* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: GRAMINTA SAHITYA ANI VASTAV
  • Availability : Available
  • ISBN : 9788171612697
  • Edition : 3
  • Publishing Year : MAY 1981
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 164
  • Language : MARATHI
  • Category : REFERENCE AND GENERAL
  • Available in Combos :ANAND YADAV COMBO SET-33 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE CULTURAL ROOT OF INDIA IS HIDDEN IN ITS VILLAGE LIFE. THE EXISTENCE OF VILLAGES CAN BE TRACED BACK TO THE VEDA ERA OF INDIA. THE VILLAGES HAVE PRESERVED THE AGE-OLD CULTURE. GOVERNMENT SCHEMES HAVE HELPED VILLAGES GAIN SOME POPULARITY. WITH THE AWAKENING OF MINDS IN THE LIGHT OF DEMOCRACY, LITTÉRATEURS FROM RURAL AREAS STARTED CONTRIBUTING. ESPECIALLY AFTER 1960, THERE WAS A CONSIDERABLE AMOUNT OF THOUGHTS PENNED DOWN BY THEM. TODAY, THEY ARE TRUDGING ALONG A FRESH PATH. THE NEW PATH IS ALSO CREATING QUESTIONS REGARDING PROBLEMS ON THE BACKGROUND OF VILLAGES. THIS LITERATURE IS AT TIMES CRITICIZED ON THE BASIS OF ITS RURAL BACKGROUND. LITERATURE BASED ON RURAL BACKGROUND IS CLOSELY RELATED TO SOCIAL REALITIES. THIS BOOK EXPLORES VARIOUS ASPECTS LIKE THE ROOT CAUSE OF PROBLEMS RELATED TO LITERATURE, VILLAGES AND CITIES OR TOWNS IN ITS RELATION, ETC. IT ALSO DISCUSSES THE CULTURAL AND PHILOSOPHICAL ASPECTS.
भारतीय संस्कृतीचे मूळ क्षेत्र ग्रामजीवन हे आहे. भारतीय खेडी ही शहरांच्याही अगोदरची असून वेदकाळापासून आQस्तत्वात आहेत. हजारो वर्षे आQस्तत्वात असलेल्या या खेड्यांतून आजही लोकसंस्कृतीचे झरे वाहताना दिसतात. भारतीय स्वातंत्र्योत्तर काळात ग्रामजीवनाला सरकारी पातळीवर कागदोपत्री तरी चांगले दिवस आले. लोकशाही आली आणि खेडी जागी होऊ लागली. या जागृतीची एक खूण म्हणजे एकोणीसशे साठनंतरचे ग्रामीण साहित्य होय. आज ते नव्या उन्मेषाने अवतरू पाहते आहे. या नव्या वाटचालीत ग्रामीण साहित्याविषयीचे अनेक प्रश्न निर्माण होतात, उपाQस्थत केले जातात. संक्रमण अवस्थेच्या या काळात अनेक वाङ्मयबाह्य हेतूंनी ग्रामीण साहित्याविषयी गैरसमजही पसरविले जातात. ग्रामीण साहित्य आणि सामाजिक वास्तव यांचा एक अतूट संबंध आरंभापासून आहे. ग्रामीण साहित्यविषयक या विविध प्रश्नांची उत्तरे काय असू शकतील - वाङ्मयीन समस्यांचे तात्त्विक स्वरूप काय असू शकेल - ग्रामीण साहित्य आणि खेडे यांचा संबंध कोणत्या प्रकारचा आहे - शहर आणि ग्रामीण साहित्य यांचे नाते काय - इत्यादी विविध प्रश्नांची, समस्यांची, संबंधांची, कसांची वाङ्मयीन आणि सांस्कृतिकदृष्ट्या तात्त्वक मूलगामी चर्चा करणारा हा ग्रंथ आहे.
राज्य पुरस्कार १९८३
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#झोंबी #(महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार १९८८-८९) #(महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार १९८८-८९) #(दि फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स -उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार १९८९) #(मारवाडी संमेलन पुरस्कार १९९०) # (साहित्य अकादमी पुरस्कार १९९०) #(प्रवरानगर - विखेपाटील पुरस्कार १९९१) #(संजीवनी साहित्य पुरस्कार, कोपरगाव १९९४) # नांगरणी # (रोहमारे ग्रामीण पुरस्कार १९९०) #घरभिंती #काचवेल #माऊली # (कालीमाता साहित्य पुरस्कार १९८६ #परिमल लेखन पुरस्कार १९८६ # नटरंग #(महाराष्ट्र राज्य पुरस्कार १९८२) # गोतावळा # शेवटची लढाई #(राज्य पुरस्कार २००१-०२) #भूमिकन्या #झाडवाटा # उगवती मने #(राज्य पुरस्कार २००२-०३) # आदिताल # डवरणी #माळावरची मैना # घरजावई #खळाळ #उखडलेली झाडं #सैनिक हो, तुमच्यासाठी... #मळ्याची माती #मायलेकरं #साहित्यिकाचा गाव #मातीखालची माती #स्पर्शकमळे #पाणभवरे #साहित्यिक जडण-घडण # ग्रामसंस्कृती #(रा. ना. सबनीस वाङ्मयपुरस्कार २००२) # मराठी लघुनिबंधाचा इतिहास #साहित्याची निर्मिती प्रक्रिया #ग्रामीणता : साहित्य आणि वास्तव आत्मचरित्र मीमांसा #"ग्रामीण साहित्य : स्वरूप व समस्या #(राज्य पुरस्कार १९८३) # मराठी साहित्य - समाज आणि संस्कृती #१९६० नंतरची सामाजिक स्थिती आणिसाहित्यातील नवे प्रवाह # डॉ. आनंद यादव - एक साहित्यिक प्रवास #ZOMBI #NANGARNI #GHARBHINTI #KACHVEL #MAULI #NATRANG #GOTAVALA #SHEVATCHI LADHAI #BHUMIKANYA #ZADVATA #UGVATI MANE #AADITAL #DAVARNI #MALAVARCHI MAINA #GHARJAWAI #KHALAL #UKHADLELI ZADE #SAINIK HO TUMACHYASATHI #MALYACHI MATI #MAI LEKARA #SAHITYIKACHA GAON #MATIKHALCHI MATI #SPARSHKAMALE #PANBHAVARE #SAHITYIK JADAN-GHADAN #GRAMSANSKRUTI #MARATHI LAGHUNIBANDHACHA ITIHAS #SAHITYACHI NIRMITI PRAKRIYA #GRAMINTA SAHITYA ANI VASTAV #AATMACHARITRA MIMANSA #GRAMIN SAHITYA : SWARUP ANI SAMASYA #1960 NANTARCHI SAMAJIK STHITI ANI SAHITYATEEL NAVE PRAVAH #DR. ANAND YADAV EK SAHITYIK PRAVAS
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAKAL 21-11-1982

    ग्रामीण साहित्याचे वादग्रस्त विवेचन… ग्रामीण साहित्य आणि वास्तव हे प्रा. आनंद यादव यांचे ग्रामीण साहित्यविषयक स्वतंत्र भूमिका मांडणारे दुसरे पुस्तक आहे. ग्रामीण साहित्याची निर्मितीप्रक्रिया, याचे वेगळे स्वरूप याविषयी चिंतन करून ग्रामीण साहित्यविषयक ्वत:ची अशी भूमिका आनंद यादव गेली काही वर्ष मांडी ऐतिहासिक, सामाजिक, दलित, चरित्रात्मक, प्रादेशिक ही साहित्यविषयक वर्णनात्मक विशेषणे टीकाकारांनी यापूर्वी स्वीकारली आहेत. साहित्याचे ‘ग्रामीण’ हे विशेषण लेखकाने केवळ स्वीकारलेले नाही तर त्या साहित्यविषयीची स्वतंत्र ठाम पण वादग्रस्त ठरू शकणारी अशी भूमिका त्यांनी ‘ग्रामीणता: साहित्य आणि वास्तव’ या पुस्तकात मांडली आहे. प्रस्तुत पुस्तकात एकूण बारा लेख आहेत. त्यापैकी तीन लेख- पहिला मराठी ग्रामीण कादंबरीकार पिराजी पाटील, मराठी मातीचा पहिला कादंबरीकार र. वा. दिघे, पहिली मराठी ग्रामीण कवयित्री बहिणाबाई चौधरी साहित्याचा परामर्श घेणारे आहेत. अन्य नऊ लेख ‘ग्रामीण साहित्य सवतासुभा आहे काय?’, ‘ग्रामीण साहित्य आणि सामाजिक जाणीव’, ‘मराठी खेडे नवे आणि जुने’, ‘ग्रामीण साहित्य आणि शहरी संस्कार’, ‘ग्रामीण साहित्य आणि बदलते खेडे’, ‘ग्रामीण साहित्याचे टीकाकार’, ‘ग्रामीण हे विशेषण काय अपेक्षिते?’ ‘साहित्यातील ग्रामीणता’, ‘आधुनिक ग्रामीण साहित्याची भूमिका’- ग्रामीण साहित्याच्या स्वरूपाची चर्चा करणारे लेख आहेत. प्रा. स. वि. भावे यांनी या पुस्तकाला लिहिलेल्या प्रस्तावनेत आनंद यादवांच्या वेगळ्या ग्रामीण साहित्यविषयक भूमिकेचे समर्थन केले आहे. स. शि. भावे यांची मते अशी ‘ग्रामीण’ हे विशेषण वर्णनात्मक असून मूल्यमापनात्मक नाही. यादवांचीही तशी भूमिका नाही. ग्रामीण या वर्णनात्मक विशेषणातून ग्रामीण साहित्याचे आकलन होण्यास साहाय्य होईल. एखाद्या लेखकाचे ‘अनुभवविश्व’ व त्याचे मर्म समजल्याशिवाय त्याचे लेखनविश्व समजणार नाही. ग्रामीण हे विशेषण मूल्यमापनात्मक नसूनही त्याचा आग्रह धरला जातो कारण भाषेच्या, साहित्याच्या अभ्यासकांना अध्यापकांना पडणाऱ्या प्रश्नांचा विचार करण्यासाठी या विवेचनाचा उपयोग होणार आहे; असा निर्वाळा देऊन प्रा. स. शि. भावे यांनी साहित्याच्या सांस्कृतिक इतिहासाच्या दृष्टीने निर्माण होणारे काही प्रश्न प्रस्तावनेत अभ्यासकांसमोर ठेवले आहेत. आपण निर्माण केलेल्या प्रश्नांचा विचार करण्यासाठी यादवांचे चिंतन उपयोगी ठरेल, असा विश्वासही स. शि. भावे यांनी प्रस्तावनेत व्यक्त केला आहे. ग्रामीण साहित्याचे स्वरूप समजून घेण्यासाठी, त्याचा अभ्यास करण्यासाठी यादवांचे विवेचन उपयुक्त ठरणारे आहे यात वादच नाही. त्यांच्या विवेचनामागे एका समर्थ कलावंताची चिंतनशीलता आहे, अर्थात त्यांना पडणारे प्रश्न ग्रामीण स्वरूपाची साहित्यनिर्मिती करणाऱ्या सर्वांना पडतीलच असे नाही, परंतु यादवांच्या ग्रामीण साहित्यविषयक भूमिकेचा विचार करताना जे अन्य प्रश्न उपस्थित होतात त्यांचा परामर्श घेतला पाहिजे. ग्रामीण साहित्य वेगळे का? ‘ग्रामीण साहित्य सवतासुभा आहे काय?’ हा या पुस्तकातील महत्त्वाचा असा लेख आहे. ‘जगातील सर्व ललित वाङ्मय एका व्यापक पातळीवरून एकच आहे’- असे सांगून साहित्यातील वैश्विकतेचे स्वरूप लेखकाने विशद केले आहे. लेखक अनुभवांना शब्दरूप देत असतो. अंतिमत: अनुभवांना शब्दरूप देणे, त्याचा अविष्कार करणे हेच कलादृष्ट्या महत्त्वाचे असते. म्हणून साहित्यप्रकार हे अनुभवांच्या आकाराचे विशेष ठरतात. ते अनुभवविशेष नव्हते. अनुभव व्यक्त करणे हेच साहित्यिकांचे अंतिम ध्येय असते, तेव्हा त्या दृष्टीने हे प्रकारही गौणस्थानी जातात. साहित्याच्या विकासाच्या दृष्टीने हे प्रकारही गौणस्थानी जातात. साहित्याच्या विकासाच्या दृष्टीने, त्याची आस्वादकता यथार्थपणे आकलन होण्याच्या दृष्टीने अशा प्रकारच्या वर्गीकरणाची आवश्यकता असते. म्हणूनच साहित्यप्रकारांचे वर्गीकरण नाकारता येत नाही. साहित्याचा वेगळेपणा मानायला काही भौगोलीक आणि सांस्कृतिक कारणे सांगितली जातात. समाजाच्या अनेक प्रकारे झालेल्या विघटनात सांस्कृतिक प्रबोधन हा एक भाग आहे. या सांस्कृतिक प्रबोधनाचा १९६० नंतरचे ग्रामीण साहित्य आणि दलित साहित्य हा एक पैलू आहे. आपण वेगळे ग्रामीण साहित्य का अपेक्षितो याचे विवेचन आणि समग्र साहित्य मूलत: ‘साहित्य’च असते येथपर्यंतची यादवांची भूमिका आणि तिचे समर्थन स्वीकारार्ह आहे, पण या विवेचनाच्या ओघात निर्माण झालेल्या निसंगतींचा परामर्श घेतला पाहिजे. गेल्या काही वर्षांत ग्रामीण परिसरात शिक्षणाचा प्रसार वाढला आहे. त्यामुळे नवा ग्रामीण वाचकांचा वर्ग निर्माण झाला आहे. हा वाचकवर्ग १९६० नंतरचे ग्रामीण साहित्य ‘आत्मप्रत्यया’साठी वाचतो. १९६० पूर्वीचा शहरी मध्यमवर्गीय वाचक आधीचे ग्रामीण साहित्य मनोरंजनासाठी वाचत होता. त्याच्या स्वप्नील कल्पनांसाठी वाचत होता. लेखकाचे हे विचार कच्च्या पायावर उभारलेले आहेत. महाराष्ट्रात १९६० नंत ग्रामीण परिसरातील शिक्षणप्रसारामुळे वाचकांची कितीशी वाढ झाली हे आकडेवारीने पाहावे लागेल. तसेच ग्रामीण वाचक कितीसे ग्रामीण साहित्य वाचतो ग्रामीण साहित्य का वाचतो आणि ग्रामीण वाचक शहरी साहित्य का वाचतो, याची अशी साचेबंद उत्तरे शोधणेही धोक्याचे आहे. आपल्या अनुभव विश्वाप्रमाणे इतरांच्या अनुभवविश्वात डोकवावे अशी कुणाही मग तो ग्रामीण असो वा शहरी असो वाचकाची इच्छा असते. मराठीतील बहुसंख्य वाचक, यादव म्हणतात ती भूमिका घेऊन साहित्याचे वाचन करीत असतील असे म्हणता येत नाही. १९६० नंतरच्या काळात चारूता सागर यांच्या सारख्या कसदार ग्रामीण साहित्यनिर्मिती करणाऱ्या लेखकाच्या कथांचे वाचन कितीशा ग्रामीण किंवा शहरी वाचकांनी केले आहे, असाही प्रश्न विचारता येईल. (या पुस्तकात रणजित देसाई, चारूता सागर किंवा मधु मंगेश कर्णिक यांच्या प्रादेशिक साहित्याचा निर्देश केलेला आढळत नाही.) शहरी साहित्याबद्दलची यादवांची भूमिकाही वादग्रस्त आहे. दिलीप चित्रे, विलास सारंग, कमल देसाई, अनिल डांगे, विजय तेंडुलकर इ. लेखकांचे साहितय मराठी संस्कृतीचे, मराठी मनाचे प्रतिबिंब मुळीच नाही. ते आत्मभ्रष्ट झालेल्या, व्यक्तीकेंद्रित, काहीशा तोल गेलेल्या मनाचे, पाश्चात्त्य समाजरचनेतून निर्माण झालेल्या दाबाचे, पाश्चात्त्य मनावर जे परिणाम आहेत त्याचे अनुकरण करणारे साहित्य आहे, असे लेखकाला वाटते. शहरातून निर्माण होणारे साहित्य आणि प्रतिष्ठा पावणारे शहरी मराठी साहित्य हे अनेक अर्थांनी मराठी साहित्य नाही. एक तर ते पाश्चात्यांचे भ्रष्ट अनुकरण आहे आणि दुसरे, ते ‘मराठी मना’चे प्रतिनिधित्व करणारे नाही. यादवांच्या या सर्व विवेचनातून ग्रामीण साहित्याचे समर्थन होत नाही; उलट शहरी साहित्याकडे पाहण्याची त्यांची संकुचित आणि मर्यादित मनोवृत्तीच प्रकट होते. इंग्रजी आमदानीत आणि स्वातंत्र्योत्तर काळात निर्माण झालेल्या सर्वच साहित्यावर शहरी मनोवृत्तीची छाप असणे, पाश्चात्त्य वाङ्मयाचा त्याच्यावर परिणाम होतो. अगदी अपरिहार्य होते. या काळात लिहिणारा लेखकवर्ग बव्हंशी लेखक वर्ग होता. १९४५ नंतरच्या काळात निर्माण झालेल्या नवसाहित्याच्या मर्यादांबरोबर त्याचे सामर्थ्यही विचारात घ्यावे लागेल. ज्याप्रमाणे ‘ग्रामीण’ हे विशेषण मूल्यमापनात्मक नाही त्याप्रमाणे ‘शहरी’ हे विशेषणही मूल्यमापनात्मक नाही, ही बाब यादवांनी लक्षात घेतलेली नाही. (या संदर्भात सत्यकथेने मध्यंतरी प्रसिद्ध केलेल्या एका अंकाची आठवण होते. पाश्चात्त्यांच्या सहवासात राहणाऱ्या मराठी माणसाच्या मनाचे सूक्ष्म प्रतिबिंब त्या अंकातील कथा साहित्यात पडलेले होते.) १९४५ नंतरच्या काळात निर्माण झालेल्या नवसाहित्याने अनुभवाच्या विविध पातळ्यांना स्पर्श केला आहे. मानवी मनाचे सूक्ष्म पदर उलगडून दाखविले आहेत. केवळ शहरी आहे म्हणून ते ग्रामीण साहित्याचया पाश्र्वभूमीवर एकदम निकालात काढणे केवळ धाडसाचेच नव्हे तर अविचाराचे ठरेल. आनंद यादवांची ही टोकाची भूमिका समग्र साहित्याला त्याच्या गुणवत्तेचे मूल्यमापन करण्याच्या दृष्टीने न्याय देणारी मुळीच नाही. ‘ग्रामीण साहित्याचे टीकाकार’ या लेखात लेखकाने मराठीत ग्रामीण साहित्यावर वीस वर्षांत झालेल्या समिक्षेचे स्वरूप विशद केले आहे. माडगूळकरांची कथा शहरी टीकाकारांना अवाङ्मयीन कारणामुळे जवळची वाटली, ग्रामीण साहित्याची समीक्षा शहरी मध्यमवर्गीय दृष्टीकोनातून झाली, व्यंकटेश माडगूळकरानंतरच्या ग्रामीण साहित्याचा शहरी टीकाकारांनी नीट अभ्यास केला नाही किंवा त्या साहित्याकडे पुरेसे लक्ष दिले नाही, या आशयाचे यादवांचे विचार पुन्हा तपासून घ्यायला हवेत. शहरी रसिकाला ग्रामीण जीवनाचे, संस्कृतीचे, माणसांचे, वातावरणाचे, रागा-लोभाचे दर्शन घडविण्यासाठी ग्रामीण साहित्याचा अवतार आहे, अशी सुप्त भूमिका शहर मध्यमवर्गीय दृष्टीतून घेतली गेली आहे, असेही मत लेखकाने नमूद केले आहे. शहरी टीकाकारांनी केलेल्या ग्रामीण साहित्याच्या मूल्यमापनाविषयी निश्चित अशी भूमिका यादवांनी घेतलेली दिसते. १९५०-५५ च्या सुमारास माडगूळकरांनी ग्रामीण स्वरुपाच्या लेखनाला सुरुवात केली. त्यानंतरच्या काळात शंकर पाटील, द. मा. मिरासदार हे लेखक वैपुल्याने लिहित होते. त्यातही माडगूळरांना अग्रस्थान होते. त्या काळात माडगूळकर सत्यकथा, मौज या नियतकालिकांतून लिहित होते. प्रा. गंगाधर गाडगीळांसारख्या समिक्षकाने त्यावेळी माडगूळकरांवर लिहिणे साहजिकच होते. प्रा. गंगाधर गाडगीळ यांनी माडगूळकरांच्या लोकप्रियतेचे अवाङ्मयीन कारण सांगितले आहे. माडगूळकरांच्या कथेतील माणदेशी माणसे भेटली, म्हणजे शहरी मनाला विसावल्यासारखे वाटते. काहीतरी हरवले होते ते मिळाल्यासारखे वाटते. अवाङ्मयीन कारणांनी एखादा लेखक कसा लोकप्रिय होतो याचे हे एक गमतीदार उदाहरण असल्याचे गाडगीळांनी सांगितले आहे. यादवांनी माडगूळकरांच्या लेखन प्रक्रियेसंबंधी स्वत: जाणवणारी काही कारणे सांगितली आहेत. माडगूळकरांची व्यावहारिक अलिप्तता यादवांना माडगूळकरांच्या, ‘नागरमना’चे लक्षण वाटते. खेड्याचा अनुभव असलेली ‘नागरमन’ शहरी वाचकावर भान ठेवून सतत माहितीगार निवेदकाच्या शेलीचा अवलंब करते. गोष्ट सांगणाऱ्या (स्टोरी टेलरची) भूमिका स्वीकारते, यामुळेच त्यांची कथा शहरी मनोवृत्तीच्या टीकाकारांना आणि रसिकालाही जवळची वाटली असावी, असा निष्कर्ष लेखकाने काढला आहे. (माडगूळकरांच्या लेखनातील सहजता, त्यांची संवेदनशीलता अनुभव व्यक्त करण्याची पद्धती, कलावंताला आवश्यक असणारी अलिप्तता यांचा विचार करता माडगूळकरांनी शहरी वाचकांचे भान ठेवून लेखन केले असावे असे म्हणणे योग्य ठरणार नाही.) काही असले तरी माडगूळकरांचे मराठी नवकथेतील श्रेय ‘मूल्यमापनात्मक’ भूमिकेवरून मान्य करावे लागते. माडगूळकर, पाटील, मिरासदार यांच्यानंतर यादव, बोराडे हीच नावे ग्रामीण साहित्याच्या संदर्भात नजरेसमोर येतात. मराठी समीक्षकांनी थोड्याफार प्रमाणात तयांचा विचार केला आहे. वस्तुत: गेल्या वीस वर्षांतील समग्र मराठी साहित्याचा विचार मराठी समिक्षेत व्हावा तितका झाला नाही. नियतकालिकातून समिक्षेला पुरेसा वाव नसणे, एखाद्या चांगल्या कलावंताकडे समिक्षकांचे लक्ष न जाणे, ही त्यामागील कारणे आहेत. तेव्हा केवळ ग्रामीणच नव्हे तर संपूर्ण मराठी साहित्यातच तसा फार विस्तृत असा समीक्षाविचार झालेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. माडगूळकर, पाटील किंवा यादव यांच्याप्रमाणे सातत्याने साहित्य-निर्मिती करणारा ताकदीचा लेखक ग्रामीण साहित्यिकांच्या तिसऱ्या पिढीत निर्माण झालेला दिसत नाही, हे ‘तिसऱ्या पिढीची ग्रामीण कथा’ या यादवांनीच संपादित केलेल्या कथासंग्रहावरून दिसून येते. (आनंद पाटील या लेखकाचे नाव या संदर्भात अपवाद म्हणून आठवू शकते.) मराठी ग्रामीण साहित्याच्या दालनात यादव म्हणतात त्याप्रमाणे खरोखरच भर पडत आहे; पण त्या निर्मितीमधील गुणवत्ताही, अलिपतपणे व वस्तुनिष्ठपणे तपासून पाहायला हवी. तिसऱ्या पिढीतील ग्रामीण कथाकारांच्या निर्मितीबाबतचे असमाधान त्या कथासंग्रहाच्या प्रस्तावनेत यादवांनीच स्वत:च नमूद करून ठेवले आहे. ग्रामीण साहित्याच्या समिक्षेतबाबतही हाच प्रश्न विचारता येईल. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात गेल्या वीस वर्षांत अनेक महाविद्यालये सुरू झाली आहेत. ग्रामीण परिसरात अध्ययन-अध्यापन करणाऱ्या प्राध्यापकांनी ग्रामीण साहित्याचे कितपत मूल्यमापन केले आहे? (या बाबतीतही प्रा. रा. ग. भोसले, प्रा. र. बा. मंचकर, प्रा. बाळकृष्ण कवठेकर ही हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच नावे नजरेसमोर येतात.) प्रा. यादव म्हणतात त्याप्रमाणे ग्रामीण वाचकांचा वर्ग तयार झाला आहे (?) त्याप्रमाणे समिक्षकांचाही वर्ग तयार होणे आवश्यक आहे. साहित्यातील एका विशिष्ट भागाचा, वर्गिकरणदृष्ट्या स्वत:ची भूमिका मांडून विचार करण्यास कोणतीही हरकत नसावी. किंबहुंना साहित्यातील वैश्विकता स्वीकारूनच प्रा. आनंद यादवांनी आपली स्वतंत्र भूमिका मांडली आहे. साहित्याच्या आकलन-आस्वादासाठी ‘ग्रामीण’हे विशेषण लावण्यासही प्रत्यवाय नसावा, परंतु आनंद यादव यांनी ग्रामीण साहित्यविषयक स्वत:ची भूमिका मांडताना शहरी मध्यमवर्गीय साहित्य आणि मध्यमवर्गीय टीकाकार यांच्याबाबतीत पक्षपात केल्यामुळे त्यांच्या महत्त्वपूर्ण अशा विवेचनास मर्यादा पडल्या आहेत. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more

I HAVE A DREAM
I HAVE A DREAM by RASHMI BANSAL Rating Star
Krishna Diwate

‘स्टे हंग्री स्टे फूलीश’ आणि ‘कनेक्ट द डॉटस’ या बेस्ट सेलर पुस्तकाच्या लेखिका ‘समाजातल्या परंपरागत समस्या सोडवण्याचा नवा मार्ग शोधून काढणार्‍या वीस सामाजिक उद्योजकांच्या प्रेरणादायी कहाण्या’ हे वाक्य पुस्तकाचे पहिले पान उघडले आणि दिसले. त्यामुळे माझ कुतुहल चाळवले आणि ते पुस्तक वाचायला सुरुवात केली. मनोगतात लेखिका म्हणतात की, आता नव्या दमाचे, डोक्याने आणि मनाने ही विचार करणारे काही जण एखाद्याच्या नजरेतील दुःख ओळखतात, पेटून उठतात; पण ते त्याच्यावर विचार एखाद्या उद्योजकाप्रमाणे करतात. म्हणून ते ‘सामाजिक उद्योजक.’ नफा मिळविण्याचा हव्यास नसला तरी ते बिझनेस मधील तत्वे वापरून ती गोष्ट साध्य करतात. हे काही तरी वेगळे आपण वाचत आहोत असे मला वाटले. त्यामुळेच ते पुस्तक वाचायला घेतले. ह्या मध्ये वीस लोकांची चरीत्रे आहेत. ते सर्व भारतीय, उच्चशिक्षित तरूण तरूणी आहेत. कोणी त्यातील शास्त्रज्ञ आहेत तर कोणी मरिन बायोलॉजिस्ट, आयआयटी, आयआयएम ग्रॅज्युएट आहेत पण कोणत्या कोणत्या सामाजिक प्रश्नाने ते अस्वस्थ झाले आणि नेहमीच्या मार्गाने न जाता वेगळीच वाट पकडली. पुस्तकात ‘रेनमेकर्स,’ ‘चेंजमेकर्स’ व ‘स्पिरिच्युअल कॅपिटॅलिस्ट’ असे तीन भाग आहेत. प्रत्येकात अनुक्रमे अकरा,सहा व तीन व्यक्तीमत्वांची ओळख करून दिली आहे. ‘सुलभ’ ही आधुनिक टॉयलेटस उभारणारे बिंदेश्वर पाठक ह्याच्या चरित्राने पुस्तकाची सुरुवात होते. जातीने बिहारमधील ब्राह्मण. पण लहानपणी टॉयलेटस साफ करणार्‍याला हात लावला त्यामुळे आजीने अक्षरशः शेण, गोमुत्र खायला लावले. पण त्याच बिंद्रेश्वरांनी अगदी योगायोगाने ह्याच क्षेत्रात काम करण्याचे ठरविले. अर्थात ही वाट निश्चितच सोपी नव्हती. अनेक हालअपेष्टा सोसत, जगाचे धक्के खात, अनेक समस्यांना तोंड देत आपले स्वप्न ‘सुलभ शौचालयाच्या’ माध्यमातून सुरु केले. तो सगळा खडतर प्रवास अर्थात पुस्तकातूनच वाचायला हवा. त्यासाठी त्यांनी केवळ ती यंत्रणा तयार केली नाही तर ती टॉयलेटस बांधून, त्यासाठी लागणारी प्रेरणा, शिक्षण, संभाषण, ट्रेनिंग, पाठपुरावा अशा सर्वच गोष्टी ‘सुलभ’ तर्फेच संभाळल्या जातात. सध्या ही संस्था स्वबळावर चालते. 100 ते 125 कोटी इतके तिचे वर्षाचे उपन्न आहे. इतकेच नाही पूर्वी जे लोक सफाईचे काम करत असत त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च संस्था करत आहे. ‘सुलभ पब्लिक स्कूल’ नावाने शाळा सुरु केली आहे. तरूणांसाठी व्होकेशनल क्लासेस चालवले जातात. म्हणजे मिळालेला नफा पुन्हा त्याच सफाई कामगारांच्या कल्याणासाठी वापरला जातो. टॉयलेटस बांधून भरपूर पैसा मिळवता येतो हे वाक्य पचायला जरा जडच जाते. अनिता आहुजा ही दिल्लीत सुखवस्तू कुटूंबात रहाणारी सामान्य स्त्री. पण कचरा वेचणार्‍या मुलांचे हाल पाहून त्यांच्यासाठी काही तरी करावे असे तिने ठरविले. तिने 1998 मध्ये कॉन्झर्व्ह नावाची संस्था उभी केली. व त्यातून पहिला प्रोजेक्ट सुरु केला तो म्हणजे आजुबाजूच्या परिसरातील कचरा उचलून त्याचे कंपोस्टखत तयार करणे. कचरा गोळा करण्यासाठी चांगल्या ढकलगाड्या आणल्या, युनिफॉर्म, आय कार्डची सोय केली. 2002 पर्यंत एक पूर्ण वेळ काम करणारी मोठी संस्था बनली. त्याचवेळी त्यांनी प्लॅस्टीकच्या कचर्‍यावर प्रयोग सुरु केले. तिचे पती शलभ ह्यांनी बिटस पिलानी मधून इंजिनिअरींग केले आहे. त्यांच्या मदतीने तिने फॅक्टरी सुरु करण्याचे ठरविले. शलभने मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक शीटस निर्मिती करू शकेल असे मशीन तयार केले. त्यासाठी अर्थातच अनेक प्रश्न समोर उभॆ राहिले. चुका झाल्या, ठोकरा खाल्या पण त्यातून वाट काढत त्यांनी चिकाटीने प्रयत्न सुरुच ठेवले. आज दोघे मिळून कचर्‍यातील प्लॅस्टिक पिशव्या वापरून आकर्षक अशा हॅडबॅगस तयार करण्याचा कारखाना चालवतात. जे लोक सुरुवातीला केवळ कचरा उचलण्याचे काम करत होते, त्यांच्या काही कौशल्य दिसले की त्यांना वेगळे काढून ट्रेनिंग दिले जाते. मशीनवर असिस्टंटचे काम करू लागतात त्यातून काही लोक तर ग्रुप लिडर ही झाले आहेत. कटींग करणॆ, क्वालिटी तपासणॆ, फिनिंशींग, पॅकिंग अशी सर्व महत्वाची कामे ते करतात. आता ते कामगार झाल्यामुळॆ त्यांना चांगला पगार, प्रॉव्हिडंट फंड, ओव्हरटाईम अशा सुविधा मिळू लागल्या त्यापेक्षा ही जास्त त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळाली. त्यांच्या साठी हे नवीनच आहे. अनिता व शलभ दोघॆही मेहनत घेतात पण एनजीओ असून ही भरपूर पैसा कमावणे त्यांना चुकीचे वाटत नाही. कारण आज ह्या एका उद्योगामुळे कित्येक कुटूंबाची आर्थिक स्थिती बदलून गेली आहे. अशीच अजून एक प्रेरणादायी कथा दिल्लीतील रंगसूत्र कंपनी चालविणार्‍या सुमिता घोस ह्यांची. स्वतः ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यावर मास्टर इन इकॉनॉमिक्स ची पदवी घेतल्यावर संजॉय घोस ह्या या आय आर एम मधून शिक्षण घेतलेल्या ध्येयवादी तरूणाशी लग्न केले. पण दुर्दैवाने आसाममध्ये काम करत असताना त्यांची 1998 मध्ये उल्फाच्या अतिरेक्यांनी हत्या केली. त्यानंतर अनेक टक्केटोणपे खात, दोन लहान मुलांचा संभाळ करत सुमिताने ‘रंगसूत्र’ नावाची कंपनी काढली. त्याच्या मार्फत ती खॆडॆगावातल्या लोकांकडून कापड, शोभॆच्या वस्तू, बनवून घेते आणि त्या फॅब ईंडीयासारख्या प्रसिध्द कंपन्यांना विकते. जैसलमेर, बारमेर जिल्ह्यातले कारागिर तिच्यासोबत काम करत आहेत. अजून एक अशीच ध्येयवादी तरूणी म्हणजे इशिता खन्ना. डेहराडून मध्ये जन्म झालेली एक सर्वसामान्य मुलगी. पण निसर्गसंवर्धन आणि भूगोल या विषयांची आवड असलेली. म्हणूनच तिने आपल्या ग्रॅज्युएशन नंतर टाटा इंन्स्टीट्यूट मधून मास्टर्स केले. पर्यावरण क्षेत्रातच काम करायचे आहे हे निश्चित ठरवून तिने काही वर्षे नोकरी केली. त्यानंतर 2002 मध्ये नोकरी सोडून आपल्या दोन मित्रांसोबत स्पिती व्हॅलीमध्ये मूस नावाची एन्जीओ सुरु केली. तेथील स्थानिक महिलांचे ग्रुपस करून त्यांना तिथे असणार्‍या सीबक थॉर्न ह्या फळांच्या लागवडीचे ट्रेनिंग दिले. त्यावर प्रक्रिया करायला शिकवले. ही झाडॆ मातीला धरून ठेवतात त्यामुळे धूप रोखली जाते, शिवाय नायट्रोजन ही धरून ठेवत असल्याने जमिनीचा पोत सुधारतो. त्यामुळे ह्या फळांवर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे तिथल्या बायकांना चांगला रोजगार मिळू लागला. त्याचबरोबर तिने स्थानिक तरूणांना पर्यटकांना ट्रेक किंवा जीप सफारीसाठी नेणे, कॅम्प लावणे, गरज पडल्यास प्रथमोपचार करणे ही कामे ही करायला शिकवले. कारण हळूहळू तिथे पर्यटन वाढू लागले. ते इको-फ्रेंडली करण्याकडॆ तिच्या इकोस्पियर संस्थेचा भर आहे. आता दरवर्षी पर्यटनातून 35 ते 40 लाखाचे उत्पन्न मिळते.आणि त्यातून नफा ही मिळतो. इकोस्पियर संस्थेने शेजारच्य़ा ‘लाहुल’ व्हॅलीमध्ये ही विकास कामे सुरु केली आहेत. पर्वतावर तयार होणार्‍या कचर्‍याच्या समस्येवरही तिला काहीतरी करायचे आहे. तिची संस्था लोकांना मुद्दाम तिथले लोक किती अवघड परिस्थितीत रहातात हे दाखवते. अतिशय थंडीत तिथे तापमान मायनस 35 पर्यंत खाली गेल्यावर हॅंडपंपने पाणी काढणे सुध्दा किती कठीण होते हे सांगितले जाते. तेव्हा आपल्यासारख्य़ा पर्यटकांना काय काय करता येईल याबद्दल ती जागरूकता निर्माण करते. मूळात हे पुस्तक 2012 साली लिहिलेले आहे. त्यामुळे आता ह्या वेगवेगळ्या प्रकारचे काम करणार्‍या संस्थेचे काम या दहा वर्षात खूपच वाढले असेल यात काही शंका नाही. दीनबंधू साहू हे मरिन बायोलॉजिस्ट आहेत पण ते प्रयोगशाळेतून बाहेर पडून समाजासाठी काम करतात. ‘प्रोजेक्ट चिलका’ ह्या त्यांच्या संस्थेमार्फत ओरिसातील लोकांना समुद्राची शेती करायला शिकवतात. ओरिसा मधील पुरी येथे जन्म झालेल्या दीनबंधूनी अतिशय हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेतल्यानंतर दिल्लीत एमएसीला ॲडमिशन घेतली. परंतु योगायोगाने १९८७ मध्ये अंटार्क्टिक वर जाण्याची संधी मिळाली. नंतर पीएचडी पूर्ण केल्यानंतर अनेक देशांमध्ये नोकरी निमित्ताने फिरले. पण तरीही शेवटी दिल्ली युनिव्हर्सिटी मध्ये प्रोफेसर म्हणून काम सुरू केले. त्यांना समुद्री वनस्पती बद्दल विशेष आस्था होती; पण त्या बद्दल आपल्या देशात फारशी जागरूकता नव्हती. ही लागवड पर्यावरण पूरक असते शिवाय त्यातून स्थानिक लोकांना उत्पन्नाचे साधन मिळते. त्यासाठी डिएसटीने निधी मंजूर केला. मग त्यांनी चिल्का सरोवराची पहाणी केली, त्यामध्ये वाढू शकतील अशा चार जातींची निवड करून स्थानिक लोकांना समजेल अशा सोप्या भाषेत माहिती दिली. प्रात्यक्षिके दाखवली, वर्कशॉप्स घेतली. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना रोजगार मिळू लागला. यातूनच पर्यावरण संरक्षण ही होऊ लागले. यातून त्यांना प्रत्यक्ष कांहीं आर्थिक फायदा होत नसला तरी ते म्हणतात, की आम्हाला दोघांना दिल्लीत चांगली नोकरी आहे. त्यामुळे पैसे कमावणे हा उद्देश नाही; पण अजून तीस वर्षांनंतर मला मी काही तरी काम केलेले दिसेल. असे जर काहीच तुम्हाला दिसणार नसेल तर जगायचे कशाला? भूषण पुनानी हे असेच अत्यंत बुध्दीमान विद्यार्थी. मेडीकलची ॲडमिशन हुकल्यामुळे डेअरी कोर्ससाठी ॲडमिशन घेतली. तिथे ही विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविला. नंतर पीएचडी केले. ग्रामविकास शिकण्यासाठी आयआयएम मध्ये एमबीए केले. हे झाल्यावर 1979 मध्ये ब्लाईंड स्कूल मध्ये दोन वर्षांसाठी नोकरी सुरु केली ती सुधा ह्याच हेतूने की मॅनेजमेंट शिकताना जी थेअरी शिकलो ती विकासाच्या क्षेत्रात वापरता येईल का? हळूहळू त्यांना अनेक लोक मिळत गेले. सर्वांनी मिळून आज संस्था खूप मोठी केली आहे.त्यांनी काम सुरु केले तेव्हा फक्त एक कॅपस होता, आज गुजरात मध्ये आठ कॅपस आहेत. दहा लाख मूल्य असलेली संस्था आज दोन कोटी रुपयांची आहे. अपंग लोकांनी स्वावलंबी व्हावे ह्यासाठी संस्था काम करते. दृष्टीहीन मुली ब्यूटी पार्लरसारखे कोर्स चालवतात, फिजिओथेरपी शिकून सेंटर मध्ये काम करतात. विकास साधण्यासाठी योग्य व्यवस्थापनेची गरज असते हे त्यांनी दाखवून दिले आहे. हजारो लोकांच्या आयुष्यात नवा प्रकाश निर्माण करून त्यांना सामान्य आयुष्य जगण्याची संधी मिळवून दिली आहे. अशी ही एकापेक्षा एक वेगवेगळ्या प्रकारची माणसे. कोणत्या तरी ध्येयाने पछाडलेली . सामाजिक कार्य करत असतानाच त्या लोकांचे कल्याण कसे होईल असा विचार करणारी. लेखिकेने त्या सर्वांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या आहेत, त्यांचे काम प्रत्यक्ष पाहून जाणून घेतले आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित गोळा करून आपल्यासमोर मांडली आहे. त्यामुळेच त्या मनोगतात म्हणतात, ‘तुमचं आयुष्य कसे ही असले तरी इतरांसाठी एखादा क्षण द्या. इतरांना प्रेम, आनंद, चांगुलपण द्या. जितकं द्याल तितकं तुम्हाला परत मिळेल.’ हेच वाक्य मलाही अतिशय उर्जा देऊन गेले. माझ्याकडे जे आहे, जे मला देणे शक्य आहे ते निरपेक्षपणे ज्यांना गरज आहे त्याला देणे ह्या सारखा आनंद अजून काय असणार? ह्याच वाक्याने मी आपली ह्या आठवड्यात रजा घेते. उद्या पासून सुरु होणार्‍या नवीन सत्रासाठी सारिका ताईंना हार्दिक शुभेच्छा. ...Read more