* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: ZOMBI
  • Availability : Available
  • ISBN : 9788177663921
  • Edition : 26
  • Publishing Year : DECEMBER 1987
  • Weight : 400.00 gms
  • Pages : 408
  • Language : MARATHI
  • Category : AUTOBIOGRAPHY
  • Sub Category : THEATRE, ACTOR, CINEMA
  • Available in Combos :ANAND YADAV COMBO SET-33 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
ZOMBEE LITERALLY MEANS WRESTLING. THIS IS AN ACCOUNT OF A YOUTH FROM INTERIOR MAHARASHTRA. HE FIGHTS HIS WAY THROUGH JUST TO COMPLETE HIS SECONDARY EDUCATION. HIS LANDLESS FATHER TILLING LANDS FOR OTHERS, THINKS HIS SON`S EDUCATION NOT ONLY UNAFFORDABLE BUT UNWISE ALSO, HE HELPLESSLY WATCHES HIS MOTHR PERMANENTLY FATED TO THANKLESS LABOUR, CONTINEOUSLY WORKING FOR AN EVERGROWING FAMILY DEEP IN THE CLUTHES OF CUSTOMS AND SUPERSTITIONS. HE HAD TO WRESTLE WITH HARDSHIPS AND HUNGER TO COMPLETE HIS SCHOOL EDUCATION. THIS AUTOBIOGRAPHICAL NOVEL IS AN AUTHENTIC TALE AS MUCH OF THE AUTHOR AND HIS FAMILY AS OF ANY OF THE HUNDREDS OF LANDLESS FAMILIES FROM RURAL INTERIORS.
आजच्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीत अस्वस्थ होऊन धुमसणे हाच ग्रामीण जीवनाचा स्थायीभाव आहे. त्या अस्वस्थपणाचा स्फोट मराठी साहित्यात सुरू झालाच आहे. हे व्हायला हेवेच होते. शिवाय, साऱ्या जगातलं साहित्य समृद्ध केलं आहे. ते या `झोंबी`सारख्या वाचकाला अस्वस्थ करणाऱ्या ग्रंथांनीच! पु. ल. देशपांडे
* प्रियदर्शनी अकादमी पुरस्कार १९८८. * महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार १९८८-८९. * दि फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स- उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार १९८९. * दे.भ.पद्मश्री डॉ. रत्नाप्पा कुंभार पुरस्कार १९८९. * मारवाडी संमेलन पुरस्कार १९९०. * साहित्य अकादमी पुरस्कार १९९०. * प्रवरानगर-विखेपाटील पुरस्कार १९९१ * संजीवनी साहित्य पुरस्कार ,कोपरगाव १९९४

No Records Found
No Records Found
Keywords
#झोंबी #(महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार १९८८-८९) #(महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार १९८८-८९) #(दि फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स -उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार १९८९) #(मारवाडी संमेलन पुरस्कार १९९०) # (साहित्य अकादमी पुरस्कार १९९०) #(प्रवरानगर - विखेपाटील पुरस्कार १९९१) #(संजीवनी साहित्य पुरस्कार, कोपरगाव १९९४) # नांगरणी # (रोहमारे ग्रामीण पुरस्कार १९९०) #घरभिंती #काचवेल #माऊली # (कालीमाता साहित्य पुरस्कार १९८६ #परिमल लेखन पुरस्कार १९८६ # नटरंग #(महाराष्ट्र राज्य पुरस्कार १९८२) # गोतावळा # शेवटची लढाई #(राज्य पुरस्कार २००१-०२) #भूमिकन्या #झाडवाटा # उगवती मने #(राज्य पुरस्कार २००२-०३) # आदिताल # डवरणी #माळावरची मैना # घरजावई #खळाळ #उखडलेली झाडं #सैनिक हो, तुमच्यासाठी... #मळ्याची माती #मायलेकरं #साहित्यिकाचा गाव #मातीखालची माती #स्पर्शकमळे #पाणभवरे #साहित्यिक जडण-घडण # ग्रामसंस्कृती #(रा. ना. सबनीस वाङ्मयपुरस्कार २००२) # मराठी लघुनिबंधाचा इतिहास #साहित्याची निर्मिती प्रक्रिया #ग्रामीणता : साहित्य आणि वास्तव आत्मचरित्र मीमांसा #"ग्रामीण साहित्य : स्वरूप व समस्या #(राज्य पुरस्कार १९८३) # मराठी साहित्य - समाज आणि संस्कृती #१९६० नंतरची सामाजिक स्थिती आणिसाहित्यातील नवे प्रवाह # डॉ. आनंद यादव - एक साहित्यिक प्रवास #ZOMBI #NANGARNI #GHARBHINTI #KACHVEL #MAULI #NATRANG #GOTAVALA #SHEVATCHI LADHAI #BHUMIKANYA #ZADVATA #UGVATI MANE #AADITAL #DAVARNI #MALAVARCHI MAINA #GHARJAWAI #KHALAL #UKHADLELI ZADE #SAINIK HO TUMACHYASATHI #MALYACHI MATI #MAI LEKARA #SAHITYIKACHA GAON #MATIKHALCHI MATI #SPARSHKAMALE #PANBHAVARE #SAHITYIK JADAN-GHADAN #GRAMSANSKRUTI #MARATHI LAGHUNIBANDHACHA ITIHAS #SAHITYACHI NIRMITI PRAKRIYA #GRAMINTA SAHITYA ANI VASTAV #AATMACHARITRA MIMANSA #GRAMIN SAHITYA : SWARUP ANI SAMASYA #1960 NANTARCHI SAMAJIK STHITI ANI SAHITYATEEL NAVE PRAVAH #DR. ANAND YADAV EK SAHITYIK PRAVAS
Customer Reviews
  • Rating StarSurekha Abhang

    परिस्थितीवर मात करून बरेच लोक आपले शिक्षण पूर्ण करतात. मात्र त्यांना कुटुंबाची साथ असते मात्र या कादंबरीत थोडं वेगळं चित्र मला अनुभवायला मिळालं गरिबीमुळे स्वतःच्या मुलाच्या शिक्षणाला जन्मदात्या बापाचा विरोध असुनही लेखकाने पोटाला अन्न कमी पण पाठीवर भरूर मार घेऊन सहा सहा मैल पायी चालून आपली शिकण्याची जिद्द पुर्ण केली . *मी एक प्राथमिक शिक्षिका असल्याने सांगायला अभिमान वाटतो की लेखक लिहीतात जिल्हा परिषदेची शाळा मला माझी वाटत होती तेथील शिक्षक मला समजुन घेत होते. परंतु याचा उलट अनुभव मला माध्यमिक शाळेत आला** .बरे असो .💐💐मात्र ही कादंबरी सर्व वयोगटातील वाचकांसाठी प्रेरणा दायी आहे पण त्याहीपेक्षा आज शिक्षण घेत असलेल्या तरूण वर्गाने या कादंबरीचे वाचन जरूर करावे हे यासाठी की आज आई वडील सहज आपल्याला समजावत असतील तर हे तरूण तरूणी लगेच नाराज होतात एवढेच काय पण नको ते प्रकार आपल्याला आजुबाजुला पाहायला व ऐकायला मिळतात तेव्हा नवसंजीवनी मिळण्यासाठी ही कादंबरी जरूर एकदा तरी वाचणात यायला हवी.💐💐 दहा भावंडात असणारा आंदा काम करून , उपाशी राहून मित्रांची जुनी पुस्तक वापरून आणि दररोज उशीर झाला म्हणून अनवाणी पायाने फडक्यात भाकरी गुंडाळून शालेय शिक्षण घेतो,एवढंच काय पण कामाच खाडं व्हायला नको म्हणून घरीच अभ्यास करून तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावतो हे वाचताना मन गहिवरल्याशिवाय राहत नाही .💐💐याचाच अर्थ असा की जिद्द, चिकाटी असेल तर ध्येयाचा मार्ग कोणीही अडवू शकत नाही. 💐💐 अजुन लिहीण्यासारख खूप आहे तुर्तास एवढेच पुरे बाकी आपण वाचणातुन अनुभवालच🌹 *हा पुस्तकातील आंदा त्या पुस्तकातच मर्यादित नाही आजही आपल्या आजूबाजूला असे आंदा आपल्याला भेटतात गरज आहे फक्त त्यांना जाणुन घेण्याची आणि शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याची ...Read more

  • Rating StarDr.Bhushan Phadke

    शालेय अभ्यासक्रमात कदाचित नववीत किंवा दहावीत आनंद यादव यांच्या आत्मचरित्रातील काही भाग धडा म्हणून अभ्यासाला होता, तेव्हाच ही आत्मचरित्रात्मक कादंबरी वाचण्याची ओढ निर्माण झाली. वयाच्या एकविशित पहिल्यांदा ही कादंबरी वाचली तेव्हा अनेकदा रडलो, वयाच्या चािशीत पुन्हा जेव्हा ही कादंबरी वाचली तेव्हाही डोळ्याच्या कडा पाणावल्या पण अनेक प्रसंगात विषण्णता आणि असहाय्यता,अनुभवली आहे. आनंदा यादवांच्या "झोंबी" या आत्मचरित्रात्मक कादंबरीपासून मराठी साहित्याचा एका वेगळ्या दिशेने प्रवास सुरू झाला हेच म्हणणे संयुक्तिक ठरेल. या आत्मचरित्राला महाराष्ट्रभूषण, महाराष्ट्र दैवत "पु ल देशपांडे" यांची प्रस्तावना लाभली आहे. झोंबी या आत्मचरित्राचे, नांगरणी आणि घरभिंती हे पुढचे भागही प्रकाशित झाले आहेत. झोंबी च्या अर्पणपत्रिकेत लेखक आनंद यादव पु ल देशपांडे यांचा उल्लेख तीर्थरूप म्हणून का करतात हे वाचकांना झोंबी चा पुढचा भाग नांगरणी वाचल्याशिवाय कळणार नाही. पुलंनी `बाल्य हरवलेले बालकाण्ड` असे झोंबी चे वर्णन केले आहे. आत्मचरित्र असूनही कुठेही आत्मप्रौढी जाणवत नाही. लेखकाने शिक्षणासाठी दारिद्र्याशी केलेली लढाई म्हणजेच "झोंबी". अनेकांनी गरिबी पाहिली असेल, पण दारिद्र्याचे चटके सोसत जीव जगत ठेवणाऱ्या एका पोराच्या हाती पाटी-पेन्सिल आल्यापासून ते मॅट्रिकची परीक्षा पास होईपर्यंत कराव्या लागणाऱ्या झोंबीची ही कहाणी कहाणी वाचकाला अंतर्मुख करते. आनंद यादव यांचे वडील रतनू, आणि आई तारा यांच्या विवाहाच्या वर्णनापासून कादंबरीची सुरुवात होते. रतन आठ-दहा वर्षाचा तर तारा एक वर्षाची. विवाह चे वर्णन करताना लेखक लिहितात, "एक वर्षाच्या ताराच्या गळ्यात बांधलेल काळभोर मण्यांचे मंगळसूत्र, डोरलं मोठे चमत्कारिक दिसत होत, चिमुरड्या पोरीचा कुंकू मळवट भरला होता. मंगळसूत्र घातलेला एक तांब्या धरून रतनची एकट्याचीच घोड्यावरून वरात निघाली, एक वर्षाची पत्नी इकडे पाळण्यात गाढ झोपी गेली.तिला यातलं काहीही माहीत नव्हतं. तिकडे तिची नियती परस्पर ठरवली जात होती. सासू-सासरे, विहीणबाई आपली हौस भागवून घेत होते" काय हे वर्णन. लेखकाची आई तारा सात-आठ वर्षाची झाल्यानंतर सासरी नांदावयास (राहायला) आली तेव्हा तिच्यावर होणारे अत्याचार वाचतांना वाचक दुःखी होतो आणि असहाय्यता अनुभवतो. तारा ची आई म्हणजेच लेखकाची आजी लवकरच गेली, तिला तेव्हा एक वर्षाचा मुलगा होता त्या वेळेचे वर्णन करताना आनंद यादव लिहितात, "आईच्या मढावरचं (प्रेतावर) तो तिच शेवटचा दुध प्यायला. बायका ताराला म्हणाल्या, पाज पोरी त्याला, हे शेवटच, त्याला पाजलं आणि मढ हलवल." आनंद यादवांनी शिक्षणासाठी भोगलेल्या व्यथा या कादंबरीत तर आहेच पण त्यासोबतच ग्रामीण जीवन, अशिक्षितपणा, दारिद्र्य, केवळ मार देणे म्हणजे शिकवणे असे मास्तरांचे स्वभाव याचे वर्णन आहे. या वर्णना सोबत आई वर होणारे होणारे अत्याचार, त्याबद्दल लेखकाची असहायता, शिकणं म्हणजे चैन आणि ती दारिद्र्यात कशी काय परवडणार म्हणून वडिलांनी लाथाबुक्क्यांनी मारणे, पुन्हा आईला होणारे अनेक मुलं आणि त्या मुलांचे अपमृत्यू, गावातल्या जत्रा, उरूस याचे वर्णन या कादंबरीत आहे. आपल्या दारिद्र्याचे हालअपेष्टांचे शिक्षणासाठी घेतलेल्या मेहनतीचे कुठेही भांडवल करण्याचा लेखकाचा हेतू नाही. आपल्याला सहानुभूती मिळावी हा सुद्धा लेखकाचा हेतू कुठेही जाणवत नाही. ग्रामीण जीवन चे काही शब्द शहरी वाचकांना नवीन असले, तरीही वाचक या कादंबरीत रंगून जातो. वाचकाला अंतर्मुख करण्याचे सामर्थ्य आनंद यादव यांच्या लेखणीत आहे. ज्या बाल्यावस्थेत वडिलांचे प्रेम, आईची माया अनुभवायचे असते त्या वयात यादवांनी उपरे पणा अनुभवला आहे. शिक्षणासाठी, पुस्तकांच्या वाचनाच्या गोडीपाई कधीकधी लेखकाने लहान सहान चोरी केल्याचा उल्लेख कुठलाही आडपडदा न ठेवता लेखकाने केला आहे. वडिलांचा शिक्षणाला टोकाचा विरोध म्हणून घर सोडून कोल्हापुरात गेले तेव्हा पोट भरण्यासाठी हरभऱ्याचा पाला आणि कचराकुंडी तील लोकांनी टाकलेल्या केळीच्या साली खाउन, शिकण्याच्या तळमळीमुळे आनंद यादव घडलेत. दहावीचा फॉर्म भरण्यासाठी लेखकाची तगमग त्यासाठी जमवलेले 35 रुपये, त्यासाठी एका मास्तरांनी केलेली मदत, आणि शेवटी दहावीत मिळालेले उज्ज्वल यश.... आत्मचरित्राचा पहिला भाग संपतो. शिक्षणासाठी एवढ्या हालअपेष्टा सोसाव्या लागू शकतात त्या सोसून जिद्दीने दारिद्र्याशी झोंबून त्यावर मात करत आनंद यादवांना सारखा एक ज्ञानी, ज्ञानयोगी कर्तबगारीने पुढे येतो आणि समाजाला दिशा देण्याचे, आपल्यासारख्या शोषितांचे जीवनमान सुधारण्याचे कार्य करतो. कादंबरी पूर्ण झाल्यावर वाचक निशब्द होतो. ...Read more

  • Rating StarVijay Nimbalkar

    बाप अडमुठी, हेकेखोर आणि स्वताच खर करणारा पोरगा अकरावीच्या बोर्ड परिक्षेला बसला. त्यावर्षी बापाने बारावं पोरगं काढलं. हा सोडला तर सगळी पोरं रोगट. माती खाऊन नाळरोगी झालेली. ती फक्त खायच्याच कामाची. `ह्या पोरांना मी एकटा खायला घालू काय? तुला मळ्यात कम करायलाच लागंन!` पोराची शाळा बंद करण्यासाठी बापाचा युक्तिवाद. असल्या भयंकर बापाच्या नाकावर टिच्चून त्याने आपलं शिक्षण पूर्ण केलं व प्राध्यापक झाला. तो पोरगा म्हणजेच लेखक आनंद यादव. - विजय निंबाळकर लोहगाव, पुणे ...Read more

  • Rating StarRagini Bagwe

    कालच "झोंबी" वाचून संपवले... पण मनात रेंगाळत राहिलेय... वाचत असतानाही बरयाचवेळा वाचन थांबवत होते... आनंद यादव प्रथमच वाचले... त्यांच्या जीवंत अनुभवांनी मन त्यांच्यापेक्षा माझेच कुचंबून जात होते...1934 ते 1955 चा काळ आहे ह्यात पण असे वाटते की कुठतरी आपणच जबाबदार त्यांच्या (आणि त्यांच्यासारख्या ईतर मुलांच्या / शेतकरी कुटुंबाच्या ) हालअपेष्टांना ... कुठे तो काळ आणि कुठे आजची पिढी...उशीरा येण्यावरून,फी वेळेत भरता येत नाही म्हणून..गरज नसलेल्या मुलांना फ्री शीप दिल्यामुळे त्यांना कसे हायस्कूलला फ्री शीप ला मुकावे लागते..पुस्तकांची व फी ची बेगमी करताना किती हाल सोसावे लागतात...किती आणि कुठे राबावे लागते..हे ते कुठेहि वाचकांकडून सहानुभूतीची अपेक्षा न बाळगता...कुठेही लेखणी न बारगळता(पु लं नी प्रस्तावनेत लिहिलेलं माझ्या विचारात ,शब्दात पकडता नाही आले असते ..असे सत्य) .. कथन करत जातात... एवढे हाल .. घरात भावंडाच्या वाढत्या लेंढरांना बाप कसा जबाबदार..तरिही शाळेला जावू नये म्हणून त्याचा बेदम मार खात...ह्या भल्या माणसाने कसे घरातल्या परिस्थितीची जबाबदारी घेत शिक्षण पूर्ण केले...आपली अभ्यासाची आणि वाचनाची , काव्य लेखनाची आवड कशी जोपासतात...ओल्ड S S C हायस्कूलात तिसरया नंबरने कसे पास होतात.... सारेच डोक्यात घोळत राहते... त्यांच्या उर्वरित 3 आत्मचरित्र पण घ्यायचीत... Hats off to you Dr Anand Yadav.. शत शत प्रणाम तुम्हांला🙏🙏 ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MANSA ASHI ANI TASHIHI
MANSA ASHI ANI TASHIHI by RAVINDRA BHAGAVATE Rating Star
ठाणे वार्ता ८ डिसंबर २०२३

कथा लेखक रवींद्र भगवते हे पटकथा, संवाद लेखक,नाटककार, अनुवादक, कवी आणि निवेदक आहेत. त्यांनी महाराष्ट्र टाईम्स, साप्ताहिक लोकप्रभा, शब्द रुची, माहेर, रणांगण, गप्पागोष्टी यांमधून कथालेखन केले आहे. काही कथासंग्रह आपल्याला झपाटून टाकतात. त्यातीलच एक म्हणज भगवते यांचा हा कथासंग्रह ! `माणसं अशी आणि तशीही` हा कथासंग्रह हातात घेतला की, अधाशासारखा वाचून झाल्यानंतरच आपल्या मनाला तृप्ती मिळते. नंतर कित्येक दिवस त्यातील पात्रांच्या नशेची झिंग काही उतरत नाही. एक एक कथा वाचत पुढे गेलो की मनात अनेक अस्वस्थ भावनांचे थैमान सुरू होते. खर तर चांगल्या लेखनाचे हेच लक्षण असते की, श्री, ते वाचकांच्या बधीर संवेदना जाग्या करते. तरल मनाचे संवेदनशील कथाकार रवींद्र भगवते यांच्याकडून कोणत्या पात्राला कसा न्याय द्यायचा हे शिकायला मिळते. त्यांनी उभ्या केलेल्या व्यक्तिरेखा आपल्या आजू‌बाजूला फिरत असतात. रोजच्या आयुष्यात भेटतात. `माणसं अशी आणि तशीही` हा कथासंग्रह हाती घेतल्यानंतर त्याचे मुखपृष्ठच आपले लक्ष वेधून घेते. निळाशार अथांग असा समुद्र, त्यामध्ये संथ वाहणारी नाव, स्त्री आणि पुरुषाचे एकमेकांकडे पाहणारे रेखाटलेले चेहरे आणि त्यांच्या डोळ्यांत दिसणारे एकमेकांचे प्रतिबिंब, (जणू काही स्त्री आणि पुरुष हे एकमेकांशिवाय अपूर्णच) `माणसं अशी आणि तशीही` या कथासंग्रहाबद्दल सरदार जाधव यांनी रेखाटलेले हे मुखपृष्ठ खूप काही सांगून जाते. एकेक कथेचा परामर्ष घेत केलेली अतिशय समृद्ध अशी प्रस्तावना ज्येष्ठ, श्रेष्ठ कथा लेखक चांगदेव काळे यांनी लिहिली आहे. या कथा सुंदर का आहेत याविषयी काळे यांनी दिलेली कारणमीमांसा नक्कीच वाचनीय आहे. या संग्रहात एकूण सोळा कथांचा समावेश केला आहे. त्यातील पंधरा कथा लघुकथा या प्रकारात मोडतात तर `अमृता` ही कथा दीर्घ कथा या प्रकारात येते. `अमृता` या कथेत, निशिकांतची आई-बहिण या अमृताला समजून घेऊ शकत नव्हत्या. तेव्हा सहजपणे समाजातील लोकांची गतिमंद माणसाकडे पाहण्याची दृष्टी एका वाक्यातच विशद केली आहे.बरेच लोक मतिमंद किंवा गतिमंद माणसांना समजू शकत नाहीत, ते असं त्यांना लांबून न्याहाळत बसतात. `अमृता` ही या कथासंग्रहातील पहिली कथा तर `रावसाहेब` ही शेवटची कथा पण या दोन्ही कथेमध्ये गतिमंद मुलीची एक वेगळीच कर्म कहाणी आहे. `अमृता` या कथेतील प्रभू काका म्हणजेच अमृताचे वडील यांची एक वेगळीच छाप मनावर उमटते. आपली गतिमंद असणारी मुलगी अमृता हिचं आपल्यानंतर कसे होणार याची काळजी त्यांच्या मनात सतत भेडसावत असते. जेव्हा त्यांच्या लक्षात येते की, अमृताला निशिकांत आवडतो, तेव्हा त्यांच्याकडे येणारा विमा एजंट निशिकांत याला दोन करोड रुपये आणि बंगला देण्याचे कबूल करून निशिकांत आणि अमृताचा त्यांनी लावून दिलेला विवाह, निशिकांत, सुनंदा या पात्र पात्रांची चित्रणे, वाचकाला अनुभवाच्या वेगळ्याच पातळीवर नेऊन ठेवतात. मानसिक गरजेइतकीच व्यक्तीची शारीरिक गरज किती महत्त्वाची आहे ते कथा लेखक भगवतेनी अगदी अचूक मांडले आहे. उदा. `कामदेवानं त्याचं अमृताच्या हातातलं बोट काढलं आणि भारल्यासारखा निशिकांत सुनंदाच्या रुमकडे चालू लागला, तो तिच्या शयनमहालात कधी आला, हे त्याचं त्यालाही कळलं नाही." गतिमंद असणाऱ्या अमृताचा मनापासून सांभाळ करणाऱ्या निशिकांतनं शरीराची भूक भागविण्यासाठी सुनंदाशी केलेलं दुसरं लग्न, आणि अमृताला सुनंदा त्रास देतेय म्हणून तिच्याशी अबोला धरलेला निशिकांत... पण कितीही झाले तरी अन्न, वस्त्र, निवाऱ्याइतक्याच शरीराच्या असणा-या गरजा भागवणे हे देखील नितांत गरजेच आहे. म्हणूनच कितीही झाले तरी तो अमृताचे हातातील बोट सोडवून सुनंदाकडेच जातोच. अमृता, निशिकांत आणि सुनंदा या तीन प्रमुख पात्रांभोवती फिरणारी ही कथा वाचकाला खिळवून ठेवते. रावसाहेब ही कथा मात्र टिपिकल मर्डर मिस्टरी असली तरी ज्या ज्या व्यक्तींकडे संशयाची सुई वळते त्या त्या व्यक्तिरेखा उसठशीत झाल्यामुळे वाचकाला विचार करायला निश्चित भाग पाडते. `अमृता` या कथेतील गतिमंद अमृता असू दे, नाही तर `राबसाहेब` या कथेतील गतिमंद संगीता असू दे त्यांचा समजूतदारपणा शहाण्या सुरत्या बाईलाही जमणार नाही. भगवते यांनी साकारलेल्या पात्रांच्या जगण्यात पराकोटीचे वैविध्य आणि विषमता ठासून भरलेली आहे त्यातून ते आपापल्या वाट्याला आलेल्या परिस्थितीशी कशी झुंज देतात किंवा जुळवून घेतात. याचा चलतचित्रपट जणू डोळ्यासमोर उभा राहतो. यातल्या कथा पुन्हा पुन्हा वाचाव्यात इतक्या चांगल्या आहेत. `तिनं सवत आणली` या कथेत, आजोबांनी कमला काकी आणि शंकरकाकांकडे बघून त्यांच्या मनातील शब्दबद्ध केलेला विचार, `मला महाभारताची आठवण झाली. जरासंधाच्या जनानखान्यात कैद केलेल्या सोळा हजार स्त्रीयांशी श्रीकृष्णानं विवाह केला होता. हा शंकर नव्हे... साक्षात कृष्ण आहे.` एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीच्या भावना समजू शकते त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे कमलाकाकी, बाबू गुंडाने आणि त्याच्या सोबतच्या चार पाच व्यक्तींनी सुमनवर केलेला बलात्कार, त्यातून तिला गेलेले दिवस, अशा मुलीशी कोण लग्न करणार करणार म्हणून कमलाकाकीनं घेतलेला निर्णय आणि त्या निर्णयाची फलश्रुती याविषयी मुळातूनच ही कथा वाचायला हवी. एक मात्र खरं की भगवते यांच्या कथेतील पात्रे ही समजूतदारपणे वागतात. `कुलूप` या कथेत उद्वेगामध्ये दीपा पंडित समोर विकी ठाकूरने काढलेले उद्वार, `स्साला.... हा इतिहासच त्रास देतोय मला. इतिहासाचं काय असतं, तो बिघडत असताना आपल्याला जाणवत नाही; पण एखाद्या भुतासारखा तो आपल्या मानगुटीवर बसतो. विकी ठाकूरला दीपाच्या आक्रमक सौंदर्याची जी भुरळ पड़ते तिला दीपा कसं तोंड देते ते लेखकाच्या खास शैलीत वाचण्यासारखं आहे. `इंटरव्ह्यू` या कथेतील गावावरून आलेला विठ्ठल अडचणींचा सामना करत नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. त्यांनी साकारलेल्या पात्रांमध्ये जिद्द आहे, सकारात्मकता आहे. त्यांच्या `लाल टिकली` या कथेतील उर्मिला हिचा नवरा अपघातामध्ये मरण पावतो. तिला समजते त्याच्या सोबत कुणी सिमरन नावाची तरुणीदेखील होती. हे समजल्यावर ऊर्मिला मृत नवऱ्याच्या चारित्र्याचा शोध घेण्यासाठी बाहेर पड़ते तेव्हा तिला काय शोध लागतो ? शोध संपवूनच ती मुंबईला परत जाते. त्यांच्या कथेतील नायिका या जिद्दी आहेत. त्यांच्या मनात आलेल्या गोष्टी तडीस नेऊनच त्या शांत बसतात. त्यांची कथालेखनावर उत्तम पकड आहे. त्यांच्या प्रत्येक कथेतील व्यक्तिरेखा साकार करताना तिचा मनोविश्लेषणात्मक वेध ते इतक्या सूक्ष्मतेने घेतात म्हणूनच या व्यक्तिरेखा आपल्यापुढे जिवंतपणे उभ्या राहतात. त्यांच्या `गॉगल` या कथेतील घरकाम करणाऱ्या संगीतावर रिबानचा गॉगल चोरल्याचा निकिता आरोप करते. एखादा आरोप प्रामाणिक माणसाला कसा अस्वस्थ करतो तो अस्वस्थपणा या कथेत छान टिपला आहे. त्यांच्या कथेतील पात्रांचे परस्परांशी असलेले नातेसंबंध कथाविषयाचे बीज आणि त्याला अनुसरून केलेली कथेची मांडणी यातून लेखकाच्या सहजाविष्काराचं सामर्थ्य लक्षात येतं. प्रवाही भाषाशैली, तिच्यातील संवेदनशीलता आणि खिळवून ठेवणारं कथाबीज यामुळे वाचक या कथांमध्ये गुंतत जातो आणि मानवी स्वभावाचे विविध नमुने पाहून स्तिमितही होतो. लेखक भावविश्वात खोल खोल उतरत जातो आणि त्यातून प्रत्येक कथा तिच्या आंतरिक गाभ्यासह वाचकांच्या मनाला एक वेगळीच अनुभूती देऊन जाते. त्यांच्या `वर्तुळ` या कथेतील अशोक याला प्लॅटफॉर्मवर धावणारी आपली बायको थोडीशी स्थूल वाटते, त्याला ती नकोशीही वाटते. त्याच्या बाजूने जाणारा तरुण-तरुणींचा सुगंधी घोळका पाहून लगेच त्याच्या मनात विचार येतो, अशाच एखाद्या फुलासी आपलं लग्न व्हायला पाहिजे होतं. मग काय सुगंधच सुगंध... आकाशाएवढा त्याच्या मनातलं हे वादळ शमतं का याचं उत्तर ही कथा सकारात्मक पद्धतीने देते. वास्तव जीवनात पाहण्यात येणारे सर्वसामान्यांचं जगणं, त्याची हतबलता, त्यांचं सोसणं, परिस्थितीला शरण जाण्याची वृत्ती, त्यांमधील ताणतणाव यांसारख्या वास्तवातून सापडणारी कथाबीजं लेखकाला जितकी अस्वस्थ करतात, तितकीच त्या कथा वाचणाऱ्यांनाही अस्वस्थ करून जातात. वास्तवातून फुललेल्या या कथेची पातळी वैयक्तिक अनुभवाची न राहता तिला विशाल सामाजिक भावविश्वाचं अधिष्ठान प्राप्त होतं. त्यांच्या अनेक कथामधून काळाची पावले उमटताना दिसतात. त्यांची `अनामिका` ही कथाही मनाला चटका लावून जाते. या कथासंग्रहाची महत्त्वाची वैशिष्ट्ये म्हणजे त्यांच्या कथेतील सर्व पात्रे ही सहज भावनेनं वावरतात. मानवी जीवनमूल्यांची जिवापाड जपणूक करताना दिसतात. कथा विषय नेहमीचेच असले तरी लेखकाची कथा मांडणीची शैली वेगळी आहे. कसदार लेखन, भाषेचा वेगळेपणा, शब्द चमत्कृतीचा नेमका वापर, आटोपशीर प्रसंग अशा अनेक जमेच्या बाजू `माणसं अशी आणि तशीही या कथासंग्रहात दिसतात. त्यांच्या कथा विचार करायला लावतात, या कथासंग्रहातल्या इतर कथांमध्येही लेखकाने अनेक नाविन्यपूर्ण विषय हाताळलेले आहेत. प्रत्येकाने आवर्जून वाचावा आणि आपल्या संग्रही ठेवावा. असा हा कथासंग्रह, कथाकार रवींद्र भगवते यांनी असेच लिहीत जावे, हीच मनःपूर्वक सदिच्छा. त्यांच्या साहित्य सेवेस सुयश चिंतिते. ...Read more

THE HUNGRY TIDE
THE HUNGRY TIDE by AMITAV GHOSH Rating Star
जयश्री सोनवणे

बंगालमधील सुंदरबनच्या पार्श्वभूमीवर ही कादंबरी जन्म घेते कादंबरीत मुख्य पात्रेत अशी चार-पाचच आहेत. कनाई -हा मूळ कलकत्त्याचा पण आता दिलीत राहून तेथे येणाऱ्या परदेशी भाषिकांना दुभाषा पुरवणे हा त्याचा धंदा आहे. पेशाने तो भाषांतरकार आहे. स्वतःच्या धंद्ामध्ये खूपच व्यस्त असणारा हा ४२ वर्षाचा तरुण त्याची मावशी नीलिमा हिच्या निर्वाणीच्या आग्रहावरून तिला भेटायला वेळात वेळ काढून लुसीबारीला आलेला आहे. पिया- ही मुळची बंगाली. पण आई-वडील सिएटलला स्थायिक झाल्यामुळे आता अमेरिकन आहे. ती सुंदरबन मधील डॉल्फिनचा अभ्यास करायला इकडे आलेली आहे आणि येताना रेल्वेमध्ये तिची कनाईशी ओळख झालेली आहे. निर्मल नीलिमा- निर्मल नीलिमा हे जोडपे या प्रदेशात राहणाऱ्या गरिबीने ग्रासलेल्या बहुसंख्य लोकांसाठी त्यांच्या उत्कर्षासाठी आपले आयुष्य खर्च करायचे हा आदर्श ठेवून १९७० पासून इथे स्थायिक झालेले आहे लुसीबारी येथे त्यांची बडाबन नावाची संस्था आहे दिली माने येथे दवाखाना काढलेला आहे. मोयना- ही लुसी बारीची स्थानिक तरुणी नीलिमाच्या दवाखान्यात नर्स चं काम शिकत आहे. त्याशिवाय अजूनही बरीच कामं ती करत असावी असे दिसते. कारण कनाई साठी जेवण बनवून आणायचं काम निलिमाने तिला सांगितलं आहे. फोकीर- फोकीर हा मोयनाचा नवरा आहे आणि तिथला मासेमारी करणारा कोळी आहे. खाडीच्या प्रदेशात राहत असल्याने मासेमारी व खेकडे हे मुख्य उपजीवीकेचे साधन आहे आणि ते पकडण्यात तो पटाईत आहे. तसेच त्याला इथल्या खाड्चीयां कण न कण माहिती आहे. होरेन - होरेन हा पण एक निष्णात आणि अनुभवी कोळी आहे आणि फोकीरला तो स्वतःच्या मुलासारखा मानतो. सर डॅनियल हॅमिल्टन नावाचा एक स्कॉटिश माणूस ब्रिटिश सरकारकडून १९०३ झाली ही बेटं असलेली दहा एकर जमीन विकत घेतो आणि तिथे मनुष्यवस्ती वसवण्याचा चंग बांधतो. अनेकांना ही जमीन त्याने फुकट दिली आणि १९२० सालापासून ज्यांच्याकडे मालमत्ता, जमीन काहीच नाही अशा अत्यंत गरीब लोकांना या जमिनीच्या मालकीच्या आशेने इथे येऊन वसाहत करण्यास आवाहन केले.१९७१ साली झालेल्या बांगला युद्धामध्ये आणि १९४७ साली झालेल्या फाळणीमध्ये असंख्य निर्वासितांचे लोंढेच्या लोंढे या बेटांवर आले तेव्हा इथे फक्त वाघ, मगरी, चित्ते, नाग, आणि शार्क मासे यांचे साम्राज्य होते. असंख्य लोक त्यांच्या भक्ष्यस्थानी पडले. जे राहिले जगले ते सतत असुरक्षिततेची मूक भावना घेऊन जगत राहिले. इथे वय वर्ष ३० च्या पुढे जगलेले तरुण खूपच कमी दिसतात. इतकंच नव्हे तर इथल्या स्त्रियांचे नेहमीचे पोशाख सुद्धा विधवेचे वस्त्र धारण करणारे असतात अशी इथली परिस्थिती अत्यंत दारुण आहे. खरंतर या कादंबरीला नायक किंवा खलनायक नाहीच आहे. जर कोणी नायक किंवा खलनायक असेल तर तो निसर्ग आहे, ती भरती-ओहोटी आहे. इथले वाघ, मगरी, साप हे सर्व खलनायक आहेत. इथले वादळी वारे, पाण्याचे सतत बदलते प्रवाह आहेत जे इथल्या मनुष्य जीवनाला कधी होत्याचे नव्हते करून टाकतील हे सांगता येत नाही. फाळणी नंतर आणि युद्धानंतर देशोधडीला लागलेले असंख्य लोक इथे आले. ते अत्यंत गरीब होते. इथल्या भरती ओहोटी, लहरी निसर्ग, हिंस्र प्राणी यांच्याशी आपल्या अस्तित्वासाठी ते लढू लागले. त्यांना जात, धर्म, कूळ, वंश यांच्याशी काही देणंघेणं नव्हतं. कारण त्यांच्या अस्तित्वाची लढाईच एवढी बिकट होती की या कशाचं भान असण्याची परिस्थितीच नव्हती. आणि या सर्व लोकांना घुसखोर ठरवून सरकारी अधिकाऱ्यांकडून त्यांना कायम त्रास दिला जात होता. तुरुंगात डांबलं जायचं आणि गोळीबारात मारलं जायचं. निर्मला मात्र क्रांतीसाठीही परिस्थिती अगदी योग्य वाटायची. आपण जेव्हाही कादंबरी वाचायला घेतो तेव्हा ती आपल्या मनाची इतकी पकड घेते की शेवटपर्यंत आपण ती सोडू शकत नाही. संपूर्ण कथानक बाळबोधपणे काळानुसार एका सरळ रेषेत न जाता नदीसारखं वळण घेत, कधी भूतकाळाच्या खाच खळग्यात अडकत, साचत पुढे जाते. मध्येच ते खूप प्रवाही होते, मध्येच संथ होते आणि मध्ये मध्ये निसरड्या शेवाळ्याप्रमाणे फसवं होत जातं. श्री अमिताभ घोष यांचे मूळ इंग्रजी पुस्तक मराठीतून वाचताना हे लक्षात येतं की अनुवादकार श्री. सुनील करमरकर यांची मराठी भाषेवरची पकड ही तितकीच पक्की आहे जितकी त्यांची इंग्रजी भाषेवर पक्की पकड आहे. कादंबरी इंग्रजीत वाचून त्याचा रसास्वाद घेणे ही सहज साध्य गोष्ट आहे. पण त्यातील तरलता आणि जीवनानुभवाला यत्किंचितही धक्का न लावता त्याचा मराठीत अनुवाद करणं हे खूप आव्हानात्मक आहे आणि हे आव्हान सुनील करमरकर यांनी यशस्वीपणे पेललेले आहे. मुळात इंग्रजी भाषेचा बाज, त्याची वाक्यरचना मराठी भाषेपेक्षा खूपच वेगळी असते. पण ही कादंबरी मराठीतून वाचताना कुठेही असं जाणवत नाही की हा अनुवाद आहे म्हणून. ही कादंबरी मुळात मराठीतच लिहिली गेली असावी असं वाटावं इतकी ती अस्सल उतरली आहे. माणसाच्या नात्यातील भावनांचा कल्लोळ आणि दुसरीकडे निसर्गाच्या लहरी स्वभावाचा कल्लोळ याचे चित्र रेखाटताना केलेली शब्दांची गुंफण खूपच विस्मित करणारी आहे. कादंबरी वाचताना ती माणसे, कांदळवनाचे जाळे, पाण्याचा आणि जंगलाचा गूढपणा, दरारा बसवणारं वादळ या गोष्टी जशाच्या तशा आपल्यासमोर उभ्या राहतात. श्री. सुनील करमरकर यांच्या भाषा कौशल्याचा हा परिणाम आहे. आजच्या काळात जिथे एका मराठी वाक्यात दोन इंग्रजी शब्द नसतील तर आपल्याला कमी लेखले जाईल ही भावना घेऊन भाषेचा वापर करणाऱ्या, न्यूनगंडात गेलेल्या मराठी माणसासाठी ही कादंबरी म्हणजे मराठी अस्खलीतपणाचे उदाहरण आहे. कुठेही अर्थाला, आशयाला, प्रासंगिक वर्णनाला बाधा न आणता मराठी भाषेचे वैभव श्री. सुनील करमरकर आपल्या लिखाणातून, अनुवादातून उलगडत जातात. त्यांनी हे सर्व लिखाण करताना घेतलेले कष्ट नक्कीच जाणवतात. श्री सुनील करमरकर यांचे हे पहिले अनुवादित पुस्तक आहे यावर विश्वास बसणार नाही इतके हे पुस्तक उत्तम झाले आहे. ...Read more