* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: NOT WITHOUT MY DAUGHTER
  • Availability : Available
  • Translators : LEENA SOHONI
  • ISBN : 9788171616732
  • Edition : 13
  • Publishing Year : MARCH 1997
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 312
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
IN AUGUST 1984, MICHIGAN HOUSEWIFE BETTY MAHMOODY ACCOMPANIED HER HUSBAND TO HIS NATIVE IRAN FOR A TWO-WEEK VACATION. TO HER HORROR, SHE FOUND HERSELF AND HER FOUR-YEAR-OLD DAUGHTER, MAHTOB, VIRTUAL PRISONERS OF A MAN REDEDICATED TO HIS SHIITE MOSLEM FAITH, IN A LAND WHERE WOMEN ARE NEAR-SLAVES AND AMERICANS ARE DESPISED. THEIR ONLY HOPE FOR ESCAPE LAY IN A DANGEROUS UNDERGROUND THAT WOULD NOT TAKE HER CHILD...
१९८४ स्वत:च्या कुटुंबीयांशी भेट घडवून आणण्याच्या मिषानं बेट्टी महमुदीचा नवरा आपल्या पत्नीला आणि मुलीला इराणला घेऊन गेला. त्या तिथं सुखात असतील, अधिक सुरक्षित असतील आणि त्यांना पुन्हा हवं तेव्हा अमेरिकेला परतता येईल, असं त्यानं तिला आश्वासन दिलं होतं. पण ते सारं खोटं होतं. त्यानं फसवणूक केली होती.

No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #LEENASOHONI #BETTYMEHMOODY #NOTWITHOUTMYDAUGHTER #BIOGRAPHY & TRUE STORIES
Customer Reviews
  • Rating Starमोईन ह्यूमॅनीस्ट.

    बेट्टी मेहमुदी लिखित `नॉट विदाऊट माय डॉटर` या इंग्रजी पुस्तकाचा `लीना सोहोनी` यांनी केलेला मराठी अनुवाद वाचून पूर्ण केलं. मी हे पुस्तक फक्त वाचलं नाही तर जगलो आणि यातून एका आईच्या साहसाला नमन करून आलो. एकंदरीत कमालीचं अस्वस्थ करून जाणारा हा प्रवास हता. "खरंच ! अशी बिकट परिस्थिती नि दुःख कोणाच्याही वाटेला येऊ नये"जे या लेखिकेच्या नशिबी आले होते. सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचकाला गुंतून ठेवणाऱ्या या पुस्तकातून एका आईच्या अफाट शौर्य अन् धाडसाचे दर्शन मला झाले. हा प्रवास वाचताना डोकं सुन्न व्हायला होतं नि कितीतरी वेळा डोळ्यांतून आपसुकच पाणी तरळत.`आजूबाजूचं काही भान राहतं नाही एवढं आपण यात गुंतून जातो.हे सर्वकाही आपल्या डोळ्यासमोर घडतोय असं आपल्याला वाटू लागतं.बेट्टी नि माहतोबचं दुःख आपल्याला आपल्या स्वतःच वाटू लागतं, या मायलेकीच्या दुःखाचे नकळतच आपण वाटेकरी होऊन जातो. हे पुस्तक वाचून पूर्ण केल्यानंतर मीच लेखिकेसोबत हा विलक्षण नि संघर्षपूर्ण प्रवास करून आलोय असं मला वाटतंय.स्वतःच दुःख मला किरकोळ वाटू लागलं आहे. खरंच ना ! आपले दुःख किती क्षुद्र असतात व आपण त्यांनाच खूप मोठे समजून कुरवाळत बसतो.जगात लोकांच्या वाटेला काय काय आलेलं आहे हे आपल्याला ठाऊक सुद्धा नसतं.जेव्हा आपण इतरांच्या दुःख नि संकटाबद्दल हे असलं काही बघतो,वाचतो तेव्हा खऱ्या अर्थाने `आपण किती नशीबवान आहोत` याची जाणीव होते नि आपल्या आयुष्यात येणारी संकटे आपल्याला किरकोळ वाटू लागतात.या अश्या पुस्तकातून इतरांच्या वेदना तर कळतातच व यासोबतच आपल्या आयुष्यात येणाऱ्या संकटांना मात देण्याची प्रेरणा आणि हिम्मत सुद्धा मिळते. कथानकाबद्दल..... बेट्टी महमुदी ह्या मूळ अमेरिकन असलेल्या महिलेला त्याचा मूळ इराणी असलेला पती `डॉ.सय्यद महमूदी`त्याच्या कुटुंबियांना भेटण्याच्या निमित्ताने इराणला घेऊन येतो.त्यांच्या सोबत त्यांची 4 वर्षाची मुलगी `माहतोब`सुद्धा असते.`अमेरिकासारख्या देशात वाढलेल्या बेट्टीला इराण सारखा कर्मठ नि महिलांना कवडीची किंमत न देणारा देश अजिबात आवडतं नाही.जेमतेम पंधरा दिवस तर काढायचे आहे,त्यानंतर आपल्या मायदेशी परत जाणारच आहोतअशी मनाची समजूत घालून ती दिवस काढत असते. पण इकडे तिच्या पती आणि त्याच्या कुटुंबीयांचं काही वेगळंच कारस्थान शिजत होतं,अमेरिकेला परत जायचं नाही असं यांनी ठरवलं होतं. एकेदिवशी मुडी बेट्टीला खडसावतो... "आता तू जन्मभर इथंच राहायचं, समजलं? तू आता इराण सोडून कधीच जायचं नाही, मरेपर्यंत इथंच राहायचं." इथून सुरू होतो प्रवास एका आईच्या एका आगळ्या वेगळ्या संघर्षपूर्ण नि खडतर प्रवासाचा. "काहीही झालं तरीही आपल्या मुलीला घेऊन अमेरिकेला परत जायचंच" हा मनाशी निर्धार करून इथे आलेल्या संकटांना तोंड देत,बिकट परिस्थितीचा सामना करत करत ती सुटकेचे प्रयत्न सुरूच ठेवते. शेवटी येथील एका माणसाच्या साह्याने ती इराण मधून पलायन करण्यात यशस्वी होते.`पण तीचा हा सुटकेचा मार्ग सोपा नसतो.पावलोपावली संकट,Sold असते परंतु तरीही ती काही जुमानत नाही नि मनाशी केलेला निर्धार पूर्ण करून दाखवतेच नि येथे एका आईचा विजय होतो ...! ...Read more

  • Rating StarGajanan Kale

    हिरकणी आठवते ना? कोजागिरी पौर्णिमेला गडावर दुध देण्यासाठी जाते आणि उशिर झाल्या मुळे गडाचे दरवाजे बंद होतात आणि गडातच अडकून पडते ..आपले तान्हे बाळ घरी असल्यामुळे त्याच्या विरहाने अगदी व्याकुळ होते.जिथे चिलट मुंग्या सुध्दा जाऊ शकत नाही एवढा मोठा डोंगर िथून खाली पाहिलं तरी धक्क व्हायला लागतं . अशा असाध्य डोंगर पार करुन ति माय आपल्या लेकराला जाऊन बिलगते...हे फक्त एका आईचे काळीजीपोटी केलेलं धाडसच... नाॅट विदाऊट माय डाॅटर ...हे पुस्तक त्याच धाटणीतले पण खुप वेगळे ..यातील साम्य म्हणजे आई चे लेकराबद्दलच ममत्व. एक विधवा अमेरिकन स्त्री एका इराणी माणसा सोबतो लग्न करते जो की पेशाने osteopathic Anasthetic (अस्थिचिकित्सा तज्ञ तसेच भूलतज्ञ) डॉक्टर असतो.काही वर्ष निवासी डॉक्टर म्हणुन अमेरिकेमध्ये काम करतो आणि नंतर आपल्या बायकोला आणि पोरीला घेऊन इराणला १५ दिवसांच्या अटी वर घेऊन जातो आणि इथेच गल्लत होते.तो घेऊन जातो कायमचा इराणला राहायला.तिथे गेल्यावर बायकोच्या लक्षात येते आपण पुरते फसलो आहोत,आपली आपल्या मायदेशी जाण्याचे मार्ग बंद झाले आहेत.आता आपण कधीच अमेरिकेला जाऊ शकणार नाही. त्यादोघींना तिथे ओलिस ठेवले जाते,त्यांच्यावर अमानुष अत्याचार केले जातात ,त्याच परिस्थितीमध्ये हि माता अमेरिकन एंबसी मध्ये चकरा मारते पण काहीच साध्य होत नाही. शेवटी चोरट्या मार्गाने तुर्की ने अमेरिकेत दाखल होते. गजानन काळे. ...Read more

  • Rating StarNaresh Mohare

    बेत्ती मेहमूदी यांचे Not without my daughter हे पुस्तक आज माझे पूर्ण वाचून झाले. वाचनवेडा या ग्रुपमध्ये नॉट विदाऊट माय डॉटर या पुस्तकाबद्दल बरेच चांगले कमेंट वाचून मी रूपालीताई यांच्या पुस्तकभीशी द्वारे हे पुस्तक मी मागून घेतले आणि वाचयला सुरवात कली. या पुस्तकामध्ये एक अमेरिकन महिला जी आपली छोटीशी मुलगी अणि तिचे इराणी पती यांच्या बरोबर पतीच्या घरी इराण जाते. इराण मध्ये गेल्यावर तिला आलेले वाईट अनुभव, पतीने केलेली फसवणूक, तिचा आणि तिच्या मुलीचा शारीरिक अणि मानसिक छळ, युद्धजन्य वातावरण, तेथील लोकांचे राहणीमान, पुरुषी वर्चस्व आणि तेथील चालीरीती आणि परंपरा मुळे महिलांना पुरुषी वर्चस्वाखाली आपले जीवन कसे जगावे लागते हे सर्व पुस्तका मध्ये लेखिकेने मांडले आहे या सर्व परिस्थितीतून ती तिच्या मुलीला घेऊन आपल्या स्वातंत्र्यासाठी इराण मधून पळून अमेरिकेला जाण्यासाठी तिने कशाप्रकारे प्रत्येक अडचणीवर मात करून अमेरिकेला कशी पोहोचली या सर्व घडामोडीचे सर्व प्रसंग आपल्या डोळ्यासमोर उभे केले आहेत मी दिलेल्या या छोट्याशा माहिती पेक्षा स्वतः पुस्तक वाचताना जो आपल्याला अनुभव येतो आणि एकदा हे पुस्तक वाचायला सुरुवात केल्यावर शेवट पर्यंत हे पुस्तक लवकर लवकर वाचून कसे पूर्ण होईल यासाठीच आपली धडपड चाललेली असेल.. ...Read more

  • Rating StarSandeep Jadhav

    "एका आधुनिक हिरकणीची सत्यकथा" आईचं आपल्या मुलांसोबतचं नातं शब्दांपलिकडचं! कवितांमधून वर्णन केलेली आई ही नेहमीच तिची एक प्रेमळ, शांत प्रतिमा आपल्यासमोर घेऊन येते. परंतु खऱ्या आयुष्यात आपल्या मुलांसाठी प्रसंगी अतिशय कठोर होऊन धाडसीपणे निर्णय घेणयाची ताकदसुद्धा तिच्यामध्ये असते याची पुष्कळ उदाहरणे मिळतील. माणूसच नाही तर अगदी प्राणी-पक्षीही याला अपवाद नाहीत! अशा काही उदाहरणांचा विचार करायचा म्हटलं तर सर्वात प्रथम डोक्यात विचार येतो तो स्वराज्यातील "हिरकणीचा"! आपल्या तान्ह्या मुलासाठी ४५०० फूट उंच रायगडचा कडा भर अंधारात उतरून जाणाऱ्या हिरकणीकडे नेहमीच एक धाडसी मातृत्वाचं उदाहरण म्हणून पाहिलं जातं. प्रत्यक्ष शिवरायांनासुद्धा दखल घ्यावी लागणारी ती घटना! आज ३५० वर्षांनंतरसुद्धा ती कथा ऐकताना अंगावर शहारे येतात यावरूनच कल्पना करता येईल की आपल्या मुलासाठी "हिरकणीने" केलेलं धाडस किती अचाट होतं. "नॉट विदाऊट माय डॉटर" ही सत्यकथा आहे अशाच एका आधुनिक "हिरकणीची". बेट्टी महमूदी या अमेरिकन स्त्रीने आपल्या मुलीसाठी केलेल्या एका अफाट धाडसाची ही सत्यकथा! अमेरिकेत राहणार्‍या बेट्टी महमूदीला तिचा नवरा "मूडी" काही कारणाने इराणला घेऊन जातो व तिला तिच्या मुलीसोबत तिथेच डांबून ठेवण्याचा प्रयत्न करतो. बेट्टीसोबतच आपल्या चार वर्षांच्या मुलीवरही तो अनन्वित अत्याचार करतो. यातून सुटका होणे जवळजवळ अशक्य आहे याची जाणीव बेट्टीला झाल्यानंतर आपल्या व मुलीच्या सुटकेसाठी अत्यंत कठीण मार्ग अवलंबण्याचं धाडस ती करते. तिच्या या सुटकेच्या संघर्षाची आणि क्षणाक्षणाला वाचकाच्या हृदयाचा ठोका चुकवणारी ही सत्यकथा! बेट्टी महमूदी यांनी स्वतःच त्यांचा अनुभव सांगितल्यामुळे वाचत असताना त्यांच्यावर आणि त्यांच्या मुलीवर ओढवलेल्या जीवघेण्या घटनेची दाहकता जाणवत राहते. आजही जिथे अमेरिका आणि इराण यांच्यामधून विस्तवही जात नाही तिथे ३० वर्षांपूर्वी काय परिस्थिती असेल याचा फक्त अंदाजच केलेला बरा. अशा वातावरणात फक्त आपल्या नवऱ्यावरील विश्वासाखातर, आपल्या ४ वर्षांच्या मुलीसोबत तेहरानमधे पाऊल ठेवणारी बेट्टी जेव्हा आपला अनुभव पुस्तकातून आपल्याला सांगायला चालू करते तेव्हा वाचक अक्षरशः त्या प्रवासासोबत चिकटून राहतो. तिच्यावर ओढवणाऱ्या सर्व प्रसंगांसोबत वाचक इतका एकरुप होतो की तिच्या थरारक सुटकेनंतर नकळत वाचकाच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात. बेट्टीचा अमेरिका ते तेहरान आणि परत अमेरिका हा प्रवास आपल्याला खूप काही शिकवून जातो. बेट्टी महमुदी यांनी लिहिलेलं "नॉट विदाऊट माय डॉटर" हे पुस्तक म्हणजे इराणसारख्या काही धर्मांध मुस्लिम देशात व्यक्तिस्वातंत्र्य या मूलभूत हक्कासाठी स्त्रियांना आजही द्याव्या लागणार्‍या कठोर लढ्याची एक प्रातिनिधिक कहाणी आहे असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरू नये. तब्बल १८ महिने इराणमधे नवऱ्याच्या नजरकैदेत राहिलेल्या काळात स्त्रियांसाठी जाचक असणाऱ्या मुस्लिम रूढी-परंपरा जपताना बेट्टीची होणारी तारेवरची कसरत, तेथील वातावरणात आपल्या मुलीच्या सुरक्षेसाठी - स्वातंत्र्यासाठीची तिची तळमळ - धडपड, मधेच काही काळासाठी आपल्या मुलीपासून झालेली ताटातूट आणि तेव्हा एक आई म्हणून होणारी तिची मानसिक अवस्था, तिला स्वातंत्र्याची कळालेली किंमत आणि स्वदेशी परतण्याची तीव्र इच्छा, सुटकेसाठी तिने केलेले काही अयशस्वी प्रयत्न, शेवटी नाईलाजास्तव जीवावर उदार होऊन आपल्या ४ वर्षांच्या मुलीसोबत इराणमधून बेकायदेशीररित्या पळून जाण्याचा घेतलेला धाडसी निर्णय आणि त्याच्या पूर्णत्वाचा थरारक प्रवास बेट्टी यांनी त्यांच्या या ३०४ पानी "नॉट विदाऊट माय डॉटर" मधून लोकांपुढे आणला आहे. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more