* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: HEROINE OF THE DESERT
  • Availability : Available
  • Translators : SHOBHANA SHIKNIS
  • ISBN : 9788184980578
  • Edition : 2
  • Publishing Year : AUGUST 2009
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 174
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
Quantity
Buying Options:
  • Print Books:
DESCRIBED AS A `MODERN DAY SAINT`, DONYA - AL NAHI, ORIGINALLY A BRITISH WOMAN, LATER MARRIED TO A MUSLIM, SHE ALSO EMBRACED ISLAM AFTER MARRIAGE. SEPARATED FROM HER FIRST HUSBAND AFTER THE BIRTH OF HER FIRST SON, SHE LATER MARRIED TO AN IRAQI, MAHMOND AND HAD THREE CHILDREN FROM THAT MARRIAGE. SINCE THE BOOK, "HEROINE OF THE DESERT` IS A TRUE STORY, AN ACCOUNT OF DONYA`S MISSION TO CAPTURE CHILDREN SEPARATED FROM THEIR MOTHERS BY DECEIT, AND TAKEN AWAY TO THE MIDDLE EAST COUNTRIES BY THEIR FATHERS, IT IS EVEN MORE THRILLING THAN ANY FICTION. DONYA - AL NAHI GOT INVOLVED IN THE SERIES OF THESE CHALLENGING, RISKY AND DARE-DEVIL ESCAPADES TO UNITE THE CHILDREN WITH THEIR FORELORN MOTHERS, WHEN SHE FIRST MET A WOMEN AT QUEENSWAY IN LONDON. SHE SUCCEEDED IN MOST OF THE MISSIONS WITH EXCEPTION OF ONE OR TWO CASES; SHE HAD TO ALSO GO THROUGH SOME HAIR-RAISING EXPERIENCES OF IMPRISONMENT, HOT CAR-CHASES, AND EVEN THREATS TO HER LIFE. THOUGHT INTIALLY SHE KEPT HER TRUE IDENTIFY A SECRET, FINALLY SHE BECAME A KNOWN FIGURE DUE TO THE NEWSPAPER PUBLICITY AS WELL AS T. V. CHANNELS. SO SHE DECIDED TO DETACH FROM THESE MISSIONS DIRECTLY, TO PROTECT HER FAMILY FROM ANY THREATS OR HARM CAUSED BY THE FATHERS OF ABDUCTED CHILDREN. CHANNEL FOUR OF BRITISH TELEVISION MADE A DOCUMENTARY ON HER; DONYA DECIDED TO WRITE A BOOK ON HER HEROIC MISSIONS AND ASSISTED BY ANDREW CROFTS, AN ACCOMPLISHED GHOST WRITER, WROTE HER DEBUT BOOK, `HEROINE OF THE DESERT.` THE BOOK IS A TRUE AND SINCERE ACCOUNT OF HER TURBULENT LIFE, SOME OF THE MISTAKES THAT SHE UNABASHEDLY CONFESSES TO, AND A THRILLING NARRATION OF THE UNPREDICTABLE EVENTS, IT`S HEARTWARMING TO READ ABOUT HER LOVE FOR THE CHILDREN, INCLUDING HER OWN.
‘‘मेरीने लैलाला उचलून घेतलं आणि त्या दोघी एकमेकींच्या आलिंगनात जणू काही अनंतकाळपर्यंत विसावल्यासारख्या भासल्या....’’ मेरीला तातडीने कृती केली पाहिजे, याचं भान आलं.... लैलाचं मुटकुळं घट्ट धरून ती टॅक्सीकडे आली.... दरवाज्यापर्यंत पोहचताच मी आत उडी घेतली; ड्रायव्हरला ओरडून सांगत, ‘चल, निघ.’ ‘शेकडो ब्रिटिश स्त्रियांसाठी डोन्या-अल् नहि ही एक दयेची मूर्तिमंत देवदूतच आहे....’ ‘विश्वास बसणार नाही एवढ्या धैर्यवान अशा या डोन्याच्या आयुष्याचं इतिकर्तव्य म्हणजे मुलांच्या विरहाने दु:खी झालेल्या स्त्रियांचं त्यांच्या मुलांशी पुनर्मीलन घडवून आणणं... आणि तेही ठार मारण्याच्या धमक्यांना आणि तुरुंगात टाकलं जाण्याच्या संकटांना तोंड देत....’ ‘हृदयाचा ठोका चुकवणा-या धाडसी मोहिमा म्हणून डोन्याच्या गोष्टी जेवढ्या परिणामकारक आहेत, तेवढ्याच सांस्कृतिक भिन्नता असलेल्या लोकांनी विवाहबद्ध झाल्यावर काय चुकत जातं, त्याचंही त्या परिणामकारक चित्रण करतात....’
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES #HEROINE OF THE DESERT #SHOBHANASHIKNIS #DONYAALNAHI
Customer Reviews
  • Rating StarAnil Udgirkar

    मुलं परदेशी पळवून न्यायची व त्यांची आई पासून ताटातून करायची हा उद्योग कांही पुरूषांचा आणि ती परत आणण्यासाठी मातांनी दिलेला लढा.वाचनीय!

  • Rating Starविजय परांजपे, पुणे

    `हिरॉईन ऑफ द डेझर्ट` हे डोन्या अल-नही ने लिहिलेले व शोभना शिकनीस यांनी अनुवाद केलेले पुस्तक वाचले आणि एक थरारक अनुभव आला. लेखिकेने सूक्ष्म बारकाव्यासह वर्णन केल्याने त्यातील प्रत्येक प्रसंग स्वत: अनुभवल्यासारखे वाटले. अंगावर शहारे आले. दुसऱ्या धर्माच आकर्षण सर्वांनाच असते. धर्मांतर केल्यावर त्याचे काही फायदे आहेत तसे काही तोटेही आहेत हे प्रत्यक्ष अनुभवायला मिळते तेव्हाच समजते. तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. शोभना शिकनीस यांनी मुळ पुस्तकाचे भाषांतर सुंदर केलेले आहे. शोभना शिकनीस यांचे कॉलेलजीवनावरील अनुभव कथन मी आपल्या दिवाळी अंकात वाचले होते तेव्हा त्या एक सशक्त लेखिका वाटल्या होत्या. त्याचा पुन्हा एकदा अनुभव आला. या लेखिकेचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व मनाला लुभावते. ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 3-1-2010

    ‘हिरॉईन ऑफ अ डेझर्ट’ हे डोन्या-अल्-नहि या एका हिंमतबाज स्त्रीचे पुस्तक आहे. ही स्त्री मूळची इंग्लिश. तिचे तेथील नाव आहे डॉना टेपन. केंब्रिजशायर, लंडन येथे तिचा जन्म झाला. डोन्याची वाढ अस्थिर कुटुंबात झाली. तिला आईबद्दल फारशी आस्था नव्हती. वडिलांबद्दलमात्र जिव्हाळा होता. तारुण्याच्या सुरुवातीच्या काळात तिला मुस्लिम मित्र लाभले. पुढे विवाह आणि स्थिर कौटुंबिक जीवन वाट्याला येऊनही चौकटतील जीवन न जगता, तिने एका वेगळ्या धाडसी आयुष्यात प्रवेश केला. या जगावेगळया धाडसी आयुष्याची कहाणी म्हणजे, हे पुस्तक होय. आखाती देशांतून अनेक श्रीमंत अरब तरुण इंग्लंडमध्ये येतात. अतिशय पारंपारिक कुटुंबात वाढलेले हे तरुण इंग्लंडमधील स्त्रियांच्या आधुनिकतेने प्रभावित होतात. त्यातून विवाहही होतात. या संमिश्र विवाहात, कालांतराने, विशेषत: मुलांना जन्म दिल्यावर हे तरुण आपल्या देशात जाण्यासाठी उत्सुक असतात. पाश्चिमात्य देशातील आधुनिक जीवनशैलीत मुलांना वाढविण्याबाबत त्यांची उदासीनता पती-पत्नीत बेबनाव निर्माण करते. यातूनच हे पुरुष मुलांना आपल्या देशात पळवून नेतात. या पलायनाबाबत पूर्णपणे अनभिज्ञ असणाऱ्या अनेक स्त्रिया, मुलांशिवाय नैराश्यपूर्ण जीवन जगतात. डोन्याचा हा लढा अशाच स्त्रियांसाठी आहे. डोन्याने जॉर्डन, लीबिया, मोरोक्को, इराक अशा कितीतरी ठिकाणांहून मुलांना आणून त्यांच्या मातांकडे सोपविले. ही बाब अर्थातच सोपी नव्हे. प्रत्येक देशाचे कायदे, नियम वेगवेगळे, त्यातून मुलांचे पासपोर्ट पित्यांकडे... अशा वेळी मुलांना पुन्हा इंग्लंडला आणताना ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतात, त्या बेकायदेशीर असूनही, मुलांना आईचे प्रेम मिळण्यासाठी डोन्या करते. या पुस्तकातील अनेक प्रसंग थरारक आहेत. तिने शेकडो आयांना त्यांची मुले पुन्हा मिळवून दिली आहेत. ‘मुलांना पळविणारी स्त्री’, अशी तिची प्रतिमा निर्माण झालेली असली, तरी ती मुलांच्या इच्छेविरुद्ध वागत नाही. मुलांना आई हवी असूनही जेव्हा पिता बळजबरीने ताबा सांगतो, तेव्हाच ती अशी कृती करते. त्यामुळे सतत मिळणाऱ्या धमक्यांनाही तोंड देते. आज तिच्या या कामाचे जगभरात कौतुक होत असले, तरी त्यातील धोका तिला माहीत आहे. डोन्याच्या या कामात तिचा पती महमूद याची विलक्षण साथ आहेच; पण आखाती देशांत आणि उत्तर आफ्रिकेत तिला मदत करणाऱयांचे एक जाळेच तयार झाले आहे. त्यात टॅक्सी ड्रायव्हरपासून ते अधिकारी, नेते, श्रीमंत अरबांचाही समावेश आहे. या पुस्तकातून ती या साऱ्या गोष्टी सांगता सांगता आपल्या पूर्वायुष्यात झालेल्या चुका, कौटुंबिक वातावरण यांचेही स्पष्टीकरण देते. पुस्तकाच्या अखेरीस ती आपल्या मानवतावादी कामाचे स्वरुप अधिक विस्तारताना दिसते. मशिदीत पावाचा तुकडा मिळेल या आशेने फिरणाऱ्या मुलांसाठी इराकमध्ये अनाथाश्रम उघडण्याचा, पळवून नेलेल्या मुलांची बाल्यावस्था जपण्याचा, आपल्या पळवून नेलेल्या मुलांना भेटायला जाणाऱ्या मातांसाठी निधी उभारण्याचा तिचा निश्चय आहे. तिच्या कामाचा हा परीघ पाहता, उच्च प्रतीच्या संवेदना बाळगणारी, दीनदुबळ्यांची सेवा करणारी सेवाव्रती, हे तिचे रुप मनात ठसते. हे पुस्तक डोन्याच्या जगावेगळ्या धाडसाची कहाणी तर सांगतेच; पण त्याचबरोबर पती-पत्नीमधील नात्यावर आणि भिन्न संस्कृतीतील परस्परसंबंधांवरही प्रकाश टाकते. सतत मिळणाऱ्या धमक्यांनाही तोंड देते. आज तिच्या या कामाचे जगभरात कौतुक होत असले, तरी त्यातील धोका तिला माहीत आहे. डोन्याच्या या कामात तिचा पती महमूद याची विलक्षण साथ आहेच; पण आखाती देशांत आणि उत्तर आफ्रिकेत तिला मदत करणाऱयांचे एक जाळेच तयार झाले आहे. त्यात टॅक्सी ड्रायव्हरपासून ते अधिकारी, नेते, श्रीमंत अरबांचाही समावेश आहे. या पुस्तकातून ती या साऱ्या गोष्टी सांगता सांगता आपल्या पूर्वायुष्यात झालेल्या चुका, कौटुंबिक वातावरण यांचेही स्पष्टीकरण देते. पुस्तकाच्या अखेरीस ती आपल्या मानवतावादी कामाचे स्वरुप अधिक विस्तारताना दिसते. मशिदीत पावाचा तुकडा मिळेल या आशेने फिरणाऱ्या मुलांसाठी इराकमध्ये अनाथाश्रम उघडण्याचा, पळवून नेलेल्या मुलांची बाल्यावस्था जपण्याचा, आपल्या पळवून नेलेल्या मुलांना भेटायला जाणाऱ्या मातांसाठी निधी उभारण्याचा तिचा निश्चय आहे. तिच्या कामाचा हा परीघ पाहता, उच्च प्रतीच्या संवेदना बाळगणारी, दीनदुबळ्यांची सेवा करणारी सेवाव्रती, हे तिचे रुप मनात ठसते. हे पुस्तक डोन्याच्या जगावेगळ्या धाडसाची कहाणी तर सांगतेच; पण त्याचबरोबर पती-पत्नीमधील नात्यावर आणि भिन्न संस्कृतीतील परस्परसंबंधांवरही प्रकाश टाकते. ...Read more

  • Rating StarDAINIK PUNYANAGARI 8-11-2009

    डोन्या अल्-नहि यांचं हिरॉईन ऑफ द डेझर्ट हे पुस्तक हृदयस्पर्शी आहे. शोभना शिकनीस यांनी या पुस्तकाचा मराठी अनुवाद केला आहे. अपहृत मुलांना मध्यपूर्वेच्या जॉर्डन, लिबिया यांसारख्या देशांतून सोडवून आणून त्यांच्या मातांच्या ताब्यात देण्याचं काम डोन्या अल्-हि यांनी हयातभर केलं हे करताना त्यांना अनेक धाडसांचा सामना करावा लागला. त्याच्या कहाण्या ‘हिरॉईन ऑफ डेझर्ट’ या पुस्तकात वाचायला मिळतात. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more