CHRISTOPHER REICH

About Author

Birth Date : 12/11/1961


CHRISTOPHER REICH IS A SWISS AMERICAN AUTHOR. CHRISTOPHER REICH WAS BORN IN TOKYO ON NOVEMBER 12, 1961, SON TO WILLY WOLFGANG REICH AND MILDRED REICH. HIS FAMILY MOVED TO THE UNITED STATES IN 1965. HE GRADUATED UNDERGRAD FROM GEORGETOWN UNIVERSITY AND WENT ON TO STUDY BUSINESS AT THE UNIVERSITY OF TEXAS.

खिस्तोफर रिच यांचा जन्म टोकिओमध्ये झाला. वयाच्या चौथ्या वर्षी तो कुटुंबासमवेत लॉस एंजलिसला आला. १९७९साली त्याने हार्वर्ड स्वूÂलमधून पदवी संपादन केली. त्यानंतर वॉशिंग्टन डी.सी.ला जाऊन तिथल्या जॉर्जटाउन विद्यापीठातून त्याने आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र या विषयातही पदवी मिळवली. दोन वर्षं त्याने स्टॉकब्रोकरचा व्यवसाय केला, पण त्यात त्याचे मन रमले नाही. स्वित्झर्लंडला जाऊन तो युनियन बँक ऑफ स्वित्झर्लंडमध्ये नोकरी करू लागला. सात वर्षं बँकेत नोकरी केल्यावर त्याने अचानक लेखक व्हायचं ठरवलं. तोपर्यंत त्याने एखादी लघुकथादेखील लिहिली नव्हती विंÂवा इंग्रजी वाङ्मयाचा नीट अभ्यासही केला नव्हता. पण त्याला वाचनाचं जबरदस्त वेड होतं. आपण नक्की लेखक होऊ याचा ठाम विश्वास त्याला होता व त्याच्या पत्नीने त्याच्या या निर्णयाला मनापासून पाठिंबा दिला. त्यानंतर तो ऑस्टिनला स्थलांतरित झाला व तिथेच त्याने ‘नंबर्ड अकाउंट’ ही त्याची पहिली कादंबरी लिहिली. ‘नंबर्ड अकाउंट’ आणि ‘द पॅट्रियट्स क्लब’ या त्याच्या दोन गाजलेल्या कादंबNयांमुळे न्यू यॉर्वÂच्या सर्वाधिक खप असलेल्या लेखकांमध्ये त्याचं नाव झळकलं व २००६साली सर्वोत्कृष्ट खळबळजनक कादंबरीकाराचं पारितोषिक देऊन त्याला सन्मानित करण्यात आलं. पत्नी व मुलांसह तो सध्या दक्षिण वॅÂलिफोर्निया येथे राहत आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
RULES OF DECEPTION Rating Star
Add To Cart INR 750
TBC Classic Book

Latest Reviews

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
डॉ शिंदे निलेश, अमरावती

`कुलमामाच्या देशात` वाचून काढले. प्रत्येक कथा खुप वाचनीय आहे. `कपारीत वाघोबा` मध्ये रवींद्र वानखडे ह्यांनी पहाटे चार ते 10 नुसती भ्रमंती केली आहे.. सकाळची सूर्यकिरण अंगावर पडली असताना वाघ बघायला भेटणं ही एक अप्रूप वाटणारी गोष्ट आहे. `डरकाळीचा रार` वानखडे साहेबांनी बेलसरें सोबत अनुभवला आहे. `जिवाची पर्वा` न करता वानखडे साहेब पाळण्यात विसावले होते. गव्याच्या पिलावर वाघीणीने हल्ला केला नाही.. हे वानखडे साहेबांनी स्वतः बघितले व आम्हाला देखील समजले.. वाघाच्या पंजाची कशी प्रतिकृती तयार करतात हे सांगितले परंतू मला लक्षात आले नाही (मी प्रत्यक्ष बोलून जाणून घेईन). `मेहमान रह गया` या कथेत वाघाने माणसाची शिकार कशी केली त्यानंतर वनविभागाने बसची सोय करून मुलांना मदत कशी झाली हे देखील सांगितले व आपल्या सारखे वन अधिकारी काय करू शकतो हे प्रांजळ पणे नमूद केले आहे.. सेमडोह येथील गजराजाची कथा अजून देखील लोक सांगतात त्यातील तुम्ही त्याला वाचवयाचा प्रयत्न केला परंतू तो नियतीला मान्य नसेल. बाणा का घुंगरू- मधील हल्ला व घटना मन विचलित करणारी वाटली व मेळघाट मधील वन कर्मचारी किती कामसू आहेत हे त्या वरून दिसले.. मला बाणा ढाप प्रत्यक्ष बघायला आवडेल.. `रानगव्यांची कवायत` मध्ये रानगवे स्वतःच रक्षण कश्या पद्धतीनं करतात हे मला पहिल्यांदा समजले.. कोकटु इथं तीन दिवस आपण वाघ बघण्याची केलेली हॅट्रिक ही जंगलाने तुम्हा वनाधिकार्‍यास दिलेली सलामी आहे. `शिकार हो गया` - माहुल वेलीचा कसा उपयोग केला जातो व पोळी तयार करतात हे देखील वेगळी गोष्ट वाटली.. आपण सांबर शिकार कशी थांबवली व वन्यजीवनाची साखळी अबाधित राखली.. वाघ खेकडे मारून खातो हे ऐकून नवल वाटले.. असा सॉलिड वन अधिकारी मेळघाटला लाभला हे या कथां मधून मला समजलं व प्रत्येक वाचकाला हे जंगल, इथले लोक या विषयी कायम आकर्षण निर्माण करत राहील.. ...Read more

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
श्री. बाबाराव घोरमाडे, अमरावती

अमरावती जिल्हा मधील एका सामान्य खेड्यातील, एक अलौकिक असामान्य अशा फुटबॉल खेळाडूचे हे व्यक्तिचरित्र. १९४० ते १९५१ हा कालखंड म्हंजे तसाही भारतीया करीता त्यातल्या त्यात ग्रामीण भागाकरिता खडतर कालखंड. अशा विपरीत परिस्थितीत शैक्षणिक आर्थिक सामाजिक मारगदर्शन इत्यादी पाठबळ चा अभाव असताना सुद्धा आतंरराष्ट्रीय दर्जा चा खेळाडू निर्माण होणे हे ते चरित्र नायक चे असामान्य व्यक्तिमत्व अधोरेखित होते. समाधानाची आनंदाची बाब ही की हे पुस्तक रूपाने प्रसिध्द करण्याचे काम चरित्र नायक चे सुपुत्र श्री गजाननराव उर्फ जी बी देशमुख यांनी केले. हे सर्व काही अंशी कर्ज ओझे हलके करण्यासारखे आहे लेखकाला या करीता खूप मेहनत करून माहिती संकलित करावी लागली. एखादी थप्पड बनती थी........ बडे बेआबरू होकर घरी आलो........पण कहाणी मे ट्विस्ट अभि बाकी था..... प्रसंगी चे वाक्य रचना , कोसळणाऱ्या धबधबा सारखे निखळ आनंद देऊन गेले . मेहता पब्लिशिंग ने लॉन्च केले म्हणजे सर्वदूर मराठी माणसाचे पर्यंत पोहोचले आहे वाचनीय आहे प्रत्येकाने वाचावे.विसावा शतकातील पुर्वाध, विपरीत परिस्थितीतही किती कष्ट करावे लागले असतील? धन्य ते.. ...Read more