* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788171617432
  • Edition : 3
  • Publishing Year : JANUARY 1989
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 88
  • Language : MARATHI
  • Category : POEMS
  • Available in Combos :ANAND YADAV COMBO SET-33 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
‘MAI LEKRA’ IS A POETRY COLLECTION BY ANAND YADAV. YADAV BROUGHT LITERATURE FROM VILLAGE IN LIMELIGHT . LIFE IN THE VILLAGE, POVERTY , CONDITION OF AGRICULTURE ARE THE PLATFORMS OF YADAV SIR’S WRITING. HIS POETRY ALSO CONTAINS THIS FEATURES.
दर्शनी स्वरूपात `मायलेकर` हा काव्यात्म संवाद आहे. शिक्षण संपवून घरी परतलेल्या मुलाला पाहून आनंदलेली आई आपली स्वप्न खरी होणार या अपेक्षेने मुलांपुढे मांडते आणि शहरी संस्कारामुळे नवी नजर घेऊन आलेला मुलगा आपली स्वप्नं भिन्न असल्याच सांगतो. उभयतांच्या स्वप्नाची परिभाषा बदलली असली तरी दोघांचा भावविश्व एकच आहे. वात्सल्यापोटी मुलाच्या सारया आठवणी आईच्या उरात दाटून येतात. ती त्यांना मुक्तपणे वाट करून देते. शिक्षणामुळे अंतरमुख झालेल्या मुलाला कुटूंबातील विदारक दैत्याची जाणीव होते. कष्टकरी समाज आणि त्याच्या जीवावर सुखासीन झालेला प्रस्थापित वर्ग याविषयीचे आकलन मुलाला विमनस्क करते. हि परिस्थिती बदलण्याचा निर्धारही तो व्यक्त करतो. माय लेकराचा हा संवाद केवळ व्यक्तिगत राहत नाही, तर त्यातून ग्रामीण समाजातील गांजलेल्या वर्गाची प्रातिनिधिक वेदना समोर येते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#झोंबी #(महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार १९८८-८९) #(महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार १९८८-८९) #(दि फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स -उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार १९८९) #(मारवाडी संमेलन पुरस्कार १९९०) # (साहित्य अकादमी पुरस्कार १९९०) #(प्रवरानगर - विखेपाटील पुरस्कार १९९१) #(संजीवनी साहित्य पुरस्कार, कोपरगाव १९९४) # नांगरणी # (रोहमारे ग्रामीण पुरस्कार १९९०) #घरभिंती #काचवेल #माऊली # (कालीमाता साहित्य पुरस्कार १९८६ #परिमल लेखन पुरस्कार १९८६ # नटरंग #(महाराष्ट्र राज्य पुरस्कार १९८२) # गोतावळा # शेवटची लढाई #(राज्य पुरस्कार २००१-०२) #भूमिकन्या #झाडवाटा # उगवती मने #(राज्य पुरस्कार २००२-०३) # आदिताल # डवरणी #माळावरची मैना # घरजावई #खळाळ #उखडलेली झाडं #सैनिक हो, तुमच्यासाठी... #मळ्याची माती #मायलेकरं #साहित्यिकाचा गाव #मातीखालची माती #स्पर्शकमळे #पाणभवरे #साहित्यिक जडण-घडण # ग्रामसंस्कृती #(रा. ना. सबनीस वाङ्मयपुरस्कार २००२) # मराठी लघुनिबंधाचा इतिहास #साहित्याची निर्मिती प्रक्रिया #ग्रामीणता : साहित्य आणि वास्तव आत्मचरित्र मीमांसा #"ग्रामीण साहित्य : स्वरूप व समस्या #(राज्य पुरस्कार १९८३) # मराठी साहित्य - समाज आणि संस्कृती #१९६० नंतरची सामाजिक स्थिती आणिसाहित्यातील नवे प्रवाह # डॉ. आनंद यादव - एक साहित्यिक प्रवास #ZOMBI #NANGARNI #GHARBHINTI #KACHVEL #MAULI #NATRANG #GOTAVALA #SHEVATCHI LADHAI #BHUMIKANYA #ZADVATA #UGVATI MANE #AADITAL #DAVARNI #MALAVARCHI MAINA #GHARJAWAI #KHALAL #UKHADLELI ZADE #SAINIK HO TUMACHYASATHI #MALYACHI MATI #MAI LEKARA #SAHITYIKACHA GAON #MATIKHALCHI MATI #SPARSHKAMALE #PANBHAVARE #SAHITYIK JADAN-GHADAN #GRAMSANSKRUTI #MARATHI LAGHUNIBANDHACHA ITIHAS #SAHITYACHI NIRMITI PRAKRIYA #GRAMINTA SAHITYA ANI VASTAV #AATMACHARITRA MIMANSA #GRAMIN SAHITYA : SWARUP ANI SAMASYA #1960 NANTARCHI SAMAJIK STHITI ANI SAHITYATEEL NAVE PRAVAH #DR. ANAND YADAV EK SAHITYIK PRAVAS
Customer Reviews
  • Rating StarEknath Marathe

    मायलेकर, आनंद यादव मेहता पब्लिकेशन ... गरीब शेतकरी कुटुंबातली आई, छातीवर धोंडा ठेवून आपल्या मुलाला शिकायला पाठवते. पुढे तो मुलगा शिकतच राहतो. पदवी, पदव्युत्तर शिक्षण. आईला वाटते की आता मुलाने शिक्षण पुरे करून घरी करत यावे, कारकुनी करावी, गावात घरचे नाव मोठे करावे. नातवाला मांडीवर खेळवत मग तिने समाधानाने देह सोडावा. आपल्या भावना आईने काव्यात मांडल्या आहेत. मुलाने त्याला तसेच काव्यात उत्तर दिले आहे. शिक्षणाचा महासागर त्याला साद घालतो आहे. त्याची स्वप्ने कारकुनी करण्याची नाही तर प्राध्यापकी करण्याची आहेत. कष्टकरी वर्गाला त्याला न्याय मिळवून द्यायचा आहे. त्यांना दास्यातून व दारिद्र्यातून मुक्त करायचे आहे. त्याला त्या साठी लग्नाच्या बंधनात सुद्धा अडकायचे नाही. जन्म दात्या आईने त्याला आता मायेच्या बंधनात बांधू नये व मोठ्या आईच्या मदतीला जाण्यास मुक्त करावे. ग्रामीण शब्द अगदी सहज वापरलेले हे काव्य आहे . काही शब्द लागत नाहीत पण अशा शब्दांचे अर्थ सुद्धा शेवटी दिले आहेत. नक्की वाचा, एक वेगळाच काव्यानुभव घ्या ! काव्य पुस्तकाला प्रस्तावना मूळ काव्या पेक्षा मोठी आहे ! नमनाला घडाभर पाणी ! ...Read more

  • Rating StarSandip Chavan

    #मायलेकरं` हे आनंद यादव यांचे दिर्घकाव्य आहे. शहरातून शिक्षण संपवून घरी आलेला मुलगा आणि त्याला पाहून हरकून गेलेली त्याची खेड्यात राहणारी आई या दोहोंचा काव्यात्म संवाद म्हणजे `मायलेकरं!` प्रतिकूल परिस्थितीत आणि नवरा अकाली गेल्यानंतर (मुलंमुली मिून) सहा मुलांना वाढवण्यासाठी आईला करावा लागलेला संघर्ष, मोठा वसंता शिक्षणासाठी बाहेर गेल्यानंतरच्या त्याच्या आठवणी, तो शिकून आल्यानंतरची तिने रंगवलेली स्वप्ने इत्यादी प्रसंग आईच्या मुखातून आपल्याला ऐकायला मिळतात. तर दुसरीकडे शिक्षणामुळे अंतर्मुख झालेल्या मुलाला कुटुंबातील विदारक दैन्याची झालेली जाणीव; कष्टकरी समाज आणि त्याच्या जीवावर सुखासीन झालेला प्रस्थापित वर्ग याविषयी त्याला झालेले आकलन; ही परिस्थिती बदलण्याचा त्याचा निर्धार तो काव्यातून व्यक्त करतो. आई-लेकराच्या स्वप्नांमधील भिन्नता आहे मात्र त्यांचे भावविश्व एकच आहे. मायलेकरचा हा संवाद केवळ व्यक्तिगत नसून त्यातून ग्रामीण समाजातील गांजलेल्या वर्गाच्या वेदना समोर येतात. ...Read more

  • Rating StarDAINIK LOKSATTA 25-06

    संवादात्मक प्रदीर्घ काव्य भावप्रधान… प्रा. आनंद यादव हे मराठी साहित्यिकांत बिनीचे सरदार मानले जातात. कथा, काव्य, कादंबरी, निबंध असे साहित्याचे विविध प्रकार त्यांनी सहजपणे सादर केले आहेत. हे मराठी वाचकांना माहीत असणारच. समीक्षका म्हणूनही त्यांनी आपलेस्थान निश्चित केले आहे. ग्रामीण जीवनाचे भावदर्शन हा त्यांच्या साहित्याचा स्थायीभाव आहे. सोशित समाजाचे विविधांगी दर्शन त्यांनी घडविले आहे. प्रस्तुत ‘मायलेकरं’ हा काव्यसंग्रहही त्याच जीवनाच्या आशा-आकांक्षा दर्शविणारा ग्रामीण मायलेकारांचा मार्मिक संवाद आहे. ग्रामीण भावकाव्य ही कविता वास्तवधिष्ठित आहे. (मला तर ती आत्मनिष्ठच वाटते.) ह्या प्रदीर्घ कवितेचे दोन भाग आहेत. पूर्वार्धात ११ कडवी असून त्यामध्ये खेड्यातील आईचे आपल्या मुलाविषयीचे स्वप्न रंगविले आहे, तर उत्तरार्धात ११च कडव्यातून द्विपदवीधर होऊन आलेला तिचा मुलगा आपली स्वप्ने भिन्न असल्याचे सांगतो. आईची स्वप्ने, आकांक्षा, सुखाच्या कल्पना तेथील मातीशी बांधलेली आहेत. दैन्य, दारिद्र्य व दु:ख हा तिचा वारसा आहे. उलट मुलगा शहरातून शिकून. शहाणा होऊन आलेला त्याला सामाजिक विषमता बोचू लागलेली असते. तरीही तो कडवटपणा धारण करीत नाही. एक प्रकारचा समजूतदारपणा त्याच्या ठिकाणी जाणवतो. आपल्या बांधवांची परिस्थिती स्थितीशीलता तो समजून घेतो. पारंपारिक रूढींची वेढी एकदम तोडणे कठीण. पण प्रयत्न व्हायलाच हवेत म्हणून त्याची स्वप्ने वेगळी आहेत. ग्रामीण माय व विद्याविभूषीत मुलगा यांच्या दोन प्रवृत्तींचे प्रातिनिधक दर्शन आनंद यांदवांनी साक्षेपाने घडविले आहे. प्रेमळ आई सुरुवातीस शिकून आलेला मुलगा पाहून आईचे अंत:करण कौतुकाने भरून येते. त्याचे बालपण, शिक्षण, दारिद्र्य, वडिलांचा मृत्यू, मुलाची पुढील शिक्षणाची ऊर्मी, शहरात त्याला सहन करावी लागलेली परिस्थिती ह्या सर्वांचे चित्र तिच्या मनापुढे उभे राहते. आता मुलगा शिकून परत आला आहे. ती आनंदून जाते व म्हणते– तुझ्या वरतीला राजा सारं फुटलं रं गाव; तवा सुखाच्या सागरात माझी तरंगते नाव. त्याने आता इथंच राहून संसार, नोकरी (कारकुनाची) करावी असं तिच्या भाबड्या मनाला वाटतं. ह्या पूर्वार्धातून एक अशिक्षित ग्रामीण आई, तिचे मर्यादित विश्व, जीवनविषयक दृष्टिकोन जाणवतो. वाट्याला आलेली परिस्थिती निमूटपणे सहन करणारा हा गतानुगतिक दृष्टिकोन आहे. हे मृण्मय भावसत्य अस्वस्थ करून सोडते व करुणरसप्रधान पूर्वार्ध येथे संपतो. मुलाचा वैचारिक दृष्टिकोन मुलगा शिकला. त्याला प्राध्यापक, वकील व्हावं असं वाटणं साहजिक आहे. पण त्याला शहरात विपरित अनुभव आले व त्याचे मन त्याला गावाकडे ओढू लागले. माझा खेड्याचा सुदाम ती गं सोन्याची द्वारका नाही श्रीकृष्ण भेटला झालो पोरका पोरका. गावमातीच्या पाण्याची बर्फाला चव कशी येणार? नवीन यंत्रयुग आलं. खेडी उद्ध्वस्त झाली. त्यांच्या श्रमाने धरणं बांधली गेली. पण त्यांच्या अंगणात पाण्याचा थेंबही पडला नाही. खेड्यातील शेतकऱ्यांचे सावकारांनी शोषणच चालविले हे थांबले पाहिजे. श्रमिकांच्या श्रमाची योग्य किंमत मिळायला हवी. तुझ्या दामाचा नाही गं दाम तोलून मिळत अर्थ अनर्थाचे मूळ आई, नाही का कळत? आपलं हक्काचं मिळविण्यासाठी संघर्ष अटळ आहे. आई, रामोशी घेऊन कोना कोपरा धुंडीत तुझं लुटलेलं सोनं परतून मी आणीन. मुलगा म्हणतो की मी आता जनजागृतीसाठी माझी लेखणी (ज्ञान) वापरणार आहे. जात्यांची घरघर थांबली पाहिजे. गरीब शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण थांबले पाहिजे. कारण श्रमदेवच महत्त्वाचा आहे. शेतकरी सुखी तरच समाज सुखी होईल. माझी माय आदिवेद घरघर तिची ऋचा पंडितांनो अनुभवा तिच्या आतड्याची वाचा. माझी माय आदिवेद कष्ट कष्ट तिचे सूक्त अहो पंडितांनो हुंगा घामगंध रक्तयुक्त. कवीने ग्रामीण बोलीचा, प्रतिमांचा कलात्मक वापर केला आहे. अष्टाक्षरी अक्षर छंद लोकसाहित्यातील लोकपरंपरेशी जुळता आहे. कवीने एक समर्थ वेदना परिणामकारक रीतीने ह्या ह्या दीर्घकाव्यात मांडली आहे. सामाजिक प्रश्नांवरील ही सुसृती टीकाच आहे. It is really a poetic criticism of life. -ग. वि. नेर्लेकर ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

रुपाली सोनवणे

#रुक #जाना #नही लेखक: Dr. भावेश भाटिया शब्दांकन: Dr: सचिन पाचोरकर अनुवाद: सुप्रिया वकील ​अंथरून पाहून पाय पसरावे... अह्ह.. त्या निर्जीव अंथरुणासाठी आपल्या सजीव पावलांना का त्रास द्यावा? असेच एक जबरदस्त आत्मचरित्र वाचून संपवलं आणि एक ऊर्जा निर्माणकरून गेलं, पुस्तकाचं नाव आहे `रुक जाना नहीँ ​डॉ. भावेश भाटिया यांची ही प्रेरणादायी कहाणी. शाळेत असताना आलेलं अकाली अंधत्व आणि त्यानंतर खडखडीत खडतर जीवनाचा सुरू झालेला प्रवास, पण या प्रवासात खचलेल्या बालमनाला त्यांच्या आईने दिलेलं बळ, प्रेरणा व आत्मसन्मानाची शिकवण आणि स्वाभिमानाचे धडे लेखकास पुरे होते. हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. चांगल्या धडधाकट व्यक्तीवर संकट आल्यावर दूर दूर पळणारे नातलग, मित्र परिवार, जातभाई... दृष्टी गेलेल्या व्यक्तीस कितपत आधार देतील? पण एक ऑपरेटर ते एक उद्योजक, `सनराईज कॅण्डल`चा विस्तार आणि स्वतःबरोबर अनेक दृष्टिहीन व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभं करून रोजगार देणारा हा अवलिया किती अडथळे पार करून आलाय हे जाणून घेण्यासाठी पुस्तक वाचायला हवंच. ​कुठलाही वशीला नाही की कोणाची सहानुभूती नाही, स्वबळावर विविध प्रयोग करत उद्योग यशस्वी करणं सोपं नाही. यात ज्या ज्या देवमाणसांनी हातभार लावला त्यांचा पण उल्लेख आहे, पण त्या देवमाणसांनी देखील कधीच उपकारिक भाषा न करता व स्वाभिमान न दुखावता कशी मदत करता येऊ शकते हे त्यांच्या कृतीतून दाखवून दिलंय. लेखक फक्त उद्योग उभारून थांबले नाहीत तर त्यांनी सामाजिक जाणीवेचं भान देखील ठेवलंय. महाबळेश्वरमध्ये सनराईज कॅण्डल नावाने त्यांनी भव्य असा उद्योग परिसर आणि म्युझियम सुरू केलंय, तेथे अनेक दृष्टिहीन व्यक्तींना रोजगार मिळाला आहे त्याचबरोबर सर्वजण स्वाभिमानाने कष्ट करून जगत आहेत. हजारो आयुष्य त्यांनी उजळून टाकली आहेत. दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार सह एकून 46 पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.विशेष म्हणजे सर्व पुरस्कार त्यांच्या योग्यतेनुसार दिले आहेत.. आणी अशा हजारो पुरस्कारांचे ते मानकरी आहेत असंच वाटत..त्यांच्या कामाची दखल रिलायन्स ग्रुप ने देखील घेतली आहे.व त्यांच्या पुस्तकास प्रस्तावना देखील नीता अंबानी यांनी दिली आहे.उद्योग करताना छोट्या छोट्या गोष्टी कसा प्रभाव करतात याच वर्णन देखील त्यांनी लिहिल आहे.. ​या कार्यात महत्त्वाचं योगदान त्यांच्या धर्मपत्नी नीता भाटिया यांनी दिलं आहे. दूरदृष्टी ठेवून आपल्या पतीस प्रोत्साहन देऊन, नवीन कल्पनेसह पाठिंबा देऊन त्यांना हुरूप देण्याचं काम त्यांनी केलंय. नीता भाटिया यांचं कर्तृत्व, त्यांचं पवित्र निस्वार्थी प्रेम या पुस्तकातून वाचताना आंतरिक वेगळी ऊर्जा मिळते. कलियुगातील देवी हा शब्द व मान त्यांना समर्पक वाटतो. पुस्तक सर्व वयोगटातील वाचक वाचू शकतात. मनाने खचलेल्या पण शरीराने धडधाकट असलेल्या प्रत्येक व्यक्तीने वरील पुस्तक नक्की वाचावं आणि आत्मसात करावं. एवढ्या उंचीवर असूनही जमिनीवर पाय असलेल व्यक्तिमत्व आहे. अगदी प्रेमळ पणे वागण बोलण सन्मान देण..ही दैवी देणगी त्यांच्या जवळ आहे. ...Read more

RAZOR SHARP
RAZOR SHARP by ASHWIN SANGHI Rating Star
सुनील माने, पुणे

लेखक अश्विन सांघी “द रोझाबल लाइन” या पहिल्याच कादंबरीने खूप लोकप्रिय झाला. प्राचीन भारतीय दंतकथा/ऐतिहासिक संदर्भ घेऊन त्याच्याभोवती आजच्या काळात रहस्यपूर्ण कथा लिहिणारा अश्विन. Chanakya’s Chant, The Krishna Key, The Sialkot Saga, Keepers of the Kalacakra, The Vault of Vishnu, The Magicians of Mazda अशा एकापेक्षा एक सुंदर रहस्य कादंबर्या “भारत सिरीज़” नावाने खूप प्रसिद्ध झाल्या. या सर्व कादंबऱ्या मी इंग्लिश मधेच वाचल्या. यांचा मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाउस यांच्याकडे उपलब्ध आहे. अश्विन सांघीने या भारत सिरीज शिवाय एक नवीन थ्रिल्लर सिरीज (कुत्ता कदम) सुरू केली आहे. त्यांतील पहिली कादंबरी Razor Sharp. एक सिरियल किलर मुंबईत एकानंतर एक खून पाडतोय. पोलिस चक्रावले आहेत. 1. रविवार दि २ फेब्रुवारी , गोरेगाव पश्चिममधे रवि मेहराचा खून होतो. त्याची बायको खुशी कॅाल सेंटरचा जॅाब करून रात्री ११.३० ला परत येते. खूप वेळा बेल वाजवून दार न उघडल्यामुळे ती उघडून आत येते तर रवि रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलेला असतो. त्याचे हात पाठीमागे नायलॅान दोरीने बांधलेले असतात. त्याच्या छातीत सुरा खुपसलेला असतो. त्याच्या तोंडात काहीतरी खाद्य पदार्थ असतो. 2. सोमवार दि १० फेब्रुवारी , लोअर परळमधे सुचंद्रा अग्रवालचा खून. तिची कामवाली आल्यावर दार न उघडल्यामुळे सोसायटीवाले दार तोडतात. आत सुचंद्राचा खून झालेला. हात नायलॅान दोरीने मागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात काहीतरी खाद्यपदार्थ. पोलिस चक्रावलेले. मग पोलिसखाते जागे होते. त्यांचा नावाजलेला अधिकारी जो सस्पेंड झालेला आहे, त्या प्रकाश कदम, DCP याला बोलावले जाते. राज्याचे गृहमंत्री ओंकार लोखंडे, त्यांचा माणूस कमिशनर चव्हाण आणि उपगृहमंत्री जयंत गायकवाड व त्यांचा माणूस SCP राणे, मुंबईचा डॅान भाऊ पाटील जो लोखंडेचाच माणूस असतो, हे सर्व या केसच्या मागावर लागतात. कदम हा राणेंच्या ओळखीचा खास ऑफिसर असतो म्हणून त्यालाही इन्व्हेस्टीगेशनला बोलावले जाते. 3. मंगळवार दि १८ फेब्रुवारी , ठाणे येथे मंगला शहाचा खून. तिच्या शेजारणीमुळे हे कळते. मंगलाचे हात नायलॅान दोरीने पाठीमागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात खाद्यपदार्थ. पोलिस अधिकारी शिंदे कदमबरोबर येतात. मंगलाच्या चेहऱ्याजवळ कदमला पेस्टिसाईडचा वास येतो. चेहरा निळसर झालेला. खून झाल्यावर बॅाडीला हलवलेले दिसते. तो ऑफिसमध्ये जुन्या खूनांचे फोटो तपासतो. त्यांचीही बॅाडी खून केल्यावर हलवलेली दिसते. चेहऱ्यावर निळसर झाक दिसते. तिन्ही खून “फिनेक” ब्रॅंडच्या चाकूने केलेले असतात. हे समान धागे कदम त्याची मुलगी केतुल बरोबर चर्चा करतो. केतुलची आई काही वर्षांपूर्वी कदमला सोडून गेलेली असते. ती भाऊ पाटीलची सावत्र बहीण असते. पण सध्या ती कुठे आहे व काय करते हे माहित नसते. केतुल कोर्टात काम करत असते तसेच ती “शक्ती” या NGO मधेही काम करते. शक्ती हे सोनापूरमधुन सुटका केलेल्या वेश्यांचे पुनर्वसन करत असते. निर्मल नावाचा तिचा मित्र एथिकल हॅकर असतो. तिच्यावर प्रेम करत असतो. कदमला हार्ट अटॅक येऊन गेलेला व स्टेंट बसवलेला असतो. Depression मुळे त्याची सायकॅालॅाजिस्टकडे ट्रिटमेंट चालू असते. कदमला या तिन्ही केसमधे आणखी एक धागा सापडतो. हे खून आठ दिवसांच्या अंतरावर झालेले असतात. म्हणजे पुढचा खून बुधवारी होणार असल्याचे तो राणे व शिंदेला सांगतो. 4. बुधवार दि २६ फेब्रुवारी, कांदिवली पश्चिम, लक्ष्मी बुधीराजाचा खून. तोच पॅटर्न. 5. गुरुवार दि ५ मार्च, खार पश्चिम, गुरुराज अदवानीचा खून सेम पॅटर्न. गुरूराज हा युट्युबवरचा प्रसिद्ध सिंगर असतो. 6. शुक्रवार दि १३ मार्च, ताडदेव, दिव्या शुक्रपाणीवर खूनी हल्ला होतो. पण ती जबर जखमी होते. ती फिटनेस ट्रेनर असल्यामुळे खुन्याबरोबर झटापट करते. पण चाकू पोटात घुसल्यामुळे ती जबर जखमी होते. हात बांधलेले असतानाही ती फोनवर “सिरी” ला तिच्या भावाला, ध्रुवला फोन लावायला सांगते. फोन लागतो व ती “हेल्प हेल्प” एव्हढेच बोलून बेशुद्ध होते. म्हणून खुनी पळून जातो. ध्रुव तिथे पोहोचून तिला हॅास्पिटलमधे ॲडमिट करतो. पोलिसांना तिथे खुन्याची बॅग सापडते. त्यांत नायलॅानची दोरी, बेगॅान स्प्रे व राजमाच्या बिया सापडतात. तिसऱ्या खुनाआधी पोलिस संशयित म्हणून राजू दाभाडेला अटक करतात. पण चौथ्या खूनाच्या वेळेस तो कस्टडीतच असतो. मग खूनी कोण? 7. शनिवार दि २१ मार्च, बान्द्रा पश्चिम, शनिया डिसौजाचा खून होतो. सेम मोडस ऑपरेंडी . 8. शनिवार दि २८ मार्च, चेंबूर, ७१ वर्षांच्या राहुल सिंह नावाच्या सिख व्यक्तिचा खून होतो. तीच पध्दत. यानंतर एक दिवस कदम KBC बघत असताना अमिताभ बच्चन एका सिनेमाचं गाणं लावून त्याचा पिक्चर ओळखायला सांगतात. ते गाणं असते- “सोमवार को हम मिले मंगलवार को नयन बुध को मेरी निंद खुली जुम्मेरात को चैन अरे शुक्र शनी कटे मुश्किलसे आज है इतवार सात दिनों में हो गया जैसे सात जनम का प्यार” आणि कदमच्या डोक्यात एकदम प्रकाश पडतो… अरे, हे सर्व खून असेच रविवार ते शनिवार एक एका वारी घडलेत! पण शनिवारी दोन खून कसे? याच्या मागे काही खगोलशास्त्र किंवा भविष्याचा तर संबंध नाही? कदमला आठवतं की शेजारी राहणारा डॉ. देसाईला पण भविष्य-खगोलशास्त्राची आवड व माहिती आहे. ( डॅाक्टर कडे सापडलेल्या नायलॅानचे रंगीत दोर व फिनेक कंपनीचा चाकू यामुळे एक संशयित म्हणून कदमने त्याला अटक करून पुछताछ केलेली असते) कदम लगेच डॅाक्टरांकडे जातो. त्यांची माफी मागून त्यांना या प्रश्नांत मदत करायला सांगतो. तो या सर्व खुनांचा सिक्वेन्स सांगतो. ते प्रत्येक वारी का घडले? मग शनिवारी दोन का? यापुढे कोणता वार? कुणाचा खून? डॅाक्टर सांगतात की भारतीय भविष्य व खगोल शास्त्रात नवग्रहांना खूप महत्व आहे. रवि, सोम(चंद्र), मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि, राहू आणि केतु. यांचे रंग व धान्य वेगवेगळे असतात. त्या त्या ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी ते वापरले जातात. कदम ही माहिती लिहून घेतो. त्यावरून प्रत्येक खुनात वापरण्यात आलेले फिनेक कंपनीचे चाकू, वेगवेगळ्या रंगांचे नायलॅान दोर व तोंडातील पदार्थ यांचा संबंध जोडून एक तख्ता तयार करतोः- “रवि मेहरा-रविवार-सोनेरी दोर- तोंडात गहू-दिशा पूर्व सुचंद्रा-सोमवार-चंदेरी दोर-तोंडात तांदूळ-दिशा पश्चिम मंगला शाह-मंगळवार-लाल दोर-तोंडात तूर डाळ- दिशा दक्षिण लक्ष्मी बुधीराजा-बुधवार-हिरवा दोर-तोंडात हिरवे मूग-दिशा उत्तर गुरुराज अदवानी-गुरूवार-पिवळा दोर-तोंडात हरबरा डाळ-दिशा उत्तर पूर्व(ईशान्य) दिव्या शुक्रपाणी-शुक्रवार-पांढरा दोर-राजमा-दिशा दक्षिण पूर्व शनिया डिसौजा-शनिवार-काळा दोर-तोंडात काळे तिळ-दिशा उत्तर पश्चिम राहुल सिंग-शनिवार-निळा दोर-तोंडात उडीद दाळ-दिशा दक्षिण पश्चिम” आता उरला एकच ग्रह-केतु. केतुचा वार मंगळवार. ग्रे रंग, चना दाळ, दिशा दक्षिण पश्चिम. “केतु”म्हणजे कदमची मुलगी केतुलचा नंबर लागणार? आज तर मंगळवारच आहे! कदम घाबरून जातो! तो केतुलला फोन करतो पण तो बंद लागतो. ती सध्या कुठे आहे? कोर्टात? कदम आपल्या मुलीला वाचवतो का? खरा खुनी कोण असतो? तो पकडला जातो का? त्याचे यामागचा उद्देश काय असतो? याच्यामध्ये अजून कोण सामिल असतं का? याची उत्तरे मिळण्यासाठी वाचावी लागेल अश्विन सांघी यांची कादंबरी Razor Sharp. ...Read more