दल लिहिताना त्यांना कृष्ण, राम (‘जगात राम शोधायला आलेला राम !’) खिस्त शिवाजी, हिटलर, सीता, उर्मिला, राणी लक्ष्मी, हेलन (ऑफ ट्रॉय) इत्यादींचे डोळे आठवतात ! (महात्मा गांधी, फ्लॉरेन्स नाइिंटगेल, बेबी शकुंतला, मीना कुमारी, गुरुदत्त इ. मंडळी जागेच्याअभावी सटकली असावीत !) अर्थात यावर उतारा म्हणून की काय यादव ‘‘भव्य डौलदार कमानीसारखा दिसणारा तुझा डोळा. मी खालच्या पापणीवर उभा. काळ्याभोर बुबुळामध्ये आत सकाळची स्वच्छ उन्हं पसरली आहेत. पाहता पाहता तुझं बुबुळ अलगद गुहेच्या तिळासारखं वर उघडतं नि मी आत जातो...’’ असं काही तरी जीवघेणं लिहून जातात. यादवांच्या या लेखनात कलात्मकता आणि व्यावसायिकता यांचे मिश्रण झालेले दिसते. पुस्तकाची सजावट माझ्या या निरीक्षणाला पुष्टी देणारीच आहे. मुखपृष्ठावरील रंगीत चित्र व आतील रेखाचित्रे (जोशी आर्टसची) अलंकरणात्मक आहेत; पण लेखांचा आशय मात्र त्यांच्यातून व्यक्त होत नाही. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more