* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
SATIRICAL AND NOSTALGIC, MARK TWAIN’S EPIC MASTERPIECE, THE ADVENTURES OF TOM SAWYER, BRINGS OUT THE INEQUITIES OF ADULT REALITY FROM BENEATH THE INNOCENCE OF CHILDHOOD. IN THE FICTIONAL TOWN OF ST. PETERSBURG, MISSOURI, ALONG THE MISSISSIPPI RIVER, TOM SAWYER LIVES WITH HIS AUNT POLLY AND HALF-BROTHER SID. AS THE NOVEL BEGINS, WE CATCH HIM STEALING FROM THE JAM JAR AND NARROWLY ESCAPING BEING HIT. BUT HIS LIFE IS FULL OF ADVENTUROUS EPISODES. WHAT HAPPENS AS HE MOVES FROM ONE ESCAPADE TO ANOTHER—ACCOMPANYING HUCKLEBERRY FINN TO THE GRAVEYARD AT NIGHT WHERE THEY WITNESS A TRIO OF GRAVE ROBBERS; FALLING IN LOVE WITH BECKY THATCHER AND BEING SHUNNED; ENJOYING THE NEW FOUND FREEDOM AND THEN BEING STRUCK BY THE IDEA OF APPEARING AT HIS OWN FUNERAL; HUNTING FOR BURIED TREASURE IN A HAUNTED HOUSE WITH HUCK AND SO ON..? THE ADVENTURES OF TOM SAWYER HAS BEEN WIDELY ADAPTED INTO FEATURE FILMS AND TELEVISION SERIES. IT IS FOLLOWED BY ADVENTURES OF HUCKLEBERRY FINN.
ही कादंबरी दीडेकशे वर्षांपूर्वी अमेरिकेत प्रसिद्ध झाली. मिसिसिपी नदीकाठच्या सेंट पीटर्सबर्ग या काल्पनिक गावात राहाणाऱ्या टॉम सॉयर या खोडकर मुलाचं भावविश्व या कादंबरीत उभं राहातं.. बालपणीचा निरागसपणा आणि प्रौढ वयातलं वास्तव यांच्यातील तफावत टॉम सॉयरच्या या गोष्टीतून जाणवते. ही तफावत आपणही अनुभवलेली असतेच ना, त्यामुळं भूगोलाचं नि भाषेचं अंतर पार करून ही कादंबरी आपल्याशी संवाद साधते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#THEADVENTURESOFTOMSAWYER #MARKTWAIN #AVADHOOTDONGARE #MARATHIBOOKS #ONLINEMARATHIBOOKS #TRANSLATEDMARATHIBOOKS #TBC #TRANSLATEDBOOKS@50%
Customer Reviews
  • Rating StarBhalchandra Sandbhor

    कादंबरी: टॉम सॉयरची साहसं. लेखक: मार्क ट्वेन. अनुवाद: अवधूत डोंगरे. मी शालेय विध्याथी असताना गंगाधर गाडगीळ यांच ‘ धाडसी चंदू ‘ हे पुस्तक वाचलं होतं त्यावेळी लहान गोष्टीची पुस्तकं वाचनाऱ्याला कादंबरी काय ते पहिल्यादाच समजलं, हे पुस्तक मला खु आवडलं होतं आणी त्या बद्दल मी मित्राशी खूप बोलायचो. पुस्तकाची स्तुती आणी सारांश ऐकून अनेक मित्रापैकी आता आठवत नाही पण कोणातरी मित्राकडून ते मला परत काही मिळाल नाही. आता लॉकडावूण मधे बरीच पुस्तके वाचली त्यात धाडसी चंदू परत वाचयची तीव्र ईछ्या झाली मग काय माझी इंटरनेटवर शोध मोहीम सुरू झाली सर्च केल्यावर समजलं की हे पुस्तक out of print आहे आणि काही ठरावीक ग्रंथलयातच उपलब्ध आहे. पुस्तक नाही मिळालं म्हणून मी जरा अस्वस्थ झालो त्यानंतर मी गंगाधर गाडगीळ यांची ग्रंथसूची वाचत असताना समजलं की ‘ धाडसी चंदू ‘ ही कादंबरी त्यांनी अमेरिकन लेखक मार्क ट्वेन यांच्या The Adventure of Tom Sawyer (टॉम सॉयरची सहासं) या पुस्तकावर प्रेरित होऊन लीहेलेली आहे. पुन्हा शोध घेतल्यावर अखेर लेखक अवधूत डोंगरे यांचा ‘टॉम सॉयरची सहासं’ हा अनुवाद ई पुस्तकालयात मिळाला. पुस्तक २ दिवसांत वाचून झाल. मन पुन्हा किशोरअवस्थेत जाऊन गावाकडील कैलारू व मातीच्या भिंती असलेल्या शाळेतील धमाल मस्ती अनुभवू लागलं. हाफचड्डीच्या खिशातील पेन्सिल चे तुकडे, काचेच्या सवंगड्या, शिंपले, खेळण्याच्या शिपायाचा तुटका पाय, दोरा, लाकडी शिट्टी हा खजिना हाताला पुन्हा जाणवला. मित्रांबरोबर खजिन्याच्या शोधात दूर दूर भटकणं, दुसऱ्याच्या शेतातील चोरलेल्या भुईमुगाच्या शेंगा, पेरूचा पोट भरेपर्यंतचा ढेकर अनुभवाला. मुळ पुस्तक वाचून एक वेगळंच मानसीक समाधान आलं. मार्क ट्वेन यांनी The Adventures of Tom Sawyer नंतर लेहिलेली टॉम सॉयरचा मित्र `हक फीन` च्या जीवनावर वर आधारीत The Adventures of Huckleberry Finn (हकलबेरी फिन ची सहासं) ही कादंबरी पण छान आहे. मिसीसीपी नदीतून तराफ्यावर हक फीन ने मित्र निगर जिम बरोबर केलेला प्रवास, नदीकाठी शेकोटी पेटवून मस्त गरमा गरम मासे, मक्याची भकारीचं जेवण आणि सोबतीला प्रवासात वेगवेगळ्या गावी अनुभवास येणारी सहासं वाचनीय आहेत. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more