* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: SAINIK HO TUMACHYASATHI
  • Availability : Available
  • ISBN : 9788177667660
  • Edition : 5
  • Publishing Year : JANUARY 2000
  • Weight : 100.00 gms
  • Pages : 36
  • Language : MARATHI
  • Category : CHILDREN LITERATURE
  • Available in Combos :ANAND YADAV COMBO SET-33 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
DURING WARTIME, IT IS ALWAYS SEEN THAT PEOPLE COME TOGETHER FORGETTING THEIR PAST, PERSONAL, POLITICAL, RELIGIOUS AND COMMUNITY DIFFERENCES TO FIGHT THE WAR. THE STORIES OF SOLDIERS` VALOUR AND SPIRIT ALWAYS NURTURE THE TENDER MINDS DEEPLY. WHILE LISTENING TO THE PATRIOTIC SONGS FULL OF BRAVERY; YOUNG MINDS AUTOMATICALLY GET TUNED TO THE WORDS, RHYTHM AND THE MEANING THEREIN. THEY GET IMPRESSED WITH PATRIOTISM. THIS IS A COLLECTION OF POEMS WRITTEN IN THE MEMORY OF THOSE SOLDIERS WHO GAVE UP THEIR LIFE OR WHO FOUGHT WITH IMMENSE BRAVERY. THESE SONGS WILL SURELY INSPIRE THE YOUNG MINDS.
युद्धकाळात सारे राष्ट्र प्रादेशिक, राजकीय, धार्मिक, सामाजिक भेद विसरून एकात्म होते आणि युद्धाला सामोरे जाते. सैनिकांच्या युद्धपराक्रमांचे संस्कार बालमनावर खोलवर होत असतात. पराक्रमाची गीते ऐकताना मुलांच्या मुठी वळतात, त्या गीतांच्या लयीवर ती नाचू लागतात. नकळत राष्ट्रीय भावनेने ती प्रभावित होतात. भारतपाक यांच्यात झालेल्या युद्धांत ज्यांनी विशेष पराक्रम गाजविले, अशा सैनिकांची ही पराक्रमगीते कुमारांना निश्चितच प्रेरणादायक ठरतील.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#झोंबी #(महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार १९८८-८९) #(महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार १९८८-८९) #(दि फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स -उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार १९८९) #(मारवाडी संमेलन पुरस्कार १९९०) # (साहित्य अकादमी पुरस्कार १९९०) #(प्रवरानगर - विखेपाटील पुरस्कार १९९१) #(संजीवनी साहित्य पुरस्कार, कोपरगाव १९९४) # नांगरणी # (रोहमारे ग्रामीण पुरस्कार १९९०) #घरभिंती #काचवेल #माऊली # (कालीमाता साहित्य पुरस्कार १९८६ #परिमल लेखन पुरस्कार १९८६ # नटरंग #(महाराष्ट्र राज्य पुरस्कार १९८२) # गोतावळा # शेवटची लढाई #(राज्य पुरस्कार २००१-०२) #भूमिकन्या #झाडवाटा # उगवती मने #(राज्य पुरस्कार २००२-०३) # आदिताल # डवरणी #माळावरची मैना # घरजावई #खळाळ #उखडलेली झाडं #सैनिक हो, तुमच्यासाठी... #मळ्याची माती #मायलेकरं #साहित्यिकाचा गाव #मातीखालची माती #स्पर्शकमळे #पाणभवरे #साहित्यिक जडण-घडण # ग्रामसंस्कृती #(रा. ना. सबनीस वाङ्मयपुरस्कार २००२) # मराठी लघुनिबंधाचा इतिहास #साहित्याची निर्मिती प्रक्रिया #ग्रामीणता : साहित्य आणि वास्तव आत्मचरित्र मीमांसा #"ग्रामीण साहित्य : स्वरूप व समस्या #(राज्य पुरस्कार १९८३) # मराठी साहित्य - समाज आणि संस्कृती #१९६० नंतरची सामाजिक स्थिती आणिसाहित्यातील नवे प्रवाह # डॉ. आनंद यादव - एक साहित्यिक प्रवास #ZOMBI #NANGARNI #GHARBHINTI #KACHVEL #MAULI #NATRANG #GOTAVALA #SHEVATCHI LADHAI #BHUMIKANYA #ZADVATA #UGVATI MANE #AADITAL #DAVARNI #MALAVARCHI MAINA #GHARJAWAI #KHALAL #UKHADLELI ZADE #SAINIK HO TUMACHYASATHI #MALYACHI MATI #MAI LEKARA #SAHITYIKACHA GAON #MATIKHALCHI MATI #SPARSHKAMALE #PANBHAVARE #SAHITYIK JADAN-GHADAN #GRAMSANSKRUTI #MARATHI LAGHUNIBANDHACHA ITIHAS #SAHITYACHI NIRMITI PRAKRIYA #GRAMINTA SAHITYA ANI VASTAV #AATMACHARITRA MIMANSA #GRAMIN SAHITYA : SWARUP ANI SAMASYA #1960 NANTARCHI SAMAJIK STHITI ANI SAHITYATEEL NAVE PRAVAH #DR. ANAND YADAV EK SAHITYIK PRAVAS
Customer Reviews
  • Rating StarTARUN BHARAT, MUMBAI 02-04-2000

    आनंद यादव यांनी कुमांरासाठी ‘सैनिक हो, तुमच्यासाठी....’ हा काव्यसंग्रह लिहिलेला आहे. यात भारतीय सैनिकांची पराक्रम गीते असून आनंद यादव यांनी तो भारतीय सैनिकांना अर्पण केलेला आहे. भारत-पाक यांच्यात झालेल्या युद्धात ज्यांनी विशेष पराक्रम गाजविला अशा सैनकांचे व्यक्तिचित्रण करणाऱ्या एकूण दहा कविता असून प्रत्येक वितेत एकेका सैनिकाचा पराक्रम मांडलेला आहे. विविधतेने नटलेल्या आपल्या अखंड भारतभूमीत अनेक युरोपियन येऊन राज्य करून गेले. भरपूर संपत्ती लुटून घेऊन गेले. एवढ्याने समाधान झाले नाही म्हणून ‘हिंदू-मुस्लिम’ फुटीरतेचे बीज रोवून गेले. हे बीज रुजल्याने अखंड भारमाता खंडली गेली. पापी पाक जन्माला आले. त्यामुळे स्वातंत्र्यदिनाच्या आदली रात्र कशी होती हे सांगताना कवी म्हणतो - ‘रक्ताने न्हाऊन निघाली स्वातंत्र्याची आधली रात.’ भारतमातेच्या शिरारवर काश्मीरसारखा सुंदर मुकुटमणी आहे. त्याची हाव पाकला लागली. यासाठी पाकने हरतऱ्हेने प्रयत्न सुरु केले. युनोमध्ये जाऊन पाहिले, घुसखोरी सुरु केली. काश्मीरमध्ये आतंकवाद पसरवला. तरीही भारत शर्तीचा प्रयत्न करीत होता. पाक मात्र हेका सोडायला तयार नव्हते. शेवटी भारताची सहनशक्ती तुटली आणि युध्द सुरु झाले. अशी पार्श्वभूमी कवीने ‘नमनाचे पडघम’ या कवितेत तयार केली आहे. व त्यानंतर अनुक्रमे दहा कविता लिहिलेल्या आहेत. काव्यसंग्रहातील पहिली कविता ‘गुलाम कादिरची स्वदेशनिष्ठा’ ही आहे. यात ‘खाग’ ग्रामच्या गुलाम कादिर नावाच्या वीराचे शौर्य वर्णिले आहे. भारतीय सीमेवर वसलेल्या गावांच्या जागृकतेमुळे व देशप्रेमामुळेच आपण अखंड स्वातंत्र्य भोगत असतो. हे सांगताना कवी म्हणतो - ‘ही असली जवान गावे सीमेवर जागोजागी म्हणूनीच हिंदवी माता स्वातंत्र्या अखंड भोगी’ दुर्गम डोंगराळ भागातील पाकिस्तानचे दारुगोळ्याचे महत्वाचे केंद्र उदध्वस्त करणारा मेजर रणजितसिंग, रणगाड्यांच्या हल्ल्यांना कडवी झुंज देणारा हवालदार अब्दुल हमीद, नऊ रणगाड्यांच्या बदलात साठांचा धुव्वा उडवणारा कर्नल तारापोर, बरकी गाव जिंकून घेताना शहीद झालेला रामसिंह, शत्रूचा बालेकिल्ला बॉम्बने उडवणारा बालकराम यांची बहादुरी वाचून कुणारे बाहू स्फुरणार नाहीत ! रात्रीच्या वेळी गस्त घालताना सुद्धा किती सावधगिरी लागते व प्रसंगी निर्भिडपणे एकाकी शत्रूल कशी झुंज द्यावी लागते याचे वर्णन ‘शिंगारसिंगाची टेहळणी’ या कवितेत वाचायला मिळते. युध्द सुरु असताना आपल्या सैनिकांना शस्त्राचा पुरवठा करणे ही तातडीची गरज असते. असेच रणसाहित्य घेऊन चक्रधर मेजरसिंह निघाला. अनेक अडचणींवर मात करत त्याचा ट्रक धावत होता, पण शत्रूने त्याच्या देहाची चाळण केली. ट्रकलाही आग लागली अशा स्थितीतही तो नेमक्या ठिकाणी आला व गतप्राण झाला. त्याही अवस्थेत त्याची बोटे गाडीच्या चाकावर होती. अशा शूरवीराचे वर्णन काव्यसंग्रहातील शेवटची कविता ‘चक्रधर मेजरसिंह’ या कवितेत पाहायला मिळते. काव्यसंग्रहात प्रत्येक कवितेच्या सुरुवातीला त्या कवितेच्या अनुषंगाने चित्रं काढलेली आहेत, त्यामुळे ती कविता अधिक आकर्षक वाटते व कुमारांना वाचण्यास हुरुप देते. भाषा अगदी सरळ, साधी व सोपी असल्याने मुलांना कुठेही अडचण येणार नाही. संग्रहात कवीने म्हटले आहे की, ‘ज्या वीरांनी तानाजीसम रणी ठेविला माथा आदरभावे त्या अर्पी मी ओबडधोबड गाथा’ असा हा सैनिकांच्या पराक्रम गीतांचा काव्यसंग्रह कुमारांना वाचण्यास चांगला आहे. याव्दारे त्यांच्या मनात देशप्रेमाची भावना दृढ होईल व देशासाठी तन मन धन अर्पण करण्याची वृत्ती निर्माण होण्यास मदत होईल. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RAZOR SHARP
RAZOR SHARP by ASHWIN SANGHI Rating Star
सुनील माने, पुणे

लेखक अश्विन सांघी “द रोझाबल लाइन” या पहिल्याच कादंबरीने खूप लोकप्रिय झाला. प्राचीन भारतीय दंतकथा/ऐतिहासिक संदर्भ घेऊन त्याच्याभोवती आजच्या काळात रहस्यपूर्ण कथा लिहिणारा अश्विन. Chanakya’s Chant, The Krishna Key, The Sialkot Saga, Keepers of the Kalacakra, The Vault of Vishnu, The Magicians of Mazda अशा एकापेक्षा एक सुंदर रहस्य कादंबर्या “भारत सिरीज़” नावाने खूप प्रसिद्ध झाल्या. या सर्व कादंबऱ्या मी इंग्लिश मधेच वाचल्या. यांचा मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाउस यांच्याकडे उपलब्ध आहे. अश्विन सांघीने या भारत सिरीज शिवाय एक नवीन थ्रिल्लर सिरीज (कुत्ता कदम) सुरू केली आहे. त्यांतील पहिली कादंबरी Razor Sharp. एक सिरियल किलर मुंबईत एकानंतर एक खून पाडतोय. पोलिस चक्रावले आहेत. 1. रविवार दि २ फेब्रुवारी , गोरेगाव पश्चिममधे रवि मेहराचा खून होतो. त्याची बायको खुशी कॅाल सेंटरचा जॅाब करून रात्री ११.३० ला परत येते. खूप वेळा बेल वाजवून दार न उघडल्यामुळे ती उघडून आत येते तर रवि रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलेला असतो. त्याचे हात पाठीमागे नायलॅान दोरीने बांधलेले असतात. त्याच्या छातीत सुरा खुपसलेला असतो. त्याच्या तोंडात काहीतरी खाद्य पदार्थ असतो. 2. सोमवार दि १० फेब्रुवारी , लोअर परळमधे सुचंद्रा अग्रवालचा खून. तिची कामवाली आल्यावर दार न उघडल्यामुळे सोसायटीवाले दार तोडतात. आत सुचंद्राचा खून झालेला. हात नायलॅान दोरीने मागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात काहीतरी खाद्यपदार्थ. पोलिस चक्रावलेले. मग पोलिसखाते जागे होते. त्यांचा नावाजलेला अधिकारी जो सस्पेंड झालेला आहे, त्या प्रकाश कदम, DCP याला बोलावले जाते. राज्याचे गृहमंत्री ओंकार लोखंडे, त्यांचा माणूस कमिशनर चव्हाण आणि उपगृहमंत्री जयंत गायकवाड व त्यांचा माणूस SCP राणे, मुंबईचा डॅान भाऊ पाटील जो लोखंडेचाच माणूस असतो, हे सर्व या केसच्या मागावर लागतात. कदम हा राणेंच्या ओळखीचा खास ऑफिसर असतो म्हणून त्यालाही इन्व्हेस्टीगेशनला बोलावले जाते. 3. मंगळवार दि १८ फेब्रुवारी , ठाणे येथे मंगला शहाचा खून. तिच्या शेजारणीमुळे हे कळते. मंगलाचे हात नायलॅान दोरीने पाठीमागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात खाद्यपदार्थ. पोलिस अधिकारी शिंदे कदमबरोबर येतात. मंगलाच्या चेहऱ्याजवळ कदमला पेस्टिसाईडचा वास येतो. चेहरा निळसर झालेला. खून झाल्यावर बॅाडीला हलवलेले दिसते. तो ऑफिसमध्ये जुन्या खूनांचे फोटो तपासतो. त्यांचीही बॅाडी खून केल्यावर हलवलेली दिसते. चेहऱ्यावर निळसर झाक दिसते. तिन्ही खून “फिनेक” ब्रॅंडच्या चाकूने केलेले असतात. हे समान धागे कदम त्याची मुलगी केतुल बरोबर चर्चा करतो. केतुलची आई काही वर्षांपूर्वी कदमला सोडून गेलेली असते. ती भाऊ पाटीलची सावत्र बहीण असते. पण सध्या ती कुठे आहे व काय करते हे माहित नसते. केतुल कोर्टात काम करत असते तसेच ती “शक्ती” या NGO मधेही काम करते. शक्ती हे सोनापूरमधुन सुटका केलेल्या वेश्यांचे पुनर्वसन करत असते. निर्मल नावाचा तिचा मित्र एथिकल हॅकर असतो. तिच्यावर प्रेम करत असतो. कदमला हार्ट अटॅक येऊन गेलेला व स्टेंट बसवलेला असतो. Depression मुळे त्याची सायकॅालॅाजिस्टकडे ट्रिटमेंट चालू असते. कदमला या तिन्ही केसमधे आणखी एक धागा सापडतो. हे खून आठ दिवसांच्या अंतरावर झालेले असतात. म्हणजे पुढचा खून बुधवारी होणार असल्याचे तो राणे व शिंदेला सांगतो. 4. बुधवार दि २६ फेब्रुवारी, कांदिवली पश्चिम, लक्ष्मी बुधीराजाचा खून. तोच पॅटर्न. 5. गुरुवार दि ५ मार्च, खार पश्चिम, गुरुराज अदवानीचा खून सेम पॅटर्न. गुरूराज हा युट्युबवरचा प्रसिद्ध सिंगर असतो. 6. शुक्रवार दि १३ मार्च, ताडदेव, दिव्या शुक्रपाणीवर खूनी हल्ला होतो. पण ती जबर जखमी होते. ती फिटनेस ट्रेनर असल्यामुळे खुन्याबरोबर झटापट करते. पण चाकू पोटात घुसल्यामुळे ती जबर जखमी होते. हात बांधलेले असतानाही ती फोनवर “सिरी” ला तिच्या भावाला, ध्रुवला फोन लावायला सांगते. फोन लागतो व ती “हेल्प हेल्प” एव्हढेच बोलून बेशुद्ध होते. म्हणून खुनी पळून जातो. ध्रुव तिथे पोहोचून तिला हॅास्पिटलमधे ॲडमिट करतो. पोलिसांना तिथे खुन्याची बॅग सापडते. त्यांत नायलॅानची दोरी, बेगॅान स्प्रे व राजमाच्या बिया सापडतात. तिसऱ्या खुनाआधी पोलिस संशयित म्हणून राजू दाभाडेला अटक करतात. पण चौथ्या खूनाच्या वेळेस तो कस्टडीतच असतो. मग खूनी कोण? 7. शनिवार दि २१ मार्च, बान्द्रा पश्चिम, शनिया डिसौजाचा खून होतो. सेम मोडस ऑपरेंडी . 8. शनिवार दि २८ मार्च, चेंबूर, ७१ वर्षांच्या राहुल सिंह नावाच्या सिख व्यक्तिचा खून होतो. तीच पध्दत. यानंतर एक दिवस कदम KBC बघत असताना अमिताभ बच्चन एका सिनेमाचं गाणं लावून त्याचा पिक्चर ओळखायला सांगतात. ते गाणं असते- “सोमवार को हम मिले मंगलवार को नयन बुध को मेरी निंद खुली जुम्मेरात को चैन अरे शुक्र शनी कटे मुश्किलसे आज है इतवार सात दिनों में हो गया जैसे सात जनम का प्यार” आणि कदमच्या डोक्यात एकदम प्रकाश पडतो… अरे, हे सर्व खून असेच रविवार ते शनिवार एक एका वारी घडलेत! पण शनिवारी दोन खून कसे? याच्या मागे काही खगोलशास्त्र किंवा भविष्याचा तर संबंध नाही? कदमला आठवतं की शेजारी राहणारा डॉ. देसाईला पण भविष्य-खगोलशास्त्राची आवड व माहिती आहे. ( डॅाक्टर कडे सापडलेल्या नायलॅानचे रंगीत दोर व फिनेक कंपनीचा चाकू यामुळे एक संशयित म्हणून कदमने त्याला अटक करून पुछताछ केलेली असते) कदम लगेच डॅाक्टरांकडे जातो. त्यांची माफी मागून त्यांना या प्रश्नांत मदत करायला सांगतो. तो या सर्व खुनांचा सिक्वेन्स सांगतो. ते प्रत्येक वारी का घडले? मग शनिवारी दोन का? यापुढे कोणता वार? कुणाचा खून? डॅाक्टर सांगतात की भारतीय भविष्य व खगोल शास्त्रात नवग्रहांना खूप महत्व आहे. रवि, सोम(चंद्र), मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि, राहू आणि केतु. यांचे रंग व धान्य वेगवेगळे असतात. त्या त्या ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी ते वापरले जातात. कदम ही माहिती लिहून घेतो. त्यावरून प्रत्येक खुनात वापरण्यात आलेले फिनेक कंपनीचे चाकू, वेगवेगळ्या रंगांचे नायलॅान दोर व तोंडातील पदार्थ यांचा संबंध जोडून एक तख्ता तयार करतोः- “रवि मेहरा-रविवार-सोनेरी दोर- तोंडात गहू-दिशा पूर्व सुचंद्रा-सोमवार-चंदेरी दोर-तोंडात तांदूळ-दिशा पश्चिम मंगला शाह-मंगळवार-लाल दोर-तोंडात तूर डाळ- दिशा दक्षिण लक्ष्मी बुधीराजा-बुधवार-हिरवा दोर-तोंडात हिरवे मूग-दिशा उत्तर गुरुराज अदवानी-गुरूवार-पिवळा दोर-तोंडात हरबरा डाळ-दिशा उत्तर पूर्व(ईशान्य) दिव्या शुक्रपाणी-शुक्रवार-पांढरा दोर-राजमा-दिशा दक्षिण पूर्व शनिया डिसौजा-शनिवार-काळा दोर-तोंडात काळे तिळ-दिशा उत्तर पश्चिम राहुल सिंग-शनिवार-निळा दोर-तोंडात उडीद दाळ-दिशा दक्षिण पश्चिम” आता उरला एकच ग्रह-केतु. केतुचा वार मंगळवार. ग्रे रंग, चना दाळ, दिशा दक्षिण पश्चिम. “केतु”म्हणजे कदमची मुलगी केतुलचा नंबर लागणार? आज तर मंगळवारच आहे! कदम घाबरून जातो! तो केतुलला फोन करतो पण तो बंद लागतो. ती सध्या कुठे आहे? कोर्टात? कदम आपल्या मुलीला वाचवतो का? खरा खुनी कोण असतो? तो पकडला जातो का? त्याचे यामागचा उद्देश काय असतो? याच्यामध्ये अजून कोण सामिल असतं का? याची उत्तरे मिळण्यासाठी वाचावी लागेल अश्विन सांघी यांची कादंबरी Razor Sharp. ...Read more

BANGARWADI
BANGARWADI by VYANKATESH MADGULKAR Rating Star
Sameer Kazi

सुंदर अशी कादंबरी माणदेशी बनगरवाडी तशी कोरडी रखरखती पण, यातील पात्रात मायेचा करुणेचाओलावा मनात घर करुन जातो