* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: GOTAVALA
  • Availability : Available
  • ISBN : 9788184984101
  • Edition : 12
  • Publishing Year : MAY 1971
  • Weight : 150.00 gms
  • Pages : 156
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :ANAND YADAV COMBO SET-33 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE FARMSTEAD LOOKED AS IF IT WAS UNWELL… EVERYTHING LOOKED BARREN DASH; NOT A SINGLE TREE, NOR ANTHILL, NOR AN OUTCROP… HOW WOULD CATTLE COME THERE, OR ANY CHILDREN? COME ON! ENOUGH IS ENOUGH. BETTER NOT STAY HERE ANY LONGER. LET ME GATHER ALL THAT IS MINE AND MOVE, FROM ONE MOOR, TO ANOTHER. LOOKING FOR A FARMSTEAD. THERE IS NOTHING HERE TO HOLD ME BACK.
जिवाला बंर नसल्यागत मळा दिसत हुता... सबंध माळावर कुठं झाड, डगरी, वारूळ काय बी दिसत नव्हतं... आता माळावर ढोरं कशाला येतील नि पोरं तरी कशाला येतील?... चला! रग्गड झालं आता. आता नगंच रह्यायला... समदा गोतावळा घेऊन असंच मळानं माळ हुडकत जाऊ. माळ हुडकत जाऊ. हितं आता कोण हाय आपल?

No Records Found
No Records Found
Keywords
#झोंबी #(महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार १९८८-८९) #(महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार १९८८-८९) #(दि फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स -उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार १९८९) #(मारवाडी संमेलन पुरस्कार १९९०) # (साहित्य अकादमी पुरस्कार १९९०) #(प्रवरानगर - विखेपाटील पुरस्कार १९९१) #(संजीवनी साहित्य पुरस्कार, कोपरगाव १९९४) # नांगरणी # (रोहमारे ग्रामीण पुरस्कार १९९०) #घरभिंती #काचवेल #माऊली # (कालीमाता साहित्य पुरस्कार १९८६ #परिमल लेखन पुरस्कार १९८६ # नटरंग #(महाराष्ट्र राज्य पुरस्कार १९८२) # गोतावळा # शेवटची लढाई #(राज्य पुरस्कार २००१-०२) #भूमिकन्या #झाडवाटा # उगवती मने #(राज्य पुरस्कार २००२-०३) # आदिताल # डवरणी #माळावरची मैना # घरजावई #खळाळ #उखडलेली झाडं #सैनिक हो, तुमच्यासाठी... #मळ्याची माती #मायलेकरं #साहित्यिकाचा गाव #मातीखालची माती #स्पर्शकमळे #पाणभवरे #साहित्यिक जडण-घडण # ग्रामसंस्कृती #(रा. ना. सबनीस वाङ्मयपुरस्कार २००२) # मराठी लघुनिबंधाचा इतिहास #साहित्याची निर्मिती प्रक्रिया #ग्रामीणता : साहित्य आणि वास्तव आत्मचरित्र मीमांसा #"ग्रामीण साहित्य : स्वरूप व समस्या #(राज्य पुरस्कार १९८३) # मराठी साहित्य - समाज आणि संस्कृती #१९६० नंतरची सामाजिक स्थिती आणिसाहित्यातील नवे प्रवाह # डॉ. आनंद यादव - एक साहित्यिक प्रवास #ZOMBI #NANGARNI #GHARBHINTI #KACHVEL #MAULI #NATRANG #GOTAVALA #SHEVATCHI LADHAI #BHUMIKANYA #ZADVATA #UGVATI MANE #AADITAL #DAVARNI #MALAVARCHI MAINA #GHARJAWAI #KHALAL #UKHADLELI ZADE #SAINIK HO TUMACHYASATHI #MALYACHI MATI #MAI LEKARA #SAHITYIKACHA GAON #MATIKHALCHI MATI #SPARSHKAMALE #PANBHAVARE #SAHITYIK JADAN-GHADAN #GRAMSANSKRUTI #MARATHI LAGHUNIBANDHACHA ITIHAS #SAHITYACHI NIRMITI PRAKRIYA #GRAMINTA SAHITYA ANI VASTAV #AATMACHARITRA MIMANSA #GRAMIN SAHITYA : SWARUP ANI SAMASYA #1960 NANTARCHI SAMAJIK STHITI ANI SAHITYATEEL NAVE PRAVAH #DR. ANAND YADAV EK SAHITYIK PRAVAS
Customer Reviews
  • Rating Starगणेश शेलार औरंगाबाद

    गाेतावळ्यातला नारबाचा संसार वाचला. मतलबी मालक अन् निष्ठावान चाकर याची सांगड घालून कथेत चपखलपणे जम बसवला. काेंबडं, बकरं, बैलं,कुतरं आणि मुके प्राणी केवळ यांच्यातच नव्हे तर झाडं, पीके, खाेपटी, शेत आणि एकूणच चराचरात गुरफटलेला कुटुंबप्रमुख म्हणून सर्वथव मान्यता मिळालेला नारबा मालकासाठी अहाेरात्र गुलामगिरी करुन त्याच्या भल्यासाठी सदैव हित पाहणारा. त्याला स्वतःचं असं काही अस्तित्व शेष न उरलेला गडी. शेती-माती व प्राणिमात्रांत रमून आयुष्य कंठताना पुर्णपणे स्वार्थाचा स्पर्श न हाेता चंदनासारखं उगाळला पण त्याचा गंधही कुणाला लागला नाही. निसर्ग चक्राप्रमाणे ठाेकताळा मनाशी बांधून आपल्या मस्तीतच गाेतावळा हाकणारा नारबा वाचकांना आचंबित करुन साेडल्याबिगर राहत नाही. स्वार्थी मालकाला आधुनिकतेची कास लागल्याने एक एक करता नारबाचा गाेतावळा कमी करताना त्याच्या जीवाची हाेत असलेल्या घालमेलीशी काडीचाही संबंध ठेवत नाही. मागील काही काळात अशी स्थिती सरंजामदारांमध्ये फाेफावलेली पाहायला मिळत. सर्व प्राणीमात्रांत एकरुप झालेल्या नारबाच्या आयुष्यात आधुनीकतेने घाला घालून त्याचे मनच उध्वस्त करुन त्याला घरका ना घाटका असे करुन साेडले. एका ट्रॅक्टरने ही किमया करुन साेडली..! नारबा हा पारंपरिक शेती व्यवस्थेचा पुरस्कर्ता त्याला आधुनिक जीवन व्यवस्थेशी काही देणे घेणे नाही. मालकाशी त्याने हयातभर निष्ठा घालवली. डॉ. आनंद यादवांच्या या दीर्घ कथेत नारबा हीरो ठरला तर, मालक पार झिरो. कथेत ग्रामीण भाषेचा बाज असल्याने समजायला व उमजायला एखाद्या चढणीसारखीच लागली अन् उत्कृष्ट कथा वाचावयास मिळाली. ...Read more

  • Rating StarSURENDRA DAREKAR PATIL

    `गोतावळा` ही खरं तर यांत्रिकतेपेक्षाही वीस वर्षे मळ्यात राबून तिथल्या कुत्रे कोंबडी गुराढोरात जीव अडकून शेवटी नात्यांबद्दल भ्रमनिरास झालेल्या नारबा या सालकरी गड्याची जीवाला चटका लावणारी गोष्ट आहे. कादंबरीचा शेवट ` जिवाला बंर नसल्यागत मळा दिसत हुता.. सबंध माळावर कुठं झाड, डगरी, वारूळ काय बी दिसत नव्हतं... आता माळावर ढोरं कशाला येतील नि पोरं तरी कशाला येतील?... चला! रग्गड झालं आता. आता नगंच रह्यायला... समदा गोतावळा घेऊन असंच मळानं माळ हुडकत जाऊ. माळ हुडकत जाऊ. हितं आता कोण हाय आपल?` असा विमनस्क करणारा आहे. ...Read more

  • Rating StarSandip R Chavan

    छान आहे

  • Rating StarShradha Gangatirkar

    अप्रतिम गोष्ट!

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

FRANKLIN MALIKA COMBO SET - 29 BOOKS
FRANKLIN MALIKA COMBO SET - 29 BOOKS by PAULETTE BOURGEOIS Rating Star
रश्मी मुसळे-साळगांवकर

लहानग्यांच्या विश्वातल्या छोट्या छोट्या गमतीजमती या पुस्तकांच्या मालिकेतून अगदी मजेशीर पद्धतीने मुलांसमोर येतात..त्या गोष्टी ऐकताना, वाचताना मूलं यात अगदी रमून जातात... शिवाय आजवर ससा आणि कासव यांव्यतिरिक्त इतर कथाविश्वात काहीसा दुर्लक्षित राहिलेलया कासवाच्या जगातही अनेक गंमती घडू शकतात ही नवखी कल्पना मुलांना भारीच आवडते... ...Read more

MARATHI DAULATICHE NARI SHILP
MARATHI DAULATICHE NARI SHILP by GOPAL DESHMUKH Rating Star
लोकसत्ता २२ जानेवारी २०२३.

बाईचे विश्व हे चूल आणि मूल एवढय़ापुरतेच मर्यादित नसते याची उदाहरणे आपल्याला इतिहासातसुद्धा पाहायला मिळतात. इतिहासात डोकावून पाहिले तर स्त्रियांचे आयुष्य हजार बंधनांनी जखडलेले होते. लहान वयातच मुलींची लग्नं केली जात असत. सतीची चाल, विधवांना केशपनाची सक्ती, सती जाणाऱ्या स्त्रियांच्या मरणाइतकेच सती न जाणाऱ्या विधवांचे जगणे भयंकर होते. अशा समाजातच काही स्त्रिया अशासुद्धा होऊन गेल्या ज्यांनी आपल्या कार्याने, आपल्या धाडसाने, शौर्याने महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाची भर टाकली. समाजाचा स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्यात ज्यांचा मोलाचा वाटा आहे अशाच काही निवडक स्त्रियांचे चरित्र रेखाटन गोपाळ देशमुख यांनी ‘मराठी दौलतीचे नारी शिल्प’ या पुस्तकात केले आहे. जिजाऊमातेने बालशिवाजींची जडणघडण केली. अशा कर्तृत्ववान जिजाबाईंचे व्यक्तिचरित्र ‘राजमाता जिजाऊ’ या प्रकरणामध्ये सारांशरूपाने रेखाटण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. तसेच शिवरायांच्या जीवनात ज्या आठ राण्या आल्या त्यांच्या जीवनकार्याचे वर्णन ‘राणीवसा’ या प्रकरणात येते. ‘महाराणी येसूबाई’ या प्रकरणात त्यांची स्वराज्यनिष्ठा व दूरदृष्टी कशी दिसून येते याचे वर्णन केले आहे. संकटसमयी संभाजी राजांना दिलेल्या सल्ल्यामुळे त्यांच्या कार्यात मदत कशी झाली याचेही वर्णन आले आहे. ताराबाई, उमाबाई दाभाडे, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी युद्धभूमीवर शत्रूला तोंड कसे दिले. दर्याबाई निंबाळकर, पेशवा पत्नी गोपिकाबाई, रमाबाई, गंगाबाई यांनाही व्यक्तिगत सुखदु:खाबरोबरच मराठी दौलतीच्या वाटचालीत आपली भूमिका कशी पार पाडावी लागली याचीही माहिती पुस्तकात देण्यात आली आहे. दौलतीचा कारभार करताना अहिल्याबाईंना तीस वर्षे वैयक्तिक दु:खांना सामोरे जावे लागले. या साऱ्या दु:खांना बाजूला सारून उत्कृष्ट कार्य करून त्या ‘साध्वी पुण्यश्लोक अहिल्या’ कशा झाल्या याचा थोडक्यात आढावा घेतला आहे ‘अहिल्याबाई होळकर’ या प्रकरणात. तसेच पुतळाबाई आणि रमाबाई यांचे पतिनिष्ठेचे वर्णनही वाचायला मिळते. या सर्व व्यक्तिचरित्रांपैकी ‘राणी लक्ष्मीबाई’ यांचे चरित्र वाचताना त्यांची धाडसी वृत्ती, चिकाटी, येईल त्या प्रसंगाला न घाबरता शौर्याने सामोरे जाण्याची वृत्ती व शेवटी त्यांचा झालेला शोकात्मक शेवट आपल्या मनाला चटका लावून गेल्याशिवाय राहात नाही. वयाच्या चौदाव्या वर्षी गंगाधरराव यांच्याशी विवाह झाल्यानंतर आपल्या मुलाच्या आणि पतीच्या निधनानंतर शोक करत न बसता ही वीरांगना आपला दत्तक मुलगा दामोदर याला घेऊन ब्रिटिशांच्या कटू कारस्थानांना तोंड देण्यास सज्ज झाली होती. यातच तिला वीरमरण आले. हे वीरमरण येतानासुद्धा ती मोठय़ा शौर्याने अखेरच्या क्षणापर्यंत लढली आणि जेव्हा आपला देह आपल्याला साथ देत नाही हे लक्षात आले तेव्हा तिने आपल्या अनुयायांना आपला देह शत्रूच्या हातात पडता कामा नये, त्याला अग्नी द्या, असे सांगितले. अशा या वीरांगनेची गर्जना ‘मै मेरी झांसी नही दूंगी’ ही आजही अनेक स्त्रियांना आपल्या कामात प्रेरणा देणारी अशी आहे. राणी लक्ष्मीबाईच्या मरणाविषयी अनेक हकीकती उपलब्ध आहेत. त्यांचा उल्लेखही या पुस्तकात आला आहे. या पुस्तकातील स्त्रिया इतिहासकालीन असल्याने काही ठिकाणी ऐतिहासिक संदर्भाची पुनरावृत्ती झाल्यासारखे वाटते; पण ते येणेसुद्धा गरजेचे आहे. साध्या सोप्या भाषेत ही स्त्री चरित्रे आपल्याला वाचायला मिळतात. थोडक्यात असे म्हणता येईल की, इतिहासकाळातील थोर महिला विभूतींच्या जीवनकार्याचा अल्पांशाने सार वाचकांपुढे मांडण्याचा प्रयत्न लेखक गोपाळ देशमुख यांनी केला आहे, तो कौतुकास्पद आहे. ...Read more