* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE FACEBOOK EFFECT
  • Availability : Available
  • Translators : VARSHA VELANKAR
  • ISBN : 9789386175175
  • Edition : 1
  • Publishing Year : OCTOBER 2016
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 408
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
Quantity
Buying Options:
  • Print Books:
IT WAS CREATED IN A HARVARD DORM ROOM - OVER 500 MILLION PEOPLE USE FACEBOOK REGULARLY, IN JUST ABOUT EVERY COUNTRY ON EARTH. THAT A COMPANY THIS POWERFUL AND INFLUENTIAL WAS STARTED AS A LARK BY A COUPLE OF 19-YEAR-OLDS MAKES IT A FASCINATING AND SURPRISING TALE. THAT ONE OF THEM, THE VISIONARY MARK ZUCKERBERG, HAD THE MATURITY, STRATEGIC SMARTS AND LUCK TO KEEP HIS COMPANY AHEAD OF ITS RIVALS ANCHORS THE TALE. WITH EXCLUSIVE INSIDE ACCESS TO ALL THE COMPANY`S LEADERS DAVID KIRKPATRICK TELLS OF THE VISION, THE TENACITY, THE REFUSAL TO COMPROMISE, AND THE VISION ZUCKERBERG HAS TO REMAKE THE INTERNET. A BRILLIANT AND FASCINATING CAST OF CHARACTERS CREATED FACEBOOK AND KIRKPATRICK HAS INTERVIEWED ALL OF THEM. NEVER BEFORE HAVE ZUCKERBERG AND HIS CLOSEST COLLEAGUES TOLD WHAT REALLY HAPPENED AS THEY BUILT THEIR DYNAMO WHILE EATING FAST FOOD, STAYING UP ALL NIGHT, AND THUMBING THEIR NOSES AT HOW THINGS ARE USUALLY DONE.
N/A

No Records Found
No Records Found
Keywords
MARKZUCKERBERG #FACEBOOK #DAVID #KIRKPATRICK #VARSHAVELANKAR #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%
Customer Reviews
  • Rating StarLOKPRABHA 26-04-2019

    फेसबुकची सोशल कथा... आजपासून दहाएक वर्षांपूर्वी ‘तुम्ही कुठे भेटून गप्पा मारायचात’ असा प्रश्न एखाद्या तिशी-पस्तीशीतील मंडळींना विचारला तर कदाचित त्यांना ते ठिकाण पटकन आठवणारही नाही किंवा पंधरा वर्षांपूर्वी टाइमपास कसा करायचात, हा प्रश्न त्यांना बुचक्यात पाडेल. स्मार्टफोन आणि इंटरनेट या दोन साधनांनी समृद्ध असलेल्या आपल्या समाजावर फेसबुकने पाडलेला प्रभाव किती, याचं मोजमाप वरील दोन प्रश्नांतून करता येईल. जगभरात २.३ अब्ज इतके मासिक वापरकर्ते असलेल्या फेसबुकने साऱ्यांनाच भारून टाकलं आहे. सोशल नेटवर्किंगचं अफाट जाळं विणणाऱ्या फेसबुकने केवळ संवादाचं नवीन माध्यमच उभं केलं नाही तर, माणसांना एकमेकांना जोडण्याचंही काम केलं. जगाच्या कोणत्याही भागात घडणाऱ्या एखाद्या घटेचा व्हिडिओ पोहोचवण्यापुरतंच ते मर्यादित राहिलेलं नाही तर, अनेक देशांच्या सत्तासंघर्षात त्यानं महत्त्वाची भूमिका बजावली आहे. असं असलं तरी, आपल्या अवतीभवती फेसबुकबद्दल तक्रारी करणारेही अनेकजण सापडतील. फेसबुकच्या माध्यमातून लोकांच्या खासगीपणावर होत असलेलं अतिक्रमण, त्याला आलेलं बाजारीकरणाचं स्वरूप, वापरकर्त्यांच्या माहितीची विक्री आणि तरुण पिढीत वाढत असलेलं फेसबुकचं व्यसन अशा अनेक रास्त तक्रारी या माध्यमाची काळी बाजू उघड करतात. फेसबुकच्या पंधरा वर्षांच्या कारकीर्दीतल्या या स्थित्यंतराचा मागोवा घ्यायचा असेल तर, ‘फेसबुक इफेक्ट’ हे डेव्हिड कर्कपॉट्रिक लिखित आणि वर्षा वेलणकर यांनी मराठीतून अनुवादित केलेलं पुस्तक वाचायला हवं. फोर्च्युन या जगप्रसिद्ध अमेरिकी नियतकालिकात तंत्रज्ञान संपादक या पदावर अनेक वर्षे काम केलेले आणि तंत्रज्ञानविषय घडामोडींचा बारकाईने अभ्यास करणारे म्हणून डेव्हिड कर्कपॉट्रिक प्रसिद्ध आहेत. आपल्या चार दशकांच्या कारकीर्दीत कर्कपॉट्रिक यांनी फेसबुकच्या निमित्ताने समाजमनावर होत असलेला परिणाम हेरला आणि त्याला पुस्तकाचे स्वरूप दिले.’ जगभरातील लोकांना आणि विशेषत: तरुणाईला एका समान सांस्कृतिक अनुभवाला सामोरं जाण्याचा मार्ग मोकळा करू देणारं हे द्वार आहे’ असं त्यांचं म्हणणं आहे. ‘पण ही (फेसबुकची) वाढ आणि समाजात खोलवर होणाऱ्या त्याचा शिरकाव यामुळे काही सामाजिक, राजकीय, नियमन आणि धोरणासंदर्भात जटिल प्रश्नही निर्माण झाले आहेत’ हेही आवर्जून सांगतात. या दोन वाक्यांच्या दरम्यान कर्कपॉट्रिक यांनी फेसबुकची अवघी सोशलकथा वाचकांसमोर मांडली आहे. या पुस्तकाचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे फेसबुकच्या जन्माची कथा. मार्क झकरबर्ग यानं हॉवर्डमध्ये शिक्षण घेत असताना एक अवांतर प्रकल्प म्हणून फेसबुकची निर्मिती केली. हॉवर्डमधल्या विद्यार्थ्यांना एकमेकांशी जोडण्यासाठीचा तो प्रयोग होता. पण त्याही आधी मार्कनं फेसमॉश नावाचा एक प्रोग्रॉम तयार केला होता. हॉवर्डच्या कॉलेज कॅम्पसमधील सर्वांत हॉट चेहरा शोधण्यासाठी या प्रोग्रॉमचा खटाटोप मार्कनं केला होता. हॉवर्डमधल्या सगळ्या विद्यार्थ्यांची माहिती असलेल्या एका डायरीला फेसबुक असं म्हटलं जाई. फेसमॉशसाठी मार्कनं फेसबुकचाच वापर केला. फेसबुकमधील सगळी माहिती फेसमॉशमध्ये पुरवल्यानंतर मार्कनं केवळ चाचणी म्हणून आपल्या काही मित्रांना त्याची लिंक पाठवली. पण त्याच्या मित्रमंडळींना फेसमॉश इतकं भावलं की काही तासांत ते अवघ्या हॉवर्डच्या चर्चेचा विषय बनलं. पण मार्क तिथंच थांबला नाही. त्यानं फेसमॉश आणि त्याआधीच्या अशाच खटाटोपांना एकत्र करत द फेसबुक डॉट कॉम हे संकेतस्थळ प्रदर्शित केलं. हॉवर्डमधील विद्यार्थ्यांना आपल्या मित्रमंडळींच्या संपर्कात ठेवण्यासाठी हे संकेतस्थळ विकसित करण्यात आलं. त्याला अफाट यश मिळालं आणि त्यानंतर वर्ष-दोन वर्षांत झकरबर्गनं विविध महाविद्यालये, हायस्कूल असं करत सर्वसामान्य तरुणाईसाठी फेसबुक सुरू केलं. फेसबुकच्या जन्माची ही कथा या पुस्तकात अतिशय विस्ताराने आली आहे. त्यामुळे अन्यत्र कुठेही न वाचलेले अनेक पैलू यानिमित्ताने उलगडले आहेत. फेसबुक सार्वजनिक होताच त्या वेळी तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या मायक्रोसॉफ्ट, गुगल, याहू, वायकॉम यांसारख्या कंपन्यांनी ते आपल्या ताब्यात घेण्याचे कसे प्रयत्न केले, याचं वर्णनही या पुस्तकात आहे. फेसबुकमधील हिस्सेदारीसाठी बड्या-छोट्या कंपन्यांनी केलेली मोर्चेबांधणी या पुस्तकात अतिशय व्यवस्थितपणे मांडली आहे. पुढे फेसबुकची कंपनी स्थापन करताना झकरबर्गच्या आयुष्यात घडलेला घटनाक्रमही कर्कपॉट्रिक यांनी सखोल संशोधनाद्वारे मांडला आहे. हा सगळा इतिहास केवळ रंजकच नव्हे, तर एखाद्या नवउद्यमीला प्रेरित करणाराही आहे. त्याच काळात फेसबुकची संकल्पना ही निव्वळ उचलेगिरी असल्याचा आरोप करून करण्यात आलेल्या याचिकांची माहितीही कर्कपॉट्रिक देतात. मात्र त्यात केवळ फेसबुक आणि झकरबर्ग यांची बाजू झळकते. फेसबुकच्या संकल्पनेवर दावा करणाऱ्यांचं म्हणणं विस्ताराने मांडण्यात कर्कपॉट्रिक यांनी केलेला संकोच अनाकलनीय आहे. फेसबुकच्या जन्मकथेनंतर पुस्तकाची शेवटची दीडेकशे पाने त्याच्या आजच्या (अर्थात २०१० पर्यंतच्या) प्रवासाची आहेत. या दरम्यान फेसबुकचा १५ अब्ज डॉलरची कंपनी म्हणून निर्माण झालेला दबदबा तसंच फेसबुकमुळे वापरकर्त्यांच्या गोपनीयतेला असलेला धोका यांचं विवेचन पुस्तकात व्यवस्थित आलं आहे. फेसबुकचा राजकीय व्यासपीठ म्हणून होत असलेला वापर आणि फेसबुकच्या माध्यमातून देशोदेशांतील चळवळींना मिळालेलं व्यासपीठ यांचाही कर्कपॉट्रिक यांनी आढावा घेतला आहे. हे करतानाच लेखकाने फेसबुकच्या भविष्याचाही वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे. युनिव्हर्सल कनेक्टिव्हिटीसाठी आवश्यक गुण फेसबुकमध्ये पुरेपूर भरलेले आहेत. फेसबुकला ‘वैश्विक खेडं’ बनवण्याच्या झकरबर्गच्या महत्त्वाकांक्षेलाही ते पूरक आहेत. मात्र हे होत असतानाच अनियंत्रित आणि अतिरेकी देवाणघेवाणीतून निर्माण होणाऱ्या माहितीचं काय, असा प्रश्नही लेखकाने शेवटी विचारला आहे. सरतेशेवटी अनुवादाविषयी, फेसबुकबद्दल तक्रारी करणाऱ्या पालकांनी आणि त्याच्या नको इतक्या प्रेमात पडलेल्या तरुणवर्गाने आवर्जून वाचावे असे हे पुस्तक आहे. या पुस्तकाच्या अनुवादाची गरज वर्षा वेलणकर यांनी आपल्या मनोगतात अतिशय स्पष्टपणे विशद केली आहे. ज्या संवादाची, त्यातून निर्माण होणाऱ्या मानवी नात्यांची, त्या नात्यांच्या जपणुकीची अपेक्षा मार्क झकरबर्गला आहे, त्यात फेसबुक वापरणाऱ्यांच्या या साधनासंदर्भातील अज्ञानाचा मोठा अडसर निर्माण झाला आहे, असे वेलणकर सांगतात आणि ते योग्यही आहे. पुरेशा माहितीअभावी वापरलेल्या कोणत्याही गोष्टीचा पुरेपूर उपयोग तर करता येतच नाही, परंतु त्यातून नुकसान होण्याचाच धोका अधिक असतो. फेसबुकच्या बाबतीत असे धोके आपल्याला वारंवार दिसत आहेत. त्या धोक्यांपासून बचाव करायचा असेल तर ‘द फेसबुक इफेक्ट’ वाचायलाच हवं. –आसिफ बागवान ...Read more

  • Rating StarVaibhav Mahajan

    हॉवर्ड मध्ये एका एकोणीस वर्षांच्या विद्यार्थ्यांनी एका कंपनीची निर्मिती केली या कंपनीने केवळ इंटरनेट जगतामध्ये बदल घडून आले नाहीत तर मार्गही बदलले . या पुस्तकात लेखकाने फेसबुक कसे तयार झाले, त्याची वाढ कशी झाली, आणि त्यांचे भविष्य काय असेल याची तपशीलार माहिती संशोधन करून मांडली आहे . यात फेसबुक वाढीच्या प्रवासात त्याला आलेले यश- अपयश झालेल्या चुका यांच्यावरही प्रकाश टाकण्यात आला आहे. मुख्य म्हणजे हे पुस्तक स्वतः मार्क झुकेरबर्ग आणि फेसबुकच्या जडणघडणीत महत्त्वाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या मुलाखतीवर आधारलेले आहे . हे पुस्तक आहे त्या व्यक्तीबद्दल ज्या व्यक्तीने जगभरातील करोडो लोकांना अक्षरश: वेड लावले . क्वचितच असा एखादा व्यक्ती सापडेल की ज्यांनी कधीच फेसबुकचा उपयोग केला नाही ,फेसबुकने संपूर्ण जगावर दुरगामी परिणाम केलेले आहेत . २०११ साली इजिप्त टय़ुनिशिया सारख्या अनेक देशात जनक्रांती झाली, हुकूमशाही जाऊन लोकशाहीचा उदय झाला या मागची प्रेरणा फेसबुकच होते हे नंतर उघड झाले. म्हणजेच आज सामजिक माध्यमं सगळया जगाला बदलुन टाकण्याची एखादया देश‍ात सत्तापलट करण्याची ताकद ठेवते. सर्वं सामाजिक माध्यमात फेसबुक हे एक शक्तीशाली माध्यम आहे. त्याच्या जन्मापासुनचा प्रवास या पुस्तकात दिला आहे. ...Read more

  • Rating StarSAPTAHIK SAKAL 16-06-2018

    ‘फेसबुक’ हे नाव आजमितीला घराघरांत पोहोचले आहे. आजच्या पिढीत तर फेसबुक वापरत नसेल असा माणूस सापडणे विरळ आहे. संपूर्ण जगाला अल्पावधीत वेड लावणाऱ्या या फेसबुकचा रंजक आहे. छोट्या कॉलेजपासून सुरू झालेल्या ‘फेसबुक’चा शोध नेमका कसा लागला? याची वाढ कशी झाली?फेसबुकच जडणघडण, फेसबुकचे भविष्य अशा अनेक प्रश्नांवर या पुस्तकात प्रकाश टाकण्यात आला आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK LOKSATTA 02-04-2017

    फेसबुकचा मुखवटा... फेसबुक आणि इतर सोशल नेटवर्क हे आज आपल्या जगण्याचा भाग झाले आहेत. मात्र, हे बदल अनुभवताना आणि पारंपरिक वा नवी माध्यमं वापरताना आपण एक व्यक्ती व समुदाय म्हणून त्यांच्या परिणामांबाबत सजग असतोच असं नाही. माध्यमं अशी आंधळेपणानं वापरणं िती धोक्याचं आहे याची जाणीव आपल्याला अधूनमधून होते; पण ती तेवढ्यापुरतीच. ‘द फेसबुक इफेक्ट’ या नुकत्यच प्रकाशित झालेल्या पुस्तकाचं वाचन या पार्श्वभूमीवर महत्त्वाचं ठरतं. डेव्हिड कर्कपॅट्रिक यांच्या मूळ पुस्तकाचा अनुवाद वर्षा वेलणकर यांनी केला आहे. मूळ पुस्तक २०१० मध्ये प्रसिद्ध झालं. त्यानंतरच्या सहा वर्षांत जग आणि फेसबुक आणखी बदललं आहे. ही मर्यादा ध्यानात घेतली तरीही फेसबुकसारख्या माध्यमाकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी हे पुस्तक आपल्याला देतं. कर्कपॅट्रिक हे जगप्रसिद्ध ‘फॉर्च्युन’ नियतकालिकाचे तंत्रज्ञानविषयक लेखक आहेत. मार्क झकरबर्गसह अनेकांच्या मुलाखती घेतल्यानंतर पत्रकारितेच्या शिस्तीनं फेसबुकचे अंतरंग उलगडण्याचा प्रयत्न त्यांनी यात केला आहे. योग्य ठिकाणी संबंधितांची वक्तव्यं देत स्वत:ची निरीक्षणं आणि मतं ते तत्कालीन संदर्भात नोंदवतात. ‘फेसबुक हे एक सामाजिक साधन आहे!’ यावर मार्कची अढळ श्रद्धा आहे. या माध्यमातून आपण स्वत:ची एक डिजिटल ओळख निर्माण करतो आणि आपण जे काही करतो त्याचा एक डिजिटल ठसा तिथं राहतो. लेखकानं नोंदवल्याप्रमाणे फेसबुक हे आजवरच्या इतिहासात सर्वांत जास्त वापरलं जाणारं माध्यम आहे. ऑनलाइन असलेल्या प्रत्येक व्यक्तीची डिरेक्टरी बनण्याकडे त्याची वाटचाल सुरू आहे. फेसबुक, सोशल नेटवर्क आणि एकूणच माध्यमांच्या परिणामांबाबतचं भान येण्यासाठी ‘द फेसबुक इफेक्ट’ हे पुस्तक जरूर वाचावं. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more