* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: KEEPERS OF THE KALACHAKRA
  • Availability : Available
  • Translators : SANKET LAD
  • ISBN : 9789357200790
  • Edition : 1
  • Publishing Year : JULY 2023
  • Weight : 500.00 gms
  • Pages : 380
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :ASHWIN SANGHI COMBO SET - 8 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
A SEEMINGLY RANDOM SELECTION OF HEADS OF STATE ARE STRUCK DOWN LIKE FLIES BY UNNAMED KILLERS WHO WORK WITH THE CLINICAL EFFICIENCY OF BUTCHERS. EXCEPT THAT THEY LEAVE NO TRACE OF THEIR METHODS. WELCOME BACK TO THE SHADOWY AND ADDICTIVE WORLD OF ASHWIN SANGHI. AFTER THE ROZABAL LINE, CHANAKYA`S CHANT, THE KRISHNA KEY AND THE SIALKOT SAGA, ASHWIN SANGHI RETURNS AT LAST WITH ANOTHER QUIETLY FEARSOME TALE-THIS TIME OF MEN WHO GUARD THE `KALACHAKRA` OR THE WHEEL OF TIME.SANGHI DESCRIBES A WORLD OF PEOPLE AT WAR WITH ONE ANOTHER-A BOOMERANGING CONFLICT OF FAITHS THAT RESULTS IN ACTS OF SUCH SLOW AND PLANNED HUMAN CRUELTY THAT THEY DEFY HUMAN IMAGINATION. CAUGHT IN THE MIDST OF THIS MADNESS IS VIJAY SUNDARAM, A GEEK SCIENTIST WHO IS ONLY DIMLY AWARE THAT THE WIDER SKY OUTSIDE HIS LABORATORY IS STRETCHED TAUT AND CLOSE TO BEING TORN APART BY FORCES THAT HE WANTS SIMPLY TO HAVE NOTHING TO DO WITH. BUT EVENTS CONSPIRE TO PROPEL VIJAY INTO THE LABYRINTH OF MILESIAN LABS, A CENTRE OF RESEARCH DEEP IN THE FORESTED HILLS OF UTTARAKHAND. WHAT HE STUMBLES UPON IS A PRIMORDIAL CLUE TO A GALACTIC SECRET THAT COULD ACCELERATE THE DOWNWARD SPIRAL OF HUMANKIND. TRAPPED AND WHOLLY UNAWARE OF HIS ACTUAL FOE, VIJAY RACES AGAINST TIME TO SAVE HUMANITY-AND HIMSELF. ZIGZAGGING FROM RAMA`S CROSSING TO LANKA TO THE BIRTH OF BUDDHISM; FROM THE ORIGIN OF WAHHABISM TO THE EINSTEINIAN GRAVITATIONAL WAVE-DETECTORS OF LIGO; FROM THE CHARNEL-GROUNDS OF NAKED TANTRIC PRACTITIONERS TO THE BESPOKE SUITS OF THE OVAL OFFICE; AND FROM THE RITES OF MINERVA, SHROUDED IN FRANKINCENSE, TO THE SMOKE-DARKENED RUINS OF NALANDA, KEEPERS OF THE KALACHAKRA IS A JOURNEY THAT WILL HAVE YOU GASPING FOR BREATH-BUT ONE THAT YOU CANNOT ABANDON TILL ALL THE PIECES OF THE JIGSAW COME TOGETHER. TILL YOU COME UP GOBSMACK AGAINST AN END THAT YOU SIMPLY DID NOT SEE COMING.
"वरवर पाहता ज्यांचा एकमेकांशी काही संबंध नाही असे नेते निनावी मारेकऱ्यांकडून किडामुंग्यांसारखे मारले जात आहेत. ते मारेकरी अगदी एखाद्या कसायासारखे आपले काम करतात. फरक इतकाच की तेकेलेल्या कामाचा किंचितसा मागमूसही ठेवत नाहीत. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं, अश्विन सांघीच्या या गूढ आणि खिळवून ठेवणाऱ्या विश्वात. रोझाबल लाइन, चाणक्याज चान्ट, द कृष्णा की आणि सियालकोट सागा नंतर अखेरीस अश्विन सांघी परत आलेत, आणखी एका चित्तथरारक कथा घेऊन - ही कथा आहे अशा माणसांची, जी ‘कालचक्राचे’म्हणजे काळाच्या चक्राचे रक्षण करतात. सांघीनी या कथेमध्ये धर्मांच्या स्वतःवरच उलटणाऱ्या संघर्षात परस्परांशी लढायला उभ्या ठाकलेल्या लोकांचं वर्णन केलं आहे. त्या संघर्षाचीपरिणती मंदगतीने आणि नियोजनबद्ध मानवी क्रौर्यामध्ये होते, जे मानवाच्या कल्पनाशक्तीच्या पलीकडचं असतं. त्यातच एक भोळसट शास्त्रज्ञ विजय सुंदरम या अंदाधुंदीमध्ये घेरला जातो. त्याला पुसटशी कल्पनाही नाही की त्याच्याशी ज्या शक्तींचा का शक्तीं ही संबंध नाही असं त्याला वाटतंय त्यांच्यामुळेच त्याच्या प्रयोगशाळेबाहेरच्या जगावर एवढा ताण आलाय आणि लवकरच त्या जगाच्या चिंधड्या उडणार आहेत. कालचक्राच्या रक्षकांचा हा वेड्यावाकड्या वळणाचा प्रवास तुम्हाला श्वास रोखून ठेवायला लावतो-पण तरीही या गूढ खेळातली सगळी कोडी सुटेपर्यंत तो प्रवास तुम्हाला थांबवताही येत नाही. नाही असं त्याला वाटतंय त्यांच्यामुळेच त्याच्या प्रयोगशाळेबाहेरच्या जगावर एवढा ताण आलाय आणि लवकरच त्या जगाच्या चिंधड्या उडणार आहेत. कालचक्राच्या रक्षकांचा हा वेड्यावाकड्या वळणाचा प्रवास तुम्हाला श्वास रोखून ठेवायला लावतो-पण तरीही या गूढ खेळातली सगळी कोडी सुटेपर्यंत तो प्रवास तुम्हाला थांबवताही येत नाही. "
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक #मेहतापब्लिशिंगहाऊस #दकृष्णाकी #कालचक्राचेरक्षक #अश्विनसांघी #कादंबरी #अनुवाद #क्लासिक #इतिहास #महाभारत #MARATHIBOOKS #ONLINEMARATHIBOOKS #MARATHINOVEL #MEHTAPUBLISHINGHOUSE #INDIANCULTURE #THEKRUSHNAKEY #THEKEEPERSOFKALCHAKRA #ASHWINSANGHI #HISTORICALFICTION #MAHABHARAT #SPIRITUAL #FICTION #TRANSLATION
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

BACKSTAGE
BACKSTAGE by MONTEK SINGH AHLUWALIA Rating Star
महाराष्ट्र टाईम्स.. ६.९.२०२६

भारताच्या आर्थिक सुधारणांवर अनेक पुस्तके आजवर प्रसिद्ध झाली आहेत. काहींमध्ये आकडेवारीचे जंजाळ असते, काही धोरणांचे विश्लेषण करतात, तर काही विशिष्ट नेत्यांची जाहिरातबाजी करतात. मात्र माँटेकसिंग अहलुवालिया यांचे `बॅकस्टेज : भारताच्या उच्च वाढीच्या र्षांमागची कहाणी` हे पुस्तक या सगळ्यांपेक्षा वेगळे ठरते. कारण हे पुस्तक भारताच्या आर्थिक परिवर्तनाची कथा बाहेरून पाहणाऱ्या अभ्यासकाने नव्हे, तर त्या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी उभ्या असलेल्या व्यक्तीने सांगितलेली आहे. जी. बी. देशमुख यांनी मूळ इंग्रजी पुस्तकाचा केलेला मराठी अनुवाद सरस उतरला आहे. पुस्तकाच्या सुरुवातीलाच माँटेकसिंग एक गोष्ट स्पष्ट करतात, ती म्हणजे, हे पुस्तक आत्मकथन नाही. आत्मप्रौढी मिरवण्यासाठी नव्हे, तर भारताच्या आर्थिक सुधारणांचा प्रवास समजावून सांगण्यासाठी अहलुवालिया हे पुस्तक लिहितात. विषयाच्या अनुषंगाने पुस्तकात त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील संदर्भ येतात, पण ते आर्थिक आणि राजकीय घडामोडी समजावून सांगण्यापुरतेच. सिकंदराबादमधील मध्यमवर्गीय वातावरणातून सुरू झालेला त्यांचा प्रवास दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, ऑक्सफर्ड, जागतिक बँक, अर्थ मंत्रालय, योजना आयोग आणि अखेर देशाच्या सर्वोच्च आर्थिक धोरणनिर्मितीच्या केंद्रापर्यंत पोहोचतो. हा प्रवास वाचताना स्वतंत्र भारताच्या आर्थिक विचारसरणीचा विकासक्रम उलगडत जातो. पुस्तकाचे केंद्रस्थान अर्थातच १९९१च्या आर्थिक संकटाचे आहे. त्यावेळी देशाकडे काही आठवड्यांच्या आयातीपुरताही डॉलर शिल्लक नव्हता. सोन्याचा साठा गहाण ठेवण्याची वेळ आली होती आणि आर्थिक दिवाळखोरीची शक्यता प्रत्यक्ष समोर उभी होती. अशावेळी सरकारने घेतलेले निर्णय, त्यामागील तणाव, राजकीय अनिश्चितता आणि प्रशासकीय संघर्ष यांचे वर्णन पुस्तकात अत्यंत जिवंतपणे आले आहे. नाणेनिधी किंवा जागतिक बँकेच्या दबावामुळे या सुधारणा झाल्याची धारणा माँटेकसिंग ठामपणे नाकारतात. हे पुस्तक आर्थिक सुधारणांना कोणत्याही प्रकारच्या विचारधारेच्या चष्म्यातून पाहत नाही. लेखक ना मुक्त बाजाराचे अंधसमर्थन करतात, ना राज्यनियंत्रित व्यवस्थेचे. त्यांचा दृष्टिकोन व्यवहारवादी आहे. भारतासारख्या लोकशाही देशात सुधारणा एका झटक्यात होत नाहीत; त्या राजकीय वास्तवाशी जुळवून घेत हळूहळू पुढे सरकतात, हे ते वारंवार. अधोरेखित करतात. पुस्तकात अनेक ठिकाणी `सुधारणा` हा आर्थिक नव्हे, तर राजकीय प्रक्रियेचाही विषय आहे, हे प्रकर्षाने जाणवते. अहलुवालिया या पुस्तकात अनेक व्यक्ती, अधिकारी, अर्थतज्ज्ञ आणि राजकीय नेत्यांच्या योगदानाचा उल्लेख करतात. नरसिंह राव, मनमोहन सिंग, पी. चिदंबरम, यशवंत सिन्हा, जसवंत सिंह यांच्यापासून ते विविध सनदी अधिकाऱ्यांपर्यंत अनेकांची भूमिका ते प्रामाणिकपणे नोंदवतात. योजना आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून काम करताना अहलुवालिया यांनी जवळून अनुभवलेला काळ येथे उभा राहतो. सन २००४ ते २०११ या काळातील उच्च आर्थिक वाढ, दारिद्रयनिर्मूलनातील प्रगती, पायाभूत सुविधांमध्ये झालेली वाढ आणि ग्रामीण विकासाच्या कार्यक्रमांचे मूल्यमापन ते करतात. विशेषतः भारताने सलग अनेक वर्षे सात ते आठ टक्क्यांच्या दरम्यान वाढ नोंदवली, ती केवळ जागतिक परिस्थितीचा. परिणाम नव्हती; १९९० नंतरच्या सुधारणांनी घातलेल्या पायावर उभे राहून ती शक्य झाली, हा त्यांचा युक्तिवाद पटण्याजोगा वाटतो. मात्र पुस्तकाचे खरे सामर्थ्य यशोगाथेत नाही, तर आत्मपरीक्षणात आहे. यूपीए-२ दरम्यान निर्माण झालेली निर्णयप्रक्रियेतील अडचण, गुंतवणुकीतील वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक मंदी, भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे निर्माण झालेले वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक थेट भाष्य करतात. अनुवादक जी. बी. देशमुख यांनी मूळ पुस्तकातील आर्थिक संकल्पना सहज आणि प्रवाही मराठीत मांडल्या आहेत. यात कृत्रिमता जाणवत नाही. आर्थिक विषयावरील पुस्तक असूनही भाषा जड वाटत नाही. आर्थिक सुधारणांच्या व्यापक सामाजिक परिणामांचा स्वतंत्र आणि सविस्तर ऊहापोह येथे अपेक्षेपेक्षा कमी आढळतो. मात्र, हे पुस्तक ज्या उद्देशाने लिहिले गेले आहे त्या उद्देशात ते अत्यंत यशस्वी ठरते. `बॅकस्टेज` हे केवळ पुस्तक नाही; ते भारताच्या आर्थिक परिवर्तनाचा प्रत्यक्षदर्शी दस्तऐवज आहे. १९९१ नंतर भारताने घेतलेल्या वळणाचा अर्थ समजून घ्यायचा असेल, उच्च वाढीच्या वर्षामागील वास्तविक कथा जाणून घ्यायची असेल आणि धोरणनिर्मितीच्या पडद्यामागे काय घडत असते याचा मागोवा घ्यायचा असेल, तर हे पुस्तक अभ्यासणे आवश्यक ठरते. भारतीय अर्थव्यवस्थेच्या आर्थिक सुधारणांचा इतिहास आणि त्यांचे परिणाम समजून घेण्यासाठी हे पुस्तक एक महत्त्वाचा संदर्भग्रंथ म्हणून ओळखले जाऊ शकते. मराठीत उपलब्ध असलेला हा अनुवाद त्या दृष्टीने विशेष स्वागतार्ह आहे. ...Read more

HACHYUKISUNASKI
HACHYUKISUNASKI by ABA MAHAJAN Rating Star
Dinesh

This is a different planet. This is a different world. And this is a truly different book. I loved it. You should also buy it and read it. I’m sure you will love it too. Hachyukisunaski is a fantastic Book.