* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: I LOST MY LOVE IN BAGHDAD
  • Availability : Available
  • Translators : ANJANI NARAVANE
  • ISBN : 9788184981902
  • Edition : 2
  • Publishing Year : JANUARY 2011
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 278
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
  • Available in Combos :ANJANI NARAWANE COMBO SET-22 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Print Books:
"I LOST MY LOVE IN BAGHDAD" IS AN EXTRAORDINARILY GRIPPING AND INFORMATIVE ACCOUNT OF THE CHAOS INSIDE THE GREEN ZONE BY "NEWSWEEK`S" YOUNGEST WAR CORRESPONDENT, WHOSE FIANCE WAS KILLED DURING AN ATTEMPTED KIDNAPPING. AT AGE TWENTY-FIVE, MICHAEL HASTINGS ARRIVED IN BAGHDAD TO COVER THE WAR IN IRAQ FOR "NEWSWEEK," HE HAD AT HIS DISPOSAL A LITTLE HEMINGWAY ROMANTICISM AND ALL THE APPARATUS OF A TWENTY-FIRST-CENTURY REPORTER -- CELL PHONES, HIGH-SPEED INTERNET ACCESS, DIGITAL VIDEO CAMERAS, FIXERS, DRIVERS, GUARDS, TRANSLATORS. IN STARTLING DETAIL, HE DESCRIBES THE CHAOS, THE VIOLENCE, THE NEVER-ENDING THREATS OF BOMB AND MORTAR ATTACKS, THE FRONT LINES THAT CAN BE A HALF MILE FROM THE GREEN ZONE, THAT CAN BE ANYWHERE. THIS IS A NEW KIND OF WAR: PRIVATE SECURITY COMPANIES FOLLOW THEIR OWN RULES OR LACK THEREOF; SOLDIERS IN COMBAT GET INSTANT MESSAGES FROM THEIR GIRLFRIENDS AND FAMILIES; MEMBERS OF THE LOUISIANA NATIONAL GUARD WATCH KATRINA`S DECIMATION OF THEIR CITY ON A TV IN THE BARRACKS. BACK IN NEW YORK, HASTINGS HAD FALLEN IN LOVE WITH ANDI PARHAMOVICH, A YOUNG IDEALIST WHO WORKED FOR AIR AMERICA. A YEAR INTO THEIR COURTSHIP, ANDI FOLLOWED MICHAEL TO IRAQ, TAKING A JOB WITH THE NATIONAL DEMOCRATIC INSTITUTE. THEIR WAR-ZONE ROMANCE IS ANOTHER WINDOW INTO LIFE IN BAGHDAD. THEY CALL EACH OTHER PET NAMES; THEY MAKE PLANS FOR THE FUTURE; THEY FIGHT, USUALLY BECAUSE EACH IS FEARFUL FOR THE OTHER`S SAFETY; AND THEY TRY TO FIGURE OUT HOW TO GET TOGETHER, WHEN IT MEANS PUTTING BODYGUARDS AND DRIVERS IN JEOPARDY.THEN ANDI GOES ON A DANGEROUS MISSION FOR HER NEW EMPLOYER -- A MEETING AT THE IRAQI ISLAMIC PARTY HEADQUARTERS THAT ENDS IN CATASTROPHE. SEARING, UNFLINCHING, AND REVELATORY, "I LOST MY LOVE IN BAGHDAD" IS BOTH A RAW, BRAVE, BRILLIANTLY OBSERVED ACCOUNT OF THE WAR AND A HEARTBREAKING STORY OF ONE LIFE LOST TO IT.
लहानपणापासून लष्कर, शस्त्रास्त्रं, युद्ध याबद्दल खूप कुतूहल आणि आकर्षण असलेला मायकेल होस्टिंग्ज मोठा झाल्यावर ‘न्यूजवीक’चा वार्ताहर होतो आणि इस्राइल, व्हिएतनाम इत्यादी ठिकाणी अनुभव घेतल्यावर त्याची नेमणूक इराकमधील वार्ताहर म्हणून होते. ते काम त्याला आवडतं; परंतु त्याच सुमारास अ‍ॅन्डी या अतिशय हुशार, सुरेख आणि आदर्शवादी तरुणीच्या तो प्रेमात पडतो आणि एकमेकांपासून दूर राहणं दोघांना खूप जड जातं. आदर्शवादी अ‍ॅन्डी सद्दामच्या पाडावानंतर इराकमधील राजकीय पक्षांना लोकशाही मूल्यं प्रस्थापित करण्यास मदत करण्याच्या विचारांनी प्रेरित होऊन आणि मायकेल आहे त्या देशात राहायला मिळेल म्हणून इराकमध्ये नॅशनल डेमोक्रटिक इन्स्टिट्यूटमध्ये नोकरी मिळवून बगदादला येते, उत्साहानं कामाला लागते. परंतु इराकमध्ये परिस्थिती अत्यंत वाईट असते. जी हिंसा चालू असते, ती विश्वास बसणार नाही, कल्पना करता येणार नाही, समजणार नाही अशी असते. अमेरिकन सैनिकांच्या मनातही कडवटपणा असतो, कठोर उपहास असतो. किती अमेरिकन कुटुंबांचा सत्यानाश करीत असतं हे युद्ध हे त्यांच्या सरकारला समजत नसतं? २००६ साल संपतं तेव्हा छत्तीस हजार इराकी मेलेले असतात, आठशेहून जास्त अमेरिकन्स मेलेले असतात, पन्नास कोटी डॉलर्स खर्च झालेले असतात. शिया आणि सुन्नी एकमेकांना तर मारत असतातच; परंतु अमेरिकन लष्कर आणि अमेरिकन माणसं तर तेथे कोणालाच नको असतात म्हणून तेही मारले जात असतात. अशा भयानक वातावरणात उत्साह आणि चिकाटी टिकवून धरून काम करू पाहणा-या मायकेल आणि अ‍ॅन्डीच्या प्रेमकथेचा जो अत्यंत दुर्दैवी आणि भयानक अंत होतो, त्याबद्दल प्रत्यक्षच वाचा–

No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES #ILOSTMYLOVEINBAGDAD #ANAJANINARAVANE #MICHAELHASTINGS #मायकेलहेस्टीग #अंजनी नरवणे
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAMANA 15-05-2011

    बगदादची कथा... अरबी भाषेतल्या सुरस आणि चमत्कारिक या काही शतकांपूर्वी बगदादमध्ये सांगितल्या गेल्या होत्या कारण इस्लामी खलिफाची राजधानी त्याकाळी तिथे होती. प्रस्तुत ‘आय लॉस्ट माय लव्ह इन बगदाद’ या पुस्तकातली कथा बगदादमध्ये प्रत्यक्ष घडलेली आहे. मात् ती अमेरिकन कथा आहे नि शोकांत कथा आहे. मायकेल हेस्टिग्ज हा ‘न्यूजवीक’ या प्रख्यात अमेरिकन साप्ताहिकाचा वार्ताहर आहे. युद्ध हा त्याच्या कुतूहलाचा, आवडीचा, अभ्यासाचा विषय आहे. जेरुसलेम, वेस्ट बँक गाझा, कुर्दिस्तान या युद्धमान प्रदेशांमधून त्याने पाठवलेली वार्तापत्रे गाजलेली आहेत. २००३ साली अमेरिकेने इराकवर लष्करी आक्रमण केलं आणि दुसऱ्या आखाती युद्धाला सुरुवात झाली. २००५ साली ‘न्यूजवीकचा खास युद्धवार्ताहर म्हणून मायकेलची नेमणूक बगदादमध्ये झाली. खरं म्हणजे दुसरी कुणी अमेरिकन पोरगी असती तर तिने दुसरा प्रियकर शोधला असता पण अ‍ॅण्डी वेगळीच होती तिने इरकच्या नॅशनल डेमोक्रॅटिक इन्स्टिट्यूटमध्ये नोकरी मिळवली आणि ती पण बगदादमध्ये येऊन पोहोचली. इराकमधली परिस्थती कमालीची खराब होती. रोज केव्हाही. कुठेही डझनवारी बॉम्बस्फोट होत होते आणि शेकड्यांनी माणसे मरत होती. बगदादमधला मायकेल आणि अ‍ॅण्डी यांचा जीवनक्रम कमालीचा व्यस्त तर होताच, पण अक्षरश: प्रत्येक क्षण ते मृत्यूच्या छायेत जगत होते. आणि अखेर १७ जानेवारी २००७ हा दुर्दीन उगवला. अ‍ॅण्डी बगदाद शहराच्या यारमूक भागात इराकी इस्लामिक पार्टीच्या सदस्यांना भेटली. अ‍ॅण्डीच्या इन्स्टिट्यूटने इराकमध्ये लोकशाही व्यवस्था रुजावी यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम आखलेला होता त्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी ही भेट होती. भेट संपली. अ‍ॅण्डी बुलेटप्रुफ गाडीतून पार्टीच्या कार्यालयाबाहेर पडली. तोच तिच्या गाडीवर गोळ्यांचा भडीमार झाला. पण त्याचा काही उपयोग नाही हे दिसल्यावर अतिरेक्यांनी गाडीखाली हॅण्डग्रेनेडचा स्फोट घडवला अ‍ॅण्डी ठार झाली हे घडत असताना ज्यांना भेटण्यासाठी अ‍ॅण्डी गेली होती त्या इराकी इस्लामिक पार्टीचे लोक काम करीत होते. ते आपल्या पक्ष कार्यालयासमोरच घडणारा हा प्रकार शांतपणे पाहत उभे होते. ही खबर मिळाल्यावर मायकेल सुन्न झाला, पण हर हिकमतीने त्याने अ‍ॅण्डीचे मृतदेह - देह कसला. देहाचे अवशेष मिळवले नि अमेरिकेत आणले. या सगळ्या घटनाक्रमाचीच ही कथा. युद्धकथा नि शोकांत प्रेमकथा पण अत्यंत वाचनिय. अंजली नरवणे यांचा मराठी अनुवाद उत्तम, मांडणी, मुद्रण, मुखपृष्ठासह मेहता प्रकाशनाची एकंदर निर्मिती उत्तम. ...Read more

  • Rating StarSuhas Birhade

    अमेरिकन पत्रकार मायकल हेस्टिंग याचे इराक मधील युध्दाच्या रिपोर्टींग वरील ``आय लॉस्ट माय लव्ह इन बगदाद`` (२००८) हे पुस्तक. लेखकाने युध्दाचे कव्हरेज आणि स्वत:ची प्रेमकथा यांची सांगड घालत या पुस्तकाची मांडणी केली आहे. २००५ साली अमेरिका इराक मध्ये बंडखरांविरूध्द युध्दात उतरले. तेव्हा मायकल आपली प्रेयसी अॅण्डी पारहामोव्हीचला सोडून `न्युज विक` या साप्ताहिकातर्फे इराक मध्ये रिपोर्टिंगसाठी जातो. सतत संकटं, मृत्यूचा धोका पत्करून तो रिपोर्टींग करत असतो. मायकलच्या विरहाने व्याकुळ झालेली अॅण्डी त्याचा सहवास मिळावा म्हणून अमेरिकन परराष्ट्रखात्यात नोकरी मिळवून बगदादला येते. ते सुखी संसाराची स्वप्न रंगवतात पण अचानक एका हल्ल्यात अॅण्डी मरण पावते. युध्दाचं बेडरपण कव्हरेज करणारा मायकलमधला अॅण्डीच्या मृत्यूने कोसळतो, भावनिक होतो. पुस्तकाच्या नावातच मायकलच्या प्रेमाचा मृत्यू होतो हे सांगितले असल्याने अॅण्डीच्या मृत्यूचा तसा वाचकांना धक्का बसत नाही. पण अॅण्डीचा मृत्यू चटका लावून जातो. पुस्तकातून इराक मधील भयावह स्थिती उलगडते. इराक हा सर्वाधिक भूसुरंग असलेला देश. दिडशे लाख सुरूंग पेरलेले होते. या युध्दात दिडशे पत्रकार हल्ल्यात मारले गेले. पण धाडस दाखवून मायकल रिपोर्टिंग करत असतो अमेरिकन सैन्याची इराक मधील कारवाई, बंडखोरांचे हल्ले, सुन्नी आणि शियांचा संघर्ष, इसिसचा उगम समजतो. सद्दाम हुसेनचा पडाव होण्यापर्यंतच्या घडामोडी पुस्तकात आहे. या युध्दात दररोज दोन अमेरिकन सैनिक मारले जात होते. जवळपास ३ हजार अमेरिकन सैनिक तर हजारो इराकी सैनिक मारले गेले. पत्रकाराला इराक सारख्या देशात रिपोर्टींग करताना किती संकटांना तोंड द्यावे लागायचं ते पुस्तकातून समजतं. पुस्तकात अमेरिकन सैनिकांच्या मनातील घालमेल, अस्वस्थता दिसून येते. मागील आठवड्यात अमेरिकेने अफगाणिस्तानात २१ हजार सैनिक पाठविण्याचा निर्णय़ घेतला आहे. इराक मधील युध्द अनुभवानंतर अमेरिकने अद्याप धडा घेतलेला नाही हेच दिसतं आपल्या प्रियकराच्या भेटीसाठी आलेली २८ वर्षांची अॅण्डी इसिसच्या दहशतवादी हल्ल्यात मारली जाते. तर पुस्तक लिहिल्यानंतर ४ वर्षातच २०१३ मध्ये वयाच्या ३३ व्या वर्षी मायकल देखील एका संशयास्पद कार अपघातात मरण पावतो. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more