* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: GROWING UP BIN LADEN
  • Availability : Available
  • Translators : BAL BHAGWAT
  • ISBN : 9788184982534
  • Edition : 2
  • Publishing Year : JUNE 2011
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 408
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
Quantity
Buying Options:
  • Print Books:
OSAMA BIN LADEN IS THE WESTERN WORLD’S MOST WANTED TERRORIST. INTENT ON SECRECY AT ALL COSTS, HIS PERSONAL LIFE HAS BEEN SHROUDED IN MYSTERY — UNTIL NOW. FOR THE FIRST TIME, OSAMA FIRST WIFE AND FOURTH SON BREAK THE SILENCE TO REVEAL THE TRUTH ABOUT THE CHARACTER AND LIFE OF A MAN BOTH FEARED AND REVERED AROUND THE GLOBE. OSAMA MARRIED HIS FIRST COUSIN NAJWA WHEN HE WAS JUST 17. HERE SHE DESCRIBES THE QUIET, SERIOUS YOUNG MAN SHE FELL IN LOVE WITH, WHO WOULD TAKE HER FROM A LIFE OF EXTRAORDINARY WEALTH IN SAUDI ARABIA TO A REMOTE MOUNTAINTOP IN AFGHANISTAN. AS HIS SENIOR WIFE, SHE WOULD BEAR HIM ELEVEN CHILDREN AND WATCH HIM BECOME EVER STRICTER, UNTIL HIS GROWING FANATICISM TORE THE FAMILY APART. THEIR SON, OMAR, GIVES A DETAILED ACCOUNT OF HIS CHILDHOOD, VYING FOR HIS FATHER’S LOVE IN A HOUSEHOLD OF MORE THAN 20 BROTHERS AND SISTERS — AND A YOUTH SPENT LEARNING DESERT SURVIVAL SKILLS AND HANDLING KALASHNIKOVS. HERE WE SEE OSAMA THE AUTHORITARIAN HUSBAND AND STERN FATHER, THE ENTREPRENEUR, AND THE LEADER OF A COMPLEX TERRORIST NETWORK. TOGETHER, IN GRIPPING DETAIL, MOTHER AND SON REVEAL THEIR LIFE ON THE RUN — FORCED TO FLEE FROM COUNTRY TO COUNTRY IN RESPONSE TO OSAMA’S INCREASINGLY MILITANT ACTIVITIES — UNTIL THEIR EVENTUAL ESCAPE FROM AFGHANISTAN JUST BEFORE THE TRAGIC EVENTS OF 9/11 THAT WOULD CHANGE THE WORLD FOREVER. NEVER BEFORE HAS OSAMA’S OWN FAMILY GONE BEYOND THE HEADLINES TO SHOW US OSAMA THE MAN. NOW, WITH UNPRECEDENTED ACCESS, AND COMPLETE WITH EXCLUSIVE FAMILY PHOTOGRAPHS, JEAN SASSON, AUTHOR OF THE BESTSELLING PRINCESS: A TRUE STORY OF LIFE BEHIND THE VEIL IN SAUDI ARABIA, TAKES US INSIDE THE SECRET WORLD OF OSAMA BIN LADEN.
११ सप्टेंबर, २००१ रोजी आजपर्यंतच्या सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्यात अमेरिकेत चार प्रवासी विमानांचे अपहरण करून ती अमेरिकन लक्ष्यांवर आदळवतात. त्या पैकी दोन विमाने वल्र्ड ट्रेड सेंटरच्या गगनचुंबी इमारतींना धडक देतात आणि त्या कोसळतात हे जगभर प्रसारित झालेले दृश्य कोणीच विसरू शकत नाही. तीन एक हजार निरपराध लोक जीव गमावतात. त्या वेळेपासून दहशतवाद हा शब्द उच्चारताच प्रथम एकच चेहरा डोळ्यांसमोर येतो, ओसामा बिन लादेन! हा इतका कट्टर दहशतवादी बनला कसा हे कळणे अवघड होते; कारण अत्यंत धनाढ्य अशा कुटुंबात त्याचा जन्म झाला होता. पण आता त्याला ओळखणारे त्याच्या कुटुंबामधले कुणीही त्याच्याबद्दल बोलायला तोंड उघडायलाच तयार नव्हते. आणि मग खरे तर आश्चर्यच घडले, ओसामाची पहिली पत्नी नज्वा आणि त्यांचा चौथा मुलगा ओमर यांनी बोलण्याची तयारी दर्शवली. कट्टर धर्मवेडा, दहशतवादी, स्वत:च्या मुलांनीही आत्मघातकी हल्लेखोर बनावे अशी आशा बाळगणा-या ओसामा बिन लादेनच्या व्यक्तिमत्त्वाचे वेगळेच पैलू उलगडले. त्यांनी सांगितलेली चित्तवेधक कथा म्हणजेच ग्रोर्इंग अप बिन लादेन!

No Records Found
No Records Found
Keywords
#GROWINGUPBINLADEN # SAUDIAREBIATILSURUVATICHE DIWAS # AAMCHE KHARTUMMADHALE AAYUSHYA #AAFGANISTHAN # OSAMABINLADENCHEKUTUMB #GHATANAKRAM #ALKAYADAGHATANAKRAM #
Customer Reviews
  • Rating Starबाळ भागवत, मुंबई

    ``ग्रोर्इंग अप बिन लादेन`` या पुस्तकाचा अनुवाद करायची संधी मला दिल्याबद्दल मी मेहता प्रकाशनाचा अत्यंत आभारी आहे. इतक्या मोठ्या संख्येने हजर असणाऱ्या लोकांसमोर नुसते उभे रहाण्याचाही पहिलाच अनुभव. पुस्तक प्रकाशन सोहळा संस्मरणीय ठरावा असाच अप्रतिम होत. कधी अपेक्षाच केली नव्हती अशा व्यक्तींबरोबर काही काळ घालवता आला. पुस्तक प्रकाशनाचा वर्तमानपत्रातला फोटो आणि सर्वांच्या सह्या घेतलेली पुस्तकाची प्रत या दोन मौल्यवान गोष्टी आयुष्यभर आनंद देणार आहेत. या पुस्तकाचा अनुवाद केल्यापासून कुठल्याही पुस्तकाच्या दुकानात गेल्यावर नॉन फिक्शन विभागाकडे वळायची सवय लागलेली आहे. `द अफगाण`च्या अर्पण पत्रिकेत लिहिले आहे तेच खरे आहे. तुम्हा दोघांची ओळख झाल्यापासून आयुष्य सुखासमाधानात जाते आहे . मेहता प्रकाशनाच्या सर्व जणांचे कष्ट बघता इतर सर्वांचे आभार किती मानायचे, कौतुक किती करायचे कळत नाही. ...Read more

  • Rating StarDAINIK LOKSATTA LOKRANG

    ओसामा बिन लादेन हा जागतिक दहशत वादाचा `चेहरा` समजाला जातो. अमेरिकेवरील दहशदवादी हल्ल्यानंतर ओसामाला ठार करण्यासाठी अमेरिका गेली १०वर्षे प्रयत्न करत होती. ज्या प्रयत्नांना अखेर यश मिळालं. आणि लादेनचा शेवट झाला. अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राला सतावण-य लादेन बद्दल कायमचा एक प्रकारचं औत्सुक्य राहिलेलं आहे. ज्यांच्या शेवटाकडे सर्व जगाचे डोळे लागून राहिले होते, ज्याचा मृत्यूची बातमी ऐकण्यासाठी सर्वांचे कान आतुर झाले होते. आणि ज्याला मारण्यासाठी अमेरिका जिवाचं रान करत होती, त्या ओसामानं आपल्या वैयक्तिक जीवनाबद्दल कमालीची गुप्तता पाळली होती. त्याच्या मृत्यूनंतर थोड्याफार प्रमाणात त्याचं व्यक्तिगत जीवन लोकासमोर आलं असलं तरी ओसामा या व्यक्तीबद्दल अजून सविस्तरपणे वाचावसं वाटत असेल तर `ग्रोइंग अप बिन लादेन` हे पुस्तक वाचावयास हवं. ओसामाची पहिली पत्नी नज्वा बिन लादेन यांनी जीन ससन यांच्या मदतीने ओसामाचे आयुष्य शब्दबद्ध केले आहे. ओसामा आणि त्याची अल कायदा दहशदवादी संघटना यांच्याबद्दल आजपर्यंत अनेक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत, पण खुद्द ओसामाच्या कुटुंबीयांनी लिहिलेलं हे पहिलच पुस्तक आणि म्हणूनच वेगळं. ज्या व्यक्तिबद्दल आज प्रत्येकाच्या मनात घृणा, चीड , राग, द्वेष, या भावनांखेरीज काही नाही, या प्रार्श्वभूमीवर त्या व्यक्तीची बायको आणि मुलाने हे पुस्तक लिहण्यात हा पुढाकार घ्यावा, त्याचं आयुष्य लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करावा, हेच विशेष आहे. आणि ओसामाचा शेवट झाल्यानंतर अल्पावधीतच हे पुस्तक प्रसिद्ध झालं आहे. ओसामाने आपल्या कुटुंबीयाबद्दल बाहेरच्या जगाला काहीही न कळू देण्याची दक्षता घेतली होती तशीच आपल्या कुटुंबीयांपासून अतिरेकी कारवाया लपवून ठेवल्या होत्या. त्यामुळे हे पुस्तक वैयाक्तिक आयुष्यातील घटनांचाच आढावा घेतं, त्याचप्रमाणे धनाढय कुटुंबात जन्मलेल्या उच्चशिक्षित व्यक्तीचं क्रूरकर्मा सैतनात कसं रुपांतर होतं, याच चित्रण करतं. मध्यमवर्गीय संस्कारात वाढलेला आणि सर्वसामान्य आयुष्य जगलेला ओसामा कालौघात कट्टर दहशतवादी बनतो आणि ओसामाच्या हिंसक कारवायांच्या छायेत वाढलेला ओमर मात्र शांततेचा मार्ग अवलंबतो, हा या पुस्तकात अधोरेखित होणारा परस्पर विरोध कोड्यात टाकणारा आहे. वास्तविक ओसामा हा नज्वाच्या आत्याचा मुलगा. म्हणजे तिचा आत्ये भाऊ. महोम्मद आवद बिन लादेन यांच्या बावीस मुलांपैकी अठरावा मुलगा. चौदा वर्षाची नज्वा सोळा वर्षाच्या मृदू, स्वभावाच्या शांत, करारी, धार्मिक आणि रूढीप्रिय अशा ओसामाच्या प्रेमात पडली होती. ओसमाचेही नज्वावर मनापासून प्रेम होते. मुस्लिमांमध्ये नात्यातील विवाहाला विरोध नाही. उलट जवळच्या दोन कुटुंबात घानिष्ठ संबंध निर्माण होतात. म्हणून अशी लग्ने सर्रास होतात. त्यामुळे ओसामाचं आणि नज्वाचं लग्नही झाला झालं आणि टेनिस खेळणा-या, सायकल दामटणा-या, चित्र काढणा-या नज्वाने ओसामाच्या प्रेमाखातर या सा-याला तिलांजली दिली. ओसामाचा प्रेमात आकंठ बुडालेली नज्वा ओसामाच्या आदेशानुसार चढायला लागली आणि त्यात काही गैर आहे असेही तिला वाटत नव्हते. ओसामाचं पूर्व आयुष्य पहिला तरं त्यात दहशतवादाची मुळं सापडत नाहीत. त्याने अर्थशास्त्र आणि मॅनेजमेंट केल्यानंतर वडीलांच्या `सौदी बिन लादेन गृप` या सौदी अरेबियातील अग्रगण्य कंपनीत काम करायला सुरुवात केली होती. त्याच्या खाजगी पुस्तक संग्रहालयात अरेबिक आणि इंग्लिश भाषेतील धार्मिक आणि लष्करी विषयांमधील शेकडो पुस्तके होती. तो उत्कृष्ट इंग्लिश बोलत आणि लिहित असे. याशिवाय सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो कुटुंबवत्सल होता. सगळ्या बायकांवर आणि मुलांवर त्याचं प्रेम होतं. मुलांबरोबर घालवायला त्याला फारसा वेळ मिळत नसे. पण जो काही वेळ मिळत असे, त्यात तो अनेक गोष्टी बगण्यासाठी मुद्दाम मुलांना घेऊन जात असे. माहिती देत असे. मुलांनी कणखर आणि शूर बनावे यासाठी तो प्रशिक्षणाच्या वेगवेगळ्या क्लृप्त्या काढत असे. याचबरोबर दुस-या बाजूला मुस्लिम म्हणून जास्तीत जास्त साधे राहायला हवे, आधुनिक गोष्टीचा त्याग करायला हवा, अशा हेकट भूमिकांचा मुलानांही त्रास होत असे. पण त्यातून मुलं त्यांच्या पद्धतीने मार्ग काढून स्वत:ला हवं ते मिळवत असत. बालपणीच्या या आठवणी वाचताना एक गोष्ट मात्र स्पष्ट होते की असं असलं तरी मुलांच्या मनात ओसमाविषयी आदर होता, प्रेम होतं. तीच गोष्ट नज्वाची. ओसामाच्या बाहेरचा हालचालींविषयी अनभिज्ञ असण्या-या नज्वाने ओसामा सांगेल तसे जगायचे, ठेवेल तसे राहायचे हे मनाशी निश्चित केले होते. त्यामुळे ती कुठल्याही गोष्टीला विरोध करत नसे. कमालीच्या बाहेर पतीनिष्ठ आणि आज्ञाधारक. त्यातच एकापाठोपाठ एक मुलांचा जन्म होत गेल्यानंतर मुलांचं संगोपन करण्यात नज्वाचा चार भिंती पलीकडच्या आयुष्याशी संपर्कच तुटला. याच काळात मध्यपूर्वेत होणा-या हालचालीचा ओसमावर परिणाम व्हायला लागला होता. जिहादबद्दल त्याच्या भावना तीव्र होत चालल्या होत्या. अब्दुल्लाह अझामच्या विचारांचा त्याच्यावर पगडा बसत चालला होता. लादेन कुटुंबाची संपत्ती वाढवण्यापेक्षा आयुष्यात दुसरं काहीतरी ध्येय निर्माण करावं आणि त्यासाठी प्रयत्न करावेत, या आझमच्या विचरांनी प्रेरित झालेला ओसामा अफगाणिस्थान मधील रशियन आक्रमकांविरूद्ध लढण्यासाठी तयार झाला होता. तिथूनच ओसामा आणि नज्वा यांच्या विचारामधील दरी वाढत गेली होतीच पण कुटुंबवत्सल ओसामाची मानसिकताही बदलत चालली होती. मुस्लीम राष्ट्रावरचा मुस्लीमेतर राष्ट्रांचा प्रभाव नष्ट करणं, या विचाराने तो पछाडला होता. घराबाहेरच्या कारवायांना वेग आला होता. त्याच्या शिकवणुकीवर श्रद्धा बाळगणा-यांच्या संख्येत वेगाने वाढ होत होती. अत्यंत कडवटपणे ते ओसामाचे रक्षण करत असत. त्यामध्ये १९९४मध्ये सौदी सरकारने ओसामा आणि त्याच्या कुटुंबियाचे नागरिकत्व रद्द केले. त्याची मालमत्ता गोठवली. त्याच्या मुलांचा वारसाहक्क काढून घेतला. यात ओसामाने काही कोट्यावधी डॉलर्सची मालमत्ता गमावली होती. श्रीमंतीत लोळणारा ओसामा आर्थिक अडचणीत सापडला होता. पाच बायका वीस मुलं अशा प्रचंड मोठ्या कुटुंबाची जबाबदारी त्याचावर होती. अशा प्रत्येक वैयक्तिक धक्यावर सौदी अरेबिया आणि अमेरिकेवर दहशतवादी हल्ले चढवण्याची ओसामाची इच्छा तीव्र होत गेली. त्यासाठी त्याने अल कायद्याची लष्करी ताकद वाढवण्याचा निर्णय घेतला. या युद्धासाठी त्याने माणसे गोळा करायला सुरवात केली. त्यांच्या प्रशिक्षणाची सोय केली. डॉ. अयमान अल जवाहिरीचा अल जीहाद गट आणि ओमर आब्दोल रहमानचा अल गम अल इस्लामिया गट यांनीही अल कायदा बरोबर हातमिळवणी केली. ओसामाच्या मनातील सैतनाने त्याचा पूर्णपणे ताबा घेतला होता. `उच्चशिक्षित आणि आवाजात बोलणारे माझे वडील असल्या गुंड आणि क्रूर प्रवृतीच्या माणसांच्यात कसे राहू शकतात हा प्रश्न वाढत्या वयाच्या ओमरला त्रास देत होता. जे काय चाललं आहे, ते बरोबर नाही, याची जाणीव व्हायला लागली होती. अशा वातावरणात राहणं नकोसं वाटायला लागलं होतं. पण वय लहान असल्यानं येणारी अगतिकता त्रासदायक ठरत होती. त्यात मोठा भाऊ अब्दुल्ला घर सोडून निघून गेल्यानं वडिलांची गादी चालवायची जवाबदारी आपल्यावर तर येणार नाही, याचं भय होतं. मोठ्या भावाप्रमाणे हे सर्व सोडून जाण्याची इच्छा परत परत मनात डोकवत होती. पण आई आणि लहान भावंड यानां सोडून जाववत नाही, अशा कात्रीत सापडलेल्या ओमर ओसामा बरोबर भरकटत आयुष्य घालवत होता, ते एक न एक दिवस हे सगळं सोडायचचं, हे मनाशी ठरवून. आपल्या आयुष्यातील हा चढ-उतारांचा आलेख लोकांसमोर मांडण्याचं धाडस ओमरने आणि नज्वाने या पुस्तकाद्वारा केलं आहे. ओसमासारख्या व्यक्तीची बायको आणि मुलगाच त्याच्या अत्यंत गुप्त ठेवल्या गेलेल्या आयुष्याचा पट उलगडून दाखवत आहेत म्हटल्यानंतर या पुस्तकाला एक वेगळं परिमाण अपोआपच लाभतं. एक प्रकरण ओमरचे आणि एक प्रकरण नज्वाचे, आणि मधून मधून जीनने दिलेली जोड असा आकृतिबंध स्वीकारल्यानं माहितीची पुनरुक्ती होऊन पसरटपणा वाढत गेल्याचं जाणवतं. सध्याच्या घाई-गर्दी गडबडीच्या काळात लोकांच वाचन-अवकाश आक्रसत चाललं आहे. मोठ्या दांडग्या पुस्तकांकडे बहुतांशी वाचक पाठ फिरवतात. अशा परिस्थितीत पुस्तकाची पृष्ठसंख्या आटोक्यात ठेवणं गरजेचं झालं आहे. दुस-या महायुद्धाच्या शेवटी विन्स्टन चर्चिल यांनी असं म्हटलं होत ` सर्व थांबल्यावर आपण मागे बघतो.` अत्यंत लहानसहान बाबींकडे काळजीपूर्वक लक्ष देऊन गुन्हेगार आणि शूर वीरांचा शोध घेतो. कुठे आहेत युद्ध सुरु करणारे खलनायक? माहित पाहिजे आपल्याला. दु:खाने जळफळत असताना , जखमांनी राग अनावर होत असताना, आम्हाला सत्य समजावण्याचा, या गुन्ह्याची जबाबदारी कुणाची आहे, हे शोधण्याचा हक्कच आहे.` हीच भावना हे पुस्तक वाचताना मनाचा ताबा घेते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

KHULBHAR DUDHACHI KAHANI
KHULBHAR DUDHACHI KAHANI by SUNANDA AMRAPURKAR Rating Star
श्रीपाद ब्रह्मे

नुकतंच असंच वेगानं वाचून संपवलेलं दुसरं पुस्तक म्हणजे सुनंदा अमरापूरकर यांचं ‘खुलभर दुधाची कहाणी’. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या त्या पत्नी. अर्थात ही काही त्यांची एकमेव ओळख नव्हे. एक चांगल्या अभिनेत्री, उत्तम अनुवादक म्हणूनही त्या ्रसिद्ध आहेत. त्यांनी ‘खुलभर दुधाची कहाणी’ या आत्मचरित्रवजा लेखनातून त्यांच्या जगण्याचा व्यापक पट अतिशय प्रांजळपणे उलगडला आहे. मला हे पुस्तक विशेष भावण्याचं कारण म्हणजे त्यात आलेलं नगरचं वर्णन. मी स्वत: नगरला फार प्रदीर्घ काळ राहिलो नसलो, तरी ते शेवटी माझ्या जिल्ह्याचं गाव. आणि वयाच्या १३ ते २२ अशा महत्त्वाच्या कुमार व तरुण वयातला माझा तिथला रहिवास असल्यानं नगरच्या आठवणी विसरणं शक्य नाही. सुनंदाताई माझ्या आईच्या वयाच्या. त्यामुळं त्यांच्या लहानपणच्या आठवणी जवळपास माझ्या जन्माच्या २०-२५ वर्षं आधीच्या. असं असलं तरी मी त्या वर्णनाशी, त्या काळातल्या नगरशीही रिलेट होऊ शकलो, याचं कारण मुळात गेल्या शतकात बदलांचा वेग अतिशय संथ होता. नगरसारख्या निम्नशहरी भागात तर तो आणखी संथ होता. त्यामुळं एकूण समाजजीवनात १९६० ते १९९० या तीस वर्षांत तपशिलातले फरक सोडले, तर फार मोठा बदल झाला नव्हता. सुनंदाताई माहेरच्या करमरकर. त्यांचं आजोळ‌ सातारा असलं, तरी त्या जन्मापासून नगरमध्येच लहानाच्या मोठ्या झालेल्या. अगदी पक्क्या ‘नगरी’ म्हणाव्यात अशा. ( आजही त्या स्वत:ला अभिमानानं ‘नगरकर’च म्हणवून घेतात.) सुनंदाताईंचे वडील त्या दहा वर्षांच्या असतानाच गेले. त्यांना मामांचा आधार होता, पण आईनंच लहानाचं मोठं केलं. तेव्हाचं त्यांचं निम्न मध्यमवर्गीय जगणं, नगरमधले वाडे, तिथलं समाजजीवन, तिथल्या शाळा, शिक्षक, नगरमधील दुकानं, दवाखाने, तिथल्या गल्ल्या, बाजार हे सगळं सगळं सुनंदाताई अतिशय तपशीलवार उभं करतात. नगरसारख्या मध्यम शहरात वाढलेल्या महाराष्ट्रातील कुठल्याही शहरातील त्या काळातील व्यक्तीला अतिशय सहज रिलेट होईल, असं त्यांचं हे जगणं होतं. त्यात सुनंदाताईंचं लेखन अतिशय सहज, सोपं आणि प्रांजळ असल्यामुळं ते आपल्याला अगदी भिडतं. एका प्रख्यात अभिनेत्याची पत्नी असल्यानं त्यांचं जीवन इतर सर्वसामान्य स्त्रियांपेक्षा वेगळं झालं असेल, अशी आपली अपेक्षा असते. सुनंदाताईंच्या लेखनातून या ‘वेगळ्या जीवना’ची काही तरी झलक मिळेल, अशीही आपली एक भूमिका तयार झालेली असते. सदाशिव अमरापूरकरांसारख्या मनस्वी अभिनेत्याशी लग्न झाल्यानंतर सुनंदाताईंचं जगणं बदललंही; मात्र ते वेगळ्या पद्धतीनं. सदाशिव अमरापूरकर ऊर्फ नगरकरांचा लाडका बंडू त्यांना नगरमध्ये शाळेपासून कसा भेटला, नंतर कॉलेजमध्ये दोघांनी एकाच ग्रुपमधील नाटकं कशी सादर केली, त्यात अगदी नकळतपणे त्यांचं प्रेम कसं जमलं आणि नंतर नगर सोडून त्या पतीच्या कारकिर्दीसाठी मुंबईत कशा आल्या हा सर्व नाट्यमय प्रवास सुनंदाताई अतिशय तन्मयतेनं मांडतात. अमरापूरकर मंडळींच्या घराविषयीचे तपशील त्यात येतात. अमरापूरकरांचे वडील दत्तोपंत हे नगरमधलं मोठं प्रस्थ. श्रीमंत घराणं. मोठा वाडा, नोकरचाकर वगैरे. त्या तुलनेत सुनंदाताईंची माहेरची परिस्थिती जेमतेम म्हणावी अशी. अशा परिस्थितीत हे लग्न झालं आणि त्या अमरापूरकरांची सून झाल्या, इथपर्यंत पुस्तकाचा निम्मा प्रवास (मध्यंतरच) होतो. पुढल्या दोनशे पानांत आपल्याला खऱ्या अर्थानं सदाशिव अमरापूरकर हे काय व्यक्तिमत्त्व होतं, हे उलगडत जातं. अमरापूरकरांनी शेवटपर्यंत त्यांची मध्यमवर्गीय राहणी व मध्यमवर्गीय मूल्यं सोडली नाहीत. ‘अर्धसत्य’सारख्या सिनेमामुळं एका रात्रीतून ते भारतभरात प्रसिद्ध झाले. या एका ओळखीमुळं अमरापूरकरांचं जीवन पूर्ण बदलून गेलं. तोपर्यंत असलेली आर्थिक ओढगस्तीही संपली. हिंदी चित्रपटसृष्टीत अगदी स्वप्नवत अशा रीतीनं ते मोठे स्टार झाले. एकापाठोपाठ एक खलनायकी भूमिका त्यांच्याकडं येऊ लागल्या. पैसा येऊ लागला. अशा परिस्थितीत एक मध्यमवर्गीय कुटुंब या सगळ्या धबधब्याला कसं तोंड देतं आणि आपली मूल्यं कायम जपत राहतं, हे सुनंदाताईंनी फार हृद्यपणे लिहिलं आहे. सुनंदाताईंनी अनेक वर्षं एलआयसीत नोकरी केली. पतीचं अस्थिर क्षेत्र असल्यानं त्यांनी सुरुवातीला नोकरी केलीच; पण नवरा हिंदी चित्रपटसृष्टीत सुपरस्टार व्हिलन झाल्यावरही त्यांनी ही नोकरी सोडली नाही. त्यांच्या तिन्ही मुलींवर त्यांनी उत्तम संस्कार केले. एका सिनेमाच्या प्रीमियरनंतर हे सगळे कुटुंबीय कसे घरी जाऊन पिठलं-भाकरीचं जेवण तयार करून जेवले हे त्यांनी एका प्रसंगात अतिशय खेळकरपणे सांगितलं आहे. अमरापूरकरांचं नाटकवेड, भौतिक सुखांविषयीची काहीशी विरक्त वृत्ती, त्यांचा मित्रांचा गोतावळा, अनेक माणसांचा घरात राबता असा एकूण ‘देशस्थी’ कारभार यावर सुनंदाताई कधी गमतीत, तर कधी काहीसं वैतागून टिप्पणी करतात. अर्थात त्यांचं सदाशिव अमरापूरकरांवर अतिशय प्रेम होतं आणि त्यांनी हे शेवटपर्यंत उत्तम निभावलं. अशा आत्मचरित्रांत अनेकदा ‘आहे मनोहर तरी... गमते उदास’ असा सूर लागण्याचा धोका असतो. सुनंदाताईंच्या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणजे, एखादा अपवाद वगळता, त्यांच्या या संपूर्ण पुस्तकात असा रडवा सूर कधीही लागलेला नाही. आपल्याला जे काही मिळालं, ते आपणच निवडलं आहे आणि त्यामुळं त्याविषयी तक्रार करण्याचा आपल्याला काही अधिकार नाही, अशी एक भूमिका त्यांनी घेतलेली दिसते. त्यांच्या या पुस्तकातून विसाव्या शतकातील मध्यमवर्गीय ब्राह्मण घरातील एका तरुणीच्या आशा-आकांक्षांचा, आयुष्यानं दिलेल्या आश्चर्याच्या धक्क्यांचा आणि त्याला सामोरं जाण्यातील धीट दिलदारपणाचा लोभस प्रवास दिसतो. आपली मध्यमवर्गीय मूल्यं जपत, प्रामाणिकपणे व उमेदीनं आयुष्य जगणाऱ्या अनेक महिलांना या पुस्तकात आपल्या जगण्याचं प्रतिबिंब सापडेल. तेच या ‘खुलभर दुधाच्या कहाणी’चं यश आहे. ...Read more

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
प्रभाकर गावंडे, अमरावती

मी विकत घेऊन वाचले आहे हे पुस्तकं, चांगले आहे, नवीन माहिती वाचायला मिळाली.