ANAND KANHERE

About Author

Birth Date : 04/06/1941


SEVENTY-FIVE-YEAR-OLD ANAND KANHERE IS A BARODA M.S. BA (ELECTRONICS) FROM THE UNIVERSITY AND MMS IN MANAGEMENT FROM THE UNIVERSITY OF PUNE. HE ALSO PLAYED CRICKET AND BADMINTON WELL. ) LEADERS OF TOMORROW IS A CERTIFICATE COURSE.

वयाच्या पंचाहत्तरीत असलेले आनंद कान्हेरे यांनी बडोद्याच्या एम.एस. विद्यापीठातून बी.ई (इलेक्ट्रॉनिक व पुणे विद्यापीठातून व्यवस्थापन क्षेत्रातील एम.एम.एस. या पदव्या घेतल्या आहेत. ते क्रिकेट व बॅडमिंटनही उत्तम खेळायचे. त्यांनी सातत्याने आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांत भाग घेतला आणि विजेतेपद मिळवले होते. त्याशिवाय त्यांनी आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचा (आय एल ओ चा) लीडर्स ऑफ टुमॉरो हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम केलेला आहे. त्यांच्या वडिलांनी स्थापन केलेल्या मॅस्वी कंपनीत त्यांनी १९६५ ते १९७३ ही आठ वर्षे अत्यंत महत्त्वाची कामगिरी बजावली. दुर्दैवाने ती कंपनी बंद पडल्यानंतर सह्याद्री उद्योग, किर्लोस्कर किसान, महिन्द्रा ओवेन, आरसीए फोटोफोन, स्वस्तिक रबर इत्यादी औद्योगिक आस्थापनांतून जबाबदारीच्या तंत्र-व्यवस्थापकीय पदांवर कामे केली. १९८२ मध्ये त्यांनी स्वत:चा हर्षांजली उद्योग हा व्यवसाय सुरू केला आणि १९८९ मध्ये त्याचे हर्षांजली इन्स्ट्रुमेंन्टस या कंपनीत रूपांतर केले. अलीकडे त्यांनी आपले ज्येष्ठ चिरंजीव जय यांच्या बरोबर जी. आय. ऑटोमेशन अ‍ॅन्ड सिस्टीम्स प्रा. लि. ही रोबोटिक्सच्या क्षेत्रात कार्य करणारी कंपनी सुरू केली. या वयातही ते औद्योगिक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांची अजुनी रुसून आहे ही सामाजिक कादंबरी १९७३ मध्ये कुलकर्णी ग्रंथागार मार्फत प्रकाशित झाली आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
MASVI KANHERE Rating Star
Add To Cart INR 180

Latest Reviews

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
डॉ शिंदे निलेश, अमरावती

`कुलमामाच्या देशात` वाचून काढले. प्रत्येक कथा खुप वाचनीय आहे. `कपारीत वाघोबा` मध्ये रवींद्र वानखडे ह्यांनी पहाटे चार ते 10 नुसती भ्रमंती केली आहे.. सकाळची सूर्यकिरण अंगावर पडली असताना वाघ बघायला भेटणं ही एक अप्रूप वाटणारी गोष्ट आहे. `डरकाळीचा रार` वानखडे साहेबांनी बेलसरें सोबत अनुभवला आहे. `जिवाची पर्वा` न करता वानखडे साहेब पाळण्यात विसावले होते. गव्याच्या पिलावर वाघीणीने हल्ला केला नाही.. हे वानखडे साहेबांनी स्वतः बघितले व आम्हाला देखील समजले.. वाघाच्या पंजाची कशी प्रतिकृती तयार करतात हे सांगितले परंतू मला लक्षात आले नाही (मी प्रत्यक्ष बोलून जाणून घेईन). `मेहमान रह गया` या कथेत वाघाने माणसाची शिकार कशी केली त्यानंतर वनविभागाने बसची सोय करून मुलांना मदत कशी झाली हे देखील सांगितले व आपल्या सारखे वन अधिकारी काय करू शकतो हे प्रांजळ पणे नमूद केले आहे.. सेमडोह येथील गजराजाची कथा अजून देखील लोक सांगतात त्यातील तुम्ही त्याला वाचवयाचा प्रयत्न केला परंतू तो नियतीला मान्य नसेल. बाणा का घुंगरू- मधील हल्ला व घटना मन विचलित करणारी वाटली व मेळघाट मधील वन कर्मचारी किती कामसू आहेत हे त्या वरून दिसले.. मला बाणा ढाप प्रत्यक्ष बघायला आवडेल.. `रानगव्यांची कवायत` मध्ये रानगवे स्वतःच रक्षण कश्या पद्धतीनं करतात हे मला पहिल्यांदा समजले.. कोकटु इथं तीन दिवस आपण वाघ बघण्याची केलेली हॅट्रिक ही जंगलाने तुम्हा वनाधिकार्‍यास दिलेली सलामी आहे. `शिकार हो गया` - माहुल वेलीचा कसा उपयोग केला जातो व पोळी तयार करतात हे देखील वेगळी गोष्ट वाटली.. आपण सांबर शिकार कशी थांबवली व वन्यजीवनाची साखळी अबाधित राखली.. वाघ खेकडे मारून खातो हे ऐकून नवल वाटले.. असा सॉलिड वन अधिकारी मेळघाटला लाभला हे या कथां मधून मला समजलं व प्रत्येक वाचकाला हे जंगल, इथले लोक या विषयी कायम आकर्षण निर्माण करत राहील.. ...Read more

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
श्री. बाबाराव घोरमाडे, अमरावती

अमरावती जिल्हा मधील एका सामान्य खेड्यातील, एक अलौकिक असामान्य अशा फुटबॉल खेळाडूचे हे व्यक्तिचरित्र. १९४० ते १९५१ हा कालखंड म्हंजे तसाही भारतीया करीता त्यातल्या त्यात ग्रामीण भागाकरिता खडतर कालखंड. अशा विपरीत परिस्थितीत शैक्षणिक आर्थिक सामाजिक मारगदर्शन इत्यादी पाठबळ चा अभाव असताना सुद्धा आतंरराष्ट्रीय दर्जा चा खेळाडू निर्माण होणे हे ते चरित्र नायक चे असामान्य व्यक्तिमत्व अधोरेखित होते. समाधानाची आनंदाची बाब ही की हे पुस्तक रूपाने प्रसिध्द करण्याचे काम चरित्र नायक चे सुपुत्र श्री गजाननराव उर्फ जी बी देशमुख यांनी केले. हे सर्व काही अंशी कर्ज ओझे हलके करण्यासारखे आहे लेखकाला या करीता खूप मेहनत करून माहिती संकलित करावी लागली. एखादी थप्पड बनती थी........ बडे बेआबरू होकर घरी आलो........पण कहाणी मे ट्विस्ट अभि बाकी था..... प्रसंगी चे वाक्य रचना , कोसळणाऱ्या धबधबा सारखे निखळ आनंद देऊन गेले . मेहता पब्लिशिंग ने लॉन्च केले म्हणजे सर्वदूर मराठी माणसाचे पर्यंत पोहोचले आहे वाचनीय आहे प्रत्येकाने वाचावे.विसावा शतकातील पुर्वाध, विपरीत परिस्थितीतही किती कष्ट करावे लागले असतील? धन्य ते.. ...Read more