* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
ZOMBEE LITERALLY MEANS WRESTLING. THIS IS AN ACCOUNT OF A YOUTH FROM INTERIOR MAHARASHTRA. HE FIGHTS HIS WAY THROUGH JUST TO COMPLETE HIS SECONDARY EDUCATION. HIS LANDLESS FATHER TILLING LANDS FOR OTHERS, THINKS HIS SON`S EDUCATION NOT ONLY UNAFFORDABLE BUT UNWISE ALSO, HE HELPLESSLY WATCHES HIS MOTHR PERMANENTLY FATED TO THANKLESS LABOUR, CONTINEOUSLY WORKING FOR AN EVERGROWING FAMILY DEEP IN THE CLUTHES OF CUSTOMS AND SUPERSTITIONS. HE HAD TO WRESTLE WITH HARDSHIPS AND HUNGER TO COMPLETE HIS SCHOOL EDUCATION. THIS AUTOBIOGRAPHICAL NOVEL IS AN AUTHENTIC TALE AS MUCH OF THE AUTHOR AND HIS FAMILY AS OF ANY OF THE HUNDREDS OF LANDLESS FAMILIES FROM RURAL INTERIORS.
आजच्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीत अस्वस्थ होऊन धुमसणे हाच ग्रामीण जीवनाचा स्थायीभाव आहे. त्या अस्वस्थपणाचा स्फोट मराठी साहित्यात सुरू झालाच आहे. हे व्हायला हेवेच होते. शिवाय, साऱ्या जगातलं साहित्य समृद्ध केलं आहे. ते या `झोंबी`सारख्या वाचकाला अस्वस्थ करणाऱ्या ग्रंथांनीच! पु. ल. देशपांडे
* प्रियदर्शनी अकादमी पुरस्कार १९८८. * महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार १९८८-८९. * दि फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स- उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार १९८९. * दे.भ.पद्मश्री डॉ. रत्नाप्पा कुंभार पुरस्कार १९८९. * मारवाडी संमेलन पुरस्कार १९९०. * साहित्य अकादमी पुरस्कार १९९०. * प्रवरानगर-विखेपाटील पुरस्कार १९९१ * संजीवनी साहित्य पुरस्कार ,कोपरगाव १९९४

No Records Found
No Records Found
Keywords
#झोंबी #(महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार १९८८-८९) #(महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार १९८८-८९) #(दि फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स -उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार १९८९) #(मारवाडी संमेलन पुरस्कार १९९०) # (साहित्य अकादमी पुरस्कार १९९०) #(प्रवरानगर - विखेपाटील पुरस्कार १९९१) #(संजीवनी साहित्य पुरस्कार, कोपरगाव १९९४) # नांगरणी # (रोहमारे ग्रामीण पुरस्कार १९९०) #घरभिंती #काचवेल #माऊली # (कालीमाता साहित्य पुरस्कार १९८६ #परिमल लेखन पुरस्कार १९८६ # नटरंग #(महाराष्ट्र राज्य पुरस्कार १९८२) # गोतावळा # शेवटची लढाई #(राज्य पुरस्कार २००१-०२) #भूमिकन्या #झाडवाटा # उगवती मने #(राज्य पुरस्कार २००२-०३) # आदिताल # डवरणी #माळावरची मैना # घरजावई #खळाळ #उखडलेली झाडं #सैनिक हो, तुमच्यासाठी... #मळ्याची माती #मायलेकरं #साहित्यिकाचा गाव #मातीखालची माती #स्पर्शकमळे #पाणभवरे #साहित्यिक जडण-घडण # ग्रामसंस्कृती #(रा. ना. सबनीस वाङ्मयपुरस्कार २००२) # मराठी लघुनिबंधाचा इतिहास #साहित्याची निर्मिती प्रक्रिया #ग्रामीणता : साहित्य आणि वास्तव आत्मचरित्र मीमांसा #"ग्रामीण साहित्य : स्वरूप व समस्या #(राज्य पुरस्कार १९८३) # मराठी साहित्य - समाज आणि संस्कृती #१९६० नंतरची सामाजिक स्थिती आणिसाहित्यातील नवे प्रवाह # डॉ. आनंद यादव - एक साहित्यिक प्रवास #ZOMBI #NANGARNI #GHARBHINTI #KACHVEL #MAULI #NATRANG #GOTAVALA #SHEVATCHI LADHAI #BHUMIKANYA #ZADVATA #UGVATI MANE #AADITAL #DAVARNI #MALAVARCHI MAINA #GHARJAWAI #KHALAL #UKHADLELI ZADE #SAINIK HO TUMACHYASATHI #MALYACHI MATI #MAI LEKARA #SAHITYIKACHA GAON #MATIKHALCHI MATI #SPARSHKAMALE #PANBHAVARE #SAHITYIK JADAN-GHADAN #GRAMSANSKRUTI #MARATHI LAGHUNIBANDHACHA ITIHAS #SAHITYACHI NIRMITI PRAKRIYA #GRAMINTA SAHITYA ANI VASTAV #AATMACHARITRA MIMANSA #GRAMIN SAHITYA : SWARUP ANI SAMASYA #1960 NANTARCHI SAMAJIK STHITI ANI SAHITYATEEL NAVE PRAVAH #DR. ANAND YADAV EK SAHITYIK PRAVAS
Customer Reviews
  • Rating StarRahul Sutar

    जीवनातील येणारे प्रसंग आणि त्यातून खंबीर वाटचाल करावी ही पूर्ण जाणीव प्रो. आनंद यादव यांच्या सर्व कादंबरीतून प्रेरणा मिळते

  • Rating StarSurekha Abhang

    परिस्थितीवर मात करून बरेच लोक आपले शिक्षण पूर्ण करतात. मात्र त्यांना कुटुंबाची साथ असते मात्र या कादंबरीत थोडं वेगळं चित्र मला अनुभवायला मिळालं गरिबीमुळे स्वतःच्या मुलाच्या शिक्षणाला जन्मदात्या बापाचा विरोध असुनही लेखकाने पोटाला अन्न कमी पण पाठीवर भरूर मार घेऊन सहा सहा मैल पायी चालून आपली शिकण्याची जिद्द पुर्ण केली . *मी एक प्राथमिक शिक्षिका असल्याने सांगायला अभिमान वाटतो की लेखक लिहीतात जिल्हा परिषदेची शाळा मला माझी वाटत होती तेथील शिक्षक मला समजुन घेत होते. परंतु याचा उलट अनुभव मला माध्यमिक शाळेत आला** .बरे असो .💐💐मात्र ही कादंबरी सर्व वयोगटातील वाचकांसाठी प्रेरणा दायी आहे पण त्याहीपेक्षा आज शिक्षण घेत असलेल्या तरूण वर्गाने या कादंबरीचे वाचन जरूर करावे हे यासाठी की आज आई वडील सहज आपल्याला समजावत असतील तर हे तरूण तरूणी लगेच नाराज होतात एवढेच काय पण नको ते प्रकार आपल्याला आजुबाजुला पाहायला व ऐकायला मिळतात तेव्हा नवसंजीवनी मिळण्यासाठी ही कादंबरी जरूर एकदा तरी वाचणात यायला हवी.💐💐 दहा भावंडात असणारा आंदा काम करून , उपाशी राहून मित्रांची जुनी पुस्तक वापरून आणि दररोज उशीर झाला म्हणून अनवाणी पायाने फडक्यात भाकरी गुंडाळून शालेय शिक्षण घेतो,एवढंच काय पण कामाच खाडं व्हायला नको म्हणून घरीच अभ्यास करून तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावतो हे वाचताना मन गहिवरल्याशिवाय राहत नाही .💐💐याचाच अर्थ असा की जिद्द, चिकाटी असेल तर ध्येयाचा मार्ग कोणीही अडवू शकत नाही. 💐💐 अजुन लिहीण्यासारख खूप आहे तुर्तास एवढेच पुरे बाकी आपण वाचणातुन अनुभवालच🌹 *हा पुस्तकातील आंदा त्या पुस्तकातच मर्यादित नाही आजही आपल्या आजूबाजूला असे आंदा आपल्याला भेटतात गरज आहे फक्त त्यांना जाणुन घेण्याची आणि शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याची ...Read more

  • Rating StarDr.Bhushan Phadke

    शालेय अभ्यासक्रमात कदाचित नववीत किंवा दहावीत आनंद यादव यांच्या आत्मचरित्रातील काही भाग धडा म्हणून अभ्यासाला होता, तेव्हाच ही आत्मचरित्रात्मक कादंबरी वाचण्याची ओढ निर्माण झाली. वयाच्या एकविशित पहिल्यांदा ही कादंबरी वाचली तेव्हा अनेकदा रडलो, वयाच्या चािशीत पुन्हा जेव्हा ही कादंबरी वाचली तेव्हाही डोळ्याच्या कडा पाणावल्या पण अनेक प्रसंगात विषण्णता आणि असहाय्यता,अनुभवली आहे. आनंदा यादवांच्या "झोंबी" या आत्मचरित्रात्मक कादंबरीपासून मराठी साहित्याचा एका वेगळ्या दिशेने प्रवास सुरू झाला हेच म्हणणे संयुक्तिक ठरेल. या आत्मचरित्राला महाराष्ट्रभूषण, महाराष्ट्र दैवत "पु ल देशपांडे" यांची प्रस्तावना लाभली आहे. झोंबी या आत्मचरित्राचे, नांगरणी आणि घरभिंती हे पुढचे भागही प्रकाशित झाले आहेत. झोंबी च्या अर्पणपत्रिकेत लेखक आनंद यादव पु ल देशपांडे यांचा उल्लेख तीर्थरूप म्हणून का करतात हे वाचकांना झोंबी चा पुढचा भाग नांगरणी वाचल्याशिवाय कळणार नाही. पुलंनी `बाल्य हरवलेले बालकाण्ड` असे झोंबी चे वर्णन केले आहे. आत्मचरित्र असूनही कुठेही आत्मप्रौढी जाणवत नाही. लेखकाने शिक्षणासाठी दारिद्र्याशी केलेली लढाई म्हणजेच "झोंबी". अनेकांनी गरिबी पाहिली असेल, पण दारिद्र्याचे चटके सोसत जीव जगत ठेवणाऱ्या एका पोराच्या हाती पाटी-पेन्सिल आल्यापासून ते मॅट्रिकची परीक्षा पास होईपर्यंत कराव्या लागणाऱ्या झोंबीची ही कहाणी कहाणी वाचकाला अंतर्मुख करते. आनंद यादव यांचे वडील रतनू, आणि आई तारा यांच्या विवाहाच्या वर्णनापासून कादंबरीची सुरुवात होते. रतन आठ-दहा वर्षाचा तर तारा एक वर्षाची. विवाह चे वर्णन करताना लेखक लिहितात, "एक वर्षाच्या ताराच्या गळ्यात बांधलेल काळभोर मण्यांचे मंगळसूत्र, डोरलं मोठे चमत्कारिक दिसत होत, चिमुरड्या पोरीचा कुंकू मळवट भरला होता. मंगळसूत्र घातलेला एक तांब्या धरून रतनची एकट्याचीच घोड्यावरून वरात निघाली, एक वर्षाची पत्नी इकडे पाळण्यात गाढ झोपी गेली.तिला यातलं काहीही माहीत नव्हतं. तिकडे तिची नियती परस्पर ठरवली जात होती. सासू-सासरे, विहीणबाई आपली हौस भागवून घेत होते" काय हे वर्णन. लेखकाची आई तारा सात-आठ वर्षाची झाल्यानंतर सासरी नांदावयास (राहायला) आली तेव्हा तिच्यावर होणारे अत्याचार वाचतांना वाचक दुःखी होतो आणि असहाय्यता अनुभवतो. तारा ची आई म्हणजेच लेखकाची आजी लवकरच गेली, तिला तेव्हा एक वर्षाचा मुलगा होता त्या वेळेचे वर्णन करताना आनंद यादव लिहितात, "आईच्या मढावरचं (प्रेतावर) तो तिच शेवटचा दुध प्यायला. बायका ताराला म्हणाल्या, पाज पोरी त्याला, हे शेवटच, त्याला पाजलं आणि मढ हलवल." आनंद यादवांनी शिक्षणासाठी भोगलेल्या व्यथा या कादंबरीत तर आहेच पण त्यासोबतच ग्रामीण जीवन, अशिक्षितपणा, दारिद्र्य, केवळ मार देणे म्हणजे शिकवणे असे मास्तरांचे स्वभाव याचे वर्णन आहे. या वर्णना सोबत आई वर होणारे होणारे अत्याचार, त्याबद्दल लेखकाची असहायता, शिकणं म्हणजे चैन आणि ती दारिद्र्यात कशी काय परवडणार म्हणून वडिलांनी लाथाबुक्क्यांनी मारणे, पुन्हा आईला होणारे अनेक मुलं आणि त्या मुलांचे अपमृत्यू, गावातल्या जत्रा, उरूस याचे वर्णन या कादंबरीत आहे. आपल्या दारिद्र्याचे हालअपेष्टांचे शिक्षणासाठी घेतलेल्या मेहनतीचे कुठेही भांडवल करण्याचा लेखकाचा हेतू नाही. आपल्याला सहानुभूती मिळावी हा सुद्धा लेखकाचा हेतू कुठेही जाणवत नाही. ग्रामीण जीवन चे काही शब्द शहरी वाचकांना नवीन असले, तरीही वाचक या कादंबरीत रंगून जातो. वाचकाला अंतर्मुख करण्याचे सामर्थ्य आनंद यादव यांच्या लेखणीत आहे. ज्या बाल्यावस्थेत वडिलांचे प्रेम, आईची माया अनुभवायचे असते त्या वयात यादवांनी उपरे पणा अनुभवला आहे. शिक्षणासाठी, पुस्तकांच्या वाचनाच्या गोडीपाई कधीकधी लेखकाने लहान सहान चोरी केल्याचा उल्लेख कुठलाही आडपडदा न ठेवता लेखकाने केला आहे. वडिलांचा शिक्षणाला टोकाचा विरोध म्हणून घर सोडून कोल्हापुरात गेले तेव्हा पोट भरण्यासाठी हरभऱ्याचा पाला आणि कचराकुंडी तील लोकांनी टाकलेल्या केळीच्या साली खाउन, शिकण्याच्या तळमळीमुळे आनंद यादव घडलेत. दहावीचा फॉर्म भरण्यासाठी लेखकाची तगमग त्यासाठी जमवलेले 35 रुपये, त्यासाठी एका मास्तरांनी केलेली मदत, आणि शेवटी दहावीत मिळालेले उज्ज्वल यश.... आत्मचरित्राचा पहिला भाग संपतो. शिक्षणासाठी एवढ्या हालअपेष्टा सोसाव्या लागू शकतात त्या सोसून जिद्दीने दारिद्र्याशी झोंबून त्यावर मात करत आनंद यादवांना सारखा एक ज्ञानी, ज्ञानयोगी कर्तबगारीने पुढे येतो आणि समाजाला दिशा देण्याचे, आपल्यासारख्या शोषितांचे जीवनमान सुधारण्याचे कार्य करतो. कादंबरी पूर्ण झाल्यावर वाचक निशब्द होतो. ...Read more

  • Rating StarVijay Nimbalkar

    बाप अडमुठी, हेकेखोर आणि स्वताच खर करणारा पोरगा अकरावीच्या बोर्ड परिक्षेला बसला. त्यावर्षी बापाने बारावं पोरगं काढलं. हा सोडला तर सगळी पोरं रोगट. माती खाऊन नाळरोगी झालेली. ती फक्त खायच्याच कामाची. `ह्या पोरांना मी एकटा खायला घालू काय? तुला मळ्यात कम करायलाच लागंन!` पोराची शाळा बंद करण्यासाठी बापाचा युक्तिवाद. असल्या भयंकर बापाच्या नाकावर टिच्चून त्याने आपलं शिक्षण पूर्ण केलं व प्राध्यापक झाला. तो पोरगा म्हणजेच लेखक आनंद यादव. - विजय निंबाळकर लोहगाव, पुणे ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more