D. S Patil, Dharangaon पितृतुल्य आदरणीय डॉ गांधीजी,
सस्नेह चरणस्पर्श....
माझ्या सर्जरी च्या निमित्ताने आपली ओळख झाली आणि एक पुरोगामी विचारसरणी,संस्कारक्षम व्यक्तीमत्वाचा झरा ,आदर्श पिता,डॉक्टर ,
समाज भिमुख व्यक्तिमत्व ची ओळख झाल्याचा आनंद झाला आहे.
कृपया, मी आपणावर स्तुती सुमने उधळत आहे असे समजू नये .
सर्जरी चे निमित्ताने आपल्याशी वेळोवेळी झालेला संवाद आणि मना सर्जना या पुस्तकातून झालेली आपल्या व्यक्तिमत्त्वाची ओळख ... यातून माझ्या भावना प्रकट होत आहेत .
सर,जिद्द चिकाटी आणि ध्येय निश्चित असेल तर कोणत्याही परिस्थितीत यशाचे शिखर गाठता येते शिवाय मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने कसे करावे याचा आदर्श , मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपण आहात.आपल्या वरील संस्कार आणि स्वतहाला असलेल्या जाणिवेतून शिवाय जिज्ञासा ,स्पष्ट ,सत्य जोपासण्याची ऊर्मी असेल तर मदतीचे हात पुढे येतात.हे निश्चितच आहे .माणसाला जिद्द ,मेहनतीची तयारी असेल तर परिस्थिती आडवी येत नाही हा आजच्या तरुणांना आपण आदर्श दिलेला आहे .
यशाचे अतिउच्च शिखर गाठले असताना देखील , " ठेविले अनंत तैसेचि राहावे चित्ती असू द्यावे समाधान "
या उक्ती प्रमाणे आपण जगत आहात.
आपल्यातील सामाजिक कार्याची जाणीव तर अत्यंत प्रेरणादायी आहे फार कमी लोक अशा प्रकारचे समाजकार्य करतात भिल्ल आदिवासी,समाजाच्या नागरिकांची आरोग्य सेवा,शिक्षणासाठी आश्रमशाळा,पिण्याच्या पाण्याची व्यवस्था हे उपक्रम वाखाणण्याजोगी आहेतच आपल्यातील आत्मविश्वास आणि प्रामाणिक कार्यासाठी अनेक हातांनी आपणास सहकार्य केले नव्हे तर अनेकांना आपले कार्यकर्तृत्व बघून सहकार्य करावे असे वाटले ही अभिमानास्पद बाब आहे
आपल्या व्यवसायात आपण निष्णात तर आहातच पण त्या सोबत आपण जोपासलेली सामाजिक बांधिलकी वाचून मनभरून येते अनेकांवर आपण फ्री उपचार केले, शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष आहेत म्हणून शिक्षकांकडून फी न घेणे ,सर्व उपचार फी शिवाय करणे ,, पेशंट ला सर्व प्रकारे सहकार्य,प्रसंगी घरी जावून सर्जरी,एव्हढे धाडस करणारे सर मला वाटते आपणच एकमेव आहात.
आपल्या लहानशा मुलाला एका दिव्यांग मुलाला मदत करावीशी वाटणे, बापाने ती पूर्ण करणे नव्हे तर दिव्यांग मुलाचा संसार थाटणे,त्याला स्वतःच्या पायावर उभे करणे, त्याच्या विवाहाचा स्वागत समारंभ आपल्या घरी आयोजित करणे ही बाब सर्वसामान्य माणसाला शक्य नाही त्यासाठी एका विशेष मनाची,आणि प्रेमाची आवश्यकता असते ती आपल्याकडे आपल्या कुटुंबीयांकडे आहे
सामान्य नागरिक ते थेट अधिकारी,उद्योगपती ,यांच्याशी जुळलेली आपली नाड, प्रामाणिक आणि सेवाभावी वृत्तीचे द्योतक आहे
सर आपल्या या सेवाभावी वृत्तीने अनेक सेवाभावी संस्थांमध्ये आपल्याला काम करण्याची संधी चालून आली आणि आपण निरपेक्ष भावनेने या संधीचे सोने करीत त्या संस्था नावारूपाला आणल्या याचा निश्चितच अभिमान वाटतो.
आपण कुटुंबवत्सल देखील आहात आपल्या दैनंदिन कामकाजातून , व्यवसायाच्या व्यापातून वेळ काढून कुटुंबाकडे ही तेव्हढेच लक्ष दिले यासाठी सौ मावशींचे योगदान देखील मानावे लागेल आपल्या मार्गदर्शन आणि संस्कारातून मुलांनी राष्ट्रीय ,आंतरराष्ट्रीय खेळात प्राविण्य मिळवले सोबतच उच्च शिक्षणापासून देखील मागे राहिले नाहीत आणि आज उच्च पदावर कामकाज करीत आहेत ही आपल्या जाणीवेची आणि संस्काराची देण आहे
सर आपल्या एकूणच यशात आणि उंचावलेल्या प्रगतीच्या आलेखात सौ मावशी चा उल्लेख केला नाही तर अपूर्णता जाणवेल." प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्री चा हात असतो" याची जाणीव देखील झालेली आहे ( मावशी म्हणजे लक्ष्मी ,सरस्वती आणि अन्नपूर्णा आहेत याची जाणीव आपल्या पुस्तकातील विचारातून झालेली आहेच)
आपले मना सर्जना हे पुस्तक आजच्या तरुणाईने वाचले तर निश्चितच प्रेरणा मिळेल आणि वाचकांमध्ये वैचारिक परिवर्तन होईल.
@ आर्थिक नियोजन आणि बचतीचा आपण दिलेला सल्ला मार्गदर्शन अत्यंत मोलाचे आहे.
@ डॉ बाबा मुळे झालेली आपली ओळख चिरकाल स्मरणात राहील सर्जरीच्या निमित्ताने का असेना पण एका प्रेरणादायी व्यक्तीमत्वाची भेट झाल्याचा मनस्वी आनंद आहे. आपण जळगावला आलात तर निश्चित माझ्याकडेही या...धन्यवाद...
...Read more
Uma Gade सुप्रसिद्ध कथालेखक, गीतकार , संवादलेखक ,दिग्दर्शक गुलजार यांचा अप्रतिम कथासंग्रह .अत्यंत वाचनीय आहे