- Shrikant Adhav
DAYS OF GOLD & SEPIA by YASMEEN PREMJI
यास्मिन प्रेमजी यांनी मूळ इंग्लिशमध्ये लिहिलेल्या ‘डेज ऑफ गोल्ड अँड सीपीया’ या कादंबरीचा अनुवाद अंजनी नरवणे यांनी केलाय. लालजी लखा या नायकाभोवती फिरणाऱ्या या कथानकात प्रचंड नाट्य, प्रेमवीरांची धडपड, त्यांचा विरह अशा विविध बाबी समोर येतात. हातात कवडीह नसलेला लालजी आपलं साम्राज्य कसं उभं करतो, ते यातून कळतं.पत्रकार आणि कथालेखिका आणि प्रख्यात उद्योगपती अझिम प्रेमजी यांच्या पत्नी यास्मिन प्रेमजी यांची ही रोचक कादंबरी. अंजनी नरवणे यांनी कादंबरीचा रसाळ अनुवाद केला आहे. गुजरातमधील कच्छच्या रणात अत्यंत गरीब परिस्थितीत जन्मलेला मुलगा संकटांशी सामना करत मोठा होो. मोठेपणी मुंबईचा कॉटन किंग म्हणून कीर्ती मिळवतो. या विलक्षण प्रवासाचीच ही कथा आहे. साधारणत: १८५७ ते १९४७ पर्यंतचा काळ कादंबरीत चित्रित केला आहे. या प्रवासात तो कसा घडतो, त्याला भेटणारी माणसे आदींचेही दर्शन त्यांतून घडते.सोनेरी दिवसांची गोष्ट... मुघल साम्राज्यात सुरत ही आर्थिक राजधानी होती. इंग्रजांच्या ईस्ट इंडिया कंपनीचे मुख्यालय सुरतलाच होते. पण सन १६७० साली शिवाजी महाराजांनी सुरत दुसऱ्यांदा लुटली आणि इंग्रजांनी आपला सगळा कारभार हळूहळू मुंबईला हलवला. इंग्रज पक्क व्यापारी. त्यांनी सगळीकडच्या व्यापारी जमातींना आमंत्रण देऊन सुरक्षिततेची हमी देऊन मुंबईत बोलावले. इथून पुढे मुंबईची व्यापारी भरभराट सुरू झाली. आपण मराठी माणसे सगळ्याच गुजराती भाषिकांना व्यापारी समजतो. पण खरे म्हणजे गुजरातमधले कच्छी लोक हे उत्तम व्यापारी. या कच्छी लोकांमध्ये हिंदू आणि मुसलमान दोघेही आहेत. त्यातल्या मुसलमानांची नावेही अर्धी हिंदू असतात. उदा. अझीम प्रेमजी. आजही मुंबईचा व्यापार फार मोठ्या प्रमाणात कच्छी व्यापाऱ्यांच्याच हातात आहे आणि अझीम प्रेमजी तर हिंदुस्थानच्या आय.टी. उद्योगाचे राजे म्हणून ओळखले जातात. आता मुंबईहून बंगळुरुला स्थायिक झालेले, मूळचे कच्छी इस्माईली शिया मुसलमान असलेले अझीम प्रेमजी संपूर्ण देशातले तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जातात. अझीम प्रेमजींचे वडील महम्मद हाशीम प्रेमजी हे कच्छहून मुंबईला आले. अफाट मेहनत, गोड बोलणे आणि मिळालेली संधी अचूक पकडण्याची हातोटी या भांडवलावर प्रेमजींनी मुंबईतले अग्रगण्य व्यापारी म्हणून स्थान मिळवले. पाकिस्तान बनल्यावर जीनांनी त्यांना तिकडे येण्याचा खूप आग्रह केला होता. प्रेमजींनी त्यांना ठाम नकार दिला. प्रस्तुत ‘डेज ऑफ गोल्ड अॅण्ड सीपिया’ या पुस्तकात लेखिका यास्मिन प्रेमजी म्हणजे अझीम प्रेमजींच्या पत्नी यांनी आपल्या कर्तबगार सासऱ्यांची जीवन कहाणीच चित्तारली आहे. मात्र ही हाशीम प्रेमजींचे चरित्र किंवा चरित्रात्मक कादंबरीही नाही. यास्मिन प्रेमजींचे माहेरचे घराणे चिनॉय हेही मुंबईतले एक जुने व्यापारी घराणे. त्यामुळे आपल्या सासऱ्यांच्या कहाणीत त्यांनी मुंबईच्या जुन्या हिंदू, मुसलमान, पारशी, ज्यु अशा अनेक व्यापाऱ्यांचे रंग मिसळले आहेत. कच्छचा आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील झांजिबारशी फार पुरातन व्यापार आहे. त्यामुळे या कहाणीत कच्छ, मुंबई यांच्याबरोबर झांजिबारही येते.कच्छहून निष्कांचन अवस्थेत मुंबईत आलेला एक तरुण अविरत कष्ट करून हळूहळू मोठा होतोय. अशा मापाने बेतलेली ही कहाणी खरे म्हणजे एका महाकादंबरीचा विषय होता. कारण ती नायक लालजी लखा याचीच फक्त कथा नसून सतत भरभराटत राहणाऱ्या मुंबई शहराची कथा आहे. पुस्तक वाचनीय आहे. अंजनी नरवणे यांचा मराठी अनुवाद, चंद्रमोहन कुलकर्णी यांचे मुखपृष्ठ आणि मेहता प्रकाशनाची निर्मिती सुबक.
- DAINIK SAMANA 24-04-2016
सोनेरी दिवसांची गोष्ट...
मुघल साम्राज्यात सुरत ही आर्थिक राजधानी होती. इंग्रजांच्या ईस्ट इंडिया कंपनीचे मुख्यालय सुरतलाच होते. पण सन १६७० साली शिवाजी महाराजांनी सुरत दुसऱ्यांदा लुटली आणि इंग्रजांनी आपला सगळा कारभार हळूहळू मुंबईला हलवला.
इंग्रज पक्के व्यापारी. त्यांनी सगळीकडच्या व्यापारी जमातींना आमंत्रण देऊन सुरक्षिततेची हमी देऊन मुंबईत बोलावले. इथून पुढे मुंबईची व्यापारी भरभराट सुरू झाली. आपण मराठी माणसे सगळ्याच गुजराती भाषिकांना व्यापारी समजतो. पण खरे म्हणजे गुजरातमधले कच्छी लोक हे उत्तम व्यापारी. या कच्छी लोकांमध्ये हिंदू आणि मुसलमान दोघेही आहेत. त्यातल्या मुसलमानांची नावेही अर्धी हिंदू असतात. उदा. अझीम प्रेमजी.
आजही मुंबईचा व्यापार फार मोठ्या प्रमाणात कच्छी व्यापाऱ्यांच्याच हातात आहे आणि अझीम प्रेमजी तर हिंदुस्थानच्या आय.टी. उद्योगाचे राजे म्हणून ओळखले जातात. आता मुंबईहून बंगळुरुला स्थायिक झालेले, मूळचे कच्छी इस्माईली शिया मुसलमान असलेले अझीम प्रेमजी संपूर्ण देशातले तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जातात. अझीम प्रेमजींचे वडील महम्मद हाशीम प्रेमजी हे कच्छहून मुंबईला आले. अफाट मेहनत, गोड बोलणे आणि मिळालेली संधी अचूक पकडण्याची हातोटी या भांडवलावर प्रेमजींनी मुंबईतले अग्रगण्य व्यापारी म्हणून स्थान मिळवले. पाकिस्तान बनल्यावर जीनांनी त्यांना तिकडे येण्याचा खूप आग्रह केला होता. प्रेमजींनी त्यांना ठाम नकार दिला.
प्रस्तुत ‘डेज ऑफ गोल्ड अॅण्ड सीपिया’ या पुस्तकात लेखिका यास्मिन प्रेमजी म्हणजे अझीम प्रेमजींच्या पत्नी यांनी आपल्या कर्तबगार सासऱ्यांची जीवन कहाणीच चित्तारली आहे. मात्र ही हाशीम प्रेमजींचे चरित्र किंवा चरित्रात्मक कादंबरीही नाही. यास्मिन प्रेमजींचे माहेरचे घराणे चिनॉय हेही मुंबईतले एक जुने व्यापारी घराणे. त्यामुळे आपल्या सासऱ्यांच्या कहाणीत त्यांनी मुंबईच्या जुन्या हिंदू, मुसलमान, पारशी, ज्यु अशा अनेक व्यापाऱ्यांचे रंग मिसळले आहेत. कच्छचा आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील झांजिबारशी फार पुरातन व्यापार आहे. त्यामुळे या कहाणीत कच्छ, मुंबई यांच्याबरोबर झांजिबारही येते.
कच्छहून निष्कांचन अवस्थेत मुंबईत आलेला एक तरुण अविरत कष्ट करून हळूहळू मोठा होतोय. अशा मापाने बेतलेली ही कहाणी खरे म्हणजे एका महाकादंबरीचा विषय होता. कारण ती नायक लालजी लखा याचीच फक्त कथा नसून सतत भरभराटत राहणाऱ्या मुंबई शहराची कथा आहे. पुस्तक वाचनीय आहे. अंजनी नरवणे यांचा मराठी अनुवाद, चंद्रमोहन कुलकर्णी यांचे मुखपृष्ठ आणि मेहता प्रकाशनाची निर्मिती सुबक.
- SAKAL 10-1-16
यास्मिन प्रेमजी यांनी मूळ इंग्लिशमध्ये लिहिलेल्या ‘डेज ऑफ गोल्ड अँड सीपीया’ या कादंबरीचा अनुवाद अंजनी नरवणे यांनी केलाय. लालजी लखा या नायकाभोवती फिरणाऱ्या या कथानकात प्रचंड नाट्य, प्रेमवीरांची धडपड, त्यांचा विरह अशा विविध बाबी समोर येतात. हातात कवडीही नसलेला लालजी आपलं साम्राज्य कसं उभं करतो, ते यातून कळतं.
- MAHARASHTRA TIMES 22-11-2015
पत्रकार आणि कथालेखिका आणि प्रख्यात उद्योगपती अझिम प्रेमजी यांच्या पत्नी यास्मिन प्रेमजी यांची ही रोचक कादंबरी. अंजनी नरवणे यांनी कादंबरीचा रसाळ अनुवाद केला आहे. गुजरातमधील कच्छच्या रणात अत्यंत गरीब परिस्थितीत जन्मलेला मुलगा संकटांशी सामना करत मोठा होतो. मोठेपणी मुंबईचा कॉटन किंग म्हणून कीर्ती मिळवतो. या विलक्षण प्रवासाचीच ही कथा आहे. साधारणत: १८५७ ते १९४७ पर्यंतचा काळ कादंबरीत चित्रित केला आहे. या प्रवासात तो कसा घडतो, त्याला भेटणारी माणसे आदींचेही दर्शन त्यांतून घडते.
- AIKYA 7-2-16
हातात फुटकी कवडीही नसलेला अनाथ मुलगा, कच्छमधल्या वाळवंटातल्या अत्यंत गरीब परिस्थितीतून धडपडत वर येत येत संपत्ती आणि किर्ती मिळवून मुंबईचा ‘कॉटन किंग’ कसा होतो, याचं चित्रण या कादंबरीत कौशल्याने करण्यात आलं आहे. शिवाय १८५७ सालच्या हिंदुस्तानच्या पहिल्या स्वातंत्र्यसमरापासून सन १९४७ मध्ये स्वातंत्र्याची पहाट उगवेपर्यात अत्यंत चित्तथरारक कालखंडही यात प्रत्ययकारी पद्धतीनं रेखाटला आहे. यात तऱ्हेतऱ्हेच्या मनोवेधक, धीट, कणखर, मनाच्या, उत्साही व्यक्ती भेटतात-व्यापारसम्राट, राजेमहाराजे, गणिका, अचूक भाकितं सांगणारा योगी, समुद्रावरचे चाचे, स्वातंत्रसैनिक आणि ब्रिटीश राज्यकर्ते....
ही एक अनावर प्रेमाच्या अटळ शोकान्तिकेचीही कहाणी आहे. यात चित्रण आहे, एका धैर्यवान, चारित्र्यवान माणसाचं; त्याच्या अत्यंत प्रामाणिक व्यक्तिमत्त्वाचं, विलक्षण उदार मनाचं आणि मानसिक दौर्बल्याचही....
थक्क करून टाकणारी लालजी लखाची विलक्षण कथा खिळवून ठेवते!