* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE STORY ABOUT A PLACE CALLED KESARURU WHERE THERE IS A CONSIDERABLE DROP IN THE PRODUCTION OF CARDAMOM AND THE REASONS BEHIND THAT. AND THE RAHASYA IS HOW AND WHY DID THE SCIENTIST WHO WAS DOING RESEARCH ON CARDAMOM PRODUCTION SUDDENLY DIED. TEJASWI DESCRIBES HOW THIS TURNS INTO VILLAGE POLITICS, COLLEGE "REVOLUTION" AND FINALLY INTO COMMUNAL VIOLENCE. EACH OF THE CHARACTERS WHETHER IT IS ANGADI - THE CBI OFFICIAL, OR THE WRITER- JAYARAM, OR THE STUDENT RAFI SOUND VERY REALISTIC.
‘...मनाच्या मायाशक्तीविषयी मला एक लेखक म्हणून काय वाटतं सांगू? ती स्वतंत्र आहे की विधि-नियमांनी बद्ध आहे असा विचार करणंच चुकीचं आहे. मनाचं विश्लेषण मनानं करणं किंवा प्रज्ञेचं विश्लेषण प्रज्ञेनं करणं शक्यच नाही...’ या तत्त्वविचारांबरोबरच वेलदोड्याच्या उत्पन्नातल्या कमतरतेचा शोध घेण्यासाठी आलेल्या अंगाडीला सामोरं आलं ते निसर्गरम्य केसरूरमधलं सडलेलं समाज-जीवन, जातीयवादाचा अतिरेक, पराकोटीची लाचलुचपत, र्आिथक स्वार्थापायी निसर्गाचं शोषण- आणि त्यातून अपरिहार्यपणे होणारा मानवी विध्वंस! ‘कर्वालो’च्या लेखकाची वेंद्र साहित्य अकादमी विजेती कादंबरी.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #CHIDAMBARRAHASYA #CHIDAMBARRAHASYA #चिदंबररहस्य #FICTION #TRANSLATEDFROMKANNADATOMARATHI #UMAKULKARNI #उमाकुलकर्णी #K.P.PURNACHANDRATEJASWI. #के.पी.पूर्णचंद्र तेजस्वी "
Customer Reviews
  • Rating StarSachin Patil

    मला थरारक लिखाण खूप खूप आवडतं, कदाचित त्या मुळे मी विदेशी लेखक जसे की पाउलो कोएलो, अलेस्टर मकलिंन, डॅन ब्राउन इ. खूप वाचले. मध्यंतरी कन्नड साहित्यिक भैरप्पा सरांचे आवरण आणि पारखा वाचलं. त्या वेळी मी K.P. PURNACHANDRA TEJASVI सरांबद्दल एकल आणि वाचल हत, म्हणून ही कादंबरी विकत घेतली.. असेल काहीतरी म्हणून कादंबरी च पाहिलं पण उघडलं आणि खुळ्या सारखा वाचत गेलो. असली कादंबरी मी माझ्या उभ्या आयुष्यात वाचली नाही. Believe me,जितकी मला ययाति आवडते तितकीच किंबहुना ( 19/20.).. जबरदस्त कादंबरी आहे. नक्कीच तुमच्या library ची शान वाढवेल याची 100% खात्री ... 👌👌👌👌 ...Read more

  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    निसर्ग आणि मानव या मधील नात्याचा उहापोह करणारी कलाकृती. श्री. के. पी. पूर्णचंद्र तेजस्वी या कन्नडमधील विज्ञाननिष्ठ आधुनिक लेखकाची केंद्र साहित्य अकादमी पुरस्कार विजेती कादंबरी! वेलदोड्याच्या उत्पन्नात सातत्त्यानं का घट येत आहे, याचा शोध घेण्यासाठी कंद्र सरकारकडून अंगाडीला केसरूर या गावी पाठवण्यात येते. तो त्या निसर्गरम्य गावात दाखल होतो आणि एक सडलेलं समाज-जीवन त्याच्यासमोर ठाकतं. जातीयतेचा अतिरेक, लाच-लुचपत-त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे आर्थिक स्वार्थापायी होणारं निसर्गाचं शोषण! ‘... ही हानी आपल्यापुरतीच आहे. निसर्गाची नव्हे! आत्तापर्यंत निसर्गानं किती तरी प्रयोग करून पाहिलेत या पृथ्वीवर! उद्या आपण इथं जगायला नालायक ठरलो तर आपल्यालाही नामशेष व्हावं लागेल! पण निसर्ग मात्र शांतपणे पुन्हा पुढच्या प्रयोगाला सुरुवात करेल...’ शास्त्रज्ञ पाटील. याच चिदंबर रहस्याचा वेध घेऊ पाहणारी महान कादंबरी! मराठी अनुवाद– सौ. उमा वि. कुलकर्णी यांचा. श्री. तेजस्वी यांच्या लेखन-शैलीचा अनुवाद करण्याची हातोटी त्यांना गवसली आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

BACKSTAGE
BACKSTAGE by MONTEK SINGH AHLUWALIA Rating Star
महाराष्ट्र टाईम्स.. ६.९.२०२६

भारताच्या आर्थिक सुधारणांवर अनेक पुस्तके आजवर प्रसिद्ध झाली आहेत. काहींमध्ये आकडेवारीचे जंजाळ असते, काही धोरणांचे विश्लेषण करतात, तर काही विशिष्ट नेत्यांची जाहिरातबाजी करतात. मात्र माँटेकसिंग अहलुवालिया यांचे `बॅकस्टेज : भारताच्या उच्च वाढीच्या र्षांमागची कहाणी` हे पुस्तक या सगळ्यांपेक्षा वेगळे ठरते. कारण हे पुस्तक भारताच्या आर्थिक परिवर्तनाची कथा बाहेरून पाहणाऱ्या अभ्यासकाने नव्हे, तर त्या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी उभ्या असलेल्या व्यक्तीने सांगितलेली आहे. जी. बी. देशमुख यांनी मूळ इंग्रजी पुस्तकाचा केलेला मराठी अनुवाद सरस उतरला आहे. पुस्तकाच्या सुरुवातीलाच माँटेकसिंग एक गोष्ट स्पष्ट करतात, ती म्हणजे, हे पुस्तक आत्मकथन नाही. आत्मप्रौढी मिरवण्यासाठी नव्हे, तर भारताच्या आर्थिक सुधारणांचा प्रवास समजावून सांगण्यासाठी अहलुवालिया हे पुस्तक लिहितात. विषयाच्या अनुषंगाने पुस्तकात त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील संदर्भ येतात, पण ते आर्थिक आणि राजकीय घडामोडी समजावून सांगण्यापुरतेच. सिकंदराबादमधील मध्यमवर्गीय वातावरणातून सुरू झालेला त्यांचा प्रवास दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, ऑक्सफर्ड, जागतिक बँक, अर्थ मंत्रालय, योजना आयोग आणि अखेर देशाच्या सर्वोच्च आर्थिक धोरणनिर्मितीच्या केंद्रापर्यंत पोहोचतो. हा प्रवास वाचताना स्वतंत्र भारताच्या आर्थिक विचारसरणीचा विकासक्रम उलगडत जातो. पुस्तकाचे केंद्रस्थान अर्थातच १९९१च्या आर्थिक संकटाचे आहे. त्यावेळी देशाकडे काही आठवड्यांच्या आयातीपुरताही डॉलर शिल्लक नव्हता. सोन्याचा साठा गहाण ठेवण्याची वेळ आली होती आणि आर्थिक दिवाळखोरीची शक्यता प्रत्यक्ष समोर उभी होती. अशावेळी सरकारने घेतलेले निर्णय, त्यामागील तणाव, राजकीय अनिश्चितता आणि प्रशासकीय संघर्ष यांचे वर्णन पुस्तकात अत्यंत जिवंतपणे आले आहे. नाणेनिधी किंवा जागतिक बँकेच्या दबावामुळे या सुधारणा झाल्याची धारणा माँटेकसिंग ठामपणे नाकारतात. हे पुस्तक आर्थिक सुधारणांना कोणत्याही प्रकारच्या विचारधारेच्या चष्म्यातून पाहत नाही. लेखक ना मुक्त बाजाराचे अंधसमर्थन करतात, ना राज्यनियंत्रित व्यवस्थेचे. त्यांचा दृष्टिकोन व्यवहारवादी आहे. भारतासारख्या लोकशाही देशात सुधारणा एका झटक्यात होत नाहीत; त्या राजकीय वास्तवाशी जुळवून घेत हळूहळू पुढे सरकतात, हे ते वारंवार. अधोरेखित करतात. पुस्तकात अनेक ठिकाणी `सुधारणा` हा आर्थिक नव्हे, तर राजकीय प्रक्रियेचाही विषय आहे, हे प्रकर्षाने जाणवते. अहलुवालिया या पुस्तकात अनेक व्यक्ती, अधिकारी, अर्थतज्ज्ञ आणि राजकीय नेत्यांच्या योगदानाचा उल्लेख करतात. नरसिंह राव, मनमोहन सिंग, पी. चिदंबरम, यशवंत सिन्हा, जसवंत सिंह यांच्यापासून ते विविध सनदी अधिकाऱ्यांपर्यंत अनेकांची भूमिका ते प्रामाणिकपणे नोंदवतात. योजना आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून काम करताना अहलुवालिया यांनी जवळून अनुभवलेला काळ येथे उभा राहतो. सन २००४ ते २०११ या काळातील उच्च आर्थिक वाढ, दारिद्रयनिर्मूलनातील प्रगती, पायाभूत सुविधांमध्ये झालेली वाढ आणि ग्रामीण विकासाच्या कार्यक्रमांचे मूल्यमापन ते करतात. विशेषतः भारताने सलग अनेक वर्षे सात ते आठ टक्क्यांच्या दरम्यान वाढ नोंदवली, ती केवळ जागतिक परिस्थितीचा. परिणाम नव्हती; १९९० नंतरच्या सुधारणांनी घातलेल्या पायावर उभे राहून ती शक्य झाली, हा त्यांचा युक्तिवाद पटण्याजोगा वाटतो. मात्र पुस्तकाचे खरे सामर्थ्य यशोगाथेत नाही, तर आत्मपरीक्षणात आहे. यूपीए-२ दरम्यान निर्माण झालेली निर्णयप्रक्रियेतील अडचण, गुंतवणुकीतील वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक मंदी, भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे निर्माण झालेले वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक थेट भाष्य करतात. अनुवादक जी. बी. देशमुख यांनी मूळ पुस्तकातील आर्थिक संकल्पना सहज आणि प्रवाही मराठीत मांडल्या आहेत. यात कृत्रिमता जाणवत नाही. आर्थिक विषयावरील पुस्तक असूनही भाषा जड वाटत नाही. आर्थिक सुधारणांच्या व्यापक सामाजिक परिणामांचा स्वतंत्र आणि सविस्तर ऊहापोह येथे अपेक्षेपेक्षा कमी आढळतो. मात्र, हे पुस्तक ज्या उद्देशाने लिहिले गेले आहे त्या उद्देशात ते अत्यंत यशस्वी ठरते. `बॅकस्टेज` हे केवळ पुस्तक नाही; ते भारताच्या आर्थिक परिवर्तनाचा प्रत्यक्षदर्शी दस्तऐवज आहे. १९९१ नंतर भारताने घेतलेल्या वळणाचा अर्थ समजून घ्यायचा असेल, उच्च वाढीच्या वर्षामागील वास्तविक कथा जाणून घ्यायची असेल आणि धोरणनिर्मितीच्या पडद्यामागे काय घडत असते याचा मागोवा घ्यायचा असेल, तर हे पुस्तक अभ्यासणे आवश्यक ठरते. भारतीय अर्थव्यवस्थेच्या आर्थिक सुधारणांचा इतिहास आणि त्यांचे परिणाम समजून घेण्यासाठी हे पुस्तक एक महत्त्वाचा संदर्भग्रंथ म्हणून ओळखले जाऊ शकते. मराठीत उपलब्ध असलेला हा अनुवाद त्या दृष्टीने विशेष स्वागतार्ह आहे. ...Read more

HACHYUKISUNASKI
HACHYUKISUNASKI by ABA MAHAJAN Rating Star
Dinesh

This is a different planet. This is a different world. And this is a truly different book. I loved it. You should also buy it and read it. I’m sure you will love it too. Hachyukisunaski is a fantastic Book.