* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: DAYS OF GOLD & SEPIA
  • Availability : Available
  • Translators : ANJANI NARAVANE
  • ISBN : 9788184989236
  • Edition : 1
  • Publishing Year : NOVEMBER 2015
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 388
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Print Books:
THIS IS THE SAGA OF LALLJEE LAKHA AS HE RISES FROM HIS HUMBLE BEGINNINGS AS A PENNILESS ORPHAN IN HIS DESERT HOMELAND OF KUTCH TO AMASS A LARGE FORTUNE AS BOMBAY S COTTON KING . SET AGAINST THE EVENTFUL PERIOD BETWEEN INDIA S WAR FOR INDEPENDENCE IN 1857 AND THE FLEDGLING FREEDOM STRUGGLE OF THE EARLY TWENTIETH CENTURY, THIS SWEEPING TALE IS PEOPLED BY A VIBRANT ARRAY OF CHARACTERS MERCHANT PRINCES AND MAHARAJAS, COURTESANS AND SOOTHSAYERS, PIRATES, FREEDOM FIGHTERS AND SOLDIERS OF THE BRITISH RAJ. DAYS OF GOLD AND SEPIA PAINTS THE PORTRAIT OF A MAN OF COURAGE AND CHARACTER, AND IS THE STORY OF THE DISCOVERY OF LIFE, THE PAIN OF A PASSIONATE AND DOOMED LOVE AND FAMILY FEUDS, AND OF GREAT PERSONAL INTEGRITY AND HUMAN FRAILTY
हातात पुटकी कवडीही नसलेला अनाथ मुलगा, कच्छमधल्या वाळवंटातल्या अत्यंत गरीब परिस्थितीतून धडपडत वर येत येत संपत्ती व कीर्ती मिळवून मुंबईचा ‘कॉटन विंग’ कसा होतो, याचं चित्रण या कादंबरीत हातोटीने करण्यात आलं आहे. शिवाय १८५७ सालच्या हिंदुस्थानच्या पहिल्या स्वातंत्र्यसमरापासून सन १९४७मध्ये स्वातंत्र्याची पहाट उगवेपर्यंतचा अत्यंत चित्तथरारक कालखंडही यात प्रत्ययकारी पद्धतीने रेखाटला आहे. यात त-हेत-हेच्या मनोवेधक, धीट, कणखर मनाच्या, उत्साही व्यक्ती भेटतात – व्यापारसम्राट, राजे-महाराजे, गणिका, अचूक भाकितं सांगणारा योगी, समुद्रावरचे चाचे, स्वातंत्र्यसैनिक आणि ब्रिटिश राज्यकर्ते... ही एका अनावर प्रेमाच्या अटळ शोकान्तिकेचीही कहाणी आहे – यात चित्रण आहे, एका धैर्यवान, चारित्र्यवान माणसाचं, त्याच्या अत्यंत प्रामाणिक व्यक्तिमत्त्वाचं, विलक्षण उदार मनाचं, आणि मानवसुलभ मानसिक दौर्बल्याचंही... थक्क करून टाकणारी लालजी लखाची विलक्षण कथा खिळवून ठेवते!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #DAYSOFGOLD&SEPIA #DAYSOFGOLD&SEPIA #डेजऑफगोल्डअ‍ॅण्डसीपिया #FICTION #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #ANJANINARAVANE #अंजनीनरवणे #YASMEENPREMJI "
Customer Reviews
  • Rating StarShrikant Adhav

    DAYS OF GOLD & SEPIA by YASMEEN PREMJI यास्मिन प्रेमजी यांनी मूळ इंग्लिशमध्ये लिहिलेल्या ‘डेज ऑफ गोल्ड अँड सीपीया’ या कादंबरीचा अनुवाद अंजनी नरवणे यांनी केलाय. लालजी लखा या नायकाभोवती फिरणाऱ्या या कथानकात प्रचंड नाट्य, प्रेमवीरांची धडपड, त्यांचा वरह अशा विविध बाबी समोर येतात. हातात कवडीह नसलेला लालजी आपलं साम्राज्य कसं उभं करतो, ते यातून कळतं.पत्रकार आणि कथालेखिका आणि प्रख्यात उद्योगपती अझिम प्रेमजी यांच्या पत्नी यास्मिन प्रेमजी यांची ही रोचक कादंबरी. अंजनी नरवणे यांनी कादंबरीचा रसाळ अनुवाद केला आहे. गुजरातमधील कच्छच्या रणात अत्यंत गरीब परिस्थितीत जन्मलेला मुलगा संकटांशी सामना करत मोठा होो. मोठेपणी मुंबईचा कॉटन किंग म्हणून कीर्ती मिळवतो. या विलक्षण प्रवासाचीच ही कथा आहे. साधारणत: १८५७ ते १९४७ पर्यंतचा काळ कादंबरीत चित्रित केला आहे. या प्रवासात तो कसा घडतो, त्याला भेटणारी माणसे आदींचेही दर्शन त्यांतून घडते.सोनेरी दिवसांची गोष्ट... मुघल साम्राज्यात सुरत ही आर्थिक राजधानी होती. इंग्रजांच्या ईस्ट इंडिया कंपनीचे मुख्यालय सुरतलाच होते. पण सन १६७० साली शिवाजी महाराजांनी सुरत दुसऱ्यांदा लुटली आणि इंग्रजांनी आपला सगळा कारभार हळूहळू मुंबईला हलवला. इंग्रज पक्क व्यापारी. त्यांनी सगळीकडच्या व्यापारी जमातींना आमंत्रण देऊन सुरक्षिततेची हमी देऊन मुंबईत बोलावले. इथून पुढे मुंबईची व्यापारी भरभराट सुरू झाली. आपण मराठी माणसे सगळ्याच गुजराती भाषिकांना व्यापारी समजतो. पण खरे म्हणजे गुजरातमधले कच्छी लोक हे उत्तम व्यापारी. या कच्छी लोकांमध्ये हिंदू आणि मुसलमान दोघेही आहेत. त्यातल्या मुसलमानांची नावेही अर्धी हिंदू असतात. उदा. अझीम प्रेमजी. आजही मुंबईचा व्यापार फार मोठ्या प्रमाणात कच्छी व्यापाऱ्यांच्याच हातात आहे आणि अझीम प्रेमजी तर हिंदुस्थानच्या आय.टी. उद्योगाचे राजे म्हणून ओळखले जातात. आता मुंबईहून बंगळुरुला स्थायिक झालेले, मूळचे कच्छी इस्माईली शिया मुसलमान असलेले अझीम प्रेमजी संपूर्ण देशातले तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जातात. अझीम प्रेमजींचे वडील महम्मद हाशीम प्रेमजी हे कच्छहून मुंबईला आले. अफाट मेहनत, गोड बोलणे आणि मिळालेली संधी अचूक पकडण्याची हातोटी या भांडवलावर प्रेमजींनी मुंबईतले अग्रगण्य व्यापारी म्हणून स्थान मिळवले. पाकिस्तान बनल्यावर जीनांनी त्यांना तिकडे येण्याचा खूप आग्रह केला होता. प्रेमजींनी त्यांना ठाम नकार दिला. प्रस्तुत ‘डेज ऑफ गोल्ड अ‍ॅण्ड सीपिया’ या पुस्तकात लेखिका यास्मिन प्रेमजी म्हणजे अझीम प्रेमजींच्या पत्नी यांनी आपल्या कर्तबगार सासऱ्यांची जीवन कहाणीच चित्तारली आहे. मात्र ही हाशीम प्रेमजींचे चरित्र किंवा चरित्रात्मक कादंबरीही नाही. यास्मिन प्रेमजींचे माहेरचे घराणे चिनॉय हेही मुंबईतले एक जुने व्यापारी घराणे. त्यामुळे आपल्या सासऱ्यांच्या कहाणीत त्यांनी मुंबईच्या जुन्या हिंदू, मुसलमान, पारशी, ज्यु अशा अनेक व्यापाऱ्यांचे रंग मिसळले आहेत. कच्छचा आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील झांजिबारशी फार पुरातन व्यापार आहे. त्यामुळे या कहाणीत कच्छ, मुंबई यांच्याबरोबर झांजिबारही येते.कच्छहून निष्कांचन अवस्थेत मुंबईत आलेला एक तरुण अविरत कष्ट करून हळूहळू मोठा होतोय. अशा मापाने बेतलेली ही कहाणी खरे म्हणजे एका महाकादंबरीचा विषय होता. कारण ती नायक लालजी लखा याचीच फक्त कथा नसून सतत भरभराटत राहणाऱ्या मुंबई शहराची कथा आहे. पुस्तक वाचनीय आहे. अंजनी नरवणे यांचा मराठी अनुवाद, चंद्रमोहन कुलकर्णी यांचे मुखपृष्ठ आणि मेहता प्रकाशनाची निर्मिती सुबक. ...Read more

  • Rating StarDAINIK SAMANA 24-04-2016

    सोनेरी दिवसांची गोष्ट... मुघल साम्राज्यात सुरत ही आर्थिक राजधानी होती. इंग्रजांच्या ईस्ट इंडिया कंपनीचे मुख्यालय सुरतलाच होते. पण सन १६७० साली शिवाजी महाराजांनी सुरत दुसऱ्यांदा लुटली आणि इंग्रजांनी आपला सगळा कारभार हळूहळू मुंबईला हलवला. इंग्रज पक्क व्यापारी. त्यांनी सगळीकडच्या व्यापारी जमातींना आमंत्रण देऊन सुरक्षिततेची हमी देऊन मुंबईत बोलावले. इथून पुढे मुंबईची व्यापारी भरभराट सुरू झाली. आपण मराठी माणसे सगळ्याच गुजराती भाषिकांना व्यापारी समजतो. पण खरे म्हणजे गुजरातमधले कच्छी लोक हे उत्तम व्यापारी. या कच्छी लोकांमध्ये हिंदू आणि मुसलमान दोघेही आहेत. त्यातल्या मुसलमानांची नावेही अर्धी हिंदू असतात. उदा. अझीम प्रेमजी. आजही मुंबईचा व्यापार फार मोठ्या प्रमाणात कच्छी व्यापाऱ्यांच्याच हातात आहे आणि अझीम प्रेमजी तर हिंदुस्थानच्या आय.टी. उद्योगाचे राजे म्हणून ओळखले जातात. आता मुंबईहून बंगळुरुला स्थायिक झालेले, मूळचे कच्छी इस्माईली शिया मुसलमान असलेले अझीम प्रेमजी संपूर्ण देशातले तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जातात. अझीम प्रेमजींचे वडील महम्मद हाशीम प्रेमजी हे कच्छहून मुंबईला आले. अफाट मेहनत, गोड बोलणे आणि मिळालेली संधी अचूक पकडण्याची हातोटी या भांडवलावर प्रेमजींनी मुंबईतले अग्रगण्य व्यापारी म्हणून स्थान मिळवले. पाकिस्तान बनल्यावर जीनांनी त्यांना तिकडे येण्याचा खूप आग्रह केला होता. प्रेमजींनी त्यांना ठाम नकार दिला. प्रस्तुत ‘डेज ऑफ गोल्ड अ‍ॅण्ड सीपिया’ या पुस्तकात लेखिका यास्मिन प्रेमजी म्हणजे अझीम प्रेमजींच्या पत्नी यांनी आपल्या कर्तबगार सासऱ्यांची जीवन कहाणीच चित्तारली आहे. मात्र ही हाशीम प्रेमजींचे चरित्र किंवा चरित्रात्मक कादंबरीही नाही. यास्मिन प्रेमजींचे माहेरचे घराणे चिनॉय हेही मुंबईतले एक जुने व्यापारी घराणे. त्यामुळे आपल्या सासऱ्यांच्या कहाणीत त्यांनी मुंबईच्या जुन्या हिंदू, मुसलमान, पारशी, ज्यु अशा अनेक व्यापाऱ्यांचे रंग मिसळले आहेत. कच्छचा आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील झांजिबारशी फार पुरातन व्यापार आहे. त्यामुळे या कहाणीत कच्छ, मुंबई यांच्याबरोबर झांजिबारही येते. कच्छहून निष्कांचन अवस्थेत मुंबईत आलेला एक तरुण अविरत कष्ट करून हळूहळू मोठा होतोय. अशा मापाने बेतलेली ही कहाणी खरे म्हणजे एका महाकादंबरीचा विषय होता. कारण ती नायक लालजी लखा याचीच फक्त कथा नसून सतत भरभराटत राहणाऱ्या मुंबई शहराची कथा आहे. पुस्तक वाचनीय आहे. अंजनी नरवणे यांचा मराठी अनुवाद, चंद्रमोहन कुलकर्णी यांचे मुखपृष्ठ आणि मेहता प्रकाशनाची निर्मिती सुबक. ...Read more

  • Rating StarSAKAL 10-1-16

    यास्मिन प्रेमजी यांनी मूळ इंग्लिशमध्ये लिहिलेल्या ‘डेज ऑफ गोल्ड अँड सीपीया’ या कादंबरीचा अनुवाद अंजनी नरवणे यांनी केलाय. लालजी लखा या नायकाभोवती फिरणाऱ्या या कथानकात प्रचंड नाट्य, प्रेमवीरांची धडपड, त्यांचा विरह अशा विविध बाबी समोर येतात. हातात कवडीह नसलेला लालजी आपलं साम्राज्य कसं उभं करतो, ते यातून कळतं. ...Read more

  • Rating StarMAHARASHTRA TIMES 22-11-2015

    पत्रकार आणि कथालेखिका आणि प्रख्यात उद्योगपती अझिम प्रेमजी यांच्या पत्नी यास्मिन प्रेमजी यांची ही रोचक कादंबरी. अंजनी नरवणे यांनी कादंबरीचा रसाळ अनुवाद केला आहे. गुजरातमधील कच्छच्या रणात अत्यंत गरीब परिस्थितीत जन्मलेला मुलगा संकटांशी सामना करत मोठा होो. मोठेपणी मुंबईचा कॉटन किंग म्हणून कीर्ती मिळवतो. या विलक्षण प्रवासाचीच ही कथा आहे. साधारणत: १८५७ ते १९४७ पर्यंतचा काळ कादंबरीत चित्रित केला आहे. या प्रवासात तो कसा घडतो, त्याला भेटणारी माणसे आदींचेही दर्शन त्यांतून घडते. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RUCHIRA BHAG -1
RUCHIRA BHAG -1 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव_वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more

RUCHIRA BHAG -2
RUCHIRA BHAG -2 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more