* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: CRY OF THE KALAHARI
  • Availability : Available
  • Translators : MANDAR GODBOLE
  • ISBN : 9789353174651
  • Edition : 1
  • Publishing Year : JULY 2020
  • Weight : 500.00 gms
  • Pages : 432
  • Language : MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS IS THE STORY OF THE OWENS TRAVEL AND LIFE IN THE KALAHARI DESERT. HERE THEY MET AND STUDIED UNIQUE ANIMALS AND WERE CONFRONTED WITH DANGER FROM DROUGHT, FIRE, STORMS, AND THE ANIMALS THEY LOVED. THIS BEST-SELLING BOOK IS FOR BOTH TRAVELERS AND ANIMAL LOVERS.
‘क्राय ऑफ कालाहारी’ हे पुस्तक म्हणजे कालाहारी वाळवंटात सात वर्षे राहिलेल्या मार्क आणि डेलिया ओवेन्स यांच्या जंगली प्राण्यांच्या सहवासातील अनुभवांवर आधारित कादंबरी आहे. त्याचा मंदार गोडबाले यांनी मराठी अनुवाद केला आहे. बदली कपड्यांचा एक जोड आणि एक दुर्बीण वगळता बाकी विशेष काही न घेता मार्क आणि डेलिया या तरुण अमेरिकन जोडप्याने प्राणिजीवनाचा अभ्यास करण्यासाठी आफ्रिकेचे विमान पकडले. तिथे पोहोचल्यावर एक जुनाट लँडरोव्हर गाडी विकत घेऊन त्यांनी कालाहारी वाळवंटात (डिसेप्शन व्हॅली) खोलवर मजल मारली. ते सात वर्षे त्या परिसरात राहिले. विशेष म्हणजे त्या ठिकाणी कोणीही मानव कधीही गेलेला नव्हता, तिथे ना कोणते रस्ते होते, ना कोणी माणसे. हजारो चौरसमैलांच्या परिसरात पाण्याचा कोणताही स्रोत नव्हता. त्यांच्या आजूबाजूला जे प्राणी होते, त्यांनीही कधी माणूस पाहिला नव्हता.

No Records Found
No Records Found
Keywords
#CRYOFKALAHARI #MARKANDDELIAOWENS #MANDARGODBOLE #HINA #RODAVEL #MAKADIKADICHERAN #DECEPTIONVALLY #BILTONG #VHANDERWESTUIZEN #KORHAN #FLYKACHER #ZIZIFAS #RANCHAR #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #क्रायऑफकालाहारी #मार्कआणिडेलियाओवेन्स #मंदारगोडबाले #हायना #रोंडावेल #मकाडीकाडीचेरण #डिसेप्शनव्हॅली #बिल्टाँग #व्हॅनडरवेस्टुईझेन #कोरहान(पक्षी) #फ्लायकॅचर #झिझीफस #रांचर #मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक
Customer Reviews
  • Rating Starमोहन देशपांडे नागपुर

    cry of kalahari ह्या पुस्तके अनुवाद हिंदी सर्वोत्तम (RD) मध्ये कित्येक वर्षापूर्वी वाचले होते. माझ्याजवळ, जपून ठेवलेल्या पुस्तकामधे ते पुस्तक गहाळ झाले. मग 4 वर्षापूर्वी हे पुस्तक मिळाले व विकत घेतले. ते अनेक वेळा वाचून काढले, तरी प्रत्येकवेळी वेगळा नंद होतो. ती तुमची रसाळ भाषेची किमया. ह्या मुळेच Deceiption valley एकदा तरी बघता यावी ही इच्छा तुमचे अभिनंदन व धन्यवाद... ...Read more

  • Rating Starधवल रामतीर्थकर

    जंगल म्हणजे काय? जंगली प्राण्यांचे, मांसभक्षी प्राण्यांचे घर. वाळवंट म्हणजे काय? सताड मोकळा, अत्यंत कोरडा, पाण्याचे दुर्भिक्ष असलेला प्रदेश अवलिया म्हणजे कोण? मार्क आणि डेलिया ओवेन्स जे आफ्रिकेतल्या कालाहारी वाळवंटात, तुटपुंजी मदतीने जंगली प्राणयांच्या सहवासात राहिले हे पुस्तक नाही तर एक प्रवास आहे, ओवेन्स दाम्पत्यासह. कालाहारी वाळवंटात जिथे मैलोंमैल नुसती सताड बोडकी जमीन पसरलेली असते, जिथली नदी वर्षातील फक्त दोन महिने वाहते, जिथले प्राणीही हा मनुष्य कोणता प्राणी आहे याबद्दल अनभिज्ञ असतात अशा ठिकाणी मार्क आणि डेलिया प्राण्यांचा अभ्यास करण्यासाठी जाण्याचे नाही तर राहण्याचे ठरवतात. एके दिवशी हे प्राण्यांच्या अभ्यासाने हपापलेले दाम्पत्य १२० मैल लांब वसलेल्या मॉन खेड्यातून एक जुनी लॅन्ड रोव्हर गाडी विकत घेतात, त्यात काही कॅन पाणी भरतात, काही दिवस पुरेल एवढे अन्न कोंबतात आणि रस्ता नसलेल्या कालाहारी वाळवंटात आपले नशीब अजमावायला निघतात. आता वाळवंट म्हटलं की पहिली गोष्ट जी डोक्यात येते ते आहे पाणी. हे पाणी जपण्यासाठी, साठवण्यासाठी हे जोडपे काय काय उद्योग करतात ते वाचून आपण जे बादलीभर पाणी अनायासपणे वापरतो त्याबद्दल अचंबा वाटल्याशिवाय राहवत नाही. एका ठिकाणी तर मार्क नमूद करतो की पाण्याचा उत्तम आणि कमीतकमी वापर कसा ते करायचे. (पानाचा फोटो जोडला आहे). मी सांगण्यापेक्षा ज्यांनी अनुभवले आहे त्यांच्याकडून ऐकलेलेच बरे. आता हे पाणी यात फक्त मार्क आणि डेलिया साठी नव्हते. तर यांच्या बाभळीच्या झाडाखाली वसलेल्या कॅम्प वर येणाऱ्या असंख्य पक्षी,रात्री येणारे कोल्हे, तरस आणि सिंह हेही वाटकरी असत. जसे पाणी तसेच अन्न. मॉन खेड्यातून आणलेले अन्न कमीतकमी खाऊन जास्तीत जास्त दिवस कसे टिकवायचे याकडे दोघांचा कल. तपासाची मार्क ताजे मास जमिनीखाली गाडून ठेवायचा ज्यामुळे ते फ्रिज शिवाय जास्त वेळ टिकेल.आता गंमत अशी की यांची कॅम्प ज्या ठिकाणी असते तो बाभळीच्या झाडांचा समूह सोडून चोहीकडे मोकळी जमीन, वाळवंट पसरलेला. त्यामुळे सावलीसाठी पक्षी, प्राणी याच झाडाखाली येणार, म्हणजे यांच्या कॅम्प मध्येच. हळूहळू प्राण्यांना तंबू, माणसे बघून सवय होते आणि चक्क सिंह, तरस आणि कोल्हे यांच्या अन्नाचा चट्टामट्टा करतात किंवा नासधूस करून आरामात निघून जातात. पण मार्क आणि डेलिया फक्त निरीक्षण आणि नोंदी करत राहतात आणि त्या प्राण्यांबरोबर या वाळवंटात एकजीव होऊन जातात. इथून पुढे सुरु होते त्यांची रात्र रात्र जागून प्राण्यांच्या मागावर जाणे, त्यांचे राहणे, वागणे, खाणे, कुटुंब पद्धती, एकमेकातील नाती यांचा अभ्यास करणे आणि नोंदी करणे. हळू हळू त्यांना अर्थसहाय्य मिळू लागते. परिसराचा नीट अभ्यास करण्यासाठी ते एक छोटे विमान खरेदी करतात आणि मग त्यांच्या अभ्यासाला खरी दिशा मिळते. कारण सिंह, तरस यांची हद्द अनेक मैल पसरलेली असते. अनेक वेळा दाट झाडीत जिथे गाडी पोहोचू शकत नाही अशा ठिकाणे ते राहणे पसंद करतात. अशा वेळी हवेतून निरीक्षण केल्याने त्यांना प्राण्याची अचूक जागा समजू लागली आणि अभ्यास अजून खोल जाऊ लागला. प्राण्यांना त्यांची सवय होऊ लागते. धडधडत्या हृदयाने सिंहापासून १० फूट बसून मार्क आणि डेलिया त्यांचे निरीक्षण करतात. एकदा तर एक तरस जवळ येऊन डेलियाच्या केसांचा वास घेऊन जातो. एक सिंह मार्कच्या बुटपाशी येतो आणि चामड्याचा वास घेऊन तो न खाताच निघून जातो. असे अनेक रोमहर्षक दोघांसाठी रोजचेच असतात. हळू हळू जग बदलू लागते, शिकारी मार्क आणि डेलिया च्या ओळखीच्या सिंहाची हत्या करतात. हेही ते दोघात सहन करतात आणि आपले काम चालूच ठेवतात. त्यांच्या अकल्पनीय जगात जर डोकावून पाहायची, कालाहारी वाळवंटात राहण्याची, हिंस्त्र प्राण्यांबरोबर जगण्याची इच्छा असेल तर कालाहारीला जावे, म्हणजेच हे पुस्तक नक्की वाचावे! ...Read more

  • Rating Starमोईन के

    काही दिवसांपासून मी `मार्क नि डेलिया`या जोडप्यासोबत कालाहारी वाळवंटात वास्तव्य करत होतो.`अशा ठिकाणी आम्ही राहत होतो जिथे कोणीही मानव कधीही गेलेला नव्हता,तिथे ना कोणते रस्ते होते, ना कोणी माणसे.`हजारो चौरस मैलांच्या परिसरात पाण्याचा कोणताही स्रोत नव्हं..`हा जोडपं आपला प्राणीशास्त्राचा अभ्यास करत होता नि मी त्यांना फक्त बघत अन् अनुभवतं होतो.`हा `कालाहारी`चा प्रवास खूप काही शिकवणारा नि समृद्ध करणारा होता. या प्रवासात ब्राउन हायना,कोल्हे,सिंह नि इत्यादी विविध प्राण्यांशी ओळख अन् मैत्री झाली,`त्यांच्याबद्दल मार्क नि डेलियांकडून महत्वपूर्ण अशी माहिती मिळाली.जी फारच रोचक नि हटके होती.`या जोडप्याच्या आयुष्यात पावलोपावली येणारी वेगवेगळी संकटे व त्यांनी या संकटावर केलेली यशस्वी मात हे सर्व जणू डोळ्यांनी बघताना,अनुभवताना मी पूर्णपणे यातच गुंतून गेलो होतो..! आता हा प्रवास मी कशाप्रकारे करून आलो ?तर मी हा प्रवास `मार्क&डेलिया ओवेन्स लिखित (Cry Of The Kalahari) म्हणजेच `साद घालतो कालाहारी`या 416 पृष्ठसंख्या असलेल्या पुस्तकातून करून आलो...! `प्राणीशास्त्राचा` अभ्यास नि संशोधन करण्यासाठी आफ्रिकेतील `कालाहारी वाळवंटात`गेलेल्या एका अमेरिकेन जोडप्याने त्यांच अनुभवकथन या अप्रतिम पुस्तकातून वाचकांसमोर आणलं आहे.`आंतराष्ट्रीय स्तरावरील सर्वोच्च खपाच्या या इंग्रजी पुस्तकाचे मराठी अनुवाद`मंदार गोडबोले`यांनी केले असून जे खूपच वाचनीय व उत्तम झाले आहे.`हा अनुवाद वाचताना आपण काही अनुवादित वाचतोय असं अजिबात वाटतं नाही. मला हे पुस्तकं फार आवडलं नि भावून गेलं.`अरण्य,प्राणी, पक्षी नि निसर्गाबद्दल वाचणे मला नेहमीच आवडतं व यामुळेच मला हे पुस्तकं जरा जास्तच आवडलं.`खूपच इंटरेस्टिंग नि माहितीपूर्ण असलेलं हे पुस्तकं वाचकांना सुरुवातीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवतो.`जणू आजूबाजूला घडतं असलेलं घटनाक्रम आपण स्वतःच्या डोळ्यांनी बघतोय असं आपल्याला वाटतं राहतं.`यांनी वेगवेगळ्या प्राण्यांना दिलेले नाव आपल्या ओठांवर सारखे खेळत असतात.लेखकांनी ज्याप्रकारे आपले अनुभव आपल्यासमोर मांडले आहेत ते वाचतांना आपण पूर्णपणे यात हरवून जातो.आपल्याला आजूबाजूचं भान राहतं नाही एवढं नक्की...! आपल्याबरोबर एक बदली कपड्याचा जोड आणि एक दुर्बिण वगळता बाकी विशेष काही न घेता हे तरुण अमेरिकन जोडपं,आफ्रिकेचे विमान पकडतात. ``आफ्रिकेतील एखादा मोठा मांसाहारी प्राणी त्यांना अभ्यासायचा होता, तसा अभ्यास करून त्या संशोधनाचा उपयोग, आफ्रिकेतील प्राणिसंवर्धनाचा एखादा कार्यक्रम हाती घेण्यासाठी करायचा त्या दोघांनी निश्चय केला होता. मानवाच्या पदस्पर्शाने प्रदूषित न झालेली एखादी जागा अजूनही शिल्लक आहे, हे आपल्या डोळ्यांनी बघावे, असेही कदाचित त्या दोघांना वाटत होते." आफ्रिकेत येऊन तिथे एक थर्ड हँड लँड रोव्हर गाडी विकत घेऊन ते कालाहारी वाळवंटात खोलवर मजल मारतात.तिथे ते एकूण सात वर्षे वास्तव्य करतात, अशा ठिकाणी जिथे कोणीही मानव कधीही गेलेला नव्हता, तिथे ना कोणते रस्ते होते, ना कोणी माणसे. हजारो चौरस मैलांच्या परिसरात पाण्याचा कोणताही स्त्रोत नव्हता. या प्रचंड जंगलात ओवेन्स जोडपं आपला प्राणिशास्त्राचा अभ्यास सुरू करतो. त्यांच्या आजूबाजूला जे प्राणी होते त्यांनी कधीही माणूस पाहिला नव्हता. यांच्या सिंहांबरोबरील आणि ब्राऊन हायना, कोल्हे, जिराफ आणि त्यांना भेटलेल्या इतर अनेक प्राण्यांबरोबरचे विविध अनुभव या पुस्तकातून आपल्या समोर येतात.`जे खरंच खूपच रोचक नि वाचनीय आहेत..` मार्क नि डेलियाने तब्बल सात वर्षे नेमकं काय केलं याबद्दल विस्तुत जाणून घ्यायचं असेल तर हे पुस्तकं आवर्जून वाचा.. ...Read more

  • Rating StarAnuradha Pawar

    कालहारी वाळवंटाच्या अत्यंत दुर्गम भागात ,अतिशय अवघड परिस्थितीत, केवळ विलक्षण प्राणी प्रेमासाठी, दुर्दम्य इच्छाशक्तीने सात वर्ष राहिलेल्या जोडप्याची ही चित्तथरारक कथा आहे. वन्यजीवन ,वन्य प्राणी यांचे लेखकाने केलेले अनुभव वाचताना आपणच कालहारी च्या वाळवटात अनुभव घेत आहोत असे वाटते . रहस्यकथे पेक्षाही अत्यंत उत्कंठा लावणारे हे पुस्तक आहे. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more