* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: SAINIK HO TUMACHYASATHI
  • Availability : Available
  • ISBN : 9788177667660
  • Edition : 5
  • Publishing Year : JANUARY 2000
  • Weight : 100.00 gms
  • Pages : 36
  • Language : MARATHI
  • Category : CHILDREN LITERATURE
  • Available in Combos :ANAND YADAV COMBO SET-33 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
DURING WARTIME, IT IS ALWAYS SEEN THAT PEOPLE COME TOGETHER FORGETTING THEIR PAST, PERSONAL, POLITICAL, RELIGIOUS AND COMMUNITY DIFFERENCES TO FIGHT THE WAR. THE STORIES OF SOLDIERS` VALOUR AND SPIRIT ALWAYS NURTURE THE TENDER MINDS DEEPLY. WHILE LISTENING TO THE PATRIOTIC SONGS FULL OF BRAVERY; YOUNG MINDS AUTOMATICALLY GET TUNED TO THE WORDS, RHYTHM AND THE MEANING THEREIN. THEY GET IMPRESSED WITH PATRIOTISM. THIS IS A COLLECTION OF POEMS WRITTEN IN THE MEMORY OF THOSE SOLDIERS WHO GAVE UP THEIR LIFE OR WHO FOUGHT WITH IMMENSE BRAVERY. THESE SONGS WILL SURELY INSPIRE THE YOUNG MINDS.
युद्धकाळात सारे राष्ट्र प्रादेशिक, राजकीय, धार्मिक, सामाजिक भेद विसरून एकात्म होते आणि युद्धाला सामोरे जाते. सैनिकांच्या युद्धपराक्रमांचे संस्कार बालमनावर खोलवर होत असतात. पराक्रमाची गीते ऐकताना मुलांच्या मुठी वळतात, त्या गीतांच्या लयीवर ती नाचू लागतात. नकळत राष्ट्रीय भावनेने ती प्रभावित होतात. भारतपाक यांच्यात झालेल्या युद्धांत ज्यांनी विशेष पराक्रम गाजविले, अशा सैनिकांची ही पराक्रमगीते कुमारांना निश्चितच प्रेरणादायक ठरतील.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#झोंबी #(महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार १९८८-८९) #(महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार १९८८-८९) #(दि फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स -उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार १९८९) #(मारवाडी संमेलन पुरस्कार १९९०) # (साहित्य अकादमी पुरस्कार १९९०) #(प्रवरानगर - विखेपाटील पुरस्कार १९९१) #(संजीवनी साहित्य पुरस्कार, कोपरगाव १९९४) # नांगरणी # (रोहमारे ग्रामीण पुरस्कार १९९०) #घरभिंती #काचवेल #माऊली # (कालीमाता साहित्य पुरस्कार १९८६ #परिमल लेखन पुरस्कार १९८६ # नटरंग #(महाराष्ट्र राज्य पुरस्कार १९८२) # गोतावळा # शेवटची लढाई #(राज्य पुरस्कार २००१-०२) #भूमिकन्या #झाडवाटा # उगवती मने #(राज्य पुरस्कार २००२-०३) # आदिताल # डवरणी #माळावरची मैना # घरजावई #खळाळ #उखडलेली झाडं #सैनिक हो, तुमच्यासाठी... #मळ्याची माती #मायलेकरं #साहित्यिकाचा गाव #मातीखालची माती #स्पर्शकमळे #पाणभवरे #साहित्यिक जडण-घडण # ग्रामसंस्कृती #(रा. ना. सबनीस वाङ्मयपुरस्कार २००२) # मराठी लघुनिबंधाचा इतिहास #साहित्याची निर्मिती प्रक्रिया #ग्रामीणता : साहित्य आणि वास्तव आत्मचरित्र मीमांसा #"ग्रामीण साहित्य : स्वरूप व समस्या #(राज्य पुरस्कार १९८३) # मराठी साहित्य - समाज आणि संस्कृती #१९६० नंतरची सामाजिक स्थिती आणिसाहित्यातील नवे प्रवाह # डॉ. आनंद यादव - एक साहित्यिक प्रवास #ZOMBI #NANGARNI #GHARBHINTI #KACHVEL #MAULI #NATRANG #GOTAVALA #SHEVATCHI LADHAI #BHUMIKANYA #ZADVATA #UGVATI MANE #AADITAL #DAVARNI #MALAVARCHI MAINA #GHARJAWAI #KHALAL #UKHADLELI ZADE #SAINIK HO TUMACHYASATHI #MALYACHI MATI #MAI LEKARA #SAHITYIKACHA GAON #MATIKHALCHI MATI #SPARSHKAMALE #PANBHAVARE #SAHITYIK JADAN-GHADAN #GRAMSANSKRUTI #MARATHI LAGHUNIBANDHACHA ITIHAS #SAHITYACHI NIRMITI PRAKRIYA #GRAMINTA SAHITYA ANI VASTAV #AATMACHARITRA MIMANSA #GRAMIN SAHITYA : SWARUP ANI SAMASYA #1960 NANTARCHI SAMAJIK STHITI ANI SAHITYATEEL NAVE PRAVAH #DR. ANAND YADAV EK SAHITYIK PRAVAS
Customer Reviews
  • Rating StarTARUN BHARAT, MUMBAI 02-04-2000

    आनंद यादव यांनी कुमांरासाठी ‘सैनिक हो, तुमच्यासाठी....’ हा काव्यसंग्रह लिहिलेला आहे. यात भारतीय सैनिकांची पराक्रम गीते असून आनंद यादव यांनी तो भारतीय सैनिकांना अर्पण केलेला आहे. भारत-पाक यांच्यात झालेल्या युद्धात ज्यांनी विशेष पराक्रम गाजविला अशा सैनकांचे व्यक्तिचित्रण करणाऱ्या एकूण दहा कविता असून प्रत्येक वितेत एकेका सैनिकाचा पराक्रम मांडलेला आहे. विविधतेने नटलेल्या आपल्या अखंड भारतभूमीत अनेक युरोपियन येऊन राज्य करून गेले. भरपूर संपत्ती लुटून घेऊन गेले. एवढ्याने समाधान झाले नाही म्हणून ‘हिंदू-मुस्लिम’ फुटीरतेचे बीज रोवून गेले. हे बीज रुजल्याने अखंड भारमाता खंडली गेली. पापी पाक जन्माला आले. त्यामुळे स्वातंत्र्यदिनाच्या आदली रात्र कशी होती हे सांगताना कवी म्हणतो - ‘रक्ताने न्हाऊन निघाली स्वातंत्र्याची आधली रात.’ भारतमातेच्या शिरारवर काश्मीरसारखा सुंदर मुकुटमणी आहे. त्याची हाव पाकला लागली. यासाठी पाकने हरतऱ्हेने प्रयत्न सुरु केले. युनोमध्ये जाऊन पाहिले, घुसखोरी सुरु केली. काश्मीरमध्ये आतंकवाद पसरवला. तरीही भारत शर्तीचा प्रयत्न करीत होता. पाक मात्र हेका सोडायला तयार नव्हते. शेवटी भारताची सहनशक्ती तुटली आणि युध्द सुरु झाले. अशी पार्श्वभूमी कवीने ‘नमनाचे पडघम’ या कवितेत तयार केली आहे. व त्यानंतर अनुक्रमे दहा कविता लिहिलेल्या आहेत. काव्यसंग्रहातील पहिली कविता ‘गुलाम कादिरची स्वदेशनिष्ठा’ ही आहे. यात ‘खाग’ ग्रामच्या गुलाम कादिर नावाच्या वीराचे शौर्य वर्णिले आहे. भारतीय सीमेवर वसलेल्या गावांच्या जागृकतेमुळे व देशप्रेमामुळेच आपण अखंड स्वातंत्र्य भोगत असतो. हे सांगताना कवी म्हणतो - ‘ही असली जवान गावे सीमेवर जागोजागी म्हणूनीच हिंदवी माता स्वातंत्र्या अखंड भोगी’ दुर्गम डोंगराळ भागातील पाकिस्तानचे दारुगोळ्याचे महत्वाचे केंद्र उदध्वस्त करणारा मेजर रणजितसिंग, रणगाड्यांच्या हल्ल्यांना कडवी झुंज देणारा हवालदार अब्दुल हमीद, नऊ रणगाड्यांच्या बदलात साठांचा धुव्वा उडवणारा कर्नल तारापोर, बरकी गाव जिंकून घेताना शहीद झालेला रामसिंह, शत्रूचा बालेकिल्ला बॉम्बने उडवणारा बालकराम यांची बहादुरी वाचून कुणारे बाहू स्फुरणार नाहीत ! रात्रीच्या वेळी गस्त घालताना सुद्धा किती सावधगिरी लागते व प्रसंगी निर्भिडपणे एकाकी शत्रूल कशी झुंज द्यावी लागते याचे वर्णन ‘शिंगारसिंगाची टेहळणी’ या कवितेत वाचायला मिळते. युध्द सुरु असताना आपल्या सैनिकांना शस्त्राचा पुरवठा करणे ही तातडीची गरज असते. असेच रणसाहित्य घेऊन चक्रधर मेजरसिंह निघाला. अनेक अडचणींवर मात करत त्याचा ट्रक धावत होता, पण शत्रूने त्याच्या देहाची चाळण केली. ट्रकलाही आग लागली अशा स्थितीतही तो नेमक्या ठिकाणी आला व गतप्राण झाला. त्याही अवस्थेत त्याची बोटे गाडीच्या चाकावर होती. अशा शूरवीराचे वर्णन काव्यसंग्रहातील शेवटची कविता ‘चक्रधर मेजरसिंह’ या कवितेत पाहायला मिळते. काव्यसंग्रहात प्रत्येक कवितेच्या सुरुवातीला त्या कवितेच्या अनुषंगाने चित्रं काढलेली आहेत, त्यामुळे ती कविता अधिक आकर्षक वाटते व कुमारांना वाचण्यास हुरुप देते. भाषा अगदी सरळ, साधी व सोपी असल्याने मुलांना कुठेही अडचण येणार नाही. संग्रहात कवीने म्हटले आहे की, ‘ज्या वीरांनी तानाजीसम रणी ठेविला माथा आदरभावे त्या अर्पी मी ओबडधोबड गाथा’ असा हा सैनिकांच्या पराक्रम गीतांचा काव्यसंग्रह कुमारांना वाचण्यास चांगला आहे. याव्दारे त्यांच्या मनात देशप्रेमाची भावना दृढ होईल व देशासाठी तन मन धन अर्पण करण्याची वृत्ती निर्माण होण्यास मदत होईल. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more