* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: BHUMIKANYA
  • Availability : Notify Me
     
  • ISBN : 9788177660456
  • Edition : 5
  • Publishing Year : JANUARY 2001
  • Weight : 140.00 gms
  • Pages : 144
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :ANAND YADAV COMBO SET-33 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE STORIES IN THIS BOOK ARE ALL OF A COMMON WOMAN WHOM WE SEE OFTEN EVERYWHERE. THESE STORIES REVEAL THE TRUTH ABOUT HER, THE FACTS WHICH ARE SURPRISINGLY INTENSE, YET THESE STORIES ARE VERY MEANINGFUL AND ARTISTIC. A GIRL CHILD IS A BURDEN EVEN BEFORE SHE IS BORN. SHE IS EXPLOITED AT ALL THE MODES OF LIFE. NO ONE SEEMS TO CELEBRATE HER BIRTH, ON THE CONTRARY, EVERY SINGLE BRICK IN THE HOUSE MOURNS ON HER BIRTH. THIS ESPECIALLY, WORRIES THE MOTHER OF SUCH CHILD. IN A LIFESTYLE, WHERE SCARCITY IS IN AMPLE, THEN ALL THE WOMEN MEMBERS OF THE FAMILY FROM THE OLDEST TO THE YOUNGEST HAVE TO FACE THE INSUFFICIENCY, THE SCARCITY, AND THE PSYCHOLOGICAL AND PHYSICAL TORTURE IT BRINGS WITH IT. THE SOCIETY TREATS THE MALE GENDER AND THE FEMALE GENDER DIFFERENTLY. UNDER NO CIRCUMSTANCES, THE WOMAN CAN BE THE ONE TO CARRY THE NAME OF HER HEREDITY. RICH OR POOR, A WOMAN IS ALWAYS AN OUTSIDER IN HER HOUSE, IN HER FAMILY, AT HER INLAWS PLACE, IN HER PARENTS HOUSE. SHE IS TREATED AS A SERVANT, AS A SLAVE EITHER DIRECTLY OR INDIRECTLY. NOBODY BELIEVES THAT SHE HAS HER CLASS, CASTE, OPINION, MIND, ETC. SHE IS ALWAYS CONSIDERED AS A DOWNTRODDEN, SHE IS ALWAYS IGNORED. THE SOCIETY TAKES A PRIDE IN USING HER FOR ITS VARIOUS DESIRES. SHE IS USED TO SATISFY THE LUST. SHE IS USED FOR GETTING WORK DONE. SHE IS USED FOR RAISING THE FAMILY. THE SOCIETY STANDS ON HER EFFORTS. WHILE DOING SO, THE SOCIETY DECORATES HER WITH DIFFERENT ORNAMENTS UNDER THE NAME OF VICE, VIRTUE, HOLY, SINFUL, LAWFUL, AND UNLAWFUL. THE STORIES HERE ARE A RESULT OF ALL THE FEELINGS AND CONCERN FOR A WOMAN WHO IS NATURALLY A PREY TO ALL THIS.THESE STORIES SHADE LIGHT ON THE DRAMA, PITY, STRUGGLE, POETRY, INJUSTICE, NEGLIGENCE, TORTURE, PAIN, TROUBLE, EXPLOITATION, ETC. WE COME ACROSS THE IMAGES WHICH ARE FULL OF FEELINGS, THE DIALOGUES WHICH ARE VERY MEANINGFUL, THE VARIOUS ASPECTS OF THE LANGUAGE, THE DIFFERENT ANGLES OF NARRATION, THE PERFECT SEQUENCING OF THE WORDS, ETC. ALL THESE ASPECTS MAKE THE STORIES VERY LIVELY AND TRUE. THEY AFFECT THE READER WITH THE TRUTHFULNESS. THEY IMPRESS THE MINDS DEEPLY. ALL THESE STORIES REPRESENT THE PAIN OF A FEMALE MIND AS NEVER BEFORE.
ह्या कथा जनसामान्य स्तरातील स्त्रीचे सर्वांगीण दर्शन घडविणाऱ्या, वास्तवाचे प्रखर भान असलेल्या, आशयसमृद्ध आणि कलासंपन्न स्वरूपाच्या आहेत. भूमिकन्यांचे शोषण त्यांच्या जन्मापासूनच सुरू असते. "मुलगी जन्मल्याचे" दु:ख घरादाराला मनोमन होते. तेव्हापासूनच मुलगीच्या आयुष्याची काळजी तिच्या आईला विशेष घेरते. अपुऱ्या जीवनसुविधांच्या कुटुंबात तर बालिका, कुमारी, युवती, गृहिणी, वृद्धा या सर्वांनाच अपुरेपणाची, अभावग्रस्ततेची आणि त्यामुळे होणाऱ्या मानसिक व शारीरिक उपासमारीची झळ सतत आणि जास्तीत जास्त सोसावी लागते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#झोंबी #(महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार १९८८-८९) #(महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार १९८८-८९) #(दि फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स -उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार १९८९) #(मारवाडी संमेलन पुरस्कार १९९०) # (साहित्य अकादमी पुरस्कार १९९०) #(प्रवरानगर - विखेपाटील पुरस्कार १९९१) #(संजीवनी साहित्य पुरस्कार, कोपरगाव १९९४) # नांगरणी # (रोहमारे ग्रामीण पुरस्कार १९९०) #घरभिंती #काचवेल #माऊली # (कालीमाता साहित्य पुरस्कार १९८६ #परिमल लेखन पुरस्कार १९८६ # नटरंग #(महाराष्ट्र राज्य पुरस्कार १९८२) # गोतावळा # शेवटची लढाई #(राज्य पुरस्कार २००१-०२) #भूमिकन्या #झाडवाटा # उगवती मने #(राज्य पुरस्कार २००२-०३) # आदिताल # डवरणी #माळावरची मैना # घरजावई #खळाळ #उखडलेली झाडं #सैनिक हो, तुमच्यासाठी... #मळ्याची माती #मायलेकरं #साहित्यिकाचा गाव #मातीखालची माती #स्पर्शकमळे #पाणभवरे #साहित्यिक जडण-घडण # ग्रामसंस्कृती #(रा. ना. सबनीस वाङ्मयपुरस्कार २००२) # मराठी लघुनिबंधाचा इतिहास #साहित्याची निर्मिती प्रक्रिया #ग्रामीणता : साहित्य आणि वास्तव आत्मचरित्र मीमांसा #"ग्रामीण साहित्य : स्वरूप व समस्या #(राज्य पुरस्कार १९८३) # मराठी साहित्य - समाज आणि संस्कृती #१९६० नंतरची सामाजिक स्थिती आणिसाहित्यातील नवे प्रवाह # डॉ. आनंद यादव - एक साहित्यिक प्रवास #ZOMBI #NANGARNI #GHARBHINTI #KACHVEL #MAULI #NATRANG #GOTAVALA #SHEVATCHI LADHAI #BHUMIKANYA #ZADVATA #UGVATI MANE #AADITAL #DAVARNI #MALAVARCHI MAINA #GHARJAWAI #KHALAL #UKHADLELI ZADE #SAINIK HO TUMACHYASATHI #MALYACHI MATI #MAI LEKARA #SAHITYIKACHA GAON #MATIKHALCHI MATI #SPARSHKAMALE #PANBHAVARE #SAHITYIK JADAN-GHADAN #GRAMSANSKRUTI #MARATHI LAGHUNIBANDHACHA ITIHAS #SAHITYACHI NIRMITI PRAKRIYA #GRAMINTA SAHITYA ANI VASTAV #AATMACHARITRA MIMANSA #GRAMIN SAHITYA : SWARUP ANI SAMASYA #1960 NANTARCHI SAMAJIK STHITI ANI SAHITYATEEL NAVE PRAVAH #DR. ANAND YADAV EK SAHITYIK PRAVAS
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKSATTA 31-12-2000

    वेदनांच्या शोधात... आजची स्त्री स्वतंत्र आहे. ती स्वावलंबी आहे. स्वत:चे निर्णय स्वत: घेऊन तिच्या कर्तृत्वाचं आभाळ ती कितीतरी मोठ्ठं करु शकते. ती पुरुषांच्या बरोबरीनेच नाही तर त्याच्याही पुढं चार पावलं गेली आहे. केवळ शहरातच नव्हे गावाकडेही अलीकडे हे ित्र दिसतं. ती आता फक्त गृहिणी राहिलेली नाही. कर्तृत्वशालिनी झालेली आहे. तिचं व्यक्तिमत्व उत्तुंग होत चाललं आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांत उच्चपदावर चमकणाऱ्या स्त्रियांना पाहिलं की आपली खात्रीच होते की, स्त्री आता सोशिकतेपासून खूप दूर गेली आहे. तिचा ‘सासुरवास’ संपलाच आहे. मात्र हा आपला केवळ भ्रम आहे हे आनंद यादव यांचं ‘भूमिकन्या’ वाचल्यावर कळून येतं. खरं तर यादव यांचा ‘भूमिकन्या’ हा इथल्या भूमीवर स्वत:चं आयुष्य खडतरपणे जगणाऱ्या वेगवेगळ्या स्त्रियांच्या भावनांचा हृदयस्पर्शी आलेख मांडणारा कथासंग्रह आहे. त्यांनी उभ्या केलेल्या स्त्रिया, त्यांचं जगणं, त्यांचा प्रत्येक श्वास वाचताना वाचकाला अस्वस्थ करून जातो. दारिद्र्यात पिचलेली स्त्री, प्रतिकूल परिस्थितीशी झगडत जगू पाहणारी स्त्री, नवरा अकाली गेल्यावर कष्ट उपसणारी स्त्री, घराच्या बाहेर पतीच्या मनासारखं काही घडत नाही म्हणून घरात फुकटचा मार सहन करणारी स्त्री, मुलीचं लग्न नीट व्हावं म्हणून कष्ट करत राहणारी स्त्री, पोटाची खळगी भरण्यासाठी वणवण भटकणारी स्त्री आणि पोटाची भूक शमविण्यासाठी पती देईल ते खाणारी स्त्री अशा कित्येक स्त्रियांनी यादवांना प्रचंड अस्वस्थ केले आहे. त्यांच्या जगण्याचा इतिहास समाजापुढे यावा हाच ध्यास जणू त्यांनी घेतलेला दिसतो. या कथासंग्रहात आदिजन्मातली माणसं, टक्के उडालेला मोर, लेक लग्नाची, जल्माचं सोनं झालं, पोटुसंपण, वाकळ, बायकांचा जल्म, पांद, भूक, नरमेध या कथा स्त्रीच्या सोशिकतेची परिसीमा अधोरेखित करतात. केवळ सोशिकपणाच नाही तर वर्षातून एकदा एक तसाचा का होईना पण मिळणारा नात्याचा सहवास त्यांना किती सुखावून जातो याचाही प्रत्यय वाचताना येतो. म्हणूनच ‘आदिजन्मातली माणसं’ मधली शांता भाऊबीजेच्या तासाभरानं मोहोरुन गेलेली दिसते, परंतु कित्येक वर्ष त्याच चाकोरीतनं जाणाऱ्या तिचं ते सुखही मनाला बोचत राहतं. माळरानावरच्या शिळेनं कित्येक वर्ष जशाचं तसं राहावं तसं. ‘टक्के’ उडालेला मोर मधली मुमताज मात्र वेगळ्या कारणानं आपल्याशी संवाद साधते. एक अनामिक नातं जोडल्यावर ते जेव्हा अपघाती तुटतं तेव्हा तिचं मन टाहो फोडतं. फक्त ते कुणालाच कळत नाही. कळतं तिच्या मनाला कारण तिच्या डोळ्यातले अश्रू मनाला बजावून सांगतात - ‘कुणावर जास्त माया लावू नये.’ लेखक मुमताजचं मुकेपणच बोलकं करतो. दुसऱ्या एका ‘कळी फुलतानाचे दिवस’ मध्ये तर लेखक लग्नाची झालेल्या मुलीच्या मनाचा विचार न करता केवळ वयात लग्न झालं पाहिजे म्हणून कुणाही बरोबर (मुलीला न शोभणाऱ्या) लग्न लावून देतात अशा पालकांवर प्रहार करतात. त्यांच्याबद्दलचा रागही प्रकट करतात. ‘बायकांचा जल्म’ या कथेत आक्काच्या भावना चित्रित करताना लेखक आक्काच्या जीवनाची परवड जिवंत करतो. आनंद यादव यांच्या साऱ्या कथा ग्रामीण वातावरणातल्या तिथली परिस्थिती, तिथल्या व्यक्तिरेखा घेऊन लिहिल्या गेलेल्या. आज एकविसाव्या शतकात प्रवेश करताना ग्रामीण स्त्रियांची होणारी परवड विचार करायला लावणारीच नव्हे तर क्लेशकारक आहे. लेखकाने ‘भूमिकन्या’ हा कथासंग्रह वाचकांसमोर आणून गावात लपलेल्या वेदना सांगितल्या आहेत. किंबहुना ही त्यांनी शोषित स्त्रियांची त्यांच्या वतीने मांडलेली कैफियतही म्हणता येईल. कैफियत मांडताना सहसा तक्रारीचा सूर जास्त असतो; परंतु यादव यांनी या कथांमधून तक्रारी केलेल्या नाहीत. केवळ एक ग्रामीण सत्य परखडपणे मांडलं आहे. तेही ग्रामीण बोलीभाषेचा आधार घेत. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

रुपाली सोनवणे

#रुक #जाना #नही लेखक: Dr. भावेश भाटिया शब्दांकन: Dr: सचिन पाचोरकर अनुवाद: सुप्रिया वकील ​अंथरून पाहून पाय पसरावे... अह्ह.. त्या निर्जीव अंथरुणासाठी आपल्या सजीव पावलांना का त्रास द्यावा? असेच एक जबरदस्त आत्मचरित्र वाचून संपवलं आणि एक ऊर्जा निर्माणकरून गेलं, पुस्तकाचं नाव आहे `रुक जाना नहीँ ​डॉ. भावेश भाटिया यांची ही प्रेरणादायी कहाणी. शाळेत असताना आलेलं अकाली अंधत्व आणि त्यानंतर खडखडीत खडतर जीवनाचा सुरू झालेला प्रवास, पण या प्रवासात खचलेल्या बालमनाला त्यांच्या आईने दिलेलं बळ, प्रेरणा व आत्मसन्मानाची शिकवण आणि स्वाभिमानाचे धडे लेखकास पुरे होते. हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. चांगल्या धडधाकट व्यक्तीवर संकट आल्यावर दूर दूर पळणारे नातलग, मित्र परिवार, जातभाई... दृष्टी गेलेल्या व्यक्तीस कितपत आधार देतील? पण एक ऑपरेटर ते एक उद्योजक, `सनराईज कॅण्डल`चा विस्तार आणि स्वतःबरोबर अनेक दृष्टिहीन व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभं करून रोजगार देणारा हा अवलिया किती अडथळे पार करून आलाय हे जाणून घेण्यासाठी पुस्तक वाचायला हवंच. ​कुठलाही वशीला नाही की कोणाची सहानुभूती नाही, स्वबळावर विविध प्रयोग करत उद्योग यशस्वी करणं सोपं नाही. यात ज्या ज्या देवमाणसांनी हातभार लावला त्यांचा पण उल्लेख आहे, पण त्या देवमाणसांनी देखील कधीच उपकारिक भाषा न करता व स्वाभिमान न दुखावता कशी मदत करता येऊ शकते हे त्यांच्या कृतीतून दाखवून दिलंय. लेखक फक्त उद्योग उभारून थांबले नाहीत तर त्यांनी सामाजिक जाणीवेचं भान देखील ठेवलंय. महाबळेश्वरमध्ये सनराईज कॅण्डल नावाने त्यांनी भव्य असा उद्योग परिसर आणि म्युझियम सुरू केलंय, तेथे अनेक दृष्टिहीन व्यक्तींना रोजगार मिळाला आहे त्याचबरोबर सर्वजण स्वाभिमानाने कष्ट करून जगत आहेत. हजारो आयुष्य त्यांनी उजळून टाकली आहेत. दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार सह एकून 46 पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.विशेष म्हणजे सर्व पुरस्कार त्यांच्या योग्यतेनुसार दिले आहेत.. आणी अशा हजारो पुरस्कारांचे ते मानकरी आहेत असंच वाटत..त्यांच्या कामाची दखल रिलायन्स ग्रुप ने देखील घेतली आहे.व त्यांच्या पुस्तकास प्रस्तावना देखील नीता अंबानी यांनी दिली आहे.उद्योग करताना छोट्या छोट्या गोष्टी कसा प्रभाव करतात याच वर्णन देखील त्यांनी लिहिल आहे.. ​या कार्यात महत्त्वाचं योगदान त्यांच्या धर्मपत्नी नीता भाटिया यांनी दिलं आहे. दूरदृष्टी ठेवून आपल्या पतीस प्रोत्साहन देऊन, नवीन कल्पनेसह पाठिंबा देऊन त्यांना हुरूप देण्याचं काम त्यांनी केलंय. नीता भाटिया यांचं कर्तृत्व, त्यांचं पवित्र निस्वार्थी प्रेम या पुस्तकातून वाचताना आंतरिक वेगळी ऊर्जा मिळते. कलियुगातील देवी हा शब्द व मान त्यांना समर्पक वाटतो. पुस्तक सर्व वयोगटातील वाचक वाचू शकतात. मनाने खचलेल्या पण शरीराने धडधाकट असलेल्या प्रत्येक व्यक्तीने वरील पुस्तक नक्की वाचावं आणि आत्मसात करावं. एवढ्या उंचीवर असूनही जमिनीवर पाय असलेल व्यक्तिमत्व आहे. अगदी प्रेमळ पणे वागण बोलण सन्मान देण..ही दैवी देणगी त्यांच्या जवळ आहे. ...Read more

RAZOR SHARP
RAZOR SHARP by ASHWIN SANGHI Rating Star
सुनील माने, पुणे

लेखक अश्विन सांघी “द रोझाबल लाइन” या पहिल्याच कादंबरीने खूप लोकप्रिय झाला. प्राचीन भारतीय दंतकथा/ऐतिहासिक संदर्भ घेऊन त्याच्याभोवती आजच्या काळात रहस्यपूर्ण कथा लिहिणारा अश्विन. Chanakya’s Chant, The Krishna Key, The Sialkot Saga, Keepers of the Kalacakra, The Vault of Vishnu, The Magicians of Mazda अशा एकापेक्षा एक सुंदर रहस्य कादंबर्या “भारत सिरीज़” नावाने खूप प्रसिद्ध झाल्या. या सर्व कादंबऱ्या मी इंग्लिश मधेच वाचल्या. यांचा मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाउस यांच्याकडे उपलब्ध आहे. अश्विन सांघीने या भारत सिरीज शिवाय एक नवीन थ्रिल्लर सिरीज (कुत्ता कदम) सुरू केली आहे. त्यांतील पहिली कादंबरी Razor Sharp. एक सिरियल किलर मुंबईत एकानंतर एक खून पाडतोय. पोलिस चक्रावले आहेत. 1. रविवार दि २ फेब्रुवारी , गोरेगाव पश्चिममधे रवि मेहराचा खून होतो. त्याची बायको खुशी कॅाल सेंटरचा जॅाब करून रात्री ११.३० ला परत येते. खूप वेळा बेल वाजवून दार न उघडल्यामुळे ती उघडून आत येते तर रवि रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलेला असतो. त्याचे हात पाठीमागे नायलॅान दोरीने बांधलेले असतात. त्याच्या छातीत सुरा खुपसलेला असतो. त्याच्या तोंडात काहीतरी खाद्य पदार्थ असतो. 2. सोमवार दि १० फेब्रुवारी , लोअर परळमधे सुचंद्रा अग्रवालचा खून. तिची कामवाली आल्यावर दार न उघडल्यामुळे सोसायटीवाले दार तोडतात. आत सुचंद्राचा खून झालेला. हात नायलॅान दोरीने मागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात काहीतरी खाद्यपदार्थ. पोलिस चक्रावलेले. मग पोलिसखाते जागे होते. त्यांचा नावाजलेला अधिकारी जो सस्पेंड झालेला आहे, त्या प्रकाश कदम, DCP याला बोलावले जाते. राज्याचे गृहमंत्री ओंकार लोखंडे, त्यांचा माणूस कमिशनर चव्हाण आणि उपगृहमंत्री जयंत गायकवाड व त्यांचा माणूस SCP राणे, मुंबईचा डॅान भाऊ पाटील जो लोखंडेचाच माणूस असतो, हे सर्व या केसच्या मागावर लागतात. कदम हा राणेंच्या ओळखीचा खास ऑफिसर असतो म्हणून त्यालाही इन्व्हेस्टीगेशनला बोलावले जाते. 3. मंगळवार दि १८ फेब्रुवारी , ठाणे येथे मंगला शहाचा खून. तिच्या शेजारणीमुळे हे कळते. मंगलाचे हात नायलॅान दोरीने पाठीमागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात खाद्यपदार्थ. पोलिस अधिकारी शिंदे कदमबरोबर येतात. मंगलाच्या चेहऱ्याजवळ कदमला पेस्टिसाईडचा वास येतो. चेहरा निळसर झालेला. खून झाल्यावर बॅाडीला हलवलेले दिसते. तो ऑफिसमध्ये जुन्या खूनांचे फोटो तपासतो. त्यांचीही बॅाडी खून केल्यावर हलवलेली दिसते. चेहऱ्यावर निळसर झाक दिसते. तिन्ही खून “फिनेक” ब्रॅंडच्या चाकूने केलेले असतात. हे समान धागे कदम त्याची मुलगी केतुल बरोबर चर्चा करतो. केतुलची आई काही वर्षांपूर्वी कदमला सोडून गेलेली असते. ती भाऊ पाटीलची सावत्र बहीण असते. पण सध्या ती कुठे आहे व काय करते हे माहित नसते. केतुल कोर्टात काम करत असते तसेच ती “शक्ती” या NGO मधेही काम करते. शक्ती हे सोनापूरमधुन सुटका केलेल्या वेश्यांचे पुनर्वसन करत असते. निर्मल नावाचा तिचा मित्र एथिकल हॅकर असतो. तिच्यावर प्रेम करत असतो. कदमला हार्ट अटॅक येऊन गेलेला व स्टेंट बसवलेला असतो. Depression मुळे त्याची सायकॅालॅाजिस्टकडे ट्रिटमेंट चालू असते. कदमला या तिन्ही केसमधे आणखी एक धागा सापडतो. हे खून आठ दिवसांच्या अंतरावर झालेले असतात. म्हणजे पुढचा खून बुधवारी होणार असल्याचे तो राणे व शिंदेला सांगतो. 4. बुधवार दि २६ फेब्रुवारी, कांदिवली पश्चिम, लक्ष्मी बुधीराजाचा खून. तोच पॅटर्न. 5. गुरुवार दि ५ मार्च, खार पश्चिम, गुरुराज अदवानीचा खून सेम पॅटर्न. गुरूराज हा युट्युबवरचा प्रसिद्ध सिंगर असतो. 6. शुक्रवार दि १३ मार्च, ताडदेव, दिव्या शुक्रपाणीवर खूनी हल्ला होतो. पण ती जबर जखमी होते. ती फिटनेस ट्रेनर असल्यामुळे खुन्याबरोबर झटापट करते. पण चाकू पोटात घुसल्यामुळे ती जबर जखमी होते. हात बांधलेले असतानाही ती फोनवर “सिरी” ला तिच्या भावाला, ध्रुवला फोन लावायला सांगते. फोन लागतो व ती “हेल्प हेल्प” एव्हढेच बोलून बेशुद्ध होते. म्हणून खुनी पळून जातो. ध्रुव तिथे पोहोचून तिला हॅास्पिटलमधे ॲडमिट करतो. पोलिसांना तिथे खुन्याची बॅग सापडते. त्यांत नायलॅानची दोरी, बेगॅान स्प्रे व राजमाच्या बिया सापडतात. तिसऱ्या खुनाआधी पोलिस संशयित म्हणून राजू दाभाडेला अटक करतात. पण चौथ्या खूनाच्या वेळेस तो कस्टडीतच असतो. मग खूनी कोण? 7. शनिवार दि २१ मार्च, बान्द्रा पश्चिम, शनिया डिसौजाचा खून होतो. सेम मोडस ऑपरेंडी . 8. शनिवार दि २८ मार्च, चेंबूर, ७१ वर्षांच्या राहुल सिंह नावाच्या सिख व्यक्तिचा खून होतो. तीच पध्दत. यानंतर एक दिवस कदम KBC बघत असताना अमिताभ बच्चन एका सिनेमाचं गाणं लावून त्याचा पिक्चर ओळखायला सांगतात. ते गाणं असते- “सोमवार को हम मिले मंगलवार को नयन बुध को मेरी निंद खुली जुम्मेरात को चैन अरे शुक्र शनी कटे मुश्किलसे आज है इतवार सात दिनों में हो गया जैसे सात जनम का प्यार” आणि कदमच्या डोक्यात एकदम प्रकाश पडतो… अरे, हे सर्व खून असेच रविवार ते शनिवार एक एका वारी घडलेत! पण शनिवारी दोन खून कसे? याच्या मागे काही खगोलशास्त्र किंवा भविष्याचा तर संबंध नाही? कदमला आठवतं की शेजारी राहणारा डॉ. देसाईला पण भविष्य-खगोलशास्त्राची आवड व माहिती आहे. ( डॅाक्टर कडे सापडलेल्या नायलॅानचे रंगीत दोर व फिनेक कंपनीचा चाकू यामुळे एक संशयित म्हणून कदमने त्याला अटक करून पुछताछ केलेली असते) कदम लगेच डॅाक्टरांकडे जातो. त्यांची माफी मागून त्यांना या प्रश्नांत मदत करायला सांगतो. तो या सर्व खुनांचा सिक्वेन्स सांगतो. ते प्रत्येक वारी का घडले? मग शनिवारी दोन का? यापुढे कोणता वार? कुणाचा खून? डॅाक्टर सांगतात की भारतीय भविष्य व खगोल शास्त्रात नवग्रहांना खूप महत्व आहे. रवि, सोम(चंद्र), मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि, राहू आणि केतु. यांचे रंग व धान्य वेगवेगळे असतात. त्या त्या ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी ते वापरले जातात. कदम ही माहिती लिहून घेतो. त्यावरून प्रत्येक खुनात वापरण्यात आलेले फिनेक कंपनीचे चाकू, वेगवेगळ्या रंगांचे नायलॅान दोर व तोंडातील पदार्थ यांचा संबंध जोडून एक तख्ता तयार करतोः- “रवि मेहरा-रविवार-सोनेरी दोर- तोंडात गहू-दिशा पूर्व सुचंद्रा-सोमवार-चंदेरी दोर-तोंडात तांदूळ-दिशा पश्चिम मंगला शाह-मंगळवार-लाल दोर-तोंडात तूर डाळ- दिशा दक्षिण लक्ष्मी बुधीराजा-बुधवार-हिरवा दोर-तोंडात हिरवे मूग-दिशा उत्तर गुरुराज अदवानी-गुरूवार-पिवळा दोर-तोंडात हरबरा डाळ-दिशा उत्तर पूर्व(ईशान्य) दिव्या शुक्रपाणी-शुक्रवार-पांढरा दोर-राजमा-दिशा दक्षिण पूर्व शनिया डिसौजा-शनिवार-काळा दोर-तोंडात काळे तिळ-दिशा उत्तर पश्चिम राहुल सिंग-शनिवार-निळा दोर-तोंडात उडीद दाळ-दिशा दक्षिण पश्चिम” आता उरला एकच ग्रह-केतु. केतुचा वार मंगळवार. ग्रे रंग, चना दाळ, दिशा दक्षिण पश्चिम. “केतु”म्हणजे कदमची मुलगी केतुलचा नंबर लागणार? आज तर मंगळवारच आहे! कदम घाबरून जातो! तो केतुलला फोन करतो पण तो बंद लागतो. ती सध्या कुठे आहे? कोर्टात? कदम आपल्या मुलीला वाचवतो का? खरा खुनी कोण असतो? तो पकडला जातो का? त्याचे यामागचा उद्देश काय असतो? याच्यामध्ये अजून कोण सामिल असतं का? याची उत्तरे मिळण्यासाठी वाचावी लागेल अश्विन सांघी यांची कादंबरी Razor Sharp. ...Read more