* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177666090
  • Edition : 5
  • Publishing Year : JANUARY 1985
  • Weight : 175.00 gms
  • Pages : 176
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :ANAND YADAV COMBO SET-33 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
MAULI` IS A NOVEL NOVEL, THE CAT BEING ITS CENTRAL CHARACTER. IT IS THE AUTHOR`S PET. SLOWLY, ALONG WITH THE AUTHOR ALL HIS FAMILY MEMBERS, FRIENDS, RELATIVES, AND THE KINDRED OF THE CAT INCLUDING A CRUEL BLACK HE CAT, JOIN IN TO FORM A UNIT. THE NOVEL TAKES A PECULIAR MODE, THE WEFTS AND WARPS ARE WOVEN TIGHTLY FORMING A BEAUTIFUL WEAVING PATTERN. READERS WILL BE ASTONISHED WITH YADAV`S OBSERVATION SKILLS. HIS LONGING FOR KEEN OBSERVATION OPENS UP AN ENTIRE NEW UNIVERSE FOR HIM. HE TRIES TO EXPLORE IT AS FAR AS POSSIBLE, YET NOT FORGETTING HIS SENSES WHICH ARE ALWAYS WIDE AWAKE. WITH HIS IMMENSE WRITING SKILLS HE TAKES THE READERS TO THE ABORIGIN OF THE NATURE, WHICH IS BASED ON THE FOUNDATION OF SELFDEFENSE AND CONTINUING THE LINEAGE. THE READER UNKNOWINGLY TURNS TO THE PATH OF PRIMITIVE FOUNDATION OBSERVING THE ONLY TRUE RELATION BETWEEN A MALE AND A FEMALE, WHO THEMSELVES ARE DEPENDENT ON GENESIS AND THE RHYTHM. THIS CAT NO MORE REMAINS A MERE CAT. SHE TAKES THE FORM OF AADIMAYA`, SHE PRESENTS THE DIVINE FORM OF SELFBIRTH. MAULI` THUS TAKES A FORM OF THE CONTEMPLATION OF LIFE. THIS NOVEL IS VERY UNIQUE; I THINK IT MIGHT BE THE FIRST OF ITS TYPE, TOUCHING SIMULTANEOUSLY YET GENTLY THE DIFFERENT ASPECTS OF PHILOSOPHY, TRADITIONS, FOLK TALES AND THE ORTHODOX SETTING OF THE TYPICAL INDIAN MENTALITY. PROF. ARVIND VAMAN KULKARNI.
।। माऊली ।। ‘माऊली’ ही अगदीच वेगळी कादंबरी. तिची नायिका आहे एक मांजरी; लेखकाने माया लावलेली. या मायेच्या पसायात लेखकाचे कुटुंबीय, स्नेहीसोबती आणि त्या क्रूर काळ्या बोक्यासह मांजरीचा गोतावळाही समाविष्ट होतो आणि कादंबरीची वीण एक वेगळं रंगरूप घेऊ लागते. यादवांचे निरीक्षण वाचकाला स्तिमित करील असे आहे. हे निरीक्षणच त्यांना एक रस्ता सापडवून देते. स्वत:चे भान शाबूत ठेवून यादव हळूहळू मार्जारविश्वाचा शोध घेऊ लागतात. साधा वाटेल अशा तपशिलाची पेरणी करीत या शोधवाटेने लेखक स्वरक्षण आणि स्ववंशवर्धन या दोन मजबूत पख्यांवर विसावलेल्या निसर्गसिद्ध आदिम प्रेरणेशी वाचकाला नेऊन भिडवतो तेव्हा वाचक पछाडल्यागत होतो. उत्पत्ती, स्थिती आणि लय यांच्याच फक्त अंकित असलेले एक थेट असे नरमादीच्या नात्याचे अस्तित्व न्याहाळताना आदिनिरणाच्या वाटेकडे वळतो. मग मांजरी ही मांजरी राहत नाही; तिथे साकारत जाते आदिमायेचेत्या जगन्माऊलीचे आत्मजन्मा नि आत्मभोगी असे कृतार्थ रुपडे. चिंतनगर्भ जीवनेच्छेचा कलारूप आविष्कार म्हणजे ‘माऊली.’ दार्शनिक तत्त्वज्ञान, लोकसाहित्यपरंपरा, सनातन भारतीय समाजमन यांचा हळुवार आणि तलम स्पर्श झालेली मराठी भाषेतील ही पहिलीच साहित्यकृती असावी, इतकी ती वेगळी आहे. – प्रा. अरविंद वामन कुलकर्णी
* कालीमाता साहित्य पुरस्कार १९८६ * परिमल लेखन पुरस्कार १९८६
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#झोंबी #(महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार १९८८-८९) #(महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार १९८८-८९) #(दि फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स -उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार १९८९) #(मारवाडी संमेलन पुरस्कार १९९०) # (साहित्य अकादमी पुरस्कार १९९०) #(प्रवरानगर - विखेपाटील पुरस्कार १९९१) #(संजीवनी साहित्य पुरस्कार, कोपरगाव १९९४) # नांगरणी # (रोहमारे ग्रामीण पुरस्कार १९९०) #घरभिंती #काचवेल #माऊली # (कालीमाता साहित्य पुरस्कार १९८६ #परिमल लेखन पुरस्कार १९८६ # नटरंग #(महाराष्ट्र राज्य पुरस्कार १९८२) # गोतावळा # शेवटची लढाई #(राज्य पुरस्कार २००१-०२) #भूमिकन्या #झाडवाटा # उगवती मने #(राज्य पुरस्कार २००२-०३) # आदिताल # डवरणी #माळावरची मैना # घरजावई #खळाळ #उखडलेली झाडं #सैनिक हो, तुमच्यासाठी... #मळ्याची माती #मायलेकरं #साहित्यिकाचा गाव #मातीखालची माती #स्पर्शकमळे #पाणभवरे #साहित्यिक जडण-घडण # ग्रामसंस्कृती #(रा. ना. सबनीस वाङ्मयपुरस्कार २००२) # मराठी लघुनिबंधाचा इतिहास #साहित्याची निर्मिती प्रक्रिया #ग्रामीणता : साहित्य आणि वास्तव आत्मचरित्र मीमांसा #"ग्रामीण साहित्य : स्वरूप व समस्या #(राज्य पुरस्कार १९८३) # मराठी साहित्य - समाज आणि संस्कृती #१९६० नंतरची सामाजिक स्थिती आणिसाहित्यातील नवे प्रवाह # डॉ. आनंद यादव - एक साहित्यिक प्रवास #ZOMBI #NANGARNI #GHARBHINTI #KACHVEL #MAULI #NATRANG #GOTAVALA #SHEVATCHI LADHAI #BHUMIKANYA #ZADVATA #UGVATI MANE #AADITAL #DAVARNI #MALAVARCHI MAINA #GHARJAWAI #KHALAL #UKHADLELI ZADE #SAINIK HO TUMACHYASATHI #MALYACHI MATI #MAI LEKARA #SAHITYIKACHA GAON #MATIKHALCHI MATI #SPARSHKAMALE #PANBHAVARE #SAHITYIK JADAN-GHADAN #GRAMSANSKRUTI #MARATHI LAGHUNIBANDHACHA ITIHAS #SAHITYACHI NIRMITI PRAKRIYA #GRAMINTA SAHITYA ANI VASTAV #AATMACHARITRA MIMANSA #GRAMIN SAHITYA : SWARUP ANI SAMASYA #1960 NANTARCHI SAMAJIK STHITI ANI SAHITYATEEL NAVE PRAVAH #DR. ANAND YADAV EK SAHITYIK PRAVAS
Customer Reviews
  • Rating StarDainik Kesari 25-5-1985

    आनंद यादव यांची प्रयोगशीलता… ‘गोतावळा’ आणि ‘नटरंग’ या दोन कादंबऱ्यांच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या ‘माऊली’ या डॉ. आनंद यादव यांच्या कादंबरीबाबत सुजाण वाचकांच्या स्वाभाविकपणे अपेक्षा आहेत. या अपेक्षांना ‘माऊली’ पुरी पडते का हे पाहायचे आहे. ग्रामीण साहि्यिक आणि ग्रामीण साहित्यविषयक चळवळीचे अध्वर्यू म्हणून आज मराठी सारस्वतामध्ये डॉ. यादव ओळखले जातात. ‘माऊली’ चे लेखन करताना यादवांनी आपली ही प्रतिमा स्वत:च दूर ठेवली आहे, हे महत्वाचे आहे. मुख्य म्हणजे यादव हे प्रयोगजीवी कलावंत नव्हेत, परंतु ‘माऊली’ चे लेखन यादव यांनी अगदी ठरवून एक प्रयोग म्हणून केलेले आहे. या प्रयोगाचाच एक भाग म्हणून डॉ. यादव यांनी या कादंबरीच्या लेखनासाठी दैनंदिनी लेखनाचा प्रकार (डायरी फॉर्म) निवडला आहे. असा लेखनप्रकार निवडल्याने यादवांना या कादंबरीच्या निवेदनपद्धतीत भरपूर स्वातंत्र्य घेता आलेले आहे. यादव जो प्रयोग करु पाहतात त्याकरिता या मनःपूत स्वातंत्र्याची आवश्यकता होतीच. तरीही एका गोष्टीचा निर्देश येथेच करायला हवा. ही कादंबरी केवळ दैनंदिनीच्या स्वरुपात - आकारात नाही. तिला आरंभी एक आणि अखेरीस एक अशा दोन कथांची जोडणी आहे. या दोन कथांच्या मध्ये यादवांनी आपल्या दैनंदिनीतून उलगडत जाणारी एक मांजर - कुटुंबाची कथा ठेवली आहे. या तीन कथांची मिळून एक बृहद्कथा तयार होते. या बृहद्कथेचे सार कादंबरीच्या अखेरीस येणाऱ्या मार्जार - सूक्तामध्ये आपणास गवसते. अशा रीतीने संपूर्ण कादंबरीची रचना ही जाणीवपूर्वक एक प्रयोग म्हणूनच केलेली आहे. याच प्रयोगशीलतेचे रुप आणखी एक बाबतीत पाहण्यास सापडते. ती म्हणजे कादंबरीतील निवेदक किंवा कादंबरीतील ‘मी’. या कादंबरीत ‘मी’ नसून स्वत: डॉ. आनंद यादव हेच वावरच आहेत. नुसते स्वतः वावरत आहेत असे नव्हे तर त्यांची पत्नी स्मिता, लेक स्वाती यांच्यासह, त्यांच्या घरादारासह, त्यांच्या आप्तस्नेह्यांसह (उदाहणार्थ, शान्ता शेळके, प्रा. कमलाकर दीक्षित), त्यांच्या वसाहतीसह यादव या कादंबरीत वावरत आहेत. अशा रीतीने यादव यांनी कादंबरीत आजवर येणाऱ्या ‘मी’ च्या रुपाला आणखी एक नवेच परिणाम दिले आहे. ‘माऊली’ ही प्रथम पातळीवर एक मांजर - कुटुंब - कथा आहे. एक मांजरी आणि तिची बाळ्या, पवळ्या आणि ढवळ्या ही तीन पिल्ले यांच्या ‘जीवनार्थ कलहा’ ची ही कहाणी आहे. परंतु ‘माऊली’ ही केवळ प्राणिकथा नाही. मांजराचे जीवनविशेष जाणून घेण्याचे आपले - वाचकांचे कुतूहल शमविणे एवढेच ‘माऊली’ चे मर्यादित ध्येय नाही. जीवनविषयक कुतूहल जागृत करणे आणि शमविणे एवढेच कुठल्याही चांगल्या कादंबरीचे ध्येय नसते, हेही येथे लक्षात घ्यावे. मानवी जीवनाच्या अस्तित्वाचा शोध हेच कादंबरी या वाङमयप्रकाराचे ध्येय असते. म्हणूनच ‘नॉव्हेल्स डू नॉट प्रेझेंट अ डॉक्युमेंटरी पिक्चर ऑफ लाइफ’ यासारखी विधाने केली जातात. हेही येथे मुद्दाम लक्षात घ्यायला हवे. असे जरी असले तरी ही कादंबरी वाचताना एक गोष्ट आपणास जाणवते ती म्हणजे मांजर हे तसे माणसाला अतिपरिचित असून आपणास मांजराबद्दल , त्यांच्या जीवनक्रमाबद्दल फारच थोडी माहिती आहे. मांजर या अतिपरिचित प्राण्याबद्दल आपले अज्ञानच अधिक आहे. (हाही पुन्हा आपल्या संकुचित जीवनाच्या आकलनाचाच एक भाग म्हणायचा.) याचे कारण यादव हे मांजराबरोबर राहात-वावरत आहेत, अशी या कादंबरीची रचना आहे, त्यामुळे यादवांना जे दिसले, ते आपणास दिसले नाही, याचे आपणास आश्चर्य वाटत राहते. पण हे आश्चर्य वाटत राहणे हे काही या कादंबरीचे मूळ सूत्र नाही, त्यामुळे आपण या आश्चर्यात गुंतून पडत नाही. लेखक डॉ. यादव यांचा तसा हेतु नाही. उलटपक्षी निसर्गाने बहाल केलेले कोरे जीवन, सनातन जीवन आजच्या माणसाने गमावले आहे, असे कांही केंद्रवर्ती सूत्र या कादंबरीमागे असावे असे सतत जाणवत राहते. कारण डॉ. यादव मांजराच्या जीवनातील सनातनत्वाचा, आदिमतेचा सूर संपूर्ण कादंबरीभर लावून आहेत. ‘‘निसर्गाने आरंभावस्थेत जशी घडी घालून दिली तसंच’’ जीवन मांजर आजही- सृष्टीच्या अत्यंत उत्क्रांत अवस्थेत जगत आहे, हे यादव पुन्हा-पुन्हा दिग्दर्शित करतात. ‘‘जगाच्या आरंभी मूळ मांजर जसं होतं तसंच आजचंही मांजर आहे. एक सनातन न बदलणारं, शाश्वत प्रकृतीचं सत्य...’’ याउलट माणसाने मात्र संस्कृतीच्या भट्टीत घालून आपले मूळचे जीवन विकृत, विसविशीत करून टाकले आहे; माणसाने आपल्या मूळ जीवनाचे कोरेपण पार हरवून टाकले आहे; संस्कृती, संस्कार, शिष्टसंकेत इत्यादींच्या स्वीकारातून माणसाने आपल्या जीवनासाठी निसर्गत: नसलेले म्हणजेच कृत्रिम नियम, कृत्रिम नातीगोती स्वीकारलेली आहेत; यामध्ये मानवी जीवनाची काही प्रमाणात शोकान्तिका झालेली आहे, असे काही सूत्र डॉ. यादव ‘माऊली’ मधून मांडू पाहात आहेत. खरं जीवन ‘माऊली’ पणात आहे, आदिमता ही माऊलीमय आहे. माऊलीपण हेच एक शाश्वत, सनातन नाते आहे. इतर नाती ही अनैसर्गिक, कृत्रिम आहेत, त्यामुळे मानवी संस्कृतीने माऊलीपण, मातृत्व नाकारु नये, त्याचा तिरस्कार वा निषेध करु नये असेही सूत्र या कादंबरीतून गवसते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RAZOR SHARP
RAZOR SHARP by ASHWIN SANGHI Rating Star
सुनील माने, पुणे

लेखक अश्विन सांघी “द रोझाबल लाइन” या पहिल्याच कादंबरीने खूप लोकप्रिय झाला. प्राचीन भारतीय दंतकथा/ऐतिहासिक संदर्भ घेऊन त्याच्याभोवती आजच्या काळात रहस्यपूर्ण कथा लिहिणारा अश्विन. Chanakya’s Chant, The Krishna Key, The Sialkot Saga, Keepers of the Kalacakra, The Vault of Vishnu, The Magicians of Mazda अशा एकापेक्षा एक सुंदर रहस्य कादंबर्या “भारत सिरीज़” नावाने खूप प्रसिद्ध झाल्या. या सर्व कादंबऱ्या मी इंग्लिश मधेच वाचल्या. यांचा मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाउस यांच्याकडे उपलब्ध आहे. अश्विन सांघीने या भारत सिरीज शिवाय एक नवीन थ्रिल्लर सिरीज (कुत्ता कदम) सुरू केली आहे. त्यांतील पहिली कादंबरी Razor Sharp. एक सिरियल किलर मुंबईत एकानंतर एक खून पाडतोय. पोलिस चक्रावले आहेत. 1. रविवार दि २ फेब्रुवारी , गोरेगाव पश्चिममधे रवि मेहराचा खून होतो. त्याची बायको खुशी कॅाल सेंटरचा जॅाब करून रात्री ११.३० ला परत येते. खूप वेळा बेल वाजवून दार न उघडल्यामुळे ती उघडून आत येते तर रवि रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलेला असतो. त्याचे हात पाठीमागे नायलॅान दोरीने बांधलेले असतात. त्याच्या छातीत सुरा खुपसलेला असतो. त्याच्या तोंडात काहीतरी खाद्य पदार्थ असतो. 2. सोमवार दि १० फेब्रुवारी , लोअर परळमधे सुचंद्रा अग्रवालचा खून. तिची कामवाली आल्यावर दार न उघडल्यामुळे सोसायटीवाले दार तोडतात. आत सुचंद्राचा खून झालेला. हात नायलॅान दोरीने मागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात काहीतरी खाद्यपदार्थ. पोलिस चक्रावलेले. मग पोलिसखाते जागे होते. त्यांचा नावाजलेला अधिकारी जो सस्पेंड झालेला आहे, त्या प्रकाश कदम, DCP याला बोलावले जाते. राज्याचे गृहमंत्री ओंकार लोखंडे, त्यांचा माणूस कमिशनर चव्हाण आणि उपगृहमंत्री जयंत गायकवाड व त्यांचा माणूस SCP राणे, मुंबईचा डॅान भाऊ पाटील जो लोखंडेचाच माणूस असतो, हे सर्व या केसच्या मागावर लागतात. कदम हा राणेंच्या ओळखीचा खास ऑफिसर असतो म्हणून त्यालाही इन्व्हेस्टीगेशनला बोलावले जाते. 3. मंगळवार दि १८ फेब्रुवारी , ठाणे येथे मंगला शहाचा खून. तिच्या शेजारणीमुळे हे कळते. मंगलाचे हात नायलॅान दोरीने पाठीमागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात खाद्यपदार्थ. पोलिस अधिकारी शिंदे कदमबरोबर येतात. मंगलाच्या चेहऱ्याजवळ कदमला पेस्टिसाईडचा वास येतो. चेहरा निळसर झालेला. खून झाल्यावर बॅाडीला हलवलेले दिसते. तो ऑफिसमध्ये जुन्या खूनांचे फोटो तपासतो. त्यांचीही बॅाडी खून केल्यावर हलवलेली दिसते. चेहऱ्यावर निळसर झाक दिसते. तिन्ही खून “फिनेक” ब्रॅंडच्या चाकूने केलेले असतात. हे समान धागे कदम त्याची मुलगी केतुल बरोबर चर्चा करतो. केतुलची आई काही वर्षांपूर्वी कदमला सोडून गेलेली असते. ती भाऊ पाटीलची सावत्र बहीण असते. पण सध्या ती कुठे आहे व काय करते हे माहित नसते. केतुल कोर्टात काम करत असते तसेच ती “शक्ती” या NGO मधेही काम करते. शक्ती हे सोनापूरमधुन सुटका केलेल्या वेश्यांचे पुनर्वसन करत असते. निर्मल नावाचा तिचा मित्र एथिकल हॅकर असतो. तिच्यावर प्रेम करत असतो. कदमला हार्ट अटॅक येऊन गेलेला व स्टेंट बसवलेला असतो. Depression मुळे त्याची सायकॅालॅाजिस्टकडे ट्रिटमेंट चालू असते. कदमला या तिन्ही केसमधे आणखी एक धागा सापडतो. हे खून आठ दिवसांच्या अंतरावर झालेले असतात. म्हणजे पुढचा खून बुधवारी होणार असल्याचे तो राणे व शिंदेला सांगतो. 4. बुधवार दि २६ फेब्रुवारी, कांदिवली पश्चिम, लक्ष्मी बुधीराजाचा खून. तोच पॅटर्न. 5. गुरुवार दि ५ मार्च, खार पश्चिम, गुरुराज अदवानीचा खून सेम पॅटर्न. गुरूराज हा युट्युबवरचा प्रसिद्ध सिंगर असतो. 6. शुक्रवार दि १३ मार्च, ताडदेव, दिव्या शुक्रपाणीवर खूनी हल्ला होतो. पण ती जबर जखमी होते. ती फिटनेस ट्रेनर असल्यामुळे खुन्याबरोबर झटापट करते. पण चाकू पोटात घुसल्यामुळे ती जबर जखमी होते. हात बांधलेले असतानाही ती फोनवर “सिरी” ला तिच्या भावाला, ध्रुवला फोन लावायला सांगते. फोन लागतो व ती “हेल्प हेल्प” एव्हढेच बोलून बेशुद्ध होते. म्हणून खुनी पळून जातो. ध्रुव तिथे पोहोचून तिला हॅास्पिटलमधे ॲडमिट करतो. पोलिसांना तिथे खुन्याची बॅग सापडते. त्यांत नायलॅानची दोरी, बेगॅान स्प्रे व राजमाच्या बिया सापडतात. तिसऱ्या खुनाआधी पोलिस संशयित म्हणून राजू दाभाडेला अटक करतात. पण चौथ्या खूनाच्या वेळेस तो कस्टडीतच असतो. मग खूनी कोण? 7. शनिवार दि २१ मार्च, बान्द्रा पश्चिम, शनिया डिसौजाचा खून होतो. सेम मोडस ऑपरेंडी . 8. शनिवार दि २८ मार्च, चेंबूर, ७१ वर्षांच्या राहुल सिंह नावाच्या सिख व्यक्तिचा खून होतो. तीच पध्दत. यानंतर एक दिवस कदम KBC बघत असताना अमिताभ बच्चन एका सिनेमाचं गाणं लावून त्याचा पिक्चर ओळखायला सांगतात. ते गाणं असते- “सोमवार को हम मिले मंगलवार को नयन बुध को मेरी निंद खुली जुम्मेरात को चैन अरे शुक्र शनी कटे मुश्किलसे आज है इतवार सात दिनों में हो गया जैसे सात जनम का प्यार” आणि कदमच्या डोक्यात एकदम प्रकाश पडतो… अरे, हे सर्व खून असेच रविवार ते शनिवार एक एका वारी घडलेत! पण शनिवारी दोन खून कसे? याच्या मागे काही खगोलशास्त्र किंवा भविष्याचा तर संबंध नाही? कदमला आठवतं की शेजारी राहणारा डॉ. देसाईला पण भविष्य-खगोलशास्त्राची आवड व माहिती आहे. ( डॅाक्टर कडे सापडलेल्या नायलॅानचे रंगीत दोर व फिनेक कंपनीचा चाकू यामुळे एक संशयित म्हणून कदमने त्याला अटक करून पुछताछ केलेली असते) कदम लगेच डॅाक्टरांकडे जातो. त्यांची माफी मागून त्यांना या प्रश्नांत मदत करायला सांगतो. तो या सर्व खुनांचा सिक्वेन्स सांगतो. ते प्रत्येक वारी का घडले? मग शनिवारी दोन का? यापुढे कोणता वार? कुणाचा खून? डॅाक्टर सांगतात की भारतीय भविष्य व खगोल शास्त्रात नवग्रहांना खूप महत्व आहे. रवि, सोम(चंद्र), मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि, राहू आणि केतु. यांचे रंग व धान्य वेगवेगळे असतात. त्या त्या ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी ते वापरले जातात. कदम ही माहिती लिहून घेतो. त्यावरून प्रत्येक खुनात वापरण्यात आलेले फिनेक कंपनीचे चाकू, वेगवेगळ्या रंगांचे नायलॅान दोर व तोंडातील पदार्थ यांचा संबंध जोडून एक तख्ता तयार करतोः- “रवि मेहरा-रविवार-सोनेरी दोर- तोंडात गहू-दिशा पूर्व सुचंद्रा-सोमवार-चंदेरी दोर-तोंडात तांदूळ-दिशा पश्चिम मंगला शाह-मंगळवार-लाल दोर-तोंडात तूर डाळ- दिशा दक्षिण लक्ष्मी बुधीराजा-बुधवार-हिरवा दोर-तोंडात हिरवे मूग-दिशा उत्तर गुरुराज अदवानी-गुरूवार-पिवळा दोर-तोंडात हरबरा डाळ-दिशा उत्तर पूर्व(ईशान्य) दिव्या शुक्रपाणी-शुक्रवार-पांढरा दोर-राजमा-दिशा दक्षिण पूर्व शनिया डिसौजा-शनिवार-काळा दोर-तोंडात काळे तिळ-दिशा उत्तर पश्चिम राहुल सिंग-शनिवार-निळा दोर-तोंडात उडीद दाळ-दिशा दक्षिण पश्चिम” आता उरला एकच ग्रह-केतु. केतुचा वार मंगळवार. ग्रे रंग, चना दाळ, दिशा दक्षिण पश्चिम. “केतु”म्हणजे कदमची मुलगी केतुलचा नंबर लागणार? आज तर मंगळवारच आहे! कदम घाबरून जातो! तो केतुलला फोन करतो पण तो बंद लागतो. ती सध्या कुठे आहे? कोर्टात? कदम आपल्या मुलीला वाचवतो का? खरा खुनी कोण असतो? तो पकडला जातो का? त्याचे यामागचा उद्देश काय असतो? याच्यामध्ये अजून कोण सामिल असतं का? याची उत्तरे मिळण्यासाठी वाचावी लागेल अश्विन सांघी यांची कादंबरी Razor Sharp. ...Read more

BANGARWADI
BANGARWADI by VYANKATESH MADGULKAR Rating Star
Sameer Kazi

सुंदर अशी कादंबरी माणदेशी बनगरवाडी तशी कोरडी रखरखती पण, यातील पात्रात मायेचा करुणेचाओलावा मनात घर करुन जातो