* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789394258358
  • Edition : 2
  • Publishing Year : AUGUST 2022
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 460
  • Language : MARATHI
  • Category : HISTORICAL
  • Available in Combos :VISHWAS PATIL COMBO SET - 10 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
LIFE STORY OF CHHATRAPATI SHIVAJI IS FLAMBEAU WHICH INSPIRES INDEPENDENCE, LIBERTY AND SOVEREIGNTY. FLAMES OF HIS REIGN HISTORY ARE ENLIGHTENING THE MAHARASHTRA FOR CENTURIES. THIS CRESSET OF OUR MAHARAJA IS PENNED DOWN BY OUR OWN RENOWNED AUTHOR VISHVAS PATIL. ‘JHANJHAWAT’ IS THE FIRST BOOK IN HIS NOVEL SERIES ‘MAHASAMRAT’- CHHATRAPATI SHIVAJI MAHARAJ BIOGRAPHY. THE BOOK IS ABOUT THE PHENOMENA WHICH BOWED THE SEED OF ESTABLISHING OWN EMPIRE IN SHIVAJI MAHARAJA’S MIND. THE BOOK TELLS THE UNKNOWN HISTORY OF MARATHA’S PRIOR TO SHIVAJI MAHARAJA’S BIRTH. IT ALSO INCLUDES JIJAU-SHIVAJI MAHARAJ BIJAPUR TOUR, HIS EARLY TRAINING UNDER GUIDANCE OF SHAHAJI RAJE. THESE ASPECTS OF THE HISTORY WILL BE ENTIRELY NEW AND OVERWHELMING FOR THE READERS, NO DOUBT ABOUT THAT.
छत्रपती शिवरायांची जीवनगाथा म्हणजे स्वातंत्र्याचं स्फुल्लिंग जागवणारी धगधगती मशाल. या मशालीच्या ज्वाला महाराष्ट्राला शेकडो वर्षे प्रकाशमान करत आहेत. हाच प्रकाश दीप लोकप्रिय लेखक विश्वास पाटील यांच्या लेखनीतून वाचकांच्या भेटीस येत आहे. छत्रपती शिवरायांच्या जीवनावरील महासम्राट या कादंबरीमालेतील हा पहिला खंड अर्थात झंझावात. छत्रपती शिवरायांच्या हदयात ज्या घटनांनी स्वराज्याचं स्फुल्लिंग जागवलं, त्या घटनांचा विस्तृत परीघ आणि अवकाश सादर करणारं हे पुस्तक आहे. शिवरायांच्या जन्मापूर्वीच्याही आधीच्या अज्ञात इतिहासावर प्रकाशझोत टाकत नवी ऐतिहासिक मांडणी यात आहे. जिजाऊ आणि शिवरायांचा विजापूर दौरा, शहाजीराजांच्या उपस्थितीतली शिवरायांची तालीम, हा इतिहासाचा पैलू मराठी वाचक प्रथमच वाचतील आणि तो वाचकांना भारावून टाकणारा ठरेल, यात शंका नाही.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MAHASAMRAT #ZAZAVAT #VISHWASPATIL #CHATRAPATIVISHWASPATIL #NOVEL #SHAHAJIMAHARAJ #JIJAU
Customer Reviews
  • Rating Starनवनाथ इंगोले

    अद्वितीय लेखक. मी ज्यावेळी पानिपत वाचली होती त्याच वेळी वाटलं होतं की, महाराजांवर एक उत्कृष्ट लिखाण फक्त विश्वास पाटीलच लिहू शकतील. आणि त्यांनी ते करून दाखवलं आहे. एवढा मोठा विषय असून त्याला शब्दबध्द करून, वाचनीयता कोठेही कमी होत नाही. हे विशेष. वैचरिक परिपक्वता, भरपूर शब्द साठा, अफाट अभ्यास. वाचकाला खिळवून ठेवणारी व त्याच वेळी त्याला वास्तवतेचे भान देणारे लेखनशैली.. किती किती आणि किती... वेडा होऊन गेलो आहे मी. जन्माला येऊन सार्थक झालो आहे, श्री. विश्वास पाटील यांची पुस्तकं वाचून.. तुम्हीही वाचा. ज्ञानात मोलाची भर पडली आहे.. ...Read more

  • Rating Starवाचक

    🚩शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा🚩 महासम्राट या सिरीज मधील खंड पहिला झंजावात आज वाचून पूर्ण झाला. विश्वास पाटील यांचे संभाजी वाचले होते तेव्हा मला वाटून गेले होते की याच लेखकांनी शिवरायांबद्दल पण लिहिले पाहिजे. मध्यंतरी ही जेव्हा बातमी कळली तव्हा खूप आनंद झाला. छत्रपती शिवरायांवरील अशा मालिकेची मराठीत नितांत आवश्यकता होतीच. पुस्तक सुरू होते ते थोरले महाराज शहाजीराजे यांच्या घोडदौडीपासून. अधे-मध्ये भोसले परिवाराचा इतिहास सुद्धा अनुभवायला मिळतो. दख्खन मध्ये वावरत असणाऱ्या जुलमी परकीय सत्ता त्यांनी ,माजवलेला हल्लकल्लोळ शहाजी महाराज यांची धावपळ येणारे कठीण प्रसंग यानंतर वाचक प्रवेश करतो तो छत्रपती शिवरायांच्या आयुष्यात. प्रतिकूल परिस्थितीत झालेला जन्म बंगलोर मधील दिवस पुण्यातील दिवस स्वराज्य स्थापना लोकप्रशासन. उत्तम करव्यवस्था सैनिकांचे प्रशिक्षण या बाबी हायलाईट केलेल्या आहेतच शिवाय पाठ्यपुस्तकातून वगळलेले अनेक प्रसंग संदर्भ या पुस्तकात वाचायला मिळतात पुरंदर बद्दलचे वेगळे संदर्भ त्यांचे महत्त्व जावळीचे प्रकरण आणि पुस्तकाचा शेवट होतो तो अफजलखानाचा वध या प्रकरणाशी. यानंतर आता याच सिरीजचा दुसरा खंड Rankhaindal वाचणार आहे. ऐतिहासिक पात्रे त्यांचे वर्णन आजूबाजूचा परिसर आणि घटना लेखकांनी जिवंत केल्या आहेत. त्यामुळे इतिहासाचा रियल आस्वाद घ्यायची संधी मिळते ...Read more

  • Rating StarAbhiram Bhadkamkar

    महा-सम्राट "इतिहास वाचून माणूस बेभान होतो, भानावर येतोच असं नाही" हे (बहुधा) वि ग कानेटकर यांचे विधान मला कायमच महत्वाचे वाटते। प्रकाशनास काही महिने लोटले असले तरी निवांत ऐसपैस वेळ काढून वाचायची म्हणून बाजूला ठेवलेली ज्येष्ठ कादंबरीकार विश्वा पाटील ह्यांची महासम्राट ही कादंबरी हातात घेतली आणि तिने झपाटून गेलो। ही कादंबरी बेभानही करते आणि एक भानही देते हे तिचे वैशिष्ट्य आहे. विश्वासरावांची शैली आणि त्यांची शब्दसंपत्ती ह्यावर नवे काय बोलणार? पण ही कादंबरी उभ्या देशाचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांच्या आयुष्यातील घटनांचे केवळ चमकदार कथन यापुरती मर्यादित न राहता तत्कालीन सामाजिक व राजकीय परिसराचे भान देणारी ठरते। तेव्हाचा काळ बारीकसारीक तपशिलांसह उभा करते. ती छत्रपतींच्या तेजस्वी कर्तृत्वाला मुजरा तर करतेच पण त्यासोबत त्यांच्या जन्मापूर्वीची राजकीय परिस्थिती, त्यातून आईसाहेबांच्या मनात उगवलेल्या हिंदवी स्वराज्याच्या अत्यंत अवघड, जवळजवळ अशक्यप्राय स्वप्नाच्या पाठलागाची वेगवान घडामोड चितारते. मुघलांचे डावपेच, खेळया नेस्तनाबूत करण्यामागची `अत्यंत योजनाबद्ध आखणी` मांडत जाते। ही कादंबरी माझे त्याकाळाबद्दलचे आकलन वाढवते. मऱ्हाटी मुलाखातला तत्कालीन निसर्ग यात येतो, तत्कालीन नातेसंबंध, समाजधारणा आणि परचक्राच्या दडपणाखालची उलघाल यातून त्या काळाचा पट मांडला जातो आणि इथेच कादंबरी केवळ एका युगपुरुषांचे चरित्रकथन न रहाता एका शतकाचा लेखाजोखा होऊन जाते। वेगळेपण आहे ते हेच की ही कहाणी महाराक्षसी लाटांविरुद्ध पोहून जात महासागरालाच बांधून घालणाऱ्या चिवट आशावादाची आणि या स्वप्नाला प्रत्यक्षात उतरवणाऱ्या बुद्धीचातुर्याची होत जाते। म्हणूनच ती एकाच वेळी बेभानही करते आणि भानही देते। कादंबरी संपते एक स्वल्पविराम देत... आता पुढचे भाग... त्याची अधीरता आणि उत्सुकता... डोळे दिपून जावेत अशा थोर व्यक्तिमत्वाचे चित्रण हे शिवधनुष्य होते, जे लिलया पेलले आहे... यात रेखाटलेली चित्रे अप्रतिम आहेत... घराघरात भक्तिभावाने ठेवावा आणि `अभ्यासावा` असा हा `झंझावात` आहे... ...Read more

  • Rating Starअपूर्व मराठे.

    नुकताच ही कादंबरी वाचून पूर्ण झाली. कादंबरीची सुरुवात शहाजीराजे भोसले ह्या व्यक्तिमत्वापासून होते शहाजी राजांचा पराक्रम, त्यांची धोरणी बुद्धी, लष्करशक्ती आणि मराठ्यांचे स्वतंत्र तख्त निर्माण करण्याची तीव्र इच्छा त्या भोवतीचे त्यांचे अटीतटीचे प्रयत्न ादंबरीची सुरुवात करते. जिजाऊमासाहेब त्यांची मानसिकता आणि त्यांनी उरी बांधलेली स्वप्ने आणि आपले पती शहाजी राजे ह्यांना दिलेली साथ कादंबरीला भावनिक रूप आणते. लखोजीराव जाधव, मलिक अंबर, ही अनेक पात्रे व त्यांची वर्णन वाचताना ती आपल्यासमोरच आहे असं वाटतं. प्रत्येक गोष्ट अगदी 360 अंशात सांगितली आहे. ऐतिहासिक कादंबरी प्रमाणे ह्यात फक्त वर्णन नाहीत लष्करी, राजकीय, प्रशासनिक, महसूली, सामाजिक, भावनिक, मुत्सद्दी अश्या अनेक तत्कालीन गोष्टींवर प्रकाश टाकला आहे. श्री विश्वास पाटील ह्यांच्या लिखाणची खासियत म्हणजे युद्धवर्णन ते अगदी जबरदस्त शब्दात करतात. हत्यार त्याचे वैशिष्ट्य तर त्याचा वार आणि झालेली जखम सुद्धा सांगण्याची ताकत त्यांच्या लिखानातं आहे.. बंगळूर प्रांतातुन परत आल्यावर शिवाजी राजांना राज्य निर्माणकरण्यासाठी प्रेरणा कश्या महत्वाच्या ठरल्या व मावळ आणि किल्ले सुलतान का देत नाही त्यांचे गमक महाराजांनी कसे हेरले हे अतिशय वाचनीय.मावळातून मिळवलेली मदत पुरंदरची लढाई आणि हळूहळू सुरु स्वराज्याची प्रदीर्घ मोहीम. अफजल खानाचे प्रकरण अतिशय रुपक पण अभ्यासपूर्ण लिखाणाने रंगवले आहे. अगदी आपण स्वतः त्या लढाईचे साक्षीदार आहोत असच ते प्रकरण वाचताना वाटत. अफजलखानाच्या मोहिमेपर्यत शिवाजी महाराज किल्ले आणि सभोवतालची व्यवस्था लावताना दिसतात. प्रशासन, महसूल,न्याय, शेती आणि राज्यकारभार इत्यादी त्यांचे मुख्य विषय होते परंतु अफजलखानाच्या स्वारीनंतर महाराज वेगळ्या स्वरूपात दिसतात दिसतो तो त्यांच्यातला मुत्सद्दि, राजकारणी, कुठनीतीज्ञ आणि धोरणी योद्धा. अफजल खान वधानंतरच्या भागात कादंबरीचा शेवट होतो आणि आस लागते ती पुढच्या रणखैदाळाची. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

KHULBHAR DUDHACHI KAHANI
KHULBHAR DUDHACHI KAHANI by SUNANDA AMRAPURKAR Rating Star
श्रीपाद ब्रह्मे

नुकतंच असंच वेगानं वाचून संपवलेलं दुसरं पुस्तक म्हणजे सुनंदा अमरापूरकर यांचं ‘खुलभर दुधाची कहाणी’. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या त्या पत्नी. अर्थात ही काही त्यांची एकमेव ओळख नव्हे. एक चांगल्या अभिनेत्री, उत्तम अनुवादक म्हणूनही त्या ्रसिद्ध आहेत. त्यांनी ‘खुलभर दुधाची कहाणी’ या आत्मचरित्रवजा लेखनातून त्यांच्या जगण्याचा व्यापक पट अतिशय प्रांजळपणे उलगडला आहे. मला हे पुस्तक विशेष भावण्याचं कारण म्हणजे त्यात आलेलं नगरचं वर्णन. मी स्वत: नगरला फार प्रदीर्घ काळ राहिलो नसलो, तरी ते शेवटी माझ्या जिल्ह्याचं गाव. आणि वयाच्या १३ ते २२ अशा महत्त्वाच्या कुमार व तरुण वयातला माझा तिथला रहिवास असल्यानं नगरच्या आठवणी विसरणं शक्य नाही. सुनंदाताई माझ्या आईच्या वयाच्या. त्यामुळं त्यांच्या लहानपणच्या आठवणी जवळपास माझ्या जन्माच्या २०-२५ वर्षं आधीच्या. असं असलं तरी मी त्या वर्णनाशी, त्या काळातल्या नगरशीही रिलेट होऊ शकलो, याचं कारण मुळात गेल्या शतकात बदलांचा वेग अतिशय संथ होता. नगरसारख्या निम्नशहरी भागात तर तो आणखी संथ होता. त्यामुळं एकूण समाजजीवनात १९६० ते १९९० या तीस वर्षांत तपशिलातले फरक सोडले, तर फार मोठा बदल झाला नव्हता. सुनंदाताई माहेरच्या करमरकर. त्यांचं आजोळ‌ सातारा असलं, तरी त्या जन्मापासून नगरमध्येच लहानाच्या मोठ्या झालेल्या. अगदी पक्क्या ‘नगरी’ म्हणाव्यात अशा. ( आजही त्या स्वत:ला अभिमानानं ‘नगरकर’च म्हणवून घेतात.) सुनंदाताईंचे वडील त्या दहा वर्षांच्या असतानाच गेले. त्यांना मामांचा आधार होता, पण आईनंच लहानाचं मोठं केलं. तेव्हाचं त्यांचं निम्न मध्यमवर्गीय जगणं, नगरमधले वाडे, तिथलं समाजजीवन, तिथल्या शाळा, शिक्षक, नगरमधील दुकानं, दवाखाने, तिथल्या गल्ल्या, बाजार हे सगळं सगळं सुनंदाताई अतिशय तपशीलवार उभं करतात. नगरसारख्या मध्यम शहरात वाढलेल्या महाराष्ट्रातील कुठल्याही शहरातील त्या काळातील व्यक्तीला अतिशय सहज रिलेट होईल, असं त्यांचं हे जगणं होतं. त्यात सुनंदाताईंचं लेखन अतिशय सहज, सोपं आणि प्रांजळ असल्यामुळं ते आपल्याला अगदी भिडतं. एका प्रख्यात अभिनेत्याची पत्नी असल्यानं त्यांचं जीवन इतर सर्वसामान्य स्त्रियांपेक्षा वेगळं झालं असेल, अशी आपली अपेक्षा असते. सुनंदाताईंच्या लेखनातून या ‘वेगळ्या जीवना’ची काही तरी झलक मिळेल, अशीही आपली एक भूमिका तयार झालेली असते. सदाशिव अमरापूरकरांसारख्या मनस्वी अभिनेत्याशी लग्न झाल्यानंतर सुनंदाताईंचं जगणं बदललंही; मात्र ते वेगळ्या पद्धतीनं. सदाशिव अमरापूरकर ऊर्फ नगरकरांचा लाडका बंडू त्यांना नगरमध्ये शाळेपासून कसा भेटला, नंतर कॉलेजमध्ये दोघांनी एकाच ग्रुपमधील नाटकं कशी सादर केली, त्यात अगदी नकळतपणे त्यांचं प्रेम कसं जमलं आणि नंतर नगर सोडून त्या पतीच्या कारकिर्दीसाठी मुंबईत कशा आल्या हा सर्व नाट्यमय प्रवास सुनंदाताई अतिशय तन्मयतेनं मांडतात. अमरापूरकर मंडळींच्या घराविषयीचे तपशील त्यात येतात. अमरापूरकरांचे वडील दत्तोपंत हे नगरमधलं मोठं प्रस्थ. श्रीमंत घराणं. मोठा वाडा, नोकरचाकर वगैरे. त्या तुलनेत सुनंदाताईंची माहेरची परिस्थिती जेमतेम म्हणावी अशी. अशा परिस्थितीत हे लग्न झालं आणि त्या अमरापूरकरांची सून झाल्या, इथपर्यंत पुस्तकाचा निम्मा प्रवास (मध्यंतरच) होतो. पुढल्या दोनशे पानांत आपल्याला खऱ्या अर्थानं सदाशिव अमरापूरकर हे काय व्यक्तिमत्त्व होतं, हे उलगडत जातं. अमरापूरकरांनी शेवटपर्यंत त्यांची मध्यमवर्गीय राहणी व मध्यमवर्गीय मूल्यं सोडली नाहीत. ‘अर्धसत्य’सारख्या सिनेमामुळं एका रात्रीतून ते भारतभरात प्रसिद्ध झाले. या एका ओळखीमुळं अमरापूरकरांचं जीवन पूर्ण बदलून गेलं. तोपर्यंत असलेली आर्थिक ओढगस्तीही संपली. हिंदी चित्रपटसृष्टीत अगदी स्वप्नवत अशा रीतीनं ते मोठे स्टार झाले. एकापाठोपाठ एक खलनायकी भूमिका त्यांच्याकडं येऊ लागल्या. पैसा येऊ लागला. अशा परिस्थितीत एक मध्यमवर्गीय कुटुंब या सगळ्या धबधब्याला कसं तोंड देतं आणि आपली मूल्यं कायम जपत राहतं, हे सुनंदाताईंनी फार हृद्यपणे लिहिलं आहे. सुनंदाताईंनी अनेक वर्षं एलआयसीत नोकरी केली. पतीचं अस्थिर क्षेत्र असल्यानं त्यांनी सुरुवातीला नोकरी केलीच; पण नवरा हिंदी चित्रपटसृष्टीत सुपरस्टार व्हिलन झाल्यावरही त्यांनी ही नोकरी सोडली नाही. त्यांच्या तिन्ही मुलींवर त्यांनी उत्तम संस्कार केले. एका सिनेमाच्या प्रीमियरनंतर हे सगळे कुटुंबीय कसे घरी जाऊन पिठलं-भाकरीचं जेवण तयार करून जेवले हे त्यांनी एका प्रसंगात अतिशय खेळकरपणे सांगितलं आहे. अमरापूरकरांचं नाटकवेड, भौतिक सुखांविषयीची काहीशी विरक्त वृत्ती, त्यांचा मित्रांचा गोतावळा, अनेक माणसांचा घरात राबता असा एकूण ‘देशस्थी’ कारभार यावर सुनंदाताई कधी गमतीत, तर कधी काहीसं वैतागून टिप्पणी करतात. अर्थात त्यांचं सदाशिव अमरापूरकरांवर अतिशय प्रेम होतं आणि त्यांनी हे शेवटपर्यंत उत्तम निभावलं. अशा आत्मचरित्रांत अनेकदा ‘आहे मनोहर तरी... गमते उदास’ असा सूर लागण्याचा धोका असतो. सुनंदाताईंच्या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणजे, एखादा अपवाद वगळता, त्यांच्या या संपूर्ण पुस्तकात असा रडवा सूर कधीही लागलेला नाही. आपल्याला जे काही मिळालं, ते आपणच निवडलं आहे आणि त्यामुळं त्याविषयी तक्रार करण्याचा आपल्याला काही अधिकार नाही, अशी एक भूमिका त्यांनी घेतलेली दिसते. त्यांच्या या पुस्तकातून विसाव्या शतकातील मध्यमवर्गीय ब्राह्मण घरातील एका तरुणीच्या आशा-आकांक्षांचा, आयुष्यानं दिलेल्या आश्चर्याच्या धक्क्यांचा आणि त्याला सामोरं जाण्यातील धीट दिलदारपणाचा लोभस प्रवास दिसतो. आपली मध्यमवर्गीय मूल्यं जपत, प्रामाणिकपणे व उमेदीनं आयुष्य जगणाऱ्या अनेक महिलांना या पुस्तकात आपल्या जगण्याचं प्रतिबिंब सापडेल. तेच या ‘खुलभर दुधाच्या कहाणी’चं यश आहे. ...Read more

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
प्रभाकर गावंडे, अमरावती

मी विकत घेऊन वाचले आहे हे पुस्तकं, चांगले आहे, नवीन माहिती वाचायला मिळाली.