* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: SHEVATCHI LADHAI
  • Availability : Available
  • ISBN : 9788177661026
  • Edition : 3
  • Publishing Year : 2002
  • Weight : 120.00 gms
  • Pages : 124
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :ANAND YADAV COMBO SET-33 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS IS THE THIRD COLLECTION OF ITS TYPE BY MR. YADAV. THE HUMOUR IN THIS COLLECTION TAKES A DIFFERENT TURN FROM THE PREVIOUS TWO COLLECTIONS. THE POLITICAL AND SOCIAL ASPECTS HAVE TAKEN A DIFFERENT TURN DURING THESE 50 YEARS. THEY HAVE CREATED A CONTROVERSY AMONG THEMSELVES. THE AUTHOR SHADES A LIGHT WITH A SARCASTIC AND SATIRICAL NOTE. THE COMMON MAN WHO IS THE SUBJECT OF ALL THE STORIES IS FALLEN A PREY IN THE HANDS OF THE CORRUPTED SOCIAL LIFE, THE SELFISH AND SCHEMING MINDS OF THE POLITICIANS, THE OPPORTUNISTS, THE GREEDY GOVERNMENT SERVANTS, THE SO CALLED COSMOPOLITAN LADIES LOST IN THE SHALLOW IMAGES OF BEAUTY AND FALSE STATUS, THE DRUNKARDS AND THE TERRIBLE ATTITUDE OF THE SOCIETY. IN THIS BOOK, THE AUTHOR IS NOT PLAYING THE ROLE OF AN ENTERTAINER, BUT THAT OF A COMMENTATOR WHO IS TRYING TO BRING THE REAL PICTURE OF THIS SPOILED MARATHI PEOPLE. HE DOES THIS WITH A TINGE OF SARCASM TO THE HUMOUR. THE HUMOUR SUCCEEDS IN MAKING US HAPPY BUT NOT LEAST IS THE TINGE OF SATIRE WHICH DOES MAKE US LOOK AT THINGS FROM A DIFFERENT ANGLE. IT MAKES US THINK ABOUT IT INWARDLY. WE MUST APPRECIATE THE UNIQUENESS OF THIS COLLECTION.
‘शेवटची लढाई’ हा आनंद यादवांचा तिसरा विनोदी कथासंग्रह वाचत असताना लक्षात येते, की पहिल्या दोन संग्रहांपेक्षा या संग्रहातील विनोदाने वेगळे वळण घेतलेले आहे. आजच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीत, पन्नास वर्षांत विविध प्रकारच्या विसंगती निर्माण झालेल्या आहेत. त्यांच्यावर प्रखर प्रकाशझोत प्रस्तुत पुस्तकात विनोद आणि उपरोधउपहास यांच्या अंगांनी यादवांनी टाकलेला दिसतो. भ्रष्ट समाज जीवन, स्वार्थी आणि मतलबी राजकारण, संधिसाधू, हपापलेला शासकीय नोकरवर्ग, उथळ सौंदर्यात आणि खोट्या प्रतिष्ठेच्या कल्पनांत रमलेला श्रीमंत स्त्रीवर्ग, दारूत बुडालेला आणि समाजाच्या भेसूर वर्तनात सापडलेला सामान्य माणूस, या कथांतील विनोदाचा आणि कारुण्याचाही विषय झाला आहे. या संग्रहातील आनंद यादवांची भूमिका ही केवळ मनोरंजनकाराची नाही; तर ती सध्याच्या भ्रष्ट मराठी जीवनाचा विनोदउपरोधाच्या अंगांनी वेध घेणाऱ्या भाष्यकाराचीही आहे. त्यांच्या या दृष्टीमुळेच या संग्रहाचा आस्वाद घेणारा वाचकही हसता हसता शेवटी अंतर्मुख होतो, हे या संग्रहाचे खास वेगळेपण मानावे लागते.
राज्य पुरस्कार २००१-०२
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#झोंबी #(महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार १९८८-८९) #(महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार १९८८-८९) #(दि फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स -उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार १९८९) #(मारवाडी संमेलन पुरस्कार १९९०) # (साहित्य अकादमी पुरस्कार १९९०) #(प्रवरानगर - विखेपाटील पुरस्कार १९९१) #(संजीवनी साहित्य पुरस्कार, कोपरगाव १९९४) # नांगरणी # (रोहमारे ग्रामीण पुरस्कार १९९०) #घरभिंती #काचवेल #माऊली # (कालीमाता साहित्य पुरस्कार १९८६ #परिमल लेखन पुरस्कार १९८६ # नटरंग #(महाराष्ट्र राज्य पुरस्कार १९८२) # गोतावळा # शेवटची लढाई #(राज्य पुरस्कार २००१-०२) #भूमिकन्या #झाडवाटा # उगवती मने #(राज्य पुरस्कार २००२-०३) # आदिताल # डवरणी #माळावरची मैना # घरजावई #खळाळ #उखडलेली झाडं #सैनिक हो, तुमच्यासाठी... #मळ्याची माती #मायलेकरं #साहित्यिकाचा गाव #मातीखालची माती #स्पर्शकमळे #पाणभवरे #साहित्यिक जडण-घडण # ग्रामसंस्कृती #(रा. ना. सबनीस वाङ्मयपुरस्कार २००२) # मराठी लघुनिबंधाचा इतिहास #साहित्याची निर्मिती प्रक्रिया #ग्रामीणता : साहित्य आणि वास्तव आत्मचरित्र मीमांसा #"ग्रामीण साहित्य : स्वरूप व समस्या #(राज्य पुरस्कार १९८३) # मराठी साहित्य - समाज आणि संस्कृती #१९६० नंतरची सामाजिक स्थिती आणिसाहित्यातील नवे प्रवाह # डॉ. आनंद यादव - एक साहित्यिक प्रवास #ZOMBI #NANGARNI #GHARBHINTI #KACHVEL #MAULI #NATRANG #GOTAVALA #SHEVATCHI LADHAI #BHUMIKANYA #ZADVATA #UGVATI MANE #AADITAL #DAVARNI #MALAVARCHI MAINA #GHARJAWAI #KHALAL #UKHADLELI ZADE #SAINIK HO TUMACHYASATHI #MALYACHI MATI #MAI LEKARA #SAHITYIKACHA GAON #MATIKHALCHI MATI #SPARSHKAMALE #PANBHAVARE #SAHITYIK JADAN-GHADAN #GRAMSANSKRUTI #MARATHI LAGHUNIBANDHACHA ITIHAS #SAHITYACHI NIRMITI PRAKRIYA #GRAMINTA SAHITYA ANI VASTAV #AATMACHARITRA MIMANSA #GRAMIN SAHITYA : SWARUP ANI SAMASYA #1960 NANTARCHI SAMAJIK STHITI ANI SAHITYATEEL NAVE PRAVAH #DR. ANAND YADAV EK SAHITYIK PRAVAS
Customer Reviews
  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 02-06-2002

    विनोदाच्या आवरणाखाली दडलेले उपरोधिक चिंतन... आनंद यादव हे मराठी साहित्यातील प्रथितयश व्यक्तिमत्त्व. ग्रामीण कथेखेरीज त्यांची आत्मकथेची मालिकाही गाजली. ‘झोंबी’, ‘नांगरणी’, ‘घरभिंती’ यांनी मराठी साहित्याची वेगळी मांडणी केली. ग्रामीण बाज हा गंभीरतेच्यादिशेने जरी वळत असला तरी आनंद यादव यांनी विनोदी कथांनाही न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. आज दिसणाऱ्या मूल्यव्यवस्थेत एक लपलेली विसंगी आहे आणि ती विसंगती आनंद यादवांच्या निरीक्षणाचा भाग झाली आहे. उपरोधिकपणे त्यांनी आपल्या शब्दांची तलवार चालवली आहे आणि अब्रू असलेल्या चाडदार माणसाला ते शब्द झोंबणारे आहेत. ‘शेवटची लढाई’ हे प्रस्तुत पुस्तक म्हणजे यादवांचा तिसरा विनोदी कथासंग्रह आहे आणि मेहता पब्लिशिंग हाऊसने तो प्रसिद्ध केला आहे. एकंदर नऊ कथांच्या या पुस्तकाला मुखपृष्ठ मिळाले आहे ते शि. द. फडणीस यांचे आणि ते समाजातील मूल्यहीनतेचे दर्शन घडविणारे आहे. ‘गोपाळ भटजी आणि निवडणुकेश्वर’ या कथेत भटाभिक्षुकांनी लोकांना आपल्या नादी कसे लावले आहे याचे दर्शन आपल्याला घडते. हेच तसे उलट अर्थानेही म्हणता येईल. लोकांना जगण्यासाठी काहीतरी आधार हवा असतो आणि भटभिक्षुक त्यांना तो देतात. गोपाळ भटजी अगदी शिस्तबद्धरित्या कसा धनवान बनतो याचे नाट्यमयरित्या चित्रण करताना संस्कृतप्रचुर भाषेचा फुलोरा यादवांनी छान फुलवलाय. ‘शीर्षस्थानी थोडे केस वाढवून त्यावर काळ्या रंगाचे टोपीनामक शिरस्त्राण घालू लागले’ हे त्यापैकी एक उपरोध ठायी ठायी भरलेली ही कथा राजकारणावर येऊन संपते. ‘पीळ’ या कथेत पंताच्या चिवट स्वभावाचे दर्शन घडते. यातून विनोदाचे दर्शन घडत असले तरी त्या आवरणाखाली असलेले कारुण्यच प्रधान वाटते. गंगाधर या नातवाच्या वाढदिवसाला लोणी मिळत नाही म्हणून सत्तर वर्षाचा हा खवट व जिद्दी म्हातारा सोने विकून म्हैस घरात आणतो. गावातील इरसाल नमुने पेश करणारी ही कुरेबाज कथा वस्तुस्थितीकडे बिनबोभाट वळते. छत्रपती शिवरायांचे शिष्यत्व सांगणाऱ्या एका महाराजांच्या वाढदिवसाचे पुण्यातील पर्वतीच्या पायथ्याशी असलेल्या रायगडातील वर्णन महाराजांचा वाढदिवस’ यात आले आहे. दांभिकपणाचा जागोजागी आलेला उल्लेख परिस्थितीची जाणीव करून देतो. प्रासंगिक विनोदाचा आधार अशा कथामधून यादव घेताना दिसतात. वाढदिवसाला जनता धाडदिवस म्हणजे या कोटीतूनच कथेचा अन्वयार्थ लावता येतो. शिवा गवळ्याने वाघिणीचे दूध काढले या प्रसंगावर बेतलेली पुढची कथा वास्तवापेक्षा कल्पनात्मक ढंगाकडे झुकते. वाघीण शिवा गवळ्याला दूध काढू देते ही कल्पना रंजनात्मक विशेष दाखविणारी आहे. चुकून घडलेल्या घटितांचे रूपांतर ‘पराक्रम’ आणि सक्तारात शिवा गवळी करतो. यातही पुन्हा राजकीय आणि किडलेल्या समाजव्यवस्थेचे वर्णन् अपरिहार्यपणे येते. या पुस्तकातील कथांचे विषय पाहिले तर संधीसाधू नेते, भ्रष्टाचारी नोकरवर्ग, उथळ विचारांच्या श्रीमंत (पैसेवाल्या) बायका, लोकांच्या भावनांचा बाजार मांडणारे पुरोहित यासारख्या विषयातून आनंद यादव उपरोध आणि उपरोध वापरत कलापूर्वक लक्ष्य साधतात. तर्कविसंगतीमधून विनोद निर्माण करताना सामान्य माणूसच नेत्यांचा लक्ष्य कसा झालाय ते दिसते. शिवा गवळ्याच्या कथेनंतर ‘साप आणि उंदीर’ यामध्ये मध्यमवर्गीयाचा नको तेवढा चाललेला विचार निरर्थकतेची छाया कथेभर ठेवत यादवांनी मांडला आहे. साप आणि उंदराच्या प्रतिकांमधून ते माणसेच निर्माण करतात. ‘बेलदाराची गाढव’ या कथेत तर न्यायवस्थेच्या विसंगतीवर यादवांनी नेमके बोट ठेवले आहे. वसंतरावासारखा शिकलेला मनुष्य दोन बायका करताना समर्थन करतो - दोन बायकांशी एकदमच लग्न केल्याने ती एकच लग्न केले आहे. खालच्या कोर्टात सुटल्यावर वरच्या कोर्टात चार बायका व एकोणीस मुले असलेले न्यायमूर्ती शेख वसंतरावांना दोषी ठरवतात या कथानकात योगायोग नसून सद्य परिस्थितीचे विदारक निंदन आहे. ‘रजिस्ट्रार साहेबांची पत्नी’ या कथेची धाटणी वेगळीच आहे. उच्च स्तरावर आपले आयुष्य ढोंगीपणाने घालवणाऱ्या बाईचे आयुष्य यादवांनी छानच रेखाटले आहे. मुलगा एरव्ही ‘मम्मी’ म्हणतो पण रडताना आईच म्हणतो याचे कारण माननीय. खरं पाहता आनंद यादवांनी अशा छोट्या छोट्या कथा जागोजागी पेरत विनोदाची खुमारी चढवली आहे. बार्इंच्या आयुष्यातील बेगडीपणा आपल्या अंगावर येतो हे यश आहे. तो देव त्यांच्या आत्म्याला शांती, सौंदर्य देवो’ या वाक्याने कथेचे मर्म ध्यानात येते. ‘शिवरामाचे आरसे’ या कथेत निरीक्षण जास्त आहे. न्हाव्याचे स्वभाव-विशेष इथे मुक्तपणे येतात. ‘शेवटची लढाई’ ही शीर्षक कथा आनंद यादवांचे निवेदन किती मुक्तपणे येते आणि त्यासाठी कथेची फारशी गरज लागत नाही दाखवणारी आहे. लोकशाहीतील निवडणूक हे भ्रष्टाचाराचे मूलस्थान कसे आहे याचे वर्णन इथे येते. समाजाच्या भ्रष्ट व्यवस्थांवर बोचरी टीका करत यादव वस्तुस्थितीचे उपरोधिक दर्शन घडवितात. प्रत्येक कथेचा शेवट करताना ते वाचकांना गुंतवतात, अंतर्मुख करतात. परिणामी विनोद हा साध्य न राहात साधन या स्वरूपात काम करतो. या कथांचे यश लोकांचे लक्ष अशा पद्धतीने वेधून घेण्यात आहे. काहीशी चिंतनात्मक डूब वाचकांच्या लक्षात यायला हवी. नेते गेंड्याच्या कातडीचे असल्याने हा कथासंग्रह त्यांच्यासाठी नाही, भांडण्यातील ताजेपणाही मनाला भावतो. -अशोक नारायण जाधव ...Read more

  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 31-03-2002

    सामाजिक विसंगतीवर विनोद... डॉ. आनंद यादव यांनी सामाजिक विसंगतीवर उपहास आणि विनोदाच्या ढंगाने टाकलेला प्रकाश असे त्यांच्या ‘शेवटची लढाई’ या कथासंग्रहाचे वर्णन करावे लागेल. हा कथासंग्रह मेहता प्रकाशनाने प्रकाशित केला आहे. या संग्रहात नऊ कथा आहेत. यासंग्रहातील आनंद यादवांची भूमिका केवळ मनोरंजनकाराची नाही तर ती सध्याच्या भ्रष्ट मराठी जीवनाचा वेध घेणाऱ्या भाष्यकाराचीही आहे. साहित्याचा आस्वाद देताना हसता हसता वाचकांना अंतर्मुख करण्याची ताकद त्यांच्या कथात आहे. समाजरचनेत काही घटकाचे स्थान कसे बदलते आहे याची लेखकांनी घेतलेली नोंद अतिशय सूक्ष्म आहे. लेखकाने वापरलेली भाषा त्या त्या वर्गातील जीवनामानाचे जिवंत चित्र उभे करते आणि त्यातील विरोधाभासावर मिश्किल हास्य करायला लावते हे विशेष. ...Read more

  • Rating StarDAINIK LOKSATTA 25-08-2002

    कलाव्यवहाराची परखड चिकित्सा… ‘शेवटची लढाई’ हा यादवांचा तिसरा विनोदी कथासंग्रह. आजच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीत स्वातंत्र्यानंतरच्या पन्नास वर्षांत अनेक प्रकारच्या विसंगती निर्माण झालेल्या आहेत, त्यांच्यावर प्रखर प्रकाशझोत प्रस्तुत पुस्तकात विनो आणि उपहास, उपरोध यांच्या अंगांनी यादवांनी टाकलेला दिसतो. ‘गोपाळ भटजी आणि निवडणुकेश्वर’, ‘महाराजांचा वाढदिवस’, ‘वाघिणीची धार काढणारा गवळी’ अशा या संग्रहातील कथा निखळ विनोदाच्या अंगाने जाणाऱ्या आहेत. भ्रष्ट समाजजीवन, स्वार्थी, मतलबी राजकारण, संधिसाधू, हपापलेला शासकीय नोकरवर्ग आणि दारूत बुडालेला सामान्य माणूस या कथांतील विनोदाचा विषय झाला आहे. स्वातंत्र्योत्तर काळातील गावातील बदलते राजकारण आणि समाजकारण, संधिसाधू लोकांनी साधलेला स्वत:चा स्वार्थ आणि भ्रष्ट राजकारणी मंडळी या बाबी या कथांत उपरोध आणि उपहासाच्या रूपाने व्यक्त होतात. ‘गोपाळ भटजी आणि निवडणुकेश्वर’ या कथेत बदलत्या आर्थिक परिस्थितीची, समाजकारणाची, औद्योगिक संस्कृतीची दिशा ओळखून भिक्षुकी पेशात कालानुरूप चातुर्याने परिवर्तन करणाऱ्या बेरक्या गोपाळजींची व्यक्तिरेखा साकार होते, तर वाघिणीचे दूध काढणारा शिवा गवळी एका रात्रीत एकदम ‘हिरो’ बनतो, याही कथेत इतिहास आणि दंतकथा यांची सरमिसळ उपरोधाच्या स्पर्शाने जिवंत झाली आहे. महाराजांचा वाढदिवस मावळ तालुक्यांतल्या त्यांच्या गावकीतल्या मंडळींना ‘धाडदिवस’ कसा वाटतो, याचे मिस्किल चित्र या कथेत उभे राहते. ‘पीळ’ आणि ‘शिवरामाचे आरसे’ या कथा गांभीर्याकडे झुकणाऱ्या आहेत. ‘पीळ’ मधून जुन्या सरंजामशाहीचे अभिमानी पंत, जुन्या मानसन्मानाच्या निष्ठा उराशी बाळगून स्वत:च्या मनस्वीपणाचे ताठ कंगोरे कसे उभे करतात, याचा उल्लेख यादव करतात, तर ‘शिवरामाचे आरसे’ या कथेत साहित्यनिर्मितीच्या प्रवासालाच लेखकाने स्पर्श केला आहे, असे वाटते. ‘खरं’ तर वरवर सरळ दिसणारे आत वाकडेच असतात, हे भेदक सत्य लेखकाला अनेक वर्षांनी गावी गेल्यावर शिवरामाला भेटताना गवसते आणि शिवराम हाही एक आरसा आहे. त्याच्या मनाची सहा रूपं म्हणजे सहा आरसे अशा निष्कर्षापर्यंत यादव येतात. रजिस्टार साहेबांची पत्नी यात श्रीमंत उच्चभ्रू स्त्रियांच्या उथळ नटवेपणाचे प्रतिबिंब आहे, तर ‘शेवटची लढाई’मध्ये पुराणकथेचा वापर वास्तवजीवनातील राजकारणी जगातील मुर्खता व दांभिकता अधोरेखित करण्यासाठी यादवांनी चांगला केला आहे. लेखक यादवांचीच दोन भिन्न प्रतिबिंबचे या कलाकृतींमध्ये लक्षणीय रीतीने उमटली आहेत. गंभीर प्रकृतीच्या कादंबरीमध्ये कलावादाची, वाङ्मयचौर्याची, एकूण कलाव्यवहाराची परखड चिकित्सा करणारे तटस्थ यादव या कथांमध्ये प्रसन्न विनोदाचा निर्मळ शिडकावा करतात, ही त्यांच्या लेखन व्यक्तिमत्त्वाची जमेची बाजू आहे. -मिनाक्षी दादरावाला ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

BHARTIYA GANIKA
BHARTIYA GANIKA by DR.S.R. DESHPANDE Rating Star
डॉ. शुचिता नांदापूरकर-फडके

मंडळी, कालच्या ऱ्हासचक्रानंतर मी विचार करत होते की आज काय? पुस्तकं तर काही वाचून ठेवली होती (म्हणजे वाचली आणि ठेवून दिली बाजूला... अक्षरशः). आत्ताची समोर आहेत ती. कदाचित त्यातलं एखादं उद्या घेईन. मध्ये अचानक या पुस्तकाची जाहिरात वाचली, अगदी गेल्या ठवड्यातली गोष्ट. उत्सुकता चाळवली. समूहात काहीतरी आगळं वेगळं पुस्तक घ्यावं हा विचार सतत मनात असतोच. तसं पुस्तक घरी येताच (जय amazon) चाळायला म्हणून बसले, आणि काय सांगू, हातात मार्कर कधी आलं, मी खुणा कधी केल्या, पुस्तक कधी संपलं... कळलंच नाही. एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगते... प्रेयर पुस्तकाला तुम्ही जो भरघोस प्रतिसाद दिलात, अनेकांनी ते विकत घेण्याचा विचार केला तेव्हाच सांगायचं होतं, पण राहिलं. ओळख करून दिलेलं पुस्तक पूर्णपणे वाचनीय असतं असं नाही. त्याचा बरचसं भाग बोजड असतो. पण ते नाही का, डेटिंगच्या काळात मुलगा मुलगी स्वतःमधलं केवळ उत्तम ते दाखवतात, तसं मला प्रेयर बद्दल वाटलं. आय मीन प्रेयर पुस्तकाबद्दल वाटलं आणि गणिका या पुस्तकाबद्दल मला नेमकं तेच वाटत आहे. ========== ‘भारतीय कामशिल्प’ या पुस्तकाचं लेखन करत असताना प्राचीन भारताच्या समाजजीवनाची माहिती देणारे अनेक संदर्भग्रंथ वाचण्यात येऊन लेखकांची उत्सुकता चाळवली गेली आणि जेव्हा या विषयावर मराठीत एकही परिपूर्ण संदर्भग्रंथ नाही हे लक्षात आलं, तेव्हा त्यांनी स्वतःच या पुस्तकाचं लेखन मनावर घेतलं. केवळ सनसनाटी विषय सवंगपणे हाताळला आहे असं कुठेही वाटत नाही. अतिशय अभ्यासपूर्वक लेखन आहे. सोबत जोडलेली संदर्भग्रंथांची यादी (एकूण संख्या ६४) पुरेशी आहे. गणिका आणि उर्वरित श्रेणी या शरीरविक्रय करतात, हा वैश्विक व्यवसाय आहे. कैक काळापासून या व्यवसायाला मान्यता मिळाली आहे आणि त्याची आवश्यकता वाटली आहे. प्राचीन काळात भारतीय गणिका यांना एक संस्कृती आणि दर्जा होता. नीतीनियम होते, ते पाळावे लागत होते. पुस्तकाची प्रकरणं – प्रास्ताविक, विदेशी गणिका, भारतीय साहित्यातील गणिका, गणिकेची प्रशिक्षण व वर्णन, गानिकांची वेशभूषा, सौंदर्यप्रसाधने, विट, गणिकामाता, प्रियकराचा राग-रंग, कथांविषयी थोडेसे आणि कथा (या शेवटच्या प्रकरणात एकूण १३ कथा आहेत – अगदी सुरस आणि चमत्कारिक वाटाव्यात अशा, त्यांचा परिचय मी देणार....... नाही.) प्रास्ताविक – (नऊ पानांचं प्रकरण) कुटुंब किंवा विवाहसंस्था कधी आकाराला आले हे नक्की सांगता येत नसलं तरी स्त्री-पुरुष शरीरसंबंध हे आदिम असून ते पशु – पक्ष्यांप्रमाणेच जनन हेतुस्तव नैसर्गिक होते आणि राहतील. फलन हे स्त्रीदेहामध्ये होतं या जाणीवेतून तिला आदरस्थान प्राप्त झालं. सर्जनाची गूढ शक्ती धारण करणारी ती आदिमाया/माता/ अद्याशक्ती होय. जवळपास प्रत्येक धर्मात प्रजा, पशु आणि धान्य समृद्धीसाठी सुफलता विधी आहेत. भारतीय हिंदू धर्म शास्त्रीय ग्रंथांतून स्त्री पवित्र्याच्या कथा वाचायला मिळतात. पतीला परमेश्वर मानलं जाई. त्याही काळात गणिका हा व्यवसाय होता आणि त्याकडे सहिष्णू वृत्तीने पाहिलं जाई.राजे महाराजे त्यांचे पोशिंदे असतं. शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रिया तिरस्काराला पात्र असत, पण गणिका नाही. त्यांना नगर भूषण, नगर अलंकार, नाग्त रत्न मानलं जाई. प्रसंगी, राजे त्यांचा सल्ला घेत. त्या बहुश्रुत असतं चौसष्ट कलांत पारंगत असतं. संभाषणचतुर, हुशार, समंजस, उदार, योग्य आदर राखणाऱ्या, विनयशील आणि अनुपम सौंदर्यवती असत. एखाद्या गणिकेमुळे त्या राज्याची कीर्ती वाढत असे. धार्मिक समारंभ, सामाजिक कार्यक्रम (विविध झुंजी, शर्यती), करमणुकीचे कार्यक्रम (जलक्रीडा, वनविहार), रंगमंचावर अभिनय, अशा नानाविध ठिकाणी त्यांची ठळक उपस्थिती असे. रथारूढ अथवा सिंहासनाधिष्ठ राजाला वारा घालणे, चवरी ढाळणे, छत्र धरणे अशी कामं त्या करत. त्यांच्याशी संबंध ठेवणं समाजमान्य होतं. प्रतिष्ठितांचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन व्यापक, अगत्यशील आणि स्नेहिल होता. मात्र, त्यांना कडक आणि कठोर नियम पालन करावे लागे.विजयनगर साम्राज्याच्या अस्तानंतर ते पेशवाई संपेपर्यंतच्या काळात, मोगल राजवट येऊन गेली, ब्रिटीश वसवतवादाचा प्रसार सुरू झाला, समाज व्यवस्था बदलली, गणिका संस्कृतीला ओहोटी लागली. ब्रिटीशांचा अंमल सुरू झाल्यावर गणिका संस्था नष्ट होऊन वेश्या व्यवसाय वाढीला लागला. यामागे औद्योगिक क्रांती हे एक कारण आहे. वेश्यागमन निंद्य कृत्य मानलं जाऊ लागलं. तरुण अधिकाधिक सुशिक्षित होऊ लागला तसा शरीरसंबंधांपायी स्वास्थ्य गमवावं लागलं तर काय, हा विचार थोडाफार मूळ धरू लागला. आणि या शौकाची आसक्ती कमी झाली. चरितार्थाकरता पैसे मिळवण्यासाठी वेश्याव्यवसाय हादेखील विश्वसनीय आर्थिक व्यवसाय मानण्यात यावा असा निकाल १९११मध्ये युरोपियन न्यायालयाने दिला. विदेशी गणिका – (२७) बहुतेक सर्व प्राचीन संस्कृतीत गणिकांचे पुरावे मिळतात. इजिप्त, बबिलोन, सिरीया, फिनिशिया, ही काही उदाहरणं. ग्रीस, इटली, भारत इथे त्यांना विशिष्ट दर्जा प्राप्त झाला. त्यांचेही प्रकार होते, सामान्य वेश्या अलेत्रय्डी, आणि सर्वोच्च म्हणजे हेटीअरा (या शब्दाचा अर्थ सोबती). काही हेटीअरा वादविवादपटू होत्या. क्लेप्सीड्रा हिच्या वक्तशीरपणामुळे तिला ते नाव मिळालं होतं त्याचा अर्थ जलघटिकापात्र असा होतो. थीओफ्रत्स याने इ.पू. ३७२ – २८७ या काळात ‘ऑन मरेज’ हा ग्रंथ लिहिला, याचा सविस्तर अभ्यास करून लिओंटीयम या हेटीअराने त्यावर प्रगल्भ टीका लिहिली. रोमन समाजात कोर्टीझन अस्तित्वात होत्या. पॉम्पेई इथे व्हिकोली बाल्कोन पन्सिली नावाच्या इमारतीत शेकडो रमणी वास करत. या संदर्भातली रतिक्रिडेची मूळ चित्रं पॉम्पेईन wall paintings म्हणून प्रसिद्ध असून ती इटलीच्या वस्तुसंग्रहालयात सुरक्षित आहेत. रोमन साम्राज्यात हेटीअरा ऐवजी कोर्टीझन शब्द रूढ झाला. युरोपात पंधरा-अठरा शतकांत कोर्टीझन आणि कलावंतीण यांना समाजात विशिष्ट स्थान आणि आदर मिळत होता. फ्रान्समध्ये सतराव्या शतकात रमणींची सत्कारगृहं (सलो) प्रसिद्ध होती. जपानमध्ये गै (कलात्मक क्षमता) आणि शा (व्यक्ती) यावरून गैशा ही संज्ञा रूढ झाली. त्यांच्यात अलंकारिक सुरावट, सौजन्य, निष्कपट, सुसंस्कृतपण असे. बाराव्या शतकापासून कार्यरत असलेली ही प्रथा इडो काळात (इ.स.१६००-१८६८) अधिक वाढीला लागली. ओकिया ही त्यांची निवासस्थानं होत. विसाव्या शतकात त्यांचं वर्चस्व राजकीय क्षेत्रात वाढीला लागलं. १९२०-३० मध्ये त्यांची संख्या साधारण ८० हजार होती, ती १९७०-८० दम्यान १७ हजार इतकीच उरली आहे. चीनमध्ये पूर्वी पीकिंग (बीजिंग) इथे सिंगसॉंग हाउस हा भाग राखीव होता. शांघाय इथे अत्यंत विलासी वारांगना गृहं आहेत. सिंगापूरमध्येगिटार गर्ल्स (पीपाचाई) या नावाने त्या ओळखल्या जातात. पाकिस्तानात त्या तवायफ, कान्जारी आणि गश्ती नावाने ओळखल्या जातात. आज मात्र सर्वत्र आमुलाग्र बदल झाला आहे. भारतीय साहित्यातील गणिका – (३२) संस्कृत, प्राकृत, पाळी भाषांत, हिंदू, बौद्ध, जैन वान्ग्मयात, त्यांचा उल्लेख आढळतो. त्या वैदिक काळात भारतात होत्या हे काही ऋचांवरून समजतं. (ऋचा १.१६७.४ – अनेक पुरुषांशी सांग करणारी ती साधारणी). पंचचुडा अप्सरेपासून त्यांची उत्पत्ती झाली असं मानतात. महाभारत काळात त्यांना प्रतिष्ठा प्राप्त झाली. (राज, नागरी, गुप्त, देव आणि ब्रह्म असे पाच प्रकार होते). रामायणात फार स्थान नव्हतं. अमरकोश, महाभाष्य, वार्त्तिके, दशरूपक, कौटिलीय अर्थशास्त्र जातक कथा, पंचतंत्र, वेताळकथा, शुकबहात्तरी, गाथासप्तशती, अशा विविध ग्रंथांत त्यांचा उल्लेख आहे. कामसूत्र या ग्रंथात वात्सायनाने ‘वैशिक’ या प्रकरणात त्यांची माहिती दिली आहे. कथासरीत्सागर, राजतरंगिणी, शृंगारतिलक, सरस्वतीकंठभरणा, कलाविलास, मेघदूत, मृच्छकटिक, रत्नावली, नागानंदा, अशा नाटकांतून त्यांचा उल्लेख येतो. भारतात इ.पू. पहिल्या सहस्रकात ती प्रथा अस्तित्वात येऊन ब्रिटीशांच्या आगमनानंतर एकोणिसाव्या शतकात लोप पावली असावी असं समजलं जातं. गणिकेची प्रशिक्षण व वर्णन – (१६) गणिकेला बालपण जवळपास नव्हतच. वयाच्या सहा-सात वर्षापासून तिला घडवायला सुरुवात होत असे. त्यांच्या प्रशिक्षणात आचार, विचार, शिष्टाचार, विविध कला, खेळ, भाषा, वर्तन, सौंदर्यवर्धन, गायन, वादन, नृत्य, अलंकरण, शरीर सौष्ठव, बुद्धिवर्धन अशा प्रत्येक अंगाचा व्यापक विचार होता. काही हस्तकला शिकाव्या लागत. पाककला, सुगंधी द्रव्य निर्मिती, कामशास्त्र, प्रणायाराधन, हिकाव्म लागे. स्वसंरक्षण शिकावं लागे. गणिकांची वेशभूषा, सौंदर्यप्रसाधने – (५) आधीच्या प्रशिक्षणात हाही एक महत्त्वाचा भाग होता. विट – (७) हा शब्द मी पहिल्यांदाच ऐकला. त्याचा इथे दिलेला अर्थ – शृंगाररस नायकानुचराप्रमाणे संपत्तीचा भोग न घेणारा किंवा जो आपल्या पैशाचा वापर कधी करत नाही, असं नाटकातलं लबाड, धूर्त पात्र. गणिका संस्थेत त्याच्या जोडीने वयस्य, अनुचर, धूर्त आणि डिंडिक ही पुरुष पात्र वावरतात. प्रतिवेशिनी ही गणिकेची शेजारीण. ती विश्वासातली. ती गणिकेसाठी विट आणि प्रियकर यांच्याशी संवाद साधते. गणिकामाता – (७) हे पात्र फार महत्त्वाच. तिला संरक्षित स्त्री, कुट्टनी किंवा कुट्टीनी म्हटलं जाई. तिचं काम शिस्त राखणे, थोडक्यात रेक्टर. कामकुजानांना आळा घालणं, गणिकांना खऱ्या प्रेमापासून वंचित ठेवणं. कामुकांचं मानसशास्त्र तिला मुखोद्गत. पुरुषांच्या गुणदोषाच्या’ आधारे अचूक आडाखे बांधत ती गणिकेला सल्ला देता. तिचा दबदबा असतो. ते नसती तर गणिका ही संस्था कधीच नामशेष झाली असती. कारण स्त्रिया या स्त्रिया असल्याने स्त्रीसुलभ भावनेनुसार गणिकागिरीत न रमता त्या केव्हाच संसाराला लागल्या असत्या. प्रियकराचा राग-रंग – (९) रग हे बारा छटांमधली काम आसक्ती असं म्हणता येईल. पुरुषाची मनोवृत्ती, प्रवृत्ती, स्वभाव, गुणविशेष आणि खास करून राग-लोभ जाणून घेत गणिकेला त्याच्याशी वर्तन करावे लागते. कथांविषयी थोडेसे आणि कथा (४८) – ‘शृंगारमंजरीकथा’ हा राजा भोज रचित संस्कृत ग्रंथ असून त्यात स्त्री-पुरुष मनोवृत्ती दर्शन घडवणाऱ्या तेरा कथा आहेत. त्यापैकी काही जीर्ण, काही अपूर्ण आहेत. पैकी एक कथा वाचून दाखवते. संदर्भग्रंथ (४) सोबत फोटो दिले आहेत त्या पानांचे. या पुस्तकात आढळलेले सुंदर शब्द – गरती, लीलासहचारी, पृथुल (अर्थ कळला नाही अजून), रूपाजीवा, सूरसुंदरी परिचय फार लांबला. या विषयावरच्या इतक्या अभ्यासानंतर एखादा पेपर सहज देता येईल. परत अभिमानाने म्हणता येईल, ‘मा, मै फर्स्ट क्लास फर्स्ट आया!’ मनापासून धन्यवाद. माझी परिचय पाळी नसती तर मी हे पुस्तक वाचलंच नसतं. मजा आली मला वाचताना. तशी तुम्हालाही आली असेल अशी खात्री आहे. थांबते. ...Read more

RESHIMREGHA
RESHIMREGHA by SHANTA J SHELAKE Rating Star
मीना कश्यप शाह

शांता शेळके या कवयित्री म्हणून आपल्या सर्वांच्या माहितीच्या आहेतच. गीतकार म्हणूनही त्यांचे मोठे नाव झाले. रेशीमरेघा हे त्यांनी रचलेल्या गीतांचे पुस्तक. मुख्यतः त्यांनी चित्रपट आणि नाटक यासाठी गीते लिहिली आहेत. प्रस्तावनेत शांताबाई म्हणतात, गीते लििणे त्यांना अतिशय आकर्षक वाटत गेले आणि म्हणून केवळ चित्रपट आणि नाटकांसाठीच नाही, तर स्वानंदासाठीही, त्या गीतं लिहित राहिल्या. चालीवर गीते लिहिणे त्यांना आव्हानात्मक वाटायचे, बंधनकारक नाही. पुढे बंगाली, गुजराती अशा काही गीतांच्या चाली आवडल्या, तर त्या, त्या चालींवरही छंद म्हणून गीते लिहू लागल्या. त्यांच्या गीतांमध्ये लावण्या, गवळणी, नृत्यगीते आणि युगुलगीते (त्यांनी द्वंद्वगीते हा शब्द वापरला आहे, जो मला आवडत नाही) जास्त आहेत. ह्या पुस्तकात त्यांचे संकलन आढळून येतं. पुस्तकातील काही गीतांपेक्षा मला त्यांची प्रस्तावनाच जास्त आवडली. आपल्या गीतांबद्दल त्यांनी हळुवार होत लिहिलं आहे. प्रत्येक गाणं ध्वनिमुद्रीत होतानाचे क्षण त्यांना आठवतात. आणि ही गीतं प्रसिद्ध होण्यासाठी संगीतकार, गायक यांचा हातभार नक्कीच आहे याची त्या आठवण काढतात. गीतांचा अर्थ रसिकांपर्यंत पूर्णपणे पोहोचवण्यासाठी गायक-गायिकांचा खूपच मोठा वाटा आहे, त्यांच्याबद्दल त्या अपार कृतज्ञता व्यक्त करतात. हे पुस्तक त्यांनी लावणेसम्राज्ञी यमुनाबाईंना अर्पित केलेले आहे. त्यान्नी लिहिलेल्या "रेशमाच्या रेघांनी" या सर्वात जास्त प्रसिद्ध पावलेल्या लावणीच्या नावावर ह्या पुस्तकाचे नाव आधारित आहे. अनेक प्रसिद्ध गाणी या गीत संग्रहात आढळतात. रेशमाच्या रेघांनी, काय बाई सांगू, मनाच्या धुंदीत लहरीत, हे श्यामसुंदर, राजसा, शालू हिरवा पाच नि मरवा, चाल तुरू तुरू, मनाच्या धुंदीत लहरीत येना आणि अशी अनेक. शांताबाईंचं काव्य सामर्थ्य ह्या लावण्या/गीतांमध्ये देखील दिसून येतं... कळ्या आजच्या, शिळ्या उद्याला, ओठांशी न्याल का, आल्यावर जवळ मला घ्याल का.... अशी अनेक उदाहरणं! पुस्तकातील बहुतेक गाणी ही लावण्यांच्या स्वरूपातली आहेत. त्यामुळे त्याच त्याच भावना सारख्या सारख्या आढळून येतात. बोलावणे किंवा नको जाऊ म्हणणे, भेटी (गिफ्ट्स) घेणे, वाट पाहणे, विरह, सौंदर्याचे वर्णन, शृंगाराचे वर्णन, म्हणजे तुम्हाला काय मिळू शकेल याची कल्पना गीतातून देणे (उदा. कंबरपट्टा रेखून दावी, देहाचा आकार!!) अशा प्रकारचे विषय पुन्हा पुन्हा येत राहतात, पण (शांताबाई बीइंग शांताबाई) कुठेच तोचतोचपणा कंटाळवाणा होत नाही (वाचकाने जरा रोमँटिकपणा दाखवून वाचली ही गीतं तर फारच बहार!) शांताबाई नथ फारच आवडते असं दिसतं... नथ सर्जाची नाकी घालता हसेल डावा गाल किंवा सलगी करते नथ ओठांशी, तो तुमचा अधिकार अशा प्रकारे ती खुलून देखील दिसते ह्या गीतांमधे!! अनेकविध लावण्या आहेत ह्या पुस्तकात. पाडव्याची, रंगपंचमीची, श्रावणाची, अशा विविध दिवसांच्या लावण्या तर हिरव्या रंगाची लावणी देखील आहे. पाडव्याची लावणी म्हणजे पाडव्याला शालू मागते आहे, कारण ती रात्री एकांतात उभारणार आहे. 🙂 "मी सुंदर आहे तर आता मी काय करू?" अशी तक्रारही दिसून येते. "माझ्या नखऱ्याच्या शंभर तऱ्हा" सांगणारीला स्वतःच्या सौंदर्याची पुरेपूर जाणीव आहे आणि त्यापेक्षाही, फक्त शारीरिक सौंदर्यावर विसंबून न राहता, त्याबरोबर तोरा दाखवत भुरळ पाडणे ह्यात ती माहीर आहे. पण त्याचबरोबर ती धोक्याची सूचना पण देते आहे... घटकाभर संग बसून घालवा वेळ, जमल्यास मनांचा जमून येईल मेळ, नाहीतर यायचा अंगाशी हा खेळ, पाय टाकण्याआधी इथे, विचार पुरता करा, माझ्या नखऱ्याच्या शंभर तऱ्हा!! एका लावणीत एका पुरुषाने फसवलंय अशा स्त्रीचे रूप आहे. जत्रेत एक जण भेटला आणि त्याने आपल्याशी फ्लर्ट केलं, जत्रा उलगडल्यावर दुसऱ्या दिवशी मात्र तो डोळ्याला डोळा भिडवत नाही, तोंड चुकवून पुढे जातो, ह्याची तक्रार ह्या लावणीत येते. किती विविधता! अशा लावणी कलाकाराच्या आयुष्याचं विदारक दृश्य देखील शांताबाईंनी दाखवले आहे. तिथे येणारा आज एक, तर उद्या दुसराही असू शकेल किंवा तिथे असणारी आज एक, तर उद्या दुसरीही असू शकेल. हे सांगून त्या म्हणतात... प्रीतीचे नीतीचे व्यर्थ सांगणे, भुकेल्या देहाचे सारे मागणे, जन्माच्या नात्याचे फुका बहाणे, कुणाला सतत इथे राहणे? इथल्या महाली घडीची वस्ती, सुखाचे हिंदोळे आभाळी चढती, घडीत वरती घडीत खालती ऐन विशीतल्या स्त्रीचं सौंदर्याचं अत्युत्तम वर्णन एका गीतात केलं आहे. अनेक गीतांमध्ये पुरुषांनी स्त्रीच्या देहाचे आणि मनाचे केलेले वर्णन दिसून येते. त्यातही नुसता देहच नाही तर स्त्रीचा तोरा (attitude) देखील पुरुषाला कशी भुरळ पाडतो हे दिसतच. "ही चाल तुरुतुरु" आपल्या सगळ्यांच्या आवडीचे आणि माहितीचे आहे. असंच "मनाच्या धुंदीत लहरीत ये ना" हे देखील. गीतांमध्ये श्रावण, पाऊस, विरह, वाट बघणे हे सर्व हमखास येतं. एक गीत आहे "लहरी सजण कुणी दावा" - मीना खडीकर यांचे संगीत, उषा मंगेशकर यांचा आवाज. हे गीत मला ना वाचायला आवडलं ना ऐकायला आवडलं 🫣 श्रीकृष्ण राधेच्या कथा तर आपण गवळणींमधे अनेक वेळा ऐकल्या आहेत. कृष्णाची धून ऐकल्यानंतर अगदी काहीही न सुचता तशीच्या तशी निघालेली राधा! त्यातही तिच्या शृंगारचं वर्णन येतंच. सजण्याची आवड असलेल्या स्त्रीचे वर्णन अतिशय खुबीने शांताबाईंनी केले आहे. मला स्वतःला नटण्या मुरडण्याची अतिशय हौस असल्यामुळे हे सगळं वर्णन वाचून, "हे पुस्तक आपण आधी का नाही वाचलं" याचं दुःख मात्र झालं. ही उदाहरणं बघा ना... माथ्यावर मोतियाची जाळी, भांगेत मोती सर, चंद्रकोर भाळी, कानात झुमके, केसांमध्ये वेल, नाकात नथ, नथित हिरे, बिल्वदळे, वज्रटिक, `बोलताना पाठीवर जिचे रेशमाचे गोंडे खालीवर होतील अशी` पाच पदरी मोहन माळ!! दंडात वाकी रुताव्या, शिंदेशाही तोडे असावेत आणि पायी सांध्यात सोनसळी, गळ्यात तन्मणी, कमरेला कंबरपट्टा, पायी पैंजण.... "शालू हिरवा, पाच नि मरवा, वेणी तीपेडी घाला" हे गीत तर फारच प्रसिद्ध झाले. शृंगार आणि सौंदर्य यांचे वर्णन या सगळ्या गीतांमध्ये अगदी खुलून आलेलं आहे. आणि प्रेम! त्याविषयी किती लिहावं आणि कशाप्रकारे लिहावं असा मोठाच प्रश्न पडला आहे. तरीही एका स्त्रीच्या मनाने वाचलेल्या ह्या चार ओळी लिहीतेच... काय वाजले प्रिय ते पाऊल, तो तर वारा तिची न चाहूल, भास हो फसवा वरचेवरी, शोधितो राधेला श्रीहरी!! ...Read more