* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE RAINMAKER
  • Availability : Available
  • Translators : ANIL KALE
  • ISBN : 9788177664352
  • Edition : 2
  • Publishing Year : MARCH 2004
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 536
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :JOHN GRISHAM COMBO- 17 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Print Books:
IT’S SUMMER IN MEMPHIS. THE SWEAT IS STICKING TO RUDY BAYLOR’S SHIRT AND CREDITORS ARE NIPPING AT HIS HEELS. ONCE HE HAD ASPIRATIONS OF BREEZING THROUGH LAW SCHOOL AND PUNCHING HIS TICKET TO THE GOOD LIFE. NOW HE DOESN’T HAVE A JOB OR A PRAYER—EXCEPT FOR ONE: AN INSURANCE DISPUTE THAT LEAVES A FAMILY DEVASTATED AND OPENS THE DOOR FOR A LAWSUIT, IF RUDY CAN FIND A WAY TO FILE IT. BY THE TIME RUDY GETS TO COURT, A HEAVYWEIGHT CORPORATE DEFENSE TEAM IS THERE TO MEET HIM. AND SUDDENLY HE’S IN OVER HIS HEAD, PLUNGED INTO A NIGHTMARE OF LIES AND LEGAL MANEUVERINGS. A CASE THAT STARTED SMALL IS EXPLODING INTO A THUNDEROUS MILLION-DOLLAR WAR OF NERVES, SKILL, AND OUTRIGHT VIOLENCE—A FIGHT THAT COULD COST ONE YOUNG LAWYER HIS LIFE, OR TURN HIM INTO THE BIGGEST RAINMAKER IN THE LAND.
कायद्याची पदवी नुकतीच मिळवलेला, पोरसवदा रुडी बेलर. अत्यंत हलाखीची परिस्थिती, वाढती देणी. बिचा-याच्या हातात फक्त एक आणि एकच केस आहे... अर्थात, त्यातूनही फारशा कमाईची आशा नाहीच म्हणा, कारण त्याची क्लायंट तरी कुठे फार श्रीमंत आहे? डॉट ब्लॅकनं – रुडी बेलरच्या क्लायंटनं – एका प्रचंड मोठ्या इन्शुअरन्स कंपनीवर नुकसान भरपाईचा दावा दाखल केलाय. तिच्या मुलाचा ‘मेडिकल इन्शुअरन्स क्लेम’ मान्य करून ही कंपनी, तिच्या मुलाचे प्राण वाचवू शकली असती. पण तो क्लेम कंपनीनं नाकारला आणि तिचा मुलगा मृत्युमुखी पडला. या केसमधून तिला कंपनीकडून लक्षावधी डॉलर मिळू शकतील – पर्यायानं रुडी बेलरलाही. पण एक प्रॉब्लेम आहे – रुडी बेलरनं अजूनपर्यंत कोर्टात केसच लढवलेली नाही, आणि तो मेंफिस शहरातल्या सगळ्यात महागड्या आणि प्रथितयश वकिलासमोर उभा आहे. काय होणार या ‘लीगल बॅटल’चं? रुडी बेलर चमत्कार करून ‘इन्स्टंट रेनमेकर’ होणार का?
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #THE RAINMAKER #THE STREET LAWYER # THE PARTNER #THE CHAMBER #BIOGRAPHYA&TRUESTORIES #THE FIRM #THE ASSOCIATE #THE LAST JUROR #JOHNGRISHAM #RAVINDRAGURJAR #THECLIENT #THE TESTAMENT #THEPELICANBRIEF #MADHAVKARVE #
Customer Reviews
  • Rating StarSandeep Bade

    द रेनमेकर By ---जॉन ग्रिशम मेहता पब्लिशिंग हाऊस अनुवादक --अनिल काळे जॉन ग्रिशम यांच्या कादंबऱ्यांच वैशिष्ट्य म्हणजे.. कथानायक एक वकील...जो न्याय व्यवस्थेला जिवंत ठेवण्याच काम करतो...कधी मोठमोठ्या कंपन्यापासून, उद्योगलॉबीपासून, राजकारणी,माफियापासून तर कधी यांच्याशी हातमिळवणी करून सामान्य जनतेला न्यायापासून दूर ठेवणाऱ्या वकीलफ़र्म पासून... यामध्ये.. हालाखीच्या परिस्थितीतुन.. नुकताच वकील झालेला, परंतु कोणत्याच वकीलफ़र्म मध्ये नोकरी न मिळालेला रुडी बेलर.. त्याच्या हातामध्ये फक्त एकच केस... एक बलाढ्य इन्शुरन्स कंपनी.. जी आपल्या विमाधारक डॉट ब्लॅक या महिलेच्या आजारी मुलाचा `मेडिकल इन्शुरन्स क्लेम ` नाकारते... परिणामी त्या मुलाचा मृत्यू होतो... डॉट ब्लॅक.. रुडी बेलर मार्फत... त्या कंपनीवर नुकसान भरपाईचा दावा करते... यामध्ये... बलाढ्य इन्शुरन्स कंपन्या कशा नियमबाह्यपणे विमाधारकांचे क्लेम नाकारून गडगंज नफा कमावतात, कदाचित कुणी कोर्टात गेल्यास त्याचबरोबर सेटलमेन्ट करतात, यातूनही कोर्टात केस उभी राहिल्यास...विम्यापेक्षा जास्त पैसा मोठमोठ्या वकील खर्च करतात परंतु क्लेम द्यायाच टाळतात... याच वास्तववादी चित्रण लेखक डोळ्यासमोर उभ करतो... सर्व सत्य परिस्थिती माहित असूनही मोठमोठ्या वकीलफ़र्म पैशासाठी, कायद्याच्या नावाखाली, कशी नैतिकता गुंडाळून ठेवतात...हेही लेखक कसलाही आडपडदा न ठेवता स्वछपणे मांडतो.. त्याच बरोबर रुडी बेलरच समांतर आयुष्य, त्यातील चढउतार, स्वतःच्या इच्छा आकांशा याही गोष्टी छानपणे मांडल्या आहेत... तसंच यातील प्रत्येक व्यक्तीरेखेला योग्य न्याय दिल्याने त्याही मनात घर करून बसतात.. मग तो त्याचा मित्र बेकर, कोर्टकेस मध्ये जीव तोडून मदत करणारा डेक, न्यायाधिश हार्वे हेल, किल्पर असोत कि विरोधी वकील ड्रमंड असो... कि प्रेयसी केली रिकर.... खरंतर, इन्शुरन्स, कायदे, कोर्ट केसेस म्हणजे अगदी रटाळवाने विषय... परंतु जॉन ग्रिशम इतक्या रोमांचक पद्धतीने मांडतात की पुस्तक हातातून अर्धवट बाजूला ठेवणं जीवावर येत... इतक हे उत्कंठावर्धक आहे.. तर तर... रुडी बेलर चमत्कार करून, `इन्स्टंट रेनमेकर ` म्हणजे तो ही केस जिंकणार का आणि कशी? त्यासाठी तुम्हाला हे पुस्तकं वाचावं लागणार... --#संदीपबडे#-- ...Read more

  • Rating Starविनोद भालेराव

    वकीली व्यवसायाच्या पार्श्वभूमीवरील आणि इन्शुरन्स कंपन्यांच्या अंतर्गत घडामोडीवरील ही कादंबरी अतिशय आवडली. खटल्याच्या वेळचे प्रसंग, दोन्ही बाजूचे वकील, न्यायमूर्ती, ज्यूरी, कोर्ट हॉल इ. सर्व स्पष्टपणे डोळ्यांसमोर उभे राहतात.

  • Rating StarDAINIK LOKMAT 09-05-2004

    अमेरिकन वास्तवाचा अनुभव… इंग्रजी साहित्य वाचणाऱ्यांच्या यादीत जॉन ग्रिशम हे नाव लोकप्रिय आहे. साधी, सरळ, सोपी भाषा, विषयाची अचूक जाण आणि नेमकेपणा, यामुळे जॉन ग्रिशम यांची टेस्टामेंट, पेलिकन ब्रीफ, चेंबर यासारखी पुस्तके वाचताना वाचक नक्कीच त्यात रंगू जातो. ‘द रनमेकर’ हे पुस्तकही याच मालिकेतले आहे. या पुस्तकाचा मराठी अनुवाद अनिल काळे यांनी केला आहे. मूळ इंग्रजी कादंबरीतील सर्व बारकावे, व्यक्तीचित्रणे त्यांनी अतिशय अचूक शब्दांत शब्दबद्ध केलेली आहेत. ‘द रेनमेकर’चा कथानायक रुडी बेलर हा एक नुकतीच कायद्याची पदवी प्राप्त केलेला तरुण आहे. हातात पदवीचं भेंडोळं आणि मनात काहीतरी वेगळं करून दाखविण्याची, न्याय्य हक्कासाठी लढण्याची महत्त्वाकांक्षा घेऊन रूडी बाहेरच्या जगात प्रवेश करतो तेव्हा त्याला माणसांचे विविध नमुने अनुभवायला मिळतात. त्यांची पहिली क्लाएंट असते डॉट ब्लॅक. तिला एका मोठ्या इन्शुरन्स कंपनीविरुद्ध नुकसानभरपाईचा दावा दाखल करायचा असतो. डॉटच्या मुलाचा वैद्यकीय विम्याचा दावा कंपनी मान्य करीत नाही. अपुऱ्या पैशांअभावी मुलावर उपचार होत नाहीत आणि डॉटचा तरुण मुलगा मृत्युमुखी पडतो. डॉटला विमा कंपनीला धडा शिकवायचा असतो. तिला नुकसानभरपाईदाखल मिळणाऱ्या पैशांमध्ये जराही रस नसतो. रुढी बेलर हा तरुण वकील कथानायक या कामी सर्व मदत करण्याचे मान्य करतो. या पहिल्याच केसमध्ये त्याच्या विरुद्ध पक्षाकडे असते कसलेल्या, निष्णात वकिलांची फौज! रुडीचा साथीदार ढेक हा कायद्याची बार परीक्षा उत्तीर्ण न होऊ शकलेला, पण कायद्याच्या सर्व खाचाखोचा माहीत असलेला माणूस असतो. तो स्वत:ला ‘पॅरालॉयर’ म्हणवून घेत असतो! रुडी आणि डेक मिळून अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने ग्रेट बेनिफीट इन्शुरन्स कंपनी, त्यांच्यासाठी काम करणारी वकील मंडळी या सर्वांचाच अभ्यास करतात. त्यांची बलस्थाने, मर्मस्थाने शोधून काढताता आणि डॉटला नुकसानभरपाईची घसघशीत रक्कम कोर्टाकडून मंजूर करून घेतात. अर्थात, ही रक्कम प्रत्यक्ष हातात पडेपर्यंत दावे-प्रतिदावे चालूच राहणार आणि वर्षानुवर्षे केस कोर्टात राहणार हे अपरिहार्य. पण पहिलीवहिली केस रुडी जिंकतो. याच वळणावर येऊन कादंबरी संपते. या मूळ कथेला उपकथानकही आहेत. पेर्इंग गेस्ट म्हणून रुडी जिच्याकडे राहत असतो ती म्हातारी वृद्ध स्त्री मिस बडी आणि तिचे कुटुंबीय, रूडीला अचानकपणे भेटलेली आणि नंतर त्यांची जीवनसाथी बनलेली केली आणि तिच्या व्यक्तिगत आयुष्यातील सुखदु:ख या सर्व कथानकांनी मिळून कादंबरी अतिशय रोमांचकारी झालेली आहे. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी आपल्या देशातही ठाण मांडलेले आहे. उत्पादनांची विक्री आणि ग्राहक याच दोन गोष्टींनी महत्त्व देणाऱ्या या कंपन्या त्या-त्या देशातील संस्कृती, विचारमूल्य यांचाही कसा बळी घेतात, याचे परिणाम युवापिढीवर कसे होतात हे सर्व आपणही आता अनुभवायला लागलो आहोत. पण या कादंबरीचे कथानक जिथे घडते त्या अमेरिकेतही हीच स्थिती आहे. गरिबांना वाली नाही आणि श्रीमंतांच्या हातात सर्व प्रकारची सत्ता हा भेदभाव तिथेही आहे. लोकशाही मूल्यांची जपणूक करणाऱ्या देशांमधून आता अशा वृत्तींविरुद्ध आवाज उठायला लागला आहे हे कादंबरी वाचताना पदोपदी जाणवते. रूडी बेलर केस जिंकण्याचा ध्यास घेऊन सतत पाठपुरावा करीत केसच्या गाभ्यापर्यंत जातो, केस जिंकतो आणि मनाशी ठरवितो की, ‘कायदा या विषयाशी संबंधित अशी कुठलीही गोष्ट मी पुन्हा कधी करणार नाही. मतदार म्हणून माझी नोंद करणार नाही. या सर्व प्रवासात वाचक त्याच्याबरोबरच असतो. मूळ इंग्रजी कादंबरी वाचताना जसा परिणाम आपल्यावर होतो, अंतर्मुखता येते तसाच अनुभव मराठी अनुवाद वाचताना मिळतो हेच या पुस्तकाचे यश आहे. अर्थातच याचे श्रेय अनुवादकाला आहे. उत्तम कथानक, ओघवती भाषा असलेल्या या अनुवादाचा प्रत्येक वाचनप्रेमीने जरूर आनंद घ्यावा. -माधुरी नवरे ...Read more

  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    याआधीही या सदरातून काही भाषांतरकारांचा दृष्टिकोन जाणून घेतला आहे. भाषांतरकाराचादेखील भाषांतरमागचा विचार असतो, त्याचीदेखील एक शैली असते. कदाचित एकच पुस्तक दोन भाषांतरकार वेगवेगळ्या पद्धतीने करतील! पण या वेगळेपणादेखील एक समानता असतेच. हा वेगळेपणा भाषाशली मधला असू शकतो तर समानता असते ती विचार मांडण्यातील. `वारसा नॉस्ट्राडेमसचा`, `दुसरा बर्म्युडा ट्रँगल`, `द लास्ट डॉन` यांसारख्या पुस्तकांचे भाषांतर करणारे अनिल काळे भाषांतरमागच्या त्यांच्या विचाराबद्दल बोलताना सांगतात. `भाषांतरापेक्षा रुपांतर` म्हणणं अधिक संयुक्तिक ठरेल. एका भाषेतील साहित्य दुसऱ्या भाषेत पोहचवताना ते नेहमी त्या भाषेत केलं गेलेलं रुपांतर असतं. मी भाषांतराचीदेखील काम करतो ती कशा स्वरुपाची असतात ते पुढे ओघात येईलच. मी जेव्हा पुस्तकाचं रुपांतर करतो तेव्हा मूळ लेखकाच्या भाषेचा लहेजा कायम ठेवण्याचा माझा प्रयत्न असतो. जॉन ग्रिशॅमचं `द रेनमेकर` हे वेगळ्या भाषाशैलीतलं, काहीसं वेगळ्या धाटणीचं पुस्तक आहे. इंग्रजीत ही भाषाशैली अभावानेच वाचायला मिळते. त्या भाषेचं वैशिष्ट्य जपत अनिल काळे यांनी खूप रंजक शैलीत हे रुपांतर केलं आहे. या कथेचा नायक आहे, नुकताच कायद्याची पदवी घेऊन बाहेर पडलेला रुडी बेलररी. अत्यंत हालाखीच्या परिस्थितीला तोंड देत तो शिक्षण पूर्ण करतो. आज शिक्षण पूर्ण झालं की उद्या आपल्याला छोटी-मोठी का होईना नोकरी मिळून आपली परिस्थिती पालटेल याची स्वप्न बघत असतो. त्याच्याकडे एकुलती एक केस असते ती मेडिकल इन्शुअरन्स कंपनीच्या विरुद्ध. रुडी अननुभवी, कुठल्याही मोठ्या फर्मचा आधार नसणारा वकील, तर त्याच्याविरुद्ध असणारी पार्टी एक स्थापित श्रीमंत कंपनी. जी शहरातल्या सर्वोतम लॉ फर्मला आपली केस सोपवते. त्या फर्मच्या वकिलांचा ताफाच्या ताफा केससाठी कोर्टात उभा असतो, ज्यांच्याविरुद्ध एकटा रुडी जास्तच दीनवाणा दिसतो. रुडीकडे असतो तो प्रांजळपणा आणि आपल्या अशिलावर झालेल्या अन्यायाचं निराकारण करण्याची प्रखर इच्छा. फक्त या इच्छाशक्तीच्या जोरावर रुडी नावाजलेल्या मोठ्या कंपनीविरुद्धची केस, ती ही एक नावाजलेल्या वकिलांनी लढलेली केस जिंकेल? या प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर `द रेनमेकरच` वाचायला हवं. मूळ इंग्रजीतलं पुस्तक जर वाचायला मिळालं वा मिळवून वाचण्याची इच्छा असेल तर फारच उत्तम. नाहीतर अनिल काळे यांचे अनुवादित पुस्तक आहेच. काहीसं कंटाळवाणंही वाटू शकतं. इंग्रजी पुस्तकात जशी पानंच्या पान भरुन वर्णनं असतात तशीच इथेही आहेत. ही वर्णनं वाचण्याचा कंटाळा येणाऱ्यांना पुस्तक कितीतरी पुढे गेलं तरी काही घडतच नाहीये असंही वाटेल, पण खरं तर या पुस्तकाच्या प्रत्येक पानावर काही तरी घडत असतं. त्यातून आपल्याच रुडीचं आयुष्य. त्याच्या भोवतालची परिस्थिती समजते. कोर्टात घडणारं नाट्य तर फारच छान रंगवलं आहे. `मी नॉस्ट्राडॅमसवरचं फिक्शन पुस्तक वाचत होतो. साधारण १९८३ चा काळ असेल. त्यावेळी कॉम्प्युटर हा प्रकार आपल्याकडे अगदी हाताच्या बोटावर मोजता येईल इतक्याच लोकांपर्यंत पोहोचलेला होता. या पुस्तकात कॉम्प्युटर महत्त्वाची भूमिका बजावतो.` या पुस्तकाची ते थोडक्यात ओळख करुन देतात. `या नॉस्ट्राडॅमसच्या हाती एक पुस्तक लागतं. ज्यात अमुक एका दिवशी सगळ्या जगाचा संहार होऊन फक्त २०० लोक उरतील असं लिहिलेलं असतं. ते २०० लोक कोण असतील हे कळण्यासाठी तो संपूर्ण जगातल्या कुंडल्या कॉम्प्युटरवर मांडून त्यातून ते २०० लोक शोधून काढतो आणि त्यांना एका बेटावर आणून ठेवतो वगैरे... हा विषय अतिशय इंटरेस्टिंग होता आणि तो मराठीत यावा असं मला वाटलं म्हणून अनुवादाचा प्रसत्न करुन बघितला.` काही काव्याचं इंग्रजीत रुपांतर करण्याचा प्रयत्न केला आहे. कुसुमाग्रजांच्या पाचोळा आणि पृथ्वीचं प्रेमगीत या कवितांवर काम करतोय. अजून हे प्रायोगिक स्वरुपातच आहे. कविता त्या प्रतिमांसह दुसऱ्या भाषेत आणणं खूप कठीण असतं! याशिवाय जॉनी ग्रिशमचीच `फर्म` आणि सिडने शेल्डनची `आर यू अफ्रेड ऑफ डार्क` या दोन कादंबऱ्याच्या अनुवादाचेही काम ते करीत आहेत. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more