* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: AKHADA:THE AUTHORIZED BIOGRAPHY OF MAHAVIR SINGH PHOGAT
  • Availability : Available
  • Translators : LEENA SOHONI
  • ISBN : 9789386454911
  • Edition : 1
  • Publishing Year : MAY 2017
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 208
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE INSPIRING LIFE STORY OF ONE OF INDIA’S GREATEST WRESTLING COACHES. IN 2000, AFTER THE OLYMPIC GAMES CLOSED WITH MUCH FANFARE IN SYDNEY, LEGENDARY WRESTLER MAHAVIR SINGH PHOGAT WATCHED, DEJECTED AND HEARTBROKEN, AS THE PRIZE RESERVED BY HIS STATE GOVERNMENT FOR WINNERS OF OLYMPIC MEDALS IN WRESTLING WERE LEFT UNCLAIMED. DETERMINED TO NEVER SEE THIS INSTANCE REPEATED, PHOGAT DECIDED TO DO THE UNTHINKABLE. MUCH TO HIS NEIGHBOURS’ CURIOSITY HE SPENT TWO DAYS DIGGING A PIT IN HIS COURTYARD AND ASKED HIS YOUNG DAUGHTERS AND NIECES TO JOIN HIM THERE AT THE BREAK OF DAWN ONE DAY. LITTLE DID THEY KNOW THAT THIS UNUSUAL COMMAND FROM HIM WOULD CHANGE THEIR LIVES FOREVER. YET, EACH OF THEIR WINS IN THE RING, EVERY AMBITION HE HAD FOR THEM, CAME AT GREAT PERSONAL COST. IN THE SMALL VILLAGE OF BALALI IN HARYANA, A STATE INFAMOUS FOR ITS PRACTICE OF FEMALE FOETICIDE AND LOW LITERACY RATES, PHOGAT HAD TO BATTLE NOT JUST DEEP SOCIAL STIGMA AND AN APATHETIC GOVERNMENT, BUT ALSO A DISAPPROVING FAMILY AND PERSONAL TRAGEDY TO TRAIN THE GIRLS IN HIS SPORT. DUE TO HIS EFFORTS, THE GIRLS HAVE ALL GONE ON TO WIN MEDALS AND ACCLAIM AT THE NATIONAL AND INTERNATIONAL LEVELS, INCLUDING AT THE OLYMPICS AND THE COMMONWEALTH GAMES. AKHADA TELLS THE REMARKABLE STORY OF A MAN OF TREMENDOUS FORTITUDE, OF A FATHER WHO FOUGHT AGAINST ALL ODDS TO GIVE HIS DAUGHTERS A FUTURE THEY COULD NOT HAVE DREAMED FOR THEMSELVES.
ख्यातनाम कुस्तीपटू महावीर सिंग फोगाट यांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीची कहाणी आखाडामधून सांगितली आहे. त्यांच्या राज्यातील (हरियाणातील) कुस्तीपटूंना ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक मिळवण्यात यश येत नव्हतं. त्यामुळे ही परिस्थिती बदललीच पाहिजेया निर्धाराने पेटून उठलेल्या महावीरसिंग यांनी आपल्या घरातील मुलांबरोबर मुलींनाही कुस्तीचं प्रशिक्षण द्यायच ठरवलं. बलालीसारख्या लहानशा खेड्यात मुलींनी कुस्ती शिकणं म्हणजे कुळाला बट्टा लावणं होतं. त्यामुळे महावीरसिंगांना घरच्या-दारच्या संघर्षाला तोंड द्यावं लागलं. तसंच बलाली गावात स्टेडियम नसल्यामुळे एक शेतजमीन भाड्याने घेऊन त्यावर त्यांनी ४०० मीटरचा ट्रॅक बनवला. त्या ट्रॅकवरून जो कोणी ट्रॅक्टर नेईल त्याच्याकडूनच ते ट्रॅकची दुरुस्ती करून घेत. या सगळ्या प्रयत्नांत गावकऱ्यांची त्यांना चांगली साथ होती. महावीर सिंग यांची ही मेहनत फळाला आली आणि यानंतरच्या वर्षांमध्ये त्यांच्या हाताखाली तयार झालेल्या या कुस्तीपटूंनी आखाड्यात भरघोस यश संपादन केलंपराक्रम गाजवला. महावीर सिंगांची ही संघर्षगाथायशोगाथा जाणून घेण्यासाठी आखाडाहे पुस्तक जरूर वाचलं पाहिजे. कुस्तीचे प्रशिक्षक आणि कुस्तीपटू यांच्यासाठी तर ते मार्गदर्शक आहेचपण कोणत्याही क्रीडा प्रशिक्षकांना आणि क्रीडापटूंना ते प्रेरणा देणारं आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #AKHADA #AKHADA #आखाडा #BIOGRAPHY&TRUESTORIES #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #LEENASOHONI #लीनासोहोनी #SAURABHDUGGAL "
Customer Reviews
  • Rating StarSAKAL

    फक्त वर्तमानात जगायचं........ महावीर सिंग फोगाट यांची प्रेरणादायी जीवन कहाणी.

  • Rating StarDAINIK SAMANA 26-11-2017

    आखाडा महावीरांचा... ‘दंगल’ चित्रपट गाजला. या सिनेमाची प्रेरणा असणाऱ्या पहेलवान महावीर सिंग यांची ही जीवनकहाणी. गीता आणि बबिता फोगाट यांच्या विजयाची कथा सर्वांना ठाऊक आहे. परंतु त्यांचे पिता आणि गुरू म्हणून कुस्तीचा फड गाजविणारे महावीर सिंग यांच्या अक मेहनतीची कथा आणि व्यथा जितकी मनोरंजक आहे तितकीच स्फूर्तिदायक आहे. ग्रामीण भागात जुन्या रूढी आणि परंपरांना छेद देणाऱ्या या कुस्तीबहाद्दराने मुलींना ‘सबला’ कसे केले. हेही तितकेच हृदयस्पर्शी आणि चित्तवेधक आहे. मुलींना क्रीडा क्षेत्रात कुठे वाव आहे. या प्रश्नाचे उत्तर देणारे हे पुस्तक अनेक मातापित्यांना दिलासा देणारे ठरले आहे. स्त्रियांना प्रथम दर्जाचा आदर मिळावा म्हणून या पुस्तकाने एक नवा संदेश दिला आहे. ‘आंतरराष्ट्रीय’ फोगाट कुटुंबाने ‘बलाली’ नामक गावाला जागतिक कीर्ती कशी मिळवून दिली हे वाचनीय आहे. ब्राझीलमधील ऑलिम्पिक स्पर्धेत यश मिळविण्यासाठी काय काय करावे लागले. समाज किती मागासलेला आहे. कुणी कशी मदत केली वगैरे अनेक सुखदुःखाच्या घटना वाचकांस अवाक करतात. आता २०२० मध्ये टोकियोत स्पर्धा होतील त्या स्पर्धेची तयारी त्यांनी कधीच सुरू केली आहे. वडिलांना स्वतःचे स्वप्न पूर्ण केल्याचे समाधान आहेच. त्यांच्या भविष्यकाळाला उज्ज्वल शुभेच्छा! -अरविंद दोडे ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL (SAPTRANG) 08-10-2017

    प्रसिद्ध कुस्तीपटू महावीरसिंग फोगाट यांचं हे चरित्र. कुस्तीच्या वर्तुळात फोगाट आणि त्यांच्या चार मुलींची प्रेरणादायी कहाणी चर्चेत असली, तरी ‘दंगल’ या चित्रपटामुळं ती अगदी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचली. बलाली या गावातल्या गीता, बबिता, विनेश आणि रितू यांी वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं. त्यांच्या या सगळ्या प्रवासात अनेक अडचणी आल्या, अनेक प्रेरक प्रसंगही आले. पत्रकार सौरभ दुग्गल यांनी फोगाट कुटुंबीयांशी, त्यांच्याशी संबंधित इतरांशी प्रत्यक्ष बोलून, वेगवेगळे संदर्भ तपासून हे तपशीलवार चरित्र लिहिलं आहे. लीना सोहोनी यांनी अनुवाद केला आहे. ...Read more

  • Rating Star‎Vaibhav Mahajan‎ वाचनवेडा

    नुकताच प्रदर्शित झालेल्या आमिर खान अभिनीत "दंगल" या चित्रपटातील श्री महावीर सिंह फोगाट या व्यक्तीचा जीवनावर आधारित मेहता पब्लिशिंग हाउस यानी प्रकाशित केलेले अखाड़ा हे सुंदर पुस्तक नक्की एकदा वाचा. एका धाडसी व जिद्दी बापाची कहानी.

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

KHULBHAR DUDHACHI KAHANI
KHULBHAR DUDHACHI KAHANI by SUNANDA AMRAPURKAR Rating Star
श्रीपाद ब्रह्मे

नुकतंच असंच वेगानं वाचून संपवलेलं दुसरं पुस्तक म्हणजे सुनंदा अमरापूरकर यांचं ‘खुलभर दुधाची कहाणी’. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या त्या पत्नी. अर्थात ही काही त्यांची एकमेव ओळख नव्हे. एक चांगल्या अभिनेत्री, उत्तम अनुवादक म्हणूनही त्या ्रसिद्ध आहेत. त्यांनी ‘खुलभर दुधाची कहाणी’ या आत्मचरित्रवजा लेखनातून त्यांच्या जगण्याचा व्यापक पट अतिशय प्रांजळपणे उलगडला आहे. मला हे पुस्तक विशेष भावण्याचं कारण म्हणजे त्यात आलेलं नगरचं वर्णन. मी स्वत: नगरला फार प्रदीर्घ काळ राहिलो नसलो, तरी ते शेवटी माझ्या जिल्ह्याचं गाव. आणि वयाच्या १३ ते २२ अशा महत्त्वाच्या कुमार व तरुण वयातला माझा तिथला रहिवास असल्यानं नगरच्या आठवणी विसरणं शक्य नाही. सुनंदाताई माझ्या आईच्या वयाच्या. त्यामुळं त्यांच्या लहानपणच्या आठवणी जवळपास माझ्या जन्माच्या २०-२५ वर्षं आधीच्या. असं असलं तरी मी त्या वर्णनाशी, त्या काळातल्या नगरशीही रिलेट होऊ शकलो, याचं कारण मुळात गेल्या शतकात बदलांचा वेग अतिशय संथ होता. नगरसारख्या निम्नशहरी भागात तर तो आणखी संथ होता. त्यामुळं एकूण समाजजीवनात १९६० ते १९९० या तीस वर्षांत तपशिलातले फरक सोडले, तर फार मोठा बदल झाला नव्हता. सुनंदाताई माहेरच्या करमरकर. त्यांचं आजोळ‌ सातारा असलं, तरी त्या जन्मापासून नगरमध्येच लहानाच्या मोठ्या झालेल्या. अगदी पक्क्या ‘नगरी’ म्हणाव्यात अशा. ( आजही त्या स्वत:ला अभिमानानं ‘नगरकर’च म्हणवून घेतात.) सुनंदाताईंचे वडील त्या दहा वर्षांच्या असतानाच गेले. त्यांना मामांचा आधार होता, पण आईनंच लहानाचं मोठं केलं. तेव्हाचं त्यांचं निम्न मध्यमवर्गीय जगणं, नगरमधले वाडे, तिथलं समाजजीवन, तिथल्या शाळा, शिक्षक, नगरमधील दुकानं, दवाखाने, तिथल्या गल्ल्या, बाजार हे सगळं सगळं सुनंदाताई अतिशय तपशीलवार उभं करतात. नगरसारख्या मध्यम शहरात वाढलेल्या महाराष्ट्रातील कुठल्याही शहरातील त्या काळातील व्यक्तीला अतिशय सहज रिलेट होईल, असं त्यांचं हे जगणं होतं. त्यात सुनंदाताईंचं लेखन अतिशय सहज, सोपं आणि प्रांजळ असल्यामुळं ते आपल्याला अगदी भिडतं. एका प्रख्यात अभिनेत्याची पत्नी असल्यानं त्यांचं जीवन इतर सर्वसामान्य स्त्रियांपेक्षा वेगळं झालं असेल, अशी आपली अपेक्षा असते. सुनंदाताईंच्या लेखनातून या ‘वेगळ्या जीवना’ची काही तरी झलक मिळेल, अशीही आपली एक भूमिका तयार झालेली असते. सदाशिव अमरापूरकरांसारख्या मनस्वी अभिनेत्याशी लग्न झाल्यानंतर सुनंदाताईंचं जगणं बदललंही; मात्र ते वेगळ्या पद्धतीनं. सदाशिव अमरापूरकर ऊर्फ नगरकरांचा लाडका बंडू त्यांना नगरमध्ये शाळेपासून कसा भेटला, नंतर कॉलेजमध्ये दोघांनी एकाच ग्रुपमधील नाटकं कशी सादर केली, त्यात अगदी नकळतपणे त्यांचं प्रेम कसं जमलं आणि नंतर नगर सोडून त्या पतीच्या कारकिर्दीसाठी मुंबईत कशा आल्या हा सर्व नाट्यमय प्रवास सुनंदाताई अतिशय तन्मयतेनं मांडतात. अमरापूरकर मंडळींच्या घराविषयीचे तपशील त्यात येतात. अमरापूरकरांचे वडील दत्तोपंत हे नगरमधलं मोठं प्रस्थ. श्रीमंत घराणं. मोठा वाडा, नोकरचाकर वगैरे. त्या तुलनेत सुनंदाताईंची माहेरची परिस्थिती जेमतेम म्हणावी अशी. अशा परिस्थितीत हे लग्न झालं आणि त्या अमरापूरकरांची सून झाल्या, इथपर्यंत पुस्तकाचा निम्मा प्रवास (मध्यंतरच) होतो. पुढल्या दोनशे पानांत आपल्याला खऱ्या अर्थानं सदाशिव अमरापूरकर हे काय व्यक्तिमत्त्व होतं, हे उलगडत जातं. अमरापूरकरांनी शेवटपर्यंत त्यांची मध्यमवर्गीय राहणी व मध्यमवर्गीय मूल्यं सोडली नाहीत. ‘अर्धसत्य’सारख्या सिनेमामुळं एका रात्रीतून ते भारतभरात प्रसिद्ध झाले. या एका ओळखीमुळं अमरापूरकरांचं जीवन पूर्ण बदलून गेलं. तोपर्यंत असलेली आर्थिक ओढगस्तीही संपली. हिंदी चित्रपटसृष्टीत अगदी स्वप्नवत अशा रीतीनं ते मोठे स्टार झाले. एकापाठोपाठ एक खलनायकी भूमिका त्यांच्याकडं येऊ लागल्या. पैसा येऊ लागला. अशा परिस्थितीत एक मध्यमवर्गीय कुटुंब या सगळ्या धबधब्याला कसं तोंड देतं आणि आपली मूल्यं कायम जपत राहतं, हे सुनंदाताईंनी फार हृद्यपणे लिहिलं आहे. सुनंदाताईंनी अनेक वर्षं एलआयसीत नोकरी केली. पतीचं अस्थिर क्षेत्र असल्यानं त्यांनी सुरुवातीला नोकरी केलीच; पण नवरा हिंदी चित्रपटसृष्टीत सुपरस्टार व्हिलन झाल्यावरही त्यांनी ही नोकरी सोडली नाही. त्यांच्या तिन्ही मुलींवर त्यांनी उत्तम संस्कार केले. एका सिनेमाच्या प्रीमियरनंतर हे सगळे कुटुंबीय कसे घरी जाऊन पिठलं-भाकरीचं जेवण तयार करून जेवले हे त्यांनी एका प्रसंगात अतिशय खेळकरपणे सांगितलं आहे. अमरापूरकरांचं नाटकवेड, भौतिक सुखांविषयीची काहीशी विरक्त वृत्ती, त्यांचा मित्रांचा गोतावळा, अनेक माणसांचा घरात राबता असा एकूण ‘देशस्थी’ कारभार यावर सुनंदाताई कधी गमतीत, तर कधी काहीसं वैतागून टिप्पणी करतात. अर्थात त्यांचं सदाशिव अमरापूरकरांवर अतिशय प्रेम होतं आणि त्यांनी हे शेवटपर्यंत उत्तम निभावलं. अशा आत्मचरित्रांत अनेकदा ‘आहे मनोहर तरी... गमते उदास’ असा सूर लागण्याचा धोका असतो. सुनंदाताईंच्या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणजे, एखादा अपवाद वगळता, त्यांच्या या संपूर्ण पुस्तकात असा रडवा सूर कधीही लागलेला नाही. आपल्याला जे काही मिळालं, ते आपणच निवडलं आहे आणि त्यामुळं त्याविषयी तक्रार करण्याचा आपल्याला काही अधिकार नाही, अशी एक भूमिका त्यांनी घेतलेली दिसते. त्यांच्या या पुस्तकातून विसाव्या शतकातील मध्यमवर्गीय ब्राह्मण घरातील एका तरुणीच्या आशा-आकांक्षांचा, आयुष्यानं दिलेल्या आश्चर्याच्या धक्क्यांचा आणि त्याला सामोरं जाण्यातील धीट दिलदारपणाचा लोभस प्रवास दिसतो. आपली मध्यमवर्गीय मूल्यं जपत, प्रामाणिकपणे व उमेदीनं आयुष्य जगणाऱ्या अनेक महिलांना या पुस्तकात आपल्या जगण्याचं प्रतिबिंब सापडेल. तेच या ‘खुलभर दुधाच्या कहाणी’चं यश आहे. ...Read more

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
प्रभाकर गावंडे, अमरावती

मी विकत घेऊन वाचले आहे हे पुस्तकं, चांगले आहे, नवीन माहिती वाचायला मिळाली.