AVHAD EKNATH

About Author

Birth Date : 23/10/1972


EKNATH AVHAD, A WELKNOWN AUTHOR FOR CHILDREN HAS BEEN WORKING AS A TEACHER IN A SCHOOL RUN BY THE MUNICIPAL CORPORATION OF GREATER MUMBAI FOR THE LAST 28 YEARS. HE HAS WRITTEN POEMS, BIOGRAPHY, RIDDLES, STORIES, NATYACCHATAS (MONOLOGUE) LIKE BHODHAI, GAMMAT GAANI, SHABDANCHI NAVALAI, CCHAND DEI ANAND, ANANDACHI BAUG, AALA KAA DHYANAT? AND SO MANY OTHER BOOKS FOR CHILDREN. SOME OF THEM ARE TRANSLATED IN ENGLISH, HINDI LANGUAGES AND IN BRAIL AS WELL. SOME OF HIS WRITINGS LIKE CHANDOBACHYA DESHAT AND BABANCHA PATRA ARE A PART OF SCHOOL CURRICULUM. HE HAS BEEN CONFERRED ON SO MANY STATE LEVEL AWARDS

एकनाथ आव्हाड, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बालसाहित्यकार. मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत गेली २८ वर्षे ते शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. गेली २८ वर्षे मुलांसाठी कथा, कविता, नाट्यछटा, चरित्र, काव्यकोडी असं विविध प्रकारचं लेखन ते करीत आहेत. मुलांसाठी कथाकथन, काव्यवाचनाचे कार्यक्रम सादर करून मुलांचे मनोरंजनही ते करीत असतात. बोधाई, गंमत गाणी, अक्षरांची पुÂले, शब्दांची नवलाई, छंद देई आनंद हे बालकवितासंग्रह; आनंदाची बाग, एकदा काय झालं! हे बालकथासंग्रह; मजेदार कोडी; आलं का ध्यानात? हे काव्यकोडी संग्रह; मला उंच उडू दे हा नाट्यछटासंग्रह; मिसाईल मॅन हे चरित्र... ही त्यांच्या काही पुस्तकांची ठळक नावे. त्यांच्या काही पुस्तकांचे हिंदी, इंग्रजी भाषांमध्ये आणि ब्रेल लिपीत अनुवाद झालेले आहेत. आव्हाड सरांची इयत्ता दुसरी बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात चांदोबाच्या देशात ही कविता आणि इयत्ता सहावी सुलभभारतीच्या पाठ्यपुस्तकात बाबांचं पत्र हा धडा मुलांना अभ्यासासाठी समाविष्ट केला आहे. त्यांची आजपर्यंत जवळपास ३० पुस्तके प्रसिद्ध असून महाराष्ट्र शासनाचे वा. गो. मायदेव पुरस्कार आणि बालकवी पुरस्कार त्यांच्या बालकवितासंग्रहास मिळालेले आहेत. तसेच महाराष्ट्र शासन पर्यावरण विभागाचा सृष्टी मित्र पुरस्कार आणि महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कारही त्यांना मिळाला आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
KHALALTA AWAKHAL ZARA ANI ITAR KATHA Rating Star
Add To Cart INR 260

Latest Reviews

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more

वा. पां. जाधव अमरावती

`अमरावतीचे छप्पन स्वभाव एक मनोरंजक काव्यसंग्रह` `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे अमरावतीचे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री जी. बी. देशमुख यांचे अमरावती नगरीचा सहज स्वभाव व ह्या नगरीच्या वेगळ्या ओळखीवर आधारित मनोरंजक पुस्तक वाचले. वाचून भरपूर मनोरंजन झाले. खर काय लिहावे या लेखकाबद्दल, मन गोंधळले. ऐतिहासिक असो, प्रवास वर्णन असो, व्यक्ती विशेष असो, अनुभवात्मक घटना घडामोडी असो कशावरही सहज लिखाण करणारा हा लेखक आहे. आता तर त्यांनी लेखनाला विनोद प्रचुर फोडणी देऊन `अमरावतीचे छप्पन स्वभाव` या काव्यसंग्रहातून अमरावतीकरांना मनोरंजनाची मेजवानीच दिली आहे. प्रत्येक शहराची व त्या शहरातील वैशिष्ट्यांची एक वेगळीच ओळख असते. दिवस जातात, काळ लोटतो, पिढ्या बदलतात मात्र जुन्या स्मृतीची चिन्हे नवीन येणाऱ्या पिढीच्या मनात गुढ निर्माण करत कायम हाक देत राहतात. अमरावतीही त्याला अपवाद नाही. बापट चौकात चौक नाही, त्या जागेवर चौरस्ता नसून टी-पॉइंट आहे, खापर्डे बगीचा म्हणून आजही ओळख आहे मात्र तेथे बगिचा नाही किंवा प्रसिद्ध गांधी चौकात गांधीचा पुतळा अथवा स्मृतीदर्शक चिन्ह अथवा उल्लेख नाही मात्र गांधी चौक अशीच ओळख जनमानसात आहे. अशा एक ना अनेक विसंगत नाम दर्शक ओळख असलेली उदाहरणे त्यात सप्रमाण आहेत. पण खरी गंमत म्हणजे कधी काळी घडलेला इतिहास त्यामध्ये दडलेला आहे हे निश्चित. या सोबतच अमरावतीकरांच्या स्वभावातला स्थायी मजेदारपणाच्या एक एका हटके गुण वैशिष्ट्याच्या गमती लेखकाने हुबेहूब अधोरेखित केलेल्या आहेत. आणि त्यावरुन तत्सम रचनांचा उहापोह लेखकाने पुस्तकात केला असावा. विदेशात स्थाईक झालेल्या मूळ अमरावतीकरांना लेखकाने लिहिलेल्या गमती मनोरंजनात्मक वाटाव्या एवढी किमया जी.बी. च्या सहज लेखनाने दाखवली आहे. अमरावतीचे अग्रगण्य वृत्तपत्र दै. हिंदुस्थान मध्ये लेखकाने सतत ६ महीणे लिहीलेल्या काव्य सदरात अमरावतीच्या जनमानसाच्या हृदयाच्या ठाव घेणाऱ्या काव्य रचनांचा आठवणींनी महापूर ओसंडून गेला होता. विशेष म्हणजे ह्यात कुठेही अनावश्यक अभिनीवेष नव्हता. उलट गमतीत केलेले आत्मपरिक्षण मात्र काही प्रमाणात होते. वयस्क अमरावतीकर रसिकांना या रचना ताज्या करून त्यांच्या तारुण्यात घेऊन गेल्या हेच खरे. जी बी देशमुख या लेखकास मिळालेल्या सकारात्मक प्रतिक्रियां वरून दिसून येते. . सदर पुस्तकातील काव्यमय रचना वाचतांना अमरावतीच्या माणसाच्या वऱ्हाडभोळ्या स्वभावाची प्रचीती येते आणि वेगळाच आनंद देऊन जाते. निखळ मनोरंजन करत गुदगुल्या करणारा असा हा काव्यसंग्रह आहे. अमरावती शहराची ऐतिहासिक वैशिष्टे काव्यरूपात वाचण्याचा आनंद अमरावतीकरांना ते जिथं असतील त्या गावात, परगावात, परदेशात पुस्तक मागवून घेता येईल. ...Read more