* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: A THOUSAND SPLENDID SUNS
  • Availability : Available
  • Translators : MADHUKAR PRADHAN
  • ISBN : 9788184981797
  • Edition : 3
  • Publishing Year : NOVEMBER 2010
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 392
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :KHALED HOSSEINI COMBO SET - 3 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
MARIAM IS ONLY FIFTEEN WHEN SHE IS SENT TO KABUL TO MARRY RASHEED. NEARLY TWO DECADES LATER, A FRIENDSHIP GROWS BETWEEN MARIAM AND A LOCAL TEENAGER, LAILA, AS STRONG AS THE TIES BETWEEN MOTHER AND DAUGHTER. WHEN THE TALIBAN TAKE OVER, LIFE BECOMES A DESPERATE STRUGGLE AGAINST STARVATION, BRUTALITY AND FEAR. YET LOVE CAN MOVE A PERSON TO ACT IN UNEXPECTED WAYS, AND LEAD THEM TO OVERCOME THE MOST DAUNTING OBSTACLES WITH A STARTLING HEROISM.
अफगाणिस्तानातील ३० वर्षांच्या काळातल्या अस्थिर प्रसंगांची श्वास रोखून धरायला लावणारी मारियम आणि लैला यांची ही कथा. ही कथा वाचताना तालिबानच्या प्रदेशावरील सोव्हिएत आक्रमणापासून ते तालिबानच्या पुनस्र्थापनेपर्यंतच्या सत्तापालटाच्या कालखंडातील संघर्षमय प्रवास तुम्ही अनुभवाल. हिंसाचार, भय, आशा, श्रद्धा, यांवर जबरदस्त विश्वास असलेल्या देशातील मनोव्यापारांचा हा आलेख आहे. व्यक्तिगत आयुष्यातील धडपडीत झगडून टिकून राहण्यासाठी करायला लागणा-या संघर्षाची दोन पिढ्यातील ही शोकांतिका आहे आणि तरीही भोवताली फिरणा-या गुंतागुंतीच्या प्रसंगातूनही आनंद शोधताना कथेमध्ये वाचकाला पूर्ण गुंतवून ठेवते.

No Records Found
No Records Found
Keywords
"#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES #ATHOUSANDSPLENDIDSUNS #ए थाऊजंड स्प्लेन्डीड सन्स #FICTIONTRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI#MADHUKARPRADHAN #KHALEDHOSSEINI2 "
Customer Reviews
  • Rating StarVijay Nimbalkar

    भालचंद्र नेमाडेंच्या `हिंदू` कादंबरीतील एक स्त्री म्हणते, `देवा, पुन्हा आयुष्यात तुला दुसरं काही मागणार नाही. हे शेवटचंच. नवरा मारायचं मला बळ दे.` जगातील बहुतांश देशात, समाजात, धर्मात व जातीत काही पुरूष स्त्रीला फक्त भोगवस्तूच समजतात. मग अशा पुरषी माणसिकतेविरूध्द स्त्रियांना बंड करणं अनिवार्य होतं. रशीद मरतो का? लैला तारीकचं पुढं काय होतं? तालीबानी राजवटीत नवऱ्याला मारणाऱ्या स्त्रीला किती भयंकर शिक्षा होऊ शकते? मरीयमचा अतिश्रीमंत बाप पश्चात्ताप होऊन तिच्या मदतीला धावतो का? लग्नाअगोदर शरीरसंबंध ठेऊन मुलीला जन्म देणाऱ्या तारीक लैलाला ते तालिबानी काय शिक्षा देतात? अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरासाठी खालिद हुसैनी यांचं `अ थाऊजंड स्प्लेंडिड सन्स` वाचायला हवं. ...Read more

  • Rating StarEknath Marathe

    अफगाणिस्तानात गेली 40 वर्षे जी अशांतता माजली आहे त्याच्या बॅकड्रॉप वर ही कथा अगदी हळुवार उलगडत जाते. तिकडच्या बदलत्या राजवटी, अमेरिका आणि रशियाचा प्रादेशिक वर्चस्वासाठी चाललेला संघर्ष , टोळी युद्धे, तालिबानी राजवट व शेवटी परत शांती स्थापनेचा युनो चा ्रयत्न , या सर्वांना समांतर अशी मरियम व लैला यांची कहाणी सुरू असते. मरियम ही हरामी म्हणजे अनौरस व तिच्यापेक्षा 14 वर्षांनी लहान अशी तीची सवत लैला, यांचा हा अद्भूत जीवन संघर्ष आहे. या कथेत त्या दोघींचा नवरा रशीद, लैलाचा प्रियकर ताहीर, तिची मुले , अशी पात्रे कथानक फिरते ठेवतात. अफगाण मध्ये माजलेली अनागोंदी, आपला स्वार्थ साधल्यावर तिकडून काढता पाय घेणारी अमेरिका व रशिया, संपूर्ण प्रदेशाची झालेली राखरांगोळी, याचे फार प्रत्ययकारी चित्रण केलेले आहे. वाचताना अनेक वेळा सुन्न करणारे प्रसंग आहेत जे आपल्याला मानसिक दृष्ट्या उध्वस्त करून सोडतात. शेवट मात्र आशावादी केलेला आहे. जरूर वाचावे असे पुस्तक. या पुस्तकाचे सुरेख मराठी भावांतर करणारे मधुकर प्रधान यांचे खास आभार ! ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

वा. पां. जाधव अमरावती

`अमरावतीचे छप्पन स्वभाव एक मनोरंजक काव्यसंग्रह` `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे अमरावतीचे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री जी. बी. देशमुख यांचे अमरावती नगरीचा सहज स्वभाव व ह्या नगरीच्या वेगळ्या ओळखीवर आधारित मनोरंजक पुस्तक वाचले. वाचून भरपूर मनोरंजन झाले. खर काय लिहावे या लेखकाबद्दल, मन गोंधळले. ऐतिहासिक असो, प्रवास वर्णन असो, व्यक्ती विशेष असो, अनुभवात्मक घटना घडामोडी असो कशावरही सहज लिखाण करणारा हा लेखक आहे. आता तर त्यांनी लेखनाला विनोद प्रचुर फोडणी देऊन `अमरावतीचे छप्पन स्वभाव` या काव्यसंग्रहातून अमरावतीकरांना मनोरंजनाची मेजवानीच दिली आहे. प्रत्येक शहराची व त्या शहरातील वैशिष्ट्यांची एक वेगळीच ओळख असते. दिवस जातात, काळ लोटतो, पिढ्या बदलतात मात्र जुन्या स्मृतीची चिन्हे नवीन येणाऱ्या पिढीच्या मनात गुढ निर्माण करत कायम हाक देत राहतात. अमरावतीही त्याला अपवाद नाही. बापट चौकात चौक नाही, त्या जागेवर चौरस्ता नसून टी-पॉइंट आहे, खापर्डे बगीचा म्हणून आजही ओळख आहे मात्र तेथे बगिचा नाही किंवा प्रसिद्ध गांधी चौकात गांधीचा पुतळा अथवा स्मृतीदर्शक चिन्ह अथवा उल्लेख नाही मात्र गांधी चौक अशीच ओळख जनमानसात आहे. अशा एक ना अनेक विसंगत नाम दर्शक ओळख असलेली उदाहरणे त्यात सप्रमाण आहेत. पण खरी गंमत म्हणजे कधी काळी घडलेला इतिहास त्यामध्ये दडलेला आहे हे निश्चित. या सोबतच अमरावतीकरांच्या स्वभावातला स्थायी मजेदारपणाच्या एक एका हटके गुण वैशिष्ट्याच्या गमती लेखकाने हुबेहूब अधोरेखित केलेल्या आहेत. आणि त्यावरुन तत्सम रचनांचा उहापोह लेखकाने पुस्तकात केला असावा. विदेशात स्थाईक झालेल्या मूळ अमरावतीकरांना लेखकाने लिहिलेल्या गमती मनोरंजनात्मक वाटाव्या एवढी किमया जी.बी. च्या सहज लेखनाने दाखवली आहे. अमरावतीचे अग्रगण्य वृत्तपत्र दै. हिंदुस्थान मध्ये लेखकाने सतत ६ महीणे लिहीलेल्या काव्य सदरात अमरावतीच्या जनमानसाच्या हृदयाच्या ठाव घेणाऱ्या काव्य रचनांचा आठवणींनी महापूर ओसंडून गेला होता. विशेष म्हणजे ह्यात कुठेही अनावश्यक अभिनीवेष नव्हता. उलट गमतीत केलेले आत्मपरिक्षण मात्र काही प्रमाणात होते. वयस्क अमरावतीकर रसिकांना या रचना ताज्या करून त्यांच्या तारुण्यात घेऊन गेल्या हेच खरे. जी बी देशमुख या लेखकास मिळालेल्या सकारात्मक प्रतिक्रियां वरून दिसून येते. . सदर पुस्तकातील काव्यमय रचना वाचतांना अमरावतीच्या माणसाच्या वऱ्हाडभोळ्या स्वभावाची प्रचीती येते आणि वेगळाच आनंद देऊन जाते. निखळ मनोरंजन करत गुदगुल्या करणारा असा हा काव्यसंग्रह आहे. अमरावती शहराची ऐतिहासिक वैशिष्टे काव्यरूपात वाचण्याचा आनंद अमरावतीकरांना ते जिथं असतील त्या गावात, परगावात, परदेशात पुस्तक मागवून घेता येईल. ...Read more

ज्योती चेडे, मुंबई.

अमरावतीच्या वैशिष्ट्यांवर आधारीत खुमासदार छप्पन्न कवितांच्या संग्रहातील प्रत्येक कविता वाचत असताना अमरावतीच्या वातावरणाची धुंदी आपसुकच मनावर चढु लागली. सगळ्याच कविता सुंदर आहेत. एकेक कविता अमरावतीचे अप्रतिम वर्णन करते. प्रत्येक कवितेचा शेवट कुठेतरी गंभीर विचार करायला भाग पाडतो आणि मन गलबलून जाते. सगळ्याच कविता सुंदर आहेत पण माझ्या मनाला भावलेल्या व भिडलेल्या कविता आहेत `अमरावतीतल्या गमती`, `अमरावतीचे शिक्षण`, `अमरावतीचे हजरजबाबी`, `अमरावतीचे वेडे`, `अमरावतीच्या काकू` व बाकी सगळ्या. `अमरावतीचे वेडे` या कवितेत उल्लेखीत शेवटचा अश्रुंचा एक थेंब जरुर राखला जाईल. तसेच `अमरावतीच्या काकूं` ची उर्जा उरात भरून उरेल. जीवन देणाऱ्या विहीरीने कोणाचेही जीवन घेऊ नये, अशी सद्भावना मनात जागेल. अमरावतीकर जगात कुठेही असो त्यांच्या मनात एका कोपऱ्यात राजकमल चौक असतोच हे सत्य मनावर कोरले जाईल. प्रत्येक अमरावतीकराने ह्या कविता जगाव्यात. त्यासाठी हे पुस्तक संग्रही ठेवावे आणि परगावी राहणाऱ्या आपल्या अमरावतीकर आप्तेष्टांना भेटी दाखल द्याव्या. ...Read more