* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177663563
  • Edition : 16
  • Publishing Year : DECEMBER 1992
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 96
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :V. P. KALE COMBO SET-52 BOOKS.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS BOOK CAN BE SAID TO BE THE FRUIT OF VA PU`S PENANCE OF LAST 40 YEARS. HE SEEMS TO COME AT A CONCLUSION OF ALL HIS FINDINGS ABOUT A HUMAN MIND. IT HAS THE BASE OF DNYANESHWARI. IT IS NOT A TYPICAL LOVE STORY; ON THE CONTRARY IT REVEALS A VERY FIRM MINDSET. IT IS THE STORY OF A CIRCLE CONTINUOUSLY MOVING AROUND THE CENTER POINT. IT IS A STORY OF LOVE WHICH KNOWS NO SELFISHNESS, NO RIGHTS. IT MAKES US REALISE FOR THE FIRST TIME, THAT AS THERE IS IMMENSE HAPPINESS BEYOND HAPPINESS, THERE IS ALSO IMMENSE HAPPINESS BEYOND EVERY SORROW, PAIN, AND ACHE. SAYARA, THE MAIN CHARACTER; SHE IS A MUSLIM BY BIRTH, BUT SHE CRAVES FOR THE PERFECTION OF HINDU RELIGION. SHE HERSELF IS OF A SECULAR MIND. SHE IS NEUTRAL ABOUT HERSELF. YET, SHE HAS LOST HERSELF IN HER OWN FRESHNESS. SHE DOES NOT ASK FOR ANYTHING, BUT SHE RECEIVES BEYOND IMAGINATION WHILE OTHERS WITH LOTS OF MONEY LOSE CONTINUOUSLY. IN THIS NOVEL, THE NARRATION, THE CHARACTERS, THE IMAGES AND THE WHOLE PLOT IS SO HARMONIOUSLY BLENDED TOGETHER THAT AFTER COMPLETING IT WE JUST FEEL THE WAVES OF SACRIFICE AND IMMENSE LOVE THROUGHOUT OUR BODY AND SOUL. MANDLIK, WHO IS SAYARA`S TEACHER, DOES HE REALLY EXIST? OR IS HE JUST AN IMAGINATION OF HER MIND? BUT SOMETIMES, THE PRESENCE PLAYS THE GAME WELL THAN THE ANALYSIS. SAYARA IS SOMEONE DIFFERENT; WE FEEL HER PRESENCE EVEN AFTER COMPLETING THE NOVEL. SHE LINGERS INTO OUR MINDS AND WE ENJOY IT. SHE CAPTIVATES OUR MIND. IT IS THE UNIVERSAL TRUTH THAT VA PU`S WRITING HAS THE POTENTIAL TO CAPTURE THE READERS, BUT THIS PRESENT WORK WORKS BEYOND HIS POTENTIALS. HIS WORDS REVEAL, `WHAT DO I SEE IN ONE FLOWER? I CANNOT FIND THE BEGINNING OR THE END OF THE FRAGRANCE THAT ORIGINATES FROM A FLOWER. THE GENTLE BREEZE CARRIES IT TO FAR AWAY DISTANCES; WIND IS THE MESSENGER ANNOUNCING THE UNIFICATION OF THE LAND AND THE SKY. I SEE THIS ALL IN ONE FLOWER.`
सुगंधाचा प्रारंभ आणि शेवट शोधता येत नाही म्हणून वाऱ्याचा एक हलकासा झोका त्याला जिथपर्यंत नेईल तिथपर्यंत त्याचं आकाश. वारा म्हणजे जमीन आणि आकाश ह्यांचं मिलन अंकुरित झालं हा संदेश माणसांपर्यंत नेणारा दूत. एका फुलात मला इतकं दिसतं.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
25TH MARCH #SANVADINI #VAPU 85 #NAVRA MHANAVA AAPALA #MODEN PAN VAKNAR NAHI #ONE FOR THE ROAD #ZOPALA #MAYABAJAR #CHATURBHUJ #INTIMATE #GULMOHAR #VAPURVAI #HUNKAR #MI MANUS SHODHATOY #BAI BAYKO CALENDER #SWAR #BHULBHULAIYA #KA RE BHULALASI #VALAY #KARMACHARI #AIK SAKHE #GOSHTA HATATLI HOTI #TAPTAPADI #GHAR HARAVLELI MANASA #DOST #MAHOTSAV #KAHI KHAR KAHI KHOTA #SAKHI #RANG MANACHE #AAPAN SARE ARJUN #THIKARI #TU BHRAMAT AAHASI VAYA #HI VAT EKTICHI #PARTNER #DUNIYA TULA VISAREL #PREMAMAYEE #FANTASY EK PREYASI #PANPOI#NIMITTA #MAZA MAZYAPASHI? #PLEASURE BOX BHAG 1 #PLEASURE BOX BHAG 2 #KATHA KATHANACHI KATHA #VAPURZA #RANGPANCHAMI #SANGE VADILANCHI KIRTI #CHEERS #MANASA #JAPUN TAK PAUL #LALITKALECHYA SAHAWASAT #DAHAVYA RANGETUN #२५ मार्च #संवादिनी #वपु# ८५ # नवरा म्हणावा आपला #मोडेन पण वाकणार नाही #वन फॉर द रोड#झोपाळा #मायाबाजार #चतुर्भुज #इन्टिमेट #गुलमोहर #वपुर्वाई #हुंकार #मी माणूस शोधतोय #बाई, बायको, कॅलेंडर #स्वर #भुलभुलैय्या #का रे भुललासी #वलय #कर्मचारी #ऐक सखे #गोष्ट हातातली होती! #तप्तपदी #घर हरवलेली माणसं #दोस्त #काही खरं काही खोटं #सखी #महोत्सव #रंग मनाचे #आपण सारे अर्जुन #ठिकरी #तू भ्रमत आहासी वाया #"ही वाट एकटीची #(राज्य पुरस्कार १९७०-७१)" #पार्टनर #दुनिया तुला विसरेल #प्रेममयी #फॅण्टसी एक प्रेयसी #पाणपोई #निमित्त #माझं माझ्यापाशी? #प्लेझर बॉक्स भाग-१ #प्लेझर बॉक्स भाग-२ #कथाकथनाची कथा #वपुर्झा #रंगपंचमी #सांगे वडिलांची कीर्ती #चिअर्स #माणसं #जपून टाक पाऊल! # ललितकलेच्या सहवासातून #दहाव्या रांगेतून
Customer Reviews
  • Rating Starप्रतीक सुनील येतावडेकर

    आज बरेच दिवसानी सलग वाचून काढलेलं पुस्तक... प्रा.मंडलिक,सायरा आणि ओंकारनाथ यांच्या भोवती फिरणारं कथानक. व.पुंच्या खास शैलीतील लिखाण आणि मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून केलेलं भाष्य आणि मनात चाललेल्या अनेक विचारांच्या अवर्तनाचा घेतलेला वेध !!! तू भ्रमात आासी वाया. ...Read more

  • Rating StarNamrata Pimpale Dangare

    थोडसं, "तू भ्रमत आहासी वाया" विषयी...😊 `वसंत पुरूषोत्तम काळे` यांचं हे पुस्तक. आता `या` लेखकाबद्दल काय लिहायचं?🤔 म्हणजे खूप काही आहे लिहण्यासाठी आणि मागे #ठिकरी बद्दल लिहलं तेव्हा भली मोठी यादी ही केली होती यांच्या पुस्तकांची... पण आता परत ेच तेच काय लिहायचं?... तर, साधारणतः 1955 _ 60 चा काळ... गाडगीळ_ गोखले_ भावे_माडगुळकर या लेखकांनी मराठी कथेचे विश्व पूर्णपणे भारून टाकले होते. याच काळात वपु हे नाव लोकप्रिय होऊ लागलं ते त्यांच्या सहजगर्भ शैलीमुळे. नेमकेपणा, शब्दातला मोजकेपणा, साधेपणा, ओघवती शैली, आणि जीवनातले अस्सल अनुभव आणि त्यातले मानसीक पातळीवर रंगणारे नाट्य ही त्यांच्या लेखनाची खासीयत. एकच म्हणेन, `वपु` ... सिर्फ नाम ही काफी है...😇 तू भ्रमत आहसी वाया... 🔸️सायरा, ओंकारनाथ आणि प्रा.मंडलीक या पात्रांभोवती फिरणारी ही कथा पण नेहमीच्या त्रिकोणात अडकलेली ही प्रेमकथा नाही. 🔸️प्रा.मांडलीक, सायराच्या गुरुस्थानी तर ओंकारनाथ ऑफिसमधले बाॅस. 🔸पण मग सायरा कोण? तर... "जैसा दीपे दीपु लाविजे। तेथ आदील कोण हें नोळखिजे। तैसा सर्वस्वे जो मज भजें। तो मी होऊनी ठाकी।" 🔸️सायरा, धर्माने मुसलमान पण खऱ्या अर्थाने निधर्मी. "नातरीं येथेच दिवा। नेलिया सेजिया गांवा। तो तेंथे तरी पाडवा। दीपचि कीं।।" याप्रमाणे सगळीकडे स्वतःमधली प्रसन्नता वाटणारी सायरा. 🔸स्वतःच्या बळावर नौकरी करत शिकलेली आणि दिसायला अगदीच साधारण अशी ही मुलगी. 🔸स्वतःचे प्रश्न सोडवत असतांनाच इतरांनमधेही प्रभावितपणे बदल घडवत असते. 🔸ओंकारनाथ काय होते आणि काय झालेत? त्याच्यातील होत जाणाऱ्या बदलाला कारणीभूत असलेली सायरा हे बदल कसे घडवून आणते आणि का? 🔸ज्ञानेश्वरी, गीता, कबीर यांचे दाखले देणारी सायरा, तिचे आयुष्य, ओंकारनाथ_ विनिताची कथा हे सगळं कसं आस्वादापलिकडचा आनंद देऊन जातात. 🔸️प्लॅस्टिकच्या फूलावर फिदा असलेला ओंकारनाथ ते खऱ्या चैतन्यमय फुलाच्या प्रेमात पडलेला ओंकारनाथ, हे सांगणारा हा प्रवास म्हणजेच तू भ्रमत आहासी वाया... 🔺पूर्णपणे involve होऊन पुस्तक वाचलं तरंच ते कळणार. 🔺नाहीतर सायरा उगीचच नेहमीच इतरांना सल्ले देत असते अशीही प्रतिक्रियाही माझ्या वाचनात आली😔 आता अश्या प्रतिक्रियेवर काय बोलावे...?😶 आताच्या या corona च्या काळात आपल्या सगळ्यांनाच कळून चूकलंय की जगण्यासाठी काय अत्यावश्यक आहे आणि काय नाही. निरर्थक जगण्याला काहीच अर्थ उरत नाही. आताच्या situation साठी सुध्दा, Bang on आहे हे पुस्तक 🎯 #तूभ्रमतआहासीवाया #वाचनवेड #mustread #bethechange #वपु 😊 २८.०५.२१ ...Read more

  • Rating Starयोगेश उगले

    सायरा. विलक्षण. केवळ विलक्षण. फुलासारखी दरवळणारी. धुक्यासारखी ओघळणारी. वीजेसारखी तळपणारीही. वपुंच्या सिध्दहस्त लेखणीतून जन्माला आलेली या कादंबरीची नायिका सायरा म्हणजे एक वेगळं रसायन आहे. तिचे अवलोकन करणारा वाचक तिच्यात विरघळून जातो. आकलनाच्या मर्यादाओलांडून अनुभूतीच्या नव्या प्रदेशात सायरा आपल्याला घेऊन जाते. ही सायरा नक्की कोण आहे? तुमच्या-माझ्यासारखीच वाटत असणारी ही मुलगी क्षणात कबीराची प्रीती, ज्ञानेशाची भक्ती आणि ओशोची वृत्ती होऊन जाते, तेव्हा ती कुणासारखीच असत नाही. ती असते तिच्यासारखी. फक्त तिच्यासारखी. `पुढे स्नेह पाझरे.. मागे चालती अक्षरे..!` या ओवीला संजीवन देणारी आणि `ढाई अक्षर प्रेम का पढे सो पंडित होय` या दोह्याचा भावार्थ होणारी सायरा वाचकाला तिच्या प्रेमात पडायला भाग पाडते.. तिच्या आयुष्यात जो कुणी येईल, ती त्याच्यासारखी होऊन जाते. नंतर तो माणूस कधी सायरामय होऊन जातो, ते त्याचं त्यालाही कळत नाही. परिस्थिती कोणतीही असो, प्रत्येक वेळी सायरा आपला अंदाज खोटा ठरवते. तिचं दुःख पेलण्याचं सामर्थ्य जसं विलक्षण, तसंच तिचं रडणंही विलक्षण. तिचं फुलणंही विलक्षण. सदैव दरवळत राहणंही विलक्षण. म्हणून तिला आनंदाबरोबर अश्रूंचाही महोत्सव करता येतो. तिला प्रत्येक क्षण काठोकाठ जगता येतो. भावनांना कुरवाळता येतं. जिथे जाईल तिथे ती सुगंध घेऊन जाते. तिच्या सान्निध्यात येणारा माणूस भारावून जातो. तिच्या विचारांची उंची वेगळी आहे. तिचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोण जगावेगळा आहे. सायरा म्हणजे वस्तूंच्या सौख्यात रममाण होऊन `जगणं` विसरणाऱ्यांच्या जीवनात प्राण फुंकणारं संजीवन आहे.. वपुंच्या कादंबरीतील ही नायिका आदर्शवत वाटते म्हणून तिच्याकडे दुर्लक्ष करायला गेलं तर तेही शक्य होत नाही. कारण सायरा प्रत्येक वेळी मर्मावरच बोट ठेवते. आपल्याला आपल्या वर्तुळाबाहेर जाऊन विचार करायला भाग पाडते. बोलता बोलता ज्ञानेश्वर, कबीर, बुध्द, ओशो यांचे विचार पेरत जाते. सायरा कधी अंतर्मुख करते तर कधी अवाक् करते. `प्रतिक्षणी आनंदी राहण्याचा वसा घेतला तर कोजागिरी मावळत नाही` हे सांगणारी सायरा अगदी जवळची वाटते. तर `मित्रांपासून सख्ख्या नातेवाईकांपर्यंत आपण ज्यांना ज्यांना जवळचे मानतो किंवा जे जे आपल्याला जवळ करतात, ती निव्वळ गरजांची स्पर्धा असते` असं बोलणारी सायरा ज्ञानेश्वरांच्या `तू भ्रमत आहासी वाया` या ओवीच्या उंचीवर उभी असते. प्रत्येक ओळीतून सायरा मनापर्यंत पाझरत जाते. कादंबरी संपते. सायरा संपत नाही. सायरा काही मागत नाही. जागत राहून प्रत्येक क्षणातील सौरभ गोळा करण्याचा विचार पेरत जाते. पुस्तकाच्या पानांपासून प्राणांपर्यंत अंतर्बाह्य व्यापून उरते.. कादंबरी छोटी. त्यातील गोष्टही छोटीच. पण मोठी आहे ती या कादंबरीतील विचारगंगा. तो प्रवाह निर्मळ आहे. त्यात आपण आपलं प्रतिबिंब पाहू शकतो, तसेच नितळ पाण्याखालचा तळही पाहू शकतो. त्यातील जीवनरसाच्या आपल्याला हव्या तितक्या ओंजळी भरभरुन घेऊ शकतो. वपुंची प्रत्येक कादंबरी, प्रत्येक कथा आणि प्रत्येक प्रकारचं लेखन अतिशय उत्तुंग आहे. परंतु `तू भ्रमत आहासी वाया` ही कादंबरी म्हणजे निदान माझ्यासाठी गौरीशंकर आहे. प्रत्येकाने ही कादंबरी वाचावी, असं मी सांगणार नाही. पण प्रत्येक वाचणाऱ्याने ती अनुभवायला हवी.. © योगेश उगले 13.01.20 ...Read more

  • Rating StarMOHINI KARANDE

    जीवनाचं तत्त्वज्ञान सांगणारी आवडलेली कादंबरी.

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more