* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: SAHITYIKACHA GAON
  • Availability : Available
  • ISBN : 9788177661002
  • Edition : 3
  • Publishing Year : FEBRUARY 2004
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 136
  • Language : MARATHI
  • Category : LITERATURE
  • Available in Combos :ANAND YADAV COMBO SET-33 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
YOU AND ME, EVERYONE IS THE MEMBER OF SAME SOCIETY, SO ARE THOUSAND OTHERS. BUT, A VERY FEW POSSESS A MIND WHICH IS SENSITIVE, CONTEMPLATIVE AND EMOTIONAL TOO. THIS IS SURELY A MIND OF A WRITER. THE THINGS WHICH WE CONSIDER AS VERY SIMPLE ARE NOT SO IN THE EYES OF A WRITER. WHAT WE FAIL TO NOTICE IN THE SIMPLE MODES AND ASPECTS OF LIFE HAVE A HIDDEN POWER IN THEM, HIDDEN MEANING IN THEM. IT IS THE WRITER WHO FINDS A MEANING FAVOURABLE TO THE SOCIETY IN THE SIMPLE THINGS AROUND US. HE CONTEMPLATES OVER THEM, AS THEY TOUCH VERY DEEPLY HIS EMOTIONAL SENSITIVE MIND. MANY A TIMES, IT IS SEEN THAT THE ROUTINE CULTURAL AND TRADITIONAL EVENTS HAVE LOST THEIR TRUE MEANING OVER THE PERIOD OF TIME. THE TURN THE RITUALS AND THE FESTIVALS TAKE ARE SOMETIMES NOT SO ELEGANT. ON THE CONTRARY, THEY TEND TO BE HIDEOUS IN A WAY OR OTHER. BUT A CONTEMPLATIVE MIND GOES BEYOND THE RITES AND RITUALS, TRIES TO FIND THE ORIGIN OF THE RITUALS, THE CULTURES, AND THE IDEAS BEHIND HAVING THEM. ONCE THE IDEA IS KNOWN THEN THE SAME SIMPLE RITUALS, FESTIVALS ARE BATHED IN A CERTAIN AURA. WE LOVE THE SIMPLEST OF THEM ALL. ONCE THIS MEANING IS MADE CLEAR THEN OUR MIND ENRICHES WITH THE VERY THOUGHT OF THEM. AN INQUISITIVE PERSONALITY OFTEN WONDERS ABOUT THE ORIGIN, BIRTH PLACE, THE EVENTS AND THE SURROUNDINGS OF A LITERATURE. THIS INQUISITIVENESS MAKES IT POSSIBLE FOR ANY PERSON TO QUENCH THE THIRST AND TO FIND THE SECRETS OF BIRTH OF LITERATURE. ONE ALSO COMES ACROSS TO KNOW THE FATHER OF LITERATURE BETTER. ONE FINDS IMMENSE PLEASURE IN KNOWING THE SECRETS. THE STORIES UNDER THIS COLLECTION ARE BASED ON SOCIETY, CULTURE AND LITERATURE. THESE WILL NOT ONLY GIVE THE READERS IMMENSE PLEASURE WHILE LEADING LIFE BUT THEY WILL MAKE EVERYONE THINK, AT LEAST FOR SOME TIME.
समाजात वावरणारं साहित्यिकाचं मन सामान्यांपेक्षा अधिक संवेदनशील, चिंतनशील आणि भावनाशील असतं. त्यामुळं इतरांना साध्या, सरळ वाटणाऱ्या घटनाही साहित्यिकाला मात्र सामाजिक दृष्ट्या अधिक अर्थपूर्ण वाटतात. त्यांच्यावर तो अधिक गंभीरपणे चिंतन करतो. त्याच्या भावनाशील मनाला त्या अधिक खोलवर भिडतात. पुष्कळ वेळा पारंपरिक संदर्भ असलेल्या, सणादी सांस्कृतिक संदर्भ असलेल्या नेहमीच्या घटनांचा महत्त्वाचा उदात्त संदर्भ जनलोक हरवतात. त्यामुळे त्या सणांना विकृती, विपरीत गती प्राप्त झालेली असते. त्या विकृतिविपरीत गतीच्या पलीकडे जाणीवपूर्वक जाऊन त्या सणांचे मूळ जन्मप्रयोजन विचारी मन शोधते. प्रयोजन कळले की साधे सणही श्रीमंत आणि जिवंत वाटू लागतात. मग ते हवेहवेसे वाटतात. त्यांचे जिवलग, घनिष्ठ नाते संस्कार हरवलेल्या आपल्या मनाला कळते आणि मनही सजग, समृद्ध होते. चांगल्या साहित्याच्या र्निमितीच्या प्रत्यक्षातील जन्मखुणा, घटनास्थळे यांच्याविषयीची जिज्ञासा सुजाणसुशिक्षित माणसाला सतत असते. त्या जिज्ञासापूर्तीमुळे साहित्यकृतींची जन्मरहस्ये कळतात, जन्मदात्या साहित्यिकाच्या वृत्तिप्रवृत्ती समजतात. जिज्ञासापूर्तीचा निखळ आनंद मिळतो. प्रस्तुत संग्रहात याच (समाज, संस्कृती आणि साहित्य) तीन पैलूंवर आधारित लालित्यपूर्ण शब्दशिल्पे आणि रंगचित्रे समाविष्ट आहेत. रसिकांना ती अंतर्मुख करतील, जगण्याचे उत्कट क्षण देतील, अनुभवसमृद्ध करतील.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#झोंबी #(महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार १९८८-८९) #(महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार १९८८-८९) #(दि फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स -उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार १९८९) #(मारवाडी संमेलन पुरस्कार १९९०) # (साहित्य अकादमी पुरस्कार १९९०) #(प्रवरानगर - विखेपाटील पुरस्कार १९९१) #(संजीवनी साहित्य पुरस्कार, कोपरगाव १९९४) # नांगरणी # (रोहमारे ग्रामीण पुरस्कार १९९०) #घरभिंती #काचवेल #माऊली # (कालीमाता साहित्य पुरस्कार १९८६ #परिमल लेखन पुरस्कार १९८६ # नटरंग #(महाराष्ट्र राज्य पुरस्कार १९८२) # गोतावळा # शेवटची लढाई #(राज्य पुरस्कार २००१-०२) #भूमिकन्या #झाडवाटा # उगवती मने #(राज्य पुरस्कार २००२-०३) # आदिताल # डवरणी #माळावरची मैना # घरजावई #खळाळ #उखडलेली झाडं #सैनिक हो, तुमच्यासाठी... #मळ्याची माती #मायलेकरं #साहित्यिकाचा गाव #मातीखालची माती #स्पर्शकमळे #पाणभवरे #साहित्यिक जडण-घडण # ग्रामसंस्कृती #(रा. ना. सबनीस वाङ्मयपुरस्कार २००२) # मराठी लघुनिबंधाचा इतिहास #साहित्याची निर्मिती प्रक्रिया #ग्रामीणता : साहित्य आणि वास्तव आत्मचरित्र मीमांसा #"ग्रामीण साहित्य : स्वरूप व समस्या #(राज्य पुरस्कार १९८३) # मराठी साहित्य - समाज आणि संस्कृती #१९६० नंतरची सामाजिक स्थिती आणिसाहित्यातील नवे प्रवाह # डॉ. आनंद यादव - एक साहित्यिक प्रवास #ZOMBI #NANGARNI #GHARBHINTI #KACHVEL #MAULI #NATRANG #GOTAVALA #SHEVATCHI LADHAI #BHUMIKANYA #ZADVATA #UGVATI MANE #AADITAL #DAVARNI #MALAVARCHI MAINA #GHARJAWAI #KHALAL #UKHADLELI ZADE #SAINIK HO TUMACHYASATHI #MALYACHI MATI #MAI LEKARA #SAHITYIKACHA GAON #MATIKHALCHI MATI #SPARSHKAMALE #PANBHAVARE #SAHITYIK JADAN-GHADAN #GRAMSANSKRUTI #MARATHI LAGHUNIBANDHACHA ITIHAS #SAHITYACHI NIRMITI PRAKRIYA #GRAMINTA SAHITYA ANI VASTAV #AATMACHARITRA MIMANSA #GRAMIN SAHITYA : SWARUP ANI SAMASYA #1960 NANTARCHI SAMAJIK STHITI ANI SAHITYATEEL NAVE PRAVAH #DR. ANAND YADAV EK SAHITYIK PRAVAS
Customer Reviews
  • Rating StarMAHARASHTRA TIMES 04-04-2004

    अंतमुर्ख करणारे लेखन... आनंद यादव यांचे साहित्यिकाचा गाव हे पुस्तक अंतर्मुख करणारं आहे. यादव यांची अतिशय मनस्वी, सुरेख अशी शब्दकळा गुंगवून टाकते. आपल्या सभोवती सहजतेने घडणाऱ्या विविध घटनांच्या मागे काय दडलंय याचा शोध साहित्यिकाचं मन सतत घेत असतं. त्ामुळेच इतरांना साध्या सरळ वाटणाऱ्या घटना लेखकाला अधिक अर्थपूर्ण, चिंतनीय वाटू शकतात. याची जाणीव यादव यांचे हे ललितलेख वाचल्यावर होते. वरवर साध्या वाटणाऱ्या प्रसंगाच्या निमित्ताने यादव यांनी समाज, संस्कृती आणि साहित्य या माणसाच्या तीन पैलूंवर सुंदर भाष्य केलं आहे. हे पुस्तक वाचकाची जिज्ञासापूर्ती करणारं आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK LOKSATTA 24-10-2004

    अस्वस्थ ग्रामीण चित्रण... समकालीन मराठी साहित्यिकांमध्ये डॉ. आनंद यादव हे एक महत्त्वाचं नाव आहे. ग्रामीण साहित्य हा वाङ्मय प्रकार मराठी साहित्याला नवा आहे, असे नव्हे. पण मराठीतले बहुतेक ग्रामीण कथाकार हे बालपणी खेड्यात, गावात राहिलेले होते. त्यांचे ्रामीण कथाविश्व हे त्यांच्या त्यावेळच्या अनुभवांवर, आठवणींवर आधारलेले म्हणजेच स्मरणरंजनात्मक असे होते. त्यात फक्त भूतकाळ होता. वर्तमानकाळ किंवा अगदी नजिकच्या भूतकाळातील ग्रामीण जीवनाचा त्यांना काही परिचयच नव्हता. कारण शिक्षण, नोकरी, व्यवसाय यासाठी ते जे एकदा शहरात आले, ते कायमचे शहरवासीच झाले. नोकरी व्यवसाय करताकरता ते कथा लिहू लागले. साहित्यिक म्हणून प्रतिष्ठित झाले. परंतु त्यांची ग्रामीण कथा वर्तमानात आलीच नाही. मधल्या कालखंडात देशाच्या, महाराष्ट्राच्या समाजजीवनात फार मोठी स्थित्यंतरं घडली. देश स्वतंत्र झाला, संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला. परकी सत्ता आणि सरंजामदारी समाजव्यवस्था बदलून लोकशाही अवतरली. विविध सरकारी योजना, विकास कार्ये, शेतीच्या तंत्रातले बदल, कारखानदारी यांचे बरे नि वाईट परिणाम ग्रामीण जीवनावरही होऊ लागले. त्या जुन्या प्रतिष्ठित ग्रामीण कथाकारांच्या कथांमध्ये हा बदलता महाराष्ट्र कुठेच दिसेना. कारण त्यांच्या भावविश्वात तो नव्हताच मुळी. त्यांचा ग्रामीण जीवनाशी असलेला संबंध, सुट्टीत गावात जाऊन चार दिवस मौजमजा करण्यापुरताच उरला होता. ही कोंडी फोडून मराठी ग्रामीण कथेत वर्तमानकाळ आणण्याचे काम करणाऱ्या मोजक्या साहित्यिकांमध्ये डॉ. आनंद यादवांचे स्थान अव्वल आहे. यादवही तसे आता शहरवासीच बनलेले आहेत. पण त्यांची ग्रामजीवनाची नाळ अजिबात तुटलेली नाही. उलट अभिजात मराठी साहित्य नि अभिजात इंग्रजी साहित्य यांच्या अध्ययनातून त्यांच्या साहित्यिक जाणिवांची मुळे ग्रामीण मातीत अधिकच घट्टपणे रुजलेली दिसतात. विविध ग्रामीण साहित्यिकांच्या कथांमधून वाचकांच्या डोळ्यासमोर ग्रामीण जीवनाची काही ठराविक चित्रे निर्माण झालेली आहेत. दारिद्र्य, अवकळा, दुष्काळ, लाचारी, वतनदार मंडळींचा मुजोरपणा, लंपटपणा, सण, उत्सव, जत्रा, तमाशे, फरशा, कुऱ्हाडी, दरोडे, हिरवाकंच निसर्ग, प्राणीजीवन, पक्षीजीवन, शिकारी, सुगीच वर्णनं इत्यादी चित्रे आता ठरीव साच्याची बनून गेली आहेत. यादवांच्या कथा-कादंबऱ्यांमध्ये ही चित्रे नसतातच असे नाही; ती असतातच; पण त्यापेक्षाही वेगळे असे काही असते, जे वाचकाला आजच्या ग्रामजीवनाचं नेमकं भान आणून देते. याचे कारण असे की, यादवच ग्रामीण जीवनाकडे नुसते कथालेखनाचा कच्चा माल म्हणून बघत नाहीत. त्यांच्या चिंतनात समग्र समाज, साहित्य आणि मराठी संस्कृती यांचे जे ताणेबाणे विणले जात असतात, तेच शब्दरूपाने कागदावर उतरतात आणि म्हणूनच ते वाचकाच्या मनाला कुठेतरी जाऊन भिडतात. प्रस्तुत ‘साहित्यिकाचा गाव’ हा डॉ. यादवांचा नवा कथासंग्रह रूढार्थाने ग्रामीण कथांचा संग्रह नाही. किंबहुंना यातल्या कथा या कथाही नव्हेत. कथेच्या बाजाने लिहिलेल्या चिंतनात्मक ललित लेखांचा हा संग्रह आहे. माणूस आधुनिक बनला आहे. विज्ञानयुगाने त्याला सर्व सुखसोयी दिल्या आहेत. अगदी खेड्यापाड्यात डांबरी रस्ते सुगीची वर्णनं इत्यादी चित्रे आता ठरवी साच्याची बनून गेली आहेत. यादवांच्या कथा-कादंबऱ्यांमध्ये ही चित्रे नसतातच असे नाही; ती असतातच; पण त्यापेक्षाही वेगळे असे काही असते, जे वाचकाला आजच्या ग्रामजीवनाचं नेमकं भान आणून देते. याचे कारण असे की, यादव ग्रामीण जीवनाकडे नुसते कथालेखनाचा कच्चा माल म्हणून बघत नाहीत. त्यांच्या चिंतनात समग्र समाज, साहित्य आणि मराठी संस्कृती यांचे जे ताणेबाणे विणले जात असतात, तेच शब्दरूपाने कागदावर उतरतात आणि म्हणूनच ते वाचकाच्या मनाला कुठेतरी जाऊन भिडतात. प्रस्तुत ‘साहित्यिकाचा गाव’ हा डॉ. यादवांचा नाव कथासंग्रह रूढार्थाने ग्रामीण कथांचा संग्रह नाही. किंबहुंना यातल्या कथा या कथाही नव्हेत. कथेच्या बाजाने लिहिलेल्या चिंतनात्मक ललित लेखांचा हा संग्रह आहे. माणूस आधुनिक बनला आहे. विज्ञानयुगाने त्याला सर्व सुखसोयी दिल्या आहेत. अगदी खेड्यापाड्यांत डांबरी रस्ते नि वीज पोहोचली आहे. धरणं नि कालव्याच्या पाण्याने ग्रामीण भागातही भौतिक समृद्ध पोहोचली आहे. सध्या यालाच विकास असे म्हणतात. पण हा विकास होत असताना काही चांगले हरवत चालले आहे. माणूस कृत्रिम, पोषाखी आणि आळशी बनतो आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण जीवनातला हा ‘विकास’ लेखकाला अस्वस्थ करतो, ती अस्वस्थता आक्रस्ताळी, राणाभीमदेवी थाटाच्या भाषणांमधून मांडण्याऐवजी लेखक कथेच्या अंगाने इथे मांडतो आहे. एकंदरीत लेखसंग्रह वाचनीय, अस्वस्थ करणारा, ज्याला प्रत्यक्ष काम करायचंय त्याला प्रेरणा देणारा असा आहे. निर्मिती, कोल्हापूर यांनी तयार केलेले मुखपृष्ठ अत्यंत आकर्षक. मेहता प्रकाशनाची निर्मिती सुबक. ...Read more

  • Rating StarDAINIK KESARI 06-06-2004

    ‘साहित्यिकाचा गाव’ : साहित्याची समृद्धी... समाजात वावरणारं साहित्यिकाचं मन सामान्यांपेक्षा अधिक संवेदनशील, चिंतनशील आणि भावनाशील असतं. त्यामुळं इतरांना साध्या सरळ वाटणाऱ्या घटनांही साहित्यिकाला मात्र सामाजिकदृष्ट्या अधिक अर्थपूर्ण वाटतात. त्यांच्याव तो अधिक गंभीरपणे चिंतन करतो. त्याच्या भावनाशील मनाला या अधिक खोलवर भिडतात. सुख-दु:खं, आनंद, विषाद अशा विविध भावना माणसांच्या जीवनात सतत भेटत राहतात. परंतु या सर्व भावना स्वीकारताना साहित्यिकांच्या मनात विवेकाचे एक समंजस भान सतत जागे असते. सामान्य माणसांच्या मनात हिंदोळणारी लसलस येथे भेटत नाही. साहित्यिकांचे मन नियतीने जे दिले आहे, त्यामध्ये तृप्त आहे. त्यामुळे दु:खाचा स्वीकारही येथे अत्यंत समंजसपणाने भेटतो. दु:ख माणसाला जेवढे अंतर्मुख बनवते, तेवढे अन्य काहीही बनवू शकत नाही. अंतर्मुखतेमधून शहाणपण पाझरते. मन प्रगल्भ होते. क्वचित प्रगल्भ मन अवतीभवतीचे दु:खी शोधते. त्यांचे दु:ख कमी करण्याची आस लेखकमनात जागी होते. अलीकडेच प्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक डॉ. आनंद यादव यांच ‘साहित्यिकांचा गाव’ हा ललित संग्रह प्रसिद्ध झाला आहे. १९६० नंतरच्या ग्रामीण साहित्यातील एक महत्त्वाचे नि वाचकप्रिय लेखन म्हणून आपण यादवांच्या साहित्यकृतीकडे पाहतो. ‘झोंबी, नांगरणी, घरभिंती, काचवेळ तसेच गोतावळा’ या साहित्यकृतींच्या आसपास भटकणारं लेखन सहजपणे ‘साहित्यिकाचा गाव’ या ललित संग्रहात आलं आहे. या संग्रहातले पुरुषार्थ, दसरा, भावा-बहिणींची दिवाळी, पोरमस्तीची होळी, स्नेही, हिरवी साय, साहित्यिकाचा गाव’ हे ललित लेख वाचकांना जीवनाचे एक समृद्ध भान देणारे आहेत. शांत जलाशयात कधी तरी पाण्याच्या प्रवाहात सोडलेले दिवे आपण पाहिलेले असतात. डोळे मिटले, की परत कधी तरी ती तेजाची रांग आपल्या डोळ्यांपुढे सहजपणाने उभी राहते. आनंदाबरोबर आपल्या मनाला निरामयता प्रदान करीत असते. यादवांचे हे लेखन मला शांत प्रवाहात सोडलेल्या दिव्यांसारखे वाटते. पुष्कळवेळा पारंपरिक संदर्भ असलेल्या, सणादि सांस्कृतिक संदर्भ असलेल्या नेहमीच्या घटनांचा महत्त्वाचा उदात्त संदर्भ जनलोक हरवतात. त्यामुळे सणांना विकृती, विपरीत गति प्राप्त झालेली असते. त्या विकृती-विपरीत गतीच्या पलीकडे जाणीवपूर्वक जाऊन त्या सणांचे मूळ जन्म-प्रयोजन विचारी मन शोधते. प्रयोजन कळले, की साधे सणही श्रीमंत अणि जिवंत वाटू लागतात. मग ते हवेहवेसे वाटतात. त्यांचे जिवलग, घनिष्ठ नाते संस्कार हरवलेल्या आपल्या मनाला कळते आणि मनही सजग, समृद्ध होते. चांगल्या साहित्याच्या निर्मितीच्या प्रत्यक्षातील जन्मखुणा, घटनास्थळे यांच्याविषयीची जिज्ञासा सुजाण-सुशिक्षित माणसाला सतत असते. त्या जिज्ञासापूर्तीमुळे साहित्यकृतींची जन्मरहस्ये कळतात. जन्मदात्या साहित्यिकाच्या वृत्ति-प्रवृत्ति समजतात. जिज्ञासापूर्तीचा निखळ आनंद मिळतो. हरपल्या श्रेयाची प्राप्ती करून देत असल्याचा भास करून देणारा हा ललितसंग्रह आहे. मराठी साहित्याची समृद्धी वाढविणारा हा संग्र असून साहित्यिकांच्या भावविश्वाचा हा विस्तार वाचकाला सुखवील, असा विश्वास वाटतो. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more