* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: MAULI
  • Availability : Available
  • ISBN : 9788177666090
  • Edition : 5
  • Publishing Year : JANUARY 1985
  • Weight : 175.00 gms
  • Pages : 176
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :ANAND YADAV COMBO SET-33 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
MAULI` IS A NOVEL NOVEL, THE CAT BEING ITS CENTRAL CHARACTER. IT IS THE AUTHOR`S PET. SLOWLY, ALONG WITH THE AUTHOR ALL HIS FAMILY MEMBERS, FRIENDS, RELATIVES, AND THE KINDRED OF THE CAT INCLUDING A CRUEL BLACK HE CAT, JOIN IN TO FORM A UNIT. THE NOVEL TAKES A PECULIAR MODE, THE WEFTS AND WARPS ARE WOVEN TIGHTLY FORMING A BEAUTIFUL WEAVING PATTERN. READERS WILL BE ASTONISHED WITH YADAV`S OBSERVATION SKILLS. HIS LONGING FOR KEEN OBSERVATION OPENS UP AN ENTIRE NEW UNIVERSE FOR HIM. HE TRIES TO EXPLORE IT AS FAR AS POSSIBLE, YET NOT FORGETTING HIS SENSES WHICH ARE ALWAYS WIDE AWAKE. WITH HIS IMMENSE WRITING SKILLS HE TAKES THE READERS TO THE ABORIGIN OF THE NATURE, WHICH IS BASED ON THE FOUNDATION OF SELFDEFENSE AND CONTINUING THE LINEAGE. THE READER UNKNOWINGLY TURNS TO THE PATH OF PRIMITIVE FOUNDATION OBSERVING THE ONLY TRUE RELATION BETWEEN A MALE AND A FEMALE, WHO THEMSELVES ARE DEPENDENT ON GENESIS AND THE RHYTHM. THIS CAT NO MORE REMAINS A MERE CAT. SHE TAKES THE FORM OF "AADIMAYA`, SHE PRESENTS THE DIVINE FORM OF SELFBIRTH. "MAULI` THUS TAKES A FORM OF THE CONTEMPLATION OF LIFE. THIS NOVEL IS VERY UNIQUE; I THINK IT MIGHT BE THE FIRST OF ITS TYPE, TOUCHING SIMULTANEOUSLY YET GENTLY THE DIFFERENT ASPECTS OF PHILOSOPHY, TRADITIONS, FOLK TALES AND THE ORTHODOX SETTING OF THE TYPICAL INDIAN MENTALITY. PROF. ARVIND VAMAN KULKARNI.
।। माऊली ।। ‘माऊली’ ही अगदीच वेगळी कादंबरी. तिची नायिका आहे एक मांजरी; लेखकाने माया लावलेली. या मायेच्या पसायात लेखकाचे कुटुंबीय, स्नेहीसोबती आणि त्या क्रूर काळ्या बोक्यासह मांजरीचा गोतावळाही समाविष्ट होतो आणि कादंबरीची वीण एक वेगळं रंगरूप घेऊ लागते. यादवांचे निरीक्षण वाचकाला स्तिमित करील असे आहे. हे निरीक्षणच त्यांना एक रस्ता सापडवून देते. स्वत:चे भान शाबूत ठेवून यादव हळूहळू मार्जारविश्वाचा शोध घेऊ लागतात. साधा वाटेल अशा तपशिलाची पेरणी करीत या शोधवाटेने लेखक स्वरक्षण आणि स्ववंशवर्धन या दोन मजबूत पख्यांवर विसावलेल्या निसर्गसिद्ध आदिम प्रेरणेशी वाचकाला नेऊन भिडवतो तेव्हा वाचक पछाडल्यागत होतो. उत्पत्ती, स्थिती आणि लय यांच्याच फक्त अंकित असलेले एक थेट असे नरमादीच्या नात्याचे अस्तित्व न्याहाळताना आदिनिरणाच्या वाटेकडे वळतो. मग मांजरी ही मांजरी राहत नाही; तिथे साकारत जाते आदिमायेचेत्या जगन्माऊलीचे आत्मजन्मा नि आत्मभोगी असे कृतार्थ रुपडे. चिंतनगर्भ जीवनेच्छेचा कलारूप आविष्कार म्हणजे ‘माऊली.’ दार्शनिक तत्त्वज्ञान, लोकसाहित्यपरंपरा, सनातन भारतीय समाजमन यांचा हळुवार आणि तलम स्पर्श झालेली मराठी भाषेतील ही पहिलीच साहित्यकृती असावी, इतकी ती वेगळी आहे. – प्रा. अरविंद वामन कुलकर्णी
* कालीमाता साहित्य पुरस्कार १९८६ * परिमल लेखन पुरस्कार १९८६
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#झोंबी #(महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार १९८८-८९) #(महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार १९८८-८९) #(दि फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स -उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार १९८९) #(मारवाडी संमेलन पुरस्कार १९९०) # (साहित्य अकादमी पुरस्कार १९९०) #(प्रवरानगर - विखेपाटील पुरस्कार १९९१) #(संजीवनी साहित्य पुरस्कार, कोपरगाव १९९४) # नांगरणी # (रोहमारे ग्रामीण पुरस्कार १९९०) #घरभिंती #काचवेल #माऊली # (कालीमाता साहित्य पुरस्कार १९८६ #परिमल लेखन पुरस्कार १९८६ # नटरंग #(महाराष्ट्र राज्य पुरस्कार १९८२) # गोतावळा # शेवटची लढाई #(राज्य पुरस्कार २००१-०२) #भूमिकन्या #झाडवाटा # उगवती मने #(राज्य पुरस्कार २००२-०३) # आदिताल # डवरणी #माळावरची मैना # घरजावई #खळाळ #उखडलेली झाडं #सैनिक हो, तुमच्यासाठी... #मळ्याची माती #मायलेकरं #साहित्यिकाचा गाव #मातीखालची माती #स्पर्शकमळे #पाणभवरे #साहित्यिक जडण-घडण # ग्रामसंस्कृती #(रा. ना. सबनीस वाङ्मयपुरस्कार २००२) # मराठी लघुनिबंधाचा इतिहास #साहित्याची निर्मिती प्रक्रिया #ग्रामीणता : साहित्य आणि वास्तव आत्मचरित्र मीमांसा #"ग्रामीण साहित्य : स्वरूप व समस्या #(राज्य पुरस्कार १९८३) # मराठी साहित्य - समाज आणि संस्कृती #१९६० नंतरची सामाजिक स्थिती आणिसाहित्यातील नवे प्रवाह # डॉ. आनंद यादव - एक साहित्यिक प्रवास #ZOMBI #NANGARNI #GHARBHINTI #KACHVEL #MAULI #NATRANG #GOTAVALA #SHEVATCHI LADHAI #BHUMIKANYA #ZADVATA #UGVATI MANE #AADITAL #DAVARNI #MALAVARCHI MAINA #GHARJAWAI #KHALAL #UKHADLELI ZADE #SAINIK HO TUMACHYASATHI #MALYACHI MATI #MAI LEKARA #SAHITYIKACHA GAON #MATIKHALCHI MATI #SPARSHKAMALE #PANBHAVARE #SAHITYIK JADAN-GHADAN #GRAMSANSKRUTI #MARATHI LAGHUNIBANDHACHA ITIHAS #SAHITYACHI NIRMITI PRAKRIYA #GRAMINTA SAHITYA ANI VASTAV #AATMACHARITRA MIMANSA #GRAMIN SAHITYA : SWARUP ANI SAMASYA #1960 NANTARCHI SAMAJIK STHITI ANI SAHITYATEEL NAVE PRAVAH #DR. ANAND YADAV EK SAHITYIK PRAVAS
Customer Reviews
  • Rating StarDainik Kesari 25-5-1985

    आनंद यादव यांची प्रयोगशीलता… ‘गोतावळा’ आणि ‘नटरंग’ या दोन कादंबऱ्यांच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या ‘माऊली’ या डॉ. आनंद यादव यांच्या कादंबरीबाबत सुजाण वाचकांच्या स्वाभाविकपणे अपेक्षा आहेत. या अपेक्षांना ‘माऊली’ पुरी पडते का हे पाहायचे आहे. ग्रामीण साहि्यिक आणि ग्रामीण साहित्यविषयक चळवळीचे अध्वर्यू म्हणून आज मराठी सारस्वतामध्ये डॉ. यादव ओळखले जातात. ‘माऊली’ चे लेखन करताना यादवांनी आपली ही प्रतिमा स्वत:च दूर ठेवली आहे, हे महत्वाचे आहे. मुख्य म्हणजे यादव हे प्रयोगजीवी कलावंत नव्हेत, परंतु ‘माऊली’ चे लेखन यादव यांनी अगदी ठरवून एक प्रयोग म्हणून केलेले आहे. या प्रयोगाचाच एक भाग म्हणून डॉ. यादव यांनी या कादंबरीच्या लेखनासाठी दैनंदिनी लेखनाचा प्रकार (डायरी फॉर्म) निवडला आहे. असा लेखनप्रकार निवडल्याने यादवांना या कादंबरीच्या निवेदनपद्धतीत भरपूर स्वातंत्र्य घेता आलेले आहे. यादव जो प्रयोग करु पाहतात त्याकरिता या मनःपूत स्वातंत्र्याची आवश्यकता होतीच. तरीही एका गोष्टीचा निर्देश येथेच करायला हवा. ही कादंबरी केवळ दैनंदिनीच्या स्वरुपात - आकारात नाही. तिला आरंभी एक आणि अखेरीस एक अशा दोन कथांची जोडणी आहे. या दोन कथांच्या मध्ये यादवांनी आपल्या दैनंदिनीतून उलगडत जाणारी एक मांजर - कुटुंबाची कथा ठेवली आहे. या तीन कथांची मिळून एक बृहद्कथा तयार होते. या बृहद्कथेचे सार कादंबरीच्या अखेरीस येणाऱ्या मार्जार - सूक्तामध्ये आपणास गवसते. अशा रीतीने संपूर्ण कादंबरीची रचना ही जाणीवपूर्वक एक प्रयोग म्हणूनच केलेली आहे. याच प्रयोगशीलतेचे रुप आणखी एक बाबतीत पाहण्यास सापडते. ती म्हणजे कादंबरीतील निवेदक किंवा कादंबरीतील ‘मी’. या कादंबरीत ‘मी’ नसून स्वत: डॉ. आनंद यादव हेच वावरच आहेत. नुसते स्वतः वावरत आहेत असे नव्हे तर त्यांची पत्नी स्मिता, लेक स्वाती यांच्यासह, त्यांच्या घरादारासह, त्यांच्या आप्तस्नेह्यांसह (उदाहणार्थ, शान्ता शेळके, प्रा. कमलाकर दीक्षित), त्यांच्या वसाहतीसह यादव या कादंबरीत वावरत आहेत. अशा रीतीने यादव यांनी कादंबरीत आजवर येणाऱ्या ‘मी’ च्या रुपाला आणखी एक नवेच परिणाम दिले आहे. ‘माऊली’ ही प्रथम पातळीवर एक मांजर - कुटुंब - कथा आहे. एक मांजरी आणि तिची बाळ्या, पवळ्या आणि ढवळ्या ही तीन पिल्ले यांच्या ‘जीवनार्थ कलहा’ ची ही कहाणी आहे. परंतु ‘माऊली’ ही केवळ प्राणिकथा नाही. मांजराचे जीवनविशेष जाणून घेण्याचे आपले - वाचकांचे कुतूहल शमविणे एवढेच ‘माऊली’ चे मर्यादित ध्येय नाही. जीवनविषयक कुतूहल जागृत करणे आणि शमविणे एवढेच कुठल्याही चांगल्या कादंबरीचे ध्येय नसते, हेही येथे लक्षात घ्यावे. मानवी जीवनाच्या अस्तित्वाचा शोध हेच कादंबरी या वाङमयप्रकाराचे ध्येय असते. म्हणूनच ‘नॉव्हेल्स डू नॉट प्रेझेंट अ डॉक्युमेंटरी पिक्चर ऑफ लाइफ’ यासारखी विधाने केली जातात. हेही येथे मुद्दाम लक्षात घ्यायला हवे. असे जरी असले तरी ही कादंबरी वाचताना एक गोष्ट आपणास जाणवते ती म्हणजे मांजर हे तसे माणसाला अतिपरिचित असून आपणास मांजराबद्दल , त्यांच्या जीवनक्रमाबद्दल फारच थोडी माहिती आहे. मांजर या अतिपरिचित प्राण्याबद्दल आपले अज्ञानच अधिक आहे. (हाही पुन्हा आपल्या संकुचित जीवनाच्या आकलनाचाच एक भाग म्हणायचा.) याचे कारण यादव हे मांजराबरोबर राहात-वावरत आहेत, अशी या कादंबरीची रचना आहे, त्यामुळे यादवांना जे दिसले, ते आपणास दिसले नाही, याचे आपणास आश्चर्य वाटत राहते. पण हे आश्चर्य वाटत राहणे हे काही या कादंबरीचे मूळ सूत्र नाही, त्यामुळे आपण या आश्चर्यात गुंतून पडत नाही. लेखक डॉ. यादव यांचा तसा हेतु नाही. उलटपक्षी निसर्गाने बहाल केलेले कोरे जीवन, सनातन जीवन आजच्या माणसाने गमावले आहे, असे कांही केंद्रवर्ती सूत्र या कादंबरीमागे असावे असे सतत जाणवत राहते. कारण डॉ. यादव मांजराच्या जीवनातील सनातनत्वाचा, आदिमतेचा सूर संपूर्ण कादंबरीभर लावून आहेत. ‘‘निसर्गाने आरंभावस्थेत जशी घडी घालून दिली तसंच’’ जीवन मांजर आजही- सृष्टीच्या अत्यंत उत्क्रांत अवस्थेत जगत आहे, हे यादव पुन्हा-पुन्हा दिग्दर्शित करतात. ‘‘जगाच्या आरंभी मूळ मांजर जसं होतं तसंच आजचंही मांजर आहे. एक सनातन न बदलणारं, शाश्वत प्रकृतीचं सत्य...’’ याउलट माणसाने मात्र संस्कृतीच्या भट्टीत घालून आपले मूळचे जीवन विकृत, विसविशीत करून टाकले आहे; माणसाने आपल्या मूळ जीवनाचे कोरेपण पार हरवून टाकले आहे; संस्कृती, संस्कार, शिष्टसंकेत इत्यादींच्या स्वीकारातून माणसाने आपल्या जीवनासाठी निसर्गत: नसलेले म्हणजेच कृत्रिम नियम, कृत्रिम नातीगोती स्वीकारलेली आहेत; यामध्ये मानवी जीवनाची काही प्रमाणात शोकान्तिका झालेली आहे, असे काही सूत्र डॉ. यादव ‘माऊली’ मधून मांडू पाहात आहेत. खरं जीवन ‘माऊली’ पणात आहे, आदिमता ही माऊलीमय आहे. माऊलीपण हेच एक शाश्वत, सनातन नाते आहे. इतर नाती ही अनैसर्गिक, कृत्रिम आहेत, त्यामुळे मानवी संस्कृतीने माऊलीपण, मातृत्व नाकारु नये, त्याचा तिरस्कार वा निषेध करु नये असेही सूत्र या कादंबरीतून गवसते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

राधेय.... लेखक रणजित देसाई... मित्र कसा असावा...कर्णासारखा दातृत्व कसं असावं...कर्णासारखं असा हा कर्ण... त्याला अंगराज म्हणावं, दान देणारा दाता म्हणावं, राधेय म्हणावं कि कौतेय... काहीही म्हणा पण कर्णासारखा दाता कर्णानंतर कधी झाला नाही आणि कधी होणरही नाही... रणजित देसाई लिखीत कर्णचरीत्र राधेय आज हातावेगळं झालं ते अश्रुभरल्या नयनांनी...ज्याचा अंत करायला स्वतः देवाधिदेव कृष्णाला अर्जुनाचं सारथ्य करावं लागलं यातच अंगराज कर्णांचं विरत्व अधोरेखीत होत आहे. जन्मापासुन ज्याला केवळ सुतपुत्र म्हणुन वागणुक मिळाली असा तो कर्ण स्वतःच्या बळावर इतका महान लढवय्या बनला. पुस्तकाच्या प्रास्ताविकात देसाईंनी म्हटलं आहे की राधेय मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो, कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत, तर त्यात हा कर्ण दिसेल. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून एक अनोखी ऊंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. राधेय या कादंबरीत रणजित देसाईंच्या शब्दांनी कर्णाची अनेक रुपे अनुभवता आली. त्यामध्ये राधाई आणि वृषाली सोबतचा कर्ण, दुर्यौधनासोबतचा कर्ण, कृष्णासोबतचा कर्ण, रणांगणावरचा कर्ण आणि नदीकाठी पाठमोरा ऊभा राहत दान करत असलेला कर्ण अशा अनेक रुपांनी प्रत्येकवेळी वेगळा भासला. वृषसेन आणि चक्रधराच्या मृत्युने हळवा झालेला कर्णही वाचकाच्या डोळ्यातही पाणी आणवतो... समोर मृत्यु दिसत असताना सुध्दा केवळ दिलेल्या वचनामुळे हातातील धनुष्याचा त्याग करुन शस्त्रहिन हेणारा कर्ण रणजित देसाईंच्या शब्दांमुळे आजन्म लक्षात राहील. कर्णासारखं होणं कुणालाही कदापि शक्य नाही पण त्यातला एखादा जरी चांगला गुण अंगी बाळगण्याचा प्रयत्न प्रत्येकाने नक्कीच केला पाहीजे... प्रत्येकाच्या संग्रही असावं आणि एकदा तरी वाचावं असं पुस्तक रणजित देसाई लिखीत...राधेय... © विश्वजित शिंत्रे. ...Read more

BAJIND
BAJIND by PAHILWAN GANESH MANUGADE Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

काही पुस्तकं अशी असतात कि कितीही वेळा वाचली तरीही त्या पुस्तकाचा कंटाळा येत नाही. पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटतं आणि त्याची पारायणं होतचं राहतात. असचं एक पुस्तक म्हणजे *पै.गणेश मानुगडे* लिखीत *बाजिंद.* *बाजिंद* हे एक असं रसायन आहे जे प्रत्ेकाला अक्षरशः वेड लावतं. साधारण चार पाच वर्षांपुर्वी पहील्यांदा वाचलं होतं, त्यानंतर बर्‍याचवेळा आणि आज पुन्हा एकदा. त्याबद्दलची एक सुंदर आठवण म्हणजे माझ्या बहिणीच्या गरोदरपणाच्या दिवसात ग्रहण लागलं होतं आणि त्या ग्रहणकाळात तिला मी *बाजिंद* वाचुन दाखवलं होतं, असं हे पुस्तक. कुस्ती, प्रेमकथा, हेरगिरी, गुढ रहस्यमय बाजिंदचं जंगल, पशु-पक्षी व हिंस्र जनावरांची भाषा, बहीर्जी नाईक आणि अवघ्या हिंदुस्थानाचे आणि मराठी मनाचे आराध्यदैवत *श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज* असा या पुस्तकाचा प्रवास. शेवटाला अंगावर काटा आला कि समजावं आपण या पुस्तकाच्या प्रेमात पडलोय. रायगडच्या डोंगरदरीत वसलेल्या धनगरवाडीचा सखाराम धनगर आणि त्याच्यासोबत मल्हारी, सर्जा आणि नारायण निघालेत छत्रपती शिवरायांना भेटायला. कारण टकमक टोकावरुन ज्या गद्दारांचा कडेलोट व्हायचा ती प्रेतं येऊन पडायची ती थेट धनगरवाडीच्या आसपासच्या जंगलात आणि त्यामुळे आसपासच्या परीसरात जंगली जनावरांचा सुळसुळाट खुप वाढला होता. त्यांची मेजवानी व्हायची पण जर कधी कडेलोट नसायचा तेव्हा ती हिंस्त्र जनावरं आसपासच्या लोकवस्तीत शिरायची. हिच कैफियत मांडायला सखाराम धनगर आणि इतर मंडळी रायगडी निघतात. त्यानंतरचा त्यांचा प्रवास आणि कथा वाचकाला इतकी गुरफटवुन टाकते कि शेवटच्या पानावरची शेवटची ओळ कधी वाचुन संपते, कळतही नाही. त्यांची स्वराज्यहेर खंडोजीची भेट मग सावित्री, वस्तादकाका, वाचतानाही भितीदायक दिसणारं जंगल, कधीही न पाहीलेलं महादेवाचं मंदीर, खंडोजीचा असणारा ट्विस्ट आणि मग बहिर्जी नाईक आणि मग थेट रायगड आणि महाराज, सगळं प्रत्यक्षात आपल्यासमोर घडतयं कि असा भास निर्माण करणारं असं हे पुस्तक. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी कथा, एकदा वाचली कि पुन्हा एकदा वाचण्याचा मोह आवरता येत नाही अशी कथा, ज्यामध्ये असं बरचं काही जे वाचल्याशिवाय कळणार नाही. अजुन एक असं कि सातासमुद्रापार जगातील अव्वल गणली जाणारी इस्त्राईलची गुप्तहेर संघटना मोसाद यांच्या अभ्यासक्रमात बहिर्जी नाईक आणि आपलं हेरखातं शिकवलं जातं अशी अभिमान वाटणारी घटना आपल्या राज्यात घडलीय त्याचीच हि गोष्ट...बाजिंद... ...इकडे खंडोजीने सावित्रीला उचलुन जंगलातुन बरेच बाहेर आणले होते. पुढे डोंगराची कडेतुट होती आणि हजारो हात खोल फेसाळणार्‍या नदीचे विशाल पात्र...खंडोजीने एकदा मागे पाहीले आणि ताडले कि शिर्क्यांची फौज पाठलाग करत आहे...त्याने कशाचाही विचार न करता सावित्रीसह स्वतःला त्या कडेतुट वरुन त्या विशाल नदीच्या पात्रात झोकुन दिले...आणि... त्यासाठी वाचा *पै.गणेश मानुगडे* लिखीत...*बाजिंद..!!!* © विश्वजीत श्रीपती शिंत्रे. मु.पो.इंचनाळ, ता.गडहिंग्लज,जि.कोल्हापुर ०९९२२३१३९१९ ...Read more