AVHAD EKNATH

About Author

Birth Date : 23/10/1972


EKNATH AVHAD, A WELKNOWN AUTHOR FOR CHILDREN HAS BEEN WORKING AS A TEACHER IN A SCHOOL RUN BY THE MUNICIPAL CORPORATION OF GREATER MUMBAI FOR THE LAST 28 YEARS. HE HAS WRITTEN POEMS, BIOGRAPHY, RIDDLES, STORIES, NATYACCHATAS (MONOLOGUE) LIKE BHODHAI, GAMMAT GAANI, SHABDANCHI NAVALAI, CCHAND DEI ANAND, ANANDACHI BAUG, AALA KAA DHYANAT? AND SO MANY OTHER BOOKS FOR CHILDREN. SOME OF THEM ARE TRANSLATED IN ENGLISH, HINDI LANGUAGES AND IN BRAIL AS WELL. SOME OF HIS WRITINGS LIKE CHANDOBACHYA DESHAT AND BABANCHA PATRA ARE A PART OF SCHOOL CURRICULUM. HE HAS BEEN CONFERRED ON SO MANY STATE LEVEL AWARDS

एकनाथ आव्हाड, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बालसाहित्यकार. मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत गेली २८ वर्षे ते शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. गेली २८ वर्षे मुलांसाठी कथा, कविता, नाट्यछटा, चरित्र, काव्यकोडी असं विविध प्रकारचं लेखन ते करीत आहेत. मुलांसाठी कथाकथन, काव्यवाचनाचे कार्यक्रम सादर करून मुलांचे मनोरंजनही ते करीत असतात. बोधाई, गंमत गाणी, अक्षरांची पुÂले, शब्दांची नवलाई, छंद देई आनंद हे बालकवितासंग्रह; आनंदाची बाग, एकदा काय झालं! हे बालकथासंग्रह; मजेदार कोडी; आलं का ध्यानात? हे काव्यकोडी संग्रह; मला उंच उडू दे हा नाट्यछटासंग्रह; मिसाईल मॅन हे चरित्र... ही त्यांच्या काही पुस्तकांची ठळक नावे. त्यांच्या काही पुस्तकांचे हिंदी, इंग्रजी भाषांमध्ये आणि ब्रेल लिपीत अनुवाद झालेले आहेत. आव्हाड सरांची इयत्ता दुसरी बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात चांदोबाच्या देशात ही कविता आणि इयत्ता सहावी सुलभभारतीच्या पाठ्यपुस्तकात बाबांचं पत्र हा धडा मुलांना अभ्यासासाठी समाविष्ट केला आहे. त्यांची आजपर्यंत जवळपास ३० पुस्तके प्रसिद्ध असून महाराष्ट्र शासनाचे वा. गो. मायदेव पुरस्कार आणि बालकवी पुरस्कार त्यांच्या बालकवितासंग्रहास मिळालेले आहेत. तसेच महाराष्ट्र शासन पर्यावरण विभागाचा सृष्टी मित्र पुरस्कार आणि महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कारही त्यांना मिळाला आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
KHALALTA AWAKHAL ZARA ANI ITAR KATHA Rating Star
Add To Cart INR 260

Latest Reviews

रुपाली सोनवणे

#रुक #जाना #नही लेखक: Dr. भावेश भाटिया शब्दांकन: Dr: सचिन पाचोरकर अनुवाद: सुप्रिया वकील ​अंथरून पाहून पाय पसरावे... अह्ह.. त्या निर्जीव अंथरुणासाठी आपल्या सजीव पावलांना का त्रास द्यावा? असेच एक जबरदस्त आत्मचरित्र वाचून संपवलं आणि एक ऊर्जा निर्माणकरून गेलं, पुस्तकाचं नाव आहे `रुक जाना नहीँ ​डॉ. भावेश भाटिया यांची ही प्रेरणादायी कहाणी. शाळेत असताना आलेलं अकाली अंधत्व आणि त्यानंतर खडखडीत खडतर जीवनाचा सुरू झालेला प्रवास, पण या प्रवासात खचलेल्या बालमनाला त्यांच्या आईने दिलेलं बळ, प्रेरणा व आत्मसन्मानाची शिकवण आणि स्वाभिमानाचे धडे लेखकास पुरे होते. हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. चांगल्या धडधाकट व्यक्तीवर संकट आल्यावर दूर दूर पळणारे नातलग, मित्र परिवार, जातभाई... दृष्टी गेलेल्या व्यक्तीस कितपत आधार देतील? पण एक ऑपरेटर ते एक उद्योजक, `सनराईज कॅण्डल`चा विस्तार आणि स्वतःबरोबर अनेक दृष्टिहीन व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभं करून रोजगार देणारा हा अवलिया किती अडथळे पार करून आलाय हे जाणून घेण्यासाठी पुस्तक वाचायला हवंच. ​कुठलाही वशीला नाही की कोणाची सहानुभूती नाही, स्वबळावर विविध प्रयोग करत उद्योग यशस्वी करणं सोपं नाही. यात ज्या ज्या देवमाणसांनी हातभार लावला त्यांचा पण उल्लेख आहे, पण त्या देवमाणसांनी देखील कधीच उपकारिक भाषा न करता व स्वाभिमान न दुखावता कशी मदत करता येऊ शकते हे त्यांच्या कृतीतून दाखवून दिलंय. लेखक फक्त उद्योग उभारून थांबले नाहीत तर त्यांनी सामाजिक जाणीवेचं भान देखील ठेवलंय. महाबळेश्वरमध्ये सनराईज कॅण्डल नावाने त्यांनी भव्य असा उद्योग परिसर आणि म्युझियम सुरू केलंय, तेथे अनेक दृष्टिहीन व्यक्तींना रोजगार मिळाला आहे त्याचबरोबर सर्वजण स्वाभिमानाने कष्ट करून जगत आहेत. हजारो आयुष्य त्यांनी उजळून टाकली आहेत. दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार सह एकून 46 पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.विशेष म्हणजे सर्व पुरस्कार त्यांच्या योग्यतेनुसार दिले आहेत.. आणी अशा हजारो पुरस्कारांचे ते मानकरी आहेत असंच वाटत..त्यांच्या कामाची दखल रिलायन्स ग्रुप ने देखील घेतली आहे.व त्यांच्या पुस्तकास प्रस्तावना देखील नीता अंबानी यांनी दिली आहे.उद्योग करताना छोट्या छोट्या गोष्टी कसा प्रभाव करतात याच वर्णन देखील त्यांनी लिहिल आहे.. ​या कार्यात महत्त्वाचं योगदान त्यांच्या धर्मपत्नी नीता भाटिया यांनी दिलं आहे. दूरदृष्टी ठेवून आपल्या पतीस प्रोत्साहन देऊन, नवीन कल्पनेसह पाठिंबा देऊन त्यांना हुरूप देण्याचं काम त्यांनी केलंय. नीता भाटिया यांचं कर्तृत्व, त्यांचं पवित्र निस्वार्थी प्रेम या पुस्तकातून वाचताना आंतरिक वेगळी ऊर्जा मिळते. कलियुगातील देवी हा शब्द व मान त्यांना समर्पक वाटतो. पुस्तक सर्व वयोगटातील वाचक वाचू शकतात. मनाने खचलेल्या पण शरीराने धडधाकट असलेल्या प्रत्येक व्यक्तीने वरील पुस्तक नक्की वाचावं आणि आत्मसात करावं. एवढ्या उंचीवर असूनही जमिनीवर पाय असलेल व्यक्तिमत्व आहे. अगदी प्रेमळ पणे वागण बोलण सन्मान देण..ही दैवी देणगी त्यांच्या जवळ आहे. ...Read more