* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE STORY ABOUT A PLACE CALLED KESARURU WHERE THERE IS A CONSIDERABLE DROP IN THE PRODUCTION OF CARDAMOM AND THE REASONS BEHIND THAT. AND THE RAHASYA IS HOW AND WHY DID THE SCIENTIST WHO WAS DOING RESEARCH ON CARDAMOM PRODUCTION SUDDENLY DIED. TEJASWI DESCRIBES HOW THIS TURNS INTO VILLAGE POLITICS, COLLEGE "REVOLUTION" AND FINALLY INTO COMMUNAL VIOLENCE. EACH OF THE CHARACTERS WHETHER IT IS ANGADI - THE CBI OFFICIAL, OR THE WRITER- JAYARAM, OR THE STUDENT RAFI SOUND VERY REALISTIC.
‘...मनाच्या मायाशक्तीविषयी मला एक लेखक म्हणून काय वाटतं सांगू? ती स्वतंत्र आहे की विधि-नियमांनी बद्ध आहे असा विचार करणंच चुकीचं आहे. मनाचं विश्लेषण मनानं करणं किंवा प्रज्ञेचं विश्लेषण प्रज्ञेनं करणं शक्यच नाही...’ या तत्त्वविचारांबरोबरच वेलदोड्याच्या उत्पन्नातल्या कमतरतेचा शोध घेण्यासाठी आलेल्या अंगाडीला सामोरं आलं ते निसर्गरम्य केसरूरमधलं सडलेलं समाज-जीवन, जातीयवादाचा अतिरेक, पराकोटीची लाचलुचपत, र्आिथक स्वार्थापायी निसर्गाचं शोषण- आणि त्यातून अपरिहार्यपणे होणारा मानवी विध्वंस! ‘कर्वालो’च्या लेखकाची वेंद्र साहित्य अकादमी विजेती कादंबरी.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #CHIDAMBARRAHASYA #CHIDAMBARRAHASYA #चिदंबररहस्य #FICTION #TRANSLATEDFROMKANNADATOMARATHI #UMAKULKARNI #उमाकुलकर्णी #K.P.PURNACHANDRATEJASWI. #के.पी.पूर्णचंद्र तेजस्वी "
Customer Reviews
  • Rating StarSachin Patil

    मला थरारक लिखाण खूप खूप आवडतं, कदाचित त्या मुळे मी विदेशी लेखक जसे की पाउलो कोएलो, अलेस्टर मकलिंन, डॅन ब्राउन इ. खूप वाचले. मध्यंतरी कन्नड साहित्यिक भैरप्पा सरांचे आवरण आणि पारखा वाचलं. त्या वेळी मी K.P. PURNACHANDRA TEJASVI सरांबद्दल एकल आणि वाचल हत, म्हणून ही कादंबरी विकत घेतली.. असेल काहीतरी म्हणून कादंबरी च पाहिलं पण उघडलं आणि खुळ्या सारखा वाचत गेलो. असली कादंबरी मी माझ्या उभ्या आयुष्यात वाचली नाही. Believe me,जितकी मला ययाति आवडते तितकीच किंबहुना ( 19/20.).. जबरदस्त कादंबरी आहे. नक्कीच तुमच्या library ची शान वाढवेल याची 100% खात्री ... 👌👌👌👌 ...Read more

  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    निसर्ग आणि मानव या मधील नात्याचा उहापोह करणारी कलाकृती. श्री. के. पी. पूर्णचंद्र तेजस्वी या कन्नडमधील विज्ञाननिष्ठ आधुनिक लेखकाची केंद्र साहित्य अकादमी पुरस्कार विजेती कादंबरी! वेलदोड्याच्या उत्पन्नात सातत्त्यानं का घट येत आहे, याचा शोध घेण्यासाठी कंद्र सरकारकडून अंगाडीला केसरूर या गावी पाठवण्यात येते. तो त्या निसर्गरम्य गावात दाखल होतो आणि एक सडलेलं समाज-जीवन त्याच्यासमोर ठाकतं. जातीयतेचा अतिरेक, लाच-लुचपत-त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे आर्थिक स्वार्थापायी होणारं निसर्गाचं शोषण! ‘... ही हानी आपल्यापुरतीच आहे. निसर्गाची नव्हे! आत्तापर्यंत निसर्गानं किती तरी प्रयोग करून पाहिलेत या पृथ्वीवर! उद्या आपण इथं जगायला नालायक ठरलो तर आपल्यालाही नामशेष व्हावं लागेल! पण निसर्ग मात्र शांतपणे पुन्हा पुढच्या प्रयोगाला सुरुवात करेल...’ शास्त्रज्ञ पाटील. याच चिदंबर रहस्याचा वेध घेऊ पाहणारी महान कादंबरी! मराठी अनुवाद– सौ. उमा वि. कुलकर्णी यांचा. श्री. तेजस्वी यांच्या लेखन-शैलीचा अनुवाद करण्याची हातोटी त्यांना गवसली आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

वा. पां. जाधव अमरावती

`अमरावतीचे छप्पन स्वभाव एक मनोरंजक काव्यसंग्रह` `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे अमरावतीचे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री जी. बी. देशमुख यांचे अमरावती नगरीचा सहज स्वभाव व ह्या नगरीच्या वेगळ्या ओळखीवर आधारित मनोरंजक पुस्तक वाचले. वाचून भरपूर मनोरंजन झाले. खर काय लिहावे या लेखकाबद्दल, मन गोंधळले. ऐतिहासिक असो, प्रवास वर्णन असो, व्यक्ती विशेष असो, अनुभवात्मक घटना घडामोडी असो कशावरही सहज लिखाण करणारा हा लेखक आहे. आता तर त्यांनी लेखनाला विनोद प्रचुर फोडणी देऊन `अमरावतीचे छप्पन स्वभाव` या काव्यसंग्रहातून अमरावतीकरांना मनोरंजनाची मेजवानीच दिली आहे. प्रत्येक शहराची व त्या शहरातील वैशिष्ट्यांची एक वेगळीच ओळख असते. दिवस जातात, काळ लोटतो, पिढ्या बदलतात मात्र जुन्या स्मृतीची चिन्हे नवीन येणाऱ्या पिढीच्या मनात गुढ निर्माण करत कायम हाक देत राहतात. अमरावतीही त्याला अपवाद नाही. बापट चौकात चौक नाही, त्या जागेवर चौरस्ता नसून टी-पॉइंट आहे, खापर्डे बगीचा म्हणून आजही ओळख आहे मात्र तेथे बगिचा नाही किंवा प्रसिद्ध गांधी चौकात गांधीचा पुतळा अथवा स्मृतीदर्शक चिन्ह अथवा उल्लेख नाही मात्र गांधी चौक अशीच ओळख जनमानसात आहे. अशा एक ना अनेक विसंगत नाम दर्शक ओळख असलेली उदाहरणे त्यात सप्रमाण आहेत. पण खरी गंमत म्हणजे कधी काळी घडलेला इतिहास त्यामध्ये दडलेला आहे हे निश्चित. या सोबतच अमरावतीकरांच्या स्वभावातला स्थायी मजेदारपणाच्या एक एका हटके गुण वैशिष्ट्याच्या गमती लेखकाने हुबेहूब अधोरेखित केलेल्या आहेत. आणि त्यावरुन तत्सम रचनांचा उहापोह लेखकाने पुस्तकात केला असावा. विदेशात स्थाईक झालेल्या मूळ अमरावतीकरांना लेखकाने लिहिलेल्या गमती मनोरंजनात्मक वाटाव्या एवढी किमया जी.बी. च्या सहज लेखनाने दाखवली आहे. अमरावतीचे अग्रगण्य वृत्तपत्र दै. हिंदुस्थान मध्ये लेखकाने सतत ६ महीणे लिहीलेल्या काव्य सदरात अमरावतीच्या जनमानसाच्या हृदयाच्या ठाव घेणाऱ्या काव्य रचनांचा आठवणींनी महापूर ओसंडून गेला होता. विशेष म्हणजे ह्यात कुठेही अनावश्यक अभिनीवेष नव्हता. उलट गमतीत केलेले आत्मपरिक्षण मात्र काही प्रमाणात होते. वयस्क अमरावतीकर रसिकांना या रचना ताज्या करून त्यांच्या तारुण्यात घेऊन गेल्या हेच खरे. जी बी देशमुख या लेखकास मिळालेल्या सकारात्मक प्रतिक्रियां वरून दिसून येते. . सदर पुस्तकातील काव्यमय रचना वाचतांना अमरावतीच्या माणसाच्या वऱ्हाडभोळ्या स्वभावाची प्रचीती येते आणि वेगळाच आनंद देऊन जाते. निखळ मनोरंजन करत गुदगुल्या करणारा असा हा काव्यसंग्रह आहे. अमरावती शहराची ऐतिहासिक वैशिष्टे काव्यरूपात वाचण्याचा आनंद अमरावतीकरांना ते जिथं असतील त्या गावात, परगावात, परदेशात पुस्तक मागवून घेता येईल. ...Read more

ज्योती चेडे, मुंबई.

अमरावतीच्या वैशिष्ट्यांवर आधारीत खुमासदार छप्पन्न कवितांच्या संग्रहातील प्रत्येक कविता वाचत असताना अमरावतीच्या वातावरणाची धुंदी आपसुकच मनावर चढु लागली. सगळ्याच कविता सुंदर आहेत. एकेक कविता अमरावतीचे अप्रतिम वर्णन करते. प्रत्येक कवितेचा शेवट कुठेतरी गंभीर विचार करायला भाग पाडतो आणि मन गलबलून जाते. सगळ्याच कविता सुंदर आहेत पण माझ्या मनाला भावलेल्या व भिडलेल्या कविता आहेत `अमरावतीतल्या गमती`, `अमरावतीचे शिक्षण`, `अमरावतीचे हजरजबाबी`, `अमरावतीचे वेडे`, `अमरावतीच्या काकू` व बाकी सगळ्या. `अमरावतीचे वेडे` या कवितेत उल्लेखीत शेवटचा अश्रुंचा एक थेंब जरुर राखला जाईल. तसेच `अमरावतीच्या काकूं` ची उर्जा उरात भरून उरेल. जीवन देणाऱ्या विहीरीने कोणाचेही जीवन घेऊ नये, अशी सद्भावना मनात जागेल. अमरावतीकर जगात कुठेही असो त्यांच्या मनात एका कोपऱ्यात राजकमल चौक असतोच हे सत्य मनावर कोरले जाईल. प्रत्येक अमरावतीकराने ह्या कविता जगाव्यात. त्यासाठी हे पुस्तक संग्रही ठेवावे आणि परगावी राहणाऱ्या आपल्या अमरावतीकर आप्तेष्टांना भेटी दाखल द्याव्या. ...Read more