* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: 26-11 MUMBAI ATTACKED
  • Availability : Available
  • Translators : PROF.MUKUND NATU
  • ISBN : 9788184982046
  • Edition : 2
  • Publishing Year : FEBRUARY 2011
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 232
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
INTERVIEW WITH LET`S REPRESENTATIVE, ABDULLAH MUNTAZIR, BY THE ONLY INDIAN JOURNALIST HARINDER BAWEJA INSIDE THE HEADQUARTERS OF JAMAAT-UD-DAWA, IN MURIDKE, PAKISTAN; WHERE AJMAL AMIR KASAB, THE LONE SURVIVING TERRORIST, WAS TRAINED FOR THE ATTACK.BRINGING TOGETHER THE CAREFUL RESEARCH AND ANALYSES OF RENOWNED JOURNALISTS AND POLICE OFFICIALS, 26/11 MUMBAI ATTACKED EXPLICATES THE REALITY BEHIND THE BRAZEN ATTACK ON INDIA`S SOVEREIGNTY IN NOVEMBER 2008 WHEN TEN HEAVILY ARMED TERRORISTS HELD AN ENTIRE CITY TO RANSOM BY THE SHEER FORCE OF THEIR ZEALOTRY. THE SCENE-BY-SCENE ACCOUNTS, INCISIVE ANALYSES, AND AN EXCLUSIVE INTERVIEW WITH A LET REPRESENTATIVE ALONG WITH A DESCRIPTION OF ITS TRAINING CAMP IN MURIDKE, PAKISTAN, REVEAL HOW THE FAILURE OF INDIAN INTELLIGENCE AGENCIES LANDED MUMBAI IN THE QUAGMIRE OF TERRORISM.PAYING HOMAGE TO THE BRAVE SECURITY OFFICERS WHO LOST THEIR LIVES FIGHTING THE TERRORISTS, 26/11 MUMBAI ATTACKED REITERATES THE CHILLING REALITY THAT INDIA IS UNDER GRAVE THREAT AND THE CLOCK IS TICKING BEFORE THE NEXT BIG ATTACK.
कराचीहून सागर मार्गाने आलेले दहशतवादी, साठ तास देशाच्या आर्थिक राजधानीत रक्तरंजित थैमान घालतात; त्याची ही प्रत्यक्षदर्शी कहाणी. परदेशी पर्यटक, श्रीमंत मंडळी यांची गर्दी असलेल्या कुलाब्यातील लिओपोल्ड कॅफे, ते हॉटेल ताज आणि हॉटेल ट्रायडेंट–ओबेरॉय पर्यंतच्या मुक्त संचारात नरिमन हाऊस आणि सीएसटी येथेही त्यांनी बेबंद नरसंहार केला. हे सर्व वाचताना दु:ख आणि वैफल्याने मन विषण्ण होते. परंतु या भीतिदायक काळातही सामान्य मुंबईकरांनी दाखवलेले धैर्य आणि विविध सुरक्षा दलांतील अधिकारी आणि जवानांनी दाखवलेली कर्तव्यनिष्ठा यांनी मन उचंबळून येते. ‘ये है बम्बई मेरी जान...’ या जुन्या गाण्याची आठवण येते. धडाडीचे कार्यक्षम सर्वोच्च पोलिस अधिकारी ‘ज्युलिओ रिबेरो’ यांनी देशाच्या ढिसाळ सुरक्षाव्यवस्थेची केलेली चिरफाड काळजी निर्माण करते. अर्थात ते यावर उपायही सुचवतात. पण ते अंमलात कसे येणार हा वेगळा प्रश्न आहे. ....असे हल्ले भारताला आणखी काही काळ तरी सोसावे लागणार आहेत, याची कारणमीमांसा ज्येष्ठ पत्रकार हरिंदर बावेजा यांनी केली आहे.

No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHY&TRUESTORIES #26-11 #MUMBAIATTACK #MUKUNDNATU #HARVINDERBAWEJA #TERRORISTATTACK
Customer Reviews
  • Rating Starदेव कामत

    कराचीहून सागर मार्गाने आलेले दहशतवादी, साठ तास देशाच्या आर्थिक राजधानीत रक्तरंजित थैमान घालतात; त्याची ही प्रत्यक्षदर्शी कहाणी. परदेशी पर्यटक, श्रीमंत मंडळी यांची गर्दी असलेल्या कुलाब्यातील लिओपोल्ड कॅफे, ते हॉटेल ताज आणि हॉटेल ट्रायडेंट–ओबेरॉय पर्यंच्या मुक्त संचारात नरिमन हाऊस आणि सीएसटी येथेही त्यांनी बेबंद नरसंहार केला. हे सर्व वाचताना दु:ख आणि वैफल्याने मन विषण्ण होते. परंतु या भीतिदायक काळातही सामान्य मुंबईकरांनी दाखवलेले धैर्य आणि विविध सुरक्षा दलांतील अधिकारी आणि जवानांनी दाखवलेली कर्तव्यनिष्ठा यांनी मन उचंबळून येते. ‘ये है बम्बई मेरी जान...’ या जुन्या गाण्याची आठवण येते. धडाडीचे कार्यक्षम सर्वोच्च पोलिस अधिकारी ‘ज्युलिओ रिबेरो’ यांनी देशाच्या ढिसाळ सुरक्षाव्यवस्थेची केलेली चिरफाड काळजी निर्माण करते. अर्थात ते यावर उपायही सुचवतात. पण ते अंमलात कसे येणार हा वेगळा प्रश्न आहे. ....असे हल्ले भारताला आणखी काही काळ तरी सोसावे लागणार आहेत, याची कारणमीमांसा ज्येष्ठ पत्रकार हरिंदर बावेजा यांनी केली आहे. २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस (बोरीबंदर स्टेशन), कामा हॉस्पिटल, द न्यू ताजमहाल हॉटेल, लिओपोल्ड कॅफे, ट्रायडंट हॉटेल, ओबेरॉय हॉटेल, नरिमन हाऊस वगैरे स्थळांवर दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी हल्ला चढवून अंदाधुंद गोळीबार केला, हाताँब फेकले. बऱ्याच निरपराध नागरिकांचा त्यात नाहक बळी गेला. लाल किल्ला आणि संसदभवन यावर पूर्वी झालेल्या अतिरेक्यांच्या हल्ल्यापेक्षा व्याप्ती आणि तीव्रता या बाबतीत मुंबईतील हा हल्ला अधिक मुंबईतील हा हल्ला अधिक प्राणघातक आणि भयावह होता. या हल्ल्याचे नियोजन अधिक काटेकोर होते. या हल्ल्यासाठी बत्तीस अतिरेक्यांना पाकिस्तानमध्ये वर्षभर प्रशिक्षण देण्यात आले होते आण त्यापैकी दहा जणांना कराचीहून समुद्र मार्गे पाठवण्यात आले. गुजरातमधील पोरबंदर येथे या अतिरेक्यांनी एमव्ही कुबेर ही मासेमारी बोट हस्तगत करून मुंबई गाठली. एका डिंगीतून मुंबईत गेट वे ऑफ इंडियावर उतरून आपल्या ५ टीम केल्या आणि वेगवेगळ्या पूर्व नियोजित ठिकाणी जाऊन बाँबस्फोट आणि गोळीबार करून साठ तास मुंबईला वेठीला धरले. प्रारंभी पोलिसांनी या अतिरेक्यांना तोंड दिले. कामा हॉस्पिटलजवळ हेमंत करकरे (एटीएस प्रमुख), अशोक कामठे, विजय साळस्कर वगैरे पोलीस अधिकारी जबरदस्त जखमी झाले. नंतर राष्ट्रीय सुरक्षा दलाचे जवान अतिरेक्यांशी मुकाबला करण्यासाठी पुढे आले. तीन दिवसात या दलाचे १८ जवान बळी पडले. दहा पैकी नऊ अतिरेक्यांना ठार मारण्यात आले. दहावा अतिरेकी कसाब याला जिवंत पकडण्यात आले. या हल्ल्याविषयी वेगवेगळ्या पत्रकारांना लिहायला सांगून, त्याचे संकलन करण्याचे महिला पत्रकार हरिंदर बावेजा यांनी ठरवले. ‘तहेलका’ या वृत्त–नियतकालिकाच्या न्यूज अँड इन्व्हेस्टिगेशन्स विभागाच्या त्या संपादिका आहेत. ‘कारगिल–एक अकथित कथा’ या त्यांच्या पुस्तकाचा चांगला बोलबाला झाला आहे. २६/११ मुंबईवरील हल्ला या पुस्तकात या हल्ल्यातील प्रमुख स्थळी घडलेल्या घटनांचे नाट्य शब्दांच्या माध्यमातून उभे करणाऱ्या लेखांचा समावेश आहे. त्या त्या स्थळी प्रत्यक्ष हल्ल्याच्या वेळी हजर असणारे आणि वृत्तांकन करणारे हे पत्रकार लेखक असल्याने, संबंधितांच्या मुलाखती घेऊन आपल्या समोर घडलेल्या घटनांच्या चित्रणात तपशीलवार भर घातलेली असल्याने हे पुस्तक विश्वासार्ह दस्ताऐवजाच्या दर्जाला पात्र झाले आहे. वृत्तवाहिन्यांना शोधक कंटेन्ट पुरवणाऱ्या ‘तहेलका’ या संस्थेद्वारे अनेक सनसनाटी प्रकरणांना वाचा फोडणारे आणि सध्या आजतक या वृत्तवाहिनीत कार्यरत असणारे पत्रकार आशिष खेतान यांचे या पुस्तकात हॉटेल ताजमधील अंधारयात्रा (४० पृष्ठे) हॉटेल ओबेरायमधील धुमश्चक्री (२० पृष्ठे), कराची ते मुंबई क्रौर्याचा प्रवास (५० पृष्ठे) असे तीन लेख आहेत. दृश्य एक, दृश्य दोन अशा नाट्यपूर्ण शैलीत त्यांनी विविध घटना शब्दबद्ध केल्या आहेत. दहशतवादी आणि सूत्रधार यांच्यातील महत्त्वाची संभाषणेही त्यात समाविष्ट केली आहेत. ताजमधील कर्मचाऱ्यांना शौर्याचीही साक्षेपाने नोंद केली आहे. ‘मार्कोसनी चेंबर्समधील सुमारे दोनशे जणांचे प्राण वाचवले’ (७१), ‘हॉटेलमध्ये खासदार असल्याचे कळल्यानंतर त्या खासदाराला ओलीस धरा किंवा ठार मारा असा आदेश या घटना टीव्हीवरून पाहणाऱ्या या हल्ल्याच्या पाकिस्तानमधील सूत्रधारांनी दिला.’ (६८) या सारखे तपशील या हल्ल्याचे गांभीर्य आणि संबंधित व्यक्तींचे मनोधैर्य प्रकट करतात. आशिष खेतान यांच्या या तीन लेखांनी पुस्तकाची निम्मी पृष्ठे व्यापलेली आहेत. कराची ते मुंबई प्रवासाचे तारीख - वेळेनुसार पुनर्रचित केलेले नाट्य अतिरेक्यांच्या चौकशी करणाऱ्या पोलिसांच्या मुलाखतीतून एटीएसच्या कार्यालयातील नोंदीवरून, आंतरराष्ट्रीय फोनवरील संभाषणातून, कसाबच्या कबुलीजबाबातून आपल्यापुढे उभे राहते. अतिरेक्यांनी वापरलेल्या बोटीचे तपशीलही त्यांनी एखाद्या बेस्टसेलर पाश्चात्य थ्रिलरच्या शैलीत दिले आहेत. सीएनएन-आयबीएनचे प्रमुख वार्ताहार जॉर्ज कोशी यांच्या लेखात बोरीबंदर स्थानकावरील हल्ल्याची हकीकत आली आहे. कसाब आणि इस्माईल हे अतिरेकी गोळ्यांचा वर्षाव करून प्रवाशांना मारत होते. तेथून ते चालत आझाद मैदानापर्यंत गेले. आलब्लेस हॉस्पिटलच्या मागाच्या दाराशी पोचले. दिसेल त्याच्यावर गोळ्या झाडत पुढे जात राहिले. मेट्रोजवळ त्यांनी पोलीस निरीक्षक साळसकर यांच्यावर गोळी झाडली. त्यांचे प्रेत गाडीतून बाहेर फेकून अतिरेकी पोलीस जीपमधून पळाले. इस्माइल ड्रायव्हिंग करीत होता. विधानभवनाकडे त्याने पोलीस जीप नेली. पोलिसांनी तिचा मागचा टायर गोळीने टिपला. गाडी वळवताना कलंडली इस्माईलने धाक दाखवून तेथे असणाऱ्या शरण यांच्या स्कोडा गाडीची किल्ली मिळवली. इस्माईलने ती चौपाटीकडे नेली. पोलिसांनी उभ्या असलेल्या अडथळ्याशी गाडी न थांबल्याने गोळ्या झाडल्या. ईस्माइल मेला एके-४७ घेतलेला कसाब मेल्याचे सोंग करून रस्त्यावर पडला. तुकाराम ओंबळेंनी कसाब हालचाल करतोय हे बघून त्याला मिठी मारली. कसाबने गोळ्या झाडल्या. इतरांनी कसाबला धरून ठेवले. कसाब जिवंत हाती लागला. सलाम... मुंबई (बाची करकेरिया), भयानक वास्तव (ज्युलिओ रिबेरो), दहशतवादाचे उगम स्थान (हरिंहर बावेजा) वगैरे लेखही मुंबईच्या नागरिकांच्या मनोधैर्यावर प्रकाश टाकतात. सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटीही लक्षात आणून देतात. मुंबई हल्ल्यावरच्या या पुस्तकाने अतिरेक्यांच्या कारवायांचा बंदोबस्त करण्यासाठी सुरक्षायंत्रणांची सिद्धता आणखी कडक हवी हे लक्षात येते. संबंधित यंत्रणांनी त्याबाबत आपल्या कार्यप्रणालीत सुधारणा करायला हवी. ...Read more

  • Rating StarDAINIK AIKYA 20-03-2011

    २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस (बोरीबंदर स्टेशन), कामा हॉस्पिटल, द न्यू ताजमहाल हॉटेल, लिओपोल्ड कॅफे, ट्रायडंट हॉटेल, ओबेरॉय हॉटेल, नरिमन हाऊस वगैरे स्थळांवर दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी हल्ला चढवून अंदाधुंद गोळीबार केला, हाताँब फेकले. बऱ्याच निरपराध नागरिकांचा त्यात नाहक बळी गेला. लाल किल्ला आणि संसदभवन यावर पूर्वी झालेल्या अतिरेक्यांच्या हल्ल्यापेक्षा व्याप्ती आणि तीव्रता या बाबतीत मुंबईतील हा हल्ला अधिक मुंबईतील हा हल्ला अधिक प्राणघातक आणि भयावह होता. या हल्ल्याचे नियोजन अधिक काटेकोर होते. या हल्ल्यासाठी बत्तीस अतिरेक्यांना पाकिस्तानमध्ये वर्षभर प्रशिक्षण देण्यात आले होते आण त्यापैकी दहा जणांना कराचीहून समुद्र मार्गे पाठवण्यात आले. गुजरातमधील पोरबंदर येथे या अतिरेक्यांनी एमव्ही कुबेर ही मासेमारी बोट हस्तगत करून मुंबई गाठली. एका डिंगीतून मुंबईत गेट वे ऑफ इंडियावर उतरून आपल्या ५ टीम केल्या आणि वेगवेगळ्या पूर्व नियोजित ठिकाणी जाऊन बाँबस्फोट आणि गोळीबार करून साठ तास मुंबईला वेठीला धरले. प्रारंभी पोलिसांनी या अतिरेक्यांना तोंड दिले. कामा हॉस्पिटलजवळ हेमंत करकरे (एटीएस प्रमुख), अशोक कामठे, विजय साळस्कर वगैरे पोलीस अधिकारी जबरदस्त जखमी झाले. नंतर राष्ट्रीय सुरक्षा दलाचे जवान अतिरेक्यांशी मुकाबला करण्यासाठी पुढे आले. तीन दिवसात या दलाचे १८ जवान बळी पडले. दहा पैकी नऊ अतिरेक्यांना ठार मारण्यात आले. दहावा अतिरेकी कसाब याला जिवंत पकडण्यात आले. या हल्ल्याविषयी वेगवेगळ्या पत्रकारांना लिहायला सांगून, त्याचे संकलन करण्याचे महिला पत्रकार हरिंदर बावेजा यांनी ठरवले. ‘तहेलका’ या वृत्त–नियतकालिकाच्या न्यूज अँड इन्व्हेस्टिगेशन्स विभागाच्या त्या संपादिका आहेत. ‘कारगिल–एक अकथित कथा’ या त्यांच्या पुस्तकाचा चांगला बोलबाला झाला आहे. २६/११ मुंबईवरील हल्ला या पुस्तकात या हल्ल्यातील प्रमुख स्थळी घडलेल्या घटनांचे नाट्य शब्दांच्या माध्यमातून उभे करणाऱ्या लेखांचा समावेश आहे. त्या त्या स्थळी प्रत्यक्ष हल्ल्याच्या वेळी हजर असणारे आणि वृत्तांकन करणारे हे पत्रकार लेखक असल्याने, संबंधितांच्या मुलाखती घेऊन आपल्या समोर घडलेल्या घटनांच्या चित्रणात तपशीलवार भर घातलेली असल्याने हे पुस्तक विश्वासार्ह दस्ताऐवजाच्या दर्जाला पात्र झाले आहे. वृत्तवाहिन्यांना शोधक कंटेन्ट पुरवणाऱ्या ‘तहेलका’ या संस्थेद्वारे अनेक सनसनाटी प्रकरणांना वाचा फोडणारे आणि सध्या आजतक या वृत्तवाहिनीत कार्यरत असणारे पत्रकार आशिष खेतान यांचे या पुस्तकात हॉटेल ताजमधील अंधारयात्रा (४० पृष्ठे) हॉटेल ओबेरायमधील धुमश्चक्री (२० पृष्ठे), कराची ते मुंबई क्रौर्याचा प्रवास (५० पृष्ठे) असे तीन लेख आहेत. दृश्य एक, दृश्य दोन अशा नाट्यपूर्ण शैलीत त्यांनी विविध घटना शब्दबद्ध केल्या आहेत. दहशतवादी आणि सूत्रधार यांच्यातील महत्त्वाची संभाषणेही त्यात समाविष्ट केली आहेत. ताजमधील कर्मचाऱ्यांना शौर्याचीही साक्षेपाने नोंद केली आहे. ‘मार्कोसनी चेंबर्समधील सुमारे दोनशे जणांचे प्राण वाचवले’ (७१), ‘हॉटेलमध्ये खासदार असल्याचे कळल्यानंतर त्या खासदाराला ओलीस धरा किंवा ठार मारा असा आदेश या घटना टीव्हीवरून पाहणाऱ्या या हल्ल्याच्या पाकिस्तानमधील सूत्रधारांनी दिला.’ (६८) या सारखे तपशील या हल्ल्याचे गांभीर्य आणि संबंधित व्यक्तींचे मनोधैर्य प्रकट करतात. आशिष खेतान यांच्या या तीन लेखांनी पुस्तकाची निम्मी पृष्ठे व्यापलेली आहेत. कराची ते मुंबई प्रवासाचे तारीख - वेळेनुसार पुनर्रचित केलेले नाट्य अतिरेक्यांच्या चौकशी करणाऱ्या पोलिसांच्या मुलाखतीतून एटीएसच्या कार्यालयातील नोंदीवरून, आंतरराष्ट्रीय फोनवरील संभाषणातून, कसाबच्या कबुलीजबाबातून आपल्यापुढे उभे राहते. अतिरेक्यांनी वापरलेल्या बोटीचे तपशीलही त्यांनी एखाद्या बेस्टसेलर पाश्चात्य थ्रिलरच्या शैलीत दिले आहेत. सीएनएन-आयबीएनचे प्रमुख वार्ताहार जॉर्ज कोशी यांच्या लेखात बोरीबंदर स्थानकावरील हल्ल्याची हकीकत आली आहे. कसाब आणि इस्माईल हे अतिरेकी गोळ्यांचा वर्षाव करून प्रवाशांना मारत होते. तेथून ते चालत आझाद मैदानापर्यंत गेले. आलब्लेस हॉस्पिटलच्या मागाच्या दाराशी पोचले. दिसेल त्याच्यावर गोळ्या झाडत पुढे जात राहिले. मेट्रोजवळ त्यांनी पोलीस निरीक्षक साळसकर यांच्यावर गोळी झाडली. त्यांचे प्रेत गाडीतून बाहेर फेकून अतिरेकी पोलीस जीपमधून पळाले. इस्माइल ड्रायव्हिंग करीत होता. विधानभवनाकडे त्याने पोलीस जीप नेली. पोलिसांनी तिचा मागचा टायर गोळीने टिपला. गाडी वळवताना कलंडली इस्माईलने धाक दाखवून तेथे असणाऱ्या शरण यांच्या स्कोडा गाडीची किल्ली मिळवली. इस्माईलने ती चौपाटीकडे नेली. पोलिसांनी उभ्या असलेल्या अडथळ्याशी गाडी न थांबल्याने गोळ्या झाडल्या. ईस्माइल मेला एके-४७ घेतलेला कसाब मेल्याचे सोंग करून रस्त्यावर पडला. तुकाराम ओंबळेंनी कसाब हालचाल करतोय हे बघून त्याला मिठी मारली. कसाबने गोळ्या झाडल्या. इतरांनी कसाबला धरून ठेवले. कसाब जिवंत हाती लागला. सलाम... मुंबई (बाची करकेरिया), भयानक वास्तव (ज्युलिओ रिबेरो), दहशतवादाचे उगम स्थान (हरिंहर बावेजा) वगैरे लेखही मुंबईच्या नागरिकांच्या मनोधैर्यावर प्रकाश टाकतात. सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटीही लक्षात आणून देतात. मुंबई हल्ल्यावरच्या या पुस्तकाने अतिरेक्यांच्या कारवायांचा बंदोबस्त करण्यासाठी सुरक्षायंत्रणांची सिद्धता आणखी कडक हवी हे लक्षात येते. संबंधित यंत्रणांनी त्याबाबत आपल्या कार्यप्रणालीत सुधारणा करायला हवी. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

रुपाली सोनवणे

#रुक #जाना #नही लेखक: Dr. भावेश भाटिया शब्दांकन: Dr: सचिन पाचोरकर अनुवाद: सुप्रिया वकील ​अंथरून पाहून पाय पसरावे... अह्ह.. त्या निर्जीव अंथरुणासाठी आपल्या सजीव पावलांना का त्रास द्यावा? असेच एक जबरदस्त आत्मचरित्र वाचून संपवलं आणि एक ऊर्जा निर्माणकरून गेलं, पुस्तकाचं नाव आहे `रुक जाना नहीँ ​डॉ. भावेश भाटिया यांची ही प्रेरणादायी कहाणी. शाळेत असताना आलेलं अकाली अंधत्व आणि त्यानंतर खडखडीत खडतर जीवनाचा सुरू झालेला प्रवास, पण या प्रवासात खचलेल्या बालमनाला त्यांच्या आईने दिलेलं बळ, प्रेरणा व आत्मसन्मानाची शिकवण आणि स्वाभिमानाचे धडे लेखकास पुरे होते. हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. चांगल्या धडधाकट व्यक्तीवर संकट आल्यावर दूर दूर पळणारे नातलग, मित्र परिवार, जातभाई... दृष्टी गेलेल्या व्यक्तीस कितपत आधार देतील? पण एक ऑपरेटर ते एक उद्योजक, `सनराईज कॅण्डल`चा विस्तार आणि स्वतःबरोबर अनेक दृष्टिहीन व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभं करून रोजगार देणारा हा अवलिया किती अडथळे पार करून आलाय हे जाणून घेण्यासाठी पुस्तक वाचायला हवंच. ​कुठलाही वशीला नाही की कोणाची सहानुभूती नाही, स्वबळावर विविध प्रयोग करत उद्योग यशस्वी करणं सोपं नाही. यात ज्या ज्या देवमाणसांनी हातभार लावला त्यांचा पण उल्लेख आहे, पण त्या देवमाणसांनी देखील कधीच उपकारिक भाषा न करता व स्वाभिमान न दुखावता कशी मदत करता येऊ शकते हे त्यांच्या कृतीतून दाखवून दिलंय. लेखक फक्त उद्योग उभारून थांबले नाहीत तर त्यांनी सामाजिक जाणीवेचं भान देखील ठेवलंय. महाबळेश्वरमध्ये सनराईज कॅण्डल नावाने त्यांनी भव्य असा उद्योग परिसर आणि म्युझियम सुरू केलंय, तेथे अनेक दृष्टिहीन व्यक्तींना रोजगार मिळाला आहे त्याचबरोबर सर्वजण स्वाभिमानाने कष्ट करून जगत आहेत. हजारो आयुष्य त्यांनी उजळून टाकली आहेत. दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार सह एकून 46 पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.विशेष म्हणजे सर्व पुरस्कार त्यांच्या योग्यतेनुसार दिले आहेत.. आणी अशा हजारो पुरस्कारांचे ते मानकरी आहेत असंच वाटत..त्यांच्या कामाची दखल रिलायन्स ग्रुप ने देखील घेतली आहे.व त्यांच्या पुस्तकास प्रस्तावना देखील नीता अंबानी यांनी दिली आहे.उद्योग करताना छोट्या छोट्या गोष्टी कसा प्रभाव करतात याच वर्णन देखील त्यांनी लिहिल आहे.. ​या कार्यात महत्त्वाचं योगदान त्यांच्या धर्मपत्नी नीता भाटिया यांनी दिलं आहे. दूरदृष्टी ठेवून आपल्या पतीस प्रोत्साहन देऊन, नवीन कल्पनेसह पाठिंबा देऊन त्यांना हुरूप देण्याचं काम त्यांनी केलंय. नीता भाटिया यांचं कर्तृत्व, त्यांचं पवित्र निस्वार्थी प्रेम या पुस्तकातून वाचताना आंतरिक वेगळी ऊर्जा मिळते. कलियुगातील देवी हा शब्द व मान त्यांना समर्पक वाटतो. पुस्तक सर्व वयोगटातील वाचक वाचू शकतात. मनाने खचलेल्या पण शरीराने धडधाकट असलेल्या प्रत्येक व्यक्तीने वरील पुस्तक नक्की वाचावं आणि आत्मसात करावं. एवढ्या उंचीवर असूनही जमिनीवर पाय असलेल व्यक्तिमत्व आहे. अगदी प्रेमळ पणे वागण बोलण सन्मान देण..ही दैवी देणगी त्यांच्या जवळ आहे. ...Read more

RAZOR SHARP
RAZOR SHARP by ASHWIN SANGHI Rating Star
सुनील माने, पुणे

लेखक अश्विन सांघी “द रोझाबल लाइन” या पहिल्याच कादंबरीने खूप लोकप्रिय झाला. प्राचीन भारतीय दंतकथा/ऐतिहासिक संदर्भ घेऊन त्याच्याभोवती आजच्या काळात रहस्यपूर्ण कथा लिहिणारा अश्विन. Chanakya’s Chant, The Krishna Key, The Sialkot Saga, Keepers of the Kalacakra, The Vault of Vishnu, The Magicians of Mazda अशा एकापेक्षा एक सुंदर रहस्य कादंबर्या “भारत सिरीज़” नावाने खूप प्रसिद्ध झाल्या. या सर्व कादंबऱ्या मी इंग्लिश मधेच वाचल्या. यांचा मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाउस यांच्याकडे उपलब्ध आहे. अश्विन सांघीने या भारत सिरीज शिवाय एक नवीन थ्रिल्लर सिरीज (कुत्ता कदम) सुरू केली आहे. त्यांतील पहिली कादंबरी Razor Sharp. एक सिरियल किलर मुंबईत एकानंतर एक खून पाडतोय. पोलिस चक्रावले आहेत. 1. रविवार दि २ फेब्रुवारी , गोरेगाव पश्चिममधे रवि मेहराचा खून होतो. त्याची बायको खुशी कॅाल सेंटरचा जॅाब करून रात्री ११.३० ला परत येते. खूप वेळा बेल वाजवून दार न उघडल्यामुळे ती उघडून आत येते तर रवि रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलेला असतो. त्याचे हात पाठीमागे नायलॅान दोरीने बांधलेले असतात. त्याच्या छातीत सुरा खुपसलेला असतो. त्याच्या तोंडात काहीतरी खाद्य पदार्थ असतो. 2. सोमवार दि १० फेब्रुवारी , लोअर परळमधे सुचंद्रा अग्रवालचा खून. तिची कामवाली आल्यावर दार न उघडल्यामुळे सोसायटीवाले दार तोडतात. आत सुचंद्राचा खून झालेला. हात नायलॅान दोरीने मागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात काहीतरी खाद्यपदार्थ. पोलिस चक्रावलेले. मग पोलिसखाते जागे होते. त्यांचा नावाजलेला अधिकारी जो सस्पेंड झालेला आहे, त्या प्रकाश कदम, DCP याला बोलावले जाते. राज्याचे गृहमंत्री ओंकार लोखंडे, त्यांचा माणूस कमिशनर चव्हाण आणि उपगृहमंत्री जयंत गायकवाड व त्यांचा माणूस SCP राणे, मुंबईचा डॅान भाऊ पाटील जो लोखंडेचाच माणूस असतो, हे सर्व या केसच्या मागावर लागतात. कदम हा राणेंच्या ओळखीचा खास ऑफिसर असतो म्हणून त्यालाही इन्व्हेस्टीगेशनला बोलावले जाते. 3. मंगळवार दि १८ फेब्रुवारी , ठाणे येथे मंगला शहाचा खून. तिच्या शेजारणीमुळे हे कळते. मंगलाचे हात नायलॅान दोरीने पाठीमागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात खाद्यपदार्थ. पोलिस अधिकारी शिंदे कदमबरोबर येतात. मंगलाच्या चेहऱ्याजवळ कदमला पेस्टिसाईडचा वास येतो. चेहरा निळसर झालेला. खून झाल्यावर बॅाडीला हलवलेले दिसते. तो ऑफिसमध्ये जुन्या खूनांचे फोटो तपासतो. त्यांचीही बॅाडी खून केल्यावर हलवलेली दिसते. चेहऱ्यावर निळसर झाक दिसते. तिन्ही खून “फिनेक” ब्रॅंडच्या चाकूने केलेले असतात. हे समान धागे कदम त्याची मुलगी केतुल बरोबर चर्चा करतो. केतुलची आई काही वर्षांपूर्वी कदमला सोडून गेलेली असते. ती भाऊ पाटीलची सावत्र बहीण असते. पण सध्या ती कुठे आहे व काय करते हे माहित नसते. केतुल कोर्टात काम करत असते तसेच ती “शक्ती” या NGO मधेही काम करते. शक्ती हे सोनापूरमधुन सुटका केलेल्या वेश्यांचे पुनर्वसन करत असते. निर्मल नावाचा तिचा मित्र एथिकल हॅकर असतो. तिच्यावर प्रेम करत असतो. कदमला हार्ट अटॅक येऊन गेलेला व स्टेंट बसवलेला असतो. Depression मुळे त्याची सायकॅालॅाजिस्टकडे ट्रिटमेंट चालू असते. कदमला या तिन्ही केसमधे आणखी एक धागा सापडतो. हे खून आठ दिवसांच्या अंतरावर झालेले असतात. म्हणजे पुढचा खून बुधवारी होणार असल्याचे तो राणे व शिंदेला सांगतो. 4. बुधवार दि २६ फेब्रुवारी, कांदिवली पश्चिम, लक्ष्मी बुधीराजाचा खून. तोच पॅटर्न. 5. गुरुवार दि ५ मार्च, खार पश्चिम, गुरुराज अदवानीचा खून सेम पॅटर्न. गुरूराज हा युट्युबवरचा प्रसिद्ध सिंगर असतो. 6. शुक्रवार दि १३ मार्च, ताडदेव, दिव्या शुक्रपाणीवर खूनी हल्ला होतो. पण ती जबर जखमी होते. ती फिटनेस ट्रेनर असल्यामुळे खुन्याबरोबर झटापट करते. पण चाकू पोटात घुसल्यामुळे ती जबर जखमी होते. हात बांधलेले असतानाही ती फोनवर “सिरी” ला तिच्या भावाला, ध्रुवला फोन लावायला सांगते. फोन लागतो व ती “हेल्प हेल्प” एव्हढेच बोलून बेशुद्ध होते. म्हणून खुनी पळून जातो. ध्रुव तिथे पोहोचून तिला हॅास्पिटलमधे ॲडमिट करतो. पोलिसांना तिथे खुन्याची बॅग सापडते. त्यांत नायलॅानची दोरी, बेगॅान स्प्रे व राजमाच्या बिया सापडतात. तिसऱ्या खुनाआधी पोलिस संशयित म्हणून राजू दाभाडेला अटक करतात. पण चौथ्या खूनाच्या वेळेस तो कस्टडीतच असतो. मग खूनी कोण? 7. शनिवार दि २१ मार्च, बान्द्रा पश्चिम, शनिया डिसौजाचा खून होतो. सेम मोडस ऑपरेंडी . 8. शनिवार दि २८ मार्च, चेंबूर, ७१ वर्षांच्या राहुल सिंह नावाच्या सिख व्यक्तिचा खून होतो. तीच पध्दत. यानंतर एक दिवस कदम KBC बघत असताना अमिताभ बच्चन एका सिनेमाचं गाणं लावून त्याचा पिक्चर ओळखायला सांगतात. ते गाणं असते- “सोमवार को हम मिले मंगलवार को नयन बुध को मेरी निंद खुली जुम्मेरात को चैन अरे शुक्र शनी कटे मुश्किलसे आज है इतवार सात दिनों में हो गया जैसे सात जनम का प्यार” आणि कदमच्या डोक्यात एकदम प्रकाश पडतो… अरे, हे सर्व खून असेच रविवार ते शनिवार एक एका वारी घडलेत! पण शनिवारी दोन खून कसे? याच्या मागे काही खगोलशास्त्र किंवा भविष्याचा तर संबंध नाही? कदमला आठवतं की शेजारी राहणारा डॉ. देसाईला पण भविष्य-खगोलशास्त्राची आवड व माहिती आहे. ( डॅाक्टर कडे सापडलेल्या नायलॅानचे रंगीत दोर व फिनेक कंपनीचा चाकू यामुळे एक संशयित म्हणून कदमने त्याला अटक करून पुछताछ केलेली असते) कदम लगेच डॅाक्टरांकडे जातो. त्यांची माफी मागून त्यांना या प्रश्नांत मदत करायला सांगतो. तो या सर्व खुनांचा सिक्वेन्स सांगतो. ते प्रत्येक वारी का घडले? मग शनिवारी दोन का? यापुढे कोणता वार? कुणाचा खून? डॅाक्टर सांगतात की भारतीय भविष्य व खगोल शास्त्रात नवग्रहांना खूप महत्व आहे. रवि, सोम(चंद्र), मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि, राहू आणि केतु. यांचे रंग व धान्य वेगवेगळे असतात. त्या त्या ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी ते वापरले जातात. कदम ही माहिती लिहून घेतो. त्यावरून प्रत्येक खुनात वापरण्यात आलेले फिनेक कंपनीचे चाकू, वेगवेगळ्या रंगांचे नायलॅान दोर व तोंडातील पदार्थ यांचा संबंध जोडून एक तख्ता तयार करतोः- “रवि मेहरा-रविवार-सोनेरी दोर- तोंडात गहू-दिशा पूर्व सुचंद्रा-सोमवार-चंदेरी दोर-तोंडात तांदूळ-दिशा पश्चिम मंगला शाह-मंगळवार-लाल दोर-तोंडात तूर डाळ- दिशा दक्षिण लक्ष्मी बुधीराजा-बुधवार-हिरवा दोर-तोंडात हिरवे मूग-दिशा उत्तर गुरुराज अदवानी-गुरूवार-पिवळा दोर-तोंडात हरबरा डाळ-दिशा उत्तर पूर्व(ईशान्य) दिव्या शुक्रपाणी-शुक्रवार-पांढरा दोर-राजमा-दिशा दक्षिण पूर्व शनिया डिसौजा-शनिवार-काळा दोर-तोंडात काळे तिळ-दिशा उत्तर पश्चिम राहुल सिंग-शनिवार-निळा दोर-तोंडात उडीद दाळ-दिशा दक्षिण पश्चिम” आता उरला एकच ग्रह-केतु. केतुचा वार मंगळवार. ग्रे रंग, चना दाळ, दिशा दक्षिण पश्चिम. “केतु”म्हणजे कदमची मुलगी केतुलचा नंबर लागणार? आज तर मंगळवारच आहे! कदम घाबरून जातो! तो केतुलला फोन करतो पण तो बंद लागतो. ती सध्या कुठे आहे? कोर्टात? कदम आपल्या मुलीला वाचवतो का? खरा खुनी कोण असतो? तो पकडला जातो का? त्याचे यामागचा उद्देश काय असतो? याच्यामध्ये अजून कोण सामिल असतं का? याची उत्तरे मिळण्यासाठी वाचावी लागेल अश्विन सांघी यांची कादंबरी Razor Sharp. ...Read more