* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177664843
  • Edition : 16
  • Publishing Year : JANUARY 1971
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 164
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :RANJEET DESAI COMBO SET- 42 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS IS A COLLECTION OF STORIES BASED ON FAMOUS HISTORICAL FIGURES. THE NAME INDICATES THAT THIS IS A SET OF STORIES HAVING IT`S OWN FRAGRANCE. IN THE BEGINNING THE AUTHOR ADMITS THAT WORDS HAVE NO FRAGRANCE. THEY HAVE ONLY MEANINGS. BUT A COMBINATION OF MANY WORDS PRESENT A PERSON AND THE ATMOSPHERE MAY BE AFTER READING THESE STORIES READER WILL FEEL THE FRAGRANCE TOO THEN IT WILL GIVE ME IMMENSE SATISFACTION.` THE AUTHOR SHOWS HIS CONFIDENCE AND FAITH IN THE READERS. ALL THE STORIES IN ‘GANDHALI` ARE BASED ON THE LIVES OF FAMOUS PERSONALITIES AND THE INCIDENCES FROM THE PAST. HE HAS SLECTED EACH ONE CAREFULLY. EACH STORY IS A HOMOGENOUS MIXTURE OF VALOUR, COMPASSION AND ROMANCE. EACH ONE REFLECTS THE AUTHOR`S COMMAND OVER LANGUAGE AND TAKES THE READER TO THE HISTORY ITSELF. THE SUCCESS OF `GANDHALI` IS INTENSE ON THE BACKGROUND OF NOVELS FROM THE SAME AUTHOR, BASED ON HISTORICAL FIGURES.
ऐतिहासिक व्यक्तींची रसरशीत चित्रे उभ्या करणार्या ललितरम्य कथा. प्रेम आणि वेदना यांच्यातलं नातं जणू पाठीला पाठ लावून जन्माला आलेल्या जुळ्या भावंडांसारखं असतं. हे आशयसूत्र या संग्रहातल्या कथांच्या माध्यमातून उलगडतं. यात प्रेमासाठी सर्वस्व पणाला लावणारे मेहरुन्निसा आणि सलीम आहेत, बाजीरावांच्या मृत्यूने विष प्राशन करणारी मस्तानी आहे, तर बंदेअलीच्या जीवनाचा सूर असलेली प्राणप्रिय पत्नी चुन्ना निवर्तल्यावर वेदनेने पिळवटलेला अस्सल कलावंत आहे. सती झालेली; पण जाताजाता इतरांची आयुष्यं उजळणारी पुतळाबाई आहे, तर स्नेहाने मुत्सद्द्यांचीR हृदयं जिंकणारी, बुद्धिमान कलावंतीण माहेलका आहे. या कथांमधून प्रेमाचे वेगवेगळे पोत रणजित देसाई आपल्यापुढे ठेवतात. सगळ्या कथांचा बाज हा ऐतिहासिक असला, तरी त्यातल्या भावभावना मात्र कालातीत आहे. ‘रोमँटिक’ जातकुळीच्या या कथा व्याकूळ करतात. यातली तपशिलांची, थेट वर्णनात्मक शैली मनाचा ठाव घेते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#8 APRIL # SWAMI # SHRIMAN YOGI # RADHEYA # MAZA GAON # ABHOGI # BARI # PRATIKSHA # SAMIDHA # PAVANKHIND # LAKSHYAVEDH # SHEKARA # MORPANKHI SAVALYA # SANKET # ASHADH # MADHUMATEE # MEKH MOGARI # KATAL # ROOPMAHAL # MEGH # PRAPAT # VAISHAKH # KAMODINI # GANDHALI # BABULMORA # AALEKH # KANCHANMRUG # SHRIMANYOGI (NATAK)# SANGEET TANSEN (NATAK)# SAVALI UNHACHI (NATAK)# HE BANDH RESHMACHE (NATAK)# PANKH JAHALE VAIRI (NATAK)# DHAN APURE (NATAK)# RAMSHASTRI (NATAK)# LOKNAYAK (NATAK)# SWAMI (NATAK)# VAARSA (NATAK)# TUZI VAT VEGALI (NATAK)# PANGULGADA (NATAK)# GARUDZEP (NATAK)# SNEHADHARA (NATAK)# (NATAK)# SANCHIT (NATAK) #८ एप्रिल #स्वामी (राज्य पुरस्कार १९६२,ह.ना. आपटे पुरस्कार १९६३) #साहित्य अकादमी पुरस्कार १९६४) #श्रीमान योगी #राजा रविवर्मा #राधेय #माझा गाव #अभोगी #बारी #प्रतिक्षा #समिधा #पावनखिंड #लक्ष्यवेध #शेकरा #मोरपंखी सावल्या #संकेत #आषाढ #मधुमती #मेख मोगरी #कातळ #रुपमहाल #रुपमहाल #मेघ #प्रपात #वैशाख #कमोदिनी #गंधाली #बाबुलमोरा #आलेख #कांचनमृग #श्रीमानयोगी-नाटक #संगीत तानसेन-नाटक #सावली उन्हाची –नाटक #हे बंध रेशमाचे –नाटक #पंख जाहले वैरी –नाटक #रामशास्त्री –नाटक #धन अपुरे –नाटक #लोकनायक –नाटक #स्वामी –नाटक #वारसा –नाटक #तुझी वाट वेगळी –नाटक #पांगुळगाडा –नाटक #पांगुळगाडा –नाटक #गरुडझेप –नाटक #स्नेहधारा –नाटक #संचित -नाटक
Customer Reviews
  • Rating StarVaidya

    भर दुपारची वेळ! त्यात उन्हाळा... अंगाची लाहीलाही करणारी गर्मी...खिडकीतून बाहेर बघितल्यावर समोर दिसणारं ओसाड माळरान, त्यावर झगमगणाऱ्या उन्हाच्या झळा आणि तिथं असलेला एक पिंपळ ज्याची सगळी पानं झडून गेल्याने त्यातून पलीकडे दिसणारा डोंगर, त्या पिंपळाच्या ोडाच्या सावलीत बसलेली गाईगुरे त्यांच्या शेजारीच कपाळाला हात लावून बसलेला शेतकरी अस काहीसं चित्रं मला माझ्या खिडकीतून दिसलं, त्या झाडावर एका सुध्दा चिटपाखरू दिसलं नाही अशा वेळी अचानक वारा सुटला... माळरानावरची माती उडू लागली, एकाएकी काळे ढग दाटू लागले आणि पाण्यासाठी आसुसलेली धरणी त्या पहिल्या पावसाच्या थेंबांनी मोहरुन गेली... जणू काही कित्येक जन्मानी तिला तिच्या पहिल्या प्रेमाची भेट असावी... क्षणातच असा काही मातीचा सुगंध दरवळू लागला की त्यापुढे माणसाची मती गुंग व्हावी सारी अत्तरे फिकी पडावी असा तो दरवळ आणि माझ्या समोर असलेलं नुकतंच वाचून काढलेलं ``गंधाली" हे रणजित देसाई यांचं पुस्तकं... या दोन्ही गोष्टी मध्ये मला एकच साम्य जाणवलं... अस्सल भारतीय मातीत घडलेल्या काहीश्या विस्मरणात गेलेल्या अजरामर प्रेमकथा! यांचा दरवळ भारतीय जनमानसात शतकं उलटली तरी टिकून आहे. प्रेमासाठी आयुष्य पणाला लावणारे सलीम- मेहरूंन्निसा, बाजीरावांच्या मृत्यू नंतर विष प्राशन करणारी मस्तानी, आपल्या बुद्धिचातुर्याने ने पेशवे दरबार जिंकणारी माहेलका, एका अस्सल कलावंताच्या जीवनाचा सूर झालेली चुन्ना, आपल्या स्नेहाने इतरांचे आयुष्य उजळणाऱ्या पुतळाबाई अशा इतिहासाच्या पानांमध्ये लुप्त झालेल्या प्रेमकथा तुम्हाला प्रेमाची नव्याने ओळख करून देतील....मन गहिवरून जाईल... वेदनेची कळ येईल... खरोखरच लेखकाचे शब्द वाचकाच्या मनाचा ठाव घेतात ..आपण कितीही म्हणालो "प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं" तरी प्रेमाचा गंध आणि प्रेमाची गोष्ट वेगळीच!! ...Read more

  • Rating StarSwati Khedekar Borkar

    रणजित देसाई यांचं गंधाली हे पुस्तक वाचलं ... गंधाली...म्हणजे सुगंधी द्रव्य ठेवण्याची पेटी.. असं म्हणतात ..शब्दांना गंध गंध नसतो ..पण या गंधाने पुस्तकातील शब्दरूपी कथा वाचून नक्कीच वाचक रसिकांच्या मनात गंध दरवळला शिवाय राहत नाही. प्रेम आणि ेदना यांच्यातलं नातं जणू पाठीला पाठ लावून जन्माला आलेल्या जुळ्या भावंडांना सारखं असतं ...ही पुस्तकाची टॅगलाईन प्रत्येक कथा वाचताना जाणवते. पहिली कथा विराणी ... प्रेमासाठी सर्वस्व पणाला लावणारे मेहरुन्निसा आणि सलीम. म्हणजेच नुरजहा आणि जहांगीर ... असा रंगला विडा मध्ये.. राजनर्तकी माहेलका आणि रावरंभा निंबाळकर ..... रावरंभा निंबाळकर यांच्या प्रगतीसाठी जीव टाकणारी माहेलका .. अशी छेडली तार मध्ये बंदे अलीच्या जीवनाचा सुर असलेली प्राणप्रिय पत्नी चुन्ना निवर्तल्या नंतर वेदनेने पिळलेला अस्सल कलावंत... तिच्या आठवणीत कायम बीनचे बेसूर सुर जगणारा बंदे अली नक्कीच मनाला चटका लावून जातो . अशी रंगली प्रित मध्ये बाजीराव आणि मस्तानी यांच्यातील प्रेमाचे वर्णन ..शेवटही अगदी मनाला चटका लावून जाणारा .. आणि शेवटी नक्षत्र कथा ...शिवाजी महाराज .. महाराष्ट्राच्या जनतेचा देव महाराज गेल्यानंतर.... त्यांच्या चितेवर आपल्याला स्वतःला झोकून देऊन स्वतःच्या आयुष्याच सोनं करून जाणाऱ्या.. पुतळाबाई नक्कीच आपल्याला त्यांच्या पुढे नतमस्तक व्हायला भाग पाडतात . सगळ्या कथा मनाचा ठाव घेतात . अप्रतिम पुस्तक. ...Read more

  • Rating StarSAROJ KOLE

    गंधाली हा रणजित देसाई यांच्या कथा संग्रह वाचला..त्यातली विराणी ही जहांगीर याच्यावर लिहिलेली प्रेमकथा मनाला खूप भावली ..आत्ता पर्यंत या राजावरील काहीच माहिती वाचली नव्हती म्हणून जर उत्सुकता होती.

  • Rating StarJaywant Bhujbal

    वाचनाच्या अगदी सुरुवातीस हे पुस्तक वाचायला मिळाले होते. त्यावेळेस तर खूपच आवडले होते.

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

KHULBHAR DUDHACHI KAHANI
KHULBHAR DUDHACHI KAHANI by SUNANDA AMRAPURKAR Rating Star
श्रीपाद ब्रह्मे

नुकतंच असंच वेगानं वाचून संपवलेलं दुसरं पुस्तक म्हणजे सुनंदा अमरापूरकर यांचं ‘खुलभर दुधाची कहाणी’. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या त्या पत्नी. अर्थात ही काही त्यांची एकमेव ओळख नव्हे. एक चांगल्या अभिनेत्री, उत्तम अनुवादक म्हणूनही त्या ्रसिद्ध आहेत. त्यांनी ‘खुलभर दुधाची कहाणी’ या आत्मचरित्रवजा लेखनातून त्यांच्या जगण्याचा व्यापक पट अतिशय प्रांजळपणे उलगडला आहे. मला हे पुस्तक विशेष भावण्याचं कारण म्हणजे त्यात आलेलं नगरचं वर्णन. मी स्वत: नगरला फार प्रदीर्घ काळ राहिलो नसलो, तरी ते शेवटी माझ्या जिल्ह्याचं गाव. आणि वयाच्या १३ ते २२ अशा महत्त्वाच्या कुमार व तरुण वयातला माझा तिथला रहिवास असल्यानं नगरच्या आठवणी विसरणं शक्य नाही. सुनंदाताई माझ्या आईच्या वयाच्या. त्यामुळं त्यांच्या लहानपणच्या आठवणी जवळपास माझ्या जन्माच्या २०-२५ वर्षं आधीच्या. असं असलं तरी मी त्या वर्णनाशी, त्या काळातल्या नगरशीही रिलेट होऊ शकलो, याचं कारण मुळात गेल्या शतकात बदलांचा वेग अतिशय संथ होता. नगरसारख्या निम्नशहरी भागात तर तो आणखी संथ होता. त्यामुळं एकूण समाजजीवनात १९६० ते १९९० या तीस वर्षांत तपशिलातले फरक सोडले, तर फार मोठा बदल झाला नव्हता. सुनंदाताई माहेरच्या करमरकर. त्यांचं आजोळ‌ सातारा असलं, तरी त्या जन्मापासून नगरमध्येच लहानाच्या मोठ्या झालेल्या. अगदी पक्क्या ‘नगरी’ म्हणाव्यात अशा. ( आजही त्या स्वत:ला अभिमानानं ‘नगरकर’च म्हणवून घेतात.) सुनंदाताईंचे वडील त्या दहा वर्षांच्या असतानाच गेले. त्यांना मामांचा आधार होता, पण आईनंच लहानाचं मोठं केलं. तेव्हाचं त्यांचं निम्न मध्यमवर्गीय जगणं, नगरमधले वाडे, तिथलं समाजजीवन, तिथल्या शाळा, शिक्षक, नगरमधील दुकानं, दवाखाने, तिथल्या गल्ल्या, बाजार हे सगळं सगळं सुनंदाताई अतिशय तपशीलवार उभं करतात. नगरसारख्या मध्यम शहरात वाढलेल्या महाराष्ट्रातील कुठल्याही शहरातील त्या काळातील व्यक्तीला अतिशय सहज रिलेट होईल, असं त्यांचं हे जगणं होतं. त्यात सुनंदाताईंचं लेखन अतिशय सहज, सोपं आणि प्रांजळ असल्यामुळं ते आपल्याला अगदी भिडतं. एका प्रख्यात अभिनेत्याची पत्नी असल्यानं त्यांचं जीवन इतर सर्वसामान्य स्त्रियांपेक्षा वेगळं झालं असेल, अशी आपली अपेक्षा असते. सुनंदाताईंच्या लेखनातून या ‘वेगळ्या जीवना’ची काही तरी झलक मिळेल, अशीही आपली एक भूमिका तयार झालेली असते. सदाशिव अमरापूरकरांसारख्या मनस्वी अभिनेत्याशी लग्न झाल्यानंतर सुनंदाताईंचं जगणं बदललंही; मात्र ते वेगळ्या पद्धतीनं. सदाशिव अमरापूरकर ऊर्फ नगरकरांचा लाडका बंडू त्यांना नगरमध्ये शाळेपासून कसा भेटला, नंतर कॉलेजमध्ये दोघांनी एकाच ग्रुपमधील नाटकं कशी सादर केली, त्यात अगदी नकळतपणे त्यांचं प्रेम कसं जमलं आणि नंतर नगर सोडून त्या पतीच्या कारकिर्दीसाठी मुंबईत कशा आल्या हा सर्व नाट्यमय प्रवास सुनंदाताई अतिशय तन्मयतेनं मांडतात. अमरापूरकर मंडळींच्या घराविषयीचे तपशील त्यात येतात. अमरापूरकरांचे वडील दत्तोपंत हे नगरमधलं मोठं प्रस्थ. श्रीमंत घराणं. मोठा वाडा, नोकरचाकर वगैरे. त्या तुलनेत सुनंदाताईंची माहेरची परिस्थिती जेमतेम म्हणावी अशी. अशा परिस्थितीत हे लग्न झालं आणि त्या अमरापूरकरांची सून झाल्या, इथपर्यंत पुस्तकाचा निम्मा प्रवास (मध्यंतरच) होतो. पुढल्या दोनशे पानांत आपल्याला खऱ्या अर्थानं सदाशिव अमरापूरकर हे काय व्यक्तिमत्त्व होतं, हे उलगडत जातं. अमरापूरकरांनी शेवटपर्यंत त्यांची मध्यमवर्गीय राहणी व मध्यमवर्गीय मूल्यं सोडली नाहीत. ‘अर्धसत्य’सारख्या सिनेमामुळं एका रात्रीतून ते भारतभरात प्रसिद्ध झाले. या एका ओळखीमुळं अमरापूरकरांचं जीवन पूर्ण बदलून गेलं. तोपर्यंत असलेली आर्थिक ओढगस्तीही संपली. हिंदी चित्रपटसृष्टीत अगदी स्वप्नवत अशा रीतीनं ते मोठे स्टार झाले. एकापाठोपाठ एक खलनायकी भूमिका त्यांच्याकडं येऊ लागल्या. पैसा येऊ लागला. अशा परिस्थितीत एक मध्यमवर्गीय कुटुंब या सगळ्या धबधब्याला कसं तोंड देतं आणि आपली मूल्यं कायम जपत राहतं, हे सुनंदाताईंनी फार हृद्यपणे लिहिलं आहे. सुनंदाताईंनी अनेक वर्षं एलआयसीत नोकरी केली. पतीचं अस्थिर क्षेत्र असल्यानं त्यांनी सुरुवातीला नोकरी केलीच; पण नवरा हिंदी चित्रपटसृष्टीत सुपरस्टार व्हिलन झाल्यावरही त्यांनी ही नोकरी सोडली नाही. त्यांच्या तिन्ही मुलींवर त्यांनी उत्तम संस्कार केले. एका सिनेमाच्या प्रीमियरनंतर हे सगळे कुटुंबीय कसे घरी जाऊन पिठलं-भाकरीचं जेवण तयार करून जेवले हे त्यांनी एका प्रसंगात अतिशय खेळकरपणे सांगितलं आहे. अमरापूरकरांचं नाटकवेड, भौतिक सुखांविषयीची काहीशी विरक्त वृत्ती, त्यांचा मित्रांचा गोतावळा, अनेक माणसांचा घरात राबता असा एकूण ‘देशस्थी’ कारभार यावर सुनंदाताई कधी गमतीत, तर कधी काहीसं वैतागून टिप्पणी करतात. अर्थात त्यांचं सदाशिव अमरापूरकरांवर अतिशय प्रेम होतं आणि त्यांनी हे शेवटपर्यंत उत्तम निभावलं. अशा आत्मचरित्रांत अनेकदा ‘आहे मनोहर तरी... गमते उदास’ असा सूर लागण्याचा धोका असतो. सुनंदाताईंच्या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणजे, एखादा अपवाद वगळता, त्यांच्या या संपूर्ण पुस्तकात असा रडवा सूर कधीही लागलेला नाही. आपल्याला जे काही मिळालं, ते आपणच निवडलं आहे आणि त्यामुळं त्याविषयी तक्रार करण्याचा आपल्याला काही अधिकार नाही, अशी एक भूमिका त्यांनी घेतलेली दिसते. त्यांच्या या पुस्तकातून विसाव्या शतकातील मध्यमवर्गीय ब्राह्मण घरातील एका तरुणीच्या आशा-आकांक्षांचा, आयुष्यानं दिलेल्या आश्चर्याच्या धक्क्यांचा आणि त्याला सामोरं जाण्यातील धीट दिलदारपणाचा लोभस प्रवास दिसतो. आपली मध्यमवर्गीय मूल्यं जपत, प्रामाणिकपणे व उमेदीनं आयुष्य जगणाऱ्या अनेक महिलांना या पुस्तकात आपल्या जगण्याचं प्रतिबिंब सापडेल. तेच या ‘खुलभर दुधाच्या कहाणी’चं यश आहे. ...Read more

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
प्रभाकर गावंडे, अमरावती

मी विकत घेऊन वाचले आहे हे पुस्तकं, चांगले आहे, नवीन माहिती वाचायला मिळाली.