* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE 3 MISTAKES OF MY LIFE
  • Availability : Available
  • Translators : SUPRIYA VAKIL
  • ISBN : 9788184980806
  • Edition : 7
  • Publishing Year : NOVEMBER 2009
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 260
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :CHETAN BHAGAT COMBO SET- 3 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Print Books:
IN LATE 2000, A YOUNG BOY IN AHMEDABAD, GOVIND, DREAMT OF OWNING A BUSINESS. TO ACCOMMODATE HIS FRIENDS ISH AND OMI`S PASSION, THEY OPEN A CRICKET SHOP. HOWEVER, NOTHING COMES EASY IN A TURBULENT CITY. TO REALISE THEIR GOALS, THEY WILL HAVE TO FACE IT ALL - RELIGIOUS POLITICS, CALAMITIES, UNACCEPTABLE LOVE AND ABOVE ALL, THEIR OWN MISTAKES. WILL THEY MAKE IT? CAN AN INDIVIDUAL`S DREAMS OVERCOME THE NIGHTMARES OFFERED BY REAL LIFE? CAN WE SUCCEED DESPITE A FEW MISTAKES? BASED ON REAL EVENTS, FROM THE BESTSELLING AUTHOR OF FIVE POINT SOMEONE AND ONE NIGHT @ THE CALL CENTER, COMES ANOTHER DARK, WITTY TALE ABOUT MODERN INDIA, WHERE CHETAN BHAGAT BRINGS OUT THE ETHOS AND ISOLATION OF AN ENTIRE GENERATION TO THE FORE.
फाईव्ह पॉइंट समवन` आणि `वन नाईट @ द कॉल सेंटर` यानंतरची चेतन भगत यांची ही तिसरी कादंबरी. चेतन भगत यांच्या चित्रदर्शी शैलीतली ही कादंबरी वाचकांना त्या विश्वात नेऊन खिळवून ठेवते. लेखकाच्या खुसखुशीत भाषेमुळं ही कादंबरी अधिक वाचनीय बनली आहे. तीन मित्र... स्वत:च्या इच्छा-आकांक्षा, स्वप्नं असणारे; वास्तव जीवनाच्या धगीचा सामना करत त्याला तोंड देणारे... सत्य घटनांच्या संदर्भाशी सुरेख मिलाफ साधणारी ही कादंबरी. सध्याची पिढी, त्यांच्यापुढचे प्रश्न, सद्यपरिस्थिती यांचा वेध घेतानाच; बिझनेस, क्रिकेट व धर्म याही विषयांची सुरेख गुंफण करून वाचकांना एक विलक्षण अनुभूती देते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES #ONENIGHT@THECALLCENTRE #FIVEPOINTSOMEONE #THE 3 MISTAKES OF MY LIFE #फाईव्हपॉइंटसमवन #FICTION #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #SUPRIYAVAKIL #सुप्रियावकील #CHETANBHAGAT #चेतनभगत
Customer Reviews
  • Rating StarSuresh Phadnis

    चेतन भगत यांची एक गाजलेली कादंबरी नुकतीच वाचली .गोविंद ,ईश आणि ओमी तीन मित्र व्यवसाय करण्यासाठी एकत्र येतात .क्रिकेट सामानाचे दुकान सुरु करतात .अर्थात प्रत्येकाचे उद्दिष्ट वेगवेगळे असते .त्यातूनघडलेली कथा म्हणजे प्रेम ,धर्म ,राजकारण ,सुडाची भावना यास्वांचे एकत्रीकरण म्हणजे हि कादंबरी होय.गुजरात मधील अहमदाबाद जवळ घडलेल्या अनेक वास्तव घटनांवर आधारित हि कादंबरी चेतन भगत यांनी अतिशय छान मांडली आहे ...Read more

  • Rating Starअजित अशोक कुरणे

    आपण अनुवादित केलेली अर्थात भाषांतरित केलेली पुस्तिका ‘द थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाइफ’ मूळ लेखक आदरणीय श्री. चेतन भगत सर यांनी बिझिनेस, क्रिकेट आणि धर्म याभोवती गुंफलेली कहानी मी कारागृहामध्ये वाचली. संपूर्ण कहानी वाचत असताना माझे मन अगदी वेगळ्याच विश्ामध्ये रमले होते. माझं मन अगदी अहमदाबाद, गोवा, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, अयोध्या, मुंबई इकडं सगळीकडं धावलं! ईश, ओमी, गोविंद, या तिघांची मैत्री, मित्रप्रेम, व्यावसायिक दृष्टिकोन, क्रिकेटबद्दल असलेलं त्यांचं निस्सिम प्रेम, त्यामध्येच बिट्टुमामाच धर्मवेडेपणा आणि अलीबद्दल सांगायचे झाले, तर अगदी अखेरच्या पानापर्यंत मनाला लागून राहणारी उत्कंठा! विद्या आणि गोविंद यांची थोडकीच परंतु रोमहर्षक प्रेमकहानी वाचताना मनाला विरंगुळा वाटत होता. परंतु त्यांनी उचललेलं टोकाचं पाऊल आणि सरते शेवटी ईशला अर्थात विद्याच्या भावाला हा सर्व प्रकार जेव्हा समजला तो क्षण अगदी मनात धडकी भरवणारा होता. एकंदरीतच कथेमधील ओमी गेल्याने मन दुखावले मात्र विद्या आणि गोविंद यांच्या प्रेमाचा अंत गोड झाला आणि अलीला क्रिकेट खेळण्याच्या दृष्टीने त्याच्या मनगटात बळं आलं हे सरतेशेवटी वाचून मन अगदीच सुखावले. ...Read more

  • Rating StarSAURABH KEDAR

    The Three Mistakes Of My Life by Chetan Bhagat sir which is very beautiful and interesting book, Thank you

  • Rating StarDAINIK SAGAR 15-03-2010

    चेतन भगतच्या वाचकप्रिय पुस्तकाचा वाचनीय अनुवाद… चेतन भगत हा नव्या पिढीचा लाडका कादंबरीकर त्याच्या लोकप्रियतेचं गणित काही औरच. वन नाईट अ‍ॅट ऑल सेंटर, थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ आणि फाईव्ह पाँर्इंट समवन् ही त्याची अत्यंत गाजलेली पुस्तकं. पैकी ‘द थ्री िस्टेक्स ऑफ माय लाईफ’चा अनुवाद सुप्रिया वकील यांनी अत्यंत तारतम्यानं आणि रसाळपणानं केला आहे. त्यांची मराठी भाषा मूळ इंग्रजीचा गाभा विसरायला न लावता स्वतंत्र अनुवादाची किमया करते. व्यापार, विश्व, क्रिकेटचं क्रीडाविश्व आणि धर्माचं अध्यात्मिक विश्व यांचा त्रिवेणी संगम साधणारी ही कथा. लेखकाच्या प्रामाणिक जीवन धारणेचा प्रत्यय देणारी ही कादंबरी. व्यक्तीसह समष्टीचा आलेख मांडणारी ही कहाणी. त्यातील व्यक्तिरेखा जितक्या सजीव तितकीच पार्श्वभूमी अत्यंत जिवंत नव्या युगाच्या गतीला अनुसरून इथं सुपरफास्ट गाडीच्या वेगानं घटना घडत जातात आणि वाचक स्वतःला विसरून पुस्तक वाचत राहतो, वाचतच राहतो. - अप्पा सलागरे, योगेश बांडागळे ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
डॉ. जयंत वडतकर.अमरावती

मेळघाटचा एन्सायक्लोपिडीया असलेले निवृत्त वनाधिकारी श्री. रविंद्र वानखडे यांच्या अनुभवांवर आधारित कुलामामाच्या देशात हे पुस्तक वाचले तेव्हापासून या पुस्तकाचे लेखक श्री. जी. बी. देशमुख यांना भेटण्याची इच्छा होती. इच्छाशक्ती असली की योग जुळून येतो असं महणतात. रविंद्र वानखडे सरांच्या माध्यमातूनच तो योग जुळून आला. माझ्या एक पुस्तकाचे प्रकाशन बाबत वानखडे सरांशी चर्चा करीत असताना त्यांनी लेखकाचा संदर्भ दिला व जी.बी. ना भेटून घ्या असे सांगितले. भेट घडून आली. अगदी सहज, घरगुती भेट झाली, गप्पा रंगल्या. यावेळी जी. बी. देशमुख यांनी त्यांचे पहिले पुस्तक महारुद्र मला भेट दिले. आमच्या चर्चेतून आणि आंतरराष्ट्रीय फुटबॉल मथला मराठमोळा झंझावात महारुद्र, हे या पुस्तकाचे शीर्षक वाचून पुस्तकाचा विषय थोडक्यात समजला. लेखकाचे वडील भीमराव देशमुख यांनी फुटबॉलपटू म्हणून गाजविलेल्या कारकीदींचा आढावा या पुस्तकात होता. एका मुलाने आपल्या वडिलांवर लिहिलेले पुस्तक कसे असेल? असा प्रश्न अन पुस्तक, दोन्ही घेऊन घरी आलो. भेट मिळालेले पुस्तक वेळ मिळाला तसे एका बैठकीत वाचून काढले. आता गल्ली गल्लीत जसं क्रिकेट खेळल्या व बघितले जाते तसं स्वातंत्र्य पुर्व काळात वऱ्हाडात फुटबॉल खेळला जात असे. गावागावांत टीम असायच्या, सामने अर्थात स्पर्धा भरवल्या जात असत. स्वातंत्र्यपूर्व काळात अशाच रुपयांमधून चमकत, वऱ्हाडाच्या ग्रामीण भागातील एका खेळाडूने थेट मुंबईतील फुटबॉल क्लब व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मुसंडी मारत आपल्या खेळाचा व व्यक्तीमत्त्वाचा ठसा उमटविला होता. तो काळ होता १९३० ते १९५० चा. त्या वल्लीचे नाव होतं भिमराव देशमुख. जी. बी. देशमुख यांनी त्यांच्या वडिलांवर लिहिलेले महारुद्र पुस्तक काही फक्त भिमराव देशमुख यांची जीवन चरित्र नाही. स्वातंत्र्य मिळण्याच्या साधारण वीस वर्षा पुर्वी ३० ते ५० च्या दशकात आपल्या देशातील खेळाची स्थिती कशी होती. विशेषतः वऱ्हाडाच्या ग्रामीण भागातील स्थिती कशी होती. कुठले खेळ खेळले जात असत. स्पर्धा कशा भरवल्या जात असत. शाळा आणि शिक्षण कसं होतं. आर्थिक स्थिती कशी होती. अमरावती जिल्ह्यातील कोणत्या गावात फुटबॉलच्या नावाजलेल्या टीम होत्या. अमरावती कशी होती याची माहिती सुद्धा या पुस्तकातून वाचायला मिळते. पुस्तकाच्या पहिल्याच प्रकरणात भीमराव यांचे व्यक्तिमत्व कसं होतं हे सांगण्यासाठी लेखकाने बाबा म्हणून जरी त्यांची ओळख करून दिली असली तरी पुढील सर्व प्रकरणातून त्यांनी भीमराव अशा एकेरी उल्लेखातून हे व्यक्तिमत्व साकारले आहे. वऱ्हाडातल्या आपल्या सवयीनुसार प्रसिद्धी पासून दूर राहिलेल्या एका नामवंत फुटबॉलपटूची कारकीर्द व फुटबॉल पश्चात कौटुंबिक कारकीर्द तटस्तपणे मांडण्यात लेखक यशस्वी झाले आहेत हे आधीच सांगून टाकतो. अमरावती जिल्ह्यातील खारतळेगाव येथील फुटबॉलच्या टीम मध्ये भीमराव देशमुख यांची कारकीर्द सुरु झाली. ती १९३० सालापासून त्यावेळी ते जेमतेम विशीत होते. प्रथम शालेय स्पर्धापासून पुढे क्लब स्पर्धा पासून भीमरावने आपल्या खेळाचा ठसा उमटविला हळूहळू ख्याती विदर्भांत पोहोचली, भीमराव यांचा खेळ बघण्यासाठी लोक खास वेळ काढून येऊ लागेल, १९३८-३९ मध्ये विदर्भात झालेल्या काही स्पर्धात मुबंईच्या काही टीम सहभागी झाल्या होत्या, त्यामुळे नावाजलेल्या ब्रिटीश खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळाली. मुंबईच्या इंग्रजांच्या टीमला वऱ्हाडातील भीमराव यांच्या टीमने हरविले. वायएमसिए, मुंबईच्या अलेक्झांडर नावाच्या कप्तानाने भीमरावच्या खेळाने प्रभावित होऊन खारतळेगावच्या चार खेळाडूंना मुंबईच्या टीम कडून खेळण्याचे निमंत्रण दिले. १९४० ला भीमराव सह चार खेळाडू मुंबईत पोहोचले. अलेक्झांडरने त्यांना सराव शिबिरीत घातले. पुढील वर्षात भीमराव वायएमसिए टीम कडून खेळण्यासाठी करारबद्ध झाले. जशा आयपीएल मध्ये आज वेगवेगळ्या टीम खेळतात तसे त्यावेळी मुंबईत फुटबॉलचे क्लब होते. पुढील १० वर्षे अनेक टीम कडून खेळत अनेक स्पर्धा गाजविल्या. भीमराव यांचेवर तेव्हाच्या इंग्रजी वृत्तपत्रांतून रकाने छापले जाऊ लागले. मुंबईतील आपल्या १२ वर्षाच्या कार्यकाळात क्लब स्पर्धामधून त्यांनी ४०० सामने खेळले, तब्बल २५० गोल मारलेत. भीमराव वेगवेगळ्या स्पर्धामधून खेळत मैदान गाजवत होते. त्यातूनच १९४८ च्या ऑलम्पिक स्पर्धेच्या टीम मध्ये निवड झाली मात्र एका सराव सामन्यात पाय फॅक्चर झाल्याने देशाकडून खेळण्याची संधी हुकली. पुढील वर्षात भीमराव हे भारतीय टीम सोबत मलेशिया, कंबोडिया, इंडोनेशिया, म्यानमार, फिलिपिन्स, हाँगकाँग, थायलंड अशा देशात खेळले, या दौऱ्यातील २० पैकी १९ सामने जिंकले. भीमराव आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू झाले होते. इतके खेळून भीमराव यांचेकडे आर्थिक नियोजन नसल्याने परिस्थिती जेमतेमच होती. अशातच १९५१ साली त्यांनी निवृत्ती घेतली. अमरावती मध्ये परत आल्यावर त्यांनी आपला संसार थाटला, आर्थिक पाठबळ नसल्याने फुटकळ व्यवसाय केले. मात्र मी कधीकाळी आंतरराष्ट्रीय खेळाडू होते याचा कधी उल्लेख सुद्धा केला नाही, प्रसिद्धी पासून ते कायमच दूर राहिले. या काळात भीमराव यांच्या पत्नी अंजीरा यांनी जबाबदारीनं संसार सांभाळला. मुलांना मोठे केले. भीमराव शेवटपर्यंत मेहनत करीत राहिले. समाजात चांगले स्थान निर्माण केले. मात्र ते इतके मोठे फुटबॉलपटू होते ते अमरावतीकरांना काही माहिती झाले नाही. भीमराव यांच्या निधनानंतर या आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूचे कार्य पुढील पिढीला माहित व्हावे या उद्देशाने जी. बी. देशमुख यांनी या पुस्तकातून आपल्या तीर्थरुपांचे भावचित्र अगदी सोप्या सरळ भाषेत शब्दबद्ध करून महारुद्र च्या रूपाने वाचकांसमोर ठेवले. या लिखाणासाठी त्यांनी मुंबईत जाऊन त्या काळातील टाईम्स वृत्तपत्रांतील भीमराव यांचा उल्लेख असलेली कात्रणे मिळविली, त्यांच्या समवेत खेळलेल्या खेळाडूंना व पत्रकारांना भेटले, अमरावती मधील त्यांच्या समवयस्क परिचितांकडून त्यांची माहिती गोळा केली. त्यासाठी त्यांनी अथक अशी मेहनत घेतली. व २००५ साली हे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकाच्या पुढील आवृत्ती मेहता प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केल्याने ते पुस्तक महाराष्ट्रभर पोहोचले. या निमित्त्याने भीमराव यांचे कार्य, त्यांचा फुटबॉल खेळातील झंझावात मराठी माणसाला माहिती झाला. अमरावतीकर या नात्याने मला तर आपल्या मातीतील माणूस त्या काळात आंतरराष्ट्रीय पातळीवर झेंडा गाडून आल्याचा अभिमान वाटला. अशा अनेक अर्थाने महारुद्र महत्वाचे आहे. ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
सलिल तांबे

ज्यांना गोष्टींची आवड आहे अशा मुलांसाठी ही मेजवानी आहेच, पण आपल्या पाल्यांमध्ये संवेदनशीलता आणि निसर्गाप्रती आदर जोपासण्यासाठी मोठ्यांनीही हे पुस्तक वाचायला हवे. प्रदूषणाविरुद्ध लहान हातांनी दिलेला लढा असो किंवा निसर्गाचा खरा आनंद पिशवीत भरून आणण्यापक्षा मनात कसा साठवावा, हे सांगणारा दृष्टिकोन असो; हे पुस्तक प्रत्येक वाचकाला समृद्ध करते. पुस्तकातील प्रत्येक कथा संपताना आपल्याला जगण्याकडे बघण्याची एक नवी दृष्टी देऊन जाते. यातलं काही गूढ, काही थरार आणि खूप सारे हळवे प्रसंग अनुभवण्यासाठी तुम्हाला हे पुस्तक स्वतः वाचायलाच हवं. म्हणूनच, आपल्या संग्रही असावा असा हा `हाटूमुटूचा चंद्र` तुम्ही एकदा नक्की अनुभवा! चला तर मग, आपणही शोधूया आपला स्वतःचा ‘हाटूमुटूचा चंद्र’! ...Read more