* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: NATRANG
  • Availability : Available
  • ISBN : 9788177665130
  • Edition : 9
  • Publishing Year : OCTOBER 1980
  • Weight : 180.00 gms
  • Pages : 200
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :ANAND YADAV COMBO SET-33 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
SET IN THE 1970S, NATARANG IS A VERY RENOWNED NOVEL IN MARATHI LITERATURE, ONE OF ITS OWN TYPE. IT IS ILLUSTRIOUS AS WELL AS GLOOMY. THIS PICTURES ALMOST ALL YADAV`S SKILL AS A WRITER. HE POSSESSES AN IMMENSE QUALITY TO PICTURE THE EVENTS TRULY, MAKING THEM VERY INTERESTING, GIVING THEM A TOUCH OF PSYCHOSCIENTIFIC ASPECT. HE HAS A PERFECT SENSE OF HUMOUR AND COMPASSION, CATCHES IT WITHOUT FAIL AND MAKES THE NOVEL LIVELY. `NATRANG` IS A MOURNFUL NOVEL OF AN INDIAN ARTIST. IT HAS MANY ASPECTS OF EXPERIENCE. IT IS A HOMOGENOUS MIXTURE OF THE INTENSE POVERTY AND ARTISTIC ENERGY, AN ARTIST`S FAMILY AND THE ARTIST`S PERSONALITY. THE AUTHOR HAS PORTRAYED THE LIFESTYLE OF AN ARTIST FROM THE `MATANG` COMMUNITY. HE WANTS TO LEAVE THE SAFE BOUNDARIES, LEAD HIS LIFE IN A DIFFERENT MANNER, AWAY FROM THE TRADITIONS, WANTS TO PRODUCE SOME FINE ARTS, HE IS INSPIRED BY HIS SOUL. HE HAS TO FIGHT WITH THE ARTISTS WHO ARE READY TO SELL THEIR ART FOR THE SAKE OF MONEY. THE AUTHOR PORTRAYS PERFECTLY WELL THE ARTIST WITH HIS PUREST MIND DEDICATED TOWARDS ARTS. DR. CHANDRAKANT BANDIWADEKAR.
`नटरंग` मराठीतील एक अव्वल दर्जाची, कलात्म आणि शोकात्म कादंबरी. `नटरंग` मध्ये आनंद यादवांच्या लेखकीय व्यक्तिमत्त्वाची बहुतेक सारी वैशिष्ट्ये प्रभावीपणे व्यक्त झालेली आहेत. प्रसंगांना चित्रवत आकार देण्याची आणि संपूर्ण रसपूर्ण बनवण्याची, त्यांना मनोवैज्ञानिक स्पर्श देण्याची, प्रसंगातील कारुण्य आणि विनोद हेरण्याची लेखकाची क्षमता विलक्षण आहे. त्यामुळे कादंबरीचे वातावरण चैतन्यपूर्ण झाले आहे. `नटरंग` ही एका भारतीय कलावंताची शोकांतिका. तिला अनुभवाचे अनेक पदर आहेत. जीवनातील भयानक दारिद्र्य आणि कलात्मक ऊर्जा, कलावंताचे कुटुंब आणि कलावंताचे कलाव्यक्तिमत्त्व, मातंग समाजाची रूढिग्रस्त जनमान्य जीवनशैली आणि तिच्या बाहेर जाऊन आत्मप्रेरणेने आणि कलानिर्मितीच्या आकांक्षेने जगू पाहणारा कलावंत, कलेचा उपयोग पोट भरण्यासाठी करू पाहणारे सहकारी आणि कलेच्या विशुद्धतेचा ध्यास घेऊ पाहणारा कलावंत, अशी संघर्षाची विविध आणि व्यामिश्र रूपे `नटरंग`मध्ये एकजीव झालेली आहेत. डॉ. चंद्रकांत बांदिवडेकर
महाराष्ट्र राज्य पुरस्कार १९८२

No Records Found
No Records Found
Keywords
#झोंबी #(महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार १९८८-८९) #(महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार १९८८-८९) #(दि फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स -उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार १९८९) #(मारवाडी संमेलन पुरस्कार १९९०) # (साहित्य अकादमी पुरस्कार १९९०) #(प्रवरानगर - विखेपाटील पुरस्कार १९९१) #(संजीवनी साहित्य पुरस्कार, कोपरगाव १९९४) # नांगरणी # (रोहमारे ग्रामीण पुरस्कार १९९०) #घरभिंती #काचवेल #माऊली # (कालीमाता साहित्य पुरस्कार १९८६ #परिमल लेखन पुरस्कार १९८६ # नटरंग #(महाराष्ट्र राज्य पुरस्कार १९८२) # गोतावळा # शेवटची लढाई #(राज्य पुरस्कार २००१-०२) #भूमिकन्या #झाडवाटा # उगवती मने #(राज्य पुरस्कार २००२-०३) # आदिताल # डवरणी #माळावरची मैना # घरजावई #खळाळ #उखडलेली झाडं #सैनिक हो, तुमच्यासाठी... #मळ्याची माती #मायलेकरं #साहित्यिकाचा गाव #मातीखालची माती #स्पर्शकमळे #पाणभवरे #साहित्यिक जडण-घडण # ग्रामसंस्कृती #(रा. ना. सबनीस वाङ्मयपुरस्कार २००२) # मराठी लघुनिबंधाचा इतिहास #साहित्याची निर्मिती प्रक्रिया #ग्रामीणता : साहित्य आणि वास्तव आत्मचरित्र मीमांसा #"ग्रामीण साहित्य : स्वरूप व समस्या #(राज्य पुरस्कार १९८३) # मराठी साहित्य - समाज आणि संस्कृती #१९६० नंतरची सामाजिक स्थिती आणिसाहित्यातील नवे प्रवाह # डॉ. आनंद यादव - एक साहित्यिक प्रवास #ZOMBI #NANGARNI #GHARBHINTI #KACHVEL #MAULI #NATRANG #GOTAVALA #SHEVATCHI LADHAI #BHUMIKANYA #ZADVATA #UGVATI MANE #AADITAL #DAVARNI #MALAVARCHI MAINA #GHARJAWAI #KHALAL #UKHADLELI ZADE #SAINIK HO TUMACHYASATHI #MALYACHI MATI #MAI LEKARA #SAHITYIKACHA GAON #MATIKHALCHI MATI #SPARSHKAMALE #PANBHAVARE #SAHITYIK JADAN-GHADAN #GRAMSANSKRUTI #MARATHI LAGHUNIBANDHACHA ITIHAS #SAHITYACHI NIRMITI PRAKRIYA #GRAMINTA SAHITYA ANI VASTAV #AATMACHARITRA MIMANSA #GRAMIN SAHITYA : SWARUP ANI SAMASYA #1960 NANTARCHI SAMAJIK STHITI ANI SAHITYATEEL NAVE PRAVAH #DR. ANAND YADAV EK SAHITYIK PRAVAS
Customer Reviews
  • Rating StarKacharu Chambhare

    आनंद यादवांची नटरंग लेखन हाच पिंड स्वीकारलेल्या लेखकांकडून एकाहून एक सरस साहित्यकृती निर्मिल्या जातात पण तरीही त्यांची ओळख एखाद्याच अजरामर साहित्यकृतीशी घट्ट विणली जाते.शिवाजी सावंतांची ओळख मृत्युंजयकार म्हणून तर विश्वास पाटील झाडाझडती ,विस भाऊंना यातिकार म्हणून अशी उदाहरणं वाणगीदाखल देता येतील.अशाच पंक्तीतलं एक उदाहरण म्हणजे डॉ.आनंद यादव अर्थात झोंबीकार.आनंद यादवांची आठवण येण्याची कारण म्हणजे त्यांचा स्मृतिदिन व जयंती दिन.हे दोन्ही दिवस कमी अंतराने आहेत.कागलकर आनंदरावांचा जन्म 30 नोव्हेंबरचा व मृत्यू 27 नोव्हेंबरचा.दोन तारखातलं अंतर दिवसात मोजलं तर तीन दिवसाचं आहे पण शरीरदेहाच्या वावरण्याचा कालखंड मोजला तर तो तब्बल एक्याऐंशी वर्षाचा आहे.आकाशवाणी केंद्रातली काळी काळची नोकरी ,पुण्यातली दीर्घ काळ प्राध्यापकाची नोकरी केलेल्या आनंदरावांनी मराठी साहित्यासाठीही एकाहून एक सरस साहित्यकृती दिल्या.त्यांच्या नटरंग या कादंबरीचा परिचय मी मांडत आहे. नटरंग हा मराठी सिनेमा अनेकांनी पाहिलेला आहे.काहींनी तो दोनदा तीनदाही पाहिला असेल.तमाशा कलेचे वेड पांघरलेल्या गुणा या गुणी कलाकाराची चित्तरकथा म्हणजे नटरंग .अर्थपूर्ण गीते व दमदार कथानक यांमुळे नटरंग प्रेक्षकांचा ठाव घेतो. हो ,हा नटरंग सिनेमा ज्या कादंबरीवर बेतलेला आहे तिचं नाव आहे नटरंग व लेखक आहेत डॉ.आनंद यादव. चित्रपट पाहिलेल्या माणसांनी कादंबरी वाचायला घेतली की सुरूवातीची काही पाने वाचताना माणुस चित्रपटातल्या दृश्यांना डोळ्यासमोर ठेऊन वाचतो.मग हळूहळू चित्रपटाचं झाकण आपोआप गळून पडतं व आपण साहित्यकृतीशी एकरूप होतो. कागलच्या मांगवाड्यातील गुणा हा मुलाची ही कथा.अंगापिंडानं चांगलं थोरलं व रूपानं राजबिंड असलेलं हे गुणा पोर खरोखरीच गुणी असतं.कुस्त्या मारलेलं शरीर त्याच्याजवळ असतं पण दणकट शरीराच्या मनात एक कलासक्त चित्त वावरत असतं.भोवतालच्या परिसरात यात्रा व यात्रेतलं मनोरंजन म्हणून तमाशा ही संस्कृती रूढगत झालेली असते.गुणालाही तमाशा पाहणं आवडत असतं .त्यातूनच त्याला तमाशात काम करण्याचं व स्वतःचा फड उभा करण्याचे वेड लागते.तमाशा उभा करण्यात येणाऱ्या अडचणी व अडचणींवर केलेली मात ,तमाशाबद्दलची मते या सगळ्या गोष्टी नटरंगमध्ये वाचायाला मिळतात.तमाशा ही जरी कला असली तरी कलावंताचा प्रवास किती खडतर किती जीवघेणा असतो ,याचा आरसाच नटरंग उभा करते. कादंबरी दोन भागात आहे.पहिल्या भागात गुणाचं कौटुंबिक जीवन ,तमाशा उभे करण्याचे कष्ट अडीअडचणी आहेत.कलेला साधना ,ध्येय स्वीकारलेल्या गुणाचा संघर्ष पहिल्या भागात आहे.गुणाच्या वडिलांना गुणाचे हे तमाशाचे वेड अजिबातच पटत नव्हते.दोघा बापलेकाचे वारंवार खटके उडत.शेवटी गुणाचा बाप आत्महत्या करतो.चित्रपटात गुणाच्या बापाचा मृत्यू नैसर्गिक दाखवलेला आहे. कादंबरीचा दुसरा भाग थरार आहे.गुणा ,नयना ,विष्णू या सामान्य कलाकारांना असामान्य रंगमंच मिळतो व नाच्या या पात्राने गुणाची वाहवा होते.रात्रीच्या वेळी कलाकार म्हणून गुणाच्या नाच्याचे कौतुक होत असले तरी दिवसा मात्र नाच्या गुणाच्या वाट्याला सगळीकडूनच हेटाळणी वाट्याला येत असते.पुढं तर जे घडतं ते भयावह व अकल्पित आहे.बापय माणुस असलेल्या गुणावर बलात्कार होतो.कलेच्या पुजेला ध्येय मानणारा गुणा पुजारी अक्षरशः उद्धवस्त होतो. चित्रपट हे दिग्दर्शकाचे तांत्रिक कौशल्य असते .मुळ लेखनात पाया ,विस्तार व समारोप असल्यामुळे लेखकाची मुळ कृती चित्रपटाहून अधिक व्यापक असते.गुणाचा सारा प्रवास ,ग्रामीण बोली इ.बाबीसाठी नटरंग वाचावी. ...Read more

  • Rating StarKacharu Chambhare

    आनंद यादवांची नटरंग लेखन हाच पिंड स्वीकारलेल्या लेखकांकडून एकाहून एक सरस साहित्यकृती निर्मिल्या जातात पण तरीही त्यांची ओळख एखाद्याच अजरामर साहित्यकृतीशी घट्ट विणली जाते.शिवाजी सावंतांची ओळख मृत्युंजयकार म्हणून तर विश्वास पाटील झाडाझडती ,विस भाऊंन ययातिकार म्हणून अशी उदाहरणं वाणगीदाखल देता येतील.अशाच पंक्तीतलं एक उदाहरण म्हणजे डॉ.आनंद यादव अर्थात झोंबीकार.आनंद यादवांची आठवण येण्याची कारण म्हणजे त्यांचा स्मृतिदिन व जयंती दिन.हे दोन्ही दिवस कमी अंतराने आहेत.कागलकर आनंदरावांचा जन्म 30 नोव्हेंबरचा व मृत्यू 27 नोव्हेंबरचा.दोन तारखातलं अंतर दिवसात मोजलं तर तीन दिवसाचं आहे पण शरीरदेहाच्या वावरण्याचा कालखंड मोजला तर तो तब्बल एक्याऐंशी वर्षाचा आहे.आकाशवाणी केंद्रातली काळी काळची नोकरी ,पुण्यातली दीर्घ काळ प्राध्यापकाची नोकरी केलेल्या आनंदरावांनी मराठी साहित्यासाठीही एकाहून एक सरस साहित्यकृती दिल्या.त्यांच्या नटरंग या कादंबरीचा परिचय मी मांडत आहे. नटरंग हा मराठी सिनेमा अनेकांनी पाहिलेला आहे.काहींनी तो दोनदा तीनदाही पाहिला असेल.तमाशा कलेचे वेड पांघरलेल्या गुणा या गुणी कलाकाराची चित्तरकथा म्हणजे नटरंग .अर्थपूर्ण गीते व दमदार कथानक यांमुळे नटरंग प्रेक्षकांचा ठाव घेतो. हो ,हा नटरंग सिनेमा ज्या कादंबरीवर बेतलेला आहे तिचं नाव आहे नटरंग व लेखक आहेत डॉ.आनंद यादव. चित्रपट पाहिलेल्या माणसांनी कादंबरी वाचायला घेतली की सुरूवातीची काही पाने वाचताना माणुस चित्रपटातल्या दृश्यांना डोळ्यासमोर ठेऊन वाचतो.मग हळूहळू चित्रपटाचं झाकण आपोआप गळून पडतं व आपण साहित्यकृतीशी एकरूप होतो. कागलच्या मांगवाड्यातील गुणा हा मुलाची ही कथा.अंगापिंडानं चांगलं थोरलं व रूपानं राजबिंड असलेलं हे गुणा पोर खरोखरीच गुणी असतं.कुस्त्या मारलेलं शरीर त्याच्याजवळ असतं पण दणकट शरीराच्या मनात एक कलासक्त चित्त वावरत असतं.भोवतालच्या परिसरात यात्रा व यात्रेतलं मनोरंजन म्हणून तमाशा ही संस्कृती रूढगत झालेली असते.गुणालाही तमाशा पाहणं आवडत असतं .त्यातूनच त्याला तमाशात काम करण्याचं व स्वतःचा फड उभा करण्याचे वेड लागते.तमाशा उभा करण्यात येणाऱ्या अडचणी व अडचणींवर केलेली मात ,तमाशाबद्दलची मते या सगळ्या गोष्टी नटरंगमध्ये वाचायाला मिळतात.तमाशा ही जरी कला असली तरी कलावंताचा प्रवास किती खडतर किती जीवघेणा असतो ,याचा आरसाच नटरंग उभा करते. कादंबरी दोन भागात आहे.पहिल्या भागात गुणाचं कौटुंबिक जीवन ,तमाशा उभे करण्याचे कष्ट अडीअडचणी आहेत.कलेला साधना ,ध्येय स्वीकारलेल्या गुणाचा संघर्ष पहिल्या भागात आहे.गुणाच्या वडिलांना गुणाचे हे तमाशाचे वेड अजिबातच पटत नव्हते.दोघा बापलेकाचे वारंवार खटके उडत.शेवटी गुणाचा बाप आत्महत्या करतो.चित्रपटात गुणाच्या बापाचा मृत्यू नैसर्गिक दाखवलेला आहे. कादंबरीचा दुसरा भाग थरार आहे.गुणा ,नयना ,विष्णू या सामान्य कलाकारांना असामान्य रंगमंच मिळतो व नाच्या या पात्राने गुणाची वाहवा होते.रात्रीच्या वेळी कलाकार म्हणून गुणाच्या नाच्याचे कौतुक होत असले तरी दिवसा मात्र नाच्या गुणाच्या वाट्याला सगळीकडूनच हेटाळणी वाट्याला येत असते.पुढं तर जे घडतं ते भयावह व अकल्पित आहे.बापय माणुस असलेल्या गुणावर बलात्कार होतो.कलेच्या पुजेला ध्येय मानणारा गुणा पुजारी अक्षरशः उद्धवस्त होतो. चित्रपट हे दिग्दर्शकाचे तांत्रिक कौशल्य असते .मुळ लेखनात पाया ,विस्तार व समारोप असल्यामुळे लेखकाची मुळ कृती चित्रपटाहून अधिक व्यापक असते.गुणाचा सारा प्रवास ,ग्रामीण बोली इ.बाबीसाठी नटरंग वाचावी. ...Read more

  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 25-06-2017

    कोल्हापूर जिल्ह्यातील कागल गावामध्ये राहणाऱ्या मांग वस्तीतल्या माणसांची ही गोष्ट! खरं म्हणजे या माणसांबद्दल सांगण्यासारखं काय असणार?... जिथे समदा मांगवाडा पेकाट मोडलेल्या कुत्र्यागत निपचित पडलेला! तिथे सांगण्यासारखं काय असणार? दरिद्र्य, दु:ख आणि विलेली आयुष्ये! घराला घरं चिकटून उभी. एका बाजूला भांड्यातलं, गाडग्यातलं उरलं सुरलं. सडणारी गटारं आणि आदिवाशाप्रमाणे लंगोटी घातलेली, विटके जुनेर नेसलेली वाकड्या तिकड्या चेहऱ्याची माणसं. इथे राहणाऱ्या बाळूला कधी एकदा आयुष्य म्हणून वाट्याला आलेली साठ-सत्तर वर्ष संपतात, असं झालेलं आहे. त्याच्या तरुणपणी असं नव्हतं. गावात गुरं ढोरं होती. मोटा-औत होते. म्हसरं आणि गायरं होती. मांगाचा धंदा भरघोस चालत होता. परंतु जमाना बदलला. विहिरीवर इंजिन बसलं, इंजिनावर मोटरी आल्या आणि मोटा गेल्या. पाठोपाठ एस.टी. आली. धंदा चालणार कसा? चार पैसे मिळावे म्हणून बाळूने थोरल्या मुलाला मिलिटरीत भरती केला. चार वर्षे ठीक गेली. परंतु लढाईत तो कुठे बेपत्ता झाला, ते कुणालाच माहिती नाही. सात महिन्यांनी सरकार दरबारी ‘मृत’ अशी नोंद झाली. पोरगं गेलं म्हणून बायनी खूप रडली आणि त्यातच तिचे डोळे गेले. आता त्याचं पेन्शन येतं, परंतु ते त्याच्या बायकोच्या नावावर येतं. आणि ती तर वेगळी राहते. धाकल्या गुणाला त्याने शाळेत घातलं. परंतु तो कसाबसा सात आठ वर्षं शाळेत गेला आणि नंतर गावातच उंडारत बसला. नोकरीचं कुठे जमलंच नाही. परंतु पोट कोणाला चुकलंय? मग रोजगारी नशिबी आली. आज गुणाच्या रोजगारीवर घर कसं बसं चालतंय आणि ज्या गुणाच्या रोजगारीवर घराचं पोट अवलंबून आहे. त्या गुणाचं लक्ष मात्र... काळजाला भिडणारं हे महाराष्ट्रातलं ग्रामीण जीवन, आनंद यादव यांच्या ‘नटरंग’ कादंबरीत अगदी भेदकपणे आलेलं आहे. मराठी साहित्यजगतात १९६० नंतरच्या कादंबरी लेखनामध्ये एक महत्त्वाचा बदल झालेला आढळतो. आतापर्यंतच्या साहित्यात असलेलं महाराष्ट्रातील ग्रामीण जीवनाचे भाबडे, आनंद देणारे रंजक चित्रण न राहता खरेखुरे वास्तव दर्शन या नव्या कादंबऱ्यांमध्ये दिसतं. दरिद्री, अज्ञानी, ग्रामीण कुटुंबाच्या वाट्याला आलेल्या भीषण व्यथांचा तो आरसा आहे. गावातील रितीरिवाज, लहरी, निसर्ग, बापाचा आडमुठेपणा, स्त्रीचा होणारा अपरिमित छळ, लागोपाठ होणारी मुले, मुलांचे अपमृत्यू गावातले उरूस, जत्रा या सगळ्याचा मानवी जीवनावर होणारा परिणाम वाचकाला अस्वस्थ करून सोडतो. एकूणच काही सामर्थ्यवान कादंबरीकारांनी मराठी ग्रामीण जीवनावर भाष्य करून मराठी कादंबरीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. या वेगळी वाट चोखाळणाऱ्या लेखकांमध्ये आनंद यादव यांचा विशेष उल्लेख करावा लागेल. कथा, कादंबरी, कविता, आत्मचरित्र अशा साहित्यातील विविध अंगात मुशाफिरी करणाऱ्या आनंद यादव यांनी पाच कादंबऱ्या लिहिल्या. त्या सर्व गाजल्या. परंतु त्यात देखील त्यांच्या ‘नटरंग’ कादंबरीचा विशेष उल्लेख करावा लागेल. या कादंबरीवर सिनेमादेखील निघाला. तो देखील रसिकांनी डोक्यावर घेतला. अगदी शहरी भागात देखील हा सिनेमा खूप चालला, तेव्हा प्रश्न पडतो की, या कादंबरीत असं नेमकं काय आहे की, जे समस्त महाराष्ट्राला विशेष भावले? ‘नटरंग’ कादंबरीचा नायक गुणा मांग हा त्याच्या मांग वाड्यातला पोरांसारखा रोजंदारीवर काम करतो आहे. परंतु त्याची नजर मात्र एका वेगळ्याच जगावर आहे. मांग वाड्यातील समस्या, दु:ख ती तर रोजचीच आहेत. परंतु या दु:खाला आपलेसे करून परंपरांगत आयुष्य जगणे, हे त्याच्या स्वभावातच नाही. त्याची नजर दूर क्षितिजावर आहे. हलगीचा नाद त्याच्या कानावर पडला की त्याची पावले हलकीफुल होऊन तमाशाच्या मांडवाकडे वळतात. जीव भरारतो. तमाशाच्या मांडवात शिरल्यावर देवळात आल्यागत वाटतं. भान हरपूर तो गाणी ऐकतो. सोंगाड्याच्या नकला त्याला गुदगुल्या करतात. मन एका झगमगत्या जगात जाऊन बसतं. तो त्याची गरिबी, त्याच्या आतावर असलेलं अवघ्या कुटुंबाचं पोट. त्याचा मांगवाडा हे सगळं विसरतो. दिमाखदार राजा आणि त्याची अहंकारी राणी यांच्या जगात तो हरवतो. तमाशा संपतो. विजारीला लागलेली धूळ आणि वाळके गवत झाडत तो उठतो. थकलेलं शरीर घेऊन घराकडे परततो. मनात मात्र अजूनही तमाशाच असतो. भोवतालची दुनिया त्याला शिळी वाटू लागते. मात्र या नादात आठवड्याची अर्धी कमाई खर्च झाली आहे, याची त्याला जाणीव देखील नसते. मांगवाड्यातल्या पोरांना सोबत घेऊन गुणाला तमाशाची बारी काढायची आहे. त्या प्रमाणे तो मांग वाड्यातल्या मुलांना जमा करतो. कोणी ढोलकी वाजवतो तर कोणी बाजपेटी. तो स्वत: वग लिहितो. लावणी रचतो... मांग वाड्यात पोरांना जोर चढतो. अर्थात तमाशा उभा करायचा म्हणजे सोपं काम नाही. पैसा कुठून उभा करणार?... जगात सगळी सोंग आणता येतात परंतु पैशाचं सोंग आणता येत नाही. गुणा आणि त्याच्या कंपूला याची जाणीव आहे. त्या दृष्टीने त्यांची धावपळ सुरू आहे. परंतु थेंबे थेंबे तळे साचे... हे म्हणणे सोपे आहे. प्रत्यक्षात आणणं महाकठीण! मुळात या सर्व पोरांची आवक ती किती? रोजंदारीवर कसंबसं पोट भरतंय... आणि म्हणूनच गुणाच्या वडिलांना म्हणजे बाळू मांगाला हे सगळं मान्य नाही. त्याचा या तमाशाला विरोध आहे. गुणाने वग लिहिला याचं त्याला बिलकूल कौतुक नाही. उलट आपल्या कमरेचा चांदीचा करदोडा त्याने मोडला याचा संताप आहे. तमाशाचा सराव मांग वाड्यात जोराने सुरू आहे. ढोलकीची थाप ऐकू येते आहे. आणि तसतसा बाळूचा पारा चढतो आहे. घरात मोठे भांडण होते. बाळू मांग आणखी एका गोष्टीला घाबरतो आहे ते म्हणजे उद्या तमाशाचा पैसा घरात आला तर मांगवाडा ते मान्य करणार नाही. आपल्याला वाळीत टाकलं जाईल. असं झालं तर करायचं काय?... तमासगीरांना मांग वाड्यात इभ्रत नाही. पूर्वी कधीतरी एकाने तमाशा उभा केला होता. परंतु मांग वाड्याने त्याला वाळीत टाकले, असं झालं तर काय करायचे? बाळू गुणाला स्पष्टच सांगतो, ‘तमाशाचा पैसा’ या घरात नको. बाराबिंदाच्यानी तमाशा करावा. ‘गणाची पत्नी दारकी ती देखील विरोधातच आहे. तिला गुणाची काळजी वाटते. या तमाशापाई तासभर सुदिक नीज मिळत न्हाई’ अशीच तिची तक्रार आहे. गुणाची मत मात्र स्पष्ट आहेत. तमाशा ही कला आहे. ज्याच्यात हुन्नर आहे. त्याने तमाशा करावा. पावसाळा आला. पेरण्या सुरू झाल्या आणि पोरांचा तालमीचा उत्साह मावळला. दिवसभर चिखलात राबलं की सांजच्याला पाय धुतल्यानंतर बाहेर पडावसं वाटत नसे. दोन तीन आठवडे असे गेले. पेरण्या झाल्या आणि जोरात पाऊस सुरू झाला. आता कोणालाच काम नाही. गुणाला वाटतं आता तालमी सुरू कराव्यात. परंतु कोणालाही उत्साह नाही. कारण वग लिहून झाला. लावण्या रचून झाल्या. परंतु मुख्य प्रश्न मुलींचा. तमाशात काम करायला मुली कुठे आहेत? मांग वाड्यातील एकही मुलगी तयार होणार नाही. मुली नसतील तर तमाशा उभा राहणार कसा? तमाशातील मुलींना भले समाजात मान नसेल, परंतु त्यांच्याशिवाय ही लोककला उभी राहूच शकत नाही. हे खूप मोठे सत्य! थकल्या मनाला रंजन हवे. त्यासाठी लोककला हवी. लोककला जपणारा कोल्हाटी समाज हवा. थोडक्यात समाजातील प्रत्येक घटक आवश्यक! प्राचीन भारतीय समाज रचनेतील ही महत्त्वाची गोष्ट कथानकाच्या ओघात लेखकाने सहजगत्या अधोरेखीत केली आहे. आनंद यादव इथेच थांबत नाहीत. तर बदलत्या काळानुसार प्रगत तंत्रज्ञानाचे महत्त्व वाढत जाणार. अशावेळी परंपरागत कष्टाचे काम करणाऱ्या मांग समाजासारख्या कष्टकरी हातांना कदाचित काम मिळणार नाही. अशावेळी त्यांनी स्वत:च्या अंगातील गुण ओळखून आपल्या यशाचा मार्ग निवडला पाहिजे, असा खूप मोठा गर्भित अर्थ सांगतात. म्हणूनच मराठी ललित साहित्याच्या क्षेत्रात आनंद यादव यांच्या ‘नटरंग’चे यश उल्लेखनीय ठरते. चाकोरीबाहेर जाऊन निवडलेली कलावस्तू निवेदनाचे साधेच परंतु आशयानुकूल आणि अर्थगर्भ स्वच्छ रूप, नेमक्या प्रतिमांच्या साहाय्याने खुलत जाणाऱ्या प्रसंग, भोवतालच्या परिसराचे मूळ कथावस्तूशी निगडीत झालेले नाते आणि संपूर्ण आशयातून व्यक्त होत गेलेली माणसांचे जगणे, अशी वैशिष्ट्ये नटरंगमध्ये आढळतात. नटरंग ही कादंबरी इथेच थांबत नाही. तर उत्तरार्धात ती एका कलाकाराची शोकांतिका होते. तमाशातील कलाकारांच्या व्यथा सांगते. त्या शोकांतिकेला असलेला मनोवैज्ञानिक स्पर्श वाचकाला हादरवून सोडतो. नटरंग ही निश्चितच एक अव्वल दर्जाची कलात्मक शोकांतिका आहे. म्हणूनच १९८० साली प्रसिद्ध झालेल्या कादंबरीवर २५ वर्षांनी आलेला सिनेमा देखील रसिकांना खूप भावला. -डी. व्ही. कुलकर्णी ...Read more

  • Rating StarLOKMAT 17-1-2010

    पुस्तकातून पडद्यावर... लेखक तमाशा... नाटक... शेवटी चित्रपट आधी वैताग... आता समाधान एखादी लोकप्रिय कादंबरी चित्रपटात रूपांतरित होऊन पडद्यावर अवतरते... ‘माध्यम-बदला’चा हा किचकट प्रवास नेमका कसा घडतो लेखकाची कोणतीही कलाकृती एका माध्यमातून दुसऱ्या मा्यमात जाताना त्या कलाकृतीचं पावित्र्य जपलं जायला हवं. लेखकाला आपल्या मूळ कलाकृतीतून जे काही सांगायचं आहे त्याची सवंग लोकप्रियतेसाठी मोडतोड व्हायला नको, अशी लेखकाची स्वाभाविक इच्छा आहे. मूळ कलाकृती एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना निर्मितीची प्रक्रिया तशी गुंतागुंतीची असते. वाचक एखादी कादंबरी वाचतो म्हणजे काय करतो? तो त्या कादंबरीतील वर्णनं वाचतो, पात्रांचे संवाद वाचतो, पण चित्रपटासारख्या वेगळ्या माध्यमात साहित्यकृती रूपांतरित होत असताना असा आणि इतका ढोबळ विचार करता येत नाही. दिग्दर्शक, निर्मात्याला ती कादंबरी आतून-बाहेरून, अंतर्बाह्य ‘समजून’ घ्यावी लागते. हे ‘समजून’ घेऊन नंतर त्याची मांडणी करावी लागते. ही झाली अभिव्यक्ती. ती त्या दिग्दर्शकाची असते. कादंबरीतील एखादं पात्र ‘डुलत-डुलत’ चालतं असं जेव्हा लेखकानं म्हटलेलं असतं तेव्हा हे ‘डुलणं’ कसं असेल, कोणत्या प्रसंगात, कोणत्या पद्धतीनं तो डुलेल, अभिनेत्याची देहबोली कशी असेल म्हणजे त्या प्रसंगाला उठाव येईल इतका बारीकसारीक विचार दिग्दर्शकाला करावा लागतो, त्याने तसा तो केला पाहिजे. कादंबरीतील, मूळ कलाकृतीतील प्रत्येक घटना, प्रत्येक प्रसंग आधी दिग्दर्शकाच्या मनात उमटला पाहिजे, ती घटना त्याला दिसली पाहिजे, ती त्याला ‘व्हिज्युअलाईज’ करता आली पाहिजे. तसे जर दिग्दर्शकाला करता आले तरच तो त्या कलाकृतीला न्याय देऊ शकतो. माझ्या ‘नटरंग’ या कादंबरीवर त्याच नावाचा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. ही कलाकृती अन्य माध्यमात जाण्याचा हा तिसरा प्रसंग. याआधी या कादंबरीवरून तमाशाची निर्मिती झाली होती, या कादंबरीवरून नाटक करण्यात आलं होतं, पण हा बदल खूपच सवंग होता, उठवळ होता. तमाशात जो काही ‘तमाशा’ घालण्यात आला होता ते पाहिल्यानंतर मला त्यांना सांगावं लागलं की, हे मी चालू देणार नाही. हा ‘तमाशा’ बंद करा, त्यानंतर तो तमाशा बंद पडला. नाटकाच्या बाबतीतही तेच, त्यामुळे दहा-बारा खेळ झाल्यानंतर मी ते बंद करायला लावलं. माध्यमातला हा बदल खरोखरच खूप उठवळ होता. कादंबरीतील महत्त्त्वाचा भाग त्यातून गाळलेला होता. प्रेक्षकाला भुलवण्यासाठी, त्याच्या खिशातील पैसे काढून घेण्यासाठी चित्रपट काढणं हा धंदा झाल. माझ्या कलाकृतीचा धंदा व्हावा असं मला वाटत नव्हतं, त्यामुळे मी ते बंद करायला लावलं. प्रत्येक कलाकृतीत अनुभवाचे अनेक स्तर असतात. एक दिग्दर्शक, कलावंत या नात्याने हे स्तर तुम्हाला समजलेच पाहिजेत, त्यामुळे नुसतेच कथानक घेऊन, पात्रं घेऊन, त्यांच्या तोंडी संवाद टाकून चित्रपट तयार होत नाही. बोलपटकाराला कलाकृतीतील आशय लक्षात घ्यावा लागतो. ‘नटरंग’च्या निमित्ताने सुनील जाधवांशी झालेली चर्चा खूपच सकारात्मक होती. ते कलेचे चांगले जाणकार आहेत. तरुण आहेत. मेहनती आहेत. कादंबरीचं कथानक ज्या ठिकाणी घडतं तो कागलचा सारा परिसर, तिथली घरं, वस्त्या, दारिद्र्य, गोठे... या सगळ्या गोष्टी चित्रपट तयार करण्यापूर्वी मी त्यांना प्रत्यक्ष दाखवल्या. मागचे अनुभव पाहता, ‘चित्रपट तयार झाल्यानंतर मी तो पाहीन आणि त्यानंतरच प्रदर्शनास परवानगी देईन’ ही माझी अट होती, त्यामुळे निर्माते, दिग्दर्शकांवरील जबाबदारी मोठी होती. त्यांनीही त्यासाठी अमाप कष्ट घेतले. स्टुडिओतील चित्रणापेक्षा माध्यमात माझी कलाकृती पाहताना खरोखरच समाधान वाटलं. ‘नटरंग’च्या बाबतीत माध्यम बदलाची निर्मिती प्रव्रिâया लेखक म्हणून समाधान देणारी ठरली. - डॉ. आनंद यादव ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

ANUWADATUN ANUSARJANAKADE
ANUWADATUN ANUSARJANAKADE by LEENA SOHONI Rating Star
कौशिक लेले

पुस्तक – अनुवादातून अनुसर्जनाकडे (Anuwadatun Anusarjanakade) लेखिका – लीना सोहोनी (Leena Sohoni) भाषा – मराठी पाने – २३९ प्रकाशन – मेहता पब्लिशिंग हाऊस. फेब २०२४ छापील किंमत – रु. ३७०/- ISBN – 9789357205337 ह्या परिचयाची माझी वेबसाईट लिंक htps://learnmarathiwithkaushik.com/courses/anuwadatun-anusarjanakade/ मराठी पुस्तकांमध्ये सध्या इतर भाषांतून अनुवादित झालेली पुस्तके सुद्धा मोठ्या संख्येने दिसतात. एखादा सरस अनुवाद वाचताना आपल्या डोक्यात सुद्धा आपल्या आवडीच्या परभाषेतल्या पुस्तकांची यादी तयार होते. ही पुस्तकं सुद्धा मराठीत आली तर काय मजा येईल असं वाटतं. भाषा हा ज्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे त्यांची इच्छा एक पुढचं पाऊल टाकेल. आपणही स्वतः असा अनुवाद केला तर ? आपल्यालाही दोन्ही भाषा चांगल्या येत आहेत मग अनुवाद का करू नये ? हे पिल्लू डोक्यात शिरेलच. असा अनुवाद करायचा स्वतः काही प्रयत्न केला की लक्षात येईल की हे किती किचकट काम आहे. चांगला अनुवाद करायचा असेल तर सराव लागेल. अभ्यास लागेल. त्याची काही तंत्र मंत्र शिकून घ्यावी लागतील. एखाद्या चांगल्या जाणकार व्यक्तीचं, अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शनही मिळायला हवं. जर तुमच्याही मनात अशा भावना आल्या असतील तर लीना सोहोनी यांचं “अनुवादाकडून अनुसर्जनाकडे” हे पुस्तक तुम्हाला नक्की आवडेल. लीना सोहोनी हे नाव मराठीत अनुवादिका म्हणून प्रसिद्ध आहे. आत्तापर्यंत त्यांनी अनुवाद केलेली पन्नासच्यावर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचा अनुभव व अधिकार वेगळा सांगायला नको. त्यांचे हे पुस्तक "अनुवादातून अनुसर्जनाकडे" पुस्तकाचा पहिला भागात लीना सोनी यांनी आपल्या अनुवादाच्या प्रवासाचं सिंहावलोकन केलं आहे. त्यांनी अनुवादाची सुरुवात कशी केली, त्यात प्रगती कशी झाली हे लिहिलं आहे. अनुवादामुळे प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर, सुधा मूर्ती, किरण बेदी यांच्याशी जुळलेले संबंध आणि त्यांच्या भेटीची वर्णनं आहेत. ह्या प्रवासात “मेहता पब्लिशिंग हाऊस” या प्रकाशन संस्थेचा भरभक्कम पाठिंबा त्यांना मिळाला. सुनील मेहता आणि अनिल मेहता यांच्याबरोबरच्या आठवणी सुद्धा पुस्तकात आहेत. पुढच्या भागात अनुवाद या विषयाची एखाद्या शास्त्रीय शोधनिबंधाप्रमाणे माहिती दिलेली आहे. यात अनुवाद प्रक्रियेकडे अतिशय बारकाईने बघितलं आहे. ढोबळमानाने बघितलं तर, अनुवाद म्हणजे तर एका भाषेतल्या शब्दांच्या ऐवजी दुसऱ्या भाषेतले शब्द वापरणे. पण प्रत्येक वेळी एका शब्दाच्या बदल्यात दुसरा भाषेतला एक शब्द असं होतंच असं नाही. त्यामुळे काही वेळा शब्दाची फोड करून दाखवावी लागते. तर काही वेळा मूळ मोठं वाक्य लहान होऊ शकतं. कदाचित तिथे पूर्णपणे वेगळीच शब्दयोजना वाक्यरचना होऊ शकते. या प्रत्येक प्रकाराला एक विशिष्ट शास्त्रीय नाव (पारिभाषिक संज्ञा) आहे हे आपल्याला पुस्तक वाचून कळतं. जे शब्दांच्या बाबतीत तेच वाक्यांच्या बाबतीत. मूळ भाषेतल्या शब्दांसाठी नवीन शब्द वापरून वाक्य तयार झालं तरी ते वाचकाला सहज वाटलं पाहिजे. नाहीतर आपण लगेच म्हणू, “अनुवाद खूप बोजड झाला आहे; ठोकळेबाज झाला आहे”. हे टाळायचं तर वाक्यरचना सुद्धा सुधारायला पाहिजे. याची उदाहरणे पुस्तकात दिली आहेत आणि त्या अनुषंगाने पारिभाषिक संज्ञा (terminology) काय आहे हे मराठी आणि इंग्रजी दोन्हीत दिलं आहे. शब्द, वाक्य ह्यांना लावलेल्या कसोटीचा विस्तार करून ती कसोटी “संकल्पनां”ना लावायला पाहिजे. एखाद्या भाषेत, एखाद्या समाजात असणाऱ्या संकल्पना, प्रथा-परंपरा मराठी भाषेत नसतील तर अनुवाद करताना ते जसंच्या तसं ठेवायचं का तिथे काही वेगळी संकल्पना वापरायची ? का तळ टीप देऊन स्पष्टीकरण द्यायचं? असे एकाच गोष्टीकडे बघण्याचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. हा मुद्दा आपण सोदाहरण स्पष्ट केला आहे. हा ऊहापोह वाचल्यासार अनुवादासाठी दोन्ही भाषांवर आपली किती चांगली पकड पाहिजे हे वाचकाच्या लक्षात येईल. त्याचबरोबर जे पुस्तक आपण वाचतोय त्याची पार्श्वभूमी, त्यातल्या प्रसंगाची सामाजिक पार्श्वभूमी, आणि लेखकाला काय ध्वनीत करायचे आहे हे सगळं समजणं सुद्धा किती महत्त्वाचं हे लक्षात येईल. म्हणजे अनुवाद प्रक्रिया दिसताना शब्दांची दिसली तरी “शब्दांच्या पलीकडले” अनुवादकाला पकडता आले तरच मूळ कृतीला न्याय मिळेल. हे या पुस्तकाच्या वाचनातून अधोरेखित होतं. पुस्तकाचा प्रकारानुसार अनुवादकासमोर असणारी आव्हाने सुद्धा बदलतात. कथा-कादंबरीचा अनुवाद वेगळा तर कवितेचा अनुवाद वेगळा. कारण कवितेमध्ये भावभावनांना महत्त्व आहे तितकेच महत्त्व शब्द, लय, शब्दचमत्कृती यांनाही आहे. म्हणूनच तर ते पद्य आहे गद्य नाही. लीनाजींनी ह्याचाही परामर्श घेतला आहे. नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने अजून वेगळी. परिणामकारक संवाद, नेपथ्य, पात्रांची देहबोली, त्याचा प्रेक्षकांवर होणारा परिणाम या सगळ्याचा विचार करून अनुवाद करावा लागतो. म्हणूनच, अनुवाद म्हणजे प्रत्येक वेळी “शंभर टक्के पुस्तक जसेच्या तसे” असं नसतं. तर काही वेळा ते रूपांतर ठरतं. काही वेळा तो स्वैर अनुवाद ठरतो. तर काही वेळा मूळ कलाकृतीवर आधारित नवीन कलाकृती ठरते. हे सुद्धा कितीतरी उदाहरणे देऊन स्पष्ट केले आहे. हे सगळे मुद्दे एकमेकांशी निगडित आहेत त्यामुळे पुस्तकात बऱ्याच वेळा मुद्द्यांची पुनरावृत्ती झाली आहे असं मला वाटलं. ती पुनरुक्ती टाळून कदाचित थोडी पानं कमी करता आली असती. पण मुद्दा वाचकाच्या मनावर ठसावा, कुठलंही विशिष्ट प्रकरण वाचायला घेतले तरी ते त्या मुद्द्यापुरतं पूर्ण असावं हा त्यामागचा हेतू असेल. पुस्तकात पुढे अनुवादकांना नोकरी, व्यवसायाच्या काय संधी आहेत; कुठल्या संस्था याबद्दलचं शिक्षण देतात; कुठले कोर्सेस उपलब्ध आहेत याबद्दलचा तपशील आहे. अनुवाद करायला सुरुवात करायची असेल तर मजकूरनिवड, प्रकाशकांशी संपर्क, परवानगी ह्याचे मार्गदर्शन आहे. त्यांनतर शाळेत आपण जे प्राथमिक व्याकरण शिकतो; म्हणजे कर्ता, कर्म, क्रियापद, ॲक्टिव-पॅसिव्ह व्हॉइस, वेगवेगळे काळ इत्यादींच्या व्याख्या देऊन सगळ्याची उजळणी केली आहे. ज्याला अनुवाद क्षेत्रात उतरायचे आहे त्याला व्याकरणाचा अजून बराच अभ्यास करावा लागणारच आहे. आणि पुस्तकाचा उद्देश व्याकरण शिकवणं नाही तर अनुवादकासाठी व्याकरण अत्यावश्यक आहे हे ठसवणं आहे. त्यामुळे व्याकरणाचा भाग पुस्तकात नसता तरी चालला असता असं मला वाटलं. पुस्तकातील काही पाने वर दिलेल्या लिंकवर शेअर केली आहेत. म्हणजे तुम्हाला पुस्तकाची, लेखनशैलीची अजून चांगली कल्पना येईल. त्यात पुढील मुद्द्यांबद्दलची पाने आहेत १) अनुवादिका म्हणून येणारे कटुगोड अनुभव. २) प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर ह्यांच्या पुस्तकांचा मराठी अनुवाद लीनाजींनी केला आहे. त्यातून जेफ्री आर्चर ह्यांच्याशी भेटीगाठी झाल्या त्यातला एक प्रसंग. ३) अनुवादाचे वर्गीकरण/प्रकार सांगणाऱ्या प्रकरणातली दोन पाने. अनुवाद प्रक्रियेची किती बारकाईने तांत्रिक चिकित्सा केली आहे हे लक्षात येईल. ४) नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने ह्याबद्दलच्या प्रकरणातली दोन पाने. लीना सोहोनींचे आत्मकथन असणारा पुस्तकाचा पहिला भाग सर्व वाचकांना वाचायला आवडेलच. पुस्तकाचा दुसरा भाग तांत्रिक आहे. तो सर्वसामान्य वाचकाला वाचायला आवडेलच असं नाही. पण तो वाचल्यावर अनुवादक म्हणून काम करताना किती कटकटी असतात, काय व्यवधानं सांभाळावी लागतात हे वाचकाच्या लक्षात येईल. त्यातून अनुवादकांकडे व त्यांच्या कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन अजून कौतुकाचा आणि कृतज्ञतेचा होईल हे निश्चित. ज्यांना अनुवाद करायचा आहे, या क्षेत्रात शिरायचं आहे किंवा तशी उमेदवारी सुरू झाली आहे त्यांना हा भाग मार्गदर्शक ठरेल. जाण वाढवेल हे नक्की. त्यामुळे या पुस्तकाच्या वाचनातून अनुवादाचा किडा काही वाचकांच्या डोक्यात गेला आणि त्यातून नवे अनुवादक मराठीत निर्माण झाले तर ते सोन्याहून पिवळे ! मराठीत कथा,कादंबऱ्या, चरित्र, सामाजिक विषयांची चर्चा ह्या पद्धतीचे लेखन भरपूर होत असतं. पण ह्या पुस्तकाप्रमाणे शास्त्रीय/तांत्रिक चिकित्सा करणारी, गंभीरपणे शिकवणारी पुस्तकं कमी दिसतात. ती प्रकाशित झाली तरी ती क्रमिक पाठ्यपुस्तक किंवा “अभ्यासाचे पुस्तक” या प्रकारात ढकलली जातात आणि दुर्लक्षित होतात. पण या पुस्तकाच्या लेखिका आणि प्रकाशक यांनी हे पुस्तक मुख्यधारेतल्या पुस्तकाप्रमाणे सादर केलं आहे. त्यातून हे पुस्तक जास्त वाचलं जाईल; जास्त लोकांना विचार प्रवृत्त करेल असं मला वाटतं. अशा प्रकारची पुस्तकं मराठीत प्रकाशित होणे हे मराठी भाषेला ज्ञानभाषा करण्यासाठी मोठे योगदान आहे. त्याबद्दल प्रकाशक आणि लेखिका दोघांचेही एक मराठी भाषा प्रेमी म्हणून मी मनापासून आभार मानतो. —————————— मी दिलेली पुस्तक श्रेणी —————————— अनुवाद करणारे असाल किंवा करायची इच्छा असेल तर आवा ( आवर्जून वाचा ) इतरांनी जवा ( जमल्यास वाचा ) ——————————— आवा ( आवर्जून वाचा ) जवा ( जमल्यास वाचा ) वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक ) नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक ) ...Read more

OMKARACHI REKH JANA
OMKARACHI REKH JANA by MANJUSHRI GOKHALE Rating Star
सौ. जस्मिन जोगळेकर

आमच्या पुस्तकप्रेमी समुहावरचा एकही दिवसाचा खंड न पडता सलग 1730 वा पुस्तक परिचय पुस्तक प्रेमी समूह,पुस्तक परिचय अभियान: एकही दिवस खंड पडू न देता पुस्तकांचा परिचय हे पुस्तकप्रेमी समूहाचे यश ! पुस्तक सत्र:- ३ सप्ताह क्रमांक:- २४८ पुस्तक क्रमांक: १७३० दिनांक: १०/०३/२०२५ पुस्तकाचे नांव:- ओंकाराची रेख जना लेखक:- मंजुश्री गोखले पहिली आवृत्ती: फेब्रुवारी २०१२ पृष्ठ संख्या : ३०८ मूल्य: रु. ३२० प्रकाशन: मेहता पब्लिशिंग हाऊस परिचयकर्ती: सौ. जस्मिन जोगळेकर एखाद्या गोष्टीसाठी वेळ यावी लागते म्हणतात, तसं काहीसं झालं माझं. खरंतर पुस्तक वाचनाच्या बाबतीत असं व्हायला नको होतं पण झालं. `हे खूप सुंदर पुस्तक आहे, तुम्ही वाचाच` म्हणून एक पुस्तक आमच्या हाती आलं. अर्थात ज्यांनी सांगितलं त्यांनी त्यांच्या संग्रहातलं पुस्तक दिलं होतं. तसं बरेच दिवस होतं आमच्याकडे. नवऱ्याने वाचून खूपच सुंदर आहे, वाच नक्की सांगितलं देखील मला. पण पुस्तक परत द्यायची वेळ आली तरी वाचलं गेलं नाही. तरी ते नाव डोक्यात फिट बसलं होतं. अखेर एक दिवस ते एकच पुस्तक नव्हे तर त्याच लेखिकेची चार पुस्तकं विकतच घेऊन आले आणि मग ती वेळ आली…. त्या पुस्तकाच्या, पुस्तकातील भाषेच्या आणि त्या लेखिकेच्या प्रेमात पडण्याची. पुस्तक होतं…मंजुश्री गोखले यांनी संत जनाबाईंवर लिहिलेलं `ओंकाराची रेख जना`. `विठू माझा लेकुरवाळा`, `धरिला पंढरीचा चोर` अशा अभंग रचनेतून जनाबाई आपल्या ओळखीच्या आहेत. किंवा विठूराया त्यांना हर कामात मदत करत असतो वगैरे माहीत आहे. पण त्यांचं संपूर्ण चरित्र सगळ्यांना माहीत असेलच असं नाही. ते माहीत करून देण्याचं सुरेख काम या कादंबरीने केलं आहे. जनाबाईंच्या जन्मापूर्वीची आणि नंतरचीही त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती, छोट्या जनाला मागे ठेऊन दुखण्याने तिला सोडून गेलेली तिची आई, त्यानंतरची बिकट वेळ याचं वर्णन वाचताना डोळ्यातलं पाणी थांबत नाही. पुढेही काही प्रसंग असे आहेत…भागाबाईचं वागणं असेल किंवा सुळावर चढवायचा प्रसंग असेल… डोळ्यात पाणी येतच राहतं. पण एवढं होऊनही त्यांची पंढरीरायावरची भक्ती मात्र गाढ होती. जनाईसुध्दा त्याला पाहायला आतुर होती. सोसले चटके l पोटी नाही घास l विठ्ठलाची आस l जनाईला ll भेटीसाठी त्याच्या l गोळा तनमन l धाडे आवतान l विठूराया ll अखेर विठुरायाकडून आमंत्रण आल्यावर बापलेक पंढरीची वाट चालू लागतात. काळया देवाला पाहायला आसुसलेली जना आणि लेकीला कायमचं परक्या घरी सोडून यायचं या विचाराने जडावलेला दमा… नशिबाची रेख l भिवरेच्या काठी l विठूराया ओढी l जनाईची ll दोघांचा प्रवास विठ्ठलाच्या विश्वासावर सुरू होतो. पुढं जनाईला दामाशेटींच्या घरी सोडून देणं, त्या घराने जनाला आपलंच म्हणणं, नामदेवांसोबत तिचं मोठं होणं अशा कितीतरी प्रसंगांनी सुखावून जायला होतं. तेव्हाची सामाजिक परिस्थिती, जनाचं अतिशूद्र असणं आणि त्यातून स्त्री असणं…त्यासाठी तिला झेलावे लागणारे त्रास, संत म्हणून मोठेपण मिळाल्यावरही त्यांच्यावर आलेला चोरीचा आळ… त्रास होतो वाचताना. जनाची आणि विठ्ठलाची पहिली भेट आणि तिथून त्यांच्यात दृढ होत जाणारे नाते…वाचताना शहारून जायला होतं. जना ते संत जनाबाई हा प्रवास, त्यात जनाबाईंनी रचलेले अभंग, ज्ञानदेवादि भावंडांचा सहवास आणि मुख्य म्हणजे नामदेव आणि जनाबाई यांचे नाते… गुरू शिष्य ऐसी l जोडी कौतुकाची l जनी नामयाची l संतांमधे ll याबद्दल पुस्तकात आलेले उल्लेख मन लावून वाचण्यासारखे आहेत. विठ्ठलाच्या चरणी झालेला जनाबाईंच्या जीवनाचा शेवट म्हणजे तर 🙏 वृंदा कोमेजली l स्तब्ध वारा पाणी l ओघळले मणी l मंजिऱ्यांचे ll थरारली वीट l कंप राऊळाला l श्वास ओलावला l क्षणभर ll आज नाही घाई l विठोबाला काही l जनाईच येई l चरणाशी ll शांता शेळके यांनी अनुवाद केलेलं `चौघीजणी` जसं मनात कायमचं घर करुन बसलं आहे, त्या जोडीला आता `ओंकाराची रेख जना` हे ही अत्यंत आवडीचं झालं आहे. यापूर्वी संत साहित्य किंवा संतांवर लिहिलेलं साहित्य फारसं वाचलं नव्हतं. लताजी किंवा भीमसेनजींमुळे घराघरात पोहोचलेले अभंग तेवढे माहीत होते. त्यामुळं जनाबाईंवर लिहिलेल्या या पुस्तकाबाबत उत्सुकता होतीच. पहिल्या प्रकरणाच्या अगदी पहिल्या ओळीपासून या पुस्तकाशी जी बांधली गेले ते शेवटपर्यंत. पुस्तकातील सगळं वर्णन अगदी बारीक सारीक तपशील देऊन पुढं जात राहतं आणि त्यात आपल्याला गुंतवून ठेवतं. सुरुवातीची काही प्रकरणं तर डोळ्यात अश्रुंच्या धारा घेऊन, पुसट अक्षरं समोर ठेऊन वाचावी लागतात. प्रसंग सगळे l तपशिलासवे l डोळ्यात आसवे l वाचुनिया ll भाषा ही साजिरी l सत्य हेच वाटे l प्रसंग तो घडे l आसपास ll एकूणच पुस्तकातलं वर्णन इतकं जिवंत आहे की सगळे प्रसंग आपल्या आसपास घडताहेत असंच वाटत राहतं कायम. दमा - कुरुंडचं दुर्दैवी आयुष्य, पोटी मूल नसल्याचं त्यांचं दुःख, विठ्ठलाला त्यासाठी साकडं घालण्यासाठी त्यांनी केलेला पंढरपूरचा प्रवास असो किंवा जनाबाईंच्या खोलीत येऊन विठ्ठलाने त्यांच्याशी मारलेल्या गप्पा, त्यांना कामात केलेली मदत…. सगळे अगदी सगळे प्रसंग आपणच जगतोय असं वाटावेत इतके मनाला भिडून जातात. काही ठिकाणं तर अशी… `अरे विठ्ठला, गडबडीत भलतंच काय उचलतोस. तुझा रत्नहार आणि शेला तर घेऊन जा`...असं आपणच विठ्ठलाला हाक मारून सांगावं असं वाटायला लागतं वाचताना. भाषा, वर्णनशैली फार साजिरी आहे. पुस्तकातला `साजिरी` हा शब्द एकदम आवडून गेलाय. एखादा चेहरा पाहिल्यावर कसं आपल्याला कळून जातं ना की, ही व्यक्ती मायाळू आहे किंवा तुसडी आहे वगैरे…तसं पुस्तकाच्या सुरुवातीलाच यातल्या भाषेबद्दल आपुलकी, प्रेम वाटायला लागतं. भाषा साधी पण सुंदर, शब्दांचा वापर असा की यापेक्षा वेगळा शब्द इथं शोभला नसता असं वाटायला लागेल असा. अनवाणी पायाला चटके बसावेत इतकं हवामान अजून बदललं नव्हतं…यासाठी `अजून मातीने माया सोडली नव्हती`... किती सुरेख वाक्य आहे ना! अशी कितीतरी वाक्य आपल्याला त्यांच्या प्रेमात पाडायला लावणारी यात सापडतील. एकूणच सांगायचं झालं तर पुस्तक अप्रतिम आणि सगळ्यांनी आवर्जून वाचावं असंच आहे. एकाच लेखकाची पुस्तकं सलग एका मागोमाग एक अशी माझ्याकडून वाचली जात नाहीत. पण आता खुणावतंय ते… `जोहार मायबाप जोहार`. ...Read more