* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: SHANTARAM
  • Availability : Available
  • Translators : APARNA VELANKAR
  • ISBN : 9788184980530
  • Edition : 4
  • Publishing Year : APRIL 2010
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 1428
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
A NOVEL OF HIGH ADVENTURE, GREAT STORYTELLING AND MORAL PURPOSE, BASED ON AN EXTRAORDINARY TRUE STORY OF EIGHT YEARS IN THE BOMBAY UNDERWORLD. ‘IN THE EARLY 80S, GREGORY DAVID ROBERTS, AN ARMED ROBBER AND HEROIN ADDICT, ESCAPED FROM AN AUSTRALIAN PRISON TO INDIA, WHERE HE LIVED IN A BOMBAY SLUM. THERE, HE ESTABLISHED A FREE HEALTH CLINIC AND ALSO JOINED THE MAFIA, WORKING AS A MONEY LAUNDERER, FORGER AND STREET SOLDIER. HE FOUND TIME TO LEARN HINDI & MARATHI, FALL IN LOVE, AND SPEND TIME BEING WORKED OVER IN AN INDIAN JAIL. THEN, IN CASE ANYONE THOUGHT HE WAS SLACKING, HE ACTED IN BOLLYWOOD AND FOUGHT WITH THE MUJAHEDEEN IN AFGHANISTAN... AMAZINGLY, ROBERTS WROTE SHANTARAM THREE TIMES AFTER PRISON GUARDS TRASHED THE FIRST TWO VERSION. IT`S A PROFOUND TRIBUTE TO HIS WILLPOWER... AT ONCE A HIGH-KICKING, EYE -GOUGING ADVENTURE, A LOVE SAGA AND A SAVAGE YET TENDERLY LYRICAL FUGITIVE VISION. TIME OUT ‘EXTRAORDINARILY VIVID...A GIGANTIC, JAW-DROPPING, GRITTILY AUTHENTIC SAGA` DAILY MAIL ‘POWERFUL AND ORIGINAL... A REMARKABLE ACHIEVEMENT` SUNDAY TELEGRAPH ‘VIVID AND COMPASSIONATE... IMPRESSIVE` GUARDIAN ‘A PUBLISHING HENOMENON` SUNDAY TIMES
दूर देशाहून आलं होतं एक गोरं पाखरू. पळून आलं होतं. तुटलं होतं माणसांपासून... मातृभूमीपासून... जगण्यापासूनच! मागावर असलेले पोलीस आणि स्वत:च्या डागाळलेल्या आयुष्याची लाज वाटणारं मन यापासून त्याला पळून जायचं होतं... लपून राहायचं होतं.ते उतरलं होतं मुंबईत. अंधारी, काळी, कलकलाटाची दुनिया. पिचलेली... तरीही ताठ उभ्या कण्याची! क्षणात नरडीचा घोट घेणारी, क्षणात प्रेमाची पाखर घालून पोटाशी कवटाळणारी दुनिया! घर सुटलेलं, कुटुंब तुटलेलं, जिवलग दुरावलेले, अशा शून्य अवस्थेत भिरभिरणारं ते एकुट पाखरू शिरलं मुंबईच्या कुशीत. – आणि बघता बघता सारं बदललं. एक नवीच दुनिया उलगडत गेली. प्रेमाचा पाऊस... द्वेषाचा जाळ... विश्वासघाताचे सुरे... रहस्यांचं चक्रव्यूह आणि गुपितांच्या गुहा! शरीरसुखाच्या उफाळत्या लाटांवर नाचणारा उत्कट प्रणय आणि तुरुंगाच्या अंधारकोठडीतला रक्तरंजित छळ. जगण्याच्या लढाईत धगधगणा-या झोपड्या आणि पंचतारांकित हॉटेलातलं थंडगार ऐश्वर्य. अंडरवल्र्डमधल्या टोळीयुद्धांच्या चिखलात रुजलेली तत्त्वज्ञानाची कमळं आणि बॉलीवुडच्या झगमगाटाआडचा सुन्न अंधार. या कहाणीत काय नाही? तिच्या पोटाशी आहे पंखांवर खिळे ठोकणा-या नियतीला झुगारून, जगण्याचा अर्थ शोधत भिरभिरणारं एक पाखरू, त्याच्या पंखांवरचे प्रेमाचे रंग आणि एक शहर – मुंबई.
`द फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स, न्यू दिल्ली` तर्फे`शांताराम` या पुस्तकाच्या मुखपृष्टासाठी प्रथम पुरस्कार २०१०

No Records Found
No Records Found
Keywords
"#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES #SHANTARAM #SHANTARAM #शांताराम #FICTION #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #APARNAVELANKAR #अपर्णावेलणकर #GREGORYDAVIDROBERTS "
Customer Reviews
  • Rating StarNitin Marathe

    अभिनय व लेखनाची आवड , प्रथमोपचारा चे ज्ञान आणि सामान्य लोकांच्या भले पणावर विश्वास असणारा हा तरुण. प्रस्थापित सत्ते विरूद्ध उठाव करता करता वाईट संगतीमुळे ड्रग च्या नशे चा बळी,त्या मुळे बँका लुटायचे सत्र , घट स्फोट व शेवट तुरुंगात. पण नंतर हा ऑस्ट्ेलिया मधून तुरुंग फोडून फरार होतो व बनावट पासपोर्ट वर 1982 मध्ये भारतात प्रवेश करतो. मुंबई मध्ये काही दिवस सामान्य हॉटेल मध्ये राहिल्यावर मराठी मित्राबरोबर जळगाव च्या जवळ मित्रा च्या गावात सहा महिने मुक्काम. या दिवसात मराठी वर शिव्यांच्या बारकाव्या सहित प्रभुत्व. इथेच मित्रा ची आईने शांताराम असे बारसे करते. गावाकडून परतल्यावर कुलाब्याच्या झोपडपट्टीत मुक्काम कारण बरोबर आणलेला पैसा खतम. तिथे याच्या लिंडसे या नकली नावाचे " लिन बाबा " असे नामकरण त्याचा मित्र करतो.विदेशी नागरिकांना currency बदलून देणे ,गांजा हशीश पुरवणे असे उद्योग करून गुजराण करू लागतो. या ही दिवसात झोपडपट्टीत प्राथमिक वैद्यकीय सेवे करता दवाखाना चालवतो आणि तेथील स्थानिक लोकांच्या जीवनाशी सर्वर्था ने एकरूप होऊन जीवनाचा आनंद घेत असतो . या माणसाने मुंबई तील फोर्ट भागातील गल्ली न गल्ली पाया खालून घातली. लिओपोल्ड या इराणी कॅफे / बार मध्ये तासन तास विदेशी मित्रां बरोबर पडीक. मुंबई तील गुन्हेगारी,त्या मध्ये इराणी , अफगाणी , लेबानिस , पाकिस्तानी आणि नायजेरी टोळ्यांचा सहभाग. विदेशी चलन , बनावट पासपोर्ट / विसा , ड्रग राकेट आणि वेश्याव्यवसाय या सर्व गैर धंद्या ची सखोल माहिती. या सर्व गोष्टी वाचून आपण चकित होऊन जातो. आपल्याला मुंबई च्या गुन्हेगारी विश्वाचे नागडे दर्शन होते. या नंतर त्याचे प्रेमप्रकरण आणि मैत्रिणी करता कुंटन खान्या च्या मॅडम बरोबर पंगा घेतल्या मुळे हा हकनाक आर्थर रोड च्या जेल मध्ये पिचत पडतो. जेल मधले त्याचे अनुभव वाचून अंगावर अक्षरशः शहारे येतात. local डॉन पैसे देऊन याची सुटका करवतो. नंतर हा त्या डॉन साठी foreign currency आणि बनावट पासपोर्ट च्या धंद्यात काम करू लागतो. आता पैसा त्याच्या पायाशी लोळत असतो. या पुस्तकात जागोजागी जीवन , मित्र, प्रेम आणि ईश्वरा विषयीचे तत्वज्ञान , भारतीय लोकां चा जगण्यातल्या साध्या साध्या गोष्टीचा आनंद घ्यायची वृत्ती आणि मुंबई तील झोपडपट्टी मधील दादागिरी ते आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी अशा वेगवेगळ्या गोष्टी हातात हात घालून वावरत आहेत. कौतुक याचे वाटते की हा विदेशी माणूस झोपडपट्टी किंवा भारतातली गरिबी याची तक्रार करत नाही तर येथील लोकांच्या जिंदादिली मुळे , आयुष्य जगणं कसे सोपे होते ते सांगतो. भारतीय लोक दिवस भर हिंदी गाणी गात , चित्रपट बघत , वेग वेगळे सण साजरे करत जीवनाचा उत्सव करतात असे त्याला वाटते. आजही मुंबई ला तो आपले Home town मानतो. शेवटी तो डॉन च्या आग्रहा मुळे अफगाणिस्तान मध्ये तेथील युद्धात भाग घेण्यास जातो. हा सर्व भाग अविश्र्वनिय आहे. शेवटी ही एक कादंबरी आहे पण यातील बराचसा भाग लेखकाने अनुभवला आहे. आपल्याच मुंबई ची आणि तेथल्या रगेल आणि रंगेल जनतेची ग्रेग आपल्याला वेगळीच ओळख करून देतो. आणि सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे ... मराठी वर प्रेम करणाऱ्या ग्रेग ने मराठी अनुवाद केलेली प्रकरण ऐकून हे भाषांतर आतापर्यंतचे सर्वोत्कृष्ट भाषांतर आहे अशी अपर्णा वेलणकर यांना पावती दिली. कारण ही कादंबरी 38 भाषांमध्ये translate झाली आहे. अपर्णा ताईंचे कौतुक जेवढे करावे तेवढे थोडेच , कारण आपण अस्सल भारतीय गोष्ट वाचतोय असे वाटते. ...Read more

  • Rating StarSwamish Naik

    हे पुस्तक काही वर्ष आधी वाचाय चा योग्य आला ... खूप पाने आहेत आधी तर उचलू कि नाही असा झाला ... पण लेखकांची अक्खी दुनिया भावली आहे खिळली आहे ... काय ते लिखाण काय ती पात्र वाह !

  • Rating StarShriprasad Kulkarni

    लॉकडाउन च्या पार्श्वभूमीवर पुण्यावरून गावाकडे निघत असताना माहीत होतं की हा मोठ्ठा टप्पा, त्यात घरातून काम (वर्क फ्रॉम होम) त्यात आमच्या सिटीबँकेच्या च्या रामनवमी, पाडवा, महावीरजयंती या आणि अश्या बऱ्याच सणांच्या सुट्ट्यामुळे महिनाभरात जवळपास फक् 10-12 दिवस ऑफिस. घराबाहेर कोरोना. त्यात वडील मोबाईल मध्ये जास्त डोकं घालू देत नाहीत. ☺️ तर घरात हा इतका वेळ घालवायचा तर पुस्तकच पाहिजे, तेही तितक्याच तोलामोलाचं. खिळवून ठेवणारं. मागे जवळपास सहा महिन्यांपूर्वी अविनाश धर्माधिकारी सरांनी "शांताराम" च्या अपर्णा वेलणकर यांनी केलेल्या मराठी अनुवादाचा उल्लेख केला होता. सरांनी सांगितलं म्हणून मागवलं पुस्तक. पुस्तक 1400 पानांचं, म्हणून वाचायची ताकत झाली नाही कधी.फक्त घरातल्या बुक शेल्फ ची शोभा वाढवत होतं. पण या अश्या मोकळ्या आणि निवांत वेळेसाठी पुस्तक कोणतं घ्यायचं, लागलीच "शांताराम" डोक्यात आलं,म्हणून गावाकडे निघताना उचललं आणि टाकलं गाडीत. तर "शांताराम" लिहिलंय ग्रेगरी डेव्हिड रोबर्ट्स यांनी. हो लेखक विदेशी आहे, ऑस्ट्रेलिया चा. मागे पाचएक वर्षाखाली शांताराम ची मूळ इंग्रजी आवृत्ती वाचलीय. त्यावेळेस उद्देश होता इंग्रजी वाचुन इंग्रजी सुधारण्याचा. खरंच फरक पडला. एकाच पुस्तकात थरार आहे, रोमान्स आहे, साहस- ऍडव्हेंचर तर आहेच सोबत आहे तत्वज्ञान तेही तुम्हा आम्हाला रुचेल आवडेल पटेल अश्या भाषेत. त्यामुळे पुस्तकाचा जॉनर- शैली सांगणं अवघड. असो, "डेव्हिड" कथेचा नायक, स्वतः लेखक - जेमतेम विशीतला. सशस्त्र दरोड्याचा गंभीर आरोपाखाली वीस वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा झालेला, ऑस्ट्रेलियातील तुरुंग फोडून पळाला, ऑस्ट्रेलिया चा "मोस्ट वॉन्टेड मॅन" ज्याचं नाव इंटरपोल च्या यादीतही आहे. न्युजिलँड मार्गे लिंडसे नावाने बनवलेल्या बनावट कागदपत्राद्वारे सत्तरीच्या च्या दशकात मुंबईत येतो. आणि पुस्तकाच्या पहिल्या पानापासून थरारक कहाणी सुरू होते. "लिंडसे" मुंबईत पाऊल टाकतो आणि या शहराच्या प्रेमात पडतो. मुंबईत आल्या आल्या गाईड म्हणून प्रभाकर उर्फ प्रभू त्याला भेटतो, नंतर तो त्याचा एकदम जवळचा मित्रही होतो. प्रभाकर लिंडसे ला "लिन" असं नाव देतो. कार्ला सारखी मैत्रीण भेटते सोबत डीडीयर, उल्ला, मोदेना या पत्रांभोवती कथा फिरत राहते. कार्ला च्या एकतर्फी प्रेमात पडतो. गाईड प्रभूचं काम असतं मुंबई ची ओळख करून देणं, इथली चाल चलन शिकवणं. प्रभुही एकदम हाडाचा गाईड, तो शहरातल्या वैध अवैध गोष्टी कश्या चालतात याची एका पाठोपाठ रोज एका ठिकाणी घेऊन जाऊन माहिती देतो. त्याला मराठी शिकवतो हिंदी सुद्धा. प्रभू लिन ला मुंबई सोडून खरा भारत कसा आहे हे दाखवायला त्याच्या जळगाव जिल्ह्यातल्या त्याच्या गावी घेऊन जातो. लिन च्या नजरेतून गावाची संस्कृती वाचायला मजा येते. लिन साठी भारतीय पद्धतीने तांब्याने बकेटातील पाणी खांद्यावर घेऊन अंघोळ करायचा अनुभव सुद्धा एकदम नवीन असतो. पिके चित्रपटातील परग्रहावरून आलेल्या पिकेप्रमाणे लिनबाबा ची अवस्था असते. परत मुंबई. परत कार्ला, उल्ला, डीडीयर,मोदेना आणि अशी इतर पात्र येत राहतात, आणि पुढे अंडरवर्ल्ड चा थरार, वेश्याव्यवसाय, ड्रग्स हे सर्व चालू असतंच पण मुळात शांताराम मध्ये आहे प्रेम. प्रेम- दोन मित्रातलं, प्रेम- इथल्या लोकांवरचं, प्रेम-मुंबई शहरावरचं, भारतीय संस्कृती वरचं. इथल्या भाषेवरचं. मग त्याला इतकं सगळं इथलं आवडलंय तर लिन परत ऑस्ट्रेलिया जातो का? तो इतक्या मोठ्या बेस्ट सेलर पुस्तकाचा लेखक झाल्यावर त्याला त्याचा देश स्वीकारतो का? की राहतो इथेच आपल्या देशात. यांची उत्कंठा शेवट पर्यंत असतेच पण त्यासोबत आणखीन एक प्रश्न पूर्ण पुस्तक वाचत असताना सतत आपल्या डोक्यात असतो, पुस्तकाचं नाव "शांताराम" कशामुळे? कारण एकही पात्र नाहीये ज्याचं नाव शांताराम आहे. त्याचं उत्तर मिळतं पुस्तकाच्या मध्यात. मराठी अनुवाद माझाही अजून पूर्ण वाचून झाला नाहीये. पण इतकं मात्र नक्की. "शांताराम" हातात घेतला की खाली ठेववत नाही. खिळवून ठवतो. वाचनीय आणि संग्रहनिय असं पुस्तक. ...Read more

  • Rating StarHemant Suryavanshi

    ग्रेगरी राॅबर्ट ची "शांताराम" उत्कृष्ट आहे....

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more

I HAVE A DREAM
I HAVE A DREAM by RASHMI BANSAL Rating Star
Krishna Diwate

‘स्टे हंग्री स्टे फूलीश’ आणि ‘कनेक्ट द डॉटस’ या बेस्ट सेलर पुस्तकाच्या लेखिका ‘समाजातल्या परंपरागत समस्या सोडवण्याचा नवा मार्ग शोधून काढणार्‍या वीस सामाजिक उद्योजकांच्या प्रेरणादायी कहाण्या’ हे वाक्य पुस्तकाचे पहिले पान उघडले आणि दिसले. त्यामुळे माझ कुतुहल चाळवले आणि ते पुस्तक वाचायला सुरुवात केली. मनोगतात लेखिका म्हणतात की, आता नव्या दमाचे, डोक्याने आणि मनाने ही विचार करणारे काही जण एखाद्याच्या नजरेतील दुःख ओळखतात, पेटून उठतात; पण ते त्याच्यावर विचार एखाद्या उद्योजकाप्रमाणे करतात. म्हणून ते ‘सामाजिक उद्योजक.’ नफा मिळविण्याचा हव्यास नसला तरी ते बिझनेस मधील तत्वे वापरून ती गोष्ट साध्य करतात. हे काही तरी वेगळे आपण वाचत आहोत असे मला वाटले. त्यामुळेच ते पुस्तक वाचायला घेतले. ह्या मध्ये वीस लोकांची चरीत्रे आहेत. ते सर्व भारतीय, उच्चशिक्षित तरूण तरूणी आहेत. कोणी त्यातील शास्त्रज्ञ आहेत तर कोणी मरिन बायोलॉजिस्ट, आयआयटी, आयआयएम ग्रॅज्युएट आहेत पण कोणत्या कोणत्या सामाजिक प्रश्नाने ते अस्वस्थ झाले आणि नेहमीच्या मार्गाने न जाता वेगळीच वाट पकडली. पुस्तकात ‘रेनमेकर्स,’ ‘चेंजमेकर्स’ व ‘स्पिरिच्युअल कॅपिटॅलिस्ट’ असे तीन भाग आहेत. प्रत्येकात अनुक्रमे अकरा,सहा व तीन व्यक्तीमत्वांची ओळख करून दिली आहे. ‘सुलभ’ ही आधुनिक टॉयलेटस उभारणारे बिंदेश्वर पाठक ह्याच्या चरित्राने पुस्तकाची सुरुवात होते. जातीने बिहारमधील ब्राह्मण. पण लहानपणी टॉयलेटस साफ करणार्‍याला हात लावला त्यामुळे आजीने अक्षरशः शेण, गोमुत्र खायला लावले. पण त्याच बिंद्रेश्वरांनी अगदी योगायोगाने ह्याच क्षेत्रात काम करण्याचे ठरविले. अर्थात ही वाट निश्चितच सोपी नव्हती. अनेक हालअपेष्टा सोसत, जगाचे धक्के खात, अनेक समस्यांना तोंड देत आपले स्वप्न ‘सुलभ शौचालयाच्या’ माध्यमातून सुरु केले. तो सगळा खडतर प्रवास अर्थात पुस्तकातूनच वाचायला हवा. त्यासाठी त्यांनी केवळ ती यंत्रणा तयार केली नाही तर ती टॉयलेटस बांधून, त्यासाठी लागणारी प्रेरणा, शिक्षण, संभाषण, ट्रेनिंग, पाठपुरावा अशा सर्वच गोष्टी ‘सुलभ’ तर्फेच संभाळल्या जातात. सध्या ही संस्था स्वबळावर चालते. 100 ते 125 कोटी इतके तिचे वर्षाचे उपन्न आहे. इतकेच नाही पूर्वी जे लोक सफाईचे काम करत असत त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च संस्था करत आहे. ‘सुलभ पब्लिक स्कूल’ नावाने शाळा सुरु केली आहे. तरूणांसाठी व्होकेशनल क्लासेस चालवले जातात. म्हणजे मिळालेला नफा पुन्हा त्याच सफाई कामगारांच्या कल्याणासाठी वापरला जातो. टॉयलेटस बांधून भरपूर पैसा मिळवता येतो हे वाक्य पचायला जरा जडच जाते. अनिता आहुजा ही दिल्लीत सुखवस्तू कुटूंबात रहाणारी सामान्य स्त्री. पण कचरा वेचणार्‍या मुलांचे हाल पाहून त्यांच्यासाठी काही तरी करावे असे तिने ठरविले. तिने 1998 मध्ये कॉन्झर्व्ह नावाची संस्था उभी केली. व त्यातून पहिला प्रोजेक्ट सुरु केला तो म्हणजे आजुबाजूच्या परिसरातील कचरा उचलून त्याचे कंपोस्टखत तयार करणे. कचरा गोळा करण्यासाठी चांगल्या ढकलगाड्या आणल्या, युनिफॉर्म, आय कार्डची सोय केली. 2002 पर्यंत एक पूर्ण वेळ काम करणारी मोठी संस्था बनली. त्याचवेळी त्यांनी प्लॅस्टीकच्या कचर्‍यावर प्रयोग सुरु केले. तिचे पती शलभ ह्यांनी बिटस पिलानी मधून इंजिनिअरींग केले आहे. त्यांच्या मदतीने तिने फॅक्टरी सुरु करण्याचे ठरविले. शलभने मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक शीटस निर्मिती करू शकेल असे मशीन तयार केले. त्यासाठी अर्थातच अनेक प्रश्न समोर उभॆ राहिले. चुका झाल्या, ठोकरा खाल्या पण त्यातून वाट काढत त्यांनी चिकाटीने प्रयत्न सुरुच ठेवले. आज दोघे मिळून कचर्‍यातील प्लॅस्टिक पिशव्या वापरून आकर्षक अशा हॅडबॅगस तयार करण्याचा कारखाना चालवतात. जे लोक सुरुवातीला केवळ कचरा उचलण्याचे काम करत होते, त्यांच्या काही कौशल्य दिसले की त्यांना वेगळे काढून ट्रेनिंग दिले जाते. मशीनवर असिस्टंटचे काम करू लागतात त्यातून काही लोक तर ग्रुप लिडर ही झाले आहेत. कटींग करणॆ, क्वालिटी तपासणॆ, फिनिंशींग, पॅकिंग अशी सर्व महत्वाची कामे ते करतात. आता ते कामगार झाल्यामुळॆ त्यांना चांगला पगार, प्रॉव्हिडंट फंड, ओव्हरटाईम अशा सुविधा मिळू लागल्या त्यापेक्षा ही जास्त त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळाली. त्यांच्या साठी हे नवीनच आहे. अनिता व शलभ दोघॆही मेहनत घेतात पण एनजीओ असून ही भरपूर पैसा कमावणे त्यांना चुकीचे वाटत नाही. कारण आज ह्या एका उद्योगामुळे कित्येक कुटूंबाची आर्थिक स्थिती बदलून गेली आहे. अशीच अजून एक प्रेरणादायी कथा दिल्लीतील रंगसूत्र कंपनी चालविणार्‍या सुमिता घोस ह्यांची. स्वतः ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यावर मास्टर इन इकॉनॉमिक्स ची पदवी घेतल्यावर संजॉय घोस ह्या या आय आर एम मधून शिक्षण घेतलेल्या ध्येयवादी तरूणाशी लग्न केले. पण दुर्दैवाने आसाममध्ये काम करत असताना त्यांची 1998 मध्ये उल्फाच्या अतिरेक्यांनी हत्या केली. त्यानंतर अनेक टक्केटोणपे खात, दोन लहान मुलांचा संभाळ करत सुमिताने ‘रंगसूत्र’ नावाची कंपनी काढली. त्याच्या मार्फत ती खॆडॆगावातल्या लोकांकडून कापड, शोभॆच्या वस्तू, बनवून घेते आणि त्या फॅब ईंडीयासारख्या प्रसिध्द कंपन्यांना विकते. जैसलमेर, बारमेर जिल्ह्यातले कारागिर तिच्यासोबत काम करत आहेत. अजून एक अशीच ध्येयवादी तरूणी म्हणजे इशिता खन्ना. डेहराडून मध्ये जन्म झालेली एक सर्वसामान्य मुलगी. पण निसर्गसंवर्धन आणि भूगोल या विषयांची आवड असलेली. म्हणूनच तिने आपल्या ग्रॅज्युएशन नंतर टाटा इंन्स्टीट्यूट मधून मास्टर्स केले. पर्यावरण क्षेत्रातच काम करायचे आहे हे निश्चित ठरवून तिने काही वर्षे नोकरी केली. त्यानंतर 2002 मध्ये नोकरी सोडून आपल्या दोन मित्रांसोबत स्पिती व्हॅलीमध्ये मूस नावाची एन्जीओ सुरु केली. तेथील स्थानिक महिलांचे ग्रुपस करून त्यांना तिथे असणार्‍या सीबक थॉर्न ह्या फळांच्या लागवडीचे ट्रेनिंग दिले. त्यावर प्रक्रिया करायला शिकवले. ही झाडॆ मातीला धरून ठेवतात त्यामुळे धूप रोखली जाते, शिवाय नायट्रोजन ही धरून ठेवत असल्याने जमिनीचा पोत सुधारतो. त्यामुळे ह्या फळांवर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे तिथल्या बायकांना चांगला रोजगार मिळू लागला. त्याचबरोबर तिने स्थानिक तरूणांना पर्यटकांना ट्रेक किंवा जीप सफारीसाठी नेणे, कॅम्प लावणे, गरज पडल्यास प्रथमोपचार करणे ही कामे ही करायला शिकवले. कारण हळूहळू तिथे पर्यटन वाढू लागले. ते इको-फ्रेंडली करण्याकडॆ तिच्या इकोस्पियर संस्थेचा भर आहे. आता दरवर्षी पर्यटनातून 35 ते 40 लाखाचे उत्पन्न मिळते.आणि त्यातून नफा ही मिळतो. इकोस्पियर संस्थेने शेजारच्य़ा ‘लाहुल’ व्हॅलीमध्ये ही विकास कामे सुरु केली आहेत. पर्वतावर तयार होणार्‍या कचर्‍याच्या समस्येवरही तिला काहीतरी करायचे आहे. तिची संस्था लोकांना मुद्दाम तिथले लोक किती अवघड परिस्थितीत रहातात हे दाखवते. अतिशय थंडीत तिथे तापमान मायनस 35 पर्यंत खाली गेल्यावर हॅंडपंपने पाणी काढणे सुध्दा किती कठीण होते हे सांगितले जाते. तेव्हा आपल्यासारख्य़ा पर्यटकांना काय काय करता येईल याबद्दल ती जागरूकता निर्माण करते. मूळात हे पुस्तक 2012 साली लिहिलेले आहे. त्यामुळे आता ह्या वेगवेगळ्या प्रकारचे काम करणार्‍या संस्थेचे काम या दहा वर्षात खूपच वाढले असेल यात काही शंका नाही. दीनबंधू साहू हे मरिन बायोलॉजिस्ट आहेत पण ते प्रयोगशाळेतून बाहेर पडून समाजासाठी काम करतात. ‘प्रोजेक्ट चिलका’ ह्या त्यांच्या संस्थेमार्फत ओरिसातील लोकांना समुद्राची शेती करायला शिकवतात. ओरिसा मधील पुरी येथे जन्म झालेल्या दीनबंधूनी अतिशय हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेतल्यानंतर दिल्लीत एमएसीला ॲडमिशन घेतली. परंतु योगायोगाने १९८७ मध्ये अंटार्क्टिक वर जाण्याची संधी मिळाली. नंतर पीएचडी पूर्ण केल्यानंतर अनेक देशांमध्ये नोकरी निमित्ताने फिरले. पण तरीही शेवटी दिल्ली युनिव्हर्सिटी मध्ये प्रोफेसर म्हणून काम सुरू केले. त्यांना समुद्री वनस्पती बद्दल विशेष आस्था होती; पण त्या बद्दल आपल्या देशात फारशी जागरूकता नव्हती. ही लागवड पर्यावरण पूरक असते शिवाय त्यातून स्थानिक लोकांना उत्पन्नाचे साधन मिळते. त्यासाठी डिएसटीने निधी मंजूर केला. मग त्यांनी चिल्का सरोवराची पहाणी केली, त्यामध्ये वाढू शकतील अशा चार जातींची निवड करून स्थानिक लोकांना समजेल अशा सोप्या भाषेत माहिती दिली. प्रात्यक्षिके दाखवली, वर्कशॉप्स घेतली. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना रोजगार मिळू लागला. यातूनच पर्यावरण संरक्षण ही होऊ लागले. यातून त्यांना प्रत्यक्ष कांहीं आर्थिक फायदा होत नसला तरी ते म्हणतात, की आम्हाला दोघांना दिल्लीत चांगली नोकरी आहे. त्यामुळे पैसे कमावणे हा उद्देश नाही; पण अजून तीस वर्षांनंतर मला मी काही तरी काम केलेले दिसेल. असे जर काहीच तुम्हाला दिसणार नसेल तर जगायचे कशाला? भूषण पुनानी हे असेच अत्यंत बुध्दीमान विद्यार्थी. मेडीकलची ॲडमिशन हुकल्यामुळे डेअरी कोर्ससाठी ॲडमिशन घेतली. तिथे ही विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविला. नंतर पीएचडी केले. ग्रामविकास शिकण्यासाठी आयआयएम मध्ये एमबीए केले. हे झाल्यावर 1979 मध्ये ब्लाईंड स्कूल मध्ये दोन वर्षांसाठी नोकरी सुरु केली ती सुधा ह्याच हेतूने की मॅनेजमेंट शिकताना जी थेअरी शिकलो ती विकासाच्या क्षेत्रात वापरता येईल का? हळूहळू त्यांना अनेक लोक मिळत गेले. सर्वांनी मिळून आज संस्था खूप मोठी केली आहे.त्यांनी काम सुरु केले तेव्हा फक्त एक कॅपस होता, आज गुजरात मध्ये आठ कॅपस आहेत. दहा लाख मूल्य असलेली संस्था आज दोन कोटी रुपयांची आहे. अपंग लोकांनी स्वावलंबी व्हावे ह्यासाठी संस्था काम करते. दृष्टीहीन मुली ब्यूटी पार्लरसारखे कोर्स चालवतात, फिजिओथेरपी शिकून सेंटर मध्ये काम करतात. विकास साधण्यासाठी योग्य व्यवस्थापनेची गरज असते हे त्यांनी दाखवून दिले आहे. हजारो लोकांच्या आयुष्यात नवा प्रकाश निर्माण करून त्यांना सामान्य आयुष्य जगण्याची संधी मिळवून दिली आहे. अशी ही एकापेक्षा एक वेगवेगळ्या प्रकारची माणसे. कोणत्या तरी ध्येयाने पछाडलेली . सामाजिक कार्य करत असतानाच त्या लोकांचे कल्याण कसे होईल असा विचार करणारी. लेखिकेने त्या सर्वांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या आहेत, त्यांचे काम प्रत्यक्ष पाहून जाणून घेतले आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित गोळा करून आपल्यासमोर मांडली आहे. त्यामुळेच त्या मनोगतात म्हणतात, ‘तुमचं आयुष्य कसे ही असले तरी इतरांसाठी एखादा क्षण द्या. इतरांना प्रेम, आनंद, चांगुलपण द्या. जितकं द्याल तितकं तुम्हाला परत मिळेल.’ हेच वाक्य मलाही अतिशय उर्जा देऊन गेले. माझ्याकडे जे आहे, जे मला देणे शक्य आहे ते निरपेक्षपणे ज्यांना गरज आहे त्याला देणे ह्या सारखा आनंद अजून काय असणार? ह्याच वाक्याने मी आपली ह्या आठवड्यात रजा घेते. उद्या पासून सुरु होणार्‍या नवीन सत्रासाठी सारिका ताईंना हार्दिक शुभेच्छा. ...Read more