* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: NOTHING VENTURED
  • Availability : Available
  • Translators : SAVITA DAMALE
  • ISBN : 9789395477932
  • Edition : 1
  • Publishing Year : JANUARY 2023
  • Weight : 500.00 gms
  • Pages : 332
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :JEFFREY ARCHER COMBO - 27 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
NOTHING VENTURED IS THE INCREDIBLE AND THRILLING NOVEL BY THE MASTER STORYTELLER AND BESTSELLING AUTHOR OF THE CLIFTON CHRONICLES AND KANE AND ABEL, JEFFREY ARCHER.THIS IS A STORY ABOUT DETECTIVE WILLIAM WARWICK WHO HAS ALWAYS WANTED TO BE A DETECTIVE, AND DECIDES TO JOIN LONDON’S METROPOLITAN POLICE FORCE. AFTER GRADUATING FROM UNIVERSITY, WILLIAM BEGINS A CAREER THAT WILL DEFINE HIS LIFE: FROM HIS EARLY MONTHS ON THE BEAT UNDER THE WATCHFUL EYE OF HIS FIRST MENTOR, CONSTABLE FRED YATES, TO HIS FIRST HIGH-STAKES CASE AS A FLEDGLING DETECTIVE IN SCOTLAND YARD’S ART AND ANTIQUES SQUAD. INVESTIGATING THE THEFT OF A PRICELESS REMBRANDT PAINTING FROM THE FITZMOLEAN MUSEUM, HE MEETS BETH RAINSFORD, A RESEARCH ASSISTANT AT THE GALLERY WHO HE FALLS HOPELESSLY IN LOVE WITH, EVEN AS BETH GUARDS A SECRET OF HER OWN THAT SHE’S TERRIFIED WILL COME TO LIGHT.WHILE WILLIAM FOLLOWS THE TRAIL OF THE MISSING MASTERPIECE, HE COMES UP AGAINST SUAVE ART COLLECTOR MILES FAULKNER AND HIS BRILLIANT LAWYER, BOOTH WATSON QC, WHO ARE WILLING TO BEND THE LAW TO BREAKING POINT TO STAY ONE STEP AHEAD OF WILLIAM. MEANWHILE, MILES FAULKNER’S WIFE, CHRISTINA, BEFRIENDS WILLIAM, BUT WHOSE SIDE IS SHE REALLY ON?NOTHING VENTURED HERALDS THE START OF THE WILLIAM WARWICK NOVELS, IN THE STYLE OF JEFFREY ARCHER’S NUMBER ONE SUNDAY TIMES BESTSELLING THE CLIFTON CHRONICLES: TELLING THE STORY OF THE LIFE OF WILLIAM WARWICK – AS A FAMILY MAN AND A DETECTIVE WHO WILL BATTLE THROUGHOUT HIS CAREER AGAINST A POWERFUL CRIMINAL NEMESIS. THROUGH TWISTS, TRIUMPH AND TRAGEDY, THIS SERIES WILL SHOW THAT WILLIAM WARWICK IS DESTINED TO BECOME ONE OF JEFFREY ARCHER’S MOST ENDURING LEGACIES.CONTINUE THE GRIPPING SERIES WITH HIDDEN IN PLAIN SIGHT.
"जेफ्री आर्चर यांच्या नव्या संडे टाईम्स बेस्ट सेलर्स मालिकेची सुरुवात `नथिंग व्हेंचर्ड` या पुस्तकाने होत आहे. पोलिसात भरती झाल्यानंतर विल्यम नवोदित तपास अधिकारी म्हणून स्कॉटलंड यार्डच्या कला आणि प्राचीन कलावस्तू दलात सामील होतो. इथे प्रथमच तो एका मोठ्या प्रकरणाची उकल करतो. फिट्झमोलियन म्यूझिअममधील रेंब्रांच्या एका अमूल्य चित्राच्या चोरीचा तपास तो करत असतो. याच काळात बेथ रेन्सफोर्ड या तिथल्या संशोधन साहाय्यकेशी त्याची भेट होते. तो तिच्या प्रेमात पडतो. बेथकडेही एक गुपित असतं. हरवलेल्या चित्राचा मागोवा घेताना विल्यमची गाठ माइल्स फॉकनर या संभावित चित्रसंग्राहकाशी आणि त्याचा चलाख वकील बूथ वॉट्सन (क्यूसी) यांच्याशी पडते. विल्यमच्या एक पाऊल पुढे राहाण्यासाठी ते दोघे कायदा अगदी मोडेल इतका ताणण्याचा प्रयत्न करतात. दुसरीकडे माइल्स फॉकनरची पत्नी ख्रिस्टिना मात्र विल्यमशी मैत्री करते; पण ती नक्की कुणाच्या बाजूने असते? विल्यम वॉरिक या कुटुंबवत्सल आणि करामती तपास अधिकाऱ्याच्या जीवनाची ही कथा आहे. विल्यम आपल्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये शक्तिमान गुन्हेगारी शत्रूंशी चतुरपणे आणि हिकमतीने लढतो. "
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक #मेहतापब्लिशिंगहाऊस #जेफ्रीआर्चर #नथिंगवेंचर्ड #नथिंगव्हेन्चर्ड #थ्रिलर #विल्यमवॉरिक #MARATHIBOOKS #ONLINEMARATHIBOOKS #LOVESTORY #MARATHINOVEL #MEHTAPUBLISHINGHOUSE #JEFFREYARCHER #NOTHINGVENTURED #THRILLER #WILLIAMWARWICK
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more