ANJANI NARAVANE

About Author

Birth Date : 17/05/1934
Death Date : 08/05/2022


AFTER COMPLETING EDUCATION AT WAI AND SATARA, SHE GRADUATED FROM ARTS AND ALSO SOUGHT DIPLOMA IN RUSSIAN LANGUAGE. WHILE AT BARODA, SHE AUTHORED MANY BOOKS. SHE WAS AN ACTIVE SOCIAL WORKER THERE. LATER, WHEN SHE SHIFTED TO PUNE, SHE CONCENTRATED ON WRITING AND TRANSLATION. SHE IS THE EDITOR OF SAMVAD A TRIMONTHLY MAGAZINE. SO FAR, SHE HAS RECEIVED THE RANJIT DESAI AWARD AND THE LATE S.H. MODAK AWARD BY MAHARASHTRA SAHITYA PARISHAD.

शालेय शिक्षण वाई व सातारा येथे झाल्यानंतर नरवणे यांनी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला, परंतु तेव्हा त्यांना महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करता आले नाही. त्यानंतर १५ वर्षांनी त्यांनी शिवाजी विद्यापीठाची बी.ए. (ऑनर्स) पदवी संपादित केली. त्यानंतर बडोदा विद्यापीठातून रशियन भाषेची पदविका संपादित केली. १९५३ ते १९९८ या कालावधीत त्या बडोदा येथे वास्तव्यास होत्या. त्या वेळी त्यांनी लेखन व समाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेतला. १९९८मध्ये त्यांनी बडोद्यात एक मोठी आधुनिक बेकरी सुरू करून स्थानिकांचा रोजगार पुरवला. पुण्याला आल्यावर त्यांनी लेखन व अनुवाद यांवर लक्ष केंद्रित केले. स्त्री, किर्लोस्कर, माणूस, अमृत, माहेर, शब्दांगण, मिळून साऱ्याजणी यांसारख्या नियतकालिकांमधून त्यांनी ललित, तसेच कथालेखन केले. त्यांनी संवाद या त्रैमासिकाचे संपादकीय कामही संभाळले. गुजराती साहित्याशी संपर्क आल्यावर त्यांनी तेथील साहित्य मराठीत अनुवाद करण्याचे ठरवले. आजवर त्यांनी उत्तमोत्तम गुजराती साहित्य अनुवादित केले आहे. त्यांनी इंग्रजी पुस्तकांचाही अनुवाद केला आहे. त्यांची ललितलेखांची व पाककृतींचीही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांना रणजित देसाई पुरस्कार (२००१), महाराष्ट्र साहित्य परिषदेचा स्व.स.ह. मोडक पुरस्कार (२००१) आदी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 12 of 24 total
AAPAN AAPLE TANTANAV - EKA CHINTAN Rating Star
Add To Cart INR 140
AKOOPAR Rating Star
Add To Cart INR 300
AKSHAYPATRA Rating Star
Add To Cart INR 200
35 %
OFF
ANJANI NARAWANE COMBO SET-22 BOOKS Rating Star
Add To Cart INR 5585 INR 3630
ANK RAHIT SHUNYACHI BERIJ Rating Star
Add To Cart INR 160
ANSAR Rating Star
Add To Cart INR 350
CHALA UTHA KAMALA LAGA Rating Star
Add To Cart INR 195
CHHAVANI Rating Star
Add To Cart INR 200
DAYS OF GOLD & SEPIA Rating Star
Add To Cart INR 395
GAHAN PADLELI TEKADI Rating Star
Add To Cart INR 220
HITAGUJ - TANAVYUGATIL TARUN PIDHISHI Rating Star
Add To Cart INR 120
I LOST MY LOVE IN BAGHDAD Rating Star
Add To Cart INR 450
12

Latest Reviews

वा. पां. जाधव अमरावती

`अमरावतीचे छप्पन स्वभाव एक मनोरंजक काव्यसंग्रह` `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे अमरावतीचे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री जी. बी. देशमुख यांचे अमरावती नगरीचा सहज स्वभाव व ह्या नगरीच्या वेगळ्या ओळखीवर आधारित मनोरंजक पुस्तक वाचले. वाचून भरपूर मनोरंजन झाले. खर काय लिहावे या लेखकाबद्दल, मन गोंधळले. ऐतिहासिक असो, प्रवास वर्णन असो, व्यक्ती विशेष असो, अनुभवात्मक घटना घडामोडी असो कशावरही सहज लिखाण करणारा हा लेखक आहे. आता तर त्यांनी लेखनाला विनोद प्रचुर फोडणी देऊन `अमरावतीचे छप्पन स्वभाव` या काव्यसंग्रहातून अमरावतीकरांना मनोरंजनाची मेजवानीच दिली आहे. प्रत्येक शहराची व त्या शहरातील वैशिष्ट्यांची एक वेगळीच ओळख असते. दिवस जातात, काळ लोटतो, पिढ्या बदलतात मात्र जुन्या स्मृतीची चिन्हे नवीन येणाऱ्या पिढीच्या मनात गुढ निर्माण करत कायम हाक देत राहतात. अमरावतीही त्याला अपवाद नाही. बापट चौकात चौक नाही, त्या जागेवर चौरस्ता नसून टी-पॉइंट आहे, खापर्डे बगीचा म्हणून आजही ओळख आहे मात्र तेथे बगिचा नाही किंवा प्रसिद्ध गांधी चौकात गांधीचा पुतळा अथवा स्मृतीदर्शक चिन्ह अथवा उल्लेख नाही मात्र गांधी चौक अशीच ओळख जनमानसात आहे. अशा एक ना अनेक विसंगत नाम दर्शक ओळख असलेली उदाहरणे त्यात सप्रमाण आहेत. पण खरी गंमत म्हणजे कधी काळी घडलेला इतिहास त्यामध्ये दडलेला आहे हे निश्चित. या सोबतच अमरावतीकरांच्या स्वभावातला स्थायी मजेदारपणाच्या एक एका हटके गुण वैशिष्ट्याच्या गमती लेखकाने हुबेहूब अधोरेखित केलेल्या आहेत. आणि त्यावरुन तत्सम रचनांचा उहापोह लेखकाने पुस्तकात केला असावा. विदेशात स्थाईक झालेल्या मूळ अमरावतीकरांना लेखकाने लिहिलेल्या गमती मनोरंजनात्मक वाटाव्या एवढी किमया जी.बी. च्या सहज लेखनाने दाखवली आहे. अमरावतीचे अग्रगण्य वृत्तपत्र दै. हिंदुस्थान मध्ये लेखकाने सतत ६ महीणे लिहीलेल्या काव्य सदरात अमरावतीच्या जनमानसाच्या हृदयाच्या ठाव घेणाऱ्या काव्य रचनांचा आठवणींनी महापूर ओसंडून गेला होता. विशेष म्हणजे ह्यात कुठेही अनावश्यक अभिनीवेष नव्हता. उलट गमतीत केलेले आत्मपरिक्षण मात्र काही प्रमाणात होते. वयस्क अमरावतीकर रसिकांना या रचना ताज्या करून त्यांच्या तारुण्यात घेऊन गेल्या हेच खरे. जी बी देशमुख या लेखकास मिळालेल्या सकारात्मक प्रतिक्रियां वरून दिसून येते. . सदर पुस्तकातील काव्यमय रचना वाचतांना अमरावतीच्या माणसाच्या वऱ्हाडभोळ्या स्वभावाची प्रचीती येते आणि वेगळाच आनंद देऊन जाते. निखळ मनोरंजन करत गुदगुल्या करणारा असा हा काव्यसंग्रह आहे. अमरावती शहराची ऐतिहासिक वैशिष्टे काव्यरूपात वाचण्याचा आनंद अमरावतीकरांना ते जिथं असतील त्या गावात, परगावात, परदेशात पुस्तक मागवून घेता येईल. ...Read more

ज्योती चेडे, मुंबई.

अमरावतीच्या वैशिष्ट्यांवर आधारीत खुमासदार छप्पन्न कवितांच्या संग्रहातील प्रत्येक कविता वाचत असताना अमरावतीच्या वातावरणाची धुंदी आपसुकच मनावर चढु लागली. सगळ्याच कविता सुंदर आहेत. एकेक कविता अमरावतीचे अप्रतिम वर्णन करते. प्रत्येक कवितेचा शेवट कुठेतरी गंभीर विचार करायला भाग पाडतो आणि मन गलबलून जाते. सगळ्याच कविता सुंदर आहेत पण माझ्या मनाला भावलेल्या व भिडलेल्या कविता आहेत `अमरावतीतल्या गमती`, `अमरावतीचे शिक्षण`, `अमरावतीचे हजरजबाबी`, `अमरावतीचे वेडे`, `अमरावतीच्या काकू` व बाकी सगळ्या. `अमरावतीचे वेडे` या कवितेत उल्लेखीत शेवटचा अश्रुंचा एक थेंब जरुर राखला जाईल. तसेच `अमरावतीच्या काकूं` ची उर्जा उरात भरून उरेल. जीवन देणाऱ्या विहीरीने कोणाचेही जीवन घेऊ नये, अशी सद्भावना मनात जागेल. अमरावतीकर जगात कुठेही असो त्यांच्या मनात एका कोपऱ्यात राजकमल चौक असतोच हे सत्य मनावर कोरले जाईल. प्रत्येक अमरावतीकराने ह्या कविता जगाव्यात. त्यासाठी हे पुस्तक संग्रही ठेवावे आणि परगावी राहणाऱ्या आपल्या अमरावतीकर आप्तेष्टांना भेटी दाखल द्याव्या. ...Read more