* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: KACHVEL
  • Availability : Available
  • ISBN : 9788177662887
  • Edition : 7
  • Publishing Year : AUGUST 1997
  • Weight : 320.00 gms
  • Pages : 336
  • Language : MARATHI
  • Category : AUTOBIOGRAPHY
  • Available in Combos :ANAND YADAV COMBO SET-33 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
KACHVEL” IS THE SUCCESSOR OF ANAND YADAV`S AUTOBIOGRAPHIES; `ZOMBI`,NANGARANI`, AND `GHARBHINTI`. IN THE RURAL AREAS IT IS A CUSTOM TO MAKE A DESIGN ON THE FLOOR USING THE BROKEN GLASS BANGLES. THIS IS ALWAYS SHAPED IN THE FORM OF A VEIL INDICATING THE COMING GENERATION. EVERY HOUSEWIFE CONSIDERS HERSELF TO BE THE VEIL, HER OFFSPRING BEING THE VARIOUS BUDS AND FLOWERS BLOOMING. SHE DRAWS AS MANY BRANCHES AS HER CHILDREN. MY MOTHER POSSESSED THIS DIVINE FOLK ART, I SAW HER DIVINITY FOR THE FIRST TIME. IN THE COMING YEARS, ALL MY SIBLINGS CRAWLED ON THE VEIL. IN ITS PRESENCE, I COMPLETED MY STUDIES. THE `KACHVEL` WAS ALWAYS THERE FOR MANY YEARS, RESEMBLING A CARPET. THERE ONWARDS, FOR THE PAST 60 YEARS, I HAVE TRIED TO COLLECT AS MANY BROKEN GLASS PIECES AS POSSIBLE. I HAVE PRESERVED ALL THE GLASS PIECES I THOUGHT WORTHY. THEY WERE GIVEN TO ME BY MANY EXPERIENCED AND DEXTEROUS ARTISTS. THEY HAVE MOULDED ME AS A PERSON. AT THE END, I HAVE FELT THAT THIS `KACHVEL` IS A SYMBOL OF MARATHI COMMUNITY AND CULTURE; WITH ME AS A MERE PORTER.
आनंद यादव ह्यांच्या आत्मकथनात्मक लेखनाचा हा अंतिम मनोहरनयनमनोहर टप्पा `झोंबी`, `नांगरणी` आणि `घरभिंती` या आत्मचरित्राच्या तीन खंडांनंतरचा हा चौथा खंड काचवेल. नव्या घरातील सोप्याच्या भुईवर ग्रामीण भागात काचवेल काढण्याची लोकप्रथा आहे. काकणांच्या काचतुकड्यांनी ही वेल रेखली जाते. ही वेल वंशवेलीचंही प्रतीक असते. त्या घराची गृहिणी नकळत स्वतःला वंशवेल मानते. तिची मुलं ही त्या वेलीवरच्या कळ्या, फुलं असतात. जेवढी मुलं, तेवढे तागोरे ती काढते... आईची ही दैवी लोककला मी पहिल्यांदा बघत होतो. यथाकाळ माझी सगळी भावंडं त्या वेलीवर रांगली. मी सोप्यात बसून अभ्यास केला; त्या अभ्यासालाही काचवेलीचा कशिदा मिळाला. पंधरासोळा वर्षे ही वेल तिथं पायघडीसारखी पहुडली. तेव्हापासून मी साठ वर्षांच्या आयुष्यात खूप काचा तुकड्यातुकड्यांनी गोळा केल्या. मला आकर्षक वाटणारे रंगीत तुकडे जपून ठेवले. जागोजागी भेटलेल्या कसबी कासारांनी मला ते प्रेमाने देऊ केले. त्या तुकड्यांनीच माझ्या व्यक्तिमत्त्वाची वेल सिद्ध झाली. अंतिमत: ही काचवेल आणि तिची भूमी ही मराठी समाजाचं आणि संस्कृतीचं प्रतीकही आहे, असं जाणवलं. मी फक्त भारवाही.

No Records Found
No Records Found
Keywords
#झोंबी #(महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार १९८८-८९) #(महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार १९८८-८९) #(दि फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स -उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार १९८९) #(मारवाडी संमेलन पुरस्कार १९९०) # (साहित्य अकादमी पुरस्कार १९९०) #(प्रवरानगर - विखेपाटील पुरस्कार १९९१) #(संजीवनी साहित्य पुरस्कार, कोपरगाव १९९४) # नांगरणी # (रोहमारे ग्रामीण पुरस्कार १९९०) #घरभिंती #काचवेल #माऊली # (कालीमाता साहित्य पुरस्कार १९८६ #परिमल लेखन पुरस्कार १९८६ # नटरंग #(महाराष्ट्र राज्य पुरस्कार १९८२) # गोतावळा # शेवटची लढाई #(राज्य पुरस्कार २००१-०२) #भूमिकन्या #झाडवाटा # उगवती मने #(राज्य पुरस्कार २००२-०३) # आदिताल # डवरणी #माळावरची मैना # घरजावई #खळाळ #उखडलेली झाडं #सैनिक हो, तुमच्यासाठी... #मळ्याची माती #मायलेकरं #साहित्यिकाचा गाव #मातीखालची माती #स्पर्शकमळे #पाणभवरे #साहित्यिक जडण-घडण # ग्रामसंस्कृती #(रा. ना. सबनीस वाङ्मयपुरस्कार २००२) # मराठी लघुनिबंधाचा इतिहास #साहित्याची निर्मिती प्रक्रिया #ग्रामीणता : साहित्य आणि वास्तव आत्मचरित्र मीमांसा #"ग्रामीण साहित्य : स्वरूप व समस्या #(राज्य पुरस्कार १९८३) # मराठी साहित्य - समाज आणि संस्कृती #१९६० नंतरची सामाजिक स्थिती आणिसाहित्यातील नवे प्रवाह # डॉ. आनंद यादव - एक साहित्यिक प्रवास #ZOMBI #NANGARNI #GHARBHINTI #KACHVEL #MAULI #NATRANG #GOTAVALA #SHEVATCHI LADHAI #BHUMIKANYA #ZADVATA #UGVATI MANE #AADITAL #DAVARNI #MALAVARCHI MAINA #GHARJAWAI #KHALAL #UKHADLELI ZADE #SAINIK HO TUMACHYASATHI #MALYACHI MATI #MAI LEKARA #SAHITYIKACHA GAON #MATIKHALCHI MATI #SPARSHKAMALE #PANBHAVARE #SAHITYIK JADAN-GHADAN #GRAMSANSKRUTI #MARATHI LAGHUNIBANDHACHA ITIHAS #SAHITYACHI NIRMITI PRAKRIYA #GRAMINTA SAHITYA ANI VASTAV #AATMACHARITRA MIMANSA #GRAMIN SAHITYA : SWARUP ANI SAMASYA #1960 NANTARCHI SAMAJIK STHITI ANI SAHITYATEEL NAVE PRAVAH #DR. ANAND YADAV EK SAHITYIK PRAVAS
Customer Reviews
  • Rating StarJagannath Garje

    आज डाॅ.आनंद यादव यांच्या आत्मचरित्राचा शेवटचा खंड काचवेल हे पुस्तक वाचून पुर्ण झाले.सुरूवातीला जेव्हा झोंबो वाचली तेव्हा पुढे काय झालं असेल याची खूप उत्सूकता लगली होती.मग मी झपाटल्यासारखा पुढचे भाग नांगरणी,घरभिंती,आणी काचवेल वाचत गेलो.प्रत्येक पुस्तकवाचताना पुढे काय झाल असेल याची ओढ लागत होती.एखादा राग आळवावा तसा लेखक झोंबीपासून काचवेलपर्यंत आपल्या आयुष्याचे प्रसंग आळवीत होते.ह्या कलापूर्ण आळवण्यामूळे हा केवळ त्यांच्या आयुष्यातील नानाप्रकारच्या कडूगोड घटनांचा अहवाल न होता ही एक सुंदर कलाकृती झाली.ललित साहीत्यात घटना केवळ सत्य असून चालत नाही तर सत्य हे कल्पनेहून अदभूत असते हे जरी खरे असले तरी त्यातला अदभूतपणा कीवा त्या घटनेतील नाट्य जाणवायला त्या घटनेच्या कथानाला मिडासाच्या स्पर्शासारखा कलेचा स्पर्श घडवावा लागतो..तो इथे झाला आहे.हे आत्मचरित्र वाचताना सतत कधी स्वस्थ करणारे,कधी अस्वस्थ करणारे,कधी सुखावणारे,कधी खूप दुखवून जाणारे,नानाप्रकारच्या भाववृत्तीचा कल्लोळ उत्पन्न करणारे असे हे आत्मचरित्र म्हणजे एक शब्दशिल्प आहे..... हे चारही भाग जेव्हा मी वाचले तेव्हा खरच मला असे वाटू लागले साने गूरूजींची श्यामची आई वाचताना जी आपल्या मनाची अवस्था होते तसी अवस्था वारंवार होत होती..लेखकाच्या हळव्या मनाची,संवेदनशिल मनाची,समाजाच्याप्रती कृतज्ञता असणा-या मनाची प्रचिती येते. शेवटचा भाग वाचताना सतत जाणवत होते आज लेखक पुणे विद्यापीठात मराठी विभागप्रमुख झाले होते,साहीत्यक्षेत्रात कथा कांदबरी कवितांचा लेखक म्हणून त्यांचे कर्तूत्व गौरवाला पात्र ठललेले आहे..हे सगळे असून सुद्धा ते ज्या मातीत वाढले ज्या समाजात लहानाचे मोठे झाले ,ज्या गावात आयुष्याची झोंबी सुरू झाली त्या सर्वांशी त्यांची नाळ अजूनीही घट्ट होती..ती आंतरिक ओढ अजून कायम होती.. हे पुस्तक वाचताना लेखक ही आता आयुष्याच्या शेवटाकडे झूकलेले आहेत आणि आत्मचरित्राचाही शेवट होत असताना लेखकाच्या मनाची अवस्था खूप हळवी झालेली दिसून येत असतानाच आपल्याही मनाची अवस्था तशीच शुन्यात गेल्यासारखी होते.... आनंद यादव यांचे हे पुस्तक वाचल्याशिवाय त्यांचे आत्मचरित्र वाचल्याचे समाधान होत नाही तेव्हा आपणही नक्की वाचा.... ...Read more

  • Rating StarSaroj Bhattu

    मी ही चारही पुस्तकं वाचली आहेत, दीर्घकाळ स्मरणात राहणारी अशी पुस्तके

  • Rating Star Manisha Dhande

    "काचवेल" हे पुस्तक आनंद यादव यांच्या आत्मचरित्राचा शेवटचा चौथा भाग आहे. पहिल्या तीन भागात (झोंबी, नांगरणी,घरभिंती) यात लेखकाचा अत्यंत गरिबीच्या परिस्थितीतून, कुठलीही शैक्षणिक पार्श्वभूमी नसतांना प्राध्यापक पदापर्यंतचा प्रवास मांडलेला आहे. तर पोटापा्याचा प्रश्न सुटून, आर्थिक स्थैर्य लाभलेल्या, गावाकडच्या आपल्या घरातील माणसांच्या प्रापंचिक जबाबदारीतून मुक्त झालेल्या लेखकाची प्रतिथयश साहित्यिक म्हणून झालेली यशस्वी वाटचाल या पुस्तकात आहे... स्वत: ग्रामीण भागातून आल्यामुळे ग्रामीण भागातील तरुणांना आदर्श साहित्यनिर्मितीची जाणीव व्हावी म्हणून आनंद यादव यांनी ग्रामीण साहित्यिकांचे मेळावे यशस्वीपणे भरविले.असंख्य अडचणींवर मात करून "ग्रामीण साहित्य चळवळ" भारतीय समाजाचा गाभा असलेल्या खेडोपाड्यात यशस्वीरित्या राबविली. पुण्यामुंबई सारख्या ठिकाणी ग्रामीण भागातील तरुणांना पैशाअभावी येणं जमत नसल्याने आनंद यादव यांनी स्वत: महाराष्ट्रभर फिरून छोट्या छोट्या गावात ग्रामीण साहित्य संमेलने आयोजित केली.व ग्रामीण साहित्य चळवळीला व्यापक स्वरूप प्राप्त करून दिले. आता आपण शैक्षणिक बाजारीकरण या विषयावर बरेच वाचतो, ऐकतो पण आनंद यादव यांनी १९७० ते १९८० च्या दशकात शिक्षणविषयक होणाऱ्या बाजारीकरणा बाबतीत परखड मत या पुस्तकात मांडलेले आहे. एका प्रगल्भ साहित्यिकाचा आपल्या साहित्याविषयी असणाऱ्या प्रगल्भ विचारांचा, जाणिवांचा प्रत्यय म्हणजे "काचवेल"..... ...Read more

  • Rating StarDAINIK PUDHARI

    ‘झोंबी, नांगरणी, घरभिंती’ नंतर काचवेल... ‘झोंबी’, ‘नांगरणी’, ‘घरभिंती’ या तिन्ही पुस्तकांनंतर सुप्रसिद्ध लेखक आनंद यादव यांचे ‘काचवेल’ हे आत्मचरित्राचे पुस्तक आले आहे. वेगवेगळ्या पंचवीस लेखांच्या मदतीनं ‘काचवेल’ फुलली आहे. या खंडात मुख्यत: त्यांच्य वाङ्मयीन प्रेरणांचा व लेखनाचा आलेख आहे. त्यांची साहित्यिक जडणघडण, त्यांचं लेखन, वाङ्मयीन चर्चांमधून घडत गेलेलं, पक्कं होत गेलेलं साहित्यजीवन, एक खोल अभ्यासक व उत्तम आस्वादक होण्यासाठी त्यांची स्वत:ची मननचिंतनाची ‘प्रोसेस’ त्यांना जीवनप्रवासात भेटलेले-विशेषत: वाङ्मयीन रूचीतून जवळ आलेले त्यांचे मित्र, गुरू, संपादक, त्यांचा विचारांवरचा, लेखनावरचा प्रभाव याचं नेमक्या शब्दात केलेलं चित्रण ‘काचवेल’मध्ये आहे. ग्रामीण साहित्याच्या चळवळीबद्दलची त्यांची तळमळही काही लेखांतून व्यक्त होते व त्यामागची त्यांची भूमिका स्पष्ट करते. श्री. आनंद यादव यांचं कुटुंब, त्यांची आई, त्यांच्या मनात सदैव जागं असलेलं त्यांचं कागल गाव वगैरे उल्लेख प्रसंगात येतात. ‘आईचे शेवटचे दिवस’, ‘मायगावाचा दिवस’, ‘संसार संसार’, ‘मुलींच्या शिक्षणाची फरपट’मधून कौटुंबिक चित्रण आहे. ग्रामीण साहित्य चळवळीच्या निमित्तानं त्यांनी सगळा ग्रामीण महाराष्ट्र तुडवला आहे. निराशेनं ग्रासलेली तरुण पिढी जवळून पाहिली आहे. ग्रामीण समाजानं शाश्वत स्वरूपाच्या विकासाच्या मार्गानं जाण्यासाठी काय काय सुधारणा त्याला स्वत:ला करायला पाहिजेत त्याबद्दल श्री. आनंद यादव यांची अभ्यासपूर्ण मतं आहेत. तशा परिस्थितीतून ते स्वत: पार पडले आहेत. या वाटचालीचा आलेख आत्मचरित्राच्या रूपानं विस्तृत स्वरूपात नव्या तरुण पिढीसमोर मांडावा या उद्देशानं त्यांनी हे लेखन केलं आहे. श्री. यादव म्हणतात की, ‘आत्मचरित्र हे जीवनभाष्य असतं.’ पण त्यांनी जीवनभाष्य करण्याचं स्वरूप लेखनाला न देता ललित साहित्याच्या अंगानं ‘जीवनदर्शन’ घडवलं आहे. ‘मनात येणाऱ्या भावभावना, विचार आणि एकूणच अस्वस्थ करणारे जीवनातील अनुभव संपूर्ण विश्वासानं आणि निर्वेधपणानं ज्याच्याजवळ सांगावेत असं आयुष्यात एकमेव ठिकाण म्हणजे साहित्य असं मला वाटलं. हे ठिकाण मला मिळालं नसतं तर संवेदनशील आणि जगाची अकारण चिंता वाहणाऱ्या भावनाशील मनाचं आरोग्य बिघडलं असतं.’ अशा शब्दांत त्यांनी साहित्याशी ‘जवळीक’ त्याच्याशी असलेलं नातं व्यक्त केलं आहे. तर अंतर्बाह्य निरोगी राहण्याची देणगी आपल्याला साहित्यानं दिली असं साहित्याचं ऋण ते मानतात. ग्रामीण भागात सोप्याच्या भुईवर ‘काचवेल’ काढण्याची लोकप्रथा आहे. काचेच्या बांगड्यांच्या (काकणांच्या) तुकड्यांनी ही वेल काढली जाते. वंशवेलीचं प्रतीक असणारी ही दैवी लोककला त्यांनी आईच्या हातून रेखलेली पाहिली. वेळावेळी, जागोजागी त्यांना भेटलेल्या कसबी कारागीरांनी त्यांना ते प्रेमानं देऊ केलं. त्यांचे स्वभावगुण, स्वभावरंग बनलेल्या या तुकड्यांनी सजलीय त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देणारी काचवेल! ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more