* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: GROWING UP BIN LADEN
  • Availability : Available
  • Translators : BAL BHAGWAT
  • ISBN : 9788184982534
  • Edition : 2
  • Publishing Year : JUNE 2011
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 408
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
Quantity
Buying Options:
  • Print Books:
OSAMA BIN LADEN IS THE WESTERN WORLD’S MOST WANTED TERRORIST. INTENT ON SECRECY AT ALL COSTS, HIS PERSONAL LIFE HAS BEEN SHROUDED IN MYSTERY — UNTIL NOW. FOR THE FIRST TIME, OSAMA FIRST WIFE AND FOURTH SON BREAK THE SILENCE TO REVEAL THE TRUTH ABOUT THE CHARACTER AND LIFE OF A MAN BOTH FEARED AND REVERED AROUND THE GLOBE. OSAMA MARRIED HIS FIRST COUSIN NAJWA WHEN HE WAS JUST 17. HERE SHE DESCRIBES THE QUIET, SERIOUS YOUNG MAN SHE FELL IN LOVE WITH, WHO WOULD TAKE HER FROM A LIFE OF EXTRAORDINARY WEALTH IN SAUDI ARABIA TO A REMOTE MOUNTAINTOP IN AFGHANISTAN. AS HIS SENIOR WIFE, SHE WOULD BEAR HIM ELEVEN CHILDREN AND WATCH HIM BECOME EVER STRICTER, UNTIL HIS GROWING FANATICISM TORE THE FAMILY APART. THEIR SON, OMAR, GIVES A DETAILED ACCOUNT OF HIS CHILDHOOD, VYING FOR HIS FATHER’S LOVE IN A HOUSEHOLD OF MORE THAN 20 BROTHERS AND SISTERS — AND A YOUTH SPENT LEARNING DESERT SURVIVAL SKILLS AND HANDLING KALASHNIKOVS. HERE WE SEE OSAMA THE AUTHORITARIAN HUSBAND AND STERN FATHER, THE ENTREPRENEUR, AND THE LEADER OF A COMPLEX TERRORIST NETWORK. TOGETHER, IN GRIPPING DETAIL, MOTHER AND SON REVEAL THEIR LIFE ON THE RUN — FORCED TO FLEE FROM COUNTRY TO COUNTRY IN RESPONSE TO OSAMA’S INCREASINGLY MILITANT ACTIVITIES — UNTIL THEIR EVENTUAL ESCAPE FROM AFGHANISTAN JUST BEFORE THE TRAGIC EVENTS OF 9/11 THAT WOULD CHANGE THE WORLD FOREVER. NEVER BEFORE HAS OSAMA’S OWN FAMILY GONE BEYOND THE HEADLINES TO SHOW US OSAMA THE MAN. NOW, WITH UNPRECEDENTED ACCESS, AND COMPLETE WITH EXCLUSIVE FAMILY PHOTOGRAPHS, JEAN SASSON, AUTHOR OF THE BESTSELLING PRINCESS: A TRUE STORY OF LIFE BEHIND THE VEIL IN SAUDI ARABIA, TAKES US INSIDE THE SECRET WORLD OF OSAMA BIN LADEN.
११ सप्टेंबर, २००१ रोजी आजपर्यंतच्या सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्यात अमेरिकेत चार प्रवासी विमानांचे अपहरण करून ती अमेरिकन लक्ष्यांवर आदळवतात. त्या पैकी दोन विमाने वल्र्ड ट्रेड सेंटरच्या गगनचुंबी इमारतींना धडक देतात आणि त्या कोसळतात हे जगभर प्रसारित झालेले दृश्य कोणीच विसरू शकत नाही. तीन एक हजार निरपराध लोक जीव गमावतात. त्या वेळेपासून दहशतवाद हा शब्द उच्चारताच प्रथम एकच चेहरा डोळ्यांसमोर येतो, ओसामा बिन लादेन! हा इतका कट्टर दहशतवादी बनला कसा हे कळणे अवघड होते; कारण अत्यंत धनाढ्य अशा कुटुंबात त्याचा जन्म झाला होता. पण आता त्याला ओळखणारे त्याच्या कुटुंबामधले कुणीही त्याच्याबद्दल बोलायला तोंड उघडायलाच तयार नव्हते. आणि मग खरे तर आश्चर्यच घडले, ओसामाची पहिली पत्नी नज्वा आणि त्यांचा चौथा मुलगा ओमर यांनी बोलण्याची तयारी दर्शवली. कट्टर धर्मवेडा, दहशतवादी, स्वत:च्या मुलांनीही आत्मघातकी हल्लेखोर बनावे अशी आशा बाळगणा-या ओसामा बिन लादेनच्या व्यक्तिमत्त्वाचे वेगळेच पैलू उलगडले. त्यांनी सांगितलेली चित्तवेधक कथा म्हणजेच ग्रोर्इंग अप बिन लादेन!

No Records Found
No Records Found
Keywords
#GROWINGUPBINLADEN # SAUDIAREBIATILSURUVATICHE DIWAS # AAMCHE KHARTUMMADHALE AAYUSHYA #AAFGANISTHAN # OSAMABINLADENCHEKUTUMB #GHATANAKRAM #ALKAYADAGHATANAKRAM #
Customer Reviews
  • Rating Starबाळ भागवत, मुंबई

    ``ग्रोर्इंग अप बिन लादेन`` या पुस्तकाचा अनुवाद करायची संधी मला दिल्याबद्दल मी मेहता प्रकाशनाचा अत्यंत आभारी आहे. इतक्या मोठ्या संख्येने हजर असणाऱ्या लोकांसमोर नुसते उभे रहाण्याचाही पहिलाच अनुभव. पुस्तक प्रकाशन सोहळा संस्मरणीय ठरावा असाच अप्रतिम होत. कधी अपेक्षाच केली नव्हती अशा व्यक्तींबरोबर काही काळ घालवता आला. पुस्तक प्रकाशनाचा वर्तमानपत्रातला फोटो आणि सर्वांच्या सह्या घेतलेली पुस्तकाची प्रत या दोन मौल्यवान गोष्टी आयुष्यभर आनंद देणार आहेत. या पुस्तकाचा अनुवाद केल्यापासून कुठल्याही पुस्तकाच्या दुकानात गेल्यावर नॉन फिक्शन विभागाकडे वळायची सवय लागलेली आहे. `द अफगाण`च्या अर्पण पत्रिकेत लिहिले आहे तेच खरे आहे. तुम्हा दोघांची ओळख झाल्यापासून आयुष्य सुखासमाधानात जाते आहे . मेहता प्रकाशनाच्या सर्व जणांचे कष्ट बघता इतर सर्वांचे आभार किती मानायचे, कौतुक किती करायचे कळत नाही. ...Read more

  • Rating StarDAINIK LOKSATTA LOKRANG

    ओसामा बिन लादेन हा जागतिक दहशत वादाचा `चेहरा` समजाला जातो. अमेरिकेवरील दहशदवादी हल्ल्यानंतर ओसामाला ठार करण्यासाठी अमेरिका गेली १०वर्षे प्रयत्न करत होती. ज्या प्रयत्नांना अखेर यश मिळालं. आणि लादेनचा शेवट झाला. अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राला सतावण-य लादेन बद्दल कायमचा एक प्रकारचं औत्सुक्य राहिलेलं आहे. ज्यांच्या शेवटाकडे सर्व जगाचे डोळे लागून राहिले होते, ज्याचा मृत्यूची बातमी ऐकण्यासाठी सर्वांचे कान आतुर झाले होते. आणि ज्याला मारण्यासाठी अमेरिका जिवाचं रान करत होती, त्या ओसामानं आपल्या वैयक्तिक जीवनाबद्दल कमालीची गुप्तता पाळली होती. त्याच्या मृत्यूनंतर थोड्याफार प्रमाणात त्याचं व्यक्तिगत जीवन लोकासमोर आलं असलं तरी ओसामा या व्यक्तीबद्दल अजून सविस्तरपणे वाचावसं वाटत असेल तर `ग्रोइंग अप बिन लादेन` हे पुस्तक वाचावयास हवं. ओसामाची पहिली पत्नी नज्वा बिन लादेन यांनी जीन ससन यांच्या मदतीने ओसामाचे आयुष्य शब्दबद्ध केले आहे. ओसामा आणि त्याची अल कायदा दहशदवादी संघटना यांच्याबद्दल आजपर्यंत अनेक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत, पण खुद्द ओसामाच्या कुटुंबीयांनी लिहिलेलं हे पहिलच पुस्तक आणि म्हणूनच वेगळं. ज्या व्यक्तिबद्दल आज प्रत्येकाच्या मनात घृणा, चीड , राग, द्वेष, या भावनांखेरीज काही नाही, या प्रार्श्वभूमीवर त्या व्यक्तीची बायको आणि मुलाने हे पुस्तक लिहण्यात हा पुढाकार घ्यावा, त्याचं आयुष्य लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करावा, हेच विशेष आहे. आणि ओसामाचा शेवट झाल्यानंतर अल्पावधीतच हे पुस्तक प्रसिद्ध झालं आहे. ओसामाने आपल्या कुटुंबीयाबद्दल बाहेरच्या जगाला काहीही न कळू देण्याची दक्षता घेतली होती तशीच आपल्या कुटुंबीयांपासून अतिरेकी कारवाया लपवून ठेवल्या होत्या. त्यामुळे हे पुस्तक वैयाक्तिक आयुष्यातील घटनांचाच आढावा घेतं, त्याचप्रमाणे धनाढय कुटुंबात जन्मलेल्या उच्चशिक्षित व्यक्तीचं क्रूरकर्मा सैतनात कसं रुपांतर होतं, याच चित्रण करतं. मध्यमवर्गीय संस्कारात वाढलेला आणि सर्वसामान्य आयुष्य जगलेला ओसामा कालौघात कट्टर दहशतवादी बनतो आणि ओसामाच्या हिंसक कारवायांच्या छायेत वाढलेला ओमर मात्र शांततेचा मार्ग अवलंबतो, हा या पुस्तकात अधोरेखित होणारा परस्पर विरोध कोड्यात टाकणारा आहे. वास्तविक ओसामा हा नज्वाच्या आत्याचा मुलगा. म्हणजे तिचा आत्ये भाऊ. महोम्मद आवद बिन लादेन यांच्या बावीस मुलांपैकी अठरावा मुलगा. चौदा वर्षाची नज्वा सोळा वर्षाच्या मृदू, स्वभावाच्या शांत, करारी, धार्मिक आणि रूढीप्रिय अशा ओसामाच्या प्रेमात पडली होती. ओसमाचेही नज्वावर मनापासून प्रेम होते. मुस्लिमांमध्ये नात्यातील विवाहाला विरोध नाही. उलट जवळच्या दोन कुटुंबात घानिष्ठ संबंध निर्माण होतात. म्हणून अशी लग्ने सर्रास होतात. त्यामुळे ओसामाचं आणि नज्वाचं लग्नही झाला झालं आणि टेनिस खेळणा-या, सायकल दामटणा-या, चित्र काढणा-या नज्वाने ओसामाच्या प्रेमाखातर या सा-याला तिलांजली दिली. ओसामाचा प्रेमात आकंठ बुडालेली नज्वा ओसामाच्या आदेशानुसार चढायला लागली आणि त्यात काही गैर आहे असेही तिला वाटत नव्हते. ओसामाचं पूर्व आयुष्य पहिला तरं त्यात दहशतवादाची मुळं सापडत नाहीत. त्याने अर्थशास्त्र आणि मॅनेजमेंट केल्यानंतर वडीलांच्या `सौदी बिन लादेन गृप` या सौदी अरेबियातील अग्रगण्य कंपनीत काम करायला सुरुवात केली होती. त्याच्या खाजगी पुस्तक संग्रहालयात अरेबिक आणि इंग्लिश भाषेतील धार्मिक आणि लष्करी विषयांमधील शेकडो पुस्तके होती. तो उत्कृष्ट इंग्लिश बोलत आणि लिहित असे. याशिवाय सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो कुटुंबवत्सल होता. सगळ्या बायकांवर आणि मुलांवर त्याचं प्रेम होतं. मुलांबरोबर घालवायला त्याला फारसा वेळ मिळत नसे. पण जो काही वेळ मिळत असे, त्यात तो अनेक गोष्टी बगण्यासाठी मुद्दाम मुलांना घेऊन जात असे. माहिती देत असे. मुलांनी कणखर आणि शूर बनावे यासाठी तो प्रशिक्षणाच्या वेगवेगळ्या क्लृप्त्या काढत असे. याचबरोबर दुस-या बाजूला मुस्लिम म्हणून जास्तीत जास्त साधे राहायला हवे, आधुनिक गोष्टीचा त्याग करायला हवा, अशा हेकट भूमिकांचा मुलानांही त्रास होत असे. पण त्यातून मुलं त्यांच्या पद्धतीने मार्ग काढून स्वत:ला हवं ते मिळवत असत. बालपणीच्या या आठवणी वाचताना एक गोष्ट मात्र स्पष्ट होते की असं असलं तरी मुलांच्या मनात ओसमाविषयी आदर होता, प्रेम होतं. तीच गोष्ट नज्वाची. ओसामाच्या बाहेरचा हालचालींविषयी अनभिज्ञ असण्या-या नज्वाने ओसामा सांगेल तसे जगायचे, ठेवेल तसे राहायचे हे मनाशी निश्चित केले होते. त्यामुळे ती कुठल्याही गोष्टीला विरोध करत नसे. कमालीच्या बाहेर पतीनिष्ठ आणि आज्ञाधारक. त्यातच एकापाठोपाठ एक मुलांचा जन्म होत गेल्यानंतर मुलांचं संगोपन करण्यात नज्वाचा चार भिंती पलीकडच्या आयुष्याशी संपर्कच तुटला. याच काळात मध्यपूर्वेत होणा-या हालचालीचा ओसमावर परिणाम व्हायला लागला होता. जिहादबद्दल त्याच्या भावना तीव्र होत चालल्या होत्या. अब्दुल्लाह अझामच्या विचारांचा त्याच्यावर पगडा बसत चालला होता. लादेन कुटुंबाची संपत्ती वाढवण्यापेक्षा आयुष्यात दुसरं काहीतरी ध्येय निर्माण करावं आणि त्यासाठी प्रयत्न करावेत, या आझमच्या विचरांनी प्रेरित झालेला ओसामा अफगाणिस्थान मधील रशियन आक्रमकांविरूद्ध लढण्यासाठी तयार झाला होता. तिथूनच ओसामा आणि नज्वा यांच्या विचारामधील दरी वाढत गेली होतीच पण कुटुंबवत्सल ओसामाची मानसिकताही बदलत चालली होती. मुस्लीम राष्ट्रावरचा मुस्लीमेतर राष्ट्रांचा प्रभाव नष्ट करणं, या विचाराने तो पछाडला होता. घराबाहेरच्या कारवायांना वेग आला होता. त्याच्या शिकवणुकीवर श्रद्धा बाळगणा-यांच्या संख्येत वेगाने वाढ होत होती. अत्यंत कडवटपणे ते ओसामाचे रक्षण करत असत. त्यामध्ये १९९४मध्ये सौदी सरकारने ओसामा आणि त्याच्या कुटुंबियाचे नागरिकत्व रद्द केले. त्याची मालमत्ता गोठवली. त्याच्या मुलांचा वारसाहक्क काढून घेतला. यात ओसामाने काही कोट्यावधी डॉलर्सची मालमत्ता गमावली होती. श्रीमंतीत लोळणारा ओसामा आर्थिक अडचणीत सापडला होता. पाच बायका वीस मुलं अशा प्रचंड मोठ्या कुटुंबाची जबाबदारी त्याचावर होती. अशा प्रत्येक वैयक्तिक धक्यावर सौदी अरेबिया आणि अमेरिकेवर दहशतवादी हल्ले चढवण्याची ओसामाची इच्छा तीव्र होत गेली. त्यासाठी त्याने अल कायद्याची लष्करी ताकद वाढवण्याचा निर्णय घेतला. या युद्धासाठी त्याने माणसे गोळा करायला सुरवात केली. त्यांच्या प्रशिक्षणाची सोय केली. डॉ. अयमान अल जवाहिरीचा अल जीहाद गट आणि ओमर आब्दोल रहमानचा अल गम अल इस्लामिया गट यांनीही अल कायदा बरोबर हातमिळवणी केली. ओसामाच्या मनातील सैतनाने त्याचा पूर्णपणे ताबा घेतला होता. `उच्चशिक्षित आणि आवाजात बोलणारे माझे वडील असल्या गुंड आणि क्रूर प्रवृतीच्या माणसांच्यात कसे राहू शकतात हा प्रश्न वाढत्या वयाच्या ओमरला त्रास देत होता. जे काय चाललं आहे, ते बरोबर नाही, याची जाणीव व्हायला लागली होती. अशा वातावरणात राहणं नकोसं वाटायला लागलं होतं. पण वय लहान असल्यानं येणारी अगतिकता त्रासदायक ठरत होती. त्यात मोठा भाऊ अब्दुल्ला घर सोडून निघून गेल्यानं वडिलांची गादी चालवायची जवाबदारी आपल्यावर तर येणार नाही, याचं भय होतं. मोठ्या भावाप्रमाणे हे सर्व सोडून जाण्याची इच्छा परत परत मनात डोकवत होती. पण आई आणि लहान भावंड यानां सोडून जाववत नाही, अशा कात्रीत सापडलेल्या ओमर ओसामा बरोबर भरकटत आयुष्य घालवत होता, ते एक न एक दिवस हे सगळं सोडायचचं, हे मनाशी ठरवून. आपल्या आयुष्यातील हा चढ-उतारांचा आलेख लोकांसमोर मांडण्याचं धाडस ओमरने आणि नज्वाने या पुस्तकाद्वारा केलं आहे. ओसमासारख्या व्यक्तीची बायको आणि मुलगाच त्याच्या अत्यंत गुप्त ठेवल्या गेलेल्या आयुष्याचा पट उलगडून दाखवत आहेत म्हटल्यानंतर या पुस्तकाला एक वेगळं परिमाण अपोआपच लाभतं. एक प्रकरण ओमरचे आणि एक प्रकरण नज्वाचे, आणि मधून मधून जीनने दिलेली जोड असा आकृतिबंध स्वीकारल्यानं माहितीची पुनरुक्ती होऊन पसरटपणा वाढत गेल्याचं जाणवतं. सध्याच्या घाई-गर्दी गडबडीच्या काळात लोकांच वाचन-अवकाश आक्रसत चाललं आहे. मोठ्या दांडग्या पुस्तकांकडे बहुतांशी वाचक पाठ फिरवतात. अशा परिस्थितीत पुस्तकाची पृष्ठसंख्या आटोक्यात ठेवणं गरजेचं झालं आहे. दुस-या महायुद्धाच्या शेवटी विन्स्टन चर्चिल यांनी असं म्हटलं होत ` सर्व थांबल्यावर आपण मागे बघतो.` अत्यंत लहानसहान बाबींकडे काळजीपूर्वक लक्ष देऊन गुन्हेगार आणि शूर वीरांचा शोध घेतो. कुठे आहेत युद्ध सुरु करणारे खलनायक? माहित पाहिजे आपल्याला. दु:खाने जळफळत असताना , जखमांनी राग अनावर होत असताना, आम्हाला सत्य समजावण्याचा, या गुन्ह्याची जबाबदारी कुणाची आहे, हे शोधण्याचा हक्कच आहे.` हीच भावना हे पुस्तक वाचताना मनाचा ताबा घेते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more