* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: KARMAYOGINI
  • Availability : Available
  • ISBN : 9788177664553
  • Edition : 9
  • Publishing Year : JANUARY 1991
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 392
  • Language : MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
SHE WAS A MUCH IGNORED PATRIOT OF INDIAN GLORY; SHE WAS A PICTURE OF PERFECT VALOUR. SHE HAD A MASCULINE NATURE, STRIVING HARD THROUGHOUT. SHE WAS PURE KINDNESS, COMPASSION. SHE WAS MOTHER EARTH, LOVING THIS LAND OF INDIA.
कर्मयोगिनी` म्हणजे भारतीय इतिहासातून उपेक्षित राहिलेले सोन्याचे पान. `कर्मयोगिनी` म्हणजे लखलखीत पराक्रमाची, शौर्याची धगधगती गाथा. `कर्मयोगिनी` आहे एका अखंड अंत:र्बाह्य युद्धाशी पुरुषार्थाने घेतलेली झुंज. `कर्मयोगिनी` म्हणजे अहिल्याबाई म्हणजेच मूर्तिमंत दया, क्षमा. `कर्मयोगिनी` म्हणजे या भारत-भूमीवर अलोट प्रेम करणारी

No Records Found
Original LanguageTranslated LanguageTranslated ByWebsite
MARATHIENGLISHMEHTA PUBLISHING HOUSE https://www.mehtapublishinghouse.com/book-details/KARMAYOGINI--col--LIFE-OF-AHILYABAI-HOLKAR/1834.aspx
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #KARMAYOGINI(AHILYABAIHOLKAR) #KARMAYOGINI #कर्मयोगिनी (अहिल्याबाई होळकर) #BIOGRAPHY #MARATHI #VIJAYAJAHAGIRDAR #विजयाजहागीरदार "
Customer Reviews
  • Rating StarAkash Balwante

    अहिल्याबाई होळकर यांची पुण्यश्लोक ही ओळख बऱ्याच जणांनी रंगवली आहे. त्याला अनेक कारणे आहेत जसे त्यांचा श्रद्धाळू स्वभाव, त्यांनी केलेला बऱ्याच मंदिरांचा जीर्णोद्धार, त्यांनी केलेला दानधर्म आणि इतर बरेच काही. पण लेखिकेने या पुस्तकात त्यांच्या पुण्यश्लक या प्रतिमेबरोबरच त्या कशा कर्मयोगिनी होत्या हे ही उत्तमरीत्या सांगितले आहे. त्यांचा मुत्सद्दी स्वभाव, फडणिशीत केलेले अतुल्य काम, राज्यकारभारी गुण, त्यांची न्यायदानी वृत्ती, राजपूत चंद्रावतांचा केलेला बिमोड, राघोबादादांना युद्ध न करताच घ्यायला लावलेली माघार, आप्त स्वकीय इहलोक सोडून जातानाही दाखवलेला खंबीरपणा अशा अनेक सद् गुणांचे दर्शन यात घडते. पुस्तकाला दोन भागात विभागले आहे. पहिल्या भागात त्यांचे बालपण, सासरकडचे सुरुवातीचे दिवस, सासरे मल्हाररावांकडून घेतलेले राजकारणाचे धडे, सासवांबरोबरची जवळीक, पती खंडेरावाकडून झालेला त्रास, स्वतःचे पोटच्या लेकरामुळे आलेली हतबलता लेखिकेने खूप उत्कृष्ठरित्या रंगवली आहे. दुसऱ्या भागात त्यांचे उत्तर जीवन दाखवले आहे ज्यात सुभेदार तुकोजी बरोबरचे सुरुवातीला असलेले चांगले आणि नंतर बिनसलेले संबंध, दुसरे मल्हारराव , रखमाबाई, नारो गणेश, बापू होळकर आदींशी आलेले संबंध, त्यांनी केलेले राजकारण, महादजी शिंदे सोबत भावांसारखे संबंध असूनही शिंदे आणि होळकर यात भांडणे होत असताना आलेली विवशता ते त्यांचा इहलोकीपर्यंतचा प्रवास छानरीत्या मांडला आहे. अहिल्याबाईनीं त्यांच्या जीवन काळात बरेच मृत्यू पाहिले. त्यांची सख्खी सासू , सासरे, सती गेलेल्या सावत्र सासवा, नवरा, सती गेलेल्या सवती, मुलगा मालेराव, सती गेलेल्या सुना , नातू नथोबा, सती गेलेल्या नातसूना, जावई यशवंतराव, सती गेलेली स्वतःची मुलगी मुक्ता आणि बरेच आप्तस्वकीय त्यांना सोडून गेले. अहिल्याबाई सासरे मल्हाररावांच्या विनंतीमुळे सती गेल्या नाहीत पण इतर लोकांकरवी त्यामुळे लागलेले बोल तसेच त्यांचे सती आणि तत्सम रूढी परंपरेवरचे विचार लेखिकेने सुंदररित्या मांडले आहेत. अहिल्याबाईंच्या जीवनकाळात बरेच पेशवे होऊन गेले. थोरले बाजीराव ज्यांनी छोट्या अहिल्येवर प्रभावित होऊन मल्हररावांना तिला सून करायला सांगितले त्यांपासून ते नानासाहेब, थोरले माधवराव , नारायणराव , रघुनाथराव आणि सवाई माधवरावांपर्यंत त्यांचे सर्वांशी कडूगोड सम्बन्ध राहिले. पेशवाईतल्या घडामोडी अहिल्येला सुरुवातीला मल्हाररावांकडून, नंतर तुकोजी कडून आणि इतर हेरांकडून खलित्या मार्फत समजताना अहिल्याबाईंचे त्यावरील वैयक्तिक मते आणि विचार मात्र वाचकांना कळत राहतात. अहिल्याबाईंनी जीवनात स्वकीयांबरोबर खूप झुंज दिली पण त्यांना बदलण्यात वा सुधारण्यात त्या सपशेल अपयशी ठरल्या जसे पती खंडेराव, मुलगा मालेराव, दुसरे सुभेदार तुकोजी, दुसरे मल्हारराव आणि इतर. त्याकाळच्या मुस्लिम राज्यकर्त्यांनी केलेली मंदिर आणि इतर धार्मिक स्थळांची नासधूस आणि या अवहेलनेने हिंदू सैनिक आणि लोकांमध्ये आलेली हतबलता रोखण्यासाठी सर्व प्रमुख धार्मिक स्थळांचा जीर्णोद्धार करून त्यांना पुनः प्रेरित करणे ही अहिल्याबाईंची दूरदृष्टी दाखवते. लेखिकेने पुस्तकात जुनी (18 व्या शतकातली मराठी) भाषा वापरली आहे त्यामुळे अहिल्याबाईंचे आणि इतर पात्रांचे संवाद हे खरे खरे वाटतात. जुन्या मराठी भाषेचा साज चढवून लेखिकेने या पुस्तकाला एका वेगळ्या उंचीवर नेले आहे. त्यामुळे हे चरित्र फक्त ऐतिहासिक कादंबरी न राहता अभ्यासपूर्ण इतिहासलेखन झाले आहे. या पुस्तकावर दोन जणांनी M. Phil. केले हे समजल्यावर आश्चर्य वाटायला नको. एकंदरीत ऐतिहासिक कादंबरी आवडणाऱ्याबरोबर मराठी इतिहास संशोधक तसेच विद्यार्थी यांनी आवर्जून वाचावे असा हा अमूल्य ठेवा आहे. ...Read more

  • Rating StarShrikant Adhav

    KARMAYOGINI (AHILYABAI HOLKAR) by VIJAYA JAHAGIRDAR एका योगिनीचा प्रवास... आपल्याला इतिहासावरून कायमच आकर्षण वाटत आले आहे. इतिहासातील व्यक्ती त्यांच्या कर्तृत्वामुळे आपल्याला आदर्शवत वाटतात आणि त्या कायमच स्मरणात राहतात. छत्रपती शिवाजी महाराज तर यचं मूर्तिमंत उदाहरण आहे. त्यांच्यावर असलेल्या श्रद्धेुळे त्यांच्यावर अनेक उत्तमोत्तम पुस्तके, चरित्रे अनेक मान्यवरांनी लिहिली आहेत. परंतु इतिहासात अशा काही व्यक्ती आहेत की, त्यांच्याबद्दल अत्यंत अल्प परिचय आपल्याला आहे. त्यांच्या अतुलनीय कार्याची माहिती आहे. पण ते वाचून त्यांच्या कार्याबद्दल आणखी माहिती करून घ्यायची उत्सुकता अधिक वाढते. अशा काही व्यक्तींपैकी एका अग्रणी असणारे नाव म्हणजे अहिल्याबाई होळकर. अहिल्याबाई होळकर यांना आपण मराठेशाहीचे आधारस्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मल्हारराव होळकरांची स्नुषा आणि एक अत्यंत सत्शील, धार्मिक आचरणाची व्यक्ती म्हणून प्रत्येक मराठी माणूस ओळखतो. पण त्यांची ही ओळख म्हणजे त्यांच्या अलौकिक अशा व्यक्तिमत्त्वातील काही अंशच म्हणावा लागेल. कारण अहिल्याबाई म्हणजे शिस्त, अहिल्याबाई म्हणजे एक मुत्सद्दी राजकारणी आणि समाजाकारणी, अहिल्याबाई म्हणजे एक खंबीर नेतृत्व, बाणेदारपणा अशी कितीतरी रूपं आपल्याला विजया जहागीरदार लिखित ‘कर्मयोगिनी’ या पुस्तकातून बघायला मिळतात.अहिल्याबाई होळकरांचा ७० वर्षांचा जीवनपट विजया जहागीरदार यांनी ‘कर्मयोगिनी’ या पुस्तकात मांडला आहे. अहिल्याबार्इंनी केवळ दानधर्म केला, ठिकठिकाणी घाट, देवळे, त्यांचा जीर्णोद्धारच केला असा आक्षेप त्यांच्यावर अनेक टीकाकारांनी घेतला आहे. लेखिकेने सदर पुस्तकाच्या माध्यमातून आहिल्याबार्इंवर घेण्यात आलेल्या आक्षेपांना चोख उत्तर दिले आहे. या पुस्तकातून त्यांनी अहिल्याबाई त्यांनी अहिल्याबार्इंची कधीही प्रकाशात न आलेली, कुणालाही फारशी ज्ञात नसलेली कर्तृत्वे अगदी समर्थपणे मांडली आहेत. अहिल्याबाई या जात्याच हुशार आणि अत्यंत कुशाग्रबुद्धीच्या. याच त्यांच्या कुशाग्रबुद्धीमुळे त्यांनी आपले सासरे सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या मार्गदर्शनाखाली राजकारणाचे धडे घेतले. अहिल्याबार्इंनी त्यांच्या जीवनात अनेक सुख-दु:खांचे चढउतार अनुभवले. यात प्रामुख्याने दु:खद प्रसंगच अधिक होते. अहिल्याबार्इंचा संसार म्हणजे वैशाखातील ऊन्हाप्रमाणेच होता. पतीचा विक्षिप्तपणा, त्यांचा मृत्यू, त्यांच्याबरोबर सती गेलेल्या नऊ सवती, गौतमाबाई आणि मल्हारराव यांचे मृत्यू, पुत्र मालोरावांचा नाकर्तेपणा, त्यांचा अकाली मृत्यू, तरुण नातवाचा दुर्दैवी मृत्यू, लहानग्या नातसुनांचे सती जाणे अशा कठीण प्रसंगांतही अहिल्याबाई खंबीर राहिल्या. आयुष्यामध्ये आलेल्या वेदनादायी प्रसंगामध्येही धीरोदात्तपणे उभे राहून संसाराचा गाडा अहिल्याबार्इंनी नेटाने रेटला. ज्या काळामध्ये अहिल्याबार्इंनी यशस्वी राजकारण आणि समाजकारण केले तो काळ लक्षात घेता त्यांचे हे कर्तृत्व किती महान होते हे लक्षात येते. पुरुषप्रधान वर्चस्व असलेल्या त्या काळामध्ये एका स्त्रीने एखाद्या संस्थानाचा कारभार बघायचा म्हणजे अत्यंत कठिण असे कर्म होते. राजकीय शत्रूंबरोबरच घरातील छुप्या शत्रूंनाही नामेहरम करण्याचे धारिष्ट्य अहिल्याबार्इंमध्ये होते. त्यांच्यातील कुशल राजकारणी आपल्याला या कादंबरीत अनेक ठिकाणी दिसतो. अहिल्याबाई होळकर यांच्यासारख्या महान व्यक्तिमत्त्वाच्या जीवनालेखाचा आढावा घेणं तसे कठीणच. पण हे लेखिकेने हे शिवधनुष्य लीलया पेलले आहे. अहिल्याबाई होळकरांचा जीवनपट उलगडणारी ही कादंबरी लिहिताना लेखिकेने इतिहासाशी कुठेही प्रतारणा केलेली नाही परंतु कादंबरीमध्ये लालित्य आणण्यासाठी काही प्रसंग दंतकथेवर आधारित असल्याचे लेखिकेने नमूद केले आहे मात्र हे प्रसंग कादंबरीमध्ये इतके चपखलपणे बसले आहेत की ते दंतकथांवर आधारित आहेत हे कुठेही जाणवत नाही. संपूर्ण कादंबरीमध्ये बखरींमध्ये जी भाषा वापरली गेली आहे ती वापरण्यात आली आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक पानाच्या तळाला जे शब्द वाचकाला पटकन उमगणार नाहीत त्याचे अर्थ दिले आहेत. त्यामुळे ही भाषा कादंबरीचा आस्वाद घेताना कुठेही रसभंग होत नाही. अहिल्याबाई होळकरांचे कर्तृत्व खरोखरच देदीप्यमान आहे यात शंका नाही. अशा थोर आणि पुण्यश्लोक अहिल्याबार्इंचे चरित्र इतिहासाच्या अभ्यासकांनी आणि प्रत्येकाने वाचावे असेच आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 30-01-2005

    एका योगिनीचा प्रवास... आपल्याला इतिहासावरून कायमच आकर्षण वाटत आले आहे. इतिहासातील व्यक्ती त्यांच्या कर्तृत्वामुळे आपल्याला आदर्शवत वाटतात आणि त्या कायमच स्मरणात राहतात. छत्रपती शिवाजी महाराज तर याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. त्यांच्यावर असलेल्या श्रद्धेुळे त्यांच्यावर अनेक उत्तमोत्तम पुस्तके, चरित्रे अनेक मान्यवरांनी लिहिली आहेत. परंतु इतिहासात अशा काही व्यक्ती आहेत की, त्यांच्याबद्दल अत्यंत अल्प परिचय आपल्याला आहे. त्यांच्या अतुलनीय कार्याची माहिती आहे. पण ते वाचून त्यांच्या कार्याबद्दल आणखी माहिती करून घ्यायची उत्सुकता अधिक वाढते. अशा काही व्यक्तींपैकी एका अग्रणी असणारे नाव म्हणजे अहिल्याबाई होळकर. अहिल्याबाई होळकर यांना आपण मराठेशाहीचे आधारस्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मल्हारराव होळकरांची स्नुषा आणि एक अत्यंत सत्शील, धार्मिक आचरणाची व्यक्ती म्हणून प्रत्येक मराठी माणूस ओळखतो. पण त्यांची ही ओळख म्हणजे त्यांच्या अलौकिक अशा व्यक्तिमत्त्वातील काही अंशच म्हणावा लागेल. कारण अहिल्याबाई म्हणजे शिस्त, अहिल्याबाई म्हणजे एक मुत्सद्दी राजकारणी आणि समाजाकारणी, अहिल्याबाई म्हणजे एक खंबीर नेतृत्व, बाणेदारपणा अशी कितीतरी रूपं आपल्याला विजया जहागीरदार लिखित ‘कर्मयोगिनी’ या पुस्तकातून बघायला मिळतात. अहिल्याबाई होळकरांचा ७० वर्षांचा जीवनपट विजया जहागीरदार यांनी ‘कर्मयोगिनी’ या पुस्तकात मांडला आहे. अहिल्याबार्इंनी केवळ दानधर्म केला, ठिकठिकाणी घाट, देवळे, त्यांचा जीर्णोद्धारच केला असा आक्षेप त्यांच्यावर अनेक टीकाकारांनी घेतला आहे. लेखिकेने सदर पुस्तकाच्या माध्यमातून आहिल्याबार्इंवर घेण्यात आलेल्या आक्षेपांना चोख उत्तर दिले आहे. या पुस्तकातून त्यांनी अहिल्याबाई त्यांनी अहिल्याबार्इंची कधीही प्रकाशात न आलेली, कुणालाही फारशी ज्ञात नसलेली कर्तृत्वे अगदी समर्थपणे मांडली आहेत. अहिल्याबाई या जात्याच हुशार आणि अत्यंत कुशाग्रबुद्धीच्या. याच त्यांच्या कुशाग्रबुद्धीमुळे त्यांनी आपले सासरे सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या मार्गदर्शनाखाली राजकारणाचे धडे घेतले. अहिल्याबार्इंनी त्यांच्या जीवनात अनेक सुख-दु:खांचे चढउतार अनुभवले. यात प्रामुख्याने दु:खद प्रसंगच अधिक होते. अहिल्याबार्इंचा संसार म्हणजे वैशाखातील ऊन्हाप्रमाणेच होता. पतीचा विक्षिप्तपणा, त्यांचा मृत्यू, त्यांच्याबरोबर सती गेलेल्या नऊ सवती, गौतमाबाई आणि मल्हारराव यांचे मृत्यू, पुत्र मालोरावांचा नाकर्तेपणा, त्यांचा अकाली मृत्यू, तरुण नातवाचा दुर्दैवी मृत्यू, लहानग्या नातसुनांचे सती जाणे अशा कठीण प्रसंगांतही अहिल्याबाई खंबीर राहिल्या. आयुष्यामध्ये आलेल्या वेदनादायी प्रसंगामध्येही धीरोदात्तपणे उभे राहून संसाराचा गाडा अहिल्याबार्इंनी नेटाने रेटला. ज्या काळामध्ये अहिल्याबार्इंनी यशस्वी राजकारण आणि समाजकारण केले तो काळ लक्षात घेता त्यांचे हे कर्तृत्व किती महान होते हे लक्षात येते. पुरुषप्रधान वर्चस्व असलेल्या त्या काळामध्ये एका स्त्रीने एखाद्या संस्थानाचा कारभार बघायचा म्हणजे अत्यंत कठिण असे कर्म होते. राजकीय शत्रूंबरोबरच घरातील छुप्या शत्रूंनाही नामेहरम करण्याचे धारिष्ट्य अहिल्याबार्इंमध्ये होते. त्यांच्यातील कुशल राजकारणी आपल्याला या कादंबरीत अनेक ठिकाणी दिसतो. अहिल्याबाई होळकर यांच्यासारख्या महान व्यक्तिमत्त्वाच्या जीवनालेखाचा आढावा घेणं तसे कठीणच. पण हे लेखिकेने हे शिवधनुष्य लीलया पेलले आहे. अहिल्याबाई होळकरांचा जीवनपट उलगडणारी ही कादंबरी लिहिताना लेखिकेने इतिहासाशी कुठेही प्रतारणा केलेली नाही परंतु कादंबरीमध्ये लालित्य आणण्यासाठी काही प्रसंग दंतकथेवर आधारित असल्याचे लेखिकेने नमूद केले आहे मात्र हे प्रसंग कादंबरीमध्ये इतके चपखलपणे बसले आहेत की ते दंतकथांवर आधारित आहेत हे कुठेही जाणवत नाही. संपूर्ण कादंबरीमध्ये बखरींमध्ये जी भाषा वापरली गेली आहे ती वापरण्यात आली आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक पानाच्या तळाला जे शब्द वाचकाला पटकन उमगणार नाहीत त्याचे अर्थ दिले आहेत. त्यामुळे ही भाषा कादंबरीचा आस्वाद घेताना कुठेही रसभंग होत नाही. अहिल्याबाई होळकरांचे कर्तृत्व खरोखरच देदीप्यमान आहे यात शंका नाही. अशा थोर आणि पुण्यश्लोक अहिल्याबार्इंचे चरित्र इतिहासाच्या अभ्यासकांनी आणि प्रत्येकाने वाचावे असेच आहे. -अमिता जामखेडकर ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 29-10-2006

    एका कर्तृत्वसुंदर स्त्रीचा जीवनालेख... इतिहासकालीन कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा परिचय वेगवेगळ्या कोनांमधून वाचकांसमोर येत असतो. अभ्यासकांच्या ध्यासातून त्यांच्या कर्तृत्वाचे आलेख मांडले जातात. अशाच एका संपन्न व्यक्तित्वाच्या तेजस्वी कर्तृत्वाचा आले ‘कर्मयोगिनी’ या पुस्तकात मांडण्यात आला आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावरील चरित्रकादंबरी लिहिली आहे विजया जहागिरदार यांनी. या कादंबरीच्या निमित्ताने अहिल्याबार्इंच्या समग्र कर्तृत्वाचा आढावा लेखिकेनं अभ्यासपूर्ण दृष्टीनं आणि त्या व्यक्तित्वावरील निष्ठेनं घेतल्याचं जाणवतं. अहिल्याबार्इंच्या अंगी असलेलं मुत्सदीपण, त्यांच्यातली ज्ञानलालसा, दूरदृष्टी, धर्मपरायणता तसंच प्रजावत्सलता, रणनीती निपुणता, राज्य कारभारातली कुशलता त्याचबरोबर कल्याणकारी वृत्ती, चारित्र्यातली निष्कलंकता, साधी राहणी अशा अनेकानेक गुणांनी लेखिका भारावून गेली असल्याचं सतत जाणवतं. त्यामुळे घसघशीत वाटावी अशी कादंबरी सिद्ध झालेली आहे. अंगणात चिमुरडी अहिल्या परकराचा घोळ सावरत रंगावली रेखत होती, या बालिकारूपापासून अहिल्याबार्इंचा वेध घेत जाणारी ही कादंबरी. त्यांच्यातल्या बाणेदार, तेजस्वी, धैर्यशील अशा विविध पैलूंचे दर्शन घडवत पुढे सरकते. एकामागोमाग येणारे अनेक कौटुंबिक आघात पचवण्याचं बळ या धीरादात्त मनस्विनीजवळ होतं म्हणून त्या कर्मगतीला सामोऱ्या जाऊ शकल्या आणि राज्यकारभार नीटपणे सांभाळू शकल्या. त्याची घडी विस्कटू दिली नाही. पती खंडेरावांनी आणि पुढे स्वपुत्र मालेरावांनी त्यांना अपमानास्पद वागणूक दिली. त्यांनी अनेक अपराध केले, अन्याय केले. त्यातूनही त्या घट्टपणे उभ्या राहत गेल्या. त्यांना कर्तव्यकठोर व्हावंच लागलं. या कटकटींमध्ये गुंतून पडत्या, तर राजनीतीची, समाजनीतीची मशाल कशी हाती धरली असती? अहिल्याबार्इंना आधार होतो तो फक्त सासरे मल्हारराव होळकरांचा. त्या गुणग्राहक माणसानं तर अहिल्याबार्इंमधली प्रज्ञा अधिक तेजस्वी केली. त्यांच्यातली क्षमता ओळखली. राजनीतीचा पहिला वस्तुपाठ दिला. संकटग्रस्त अहिल्याबार्इंना ते एकदा म्हणाले ‘‘आपला आवाका मोठा. आपण आहात तर दौलत आहे. तुम्हाला पोरवयात या कुळी उचलून आणली आणि नुसती कामास जुंपली... खंडेराव ते तसे निघाले... मालेराव हे असे... काही काही सुख नाही.’’ अशी ही कर्मयोगिनी! प्रसंगी कर्तव्यकठोर झाली. कारण त्यांच्यातली सदसदविवेकबुद्धी खूप धारदार होती. एक लोकोत्तर स्त्री म्हणून इतिहास त्यांची नोंद घेतो. त्यांच्या मृत्यूनं महेश्वरचे ‘पुण्यशील महाद्वार’ कोसळले असा सार्थ उल्लेख आहे. संपूर्ण महेश्वर हळहळावं असं आकाशव्यापी कर्तृत्व त्यांनी केलं होतं. अहिल्याबाई या तेजोमय स्त्रीचं दर्शन या कादंबरीत समग्रपणे होतं. तत्कालीन बोली भाषा वापरण्याचा चांगला प्रयत्न आहे. एक मात्र खरं, की राजनीतीकुशल अहिल्याबार्इंच्या प्रतिमेपेक्षा कौटुंबिक अहिल्याबार्इंची प्रतिमा यात अधिक ठसठशीतपणे उभी राहते. दोन्हींचा तोल सांभाळला जाता तर अधिक सशक्तपणा आला असता असे वाटते. वाचनाचा ओघ मात्र या कादंबरीत चांगला सांभाळलाय, ही नोंद घ्यायला हवी. -नंदा सुर्वे ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more