* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: 127 HOURS BETWEEN A ROCK AND A HARD PLACE
  • Availability : Available
  • Translators : RESHMA KULKARNI-PATHARE
  • ISBN : 9789353172626
  • Edition : 1
  • Publishing Year : AUGUST 2019
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 280
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
  • Sub Category : MEMOIRS, DIARIES, LETTERS & JOURNALS
Quantity
Buying Options:
  • Print Books:
ON SUNDAY APRIL 27, 2003, 27-YEAR OLD ARON RALSTON SET OFF FOR A DAY`S HIKING IN THE UTAH CANYONS. DRESSED IN A T-SHIRT AND SHORTS, RALSTON, A SEASONED CLIMBER, FIGURED HE`D HIKE FOR A FEW HOURS AND THEN HEAD OFF TO WORK. 40 MILES FROM THE NEAREST PAVED ROAD, HE FOUND HIMSELF ON TOP OF AN 800-POUND BOULDER. AS HE SLID DOWN AND OFF OF THE BOULDER IT SHIFTED, TRAPPING HIS RIGHT HAND AGAINST THE CANYON WALL. NO ONE KNEW WHERE HE WAS; HE HAD LITTLE WATER; HE WASN`T DRESSED CORRECTLY; AND THE BOULDER WASN`T GOING ANYWHERE. HE REMAINED TRAPPED FOR FIVE DAYS IN THE CANYON: HYPOTHERMIC AT NIGHT, DE-HYDRATED AND HALLUCINATING BY DAY. FINALLY, HE FACED THE MOST TERRIBLE DECISION OF HIS LIFE: BRAKING THE BONES IN HIS WRIST BY SNAPPING THEM AGAINST THE BOULDER, HE HACKED THROUGH THE SKIN, AND FINALLY SUCCEEDED IN AMPUTATING HIS RIGHT HAND AND WRIST. THE ORDEAL, HOWEVER, WAS ONLY BEGINNING. HE STILL FACED A 60-FOOT RAPPELL TO FREEDOM, AND A WALK OF SEVERAL HOURS BACK TO HIS CAR - ALONG THE WAY, HE MIRACULOUSLY MET A FAMILY OF HIKERS, AND WITH HIS ARMS TOURNIQUED, AND BLOOD-LOSS ALMOST CRITICAL, THEY HEARD ABOVE THEM THE WHIR OF HELICOPTER BLADES; JUST IN TIME, ARON WAS RESCUED AND RUSHED TO HOSPITAL. SINCE THAT DAY, ARON HAS HAD A REMARKABLE RECOVERY. HE IS BACK OUT ON THE MOUNTAINS, WITH AN ARTIFICIAL LIMB; HE SPEAKS TO SELECT GROUPS ON HIS ORDEAL AND RESCUE; AND AMAZINGLY, HE IS UPBEAT, POSITIVE, AND AN INSPIRATION TO ALL WHO MEET HIM. THIS IS THE ACCOUNT OF THOSE FIVE DAYS, OF THE YEARS THAT LED UP TO THEM, AND WHERE HE GOES FROM HERE. IT IS NARRATIVE NON-FICTION AT ITS MOST COMPELLING.
ॲरन हा साहसी गिर्यारोहक एकदा कॅन्यनलँड्स या वाळवंटात गिर्यारोहणासाठी गेलेला असताना एका दगडाखाली अडकतो. त्याचा उजवा हात मनगटापासून कोपरापर्यंत चिरला जातो. त्याचा तो जखमी हात दगडाखाली अडकतो. जवळ मोजकंच खाद्य आणि पाणी...अशा परिस्थितीत सुरू होतो वेदनामय संघर्ष...त्या दगडापासून हात सोडवण्यासाठी त्याचे चालू असेलेले विविध प्रयत्न... पूर्वी केलेल्या साहसी मोहिमांच्या मनात दाटलेल्या आठवणी... एका बाजूला प्रचंड वेदना... जवळ असलेल्या व्हिडिओ कॅमेऱ्याद्वारे आपल्या प्रियजनांबद्दल व्यक्त केलेल्या भावना... ॲरनच्या वेदनामय संघर्षाची थरारक, हलवून सोडणारी कहाणी ‘ते १२७ तास...’

No Records Found
No Records Found
Keywords
#ते१२७तास! #अ‍ॅरनराल्स्टन #अनुवादकरेश्माकुलकर्णी-पाठारे #कॅननलॅँड #अनुवादितसत्यकथा #सोन्जा #वुल्फक्रीक #‘ब्लूजॉन #अनुवादितसत्यकथा #पॉलिटिक्सऑफदवूम्ब #जियोलॉजिकटाईम #इन्क्लूड्सनाऊ #एकअनादिअनंतप्रेमकथा #मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक#ANCHOR #CAMELBAK #CARABINER #DAISYCHAIN #PRAUSIKLOOP #RAPPELLING #WEBBING #HARNESS #SKLLNG #BIKING #HIKING #ARONRALSTON #RESHMAKULKARNI-PATHARE #EKANADIANANTPREMKAHANI #MARATHIBOOKS #ONLINEMARATHIBOOKS #TRANSLATEDMARATHIBOOKS #TBC #TRANSLATEDBOOKS@50%
Customer Reviews
  • Rating StarAnil Kudale

    `ते 127 तास` हे रेश्मा कुलकर्णी- पाठारे यांचं मराठी अनुवादीत पुस्तक नुकतंच वाचून झालं. अमेरिकेतील एक साहसी गिर्यारोहक `अॅरन राल्स्टन` च्या एका मोहिमेतील जीवावर बेतलेल्या 127 तासांचं अंगावर काटा आणणारं वर्णन. यावर आधारित हाॅलिवूड फिल्मही आहे. मरणांति संकटात होणारी मानवी मनाची अवस्था, थरार, आशावाद, शेवटपर्यंत संकंटाशी निकाराने लढा देण्याची विजीगीषू वृत्ती, खूप सारं.... पुस्तकामधे या प्रसंगाच्या वर्णनाबरोबरच अॅरनच्या इतर गिरीभ्रमण मोहिमांबद्दलच्या माहीतीचीही सांगड घातली आहे की ज्यामुळे अॅरनचे एकंदरीत व्यक्तीमत्वही समजते. आता सर्व काही संपलय....ते `बचेंगे तो और भी लडेंगे` या उक्तीचा प्रत्यय देणारं पुस्तक✔🙏 ...Read more

  • Rating StarKIRAN BORKAR

    अँरन हा गिर्यारोहक आहे .अति आत्मविश्वास हा त्याचा दुर्गुणच आहे . त्यामुळे तो अनेक वेळा जिवावरच्या संकटात सापडला आणि नशिबाने वाचलाही.आताही तो कॅनियन बेटावर अतिशय दुर्गम भागात गिर्यारोहणासाठी निघालाय . त्याने आपल्या प्रवासाची माहिती कोणालाच दिली नाही .ा आधी ही त्याने असे केले होते .अचानक काही ठरविणे हा त्याच्या स्वभावाचा भाग होता. त्या भागात फिरताना अचानक तो एका खिंडीत पडला. त्याच्या उजवा हात 800 पौडच्या दगडाखाली अडकला आणि दगड घट्ट बसला . पण त्यापुढचे सहा दिवस त्याच्यासाठी फक्त नरकयातना देण्यासाठी ठरले . अन्न नाही ...पुरेसे पाणी नाही..एक हात दगडाखाली गच्च अडकलेला...आजूबाजूला लोकवस्ती नाही. दिवसा रणरणते ऊन तर रात्री हाड गोठवणारी थंडी.त्यावेळी त्याच्यस भयानक मनस्थितीचे वर्णन अंगावर काटा आणते. वेळ काढण्यासाठी त्याने आपल्या गतजीवनातील आठवणी जागवल्या . स्वतःचे व्हिडीओ शूटिंग केले . फोटो काढले . पण आता शेवटी अन्न पाणी संपल्यावर आपण इथेच अडकून मरणार ही जाणीव झाल्यावर अचानक आणि क्रूर पद्धतीने त्याने स्वतःची सुटका केली. शेवटी 127 तासाने तो मोकळा झाला .या घटनेवरून 127 अवर्स हा चित्रपट 2010 साली प्रदर्शित झाला होता . अंगावर काटा आणणारे आणि जगण्याची प्रेरणा देणारे पुस्तक . © किरण कृष्णा बोरकर ...Read more

  • Rating StarDAINIK SAMANA 22-12-2019

    जीवन-मृत्यूच्या सीमारेषेवरचा जबरदस्त संघर्ष एखाद्या माणसाच्या समोर मृत्यू उभा राहतो आणि तरीही नेटाने तो त्या मृत्यूच्या दाढेतून बाहेर पडायचा अटोकाट प्रयत्न करत असतो. प्रयत्न करत असतानाच तो कधी थकतो, कधी मृत्यूला शरण जाण्याच्या निर्णयाप्रत येतो. त्ाच्या डोळयांसमोर गत जीवनातील अनेक आठवणी तरळायला लागतात, प्रियजनांच्या आठवणीने तो व्याकूळ होतो. अगदी अशीच स्थिती झाली होती अ‍ॅरन राल्स्टन या तरुणाची. तब्बल १२७ तास तो मृत्यूशी झगडत होता. त्याच्या या संघर्षाचा थरारक अनुभव त्याने स्वत:च सांगितला आहे ‘127 Hours between Rock and Hard Place’ या पुस्तकातून. या पुस्तकाचा मराठीत अनुवाद केला आहे रेश्मा कुलकर्णी-पाठारे यांनी. या पुस्तकाचं मराठी शीर्षक आहे ‘ते १२७ तास.’ लहान वयापासून साहसी खेळांची आवड असलेला अ‍ॅरन, वयाच्या विशीपर्यंत गिर्यारोहण, स्कीर्इंग, रॅपलिंग इत्यादी साहसी खेळांमध्ये अगदी निपुण असा खेळाडू बनला. चौदा हजार फुटांचे पर्वत सर करणे हा त्याच्या डाव्या हाताचा मळ होता. आपल्या कामानिमित्ताने किंवा वैयक्तिक आवडीसाठी तो अनेकदा लहान-मोठी पर्वतशिखरे सर करायला जात असे. असाच एकदा तो उताह येथील ब्ल्यू जॉन कॅन्यन खिंडीच्या भटकंतीवर गेला. एरवी आपला सगळा कार्यक्रम आणि आपण कुठल्या मार्गाने जाणार आहोत हे सगळे कुणाला तरी व्यवस्थित सांगूनच सफर करायला निघणाऱ्या अ‍ॅरनने या वेळी मात्र कुणालाच सदर सफरीची माहिती दिली नाही. इतकेच नव्हे, तर आपण ठरवलेल्या मार्गाने न जाता, स्वतःच्या लहरीनुसार मार्ग बदलत सफर करत गेला. काय कारण झाले देव जाणे; पण नेमका याच वेळी नियतीने आपला डाव साधला आणि एका निमुळत्या खिंडीमधून जाताना उजवा हात खिंडीच्या भिंतीमध्ये आणि अचानकरीत्या वरून घरंगळत आलेल्या महाकाय दगडामध्ये अडकला. त्यापुढचे पाच दिवस आणि सात तास, स्वतःला सोडवण्यासाठी काय-काय प्रयत्न केले; त्या प्रयत्नांसाठी आणि एकूणच सदर प्रसंगामध्ये जिवंत राहण्यासाठी आपली शारीरिक व मानसिक शक्ती कशी जतन केली; पुरेशा अन्न-पाण्याअभावी, अगदी स्वतःची लघवी पिऊनसुद्धा जीव कसा तगवला; आणि अखेर, एका बोथट सुरीने आपला सडत चाललेला हात कापून काढून स्वतःची सुटका कशी करून घेतली, याची कथा म्हणजे ‘ते १२७ तास!’ सुटकेनंतर त्याला आपला एक हात कायमचा गमवावा लागला. जीवघेण्या वेदनांना सामोरं जावं लागलं; पण तरीही त्याच्या साहसी मोहिमा चालू राहिल्या. अ‍ॅरनने या पूर्वी केलेल्या साहसी मोहिमांचा तपशील या १२७ तासांमध्ये त्याच्या डोळयांसमोर तरळलेल्या त्या मोहिमांच्या आठवणींतून समोर येतो. प्रियजनांच्या आठवणीने व्याकूळ झालेला अ‍ॅरन, खडकांमध्ये अडकलेला असताना व्हिडिओ शूटिंगद्वारे आपल्या प्रियजनांच्या बद्दलच्या भावना व्यक्त करतो, ते प्रसंग अतिशय भावस्पर्शी झाले आहेत. मधून मधून जीवनाविषयीचं त्याचं चिंतनही प्रकटलं आहे. त्याचं हे चिंतन या पुस्तकाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतं. तर, अ‍ॅरनचा हा संघर्ष साध्या साध्या गोष्टींसाठी रडणाऱ्या माणसांच्या डोळयांत अंजन घालणारा आणि प्रेरणादायक आहे. त्याने या अनुभवाविषयी केलेलं भाष्य फार महत्त्वाचं आहे. तो लिहितो, ‘ब्लू जॉन कॅन्यनमध्ये माझं अडकणं हा अनुभव मला आध्यत्मिकदृष्ट्या खूप समृद्ध करून गेला. जर मी काळामध्ये परत जाऊ शकलो, तर मी पुन्हा मेगन आणि क्रिस्तीचा निरोप घेऊन पुन्हा त्याच ठिकाणी जाईन, याची मला खात्री आहे. मला तो पर्याय निवडल्याबद्दल कुठलीही खंत नाहीये. आपण या पृथ्वीतलावर येतो ते आपली स्वप्नं साकारायला, आपल्यासाठी नेमून दिलेली कार्यं करायला; जेणेकरून आपण त्याद्वारा इतर लोकांसाठी प्रेरणास्त्रोत ठरू. त्या दैवी कार्यापासून दूर पळण्यापेक्षा, त्याचा मनापासून स्वीकार केलेलं कधीही चांगलं असतं. मग त्यासाठी कुठल्यातरी महत्त्वाच्या गोष्टीचा त्याग करावा लागला, तरी. कारण शेवटी, त्याग करणं हीसुद्धा एका नव्या, जोमदार सुरुवातीची नांदी असते, हो ना?’ तेव्हा चाकोरीबद्ध आणि सुरक्षित जीवनाचा मार्ग सोडून जीवनातील संघर्षाला सामोरे जा, प्रत्यक्ष मृत्यू समोर उभा राहिला तरी घाबरू नका, असा संदेश देणारं हे पुस्तक नक्कीच वाचलं पाहिजे. -अंजली पटवर्धन ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more