* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: MAHASAMRAT ZANZAVAT
  • Availability : Available
  • ISBN : 9789394258358
  • Edition : 2
  • Publishing Year : AUGUST 2022
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 460
  • Language : MARATHI
  • Category : HISTORICAL
  • Available in Combos :VISHWAS PATIL COMBO SET - 10 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
LIFE STORY OF CHHATRAPATI SHIVAJI IS FLAMBEAU WHICH INSPIRES INDEPENDENCE, LIBERTY AND SOVEREIGNTY. FLAMES OF HIS REIGN HISTORY ARE ENLIGHTENING THE MAHARASHTRA FOR CENTURIES. THIS CRESSET OF OUR MAHARAJA IS PENNED DOWN BY OUR OWN RENOWNED AUTHOR VISHVAS PATIL. ‘JHANJHAWAT’ IS THE FIRST BOOK IN HIS NOVEL SERIES ‘MAHASAMRAT’- CHHATRAPATI SHIVAJI MAHARAJ BIOGRAPHY. THE BOOK IS ABOUT THE PHENOMENA WHICH BOWED THE SEED OF ESTABLISHING OWN EMPIRE IN SHIVAJI MAHARAJA’S MIND. THE BOOK TELLS THE UNKNOWN HISTORY OF MARATHA’S PRIOR TO SHIVAJI MAHARAJA’S BIRTH. IT ALSO INCLUDES JIJAU-SHIVAJI MAHARAJ BIJAPUR TOUR, HIS EARLY TRAINING UNDER GUIDANCE OF SHAHAJI RAJE. THESE ASPECTS OF THE HISTORY WILL BE ENTIRELY NEW AND OVERWHELMING FOR THE READERS, NO DOUBT ABOUT THAT.
छत्रपती शिवरायांची जीवनगाथा म्हणजे स्वातंत्र्याचं स्फुल्लिंग जागवणारी धगधगती मशाल. या मशालीच्या ज्वाला महाराष्ट्राला शेकडो वर्षे प्रकाशमान करत आहेत. हाच प्रकाश दीप लोकप्रिय लेखक विश्वास पाटील यांच्या लेखनीतून वाचकांच्या भेटीस येत आहे. छत्रपती शिवरायांच्या जीवनावरील महासम्राट या कादंबरीमालेतील हा पहिला खंड अर्थात झंझावात. छत्रपती शिवरायांच्या हदयात ज्या घटनांनी स्वराज्याचं स्फुल्लिंग जागवलं, त्या घटनांचा विस्तृत परीघ आणि अवकाश सादर करणारं हे पुस्तक आहे. शिवरायांच्या जन्मापूर्वीच्याही आधीच्या अज्ञात इतिहासावर प्रकाशझोत टाकत नवी ऐतिहासिक मांडणी यात आहे. जिजाऊ आणि शिवरायांचा विजापूर दौरा, शहाजीराजांच्या उपस्थितीतली शिवरायांची तालीम, हा इतिहासाचा पैलू मराठी वाचक प्रथमच वाचतील आणि तो वाचकांना भारावून टाकणारा ठरेल, यात शंका नाही.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MAHASAMRAT #ZAZAVAT #VISHWASPATIL #CHATRAPATIVISHWASPATIL #NOVEL #SHAHAJIMAHARAJ #JIJAU
Customer Reviews
  • Rating Starवाचक

    🚩शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा🚩 महासम्राट या सिरीज मधील खंड पहिला झंजावात आज वाचून पूर्ण झाला. विश्वास पाटील यांचे संभाजी वाचले होते तेव्हा मला वाटून गेले होते की याच लेखकांनी शिवरायांबद्दल पण लिहिले पाहिजे. मध्यंतरी ही जेव्हा बातमी कळली तव्हा खूप आनंद झाला. छत्रपती शिवरायांवरील अशा मालिकेची मराठीत नितांत आवश्यकता होतीच. पुस्तक सुरू होते ते थोरले महाराज शहाजीराजे यांच्या घोडदौडीपासून. अधे-मध्ये भोसले परिवाराचा इतिहास सुद्धा अनुभवायला मिळतो. दख्खन मध्ये वावरत असणाऱ्या जुलमी परकीय सत्ता त्यांनी ,माजवलेला हल्लकल्लोळ शहाजी महाराज यांची धावपळ येणारे कठीण प्रसंग यानंतर वाचक प्रवेश करतो तो छत्रपती शिवरायांच्या आयुष्यात. प्रतिकूल परिस्थितीत झालेला जन्म बंगलोर मधील दिवस पुण्यातील दिवस स्वराज्य स्थापना लोकप्रशासन. उत्तम करव्यवस्था सैनिकांचे प्रशिक्षण या बाबी हायलाईट केलेल्या आहेतच शिवाय पाठ्यपुस्तकातून वगळलेले अनेक प्रसंग संदर्भ या पुस्तकात वाचायला मिळतात पुरंदर बद्दलचे वेगळे संदर्भ त्यांचे महत्त्व जावळीचे प्रकरण आणि पुस्तकाचा शेवट होतो तो अफजलखानाचा वध या प्रकरणाशी. यानंतर आता याच सिरीजचा दुसरा खंड Rankhaindal वाचणार आहे. ऐतिहासिक पात्रे त्यांचे वर्णन आजूबाजूचा परिसर आणि घटना लेखकांनी जिवंत केल्या आहेत. त्यामुळे इतिहासाचा रियल आस्वाद घ्यायची संधी मिळते ...Read more

  • Rating StarAbhiram Bhadkamkar

    महा-सम्राट "इतिहास वाचून माणूस बेभान होतो, भानावर येतोच असं नाही" हे (बहुधा) वि ग कानेटकर यांचे विधान मला कायमच महत्वाचे वाटते। प्रकाशनास काही महिने लोटले असले तरी निवांत ऐसपैस वेळ काढून वाचायची म्हणून बाजूला ठेवलेली ज्येष्ठ कादंबरीकार विश्वा पाटील ह्यांची महासम्राट ही कादंबरी हातात घेतली आणि तिने झपाटून गेलो। ही कादंबरी बेभानही करते आणि एक भानही देते हे तिचे वैशिष्ट्य आहे. विश्वासरावांची शैली आणि त्यांची शब्दसंपत्ती ह्यावर नवे काय बोलणार? पण ही कादंबरी उभ्या देशाचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांच्या आयुष्यातील घटनांचे केवळ चमकदार कथन यापुरती मर्यादित न राहता तत्कालीन सामाजिक व राजकीय परिसराचे भान देणारी ठरते। तेव्हाचा काळ बारीकसारीक तपशिलांसह उभा करते. ती छत्रपतींच्या तेजस्वी कर्तृत्वाला मुजरा तर करतेच पण त्यासोबत त्यांच्या जन्मापूर्वीची राजकीय परिस्थिती, त्यातून आईसाहेबांच्या मनात उगवलेल्या हिंदवी स्वराज्याच्या अत्यंत अवघड, जवळजवळ अशक्यप्राय स्वप्नाच्या पाठलागाची वेगवान घडामोड चितारते. मुघलांचे डावपेच, खेळया नेस्तनाबूत करण्यामागची `अत्यंत योजनाबद्ध आखणी` मांडत जाते। ही कादंबरी माझे त्याकाळाबद्दलचे आकलन वाढवते. मऱ्हाटी मुलाखातला तत्कालीन निसर्ग यात येतो, तत्कालीन नातेसंबंध, समाजधारणा आणि परचक्राच्या दडपणाखालची उलघाल यातून त्या काळाचा पट मांडला जातो आणि इथेच कादंबरी केवळ एका युगपुरुषांचे चरित्रकथन न रहाता एका शतकाचा लेखाजोखा होऊन जाते। वेगळेपण आहे ते हेच की ही कहाणी महाराक्षसी लाटांविरुद्ध पोहून जात महासागरालाच बांधून घालणाऱ्या चिवट आशावादाची आणि या स्वप्नाला प्रत्यक्षात उतरवणाऱ्या बुद्धीचातुर्याची होत जाते। म्हणूनच ती एकाच वेळी बेभानही करते आणि भानही देते। कादंबरी संपते एक स्वल्पविराम देत... आता पुढचे भाग... त्याची अधीरता आणि उत्सुकता... डोळे दिपून जावेत अशा थोर व्यक्तिमत्वाचे चित्रण हे शिवधनुष्य होते, जे लिलया पेलले आहे... यात रेखाटलेली चित्रे अप्रतिम आहेत... घराघरात भक्तिभावाने ठेवावा आणि `अभ्यासावा` असा हा `झंझावात` आहे... ...Read more

  • Rating Starअपूर्व मराठे.

    नुकताच ही कादंबरी वाचून पूर्ण झाली. कादंबरीची सुरुवात शहाजीराजे भोसले ह्या व्यक्तिमत्वापासून होते शहाजी राजांचा पराक्रम, त्यांची धोरणी बुद्धी, लष्करशक्ती आणि मराठ्यांचे स्वतंत्र तख्त निर्माण करण्याची तीव्र इच्छा त्या भोवतीचे त्यांचे अटीतटीचे प्रयत्न ादंबरीची सुरुवात करते. जिजाऊमासाहेब त्यांची मानसिकता आणि त्यांनी उरी बांधलेली स्वप्ने आणि आपले पती शहाजी राजे ह्यांना दिलेली साथ कादंबरीला भावनिक रूप आणते. लखोजीराव जाधव, मलिक अंबर, ही अनेक पात्रे व त्यांची वर्णन वाचताना ती आपल्यासमोरच आहे असं वाटतं. प्रत्येक गोष्ट अगदी 360 अंशात सांगितली आहे. ऐतिहासिक कादंबरी प्रमाणे ह्यात फक्त वर्णन नाहीत लष्करी, राजकीय, प्रशासनिक, महसूली, सामाजिक, भावनिक, मुत्सद्दी अश्या अनेक तत्कालीन गोष्टींवर प्रकाश टाकला आहे. श्री विश्वास पाटील ह्यांच्या लिखाणची खासियत म्हणजे युद्धवर्णन ते अगदी जबरदस्त शब्दात करतात. हत्यार त्याचे वैशिष्ट्य तर त्याचा वार आणि झालेली जखम सुद्धा सांगण्याची ताकत त्यांच्या लिखानातं आहे.. बंगळूर प्रांतातुन परत आल्यावर शिवाजी राजांना राज्य निर्माणकरण्यासाठी प्रेरणा कश्या महत्वाच्या ठरल्या व मावळ आणि किल्ले सुलतान का देत नाही त्यांचे गमक महाराजांनी कसे हेरले हे अतिशय वाचनीय.मावळातून मिळवलेली मदत पुरंदरची लढाई आणि हळूहळू सुरु स्वराज्याची प्रदीर्घ मोहीम. अफजल खानाचे प्रकरण अतिशय रुपक पण अभ्यासपूर्ण लिखाणाने रंगवले आहे. अगदी आपण स्वतः त्या लढाईचे साक्षीदार आहोत असच ते प्रकरण वाचताना वाटत. अफजलखानाच्या मोहिमेपर्यत शिवाजी महाराज किल्ले आणि सभोवतालची व्यवस्था लावताना दिसतात. प्रशासन, महसूल,न्याय, शेती आणि राज्यकारभार इत्यादी त्यांचे मुख्य विषय होते परंतु अफजलखानाच्या स्वारीनंतर महाराज वेगळ्या स्वरूपात दिसतात दिसतो तो त्यांच्यातला मुत्सद्दि, राजकारणी, कुठनीतीज्ञ आणि धोरणी योद्धा. अफजल खान वधानंतरच्या भागात कादंबरीचा शेवट होतो आणि आस लागते ती पुढच्या रणखैदाळाची. ...Read more

  • Rating Star१३.११.२०२२ सकाळ

    छत्रपती शिवरायांच्या जन्माआधीच्या संघर्षमय कालखंडावर प्रकाश टाकणारा ग्रंथ म्हणजे झंझावात. ज्येष्ठ लेखक विश्वास पाटील यांनी छत्रपती शिवरायांच्या जीवनावर कादंबरी मालिकेचा संकल्प सोडला आणि त्यातला पहिला भाग म्हणजे हे पुस्तक. आतापर्यंत शिवरायांच्या पराकरमावर व जीवनावर आधारित अनेक पुस्तके आली आहेत. अजूनही काही येत आहेत. या कादंबरीमालिकेचे वैशिष्टये म्हणजे नवे पुरावे विचारात घेत लेखकाने येथे इतिहासाशी फारकत घेतलेली नाही. तसेच सत्य झाकोळले जाणार नाही याची काळजी घेतली आहे. दंतकथांना स्थान दिलेले नाही. केवळ कल्पनेचा आधार घेतलाय तो वातावरण निर्मितीसाठी. मात्र अनेक अपरिचित ऐतिहासिक बाबींना या खंडात स्थान मिळाले आहे. शिवराय हि व्यक्ती नव्हती , तर एकाच वेळी सात ते आठ माणसांचे काम करणारी हि संस्था होती, असावं विधान पाटील यांनी मनोगतामध्ये केले आहे. याला बांधील राहून पाटील यांनी या महामालेचे लेखन केले आहे. छत्रपती शिवराय यांच्या आधी शहाजीराजांनी जे काम केले ते इतिहासात फारसे सांगितले गेलेलं नाही. मात्र हा काळ सांगितल्याशिवाय छत्रपती शिवरायांच्या जडणघडणीचा कालखंड समजणार नाही. शहाजीराजांनी १६२४ मध्ये भातवडीची लढाई केली ती प्रत्यक्ष दिल्लीचा बादशहा जहांगीर याच्या फौजेशी, तर १६३५ मध्ये शहाजहानशी त्यांनी युद्ध केले. विजापूरच्या आदिलशाहीचे शहाजीराजांनी प्रचंड नुकसान करूनही त्याच आदिलशाहीने शहाजीराजांना सरनोबत म्हणून सन्मानाने पाचारण केले हे वेगळे उदाहरण आहे. विश्वास पाटील यांनी या महाकादंबरीची रचना करताना अशा अपरिचित गोष्टींचा मागोवा घेतला आहे. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यनिर्मितीत शहाजीराजांचे आणि जिजाऊंमातांचे कसे मोठे योगदान होते. याचा तपशील या खंडामध्ये मिळतो. छत्रपती शिवरायांचे स्वराज्य उभारणीचे काम सुरु झाल्यानंतर या स्वराज्यावर मोठा आघात झाला तो म्हणजे अफजखानाच्या स्वारीने, अफजखानाच्या स्वारीने स्वराज्यापुढे मोठे आव्हान उभे केले; मात्र छत्रपती शिवरायांनी योग्य ती व्हुहरचना रचून अफजल खानाची स्वारी संपवलीच; पण अफजल खानाचा वधही केला. हा सारा घटनाक्रम याच खंडामध्ये आलेला आहे. छत्रपती शिवरायांवरील या कादंबरीत ललित लेखनाची शैली असली तरी कौटुंबिक वातावरणाला अवास्तव स्थान देण्यात आलेले नाही. इतिहासाशी जितके प्रामाणिक राहता येईल तितके राहून पाटील यांनी हा सगळा कालखंड प्रेरणादायी शब्दांत उभा केला आहे. यातील प्रत्येक प्रकरणाचे शीर्षकही लक्षवेधी आणि चपखल असे आहे. `कडोविकडीची लष्करपेरणी` हे शीर्षक ज्या प्रकरणाला दिले आहे, या प्रकरणात अफजल खानाभोवती प्रतापगडाच्या परिसरात महाराजांनी कशी व्यूहरचना केली होती त्याचा तपशील कळतो. नेताजी पालकर यांच्यावरील प्रकरणातून महाराजांच्या बरोबर किती ताकदीची माणसे होती हे लक्षात येते. बंगळूर येथे शहाजीराजांच्या तालमीत छत्रपती शिवरायांना राजधर्माचे धडे कसे मिळाले, तसेच वेगवेगळ्या लढायांमध्ये शहाजीराजांनी कोणती भूमिका घेतली, मुस्तदेगीरीने संकटावर कसा मार्ग काढला याचे मार्गदर्शन शिवरायांना या काळात मिळाले. `झंझावात` या पहिल्या खंडात निम्म्यापेक्षा जास्त भाग शहाजीराजांनी विविध लढायांमध्ये केवढा मोठा पराक्रम केला होता त्याचा तपशील कळतो. इतिहास हा जसेजसे नवेनवे संशोधन होईल तसतसा उलगडला जात असतो. गेल्या शंभर वर्षात छत्रपती शिवरायांच्या आयुष्यावर अनेक पुस्तके अली; मात्र जास्तीत जास्त नव्या संशोधनाचा समावेश करीत, तसेच वस्तुनिष्ठ भूमिका घेत केवळ भाषेच्या प्रेमात न पडत ऐतिहासिक सत्य मांडण्याचा प्रयत्न विश्वास पाटील यांनी कादंबरी मालेच्या लेखनात केला आहे. जवळजवळ २५० पेक्षा जास्त किल्ल्यांना पाटील यांनी भेट दिली आहे. शिवचरित्राचे अभ्यासक व इतिहास संशोधक विविध बखरींचा ,तसेच परदेशी इतिहासकारांनी नोंदविलेल्या तपशिलाचा सांगोपांग विचार करून महाराजांच्या जडणघडणीचा काळ या खंडात पाटील यांनी मांडला आहे. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more

I HAVE A DREAM
I HAVE A DREAM by RASHMI BANSAL Rating Star
Krishna Diwate

‘स्टे हंग्री स्टे फूलीश’ आणि ‘कनेक्ट द डॉटस’ या बेस्ट सेलर पुस्तकाच्या लेखिका ‘समाजातल्या परंपरागत समस्या सोडवण्याचा नवा मार्ग शोधून काढणार्‍या वीस सामाजिक उद्योजकांच्या प्रेरणादायी कहाण्या’ हे वाक्य पुस्तकाचे पहिले पान उघडले आणि दिसले. त्यामुळे माझ कुतुहल चाळवले आणि ते पुस्तक वाचायला सुरुवात केली. मनोगतात लेखिका म्हणतात की, आता नव्या दमाचे, डोक्याने आणि मनाने ही विचार करणारे काही जण एखाद्याच्या नजरेतील दुःख ओळखतात, पेटून उठतात; पण ते त्याच्यावर विचार एखाद्या उद्योजकाप्रमाणे करतात. म्हणून ते ‘सामाजिक उद्योजक.’ नफा मिळविण्याचा हव्यास नसला तरी ते बिझनेस मधील तत्वे वापरून ती गोष्ट साध्य करतात. हे काही तरी वेगळे आपण वाचत आहोत असे मला वाटले. त्यामुळेच ते पुस्तक वाचायला घेतले. ह्या मध्ये वीस लोकांची चरीत्रे आहेत. ते सर्व भारतीय, उच्चशिक्षित तरूण तरूणी आहेत. कोणी त्यातील शास्त्रज्ञ आहेत तर कोणी मरिन बायोलॉजिस्ट, आयआयटी, आयआयएम ग्रॅज्युएट आहेत पण कोणत्या कोणत्या सामाजिक प्रश्नाने ते अस्वस्थ झाले आणि नेहमीच्या मार्गाने न जाता वेगळीच वाट पकडली. पुस्तकात ‘रेनमेकर्स,’ ‘चेंजमेकर्स’ व ‘स्पिरिच्युअल कॅपिटॅलिस्ट’ असे तीन भाग आहेत. प्रत्येकात अनुक्रमे अकरा,सहा व तीन व्यक्तीमत्वांची ओळख करून दिली आहे. ‘सुलभ’ ही आधुनिक टॉयलेटस उभारणारे बिंदेश्वर पाठक ह्याच्या चरित्राने पुस्तकाची सुरुवात होते. जातीने बिहारमधील ब्राह्मण. पण लहानपणी टॉयलेटस साफ करणार्‍याला हात लावला त्यामुळे आजीने अक्षरशः शेण, गोमुत्र खायला लावले. पण त्याच बिंद्रेश्वरांनी अगदी योगायोगाने ह्याच क्षेत्रात काम करण्याचे ठरविले. अर्थात ही वाट निश्चितच सोपी नव्हती. अनेक हालअपेष्टा सोसत, जगाचे धक्के खात, अनेक समस्यांना तोंड देत आपले स्वप्न ‘सुलभ शौचालयाच्या’ माध्यमातून सुरु केले. तो सगळा खडतर प्रवास अर्थात पुस्तकातूनच वाचायला हवा. त्यासाठी त्यांनी केवळ ती यंत्रणा तयार केली नाही तर ती टॉयलेटस बांधून, त्यासाठी लागणारी प्रेरणा, शिक्षण, संभाषण, ट्रेनिंग, पाठपुरावा अशा सर्वच गोष्टी ‘सुलभ’ तर्फेच संभाळल्या जातात. सध्या ही संस्था स्वबळावर चालते. 100 ते 125 कोटी इतके तिचे वर्षाचे उपन्न आहे. इतकेच नाही पूर्वी जे लोक सफाईचे काम करत असत त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च संस्था करत आहे. ‘सुलभ पब्लिक स्कूल’ नावाने शाळा सुरु केली आहे. तरूणांसाठी व्होकेशनल क्लासेस चालवले जातात. म्हणजे मिळालेला नफा पुन्हा त्याच सफाई कामगारांच्या कल्याणासाठी वापरला जातो. टॉयलेटस बांधून भरपूर पैसा मिळवता येतो हे वाक्य पचायला जरा जडच जाते. अनिता आहुजा ही दिल्लीत सुखवस्तू कुटूंबात रहाणारी सामान्य स्त्री. पण कचरा वेचणार्‍या मुलांचे हाल पाहून त्यांच्यासाठी काही तरी करावे असे तिने ठरविले. तिने 1998 मध्ये कॉन्झर्व्ह नावाची संस्था उभी केली. व त्यातून पहिला प्रोजेक्ट सुरु केला तो म्हणजे आजुबाजूच्या परिसरातील कचरा उचलून त्याचे कंपोस्टखत तयार करणे. कचरा गोळा करण्यासाठी चांगल्या ढकलगाड्या आणल्या, युनिफॉर्म, आय कार्डची सोय केली. 2002 पर्यंत एक पूर्ण वेळ काम करणारी मोठी संस्था बनली. त्याचवेळी त्यांनी प्लॅस्टीकच्या कचर्‍यावर प्रयोग सुरु केले. तिचे पती शलभ ह्यांनी बिटस पिलानी मधून इंजिनिअरींग केले आहे. त्यांच्या मदतीने तिने फॅक्टरी सुरु करण्याचे ठरविले. शलभने मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक शीटस निर्मिती करू शकेल असे मशीन तयार केले. त्यासाठी अर्थातच अनेक प्रश्न समोर उभॆ राहिले. चुका झाल्या, ठोकरा खाल्या पण त्यातून वाट काढत त्यांनी चिकाटीने प्रयत्न सुरुच ठेवले. आज दोघे मिळून कचर्‍यातील प्लॅस्टिक पिशव्या वापरून आकर्षक अशा हॅडबॅगस तयार करण्याचा कारखाना चालवतात. जे लोक सुरुवातीला केवळ कचरा उचलण्याचे काम करत होते, त्यांच्या काही कौशल्य दिसले की त्यांना वेगळे काढून ट्रेनिंग दिले जाते. मशीनवर असिस्टंटचे काम करू लागतात त्यातून काही लोक तर ग्रुप लिडर ही झाले आहेत. कटींग करणॆ, क्वालिटी तपासणॆ, फिनिंशींग, पॅकिंग अशी सर्व महत्वाची कामे ते करतात. आता ते कामगार झाल्यामुळॆ त्यांना चांगला पगार, प्रॉव्हिडंट फंड, ओव्हरटाईम अशा सुविधा मिळू लागल्या त्यापेक्षा ही जास्त त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळाली. त्यांच्या साठी हे नवीनच आहे. अनिता व शलभ दोघॆही मेहनत घेतात पण एनजीओ असून ही भरपूर पैसा कमावणे त्यांना चुकीचे वाटत नाही. कारण आज ह्या एका उद्योगामुळे कित्येक कुटूंबाची आर्थिक स्थिती बदलून गेली आहे. अशीच अजून एक प्रेरणादायी कथा दिल्लीतील रंगसूत्र कंपनी चालविणार्‍या सुमिता घोस ह्यांची. स्वतः ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यावर मास्टर इन इकॉनॉमिक्स ची पदवी घेतल्यावर संजॉय घोस ह्या या आय आर एम मधून शिक्षण घेतलेल्या ध्येयवादी तरूणाशी लग्न केले. पण दुर्दैवाने आसाममध्ये काम करत असताना त्यांची 1998 मध्ये उल्फाच्या अतिरेक्यांनी हत्या केली. त्यानंतर अनेक टक्केटोणपे खात, दोन लहान मुलांचा संभाळ करत सुमिताने ‘रंगसूत्र’ नावाची कंपनी काढली. त्याच्या मार्फत ती खॆडॆगावातल्या लोकांकडून कापड, शोभॆच्या वस्तू, बनवून घेते आणि त्या फॅब ईंडीयासारख्या प्रसिध्द कंपन्यांना विकते. जैसलमेर, बारमेर जिल्ह्यातले कारागिर तिच्यासोबत काम करत आहेत. अजून एक अशीच ध्येयवादी तरूणी म्हणजे इशिता खन्ना. डेहराडून मध्ये जन्म झालेली एक सर्वसामान्य मुलगी. पण निसर्गसंवर्धन आणि भूगोल या विषयांची आवड असलेली. म्हणूनच तिने आपल्या ग्रॅज्युएशन नंतर टाटा इंन्स्टीट्यूट मधून मास्टर्स केले. पर्यावरण क्षेत्रातच काम करायचे आहे हे निश्चित ठरवून तिने काही वर्षे नोकरी केली. त्यानंतर 2002 मध्ये नोकरी सोडून आपल्या दोन मित्रांसोबत स्पिती व्हॅलीमध्ये मूस नावाची एन्जीओ सुरु केली. तेथील स्थानिक महिलांचे ग्रुपस करून त्यांना तिथे असणार्‍या सीबक थॉर्न ह्या फळांच्या लागवडीचे ट्रेनिंग दिले. त्यावर प्रक्रिया करायला शिकवले. ही झाडॆ मातीला धरून ठेवतात त्यामुळे धूप रोखली जाते, शिवाय नायट्रोजन ही धरून ठेवत असल्याने जमिनीचा पोत सुधारतो. त्यामुळे ह्या फळांवर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे तिथल्या बायकांना चांगला रोजगार मिळू लागला. त्याचबरोबर तिने स्थानिक तरूणांना पर्यटकांना ट्रेक किंवा जीप सफारीसाठी नेणे, कॅम्प लावणे, गरज पडल्यास प्रथमोपचार करणे ही कामे ही करायला शिकवले. कारण हळूहळू तिथे पर्यटन वाढू लागले. ते इको-फ्रेंडली करण्याकडॆ तिच्या इकोस्पियर संस्थेचा भर आहे. आता दरवर्षी पर्यटनातून 35 ते 40 लाखाचे उत्पन्न मिळते.आणि त्यातून नफा ही मिळतो. इकोस्पियर संस्थेने शेजारच्य़ा ‘लाहुल’ व्हॅलीमध्ये ही विकास कामे सुरु केली आहेत. पर्वतावर तयार होणार्‍या कचर्‍याच्या समस्येवरही तिला काहीतरी करायचे आहे. तिची संस्था लोकांना मुद्दाम तिथले लोक किती अवघड परिस्थितीत रहातात हे दाखवते. अतिशय थंडीत तिथे तापमान मायनस 35 पर्यंत खाली गेल्यावर हॅंडपंपने पाणी काढणे सुध्दा किती कठीण होते हे सांगितले जाते. तेव्हा आपल्यासारख्य़ा पर्यटकांना काय काय करता येईल याबद्दल ती जागरूकता निर्माण करते. मूळात हे पुस्तक 2012 साली लिहिलेले आहे. त्यामुळे आता ह्या वेगवेगळ्या प्रकारचे काम करणार्‍या संस्थेचे काम या दहा वर्षात खूपच वाढले असेल यात काही शंका नाही. दीनबंधू साहू हे मरिन बायोलॉजिस्ट आहेत पण ते प्रयोगशाळेतून बाहेर पडून समाजासाठी काम करतात. ‘प्रोजेक्ट चिलका’ ह्या त्यांच्या संस्थेमार्फत ओरिसातील लोकांना समुद्राची शेती करायला शिकवतात. ओरिसा मधील पुरी येथे जन्म झालेल्या दीनबंधूनी अतिशय हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेतल्यानंतर दिल्लीत एमएसीला ॲडमिशन घेतली. परंतु योगायोगाने १९८७ मध्ये अंटार्क्टिक वर जाण्याची संधी मिळाली. नंतर पीएचडी पूर्ण केल्यानंतर अनेक देशांमध्ये नोकरी निमित्ताने फिरले. पण तरीही शेवटी दिल्ली युनिव्हर्सिटी मध्ये प्रोफेसर म्हणून काम सुरू केले. त्यांना समुद्री वनस्पती बद्दल विशेष आस्था होती; पण त्या बद्दल आपल्या देशात फारशी जागरूकता नव्हती. ही लागवड पर्यावरण पूरक असते शिवाय त्यातून स्थानिक लोकांना उत्पन्नाचे साधन मिळते. त्यासाठी डिएसटीने निधी मंजूर केला. मग त्यांनी चिल्का सरोवराची पहाणी केली, त्यामध्ये वाढू शकतील अशा चार जातींची निवड करून स्थानिक लोकांना समजेल अशा सोप्या भाषेत माहिती दिली. प्रात्यक्षिके दाखवली, वर्कशॉप्स घेतली. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना रोजगार मिळू लागला. यातूनच पर्यावरण संरक्षण ही होऊ लागले. यातून त्यांना प्रत्यक्ष कांहीं आर्थिक फायदा होत नसला तरी ते म्हणतात, की आम्हाला दोघांना दिल्लीत चांगली नोकरी आहे. त्यामुळे पैसे कमावणे हा उद्देश नाही; पण अजून तीस वर्षांनंतर मला मी काही तरी काम केलेले दिसेल. असे जर काहीच तुम्हाला दिसणार नसेल तर जगायचे कशाला? भूषण पुनानी हे असेच अत्यंत बुध्दीमान विद्यार्थी. मेडीकलची ॲडमिशन हुकल्यामुळे डेअरी कोर्ससाठी ॲडमिशन घेतली. तिथे ही विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविला. नंतर पीएचडी केले. ग्रामविकास शिकण्यासाठी आयआयएम मध्ये एमबीए केले. हे झाल्यावर 1979 मध्ये ब्लाईंड स्कूल मध्ये दोन वर्षांसाठी नोकरी सुरु केली ती सुधा ह्याच हेतूने की मॅनेजमेंट शिकताना जी थेअरी शिकलो ती विकासाच्या क्षेत्रात वापरता येईल का? हळूहळू त्यांना अनेक लोक मिळत गेले. सर्वांनी मिळून आज संस्था खूप मोठी केली आहे.त्यांनी काम सुरु केले तेव्हा फक्त एक कॅपस होता, आज गुजरात मध्ये आठ कॅपस आहेत. दहा लाख मूल्य असलेली संस्था आज दोन कोटी रुपयांची आहे. अपंग लोकांनी स्वावलंबी व्हावे ह्यासाठी संस्था काम करते. दृष्टीहीन मुली ब्यूटी पार्लरसारखे कोर्स चालवतात, फिजिओथेरपी शिकून सेंटर मध्ये काम करतात. विकास साधण्यासाठी योग्य व्यवस्थापनेची गरज असते हे त्यांनी दाखवून दिले आहे. हजारो लोकांच्या आयुष्यात नवा प्रकाश निर्माण करून त्यांना सामान्य आयुष्य जगण्याची संधी मिळवून दिली आहे. अशी ही एकापेक्षा एक वेगवेगळ्या प्रकारची माणसे. कोणत्या तरी ध्येयाने पछाडलेली . सामाजिक कार्य करत असतानाच त्या लोकांचे कल्याण कसे होईल असा विचार करणारी. लेखिकेने त्या सर्वांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या आहेत, त्यांचे काम प्रत्यक्ष पाहून जाणून घेतले आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित गोळा करून आपल्यासमोर मांडली आहे. त्यामुळेच त्या मनोगतात म्हणतात, ‘तुमचं आयुष्य कसे ही असले तरी इतरांसाठी एखादा क्षण द्या. इतरांना प्रेम, आनंद, चांगुलपण द्या. जितकं द्याल तितकं तुम्हाला परत मिळेल.’ हेच वाक्य मलाही अतिशय उर्जा देऊन गेले. माझ्याकडे जे आहे, जे मला देणे शक्य आहे ते निरपेक्षपणे ज्यांना गरज आहे त्याला देणे ह्या सारखा आनंद अजून काय असणार? ह्याच वाक्याने मी आपली ह्या आठवड्यात रजा घेते. उद्या पासून सुरु होणार्‍या नवीन सत्रासाठी सारिका ताईंना हार्दिक शुभेच्छा. ...Read more