* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: KARMAYOGINI
  • Availability : Available
  • ISBN : 9788177664553
  • Edition : 9
  • Publishing Year : JANUARY 1991
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 392
  • Language : MARATHI
  • Category : BIOGRAPHY
  • Available in Combos :AHILYABAI HOLKAR BIRTHDAY OFFER SET 1
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
SHE WAS A MUCH IGNORED PATRIOT OF INDIAN GLORY; SHE WAS A PICTURE OF PERFECT VALOUR. SHE HAD A MASCULINE NATURE, STRIVING HARD THROUGHOUT. SHE WAS PURE KINDNESS, COMPASSION. SHE WAS MOTHER EARTH, LOVING THIS LAND OF INDIA.
कर्मयोगिनी` म्हणजे भारतीय इतिहासातून उपेक्षित राहिलेले सोन्याचे पान. `कर्मयोगिनी` म्हणजे लखलखीत पराक्रमाची, शौर्याची धगधगती गाथा. `कर्मयोगिनी` आहे एका अखंड अंत:र्बाह्य युद्धाशी पुरुषार्थाने घेतलेली झुंज. `कर्मयोगिनी` म्हणजे अहिल्याबाई म्हणजेच मूर्तिमंत दया, क्षमा. `कर्मयोगिनी` म्हणजे या भारत-भूमीवर अलोट प्रेम करणारी

No Records Found
Original LanguageTranslated LanguageTranslated ByWebsite
MARATHIENGLISHMEHTA PUBLISHING HOUSE https://www.mehtapublishinghouse.com/book-details/KARMAYOGINI--col--LIFE-OF-AHILYABAI-HOLKAR/1834.aspx
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #KARMAYOGINI(AHILYABAIHOLKAR) #KARMAYOGINI #कर्मयोगिनी (अहिल्याबाई होळकर) #BIOGRAPHY #MARATHI #VIJAYAJAHAGIRDAR #विजयाजहागीरदार "
Customer Reviews
  • Rating StarAkash Balwante

    अहिल्याबाई होळकर यांची पुण्यश्लोक ही ओळख बऱ्याच जणांनी रंगवली आहे. त्याला अनेक कारणे आहेत जसे त्यांचा श्रद्धाळू स्वभाव, त्यांनी केलेला बऱ्याच मंदिरांचा जीर्णोद्धार, त्यांनी केलेला दानधर्म आणि इतर बरेच काही. पण लेखिकेने या पुस्तकात त्यांच्या पुण्यश्लक या प्रतिमेबरोबरच त्या कशा कर्मयोगिनी होत्या हे ही उत्तमरीत्या सांगितले आहे. त्यांचा मुत्सद्दी स्वभाव, फडणिशीत केलेले अतुल्य काम, राज्यकारभारी गुण, त्यांची न्यायदानी वृत्ती, राजपूत चंद्रावतांचा केलेला बिमोड, राघोबादादांना युद्ध न करताच घ्यायला लावलेली माघार, आप्त स्वकीय इहलोक सोडून जातानाही दाखवलेला खंबीरपणा अशा अनेक सद् गुणांचे दर्शन यात घडते. पुस्तकाला दोन भागात विभागले आहे. पहिल्या भागात त्यांचे बालपण, सासरकडचे सुरुवातीचे दिवस, सासरे मल्हाररावांकडून घेतलेले राजकारणाचे धडे, सासवांबरोबरची जवळीक, पती खंडेरावाकडून झालेला त्रास, स्वतःचे पोटच्या लेकरामुळे आलेली हतबलता लेखिकेने खूप उत्कृष्ठरित्या रंगवली आहे. दुसऱ्या भागात त्यांचे उत्तर जीवन दाखवले आहे ज्यात सुभेदार तुकोजी बरोबरचे सुरुवातीला असलेले चांगले आणि नंतर बिनसलेले संबंध, दुसरे मल्हारराव , रखमाबाई, नारो गणेश, बापू होळकर आदींशी आलेले संबंध, त्यांनी केलेले राजकारण, महादजी शिंदे सोबत भावांसारखे संबंध असूनही शिंदे आणि होळकर यात भांडणे होत असताना आलेली विवशता ते त्यांचा इहलोकीपर्यंतचा प्रवास छानरीत्या मांडला आहे. अहिल्याबाईनीं त्यांच्या जीवन काळात बरेच मृत्यू पाहिले. त्यांची सख्खी सासू , सासरे, सती गेलेल्या सावत्र सासवा, नवरा, सती गेलेल्या सवती, मुलगा मालेराव, सती गेलेल्या सुना , नातू नथोबा, सती गेलेल्या नातसूना, जावई यशवंतराव, सती गेलेली स्वतःची मुलगी मुक्ता आणि बरेच आप्तस्वकीय त्यांना सोडून गेले. अहिल्याबाई सासरे मल्हाररावांच्या विनंतीमुळे सती गेल्या नाहीत पण इतर लोकांकरवी त्यामुळे लागलेले बोल तसेच त्यांचे सती आणि तत्सम रूढी परंपरेवरचे विचार लेखिकेने सुंदररित्या मांडले आहेत. अहिल्याबाईंच्या जीवनकाळात बरेच पेशवे होऊन गेले. थोरले बाजीराव ज्यांनी छोट्या अहिल्येवर प्रभावित होऊन मल्हररावांना तिला सून करायला सांगितले त्यांपासून ते नानासाहेब, थोरले माधवराव , नारायणराव , रघुनाथराव आणि सवाई माधवरावांपर्यंत त्यांचे सर्वांशी कडूगोड सम्बन्ध राहिले. पेशवाईतल्या घडामोडी अहिल्येला सुरुवातीला मल्हाररावांकडून, नंतर तुकोजी कडून आणि इतर हेरांकडून खलित्या मार्फत समजताना अहिल्याबाईंचे त्यावरील वैयक्तिक मते आणि विचार मात्र वाचकांना कळत राहतात. अहिल्याबाईंनी जीवनात स्वकीयांबरोबर खूप झुंज दिली पण त्यांना बदलण्यात वा सुधारण्यात त्या सपशेल अपयशी ठरल्या जसे पती खंडेराव, मुलगा मालेराव, दुसरे सुभेदार तुकोजी, दुसरे मल्हारराव आणि इतर. त्याकाळच्या मुस्लिम राज्यकर्त्यांनी केलेली मंदिर आणि इतर धार्मिक स्थळांची नासधूस आणि या अवहेलनेने हिंदू सैनिक आणि लोकांमध्ये आलेली हतबलता रोखण्यासाठी सर्व प्रमुख धार्मिक स्थळांचा जीर्णोद्धार करून त्यांना पुनः प्रेरित करणे ही अहिल्याबाईंची दूरदृष्टी दाखवते. लेखिकेने पुस्तकात जुनी (18 व्या शतकातली मराठी) भाषा वापरली आहे त्यामुळे अहिल्याबाईंचे आणि इतर पात्रांचे संवाद हे खरे खरे वाटतात. जुन्या मराठी भाषेचा साज चढवून लेखिकेने या पुस्तकाला एका वेगळ्या उंचीवर नेले आहे. त्यामुळे हे चरित्र फक्त ऐतिहासिक कादंबरी न राहता अभ्यासपूर्ण इतिहासलेखन झाले आहे. या पुस्तकावर दोन जणांनी M. Phil. केले हे समजल्यावर आश्चर्य वाटायला नको. एकंदरीत ऐतिहासिक कादंबरी आवडणाऱ्याबरोबर मराठी इतिहास संशोधक तसेच विद्यार्थी यांनी आवर्जून वाचावे असा हा अमूल्य ठेवा आहे. ...Read more

  • Rating StarShrikant Adhav

    KARMAYOGINI (AHILYABAI HOLKAR) by VIJAYA JAHAGIRDAR एका योगिनीचा प्रवास... आपल्याला इतिहासावरून कायमच आकर्षण वाटत आले आहे. इतिहासातील व्यक्ती त्यांच्या कर्तृत्वामुळे आपल्याला आदर्शवत वाटतात आणि त्या कायमच स्मरणात राहतात. छत्रपती शिवाजी महाराज तर यचं मूर्तिमंत उदाहरण आहे. त्यांच्यावर असलेल्या श्रद्धेुळे त्यांच्यावर अनेक उत्तमोत्तम पुस्तके, चरित्रे अनेक मान्यवरांनी लिहिली आहेत. परंतु इतिहासात अशा काही व्यक्ती आहेत की, त्यांच्याबद्दल अत्यंत अल्प परिचय आपल्याला आहे. त्यांच्या अतुलनीय कार्याची माहिती आहे. पण ते वाचून त्यांच्या कार्याबद्दल आणखी माहिती करून घ्यायची उत्सुकता अधिक वाढते. अशा काही व्यक्तींपैकी एका अग्रणी असणारे नाव म्हणजे अहिल्याबाई होळकर. अहिल्याबाई होळकर यांना आपण मराठेशाहीचे आधारस्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मल्हारराव होळकरांची स्नुषा आणि एक अत्यंत सत्शील, धार्मिक आचरणाची व्यक्ती म्हणून प्रत्येक मराठी माणूस ओळखतो. पण त्यांची ही ओळख म्हणजे त्यांच्या अलौकिक अशा व्यक्तिमत्त्वातील काही अंशच म्हणावा लागेल. कारण अहिल्याबाई म्हणजे शिस्त, अहिल्याबाई म्हणजे एक मुत्सद्दी राजकारणी आणि समाजाकारणी, अहिल्याबाई म्हणजे एक खंबीर नेतृत्व, बाणेदारपणा अशी कितीतरी रूपं आपल्याला विजया जहागीरदार लिखित ‘कर्मयोगिनी’ या पुस्तकातून बघायला मिळतात.अहिल्याबाई होळकरांचा ७० वर्षांचा जीवनपट विजया जहागीरदार यांनी ‘कर्मयोगिनी’ या पुस्तकात मांडला आहे. अहिल्याबार्इंनी केवळ दानधर्म केला, ठिकठिकाणी घाट, देवळे, त्यांचा जीर्णोद्धारच केला असा आक्षेप त्यांच्यावर अनेक टीकाकारांनी घेतला आहे. लेखिकेने सदर पुस्तकाच्या माध्यमातून आहिल्याबार्इंवर घेण्यात आलेल्या आक्षेपांना चोख उत्तर दिले आहे. या पुस्तकातून त्यांनी अहिल्याबाई त्यांनी अहिल्याबार्इंची कधीही प्रकाशात न आलेली, कुणालाही फारशी ज्ञात नसलेली कर्तृत्वे अगदी समर्थपणे मांडली आहेत. अहिल्याबाई या जात्याच हुशार आणि अत्यंत कुशाग्रबुद्धीच्या. याच त्यांच्या कुशाग्रबुद्धीमुळे त्यांनी आपले सासरे सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या मार्गदर्शनाखाली राजकारणाचे धडे घेतले. अहिल्याबार्इंनी त्यांच्या जीवनात अनेक सुख-दु:खांचे चढउतार अनुभवले. यात प्रामुख्याने दु:खद प्रसंगच अधिक होते. अहिल्याबार्इंचा संसार म्हणजे वैशाखातील ऊन्हाप्रमाणेच होता. पतीचा विक्षिप्तपणा, त्यांचा मृत्यू, त्यांच्याबरोबर सती गेलेल्या नऊ सवती, गौतमाबाई आणि मल्हारराव यांचे मृत्यू, पुत्र मालोरावांचा नाकर्तेपणा, त्यांचा अकाली मृत्यू, तरुण नातवाचा दुर्दैवी मृत्यू, लहानग्या नातसुनांचे सती जाणे अशा कठीण प्रसंगांतही अहिल्याबाई खंबीर राहिल्या. आयुष्यामध्ये आलेल्या वेदनादायी प्रसंगामध्येही धीरोदात्तपणे उभे राहून संसाराचा गाडा अहिल्याबार्इंनी नेटाने रेटला. ज्या काळामध्ये अहिल्याबार्इंनी यशस्वी राजकारण आणि समाजकारण केले तो काळ लक्षात घेता त्यांचे हे कर्तृत्व किती महान होते हे लक्षात येते. पुरुषप्रधान वर्चस्व असलेल्या त्या काळामध्ये एका स्त्रीने एखाद्या संस्थानाचा कारभार बघायचा म्हणजे अत्यंत कठिण असे कर्म होते. राजकीय शत्रूंबरोबरच घरातील छुप्या शत्रूंनाही नामेहरम करण्याचे धारिष्ट्य अहिल्याबार्इंमध्ये होते. त्यांच्यातील कुशल राजकारणी आपल्याला या कादंबरीत अनेक ठिकाणी दिसतो. अहिल्याबाई होळकर यांच्यासारख्या महान व्यक्तिमत्त्वाच्या जीवनालेखाचा आढावा घेणं तसे कठीणच. पण हे लेखिकेने हे शिवधनुष्य लीलया पेलले आहे. अहिल्याबाई होळकरांचा जीवनपट उलगडणारी ही कादंबरी लिहिताना लेखिकेने इतिहासाशी कुठेही प्रतारणा केलेली नाही परंतु कादंबरीमध्ये लालित्य आणण्यासाठी काही प्रसंग दंतकथेवर आधारित असल्याचे लेखिकेने नमूद केले आहे मात्र हे प्रसंग कादंबरीमध्ये इतके चपखलपणे बसले आहेत की ते दंतकथांवर आधारित आहेत हे कुठेही जाणवत नाही. संपूर्ण कादंबरीमध्ये बखरींमध्ये जी भाषा वापरली गेली आहे ती वापरण्यात आली आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक पानाच्या तळाला जे शब्द वाचकाला पटकन उमगणार नाहीत त्याचे अर्थ दिले आहेत. त्यामुळे ही भाषा कादंबरीचा आस्वाद घेताना कुठेही रसभंग होत नाही. अहिल्याबाई होळकरांचे कर्तृत्व खरोखरच देदीप्यमान आहे यात शंका नाही. अशा थोर आणि पुण्यश्लोक अहिल्याबार्इंचे चरित्र इतिहासाच्या अभ्यासकांनी आणि प्रत्येकाने वाचावे असेच आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 30-01-2005

    एका योगिनीचा प्रवास... आपल्याला इतिहासावरून कायमच आकर्षण वाटत आले आहे. इतिहासातील व्यक्ती त्यांच्या कर्तृत्वामुळे आपल्याला आदर्शवत वाटतात आणि त्या कायमच स्मरणात राहतात. छत्रपती शिवाजी महाराज तर याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. त्यांच्यावर असलेल्या श्रद्धेुळे त्यांच्यावर अनेक उत्तमोत्तम पुस्तके, चरित्रे अनेक मान्यवरांनी लिहिली आहेत. परंतु इतिहासात अशा काही व्यक्ती आहेत की, त्यांच्याबद्दल अत्यंत अल्प परिचय आपल्याला आहे. त्यांच्या अतुलनीय कार्याची माहिती आहे. पण ते वाचून त्यांच्या कार्याबद्दल आणखी माहिती करून घ्यायची उत्सुकता अधिक वाढते. अशा काही व्यक्तींपैकी एका अग्रणी असणारे नाव म्हणजे अहिल्याबाई होळकर. अहिल्याबाई होळकर यांना आपण मराठेशाहीचे आधारस्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मल्हारराव होळकरांची स्नुषा आणि एक अत्यंत सत्शील, धार्मिक आचरणाची व्यक्ती म्हणून प्रत्येक मराठी माणूस ओळखतो. पण त्यांची ही ओळख म्हणजे त्यांच्या अलौकिक अशा व्यक्तिमत्त्वातील काही अंशच म्हणावा लागेल. कारण अहिल्याबाई म्हणजे शिस्त, अहिल्याबाई म्हणजे एक मुत्सद्दी राजकारणी आणि समाजाकारणी, अहिल्याबाई म्हणजे एक खंबीर नेतृत्व, बाणेदारपणा अशी कितीतरी रूपं आपल्याला विजया जहागीरदार लिखित ‘कर्मयोगिनी’ या पुस्तकातून बघायला मिळतात. अहिल्याबाई होळकरांचा ७० वर्षांचा जीवनपट विजया जहागीरदार यांनी ‘कर्मयोगिनी’ या पुस्तकात मांडला आहे. अहिल्याबार्इंनी केवळ दानधर्म केला, ठिकठिकाणी घाट, देवळे, त्यांचा जीर्णोद्धारच केला असा आक्षेप त्यांच्यावर अनेक टीकाकारांनी घेतला आहे. लेखिकेने सदर पुस्तकाच्या माध्यमातून आहिल्याबार्इंवर घेण्यात आलेल्या आक्षेपांना चोख उत्तर दिले आहे. या पुस्तकातून त्यांनी अहिल्याबाई त्यांनी अहिल्याबार्इंची कधीही प्रकाशात न आलेली, कुणालाही फारशी ज्ञात नसलेली कर्तृत्वे अगदी समर्थपणे मांडली आहेत. अहिल्याबाई या जात्याच हुशार आणि अत्यंत कुशाग्रबुद्धीच्या. याच त्यांच्या कुशाग्रबुद्धीमुळे त्यांनी आपले सासरे सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या मार्गदर्शनाखाली राजकारणाचे धडे घेतले. अहिल्याबार्इंनी त्यांच्या जीवनात अनेक सुख-दु:खांचे चढउतार अनुभवले. यात प्रामुख्याने दु:खद प्रसंगच अधिक होते. अहिल्याबार्इंचा संसार म्हणजे वैशाखातील ऊन्हाप्रमाणेच होता. पतीचा विक्षिप्तपणा, त्यांचा मृत्यू, त्यांच्याबरोबर सती गेलेल्या नऊ सवती, गौतमाबाई आणि मल्हारराव यांचे मृत्यू, पुत्र मालोरावांचा नाकर्तेपणा, त्यांचा अकाली मृत्यू, तरुण नातवाचा दुर्दैवी मृत्यू, लहानग्या नातसुनांचे सती जाणे अशा कठीण प्रसंगांतही अहिल्याबाई खंबीर राहिल्या. आयुष्यामध्ये आलेल्या वेदनादायी प्रसंगामध्येही धीरोदात्तपणे उभे राहून संसाराचा गाडा अहिल्याबार्इंनी नेटाने रेटला. ज्या काळामध्ये अहिल्याबार्इंनी यशस्वी राजकारण आणि समाजकारण केले तो काळ लक्षात घेता त्यांचे हे कर्तृत्व किती महान होते हे लक्षात येते. पुरुषप्रधान वर्चस्व असलेल्या त्या काळामध्ये एका स्त्रीने एखाद्या संस्थानाचा कारभार बघायचा म्हणजे अत्यंत कठिण असे कर्म होते. राजकीय शत्रूंबरोबरच घरातील छुप्या शत्रूंनाही नामेहरम करण्याचे धारिष्ट्य अहिल्याबार्इंमध्ये होते. त्यांच्यातील कुशल राजकारणी आपल्याला या कादंबरीत अनेक ठिकाणी दिसतो. अहिल्याबाई होळकर यांच्यासारख्या महान व्यक्तिमत्त्वाच्या जीवनालेखाचा आढावा घेणं तसे कठीणच. पण हे लेखिकेने हे शिवधनुष्य लीलया पेलले आहे. अहिल्याबाई होळकरांचा जीवनपट उलगडणारी ही कादंबरी लिहिताना लेखिकेने इतिहासाशी कुठेही प्रतारणा केलेली नाही परंतु कादंबरीमध्ये लालित्य आणण्यासाठी काही प्रसंग दंतकथेवर आधारित असल्याचे लेखिकेने नमूद केले आहे मात्र हे प्रसंग कादंबरीमध्ये इतके चपखलपणे बसले आहेत की ते दंतकथांवर आधारित आहेत हे कुठेही जाणवत नाही. संपूर्ण कादंबरीमध्ये बखरींमध्ये जी भाषा वापरली गेली आहे ती वापरण्यात आली आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक पानाच्या तळाला जे शब्द वाचकाला पटकन उमगणार नाहीत त्याचे अर्थ दिले आहेत. त्यामुळे ही भाषा कादंबरीचा आस्वाद घेताना कुठेही रसभंग होत नाही. अहिल्याबाई होळकरांचे कर्तृत्व खरोखरच देदीप्यमान आहे यात शंका नाही. अशा थोर आणि पुण्यश्लोक अहिल्याबार्इंचे चरित्र इतिहासाच्या अभ्यासकांनी आणि प्रत्येकाने वाचावे असेच आहे. -अमिता जामखेडकर ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 29-10-2006

    एका कर्तृत्वसुंदर स्त्रीचा जीवनालेख... इतिहासकालीन कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा परिचय वेगवेगळ्या कोनांमधून वाचकांसमोर येत असतो. अभ्यासकांच्या ध्यासातून त्यांच्या कर्तृत्वाचे आलेख मांडले जातात. अशाच एका संपन्न व्यक्तित्वाच्या तेजस्वी कर्तृत्वाचा आले ‘कर्मयोगिनी’ या पुस्तकात मांडण्यात आला आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावरील चरित्रकादंबरी लिहिली आहे विजया जहागिरदार यांनी. या कादंबरीच्या निमित्ताने अहिल्याबार्इंच्या समग्र कर्तृत्वाचा आढावा लेखिकेनं अभ्यासपूर्ण दृष्टीनं आणि त्या व्यक्तित्वावरील निष्ठेनं घेतल्याचं जाणवतं. अहिल्याबार्इंच्या अंगी असलेलं मुत्सदीपण, त्यांच्यातली ज्ञानलालसा, दूरदृष्टी, धर्मपरायणता तसंच प्रजावत्सलता, रणनीती निपुणता, राज्य कारभारातली कुशलता त्याचबरोबर कल्याणकारी वृत्ती, चारित्र्यातली निष्कलंकता, साधी राहणी अशा अनेकानेक गुणांनी लेखिका भारावून गेली असल्याचं सतत जाणवतं. त्यामुळे घसघशीत वाटावी अशी कादंबरी सिद्ध झालेली आहे. अंगणात चिमुरडी अहिल्या परकराचा घोळ सावरत रंगावली रेखत होती, या बालिकारूपापासून अहिल्याबार्इंचा वेध घेत जाणारी ही कादंबरी. त्यांच्यातल्या बाणेदार, तेजस्वी, धैर्यशील अशा विविध पैलूंचे दर्शन घडवत पुढे सरकते. एकामागोमाग येणारे अनेक कौटुंबिक आघात पचवण्याचं बळ या धीरादात्त मनस्विनीजवळ होतं म्हणून त्या कर्मगतीला सामोऱ्या जाऊ शकल्या आणि राज्यकारभार नीटपणे सांभाळू शकल्या. त्याची घडी विस्कटू दिली नाही. पती खंडेरावांनी आणि पुढे स्वपुत्र मालेरावांनी त्यांना अपमानास्पद वागणूक दिली. त्यांनी अनेक अपराध केले, अन्याय केले. त्यातूनही त्या घट्टपणे उभ्या राहत गेल्या. त्यांना कर्तव्यकठोर व्हावंच लागलं. या कटकटींमध्ये गुंतून पडत्या, तर राजनीतीची, समाजनीतीची मशाल कशी हाती धरली असती? अहिल्याबार्इंना आधार होतो तो फक्त सासरे मल्हारराव होळकरांचा. त्या गुणग्राहक माणसानं तर अहिल्याबार्इंमधली प्रज्ञा अधिक तेजस्वी केली. त्यांच्यातली क्षमता ओळखली. राजनीतीचा पहिला वस्तुपाठ दिला. संकटग्रस्त अहिल्याबार्इंना ते एकदा म्हणाले ‘‘आपला आवाका मोठा. आपण आहात तर दौलत आहे. तुम्हाला पोरवयात या कुळी उचलून आणली आणि नुसती कामास जुंपली... खंडेराव ते तसे निघाले... मालेराव हे असे... काही काही सुख नाही.’’ अशी ही कर्मयोगिनी! प्रसंगी कर्तव्यकठोर झाली. कारण त्यांच्यातली सदसदविवेकबुद्धी खूप धारदार होती. एक लोकोत्तर स्त्री म्हणून इतिहास त्यांची नोंद घेतो. त्यांच्या मृत्यूनं महेश्वरचे ‘पुण्यशील महाद्वार’ कोसळले असा सार्थ उल्लेख आहे. संपूर्ण महेश्वर हळहळावं असं आकाशव्यापी कर्तृत्व त्यांनी केलं होतं. अहिल्याबाई या तेजोमय स्त्रीचं दर्शन या कादंबरीत समग्रपणे होतं. तत्कालीन बोली भाषा वापरण्याचा चांगला प्रयत्न आहे. एक मात्र खरं, की राजनीतीकुशल अहिल्याबार्इंच्या प्रतिमेपेक्षा कौटुंबिक अहिल्याबार्इंची प्रतिमा यात अधिक ठसठशीतपणे उभी राहते. दोन्हींचा तोल सांभाळला जाता तर अधिक सशक्तपणा आला असता असे वाटते. वाचनाचा ओघ मात्र या कादंबरीत चांगला सांभाळलाय, ही नोंद घ्यायला हवी. -नंदा सुर्वे ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more