* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: CRY OF THE KALAHARI
  • Availability : Available
  • Translators : MANDAR GODBOLE
  • ISBN : 9789353174651
  • Edition : 1
  • Publishing Year : JULY 2020
  • Weight : 500.00 gms
  • Pages : 432
  • Language : MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS IS THE STORY OF THE OWENS TRAVEL AND LIFE IN THE KALAHARI DESERT. HERE THEY MET AND STUDIED UNIQUE ANIMALS AND WERE CONFRONTED WITH DANGER FROM DROUGHT, FIRE, STORMS, AND THE ANIMALS THEY LOVED. THIS BEST-SELLING BOOK IS FOR BOTH TRAVELERS AND ANIMAL LOVERS.
‘क्राय ऑफ कालाहारी’ हे पुस्तक म्हणजे कालाहारी वाळवंटात सात वर्षे राहिलेल्या मार्क आणि डेलिया ओवेन्स यांच्या जंगली प्राण्यांच्या सहवासातील अनुभवांवर आधारित कादंबरी आहे. त्याचा मंदार गोडबाले यांनी मराठी अनुवाद केला आहे. बदली कपड्यांचा एक जोड आणि एक दुर्बीण वगळता बाकी विशेष काही न घेता मार्क आणि डेलिया या तरुण अमेरिकन जोडप्याने प्राणिजीवनाचा अभ्यास करण्यासाठी आफ्रिकेचे विमान पकडले. तिथे पोहोचल्यावर एक जुनाट लँडरोव्हर गाडी विकत घेऊन त्यांनी कालाहारी वाळवंटात (डिसेप्शन व्हॅली) खोलवर मजल मारली. ते सात वर्षे त्या परिसरात राहिले. विशेष म्हणजे त्या ठिकाणी कोणीही मानव कधीही गेलेला नव्हता, तिथे ना कोणते रस्ते होते, ना कोणी माणसे. हजारो चौरसमैलांच्या परिसरात पाण्याचा कोणताही स्रोत नव्हता. त्यांच्या आजूबाजूला जे प्राणी होते, त्यांनीही कधी माणूस पाहिला नव्हता.

No Records Found
No Records Found
Keywords
#CRYOFKALAHARI #MARKANDDELIAOWENS #MANDARGODBOLE #HINA #RODAVEL #MAKADIKADICHERAN #DECEPTIONVALLY #BILTONG #VHANDERWESTUIZEN #KORHAN #FLYKACHER #ZIZIFAS #RANCHAR #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #क्रायऑफकालाहारी #मार्कआणिडेलियाओवेन्स #मंदारगोडबाले #हायना #रोंडावेल #मकाडीकाडीचेरण #डिसेप्शनव्हॅली #बिल्टाँग #व्हॅनडरवेस्टुईझेन #कोरहान(पक्षी) #फ्लायकॅचर #झिझीफस #रांचर #मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक
Customer Reviews
  • Rating Starमोहन देशपांडे नागपुर

    cry of kalahari ह्या पुस्तके अनुवाद हिंदी सर्वोत्तम (RD) मध्ये कित्येक वर्षापूर्वी वाचले होते. माझ्याजवळ, जपून ठेवलेल्या पुस्तकामधे ते पुस्तक गहाळ झाले. मग 4 वर्षापूर्वी हे पुस्तक मिळाले व विकत घेतले. ते अनेक वेळा वाचून काढले, तरी प्रत्येकवेळी वेगळा नंद होतो. ती तुमची रसाळ भाषेची किमया. ह्या मुळेच Deceiption valley एकदा तरी बघता यावी ही इच्छा तुमचे अभिनंदन व धन्यवाद... ...Read more

  • Rating Starधवल रामतीर्थकर

    जंगल म्हणजे काय? जंगली प्राण्यांचे, मांसभक्षी प्राण्यांचे घर. वाळवंट म्हणजे काय? सताड मोकळा, अत्यंत कोरडा, पाण्याचे दुर्भिक्ष असलेला प्रदेश अवलिया म्हणजे कोण? मार्क आणि डेलिया ओवेन्स जे आफ्रिकेतल्या कालाहारी वाळवंटात, तुटपुंजी मदतीने जंगली प्राणयांच्या सहवासात राहिले हे पुस्तक नाही तर एक प्रवास आहे, ओवेन्स दाम्पत्यासह. कालाहारी वाळवंटात जिथे मैलोंमैल नुसती सताड बोडकी जमीन पसरलेली असते, जिथली नदी वर्षातील फक्त दोन महिने वाहते, जिथले प्राणीही हा मनुष्य कोणता प्राणी आहे याबद्दल अनभिज्ञ असतात अशा ठिकाणी मार्क आणि डेलिया प्राण्यांचा अभ्यास करण्यासाठी जाण्याचे नाही तर राहण्याचे ठरवतात. एके दिवशी हे प्राण्यांच्या अभ्यासाने हपापलेले दाम्पत्य १२० मैल लांब वसलेल्या मॉन खेड्यातून एक जुनी लॅन्ड रोव्हर गाडी विकत घेतात, त्यात काही कॅन पाणी भरतात, काही दिवस पुरेल एवढे अन्न कोंबतात आणि रस्ता नसलेल्या कालाहारी वाळवंटात आपले नशीब अजमावायला निघतात. आता वाळवंट म्हटलं की पहिली गोष्ट जी डोक्यात येते ते आहे पाणी. हे पाणी जपण्यासाठी, साठवण्यासाठी हे जोडपे काय काय उद्योग करतात ते वाचून आपण जे बादलीभर पाणी अनायासपणे वापरतो त्याबद्दल अचंबा वाटल्याशिवाय राहवत नाही. एका ठिकाणी तर मार्क नमूद करतो की पाण्याचा उत्तम आणि कमीतकमी वापर कसा ते करायचे. (पानाचा फोटो जोडला आहे). मी सांगण्यापेक्षा ज्यांनी अनुभवले आहे त्यांच्याकडून ऐकलेलेच बरे. आता हे पाणी यात फक्त मार्क आणि डेलिया साठी नव्हते. तर यांच्या बाभळीच्या झाडाखाली वसलेल्या कॅम्प वर येणाऱ्या असंख्य पक्षी,रात्री येणारे कोल्हे, तरस आणि सिंह हेही वाटकरी असत. जसे पाणी तसेच अन्न. मॉन खेड्यातून आणलेले अन्न कमीतकमी खाऊन जास्तीत जास्त दिवस कसे टिकवायचे याकडे दोघांचा कल. तपासाची मार्क ताजे मास जमिनीखाली गाडून ठेवायचा ज्यामुळे ते फ्रिज शिवाय जास्त वेळ टिकेल.आता गंमत अशी की यांची कॅम्प ज्या ठिकाणी असते तो बाभळीच्या झाडांचा समूह सोडून चोहीकडे मोकळी जमीन, वाळवंट पसरलेला. त्यामुळे सावलीसाठी पक्षी, प्राणी याच झाडाखाली येणार, म्हणजे यांच्या कॅम्प मध्येच. हळूहळू प्राण्यांना तंबू, माणसे बघून सवय होते आणि चक्क सिंह, तरस आणि कोल्हे यांच्या अन्नाचा चट्टामट्टा करतात किंवा नासधूस करून आरामात निघून जातात. पण मार्क आणि डेलिया फक्त निरीक्षण आणि नोंदी करत राहतात आणि त्या प्राण्यांबरोबर या वाळवंटात एकजीव होऊन जातात. इथून पुढे सुरु होते त्यांची रात्र रात्र जागून प्राण्यांच्या मागावर जाणे, त्यांचे राहणे, वागणे, खाणे, कुटुंब पद्धती, एकमेकातील नाती यांचा अभ्यास करणे आणि नोंदी करणे. हळू हळू त्यांना अर्थसहाय्य मिळू लागते. परिसराचा नीट अभ्यास करण्यासाठी ते एक छोटे विमान खरेदी करतात आणि मग त्यांच्या अभ्यासाला खरी दिशा मिळते. कारण सिंह, तरस यांची हद्द अनेक मैल पसरलेली असते. अनेक वेळा दाट झाडीत जिथे गाडी पोहोचू शकत नाही अशा ठिकाणे ते राहणे पसंद करतात. अशा वेळी हवेतून निरीक्षण केल्याने त्यांना प्राण्याची अचूक जागा समजू लागली आणि अभ्यास अजून खोल जाऊ लागला. प्राण्यांना त्यांची सवय होऊ लागते. धडधडत्या हृदयाने सिंहापासून १० फूट बसून मार्क आणि डेलिया त्यांचे निरीक्षण करतात. एकदा तर एक तरस जवळ येऊन डेलियाच्या केसांचा वास घेऊन जातो. एक सिंह मार्कच्या बुटपाशी येतो आणि चामड्याचा वास घेऊन तो न खाताच निघून जातो. असे अनेक रोमहर्षक दोघांसाठी रोजचेच असतात. हळू हळू जग बदलू लागते, शिकारी मार्क आणि डेलिया च्या ओळखीच्या सिंहाची हत्या करतात. हेही ते दोघात सहन करतात आणि आपले काम चालूच ठेवतात. त्यांच्या अकल्पनीय जगात जर डोकावून पाहायची, कालाहारी वाळवंटात राहण्याची, हिंस्त्र प्राण्यांबरोबर जगण्याची इच्छा असेल तर कालाहारीला जावे, म्हणजेच हे पुस्तक नक्की वाचावे! ...Read more

  • Rating Starमोईन के

    काही दिवसांपासून मी `मार्क नि डेलिया`या जोडप्यासोबत कालाहारी वाळवंटात वास्तव्य करत होतो.`अशा ठिकाणी आम्ही राहत होतो जिथे कोणीही मानव कधीही गेलेला नव्हता,तिथे ना कोणते रस्ते होते, ना कोणी माणसे.`हजारो चौरस मैलांच्या परिसरात पाण्याचा कोणताही स्रोत नव्हं..`हा जोडपं आपला प्राणीशास्त्राचा अभ्यास करत होता नि मी त्यांना फक्त बघत अन् अनुभवतं होतो.`हा `कालाहारी`चा प्रवास खूप काही शिकवणारा नि समृद्ध करणारा होता. या प्रवासात ब्राउन हायना,कोल्हे,सिंह नि इत्यादी विविध प्राण्यांशी ओळख अन् मैत्री झाली,`त्यांच्याबद्दल मार्क नि डेलियांकडून महत्वपूर्ण अशी माहिती मिळाली.जी फारच रोचक नि हटके होती.`या जोडप्याच्या आयुष्यात पावलोपावली येणारी वेगवेगळी संकटे व त्यांनी या संकटावर केलेली यशस्वी मात हे सर्व जणू डोळ्यांनी बघताना,अनुभवताना मी पूर्णपणे यातच गुंतून गेलो होतो..! आता हा प्रवास मी कशाप्रकारे करून आलो ?तर मी हा प्रवास `मार्क&डेलिया ओवेन्स लिखित (Cry Of The Kalahari) म्हणजेच `साद घालतो कालाहारी`या 416 पृष्ठसंख्या असलेल्या पुस्तकातून करून आलो...! `प्राणीशास्त्राचा` अभ्यास नि संशोधन करण्यासाठी आफ्रिकेतील `कालाहारी वाळवंटात`गेलेल्या एका अमेरिकेन जोडप्याने त्यांच अनुभवकथन या अप्रतिम पुस्तकातून वाचकांसमोर आणलं आहे.`आंतराष्ट्रीय स्तरावरील सर्वोच्च खपाच्या या इंग्रजी पुस्तकाचे मराठी अनुवाद`मंदार गोडबोले`यांनी केले असून जे खूपच वाचनीय व उत्तम झाले आहे.`हा अनुवाद वाचताना आपण काही अनुवादित वाचतोय असं अजिबात वाटतं नाही. मला हे पुस्तकं फार आवडलं नि भावून गेलं.`अरण्य,प्राणी, पक्षी नि निसर्गाबद्दल वाचणे मला नेहमीच आवडतं व यामुळेच मला हे पुस्तकं जरा जास्तच आवडलं.`खूपच इंटरेस्टिंग नि माहितीपूर्ण असलेलं हे पुस्तकं वाचकांना सुरुवातीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवतो.`जणू आजूबाजूला घडतं असलेलं घटनाक्रम आपण स्वतःच्या डोळ्यांनी बघतोय असं आपल्याला वाटतं राहतं.`यांनी वेगवेगळ्या प्राण्यांना दिलेले नाव आपल्या ओठांवर सारखे खेळत असतात.लेखकांनी ज्याप्रकारे आपले अनुभव आपल्यासमोर मांडले आहेत ते वाचतांना आपण पूर्णपणे यात हरवून जातो.आपल्याला आजूबाजूचं भान राहतं नाही एवढं नक्की...! आपल्याबरोबर एक बदली कपड्याचा जोड आणि एक दुर्बिण वगळता बाकी विशेष काही न घेता हे तरुण अमेरिकन जोडपं,आफ्रिकेचे विमान पकडतात. ``आफ्रिकेतील एखादा मोठा मांसाहारी प्राणी त्यांना अभ्यासायचा होता, तसा अभ्यास करून त्या संशोधनाचा उपयोग, आफ्रिकेतील प्राणिसंवर्धनाचा एखादा कार्यक्रम हाती घेण्यासाठी करायचा त्या दोघांनी निश्चय केला होता. मानवाच्या पदस्पर्शाने प्रदूषित न झालेली एखादी जागा अजूनही शिल्लक आहे, हे आपल्या डोळ्यांनी बघावे, असेही कदाचित त्या दोघांना वाटत होते." आफ्रिकेत येऊन तिथे एक थर्ड हँड लँड रोव्हर गाडी विकत घेऊन ते कालाहारी वाळवंटात खोलवर मजल मारतात.तिथे ते एकूण सात वर्षे वास्तव्य करतात, अशा ठिकाणी जिथे कोणीही मानव कधीही गेलेला नव्हता, तिथे ना कोणते रस्ते होते, ना कोणी माणसे. हजारो चौरस मैलांच्या परिसरात पाण्याचा कोणताही स्त्रोत नव्हता. या प्रचंड जंगलात ओवेन्स जोडपं आपला प्राणिशास्त्राचा अभ्यास सुरू करतो. त्यांच्या आजूबाजूला जे प्राणी होते त्यांनी कधीही माणूस पाहिला नव्हता. यांच्या सिंहांबरोबरील आणि ब्राऊन हायना, कोल्हे, जिराफ आणि त्यांना भेटलेल्या इतर अनेक प्राण्यांबरोबरचे विविध अनुभव या पुस्तकातून आपल्या समोर येतात.`जे खरंच खूपच रोचक नि वाचनीय आहेत..` मार्क नि डेलियाने तब्बल सात वर्षे नेमकं काय केलं याबद्दल विस्तुत जाणून घ्यायचं असेल तर हे पुस्तकं आवर्जून वाचा.. ...Read more

  • Rating StarAnuradha Pawar

    कालहारी वाळवंटाच्या अत्यंत दुर्गम भागात ,अतिशय अवघड परिस्थितीत, केवळ विलक्षण प्राणी प्रेमासाठी, दुर्दम्य इच्छाशक्तीने सात वर्ष राहिलेल्या जोडप्याची ही चित्तथरारक कथा आहे. वन्यजीवन ,वन्य प्राणी यांचे लेखकाने केलेले अनुभव वाचताना आपणच कालहारी च्या वाळवटात अनुभव घेत आहोत असे वाटते . रहस्यकथे पेक्षाही अत्यंत उत्कंठा लावणारे हे पुस्तक आहे. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
डॉ. जयंत वडतकर.अमरावती

मेळघाटचा एन्सायक्लोपिडीया असलेले निवृत्त वनाधिकारी श्री. रविंद्र वानखडे यांच्या अनुभवांवर आधारित कुलामामाच्या देशात हे पुस्तक वाचले तेव्हापासून या पुस्तकाचे लेखक श्री. जी. बी. देशमुख यांना भेटण्याची इच्छा होती. इच्छाशक्ती असली की योग जुळून येतो असं महणतात. रविंद्र वानखडे सरांच्या माध्यमातूनच तो योग जुळून आला. माझ्या एक पुस्तकाचे प्रकाशन बाबत वानखडे सरांशी चर्चा करीत असताना त्यांनी लेखकाचा संदर्भ दिला व जी.बी. ना भेटून घ्या असे सांगितले. भेट घडून आली. अगदी सहज, घरगुती भेट झाली, गप्पा रंगल्या. यावेळी जी. बी. देशमुख यांनी त्यांचे पहिले पुस्तक महारुद्र मला भेट दिले. आमच्या चर्चेतून आणि आंतरराष्ट्रीय फुटबॉल मथला मराठमोळा झंझावात महारुद्र, हे या पुस्तकाचे शीर्षक वाचून पुस्तकाचा विषय थोडक्यात समजला. लेखकाचे वडील भीमराव देशमुख यांनी फुटबॉलपटू म्हणून गाजविलेल्या कारकीदींचा आढावा या पुस्तकात होता. एका मुलाने आपल्या वडिलांवर लिहिलेले पुस्तक कसे असेल? असा प्रश्न अन पुस्तक, दोन्ही घेऊन घरी आलो. भेट मिळालेले पुस्तक वेळ मिळाला तसे एका बैठकीत वाचून काढले. आता गल्ली गल्लीत जसं क्रिकेट खेळल्या व बघितले जाते तसं स्वातंत्र्य पुर्व काळात वऱ्हाडात फुटबॉल खेळला जात असे. गावागावांत टीम असायच्या, सामने अर्थात स्पर्धा भरवल्या जात असत. स्वातंत्र्यपूर्व काळात अशाच रुपयांमधून चमकत, वऱ्हाडाच्या ग्रामीण भागातील एका खेळाडूने थेट मुंबईतील फुटबॉल क्लब व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मुसंडी मारत आपल्या खेळाचा व व्यक्तीमत्त्वाचा ठसा उमटविला होता. तो काळ होता १९३० ते १९५० चा. त्या वल्लीचे नाव होतं भिमराव देशमुख. जी. बी. देशमुख यांनी त्यांच्या वडिलांवर लिहिलेले महारुद्र पुस्तक काही फक्त भिमराव देशमुख यांची जीवन चरित्र नाही. स्वातंत्र्य मिळण्याच्या साधारण वीस वर्षा पुर्वी ३० ते ५० च्या दशकात आपल्या देशातील खेळाची स्थिती कशी होती. विशेषतः वऱ्हाडाच्या ग्रामीण भागातील स्थिती कशी होती. कुठले खेळ खेळले जात असत. स्पर्धा कशा भरवल्या जात असत. शाळा आणि शिक्षण कसं होतं. आर्थिक स्थिती कशी होती. अमरावती जिल्ह्यातील कोणत्या गावात फुटबॉलच्या नावाजलेल्या टीम होत्या. अमरावती कशी होती याची माहिती सुद्धा या पुस्तकातून वाचायला मिळते. पुस्तकाच्या पहिल्याच प्रकरणात भीमराव यांचे व्यक्तिमत्व कसं होतं हे सांगण्यासाठी लेखकाने बाबा म्हणून जरी त्यांची ओळख करून दिली असली तरी पुढील सर्व प्रकरणातून त्यांनी भीमराव अशा एकेरी उल्लेखातून हे व्यक्तिमत्व साकारले आहे. वऱ्हाडातल्या आपल्या सवयीनुसार प्रसिद्धी पासून दूर राहिलेल्या एका नामवंत फुटबॉलपटूची कारकीर्द व फुटबॉल पश्चात कौटुंबिक कारकीर्द तटस्तपणे मांडण्यात लेखक यशस्वी झाले आहेत हे आधीच सांगून टाकतो. अमरावती जिल्ह्यातील खारतळेगाव येथील फुटबॉलच्या टीम मध्ये भीमराव देशमुख यांची कारकीर्द सुरु झाली. ती १९३० सालापासून त्यावेळी ते जेमतेम विशीत होते. प्रथम शालेय स्पर्धापासून पुढे क्लब स्पर्धा पासून भीमरावने आपल्या खेळाचा ठसा उमटविला हळूहळू ख्याती विदर्भांत पोहोचली, भीमराव यांचा खेळ बघण्यासाठी लोक खास वेळ काढून येऊ लागेल, १९३८-३९ मध्ये विदर्भात झालेल्या काही स्पर्धात मुबंईच्या काही टीम सहभागी झाल्या होत्या, त्यामुळे नावाजलेल्या ब्रिटीश खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळाली. मुंबईच्या इंग्रजांच्या टीमला वऱ्हाडातील भीमराव यांच्या टीमने हरविले. वायएमसिए, मुंबईच्या अलेक्झांडर नावाच्या कप्तानाने भीमरावच्या खेळाने प्रभावित होऊन खारतळेगावच्या चार खेळाडूंना मुंबईच्या टीम कडून खेळण्याचे निमंत्रण दिले. १९४० ला भीमराव सह चार खेळाडू मुंबईत पोहोचले. अलेक्झांडरने त्यांना सराव शिबिरीत घातले. पुढील वर्षात भीमराव वायएमसिए टीम कडून खेळण्यासाठी करारबद्ध झाले. जशा आयपीएल मध्ये आज वेगवेगळ्या टीम खेळतात तसे त्यावेळी मुंबईत फुटबॉलचे क्लब होते. पुढील १० वर्षे अनेक टीम कडून खेळत अनेक स्पर्धा गाजविल्या. भीमराव यांचेवर तेव्हाच्या इंग्रजी वृत्तपत्रांतून रकाने छापले जाऊ लागले. मुंबईतील आपल्या १२ वर्षाच्या कार्यकाळात क्लब स्पर्धामधून त्यांनी ४०० सामने खेळले, तब्बल २५० गोल मारलेत. भीमराव वेगवेगळ्या स्पर्धामधून खेळत मैदान गाजवत होते. त्यातूनच १९४८ च्या ऑलम्पिक स्पर्धेच्या टीम मध्ये निवड झाली मात्र एका सराव सामन्यात पाय फॅक्चर झाल्याने देशाकडून खेळण्याची संधी हुकली. पुढील वर्षात भीमराव हे भारतीय टीम सोबत मलेशिया, कंबोडिया, इंडोनेशिया, म्यानमार, फिलिपिन्स, हाँगकाँग, थायलंड अशा देशात खेळले, या दौऱ्यातील २० पैकी १९ सामने जिंकले. भीमराव आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू झाले होते. इतके खेळून भीमराव यांचेकडे आर्थिक नियोजन नसल्याने परिस्थिती जेमतेमच होती. अशातच १९५१ साली त्यांनी निवृत्ती घेतली. अमरावती मध्ये परत आल्यावर त्यांनी आपला संसार थाटला, आर्थिक पाठबळ नसल्याने फुटकळ व्यवसाय केले. मात्र मी कधीकाळी आंतरराष्ट्रीय खेळाडू होते याचा कधी उल्लेख सुद्धा केला नाही, प्रसिद्धी पासून ते कायमच दूर राहिले. या काळात भीमराव यांच्या पत्नी अंजीरा यांनी जबाबदारीनं संसार सांभाळला. मुलांना मोठे केले. भीमराव शेवटपर्यंत मेहनत करीत राहिले. समाजात चांगले स्थान निर्माण केले. मात्र ते इतके मोठे फुटबॉलपटू होते ते अमरावतीकरांना काही माहिती झाले नाही. भीमराव यांच्या निधनानंतर या आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूचे कार्य पुढील पिढीला माहित व्हावे या उद्देशाने जी. बी. देशमुख यांनी या पुस्तकातून आपल्या तीर्थरुपांचे भावचित्र अगदी सोप्या सरळ भाषेत शब्दबद्ध करून महारुद्र च्या रूपाने वाचकांसमोर ठेवले. या लिखाणासाठी त्यांनी मुंबईत जाऊन त्या काळातील टाईम्स वृत्तपत्रांतील भीमराव यांचा उल्लेख असलेली कात्रणे मिळविली, त्यांच्या समवेत खेळलेल्या खेळाडूंना व पत्रकारांना भेटले, अमरावती मधील त्यांच्या समवयस्क परिचितांकडून त्यांची माहिती गोळा केली. त्यासाठी त्यांनी अथक अशी मेहनत घेतली. व २००५ साली हे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकाच्या पुढील आवृत्ती मेहता प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केल्याने ते पुस्तक महाराष्ट्रभर पोहोचले. या निमित्त्याने भीमराव यांचे कार्य, त्यांचा फुटबॉल खेळातील झंझावात मराठी माणसाला माहिती झाला. अमरावतीकर या नात्याने मला तर आपल्या मातीतील माणूस त्या काळात आंतरराष्ट्रीय पातळीवर झेंडा गाडून आल्याचा अभिमान वाटला. अशा अनेक अर्थाने महारुद्र महत्वाचे आहे. ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
सलिल तांबे

ज्यांना गोष्टींची आवड आहे अशा मुलांसाठी ही मेजवानी आहेच, पण आपल्या पाल्यांमध्ये संवेदनशीलता आणि निसर्गाप्रती आदर जोपासण्यासाठी मोठ्यांनीही हे पुस्तक वाचायला हवे. प्रदूषणाविरुद्ध लहान हातांनी दिलेला लढा असो किंवा निसर्गाचा खरा आनंद पिशवीत भरून आणण्यापक्षा मनात कसा साठवावा, हे सांगणारा दृष्टिकोन असो; हे पुस्तक प्रत्येक वाचकाला समृद्ध करते. पुस्तकातील प्रत्येक कथा संपताना आपल्याला जगण्याकडे बघण्याची एक नवी दृष्टी देऊन जाते. यातलं काही गूढ, काही थरार आणि खूप सारे हळवे प्रसंग अनुभवण्यासाठी तुम्हाला हे पुस्तक स्वतः वाचायलाच हवं. म्हणूनच, आपल्या संग्रही असावा असा हा `हाटूमुटूचा चंद्र` तुम्ही एकदा नक्की अनुभवा! चला तर मग, आपणही शोधूया आपला स्वतःचा ‘हाटूमुटूचा चंद्र’! ...Read more