* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: MATIKHALCHI MATI
  • Availability : Available
  • ISBN : 9788184983388
  • Edition : 3
  • Publishing Year : SEPTEMBER 1965
  • Weight : 140.00 gms
  • Pages : 144
  • Language : MARATHI
  • Category : LITERATURE
  • Available in Combos :ANAND YADAV COMBO SET-33 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
ANAND YADAV HAS A SPECIAL PLACE IN THE MINDS OF MARATHI READERS. HE HAS NOT ONLY MASTERED THE SHORT STORIES BUT ALSO THE NOVELS. WE HAVE OFTEN COME ACROSS HIS SENSITIVE MIND THROUGH MANY OF HIS STORIES. HIS MIND NOTICES THE SMALLEST OR TINIEST FEELINGS IN THE MINDS AROUND. HE GIVES MEANING TO THE NEGLECTED FEELINGS OF THOSE DOWNTRODDEN PEOPLE. WE ALL KNOW THAT THE PLANTS THRIVE IN THE SOIL. BUT ARE WE ALL AWARE OF THE FACT THAT IT DOES NOT THRIVE BECAUSE OF THE OUTERMOST LAYER VISIBLE TO OUR EYES? ON THE CONTRARY, IT IS THE LAYER OF SOIL BENEATH THE OUTERMOST SOIL WHICH IS NOT ONLY HUMID BUT ALSO WARM, THUS BEARING THE BEST SUITABLE CONDITIONS FOR THE PLANT TO ROOT ITSELF WELL. THE STORIES INCLUDED UNDER THIS TITLE HERE ARE ALL RELATED TO THE LIFE OF VILLAGERS. THROUGHOUT, THE WRITING REFLECTS THE URGE THAT THE WRITER HAS FELT FOR THE WARMTH BENEATH THESE OTHERWISE DRYAPPEARING PEOPLE. IT IS THIS URGE IN HIM THAT MAKES HIM SEE BEYOND THE DAYTODAY LIVING AND BEARING OF THE VILLAGERS. HE REVEALS THE UNKNOWN SHADES OF THESE PURE MINDS WHICH MAY OTHERWISE APPEAR TO BE SELFISH. THE STORIES HELP THE READERS TO FIND THE WARMTH AND MOISTURE DEEP WITHIN WHICH INITIATES THE DAWNING OF SUPER SENSITIVENESS. THE RESULT… THIS BOOK ENHANCES US IN RETURN, IN TERMS OF HUMANITY.
ग्रामीण जीवनातील हे विविध दर्शन अस्सल शैलीतला हा आविष्कार. मातीवर उगवलेल्या कोवळ्या अंकुराइतकीच लेखकाच्या मनाला मातीतल्या गहिऱ्या थरांची ओढ लागली आहे. ही विविध व्यक्तिचित्रे संवेदनाशील मनाने टिपली आहेत. त्यातला प्रत्येक माणूस जिताजागता वाटतो... आणि त्यासोबत वाचकांच्या मनालाही अंकुर फुटतो. सभोवारच्या माणसांचेही ‘माणूसपण’ त्यांच्या मनाला जाणवू लागते. ती जाणीव मनातल्या मातीत रुजते, बहरते. असे हे जिवंत पुस्तक आणखीही खूपसे पालवून जाते!

No Records Found
No Records Found
Keywords
#झोंबी #(महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार १९८८-८९) #(महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार १९८८-८९) #(दि फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स -उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार १९८९) #(मारवाडी संमेलन पुरस्कार १९९०) # (साहित्य अकादमी पुरस्कार १९९०) #(प्रवरानगर - विखेपाटील पुरस्कार १९९१) #(संजीवनी साहित्य पुरस्कार, कोपरगाव १९९४) # नांगरणी # (रोहमारे ग्रामीण पुरस्कार १९९०) #घरभिंती #काचवेल #माऊली # (कालीमाता साहित्य पुरस्कार १९८६ #परिमल लेखन पुरस्कार १९८६ # नटरंग #(महाराष्ट्र राज्य पुरस्कार १९८२) # गोतावळा # शेवटची लढाई #(राज्य पुरस्कार २००१-०२) #भूमिकन्या #झाडवाटा # उगवती मने #(राज्य पुरस्कार २००२-०३) # आदिताल # डवरणी #माळावरची मैना # घरजावई #खळाळ #उखडलेली झाडं #सैनिक हो, तुमच्यासाठी... #मळ्याची माती #मायलेकरं #साहित्यिकाचा गाव #मातीखालची माती #स्पर्शकमळे #पाणभवरे #साहित्यिक जडण-घडण # ग्रामसंस्कृती #(रा. ना. सबनीस वाङ्मयपुरस्कार २००२) # मराठी लघुनिबंधाचा इतिहास #साहित्याची निर्मिती प्रक्रिया #ग्रामीणता : साहित्य आणि वास्तव आत्मचरित्र मीमांसा #"ग्रामीण साहित्य : स्वरूप व समस्या #(राज्य पुरस्कार १९८३) # मराठी साहित्य - समाज आणि संस्कृती #१९६० नंतरची सामाजिक स्थिती आणिसाहित्यातील नवे प्रवाह # डॉ. आनंद यादव - एक साहित्यिक प्रवास #ZOMBI #NANGARNI #GHARBHINTI #KACHVEL #MAULI #NATRANG #GOTAVALA #SHEVATCHI LADHAI #BHUMIKANYA #ZADVATA #UGVATI MANE #AADITAL #DAVARNI #MALAVARCHI MAINA #GHARJAWAI #KHALAL #UKHADLELI ZADE #SAINIK HO TUMACHYASATHI #MALYACHI MATI #MAI LEKARA #SAHITYIKACHA GAON #MATIKHALCHI MATI #SPARSHKAMALE #PANBHAVARE #SAHITYIK JADAN-GHADAN #GRAMSANSKRUTI #MARATHI LAGHUNIBANDHACHA ITIHAS #SAHITYACHI NIRMITI PRAKRIYA #GRAMINTA SAHITYA ANI VASTAV #AATMACHARITRA MIMANSA #GRAMIN SAHITYA : SWARUP ANI SAMASYA #1960 NANTARCHI SAMAJIK STHITI ANI SAHITYATEEL NAVE PRAVAH #DR. ANAND YADAV EK SAHITYIK PRAVAS
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKSATTA 02-01-1966

    ग्रामीण वास्तव जीवनाला नकळत झालेला स्पर्श... नाविन्यपूर्ण नावाने प्रकाशित झालेला हा व्यक्तिचित्रांचा संग्रह ग्रामीण स्वभावचित्रांचे विविध दर्शन घडविणारा आहे. ‘मातीखालची माती ओली आणि उबदार असते... तिच्या उबीतच पिकं जीव धरतात’ आईच्या एका सहज बोलून गेलल्या वाक्यांतून ह्या संग्रहाला वेदनाशील मनाचे अंकुर फुटले आहेत असं भासतं. हातबुडी आलेला शिवा, चव्हाणांचा आबामा, बापू, आक्कू मावशी, गडी, सखाराम, बाबाजी बल्लाळ, फुलाआत्ती, भाडेकरु दत्तू, पोरका दिन्या, तपस्विनी, धोंडबा खादाड्या, खुळा इठू आणि लंगडा गोपा अशा चौदा व्यक्तिरेखांतून दर्शन घेतलंसं वाटतं एका सलंग खेडे गांवाचं - जिथं उंस पिकतो आहे-तितक्याच शिव्याही पिकताहेत, उधळल्या जात आहेत. ग्रामीण जीवनांतील विविध कथा मराठी साहित्यांत चांगल्याच रुजल्या आहेत, ‘खेड्यांत चला’ ह्या ग्रामोद्धाराच्या संदेशापाठोपाठच ग्रामीण कथांना आगळे महत्व आलें. शहरातल्या यांत्रिक जीवनाला कंटाळलेल्या मुळच्या ग्रामीण मनाला मूळ गावच्या व्यक्तिचित्रांचा आठव सुखद गुदगुदल्या करून जाणे स्वाभाविक होतं. भोळ्या-भाबड्या शेतकरी कुटुंबाच्या कथा निसर्गरम्य परिसरांतून डोकावणाऱ्या निर्व्याज आनंदासारख्याच स्वागतार्ह झाल्या, परंतु कुठल्याही गोष्टीचा अतिरेक झाला की, त्याचा वीट येणे हेसुद्धा निसर्गप्राप्तच आहे. अशापैकी ‘खेड्यावल्ली माणसं’ ही कथा लक्षात रहाण्यासारखी लिहिली गेली. भोळी भाबडी म्हणवून घेणारी ही खेड्यावरची माणसं किती लबाड आणि संधिसाधू असतात ह्याच एक नमुनाच ह्या कथेने पेश केला होता. ग्रामीण कथा लिहिणे याचा एक सांचाच तयार झाल्यासारख्या ग्रामीण कथा पटापट निर्माण होत होत्या - त्यातूनच अनेक नवे नवे साहित्यिक उदयाला आले. ग्रामीण कथानके लिहिण्याची खास स्पेशेलिटी असलेला लेखक - वर्ग वरचेवर लक्षात भरु लागला. श्री. आनंद यादव यांनी ह्या कथासंग्रहांतून असेच एक स्थान अशा लेखकमालिकेत निर्माण केले आहे. जिवंत भाषा, स्वाभाविक वर्णन आणि पुष्कळशा शिव्यांचे हे ग्रामीण जीवन ‘जुनेरा’ चे जुणेर करते. घाटली, निवद असे विविक्षित अस्सल गांवठी शब्द घेऊन साकार होते. गावच्या मळ्यांचे शिवाराचे व वस्तीचें ओझरते दर्शनही वास्तवतेचे नाते सांगून जाते. ग्रामीण जीवनांतील - विशेषत: घाटावरच्या ग्रामीण जीवनांतील - दैनंदिन व्यवहार व काही विशिष्ट मनोवृत्तीच्या स्वभावरेखा ग्रामीण जीवनाचे यथार्थ वर्णन करणाऱ्या आहेत. त्यात नाही ग्रामीण मनाची केवळ तरफदारी किंवा केवळ त्यांच्या मागासल्या स्वार्थी मनाचें कौतुक - ! शब्दाशब्दांतून इथे निर्माण होते आहे - कींव, दारिद्र्यांच्या ह्या जगाबद्दल कणव. येथलं अज्ञान, दारिद्रय, उपासमारीच्या पोटी आलेली अगतिकता, किंवा केवळ कष्ट करायला नको हा वृत्तींनी चटावलेली लाचारता, चोरटी वृत्ती किंवा रामोशीपणा पाहून मन विषण्ण होतं. ग्रामजीवनाची केवळ कौतुकं पहायला सरावलेल्या साहित्याला वास्तव जीवन स्पर्श करून गेल्याचा भास होतो. कोल्हापूर, सातारा, कऱ्हाड टापूंतील कुठल्यातरी एका खेड्यांतील ऊसाच्या मळ्याचे, शेतकऱ्याच्या शेतीचे कष्ट ‘दिसाचा गोंडा उगवतीला मोहरत हुता, तवापून तो रातची चांदनी उगवून मिटायच्या वकतगत - आपण आखोदेखा हाल’ प्रमाणे पुन्हा अनुभवत आहोत, अशी भावना कुठल्याही घाटावरच्या व्यक्तीला होईल आणि मग ह्या व्यक्तिचित्र संग्रहांतील प्रत्येक व्यक्तिरेखा परिचयाची वाटू लागले. वऱ्हाड, कोंकण, मराठवाडा अशा महाराष्ट्राच्या विविध भूभागाची ग्रामीण वैशिष्टये आपण वाचली, अनुभवली. घाटावरची ग्रामीण चित्रे तर आपण सिनेमांतूनही अनेकदा पाहिली आहेत, पण त्यांतून दृश्य झालेल्या रगेल रंगेल जीवनाहून एक वेगळेच जीवन ह्या कथा संग्रहांतून पहायला सापडते. कष्ट, सुख-दु:खाचा खेळ हा मानवी जीवनाचा नित्याचाच भाग आहे, परंतु त्या सुख-दु:खाच्या विश्वालाही अनेक स्वभाव वैशिष्टयाचे पैलू असतात. प्रत्येक पैलूतून वेगवेगळे सप्तरंगी इंद्रधनुष्य हातांवर उमटतं - प्रकाशाचा किरण साधून मनाला हंसवतं - खुलवतं ! श्री. आनंद यादव ह्यांनी अशाच एका इंद्रधनुष्यांतून मानवी जीवनाचे स्वाभाविक रंग खुलवले आहेत. चौदा कथा घेऊन संग्रह मोठा करण्याऐवजी निवडक आठ दहा कथांनी तो छोटा केला असता, तर एका बैठकीत कथा संग्रह वाचन काढणाऱ्याला तो आटोपशीरही वाटला असता. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

A-AMITABHCHA
A-AMITABHCHA by G.B. DESHMUKH Rating Star
प्रा. डॉ . वैशाली रवी देशमुख, अमरावती

वाचनाचे फायदे सांगताना प्रसिद्ध इंग्रजी लेखक फ्रान्सिस बेकन म्हणतो `रीडिंग मेकेथ अ फुल मॅन`. वाचनामुळे माणूस परिपूर्ण होतो. क्वचित एखादं असं पुस्तक हाती येतं जे वाचल्यानंतर ह्या परिपूर्णतेची , आत्यंतिक समाधानाची जाणीव होते . नुकतंच जी. बी. देशुख यांचं `अ- अमिताभचा` हे पुस्तक हाती पडलं एका बैठकीत ते वाचून संपवलं आणि काहीतरी माहितीपर तरीही दर्जेदार आणि साहित्यिक मूल्य असणारं पुस्तक वाचण्याचा आनंद प्राप्त झाला. सीमा आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात काम करून निवृत्त झालेल्या जीबी देशमुखांनी २०२० मध्ये अमिताभ बच्चनच्या कारकिर्दीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त त्यांच्या विविध ५० सिनेमातील भूमिकांचे विश्लेषण करणारे साप्ताहिक सदर दैनिक सकाळ मध्ये प्रकाशित केले. कोरोना काळात लिहिलेल्या या लेखमालेला त्यावेळी प्रचंड प्रतिसाद मिळाला. केवळ ज्येष्ठच नाही तर तरुण वाचकांनीही या लेखमालिकेला पसंतीची पावती दिली. २०२२ मध्ये मेहता पब्लिकेशनने अमिताभ बच्चनच्या एकूण ६२ सिनेमांवर आधारित लेख `अ अमिताभचा` या पुस्तक रूपाने प्रकाशित केले. १९६९ पासून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीला पाच दशकांपेक्षा अधिक काळ लोटला तरीही त्याचे सिनेरसिकांच्या भावविश्वावर असलेले अधिराज्य कायम आहे. ती जादू कमी ओसरण्याचं नावच घेत नाही तर ती दिवसेंदिवस वाढत आहे . किरकोळ शरीरयष्टी, भरमसाठ उंची आणि सौंदर्याच्या साचेबंद व्याख्येत न बसणारा चेहरा असलेला अमिताभ आणि त्याला मिळालेली अफाट लोकप्रियता याची सांगड घालणे सर्वसामान्य व्यक्तीच्या आकलनापलीकडचे आहे. अमिताभ बच्चनचे प्रचंड चाहते असलेले जी . बी देशमुख यांच्यासाठी `अ` हा अमिताभचाच आहे. परंतु केवळ एक चाहते म्हणून त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं नाही तर अमिताभ बच्चनचे जे गारुड कित्येक दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर आहे त्यामागची नेमकी कारणे कोणती असू शकतात हे अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने शोधण्याचा प्रयत्न त्यांनी या पुस्तकात केलेला आहे. एक रसिक, चोखंदळ प्रेक्षक, अभ्यासक आणि समीक्षक म्हणून या पुस्तकात लेखक आपल्या समोर येतात. `बेमिसाल` पासून `झुंड` या चित्रपटा पर्यंत अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीतील उत्तमोत्तम ६२ सिनेमांचा लेखकांनी या पुस्तकात परामर्ष घेतलेला आहे. या चित्रपटांमधील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित सर्व बाबींचे अत्यंत अभ्यास पूर्वक रसग्रहण केलेले आहे. `अमिताभ बच्चन चांगला कलाकार आहे` किंवा `अमुक अमुक चित्रपट चांगला आहे` असं जेव्हा एखादा सर्वसामान्य प्रेक्षक म्हणतो त्यावेळेस हे आवडणं किंवा चांगलं असणं नेमकं का आहे याची उत्तरं देण्याचा प्रयत्न लेखकाने प्रत्येक लेखात केलेला आहे. प्रत्येक चित्रपटातील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित हायलाइट्स जसे की, एखादा उत्कट प्रसंग, गाणे, नृत्य, मारामारीचे दृश्य यावर लेखकाने प्रकाश टाकलेला आहे. आपण जर तो चित्रपट पाहिला असेल तर लेखकाने वर्णन केलेले प्रसंग जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहतात आणि बघितला नसेल तर तो चित्रपट आपण पाहिलाच पाहिजे अशी तीव्र इच्छा मनात निर्माण होते. उदाहरणार्थ, शोले या चित्रपटातील रसग्रहणात ,चेहऱ्यावरचे रेषाही ढळू न देता अमिताभने फेकलेले वन लाइनर्स, बुद्धीची चमक दाखवणारे शांतपणे केलेले विनोद, हळुवार प्रेमासाठी त्याचं आतल्या आत झुरणं , मित्राच्या मांडीवर प्राणत्यागाचे उत्कट दृश्य, आणि पिढ्यानपिढ्या लक्षात राहिलेला मावशी लीला मिश्रा सोबतचा विनोदी संवाद यांचे परिणामकारक वर्णन करून त्यांनी अमिताभची उत्तुंग अभिनय क्षमता उलगडून दाखवली आहे. या पुस्तकाला वाचनीय बनवणारा एक घटक म्हणजे लेखकाने वापरलेली भाषा. अत्यंत साध्या, सोप्या आणि अनुभवातून आलेल्या शब्दातून लेखकाने अमिताभ बच्चन भूमिकांचा उत्तरोत्तर चढत जाणारा आलेख शब्दांकित केला आहे. लेखकाच्या भाषा प्रभुत्वाचे साक्ष देणारी अनेक वाक्य पुस्तकांमध्ये जागजागी आढळतात. एका ठिकाणी ते लिहितात, `अमिताभने सिनेमातील विनोदाची सूत्र हाती घेतली तेव्हापासून विनोदी कलाकारांवर जणू बेकारीचं संकट कोसळलं होतं. प्रेक्षकांना दिलेल्या मनोरंजनाच्या वचनाशी `नमक हलाली` करणाऱ्या प्रकाश मेहरा आणि अमिताभ या जोडीने प्रेक्षकांना `और हम नाचे बिन घुंगरू के` असा आनंद दिला होता. असेच एक सुंदर वाक्य- `अमिताभचा उंट मनोरंजनाचा अख्खा तंबू व्यापून बसला होता`. लेखकाच्या ओघवत्या आणि मनाला भिडणाऱ्या भाषा शैलीचं एक उदाहरण मिली चित्रपटाच्या रसग्रहणातील या परिषदेतून दिसून येत: "शेखरच्या मनावर चढलेली उदासीची पुटं अमिताभच्या कसदार अभिनयामुळे आपल्याला अस्वस्थ,उदास करून सोडतात. दारूच्या नशेतील अमिताभचं एक दृश्य मस्त जमलं होतं . मोबाईल, टीव्ही इत्यादी आधुनिक साधनं व्यवहारात येण्याच्या आधीचा तो काळ होता. मिली आजारामुळे घरात बंदिस्त झाल्यानंतर त्या दोघात नोकराच्या माध्यमातून जो पत्र व्यवहार होतो तो आजच्या मोबाईल चॅटिंग पेक्षाही प्रभावी वाटतो. रोज मिलीला वरच्या मजल्यावरून खालच्या मजल्यावर गुलदस्ता पाठवणारा अमिताभ एका चिठ्ठीत लिहितो `जो गुलदस्ता बनके खुद आ जाऊ तो कहा रखुं . ` हे रोमँटिसिझम खूप वरच्या स्तराचं होतं. अमर्याद दुःखाची वीण घट्ट करत जाताना किशोर कुमारच्या दर्दभऱ्या स्वरात `बडी सुनी, सुनी है जिंदगी ये जिंदगी` आणि `आये तुम याद मुझे गाने लगी हर धडकन` ही दोन गाणी वातावरण औदासिन्यानं भरून टाकतात. मनाचा चांगला पण लहानपणी आई वडिलांच्या बाबतीत घडलेल्या घटनेने आणि लोकांनी त्याकरिता डिवचल्यानं कच खाल्लेला, प्रेमाची आस लागलेला एक तरुण अमिताभने लाजवाब रंगवला होता. या पुस्तकाच्या रंजकतेत भर टाकणारा आणखी एक घटक म्हणजे लेखकाचे आत्मचरित्रात्मक निवेदन. प्रत्येक चित्रपटाच्या बाबतीत तो चित्रपट त्यांनी केव्हा पाहिला, कुणाबरोबर पाहिला,त्यावेळी ते किती वर्षांचे होते आणि त्या चित्रपटाचा त्यांच्या भावविश्वावर कसा परिणाम झाला याचा उल्लेख जागजागी केलेला आहे. लेखकाच्या पिढीतील वाचकांना यातून पुनः प्रत्ययाचा आनंद मिळतो. आणि आजच्या पिढीतील इतर वाचकांसाठीही ही बाब रंजक ठरते. पुस्तकाच्या मलपृष्ठावर लेखक म्हणतात, `1973 साली आम्ही पाचवीत असताना आम्हाला प्रथमच हिंदी सिनेमातील नायकाची `ये पोलीस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नही`, अशी आगळीवेगळी मिजास पडद्यावर बघायला मिळाली आणि आता निवृत्तीला आलो तर हाच अद्भुत माणूस आम्हाला `पिंक` या महिलाप्रधान सिनेमात `ना का मतलब सिर्फ ना होता है`, असं ठणकावतो, `बदला` ह्या रहस्यपटात तितक्याच जोरकसपणे `सबका सच अलग अलग होता है ,` असं तत्वज्ञान मांडतो आणि अगदी अलीकडच्या `झुंड` मध्ये झोपडपट्टीतील धटिंगण मुलांच्या घोळक्याला `झुंड नाही, टीम... `म्हणायची शिकवण देतो तेव्हा आजही त्याचं म्हणणं आमच्या हृदयात थेट उतरतं .` पुस्तक वाचत असताना लेखकाच्या अफाट निरीक्षणशक्तीचे आणि अभ्यासू वृत्तीचे दर्शन घडते . विविध दिग्दर्शकांनी अमिताभच्या अभिनयक्षमतेचा केलेला वापर , अमिताभच्या डोळ्यातून सशक्तपणे व्यक्त झालेले हृदयस्पर्शी भाव, वेगवेगळ्या चित्रपटात त्याने केलेला लाथेचा उपयोग, त्याची वैशिष्ट्यपूर्ण नृत्य, आणि भारदस्त आवाजातील संवाद आणि गाणी यांचं वर्णन वाचत असताना लेखकाची संशोधक वृत्ती तर जाणवतेच परंतु आपणही हे चित्रपट पाहून हा रसास्वाद घ्यायलाच हवा ही इच्छा वाचकांच्या मनात प्रकर्षाने निर्माण होते.यातच या पुस्तकाचे फार मोठे यश सामावले आहे हे नक्की! ...Read more

SAAD GHALATO KALAHARI
SAAD GHALATO KALAHARI by MARK & DELIA OWENS Rating Star
मोहन देशपांडे नागपुर

cry of kalahari ह्या पुस्तके अनुवाद हिंदी सर्वोत्तम (RD) मध्ये कित्येक वर्षापूर्वी वाचले होते. माझ्याजवळ, जपून ठेवलेल्या पुस्तकामधे ते पुस्तक गहाळ झाले. मग 4 वर्षापूर्वी हे पुस्तक मिळाले व विकत घेतले. ते अनेक वेळा वाचून काढले, तरी प्रत्येकवेळी वेगळा नंद होतो. ती तुमची रसाळ भाषेची किमया. ह्या मुळेच Deceiption valley एकदा तरी बघता यावी ही इच्छा तुमचे अभिनंदन व धन्यवाद... ...Read more