* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: AKBAR OF HINDUSTAN
  • Availability : Available
  • Translators : PRASHANT TALNIKAR
  • ISBN : 9789357204361
  • Edition : 1
  • Publishing Year : NOVEMBER 2024
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 432
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
"AKBAR THE GREAT IS A FAMILIAR FIGURE TO MOST INDIANS. HAILED AS A BRILLIANT WARRIOR, A GREAT ADMINISTRATOR AND A VISIONARY RULER WHOSE IDEAS OF PLURALISM AND TOLERANCE SOUGHT TO UNIFY INDIA WITH ALL ITS DIVERSITY OF PEOPLES AND RELIGIONS, HE IS ALSO AN INCREASINGLY CONTESTED FIGURE IN THE NATIONAL DISCOURSE. AND FAMILIAR THOUGH HE MIGHT BE, AKBAR IS A MYSTERY TOO, LOCKED IN HIS OWN LEGEND: A MAN TO ADMIRE BUT DIFFICULT TO KNOW. WITH REVEALING INSIGHTS INTO AKBAR’S COMPLEX AND MAGNETIC PERSONALITY, THIS BIOGRAPHY IS ALSO THE STORY OF HOW AKBAR’S IDEAS AND IDEALS OF KINGSHIP EVOLVED THROUGH HIS REIGN; OF HOW HE CAME TO CONCENTRATE IN HIMSELF BOTH POLITICAL AND RELIGIOUS AUTHORITY; OF HIS INSTANCES OF MEGALOMANIA, HIS DOUBTS AND HIS YEARNING FOR JUSTICE. RICH IN DETAIL, AND WITH A CAST OF UNFORGETTABLE CHARACTERS, IT SPARKLES WITH HUMOUR AND DRAMA TOO, AS IT VIVIDLY EVOKES THE WORLD HE LIVED IN. PARVATI SHARMA’S PORTRAIT OF AKBAR THE GREAT BRINGS ALIVE AS NEVER BEFORE A MAN IMPERFECT AND EXTRAORDINARY, WHO RULED FOR NEARLY FIFTY YEARS AND HAS LIVED IN THE INDIAN IMAGINATION FOR CLOSE TO HALF A MILLENNIUM."
"अकबर द ग्रेट ही व्यक्ती बहुतेक भारतीयांच्या परिचयाची आहे. एक उत्तम योद्धा, एक महान प्रशासक आणि अनेकतत्त्ववाद व सहिष्णुता यांबद्दलच्या ज्याच्या कल्पना विविध धर्माच्या लोकांनी युक्त असलेला भारत एकत्र आणण्याचा प्रयत्न करत राहिल्या असा एक दूरदृष्टीचा शासक, अशा प्रकारे नावाजला गेलेला अकबर राष्ट्रीय पातळीवरची एक चढत्या क्रमाने उलटसुलट चर्चा होण्याचा विषयही आहे. आणि तो परिचित जरी असला, तरी अकबर आपल्याच दंतकथेमध्ये अडकून पडलेले एक गूढदेखील आहे: प्रशंसनीय, पण समजायला कठीण. एक लहान मुलगा, एक पिता, एक मित्र, एक शत्रू म्हणून अकबर खरोखर कसा होता? त्याचा राग, त्याचे दु:ख, त्याच्या अत्यंत आवडीच्या गोष्टी आणि त्याचे हसणे, या त्याच्या मनोवस्था कशा होत्या? तेरा वर्षांचा, पितृछत्र हरपलेला आणि महत्त्वाकांक्षी सल्लागारांच्या आणि सरदारांच्या गराड्यामध्ये सापडलेला एक मुलगा जगातला सर्वांत बलिष्ठ राजा कसा झाला आणि त्याच्या या चक्रावून सोडणार्‍या प्रगतीला त्याने कसे तोंड दिले? अकबर एक संशयात्मा होता का, की आपल्यामध्ये दैवी, चमत्कारी शक्ती आहे असे त्याला वाटत होते? अकबराचे व्यामिश्र आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व उलगडून दाखवणारे हे चरित्र राजेपदासंबंधीच्या अकबराच्या कल्पना आणि आदर्श त्याच्या राज्यकाळात कसे उत्क्रांत होत गेले, त्याने राजकीय आणि धार्मिक अधिकार आपल्यामध्ये कसे एकवटले, तो स्वत:ला सर्वश्रेष्ठ समजत असल्याचे प्रसंग, त्याच्या शंका आणि त्याची न्यायासाठीची तडफड या सगळ्यांची देखील कथा आहे. तपशीलांची रेलचेल आणि अविस्मरणीय पात्रांचा संच यांनी युक्त असलेल्या या चरित्रामध्ये हास्य आणि आत्यंतिक नाट्यदेखील आहे आणि तो ज्या जगामध्ये जगला त्याचे एक सुस्पष्ट चित्र हे पुस्तक उभे करते. सखोल संशोधनाअंती आणि सुंदररित्या लिहिले गेलेले पार्वती शर्मांचे अकबर द ग्रेटचे व्यक्तिचित्र अभूतपूर्व रितीने एक अपरिपूर्ण आणि विलक्षण मनुष्य जिवंत करते. या मनुष्याने जवळजवळ पन्नास वर्षे राज्य केले आणि भारतीय जनमानसामध्ये जवळपास अर्धे सहस्रक तो जगला आहे."
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीसाहित्य#मेहतापब्लिशिंगहाऊस#अनुवादितमराठीपुस्तके#चरित्रपुस्तके#अकबरऑफहिंदुस्तान#पार्वतीशर्मा#प्रशांततळणीकर#MEHTAPUBLISHINGHOUSE#TRANSLATEDMARATHIBOOKS#AKBAROFHINDUSTAN#BIOGRAPHY#PARVATISHARMA#PRASHANTTALNIKAR
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
डॉ शिंदे निलेश, अमरावती

`कुलमामाच्या देशात` वाचून काढले. प्रत्येक कथा खुप वाचनीय आहे. `कपारीत वाघोबा` मध्ये रवींद्र वानखडे ह्यांनी पहाटे चार ते 10 नुसती भ्रमंती केली आहे.. सकाळची सूर्यकिरण अंगावर पडली असताना वाघ बघायला भेटणं ही एक अप्रूप वाटणारी गोष्ट आहे. `डरकाळीचा रार` वानखडे साहेबांनी बेलसरें सोबत अनुभवला आहे. `जिवाची पर्वा` न करता वानखडे साहेब पाळण्यात विसावले होते. गव्याच्या पिलावर वाघीणीने हल्ला केला नाही.. हे वानखडे साहेबांनी स्वतः बघितले व आम्हाला देखील समजले.. वाघाच्या पंजाची कशी प्रतिकृती तयार करतात हे सांगितले परंतू मला लक्षात आले नाही (मी प्रत्यक्ष बोलून जाणून घेईन). `मेहमान रह गया` या कथेत वाघाने माणसाची शिकार कशी केली त्यानंतर वनविभागाने बसची सोय करून मुलांना मदत कशी झाली हे देखील सांगितले व आपल्या सारखे वन अधिकारी काय करू शकतो हे प्रांजळ पणे नमूद केले आहे.. सेमडोह येथील गजराजाची कथा अजून देखील लोक सांगतात त्यातील तुम्ही त्याला वाचवयाचा प्रयत्न केला परंतू तो नियतीला मान्य नसेल. बाणा का घुंगरू- मधील हल्ला व घटना मन विचलित करणारी वाटली व मेळघाट मधील वन कर्मचारी किती कामसू आहेत हे त्या वरून दिसले.. मला बाणा ढाप प्रत्यक्ष बघायला आवडेल.. `रानगव्यांची कवायत` मध्ये रानगवे स्वतःच रक्षण कश्या पद्धतीनं करतात हे मला पहिल्यांदा समजले.. कोकटु इथं तीन दिवस आपण वाघ बघण्याची केलेली हॅट्रिक ही जंगलाने तुम्हा वनाधिकार्‍यास दिलेली सलामी आहे. `शिकार हो गया` - माहुल वेलीचा कसा उपयोग केला जातो व पोळी तयार करतात हे देखील वेगळी गोष्ट वाटली.. आपण सांबर शिकार कशी थांबवली व वन्यजीवनाची साखळी अबाधित राखली.. वाघ खेकडे मारून खातो हे ऐकून नवल वाटले.. असा सॉलिड वन अधिकारी मेळघाटला लाभला हे या कथां मधून मला समजलं व प्रत्येक वाचकाला हे जंगल, इथले लोक या विषयी कायम आकर्षण निर्माण करत राहील.. ...Read more

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
श्री. बाबाराव घोरमाडे, अमरावती

अमरावती जिल्हा मधील एका सामान्य खेड्यातील, एक अलौकिक असामान्य अशा फुटबॉल खेळाडूचे हे व्यक्तिचरित्र. १९४० ते १९५१ हा कालखंड म्हंजे तसाही भारतीया करीता त्यातल्या त्यात ग्रामीण भागाकरिता खडतर कालखंड. अशा विपरीत परिस्थितीत शैक्षणिक आर्थिक सामाजिक मारगदर्शन इत्यादी पाठबळ चा अभाव असताना सुद्धा आतंरराष्ट्रीय दर्जा चा खेळाडू निर्माण होणे हे ते चरित्र नायक चे असामान्य व्यक्तिमत्व अधोरेखित होते. समाधानाची आनंदाची बाब ही की हे पुस्तक रूपाने प्रसिध्द करण्याचे काम चरित्र नायक चे सुपुत्र श्री गजाननराव उर्फ जी बी देशमुख यांनी केले. हे सर्व काही अंशी कर्ज ओझे हलके करण्यासारखे आहे लेखकाला या करीता खूप मेहनत करून माहिती संकलित करावी लागली. एखादी थप्पड बनती थी........ बडे बेआबरू होकर घरी आलो........पण कहाणी मे ट्विस्ट अभि बाकी था..... प्रसंगी चे वाक्य रचना , कोसळणाऱ्या धबधबा सारखे निखळ आनंद देऊन गेले . मेहता पब्लिशिंग ने लॉन्च केले म्हणजे सर्वदूर मराठी माणसाचे पर्यंत पोहोचले आहे वाचनीय आहे प्रत्येकाने वाचावे.विसावा शतकातील पुर्वाध, विपरीत परिस्थितीतही किती कष्ट करावे लागले असतील? धन्य ते.. ...Read more