* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: KACHVEL
  • Availability : Available
  • ISBN : 9788177662887
  • Edition : 7
  • Publishing Year : AUGUST 1997
  • Weight : 320.00 gms
  • Pages : 336
  • Language : MARATHI
  • Category : AUTOBIOGRAPHY
  • Available in Combos :ANAND YADAV COMBO SET-33 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
KACHVEL” IS THE SUCCESSOR OF ANAND YADAV`S AUTOBIOGRAPHIES; `ZOMBI`,NANGARANI`, AND `GHARBHINTI`. IN THE RURAL AREAS IT IS A CUSTOM TO MAKE A DESIGN ON THE FLOOR USING THE BROKEN GLASS BANGLES. THIS IS ALWAYS SHAPED IN THE FORM OF A VEIL INDICATING THE COMING GENERATION. EVERY HOUSEWIFE CONSIDERS HERSELF TO BE THE VEIL, HER OFFSPRING BEING THE VARIOUS BUDS AND FLOWERS BLOOMING. SHE DRAWS AS MANY BRANCHES AS HER CHILDREN. MY MOTHER POSSESSED THIS DIVINE FOLK ART, I SAW HER DIVINITY FOR THE FIRST TIME. IN THE COMING YEARS, ALL MY SIBLINGS CRAWLED ON THE VEIL. IN ITS PRESENCE, I COMPLETED MY STUDIES. THE `KACHVEL` WAS ALWAYS THERE FOR MANY YEARS, RESEMBLING A CARPET. THERE ONWARDS, FOR THE PAST 60 YEARS, I HAVE TRIED TO COLLECT AS MANY BROKEN GLASS PIECES AS POSSIBLE. I HAVE PRESERVED ALL THE GLASS PIECES I THOUGHT WORTHY. THEY WERE GIVEN TO ME BY MANY EXPERIENCED AND DEXTEROUS ARTISTS. THEY HAVE MOULDED ME AS A PERSON. AT THE END, I HAVE FELT THAT THIS `KACHVEL` IS A SYMBOL OF MARATHI COMMUNITY AND CULTURE; WITH ME AS A MERE PORTER.
आनंद यादव ह्यांच्या आत्मकथनात्मक लेखनाचा हा अंतिम मनोहरनयनमनोहर टप्पा `झोंबी`, `नांगरणी` आणि `घरभिंती` या आत्मचरित्राच्या तीन खंडांनंतरचा हा चौथा खंड काचवेल. नव्या घरातील सोप्याच्या भुईवर ग्रामीण भागात काचवेल काढण्याची लोकप्रथा आहे. काकणांच्या काचतुकड्यांनी ही वेल रेखली जाते. ही वेल वंशवेलीचंही प्रतीक असते. त्या घराची गृहिणी नकळत स्वतःला वंशवेल मानते. तिची मुलं ही त्या वेलीवरच्या कळ्या, फुलं असतात. जेवढी मुलं, तेवढे तागोरे ती काढते... आईची ही दैवी लोककला मी पहिल्यांदा बघत होतो. यथाकाळ माझी सगळी भावंडं त्या वेलीवर रांगली. मी सोप्यात बसून अभ्यास केला; त्या अभ्यासालाही काचवेलीचा कशिदा मिळाला. पंधरासोळा वर्षे ही वेल तिथं पायघडीसारखी पहुडली. तेव्हापासून मी साठ वर्षांच्या आयुष्यात खूप काचा तुकड्यातुकड्यांनी गोळा केल्या. मला आकर्षक वाटणारे रंगीत तुकडे जपून ठेवले. जागोजागी भेटलेल्या कसबी कासारांनी मला ते प्रेमाने देऊ केले. त्या तुकड्यांनीच माझ्या व्यक्तिमत्त्वाची वेल सिद्ध झाली. अंतिमत: ही काचवेल आणि तिची भूमी ही मराठी समाजाचं आणि संस्कृतीचं प्रतीकही आहे, असं जाणवलं. मी फक्त भारवाही.

No Records Found
No Records Found
Keywords
#झोंबी #(महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार १९८८-८९) #(महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार १९८८-८९) #(दि फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स -उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार १९८९) #(मारवाडी संमेलन पुरस्कार १९९०) # (साहित्य अकादमी पुरस्कार १९९०) #(प्रवरानगर - विखेपाटील पुरस्कार १९९१) #(संजीवनी साहित्य पुरस्कार, कोपरगाव १९९४) # नांगरणी # (रोहमारे ग्रामीण पुरस्कार १९९०) #घरभिंती #काचवेल #माऊली # (कालीमाता साहित्य पुरस्कार १९८६ #परिमल लेखन पुरस्कार १९८६ # नटरंग #(महाराष्ट्र राज्य पुरस्कार १९८२) # गोतावळा # शेवटची लढाई #(राज्य पुरस्कार २००१-०२) #भूमिकन्या #झाडवाटा # उगवती मने #(राज्य पुरस्कार २००२-०३) # आदिताल # डवरणी #माळावरची मैना # घरजावई #खळाळ #उखडलेली झाडं #सैनिक हो, तुमच्यासाठी... #मळ्याची माती #मायलेकरं #साहित्यिकाचा गाव #मातीखालची माती #स्पर्शकमळे #पाणभवरे #साहित्यिक जडण-घडण # ग्रामसंस्कृती #(रा. ना. सबनीस वाङ्मयपुरस्कार २००२) # मराठी लघुनिबंधाचा इतिहास #साहित्याची निर्मिती प्रक्रिया #ग्रामीणता : साहित्य आणि वास्तव आत्मचरित्र मीमांसा #"ग्रामीण साहित्य : स्वरूप व समस्या #(राज्य पुरस्कार १९८३) # मराठी साहित्य - समाज आणि संस्कृती #१९६० नंतरची सामाजिक स्थिती आणिसाहित्यातील नवे प्रवाह # डॉ. आनंद यादव - एक साहित्यिक प्रवास #ZOMBI #NANGARNI #GHARBHINTI #KACHVEL #MAULI #NATRANG #GOTAVALA #SHEVATCHI LADHAI #BHUMIKANYA #ZADVATA #UGVATI MANE #AADITAL #DAVARNI #MALAVARCHI MAINA #GHARJAWAI #KHALAL #UKHADLELI ZADE #SAINIK HO TUMACHYASATHI #MALYACHI MATI #MAI LEKARA #SAHITYIKACHA GAON #MATIKHALCHI MATI #SPARSHKAMALE #PANBHAVARE #SAHITYIK JADAN-GHADAN #GRAMSANSKRUTI #MARATHI LAGHUNIBANDHACHA ITIHAS #SAHITYACHI NIRMITI PRAKRIYA #GRAMINTA SAHITYA ANI VASTAV #AATMACHARITRA MIMANSA #GRAMIN SAHITYA : SWARUP ANI SAMASYA #1960 NANTARCHI SAMAJIK STHITI ANI SAHITYATEEL NAVE PRAVAH #DR. ANAND YADAV EK SAHITYIK PRAVAS
Customer Reviews
  • Rating StarJagannath Garje

    आज डाॅ.आनंद यादव यांच्या आत्मचरित्राचा शेवटचा खंड काचवेल हे पुस्तक वाचून पुर्ण झाले.सुरूवातीला जेव्हा झोंबो वाचली तेव्हा पुढे काय झालं असेल याची खूप उत्सूकता लगली होती.मग मी झपाटल्यासारखा पुढचे भाग नांगरणी,घरभिंती,आणी काचवेल वाचत गेलो.प्रत्येक पुस्तकवाचताना पुढे काय झाल असेल याची ओढ लागत होती.एखादा राग आळवावा तसा लेखक झोंबीपासून काचवेलपर्यंत आपल्या आयुष्याचे प्रसंग आळवीत होते.ह्या कलापूर्ण आळवण्यामूळे हा केवळ त्यांच्या आयुष्यातील नानाप्रकारच्या कडूगोड घटनांचा अहवाल न होता ही एक सुंदर कलाकृती झाली.ललित साहीत्यात घटना केवळ सत्य असून चालत नाही तर सत्य हे कल्पनेहून अदभूत असते हे जरी खरे असले तरी त्यातला अदभूतपणा कीवा त्या घटनेतील नाट्य जाणवायला त्या घटनेच्या कथानाला मिडासाच्या स्पर्शासारखा कलेचा स्पर्श घडवावा लागतो..तो इथे झाला आहे.हे आत्मचरित्र वाचताना सतत कधी स्वस्थ करणारे,कधी अस्वस्थ करणारे,कधी सुखावणारे,कधी खूप दुखवून जाणारे,नानाप्रकारच्या भाववृत्तीचा कल्लोळ उत्पन्न करणारे असे हे आत्मचरित्र म्हणजे एक शब्दशिल्प आहे..... हे चारही भाग जेव्हा मी वाचले तेव्हा खरच मला असे वाटू लागले साने गूरूजींची श्यामची आई वाचताना जी आपल्या मनाची अवस्था होते तसी अवस्था वारंवार होत होती..लेखकाच्या हळव्या मनाची,संवेदनशिल मनाची,समाजाच्याप्रती कृतज्ञता असणा-या मनाची प्रचिती येते. शेवटचा भाग वाचताना सतत जाणवत होते आज लेखक पुणे विद्यापीठात मराठी विभागप्रमुख झाले होते,साहीत्यक्षेत्रात कथा कांदबरी कवितांचा लेखक म्हणून त्यांचे कर्तूत्व गौरवाला पात्र ठललेले आहे..हे सगळे असून सुद्धा ते ज्या मातीत वाढले ज्या समाजात लहानाचे मोठे झाले ,ज्या गावात आयुष्याची झोंबी सुरू झाली त्या सर्वांशी त्यांची नाळ अजूनीही घट्ट होती..ती आंतरिक ओढ अजून कायम होती.. हे पुस्तक वाचताना लेखक ही आता आयुष्याच्या शेवटाकडे झूकलेले आहेत आणि आत्मचरित्राचाही शेवट होत असताना लेखकाच्या मनाची अवस्था खूप हळवी झालेली दिसून येत असतानाच आपल्याही मनाची अवस्था तशीच शुन्यात गेल्यासारखी होते.... आनंद यादव यांचे हे पुस्तक वाचल्याशिवाय त्यांचे आत्मचरित्र वाचल्याचे समाधान होत नाही तेव्हा आपणही नक्की वाचा.... ...Read more

  • Rating StarSaroj Bhattu

    मी ही चारही पुस्तकं वाचली आहेत, दीर्घकाळ स्मरणात राहणारी अशी पुस्तके

  • Rating Star Manisha Dhande

    "काचवेल" हे पुस्तक आनंद यादव यांच्या आत्मचरित्राचा शेवटचा चौथा भाग आहे. पहिल्या तीन भागात (झोंबी, नांगरणी,घरभिंती) यात लेखकाचा अत्यंत गरिबीच्या परिस्थितीतून, कुठलीही शैक्षणिक पार्श्वभूमी नसतांना प्राध्यापक पदापर्यंतचा प्रवास मांडलेला आहे. तर पोटापा्याचा प्रश्न सुटून, आर्थिक स्थैर्य लाभलेल्या, गावाकडच्या आपल्या घरातील माणसांच्या प्रापंचिक जबाबदारीतून मुक्त झालेल्या लेखकाची प्रतिथयश साहित्यिक म्हणून झालेली यशस्वी वाटचाल या पुस्तकात आहे... स्वत: ग्रामीण भागातून आल्यामुळे ग्रामीण भागातील तरुणांना आदर्श साहित्यनिर्मितीची जाणीव व्हावी म्हणून आनंद यादव यांनी ग्रामीण साहित्यिकांचे मेळावे यशस्वीपणे भरविले.असंख्य अडचणींवर मात करून "ग्रामीण साहित्य चळवळ" भारतीय समाजाचा गाभा असलेल्या खेडोपाड्यात यशस्वीरित्या राबविली. पुण्यामुंबई सारख्या ठिकाणी ग्रामीण भागातील तरुणांना पैशाअभावी येणं जमत नसल्याने आनंद यादव यांनी स्वत: महाराष्ट्रभर फिरून छोट्या छोट्या गावात ग्रामीण साहित्य संमेलने आयोजित केली.व ग्रामीण साहित्य चळवळीला व्यापक स्वरूप प्राप्त करून दिले. आता आपण शैक्षणिक बाजारीकरण या विषयावर बरेच वाचतो, ऐकतो पण आनंद यादव यांनी १९७० ते १९८० च्या दशकात शिक्षणविषयक होणाऱ्या बाजारीकरणा बाबतीत परखड मत या पुस्तकात मांडलेले आहे. एका प्रगल्भ साहित्यिकाचा आपल्या साहित्याविषयी असणाऱ्या प्रगल्भ विचारांचा, जाणिवांचा प्रत्यय म्हणजे "काचवेल"..... ...Read more

  • Rating StarDAINIK PUDHARI

    ‘झोंबी, नांगरणी, घरभिंती’ नंतर काचवेल... ‘झोंबी’, ‘नांगरणी’, ‘घरभिंती’ या तिन्ही पुस्तकांनंतर सुप्रसिद्ध लेखक आनंद यादव यांचे ‘काचवेल’ हे आत्मचरित्राचे पुस्तक आले आहे. वेगवेगळ्या पंचवीस लेखांच्या मदतीनं ‘काचवेल’ फुलली आहे. या खंडात मुख्यत: त्यांच्य वाङ्मयीन प्रेरणांचा व लेखनाचा आलेख आहे. त्यांची साहित्यिक जडणघडण, त्यांचं लेखन, वाङ्मयीन चर्चांमधून घडत गेलेलं, पक्कं होत गेलेलं साहित्यजीवन, एक खोल अभ्यासक व उत्तम आस्वादक होण्यासाठी त्यांची स्वत:ची मननचिंतनाची ‘प्रोसेस’ त्यांना जीवनप्रवासात भेटलेले-विशेषत: वाङ्मयीन रूचीतून जवळ आलेले त्यांचे मित्र, गुरू, संपादक, त्यांचा विचारांवरचा, लेखनावरचा प्रभाव याचं नेमक्या शब्दात केलेलं चित्रण ‘काचवेल’मध्ये आहे. ग्रामीण साहित्याच्या चळवळीबद्दलची त्यांची तळमळही काही लेखांतून व्यक्त होते व त्यामागची त्यांची भूमिका स्पष्ट करते. श्री. आनंद यादव यांचं कुटुंब, त्यांची आई, त्यांच्या मनात सदैव जागं असलेलं त्यांचं कागल गाव वगैरे उल्लेख प्रसंगात येतात. ‘आईचे शेवटचे दिवस’, ‘मायगावाचा दिवस’, ‘संसार संसार’, ‘मुलींच्या शिक्षणाची फरपट’मधून कौटुंबिक चित्रण आहे. ग्रामीण साहित्य चळवळीच्या निमित्तानं त्यांनी सगळा ग्रामीण महाराष्ट्र तुडवला आहे. निराशेनं ग्रासलेली तरुण पिढी जवळून पाहिली आहे. ग्रामीण समाजानं शाश्वत स्वरूपाच्या विकासाच्या मार्गानं जाण्यासाठी काय काय सुधारणा त्याला स्वत:ला करायला पाहिजेत त्याबद्दल श्री. आनंद यादव यांची अभ्यासपूर्ण मतं आहेत. तशा परिस्थितीतून ते स्वत: पार पडले आहेत. या वाटचालीचा आलेख आत्मचरित्राच्या रूपानं विस्तृत स्वरूपात नव्या तरुण पिढीसमोर मांडावा या उद्देशानं त्यांनी हे लेखन केलं आहे. श्री. यादव म्हणतात की, ‘आत्मचरित्र हे जीवनभाष्य असतं.’ पण त्यांनी जीवनभाष्य करण्याचं स्वरूप लेखनाला न देता ललित साहित्याच्या अंगानं ‘जीवनदर्शन’ घडवलं आहे. ‘मनात येणाऱ्या भावभावना, विचार आणि एकूणच अस्वस्थ करणारे जीवनातील अनुभव संपूर्ण विश्वासानं आणि निर्वेधपणानं ज्याच्याजवळ सांगावेत असं आयुष्यात एकमेव ठिकाण म्हणजे साहित्य असं मला वाटलं. हे ठिकाण मला मिळालं नसतं तर संवेदनशील आणि जगाची अकारण चिंता वाहणाऱ्या भावनाशील मनाचं आरोग्य बिघडलं असतं.’ अशा शब्दांत त्यांनी साहित्याशी ‘जवळीक’ त्याच्याशी असलेलं नातं व्यक्त केलं आहे. तर अंतर्बाह्य निरोगी राहण्याची देणगी आपल्याला साहित्यानं दिली असं साहित्याचं ऋण ते मानतात. ग्रामीण भागात सोप्याच्या भुईवर ‘काचवेल’ काढण्याची लोकप्रथा आहे. काचेच्या बांगड्यांच्या (काकणांच्या) तुकड्यांनी ही वेल काढली जाते. वंशवेलीचं प्रतीक असणारी ही दैवी लोककला त्यांनी आईच्या हातून रेखलेली पाहिली. वेळावेळी, जागोजागी त्यांना भेटलेल्या कसबी कारागीरांनी त्यांना ते प्रेमानं देऊ केलं. त्यांचे स्वभावगुण, स्वभावरंग बनलेल्या या तुकड्यांनी सजलीय त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देणारी काचवेल! ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

ANUWADATUN ANUSARJANAKADE
ANUWADATUN ANUSARJANAKADE by LEENA SOHONI Rating Star
कौशिक लेले

पुस्तक – अनुवादातून अनुसर्जनाकडे (Anuwadatun Anusarjanakade) लेखिका – लीना सोहोनी (Leena Sohoni) भाषा – मराठी पाने – २३९ प्रकाशन – मेहता पब्लिशिंग हाऊस. फेब २०२४ छापील किंमत – रु. ३७०/- ISBN – 9789357205337 ह्या परिचयाची माझी वेबसाईट लिंक htps://learnmarathiwithkaushik.com/courses/anuwadatun-anusarjanakade/ मराठी पुस्तकांमध्ये सध्या इतर भाषांतून अनुवादित झालेली पुस्तके सुद्धा मोठ्या संख्येने दिसतात. एखादा सरस अनुवाद वाचताना आपल्या डोक्यात सुद्धा आपल्या आवडीच्या परभाषेतल्या पुस्तकांची यादी तयार होते. ही पुस्तकं सुद्धा मराठीत आली तर काय मजा येईल असं वाटतं. भाषा हा ज्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे त्यांची इच्छा एक पुढचं पाऊल टाकेल. आपणही स्वतः असा अनुवाद केला तर ? आपल्यालाही दोन्ही भाषा चांगल्या येत आहेत मग अनुवाद का करू नये ? हे पिल्लू डोक्यात शिरेलच. असा अनुवाद करायचा स्वतः काही प्रयत्न केला की लक्षात येईल की हे किती किचकट काम आहे. चांगला अनुवाद करायचा असेल तर सराव लागेल. अभ्यास लागेल. त्याची काही तंत्र मंत्र शिकून घ्यावी लागतील. एखाद्या चांगल्या जाणकार व्यक्तीचं, अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शनही मिळायला हवं. जर तुमच्याही मनात अशा भावना आल्या असतील तर लीना सोहोनी यांचं “अनुवादाकडून अनुसर्जनाकडे” हे पुस्तक तुम्हाला नक्की आवडेल. लीना सोहोनी हे नाव मराठीत अनुवादिका म्हणून प्रसिद्ध आहे. आत्तापर्यंत त्यांनी अनुवाद केलेली पन्नासच्यावर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचा अनुभव व अधिकार वेगळा सांगायला नको. त्यांचे हे पुस्तक "अनुवादातून अनुसर्जनाकडे" पुस्तकाचा पहिला भागात लीना सोनी यांनी आपल्या अनुवादाच्या प्रवासाचं सिंहावलोकन केलं आहे. त्यांनी अनुवादाची सुरुवात कशी केली, त्यात प्रगती कशी झाली हे लिहिलं आहे. अनुवादामुळे प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर, सुधा मूर्ती, किरण बेदी यांच्याशी जुळलेले संबंध आणि त्यांच्या भेटीची वर्णनं आहेत. ह्या प्रवासात “मेहता पब्लिशिंग हाऊस” या प्रकाशन संस्थेचा भरभक्कम पाठिंबा त्यांना मिळाला. सुनील मेहता आणि अनिल मेहता यांच्याबरोबरच्या आठवणी सुद्धा पुस्तकात आहेत. पुढच्या भागात अनुवाद या विषयाची एखाद्या शास्त्रीय शोधनिबंधाप्रमाणे माहिती दिलेली आहे. यात अनुवाद प्रक्रियेकडे अतिशय बारकाईने बघितलं आहे. ढोबळमानाने बघितलं तर, अनुवाद म्हणजे तर एका भाषेतल्या शब्दांच्या ऐवजी दुसऱ्या भाषेतले शब्द वापरणे. पण प्रत्येक वेळी एका शब्दाच्या बदल्यात दुसरा भाषेतला एक शब्द असं होतंच असं नाही. त्यामुळे काही वेळा शब्दाची फोड करून दाखवावी लागते. तर काही वेळा मूळ मोठं वाक्य लहान होऊ शकतं. कदाचित तिथे पूर्णपणे वेगळीच शब्दयोजना वाक्यरचना होऊ शकते. या प्रत्येक प्रकाराला एक विशिष्ट शास्त्रीय नाव (पारिभाषिक संज्ञा) आहे हे आपल्याला पुस्तक वाचून कळतं. जे शब्दांच्या बाबतीत तेच वाक्यांच्या बाबतीत. मूळ भाषेतल्या शब्दांसाठी नवीन शब्द वापरून वाक्य तयार झालं तरी ते वाचकाला सहज वाटलं पाहिजे. नाहीतर आपण लगेच म्हणू, “अनुवाद खूप बोजड झाला आहे; ठोकळेबाज झाला आहे”. हे टाळायचं तर वाक्यरचना सुद्धा सुधारायला पाहिजे. याची उदाहरणे पुस्तकात दिली आहेत आणि त्या अनुषंगाने पारिभाषिक संज्ञा (terminology) काय आहे हे मराठी आणि इंग्रजी दोन्हीत दिलं आहे. शब्द, वाक्य ह्यांना लावलेल्या कसोटीचा विस्तार करून ती कसोटी “संकल्पनां”ना लावायला पाहिजे. एखाद्या भाषेत, एखाद्या समाजात असणाऱ्या संकल्पना, प्रथा-परंपरा मराठी भाषेत नसतील तर अनुवाद करताना ते जसंच्या तसं ठेवायचं का तिथे काही वेगळी संकल्पना वापरायची ? का तळ टीप देऊन स्पष्टीकरण द्यायचं? असे एकाच गोष्टीकडे बघण्याचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. हा मुद्दा आपण सोदाहरण स्पष्ट केला आहे. हा ऊहापोह वाचल्यासार अनुवादासाठी दोन्ही भाषांवर आपली किती चांगली पकड पाहिजे हे वाचकाच्या लक्षात येईल. त्याचबरोबर जे पुस्तक आपण वाचतोय त्याची पार्श्वभूमी, त्यातल्या प्रसंगाची सामाजिक पार्श्वभूमी, आणि लेखकाला काय ध्वनीत करायचे आहे हे सगळं समजणं सुद्धा किती महत्त्वाचं हे लक्षात येईल. म्हणजे अनुवाद प्रक्रिया दिसताना शब्दांची दिसली तरी “शब्दांच्या पलीकडले” अनुवादकाला पकडता आले तरच मूळ कृतीला न्याय मिळेल. हे या पुस्तकाच्या वाचनातून अधोरेखित होतं. पुस्तकाचा प्रकारानुसार अनुवादकासमोर असणारी आव्हाने सुद्धा बदलतात. कथा-कादंबरीचा अनुवाद वेगळा तर कवितेचा अनुवाद वेगळा. कारण कवितेमध्ये भावभावनांना महत्त्व आहे तितकेच महत्त्व शब्द, लय, शब्दचमत्कृती यांनाही आहे. म्हणूनच तर ते पद्य आहे गद्य नाही. लीनाजींनी ह्याचाही परामर्श घेतला आहे. नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने अजून वेगळी. परिणामकारक संवाद, नेपथ्य, पात्रांची देहबोली, त्याचा प्रेक्षकांवर होणारा परिणाम या सगळ्याचा विचार करून अनुवाद करावा लागतो. म्हणूनच, अनुवाद म्हणजे प्रत्येक वेळी “शंभर टक्के पुस्तक जसेच्या तसे” असं नसतं. तर काही वेळा ते रूपांतर ठरतं. काही वेळा तो स्वैर अनुवाद ठरतो. तर काही वेळा मूळ कलाकृतीवर आधारित नवीन कलाकृती ठरते. हे सुद्धा कितीतरी उदाहरणे देऊन स्पष्ट केले आहे. हे सगळे मुद्दे एकमेकांशी निगडित आहेत त्यामुळे पुस्तकात बऱ्याच वेळा मुद्द्यांची पुनरावृत्ती झाली आहे असं मला वाटलं. ती पुनरुक्ती टाळून कदाचित थोडी पानं कमी करता आली असती. पण मुद्दा वाचकाच्या मनावर ठसावा, कुठलंही विशिष्ट प्रकरण वाचायला घेतले तरी ते त्या मुद्द्यापुरतं पूर्ण असावं हा त्यामागचा हेतू असेल. पुस्तकात पुढे अनुवादकांना नोकरी, व्यवसायाच्या काय संधी आहेत; कुठल्या संस्था याबद्दलचं शिक्षण देतात; कुठले कोर्सेस उपलब्ध आहेत याबद्दलचा तपशील आहे. अनुवाद करायला सुरुवात करायची असेल तर मजकूरनिवड, प्रकाशकांशी संपर्क, परवानगी ह्याचे मार्गदर्शन आहे. त्यांनतर शाळेत आपण जे प्राथमिक व्याकरण शिकतो; म्हणजे कर्ता, कर्म, क्रियापद, ॲक्टिव-पॅसिव्ह व्हॉइस, वेगवेगळे काळ इत्यादींच्या व्याख्या देऊन सगळ्याची उजळणी केली आहे. ज्याला अनुवाद क्षेत्रात उतरायचे आहे त्याला व्याकरणाचा अजून बराच अभ्यास करावा लागणारच आहे. आणि पुस्तकाचा उद्देश व्याकरण शिकवणं नाही तर अनुवादकासाठी व्याकरण अत्यावश्यक आहे हे ठसवणं आहे. त्यामुळे व्याकरणाचा भाग पुस्तकात नसता तरी चालला असता असं मला वाटलं. पुस्तकातील काही पाने वर दिलेल्या लिंकवर शेअर केली आहेत. म्हणजे तुम्हाला पुस्तकाची, लेखनशैलीची अजून चांगली कल्पना येईल. त्यात पुढील मुद्द्यांबद्दलची पाने आहेत १) अनुवादिका म्हणून येणारे कटुगोड अनुभव. २) प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर ह्यांच्या पुस्तकांचा मराठी अनुवाद लीनाजींनी केला आहे. त्यातून जेफ्री आर्चर ह्यांच्याशी भेटीगाठी झाल्या त्यातला एक प्रसंग. ३) अनुवादाचे वर्गीकरण/प्रकार सांगणाऱ्या प्रकरणातली दोन पाने. अनुवाद प्रक्रियेची किती बारकाईने तांत्रिक चिकित्सा केली आहे हे लक्षात येईल. ४) नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने ह्याबद्दलच्या प्रकरणातली दोन पाने. लीना सोहोनींचे आत्मकथन असणारा पुस्तकाचा पहिला भाग सर्व वाचकांना वाचायला आवडेलच. पुस्तकाचा दुसरा भाग तांत्रिक आहे. तो सर्वसामान्य वाचकाला वाचायला आवडेलच असं नाही. पण तो वाचल्यावर अनुवादक म्हणून काम करताना किती कटकटी असतात, काय व्यवधानं सांभाळावी लागतात हे वाचकाच्या लक्षात येईल. त्यातून अनुवादकांकडे व त्यांच्या कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन अजून कौतुकाचा आणि कृतज्ञतेचा होईल हे निश्चित. ज्यांना अनुवाद करायचा आहे, या क्षेत्रात शिरायचं आहे किंवा तशी उमेदवारी सुरू झाली आहे त्यांना हा भाग मार्गदर्शक ठरेल. जाण वाढवेल हे नक्की. त्यामुळे या पुस्तकाच्या वाचनातून अनुवादाचा किडा काही वाचकांच्या डोक्यात गेला आणि त्यातून नवे अनुवादक मराठीत निर्माण झाले तर ते सोन्याहून पिवळे ! मराठीत कथा,कादंबऱ्या, चरित्र, सामाजिक विषयांची चर्चा ह्या पद्धतीचे लेखन भरपूर होत असतं. पण ह्या पुस्तकाप्रमाणे शास्त्रीय/तांत्रिक चिकित्सा करणारी, गंभीरपणे शिकवणारी पुस्तकं कमी दिसतात. ती प्रकाशित झाली तरी ती क्रमिक पाठ्यपुस्तक किंवा “अभ्यासाचे पुस्तक” या प्रकारात ढकलली जातात आणि दुर्लक्षित होतात. पण या पुस्तकाच्या लेखिका आणि प्रकाशक यांनी हे पुस्तक मुख्यधारेतल्या पुस्तकाप्रमाणे सादर केलं आहे. त्यातून हे पुस्तक जास्त वाचलं जाईल; जास्त लोकांना विचार प्रवृत्त करेल असं मला वाटतं. अशा प्रकारची पुस्तकं मराठीत प्रकाशित होणे हे मराठी भाषेला ज्ञानभाषा करण्यासाठी मोठे योगदान आहे. त्याबद्दल प्रकाशक आणि लेखिका दोघांचेही एक मराठी भाषा प्रेमी म्हणून मी मनापासून आभार मानतो. —————————— मी दिलेली पुस्तक श्रेणी —————————— अनुवाद करणारे असाल किंवा करायची इच्छा असेल तर आवा ( आवर्जून वाचा ) इतरांनी जवा ( जमल्यास वाचा ) ——————————— आवा ( आवर्जून वाचा ) जवा ( जमल्यास वाचा ) वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक ) नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक ) ...Read more

OMKARACHI REKH JANA
OMKARACHI REKH JANA by MANJUSHRI GOKHALE Rating Star
सौ. जस्मिन जोगळेकर

आमच्या पुस्तकप्रेमी समुहावरचा एकही दिवसाचा खंड न पडता सलग 1730 वा पुस्तक परिचय पुस्तक प्रेमी समूह,पुस्तक परिचय अभियान: एकही दिवस खंड पडू न देता पुस्तकांचा परिचय हे पुस्तकप्रेमी समूहाचे यश ! पुस्तक सत्र:- ३ सप्ताह क्रमांक:- २४८ पुस्तक क्रमांक: १७३० दिनांक: १०/०३/२०२५ पुस्तकाचे नांव:- ओंकाराची रेख जना लेखक:- मंजुश्री गोखले पहिली आवृत्ती: फेब्रुवारी २०१२ पृष्ठ संख्या : ३०८ मूल्य: रु. ३२० प्रकाशन: मेहता पब्लिशिंग हाऊस परिचयकर्ती: सौ. जस्मिन जोगळेकर एखाद्या गोष्टीसाठी वेळ यावी लागते म्हणतात, तसं काहीसं झालं माझं. खरंतर पुस्तक वाचनाच्या बाबतीत असं व्हायला नको होतं पण झालं. `हे खूप सुंदर पुस्तक आहे, तुम्ही वाचाच` म्हणून एक पुस्तक आमच्या हाती आलं. अर्थात ज्यांनी सांगितलं त्यांनी त्यांच्या संग्रहातलं पुस्तक दिलं होतं. तसं बरेच दिवस होतं आमच्याकडे. नवऱ्याने वाचून खूपच सुंदर आहे, वाच नक्की सांगितलं देखील मला. पण पुस्तक परत द्यायची वेळ आली तरी वाचलं गेलं नाही. तरी ते नाव डोक्यात फिट बसलं होतं. अखेर एक दिवस ते एकच पुस्तक नव्हे तर त्याच लेखिकेची चार पुस्तकं विकतच घेऊन आले आणि मग ती वेळ आली…. त्या पुस्तकाच्या, पुस्तकातील भाषेच्या आणि त्या लेखिकेच्या प्रेमात पडण्याची. पुस्तक होतं…मंजुश्री गोखले यांनी संत जनाबाईंवर लिहिलेलं `ओंकाराची रेख जना`. `विठू माझा लेकुरवाळा`, `धरिला पंढरीचा चोर` अशा अभंग रचनेतून जनाबाई आपल्या ओळखीच्या आहेत. किंवा विठूराया त्यांना हर कामात मदत करत असतो वगैरे माहीत आहे. पण त्यांचं संपूर्ण चरित्र सगळ्यांना माहीत असेलच असं नाही. ते माहीत करून देण्याचं सुरेख काम या कादंबरीने केलं आहे. जनाबाईंच्या जन्मापूर्वीची आणि नंतरचीही त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती, छोट्या जनाला मागे ठेऊन दुखण्याने तिला सोडून गेलेली तिची आई, त्यानंतरची बिकट वेळ याचं वर्णन वाचताना डोळ्यातलं पाणी थांबत नाही. पुढेही काही प्रसंग असे आहेत…भागाबाईचं वागणं असेल किंवा सुळावर चढवायचा प्रसंग असेल… डोळ्यात पाणी येतच राहतं. पण एवढं होऊनही त्यांची पंढरीरायावरची भक्ती मात्र गाढ होती. जनाईसुध्दा त्याला पाहायला आतुर होती. सोसले चटके l पोटी नाही घास l विठ्ठलाची आस l जनाईला ll भेटीसाठी त्याच्या l गोळा तनमन l धाडे आवतान l विठूराया ll अखेर विठुरायाकडून आमंत्रण आल्यावर बापलेक पंढरीची वाट चालू लागतात. काळया देवाला पाहायला आसुसलेली जना आणि लेकीला कायमचं परक्या घरी सोडून यायचं या विचाराने जडावलेला दमा… नशिबाची रेख l भिवरेच्या काठी l विठूराया ओढी l जनाईची ll दोघांचा प्रवास विठ्ठलाच्या विश्वासावर सुरू होतो. पुढं जनाईला दामाशेटींच्या घरी सोडून देणं, त्या घराने जनाला आपलंच म्हणणं, नामदेवांसोबत तिचं मोठं होणं अशा कितीतरी प्रसंगांनी सुखावून जायला होतं. तेव्हाची सामाजिक परिस्थिती, जनाचं अतिशूद्र असणं आणि त्यातून स्त्री असणं…त्यासाठी तिला झेलावे लागणारे त्रास, संत म्हणून मोठेपण मिळाल्यावरही त्यांच्यावर आलेला चोरीचा आळ… त्रास होतो वाचताना. जनाची आणि विठ्ठलाची पहिली भेट आणि तिथून त्यांच्यात दृढ होत जाणारे नाते…वाचताना शहारून जायला होतं. जना ते संत जनाबाई हा प्रवास, त्यात जनाबाईंनी रचलेले अभंग, ज्ञानदेवादि भावंडांचा सहवास आणि मुख्य म्हणजे नामदेव आणि जनाबाई यांचे नाते… गुरू शिष्य ऐसी l जोडी कौतुकाची l जनी नामयाची l संतांमधे ll याबद्दल पुस्तकात आलेले उल्लेख मन लावून वाचण्यासारखे आहेत. विठ्ठलाच्या चरणी झालेला जनाबाईंच्या जीवनाचा शेवट म्हणजे तर 🙏 वृंदा कोमेजली l स्तब्ध वारा पाणी l ओघळले मणी l मंजिऱ्यांचे ll थरारली वीट l कंप राऊळाला l श्वास ओलावला l क्षणभर ll आज नाही घाई l विठोबाला काही l जनाईच येई l चरणाशी ll शांता शेळके यांनी अनुवाद केलेलं `चौघीजणी` जसं मनात कायमचं घर करुन बसलं आहे, त्या जोडीला आता `ओंकाराची रेख जना` हे ही अत्यंत आवडीचं झालं आहे. यापूर्वी संत साहित्य किंवा संतांवर लिहिलेलं साहित्य फारसं वाचलं नव्हतं. लताजी किंवा भीमसेनजींमुळे घराघरात पोहोचलेले अभंग तेवढे माहीत होते. त्यामुळं जनाबाईंवर लिहिलेल्या या पुस्तकाबाबत उत्सुकता होतीच. पहिल्या प्रकरणाच्या अगदी पहिल्या ओळीपासून या पुस्तकाशी जी बांधली गेले ते शेवटपर्यंत. पुस्तकातील सगळं वर्णन अगदी बारीक सारीक तपशील देऊन पुढं जात राहतं आणि त्यात आपल्याला गुंतवून ठेवतं. सुरुवातीची काही प्रकरणं तर डोळ्यात अश्रुंच्या धारा घेऊन, पुसट अक्षरं समोर ठेऊन वाचावी लागतात. प्रसंग सगळे l तपशिलासवे l डोळ्यात आसवे l वाचुनिया ll भाषा ही साजिरी l सत्य हेच वाटे l प्रसंग तो घडे l आसपास ll एकूणच पुस्तकातलं वर्णन इतकं जिवंत आहे की सगळे प्रसंग आपल्या आसपास घडताहेत असंच वाटत राहतं कायम. दमा - कुरुंडचं दुर्दैवी आयुष्य, पोटी मूल नसल्याचं त्यांचं दुःख, विठ्ठलाला त्यासाठी साकडं घालण्यासाठी त्यांनी केलेला पंढरपूरचा प्रवास असो किंवा जनाबाईंच्या खोलीत येऊन विठ्ठलाने त्यांच्याशी मारलेल्या गप्पा, त्यांना कामात केलेली मदत…. सगळे अगदी सगळे प्रसंग आपणच जगतोय असं वाटावेत इतके मनाला भिडून जातात. काही ठिकाणं तर अशी… `अरे विठ्ठला, गडबडीत भलतंच काय उचलतोस. तुझा रत्नहार आणि शेला तर घेऊन जा`...असं आपणच विठ्ठलाला हाक मारून सांगावं असं वाटायला लागतं वाचताना. भाषा, वर्णनशैली फार साजिरी आहे. पुस्तकातला `साजिरी` हा शब्द एकदम आवडून गेलाय. एखादा चेहरा पाहिल्यावर कसं आपल्याला कळून जातं ना की, ही व्यक्ती मायाळू आहे किंवा तुसडी आहे वगैरे…तसं पुस्तकाच्या सुरुवातीलाच यातल्या भाषेबद्दल आपुलकी, प्रेम वाटायला लागतं. भाषा साधी पण सुंदर, शब्दांचा वापर असा की यापेक्षा वेगळा शब्द इथं शोभला नसता असं वाटायला लागेल असा. अनवाणी पायाला चटके बसावेत इतकं हवामान अजून बदललं नव्हतं…यासाठी `अजून मातीने माया सोडली नव्हती`... किती सुरेख वाक्य आहे ना! अशी कितीतरी वाक्य आपल्याला त्यांच्या प्रेमात पाडायला लावणारी यात सापडतील. एकूणच सांगायचं झालं तर पुस्तक अप्रतिम आणि सगळ्यांनी आवर्जून वाचावं असंच आहे. एकाच लेखकाची पुस्तकं सलग एका मागोमाग एक अशी माझ्याकडून वाचली जात नाहीत. पण आता खुणावतंय ते… `जोहार मायबाप जोहार`. ...Read more