* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: GRAMIN SAHITYA : SWARUP ANI SAMASYA
  • Availability : Available
  • ISBN : 9788171612680
  • Edition : 4
  • Publishing Year : 1979
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 204
  • Language : MARATHI
  • Category : REFERENCE AND GENERAL
  • Available in Combos :ANAND YADAV COMBO SET-33 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS WORK WHICH FOCUSSES ON RURAL MARATHI LITERATURE IS A COLLECTION OF 17 ARTICLES WRITTEN BETWEEN 1968 AND 1979. THE AUTHOR WHO IS A SENIOR AND EMINENT AUTHOR AND LITERARY
ग्रामीण साहित्याचा सर्वांगीण अभ्यास करणारा हा मराठीतील पहिलाच ग्रंथ. मराठी ग्रामीण कथा, कादंबरी,कविता या साहित्य-प्रकारांचे ऐतिहासिक स्वरूप तर ग्रंथकाराने विशद करून दाखविलेच आहे; शिवाय त्यातून निर्माण होणाNया अनेक तात्त्विक प्रश्नांची उत्तरे साहित्यशास्त्रीय भूमिकेवरून देण्याचा प्रयत्न केला आहे. स्वातंत्र्यकाळातील ग्रामीण साहित्यातल्या पहिल्या पिढीच्या अनेक मर्यादाही ग्रंथकाराने स्पष्ट केल्या आहेत.ग्रामीण भाषेसंबंधीचे आपले विचार निर्भीडपणे मांडून नव्या पिढीच्या ग्रामीण साहित्याचे स्वरूप, या पिढीच्या ग्रामीण लेखकांचे व्यक्तिमत्त्व, त्यांच्या साहित्यविषयक अडचणीही दाखवून दिल्या आहेत. एवूÂण मराठी साहित्यात ‘ग्रामीण साहित्याचे स्थान’ नेमके काय आहे, हे धीटपणे सांगितले आहे.ग्रामीण साहित्याच्या संदर्भात या गोष्टी प्रथमच चिकित्सक रसिकांच्या समोर येत आहेत. ग्रामीण साहित्याची स्वत: निर्मिती करणाNया डॉ. आनंद यादव यांनी एवूÂण ग्रामीण साहित्याचा केलेला विचार त्यांच्या स्वानुभवाचे तेज घेऊन आल्याचे ग्रंथातील अनेक प्रखर आणि परखड विधानांतून जाणवते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#झोंबी #(महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार १९८८-८९) #(महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार १९८८-८९) #(दि फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स -उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार १९८९) #(मारवाडी संमेलन पुरस्कार १९९०) # (साहित्य अकादमी पुरस्कार १९९०) #(प्रवरानगर - विखेपाटील पुरस्कार १९९१) #(संजीवनी साहित्य पुरस्कार, कोपरगाव १९९४) # नांगरणी # (रोहमारे ग्रामीण पुरस्कार १९९०) #घरभिंती #काचवेल #माऊली # (कालीमाता साहित्य पुरस्कार १९८६ #परिमल लेखन पुरस्कार १९८६ # नटरंग #(महाराष्ट्र राज्य पुरस्कार १९८२) # गोतावळा # शेवटची लढाई #(राज्य पुरस्कार २००१-०२) #भूमिकन्या #झाडवाटा # उगवती मने #(राज्य पुरस्कार २००२-०३) # आदिताल # डवरणी #माळावरची मैना # घरजावई #खळाळ #उखडलेली झाडं #सैनिक हो, तुमच्यासाठी... #मळ्याची माती #मायलेकरं #साहित्यिकाचा गाव #मातीखालची माती #स्पर्शकमळे #पाणभवरे #साहित्यिक जडण-घडण # ग्रामसंस्कृती #(रा. ना. सबनीस वाङ्मयपुरस्कार २००२) # मराठी लघुनिबंधाचा इतिहास #साहित्याची निर्मिती प्रक्रिया #ग्रामीणता : साहित्य आणि वास्तव आत्मचरित्र मीमांसा #"ग्रामीण साहित्य : स्वरूप व समस्या #(राज्य पुरस्कार १९८३) # मराठी साहित्य - समाज आणि संस्कृती #१९६० नंतरची सामाजिक स्थिती आणिसाहित्यातील नवे प्रवाह # डॉ. आनंद यादव - एक साहित्यिक प्रवास #ZOMBI #NANGARNI #GHARBHINTI #KACHVEL #MAULI #NATRANG #GOTAVALA #SHEVATCHI LADHAI #BHUMIKANYA #ZADVATA #UGVATI MANE #AADITAL #DAVARNI #MALAVARCHI MAINA #GHARJAWAI #KHALAL #UKHADLELI ZADE #SAINIK HO TUMACHYASATHI #MALYACHI MATI #MAI LEKARA #SAHITYIKACHA GAON #MATIKHALCHI MATI #SPARSHKAMALE #PANBHAVARE #SAHITYIK JADAN-GHADAN #GRAMSANSKRUTI #MARATHI LAGHUNIBANDHACHA ITIHAS #SAHITYACHI NIRMITI PRAKRIYA #GRAMINTA SAHITYA ANI VASTAV #AATMACHARITRA MIMANSA #GRAMIN SAHITYA : SWARUP ANI SAMASYA #1960 NANTARCHI SAMAJIK STHITI ANI SAHITYATEEL NAVE PRAVAH #DR. ANAND YADAV EK SAHITYIK PRAVAS
Customer Reviews
  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 14-10-1979

    प्रा. आनंद यादव हे ग्रामीण कथाकार, कवी, ललित लेखक म्हणून जसे आपल्याला परिचयाचे आहेत तसेच ते टीकाकार म्हणूनही परिचयाचे आहेत. ‘सत्यकथा’, ‘प्रतिष्ठान’, ‘हंस’ मधून त्यांचे टीकालेखन आपल्यापुढे सतत येत असते. १९६८ ते १९७९ या काळातील टीकालेखांचे संकलन करून गरामीण साहित्याविषयीचे त्यांचे विचार साकल्याने ‘ग्रामीण साहित्य स्वरुप आणि समस्या’ या पुस्तकाच्या रुपाने आपल्यापुढे येत आहे. स्वत: लेखक असून टीकाकार असणाऱ्यांपैकी आनंद यादव एक आहेत. मराठी ग्रामीण कथा, कविता, तिची जडणघडण, तिच्या प्रेरणा, तिची भाषा या सर्वांबद्दल ते अभ्यासपूर्ण विधाने करतात, तर ग्रामीण साहित्यिक ग्रामीण रसिक, ग्रामीण साहित्यिकांच्या, रसिकांच्या अडचणी, नव्या पिढीतील ग्रामीण साहित्यिकांच्या व्यक्तिमत्त्वाविषयी ते आस्थेने, आपुलकीने लिहितात. या सर्व लेखनामागे त्यांचा जिव्हळा तीव्रतेने जाणवतो. स्वत:च्या कथा, कवितेविषयीही ते मोकळेपणाने लिहितात. स्वत:च्या लिखाणाकडे त्रयस्थपणानी बघण्याची चिकित्सक दृष्टी, तितकी अलिप्तता, त्यांच्या ठिकाणी आहे. ग्रामीण साहित्यनिर्मितीचा संबंध सरळसरळ सामाजिक परिस्थितीशी आहे. (तसा सर्वच साहित्याचा संबंध सामाजिक परिस्थितीशी असतो.) १९२० साली सामाजिक क्षेत्रात गांधीच्या तत्त्वज्ञानाचा उदय झाला आणि समाजजागृतीची लाट शहराकडून खेड्याकडे वळली. लोकोद्धाराच्या कल्पनेतून, सहानुभूतीतून ग्रामीण जीवनाकडे शहरी मध्यमवर्गीय सहानुभूतीपूर्ण दृष्टीने पाहिले, तेव्हा मध्यमवर्गीय कल्पना आरोपित करून लिहिले गेलेले सुरुवातीचे साहित्य होय. ‘१९४० पर्यंतची साहित्यदृष्टी आरोपित होती’ असे आनंद यादव म्हणतात ते याच अर्थाने. १९४० ते १९४५ मध्ये श्री. म. माटेंच्या लिखाणापासून खऱ्या ग्रामीण वाङ्मयाचा उदय दिसतो. १९४५ ते १९५० मध्ये दांडेकर, पेंडसे-पुढे १९४७ ते १९५५ मध्ये व्यंकटेश माडगूळकर, मिरासदार, शंकरराव खरात, उद्धव शेळके असा टप्प्या-टप्प्याने ग्रामीण साहित्याचा विकास झाला. ग्रामीण साहित्याने खूपच उंच भरारी मारली. स्वातंत्र्योत्तर काळातील लेखकांच्या पिढीने ग्रामीण जीवन अनुभवले होते, पण तरी हे लेखक खेड्यातील सुखवस्तू, जमीनदार घराण्यातील सुशिक्षित लेखक एका मर्यादेपर्यंत ग्रामीण जीवन रेखाटण्यात यशस्वी झाले आहेत. कुमार नलगे, सखा कलाल, चारुता सागर, महादेव मोरे ही नावे ग्रामीण साहित्याला पांढरपेशा जाणिवेतून बाहेर काढण्यास यशस्वी ठरली. पांढरपेशा जाणिवेतून ग्रामीण वाङ्मयाची मुक्तता झाली. ‘ग्रामीण साहित्य’ ही संज्ञा केव्हापासून वापरली जाते आहे हे काही निश्चित सांगता येणार नाही. पण ‘प्रादेशिक वाङ्मय’ हा शब्दप्रयोग १९३० च्या मडगाव साहित्य संमेलनात आपल्या कानावर पडला’ असे श्री. बोरकर हे ‘बोरकरांची कविता’ या संग्रहाच्या प्रस्तावनेत म्हणतात. ‘प्रादेशिक’ आणि ‘ग्रामीण’ असे शब्दप्रयोग वापरले जातात, तेव्हा या दोघांमध्ये फरक काय? नकारात्मक पद्धतीने सांगायचे झाल्यास जे नागर नाही ते ग्रामीण म्हणजेच प्रादेशिक. ‘ग्रामीण’ हा शब्द त्या त्या प्रदेशातील शहरी वाङ्मयाला आपोआप व्याधात करणारा आहे.’ (पृ.६५) म्हणून आनंद यादव या दोन्हीपैकी ग्रामीण शब्द वापरतात. ग्रामीण साहित्याचा वाचक वर्ग हा सुशिक्षित शहरी जीवन जगणारा आहे. नाविन्य म्हणून ग्रामीण साहित्य चवीने वाचले गेले, पण आज नाविन्य संपताच वाचकवर्ग ग्रामीण साहित्यापासून दुसरीकडे खेचला जातो आहे. ऐतिहासिक, पौराणिक आणि झोपडपट्टीच्या जीवनातील साहित्याकडे तो वळला. अनुभवाचे वेगळेपण संपले आणि लोकप्रियता ओसरली. ग्रामीण साहित्य पूर्वी होते तिथेच घोटाळू लागले - हे विदारक सत्य आनंद यादव स्पष्टाणे मांडतात. ‘हे लेखक सुरक्षित चाकोरीतील, हमखास यश देणारे पूर्वसिद्ध वळणाचेच लेखन करीत राहतात’ (पृ.१५६) इथे आनंद यादवांनी नेमके मर्मावर बोट ठेवले आहे. पण तरीही कोणालाही न दुखावता, नवोदितांचा हिरमोड, उत्साहभंग न होऊ देता त्यांचे दोषदर्शन करणे हे त्यांच्या टीकालेखनाचे कौशल्य होय. सत्यकथेसारख्या दर्जेदार मासिकाच्या मर्यादा ते स्पष्टपणे दाखवतात. आजच्या ‘नवजागरणाच्या’ काळात ‘सत्यकथे’सारख्या साक्षेपी मासिकाने जागरुक असायला हवे - पण तसे ते नाही १९५० ते १९६२ पर्यंत ‘सत्यकथे’च्या अभिरुचीत अनेकभिमुखता जाणवते - पुढे ती चौकट बंदिस्त होत गेली, अभिरुची टोकदार होत गेली. ग्रामीण साहित्य जाणून घ्यायला पठडीबाहेरचा डोळा टीकाकाराजवळ हवा. मला वाटते की असा पठडीबाहेरचा डोळा आनंद यादवांना लाभला आहे. ग्रामीण साहित्याचा गेल्या पन्नास वर्षांचा इतिहास आज डोळ्यांसमोर धरुन टीका करणारे समर्थ टीकाकार ग्रामीण साहित्याला लाभले आहेत. ग्रामीण साहित्याचा भुतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ ज्यांच्या डोळ्यापुढे लख्खं उभा आहे असे हे डोळस टीकाकार! त्यांच्या टीकेद्वारा वाचकाचा अभ्यासमार्ग उजळून निघतो. या पुस्तकातील संकलित लेखात ग्रामीण कथेवर जास्त भर दिला आहे. त्यामानाने ग्रामीण काव्य, नाट्य, लोकसाहित्य हे वाङ्मयप्रकार दुर्लक्षित वाटतात. परंतु पुस्तकाचे स्वरुप हे प्रबंधाचे नसून स्फुट लेखांचे असल्यामुळे वाचकांच्या ग्रामीण साहित्य विषयक अपेक्षांची पूर्ती करण्याची जबाबदारी लेखकावर येत नाही. तरीही अभ्यासक मात्र आनंद यादवांचे या विषयांवरील लिखाण वाचण्यास उत्सुक आहेत एवढंच. ही अपेक्षा आनंद याद भविष्यकाळात पूर्ण करतील अशी आशा आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MI GALIB BOLTOY
MI GALIB BOLTOY by SHABBIR ROMANI Rating Star
लोकमत २५.९.२०२३

शब्बीर रोमानी हे व्यवसायाने वकील. मातृभाषा अर्थात उर्दू आणि शिक्षण मराठी माध्यमातून झालेले. २०१८ मध्ये प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या उर्दू पुस्तकाला, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालच्या साहित्य अकादमी केंद्राचे पुरस्कार लाभले आहेत. आता मिर्झागालिबवरचे नवे पुस्तक, `मी गालिब बोलतोय...!` लक्ष वेधून घेत आहे. गालिबच्या एका शेरची पहिली ओळ घेऊन सांगायचे झाल्यास, जिक्र गालिबचा आणि खूबसूरत बयान लेखकाचे असे या पुरस्काराबद्दल म्हणता येईल. मिर्जा असदुल्ला खां,`गालिब` या श्रेष्ठ शायरची शायरी, त्याचे पत्रलेखन, चरित्र यावर आजवर शेकडो पुस्तक प्रसिद्ध आहेत. लेखकाने प्रस्तावनेत नमूद केल्यानुसार गालिबवर अनेक लेखकांनी लिहिले आहे. मराठी, हिंदी-उर्दू लेखकांची ते तपशील पाहून आचंबा वाटतो. शिवाय शब्बीर रोमानी यांनी इथे आपल्या लेखनाचे प्रयोजन सांगताना म्हटले आहे, कि गालिबबद्दल अनेक उलट-सुलट प्रकारच्या कहाण्या, विनोद, (कसलेही शेर गालिबच्या नावाने सांगत राहणे) प्रचलित आहेत; त्यामुळे गालिबची कथा, त्याच्या पत्रांमधल्या मनोरंजक गप्पा-गोष्टी आणि त्याच्याशी निगडित आठवणी हे सगळं साध्या सोप्या भाषेत लिहिण्याचा प्रयत्न म्हणजे हे पुस्तक. सर्वसामान्य माणसाच्या जगण्यातल्या सर्व भावछटा गालिबच्या काव्यातून दिसत असतात. पुस्तक वाचताना गालिबची प्रकृती, त्याची विनोद बुद्धी, संवेदनशील वृत्ती हे आपल्याला जाणवत राहते, आणि लेखकाची तळमळसुद्धा. या पुस्तकाचे वैशिष्टय म्हणजे, मोठी प्रकरण टाळून किस्से सांगावेत अशी रचना. शिवाय लेखकाची साधी-सरळ भाषा, यामुळे शायरीची आणि गालिबबद्दलची सर्वसाधारण माहिती आणि कुतुहूल असणाऱ्या वाचकांना हे पुस्तक रंजक वाटेल. सहसा गालिबचे गाजलेले शेर, किस्से हे आपल्या वाचनात असतात. या पुस्तकात गालिबचे अनेक दुर्मिळ शेर, शिवाय फारसी रचनाही या पुस्तकात समाविष्ट असल्याने त्याला एक संदर्भ ग्रंथाचेही स्वरूप आलेले आहे. गालिबला आंबे फार आवडायचे, `मिर्झा गालिब` या गाजलेल्या चित्रपटातला तो प्रसंग आजही लक्षात आहे. आंबे खाताना एक मित्र गालिबला तुच्छतेने म्हणतो, `आम तो गधेभी नही खाते!` त्यावर गालिबने त्वरित उत्तर देतो. `सिर्फ गधेही नाही खाते!` शब्बीर रोमानी यांनी हा प्रसंग व विनोद म्हणून सांगितला नाही, तर त्याचे तपशिलाने वर्णन तर केलेच शिवाय आंब्यावरची गालिबची मोठी गजल त्यांनी दिलेली असल्याने त्या किश्श्याला एक गांभीर्य आलेले आहे. असाच एक किस्सा, ते कलकत्त्याला असताना साध्या चिकणी-सुपारीवर गालिबला कुणी छेडले होते, यावर तुमची शायरी होऊन जाऊ द्या! असे आवाहन केले. या सुपारीच्या दिसण्या-असण्यावरच्या अफलातून शायरीची भली मोठी झलकच गालिबने पेश केली! गालिबच्या एक महत्वाचा शेर आहे. जिक्र ऊस परी-वंश का और फार बयां अपना बन गया रिकीब आखिर, था जो राजदां अपना त्या परिच्या सौंदर्याचे वर्णन आणि तेही माझ्या भाषेतून, माझ्याकडून ऐकले आणि माझा जवळचा असा मित्र आता या प्रेमाच्या नात्यात माझा प्रतिस्पर्धी झाला (आता तो तिच्यावर प्रेम करायला लागला) कलकत्त्याला गालिब दीडेएक वर्ष राहिला होता. तिथल्या धनिकांनी मुशायरे, मुजरे आयोजित केलेले असायचे, गालिबचा तिथे सन्मानही व्हायचा. गालिबने या बद्दल फार जिव्हाळ्याने लिहिले आहे. या मुशायऱ्यामध्ये गालिबचे फारसीचे काव्यवाचन ऐकून फारसी भाषेचे तज्ञ त्याच्यावर नाराज झाल्याची आठवण आहे! गालिबच्या तोंडून फारसीचे कौतुक ऐकून लोकांनी आक्षेप घेतला! गालिब हा आपल्या दुःख, विवंचनेवर हसणारा अद्भुत असा कलावंत होता. हा शेर वाचल्यावर आपल्याला मुन्शी प्रेमचंद यांच्या `पूस कि रात` मधला हलकू आठवतो! मिर्झा गालिबच्या कुतुहूल असणाऱ्या वाचकांना हा संग्रह आवडण्यासारखाच आहे. लेखनातल्या भाषिक काही त्रुटी वगळल्यास, गालिबचे किस्से, त्याची शायरी हे सगळे रोचक आहे. ...Read more

MRUTYUNJAYEE
MRUTYUNJAYEE by RATNAKAR MATKARI Rating Star
पुस्तकप्रेमी

मीना कश्यप शाह *मृत्युंजयी* भयकथा हा रत्नाकर मतकरींच्या लेखनाचा हातखंडा. मी दहावीच्या सुट्टीत असताना भयकथा वाचायला सुरुवात केली आणि त्यांनी मला पुरात झपाटून टाकलं होतं. ही पुस्तकं असायचीही सुटसुटीत जाडीची. त्यामुळे जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी पुस्तक लगणाऱ्या मला सगळीकडे ती घेऊन जात येत असत. क्लास मध्ये लवकर पोहोचले - वाच पुस्तक, बससाठी उभी आहे, वाच पुस्तक; झोप येत नाही, वाच (हे बहुदा चक्राकार रित्या सुरु राहायचं, झोप नाही म्हणून वाचायचं आणि वाचत असायचे म्हणून झोप नाही... त्या वयात असं सगळं चालायचं - लहानपण देगा देवा...) मृत्युंजयी सुरु केली तेव्हा आधीच खेकडा, रंगांधळा वाचून झालं होतं. अजूनही एक संपवलं होतं, पण नाव नाही आठवत (बहुतेक कबंध). त्या पार्श्वभूमीवर मृत्युंजयी फार आवडलं नाही, आणि खरं तर त्यामुळे रत्नाकर मतकरींच्या भयकथा वाचणं थांबलं. अलीकडेच हे इ-बुक मिळालं किंडल वर, पुन्हा वाचलं - आतासुद्धा शेवटच्या परिच्छेदात काय वळण मिळतं त्याची उत्सुकता होती, पण एकूणच माझा patience खूपच कमी झालाय त्यामुळे skip reading, quick reading करत पुस्तक पटकन वाचून संपलं. मृत्यू, अखेर, शेवट ही भावना प्रत्येकासाठी भीतीदायकच. त्या भीतीवर बेतलेल्या कथा ह्या संग्रहात आहेत. अतिमानवीय, फँटसी, भुताटकी अशा धक्कातंत्राचा उपयोग अनेक लेखक करतात. पण मतकरीचं वैशिष्ठय असं, की ते जळमटं सारखी कथा लिहून जातात. मृत्युंजयी मधील कथांमध्ये मृत्यूची अनेक रूपं दिसतात, कथा जिवंत माणसांच्या - पण मृत्यूची चाहूल, त्याची भीती, कधी त्याचं हवेहवेपण, कधी त्याच्याकडे आपणहून जाणे, अशा अनेक रंगढंगांनी मतकरी गूढता कायम ठेवतात. ह्या पुस्तकातील, मृत्यू अवतीभवती असलेल्या प्रत्येक कथेत, आपणा सर्वांना नक्कीच सुप्त आकर्षण वाटत असलेल्या अनेक गूढ गोष्टी येतातच... मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी करण्याची अतिमानवीय साधना... स्त्री-पुरुषातील शारीरिक आणि मानसिक ओढ... पूर्वी केलेल्या चुका आणि त्याबद्दलचा सल... जुलमाचा प्रतिशोध... अतिमानवीय शक्तींनी झपाटणे... भूतबाधा, भूतांशी गाठभेट... मृत्यूच्या अनेकविध तऱ्हा... मानसिक संतुलन ढळणे... आणि तत्सम. ह्या कथाप्रकारात महत्वाचं असतं, ते शेवटच्या काही वाक्यांमधे कथेला दिलेलं वळण आणि त्यामुळे वाचकाला बसलेला धक्का. रत्नाकर मतकरींच्या गूढकथा म्हणूनच खूप प्रभावी ठरतात. आता मात्र हे धक्का तंत्र बऱ्याच जागी पाहायला मिळतं - OTT वरच्या अनेक चित्रपट किंवा नाट्यमालांमधे हे तंत्र कथाकार वापरतात, आणि लोकांना हे पहायला खरंच खूप आवडतं, म्हणूनच त्या प्रसिद्ध होतात. अलीकडचं उदाहरण "वाळवी" चित्रपट! मृत्युंजयी मधे देखील काही कथा असा आनंद देऊन जातात. पण असं आहे ना "अति सर्वत्र वर्जयेत" - त्यामुळे बऱ्याच कथांच्या शेवटचा अंदाज लागतो आणि त्यांचा प्रभाव कमी होतो. सुरुवातीला जी गूढकथांची पुस्तकं मी वाचली, तेव्हा हे धक्कातंत्र मला नवीन होतं, त्यामुळे त्यात हा अंदाज लागत नव्हता. कदाचित मृत्युंजयी तेव्हा वाचलं आणि आताही वाचलं ते ह्या तंत्राचा अति वापर झाल्यावर वाचलं गेलं म्हणून असेल, पण कमी प्रभावी वाटलं हे खरं. अर्थात प्रत्येक गोष्टीत (सध्या इतर कथांमधे फारसे न सापडणारे) एक समान सूत्र आहे - ते म्हणजे, *वाईटाचं कधीच भलं होत नाही*. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, कधीही उचलून वाचायला सुरुवात करून काही मिनिटात एक गोष्ट संपते. सध्याच्या व्यग्र काळात हे पुस्तक पुन्हा वाचायला सोपे गेले, नक्कीच. आणि मी पुन्हा एकदा ह्या कथाप्रकाराकडे आकर्षितही झाले आहे... पुन्हा सगळी गूढकथांची पुस्तकं वाचायला हवीत. ...Read more