* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: BHANDARBHOG
  • Availability : Available
  • ISBN : 9788177660630
  • Edition : 5
  • Publishing Year : FEBRUARY 1988
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 260
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :RAJAN GAVAS COMBO SET - 4 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
`DEVDASI`, A PREY FALLEN TO THE TRADITIONS AND CULTURE. BUT THERE IS ONE MORE PREY FALLEN TO THESE HIDEOUS TRADITIONS, `JOGTYA`, HIS LIFE IS WORSE THAN THAT OF A `DEVDASI`. WE COME ACROSS MANY SUCH `JOGTE` IN THE RURAL AREAS WHO HAVE BEEN OFFERED TO THE GODS. `DEVDASI`S` LIFE IS MUCH BETTER THAN THAT OF A `JOGTYA`. SHE CAN AT LEAST GET IN RELATIONSHIP WITH SOMEONE, THROUGH THE TRADITIONAL `ZULWA`, SHE CAN BE A `MISTRESS` OF SOMEONE. IF SHE DIES, THEN PEOPLE GATHER TO COMPLETE THE LAST RITUALS FOR HER, SHE GETS A PLACE FOR HER PYRE SOMEWHERE. BUT NOBODY COMES TO COMPLETE THE LAST RITUALS FOR A `JOGTYA`. HE IS CONSIDERED TO BE UNTOUCHABLE EVEN AFTER HIS DEATH. ALIVE OR DEAD, HE HAS TO BEFRIEND ONLY THE DARKNESS. HE IS NOT ALLOWED TO SEE THE LIGHT AT ALL. HE IS ALSO A MAN, A NORMAL MAN, BUT THE RITUALS AND TRADITIONS TAKE AWAY EVERYTHING FROM HIM. THIS NOVEL IS BASED ON THIS THEME. THE HERO OF THIS NOVEL EXPRESSES HIMSELF BY SAYING, `WHEN I WAS OFFERED TO GOD, I WAS NO DIFFERENT THAN YOU PEOPLE, I HAD EVERYTHING JUST LIKE YOU, BUT I WAS CRUSHED UNDER THE OFFERING AND OVER THE PERIOD OF TIME, I ALSO DID NOT REALIZE WHEN I LOST MY BEING ME. THE LIFE OF EACH AND EVERY `JOGTYA` RESEMBLES MY LIFE IN ALL RESPECTS. HOW MUCH EVER I TRY TO TELL THIS TO ALL, BUT NOBODY WANTS TO BELIEVE ME, I HAVE ONLY WORDS, NO OTHER PROOF TO SHOW, ALL I HAVE IS RAGS! THE AUTHOR HAS VERY SUCCESSFULLY PRESENTED THE LIFE STORY OF `JOGTYA` THROUGH THIS NOVEL. HE ALSO PRESENTS THE LIFE-STYLE OF OTHER TRIBES SUCH AS CHAUNDKYA, JOGTINEE, ETC. THIS NOVEL MAKES US THINK ABOUT THESE TRIBES AND THEIR TRADITIONS. IT MAKES US THINK ABOUT THEM AS HUMAN BEINGS.
रूढीपरंपरांचा बळी म्हणजे देवदासी... याच रूढीपरंपरांचा आणखी एक बळी म्हणजे जोग्या! ग्रामीण भागात असे देवीला वाहिलेले किती तरी जोगते आढळतात. यांचं जीवन देवदासीपेक्षाही भयावह...! देवदासी झुलवा लावू शकते. एखाद्या पुरुषाची रखेल म्हणून राहू शकते. ती मेली, तर प्रेताला माणसं जमतात. कुणाच्या तरी बांधाला जागा मिळते; पण जोगत्याच्या तिरडीला माणूसच मिळणं कठीण... त्याचा स्पर्शही इंगळीसारखा... त्याच्या नशिबी फक्त अंधार... तोही पुरुषासारखा पुरुष असतो; पण रूढीपरंपरांच्या ओझ्यानं त्याला सगळंच गमवावं लागतं. हाच या कादंबरीचा विषय आहे. या कादंबरीचा नायक आपल्या वेदना व्यक्त करताना म्हणतो– ‘मला देवाला सोडलं, तवा सगळं व्हंत. आगदी तुमच्यावाणी... देवाच्या वझ्यानं पिडून खाल्लं आनी माझ्यातलं सगळंच कव्वा सपलं, माझं मलाच कळलं न्हाई... परतेक देवाच्या जोग्याचं आसंच हाय. सांगून पटत न्हाई... दाकवाय तर ईत न्हाई... आमचं सगळंच फटकुरागत...!’ लेखकानं या जीवनाची समस्या मोठ्या ताकदीनं या कादंबरीत मांडली आहे. जोगत्याच्या जीवनाबरोबरच चौंडक्या, मेळ्यातल्या जोगतिणी यांचं एक विश्वच या कादंबरीनं वाचकासमोर उभं केलं आहे. ही कादंबरी वाचकाला सुन्न करून सोडते, विचार करावयास लावते. हेच कादंबरीचं यश आहे.
RAJYA PURASKAR- 1988 MAHARASHTRA SAHITYA PARISHAD, PUNE`S G.L.THOKAL PURASKAR-1988
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#RAJANGAVAS #DEVDASI# JOGTIN# DEV #YALLUBAI #SULI #SUBANA #BAYAJA #PARADI #LIMB #JAT #BABANYA #SHEWANTAKKA #LAGNA #MELA #NAVAS #HITNI #DONGAR #BHANDARBHOG #RIVANAVAYALIMUNGI #CHOUNDAKA #AAPANMANSATJAMANAHI
Customer Reviews
  • Rating StarVijay Saravate

    भारतीय समाज पूर्णतः जातीव्यवस्था आणि रूढी-परंपरांनी पोखरला गेलाय. हे फारच भयाण व अस्वस्थ करणारं आहे. या विदारक जातीव्यवस्थेचं चित्रण अनेक दिग्गजांनी केलंय, अगदी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आण्णा भाऊ साठे पासून ते हल्ली अलिकडचं शरणकुमार लिंबाळे वगैरेपर्यंत या जातिव्यवस्थेची पाळंमुळं थोडीफार आता सैलही होताहेत. पण अजून बरच काही होणं आवश्यक आहे, अजूनहि बरेच आदिवासी समाज आहेत ज्यांना तर हेही माहित नाही कि ते स्वतंत्र्य आहेत, अजूनही त्यांची दैना संपलेली नाही. हे कमी कि काय म्हणून बऱ्याच घाणेरड्या रूढी - परंपरांनी वेढलंय, यात देव-देवस्की, पशु बळी, नर बळी, जोगते-जोगतिणी आणि बरंच काही ..... :(. या सगळ्यात भरडला जाणारा सर्वसामान्य माणूस, जो जातीव्यवस्थेचं खालचं टोक आहे. असो, यात जोगते-जोगतिणी हे बऱ्याच जातीतले असतात, तर हे जोगते-जोगतिणी होतात कसे? तर केसात केसांची जट सापडली तर ती देवीची, म्हणून तीला भंडारा लावून पुजलं जातं आणि तीला जोगतीण म्हणून सोडलं जातं आणि सांगितलं जातं कि रोज वडाचा-पिंपळाचा चीक केसाला लावून त्यावर भंडारा टाका. म्हणजे होत काय कि हि छोटी असणारी बट कालगणिक वाढत जाते. तर आजारी मुलांना / पुरुषांना बरं व्हावं म्हणून भंडारा लावून देवाला सोडलं जातं. एकदा यांना देवार्पित केलं कि पुन्हा आयुष्यभर त्यातून सुटका नाही, त्यातून मृत्यूच सोडवून नेतो. याना कोणी वाली नसतो, नुसती आयुष्यभर फरफट चालू असते. किमान जोगतीणीला कुणी तरी रखेल म्हणून ठेवतो, तिला हवं तेव्हा सोडून देतो. तीच्या पोटात गर्भ राहिला तर पाडून टाकतात वा नशिबानं जन्माला तर कुठेही तो मांसाचा जिवंत गोळा कुठंही उकिरड्यावर फेकला जातो त्यातून, तो वाचला-जगाला तर तो एखाद्या मेळ्यात चौंडकं वाजवत फिरतो, भिकारी होतो. जोगतीण मेल्यावर तीचा अंत्यविधी तरी गावकरी करतात. पण जोगत्याला तर मेल्यावर कुणी खांदा द्यायलाही तयार होत नाही कारण त्यांना अप्रतिष्ठेची भीती असते. पण तीच त्यांच्या बरोबर अंधारात झोपताना होत नाही. किती वाईट हे जगणं ... !! तर जोगते-जोगतिणी या विषावर #राजन_गवस यांची #भंडारभोग बेतलेली आहे. अजून लिहवत नाही .. थांबतो इथंच .. विजय सरवते २६-११-२०२० ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more