* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: 26-11 MUMBAI ATTACKED
  • Availability : Available
  • Translators : PROF.MUKUND NATU
  • ISBN : 9788184982046
  • Edition : 2
  • Publishing Year : FEBRUARY 2011
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 232
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
INTERVIEW WITH LET`S REPRESENTATIVE, ABDULLAH MUNTAZIR, BY THE ONLY INDIAN JOURNALIST HARINDER BAWEJA INSIDE THE HEADQUARTERS OF JAMAAT-UD-DAWA, IN MURIDKE, PAKISTAN; WHERE AJMAL AMIR KASAB, THE LONE SURVIVING TERRORIST, WAS TRAINED FOR THE ATTACK.BRINGING TOGETHER THE CAREFUL RESEARCH AND ANALYSES OF RENOWNED JOURNALISTS AND POLICE OFFICIALS, 26/11 MUMBAI ATTACKED EXPLICATES THE REALITY BEHIND THE BRAZEN ATTACK ON INDIA`S SOVEREIGNTY IN NOVEMBER 2008 WHEN TEN HEAVILY ARMED TERRORISTS HELD AN ENTIRE CITY TO RANSOM BY THE SHEER FORCE OF THEIR ZEALOTRY. THE SCENE-BY-SCENE ACCOUNTS, INCISIVE ANALYSES, AND AN EXCLUSIVE INTERVIEW WITH A LET REPRESENTATIVE ALONG WITH A DESCRIPTION OF ITS TRAINING CAMP IN MURIDKE, PAKISTAN, REVEAL HOW THE FAILURE OF INDIAN INTELLIGENCE AGENCIES LANDED MUMBAI IN THE QUAGMIRE OF TERRORISM.PAYING HOMAGE TO THE BRAVE SECURITY OFFICERS WHO LOST THEIR LIVES FIGHTING THE TERRORISTS, 26/11 MUMBAI ATTACKED REITERATES THE CHILLING REALITY THAT INDIA IS UNDER GRAVE THREAT AND THE CLOCK IS TICKING BEFORE THE NEXT BIG ATTACK.
कराचीहून सागर मार्गाने आलेले दहशतवादी, साठ तास देशाच्या आर्थिक राजधानीत रक्तरंजित थैमान घालतात; त्याची ही प्रत्यक्षदर्शी कहाणी. परदेशी पर्यटक, श्रीमंत मंडळी यांची गर्दी असलेल्या कुलाब्यातील लिओपोल्ड कॅफे, ते हॉटेल ताज आणि हॉटेल ट्रायडेंट–ओबेरॉय पर्यंतच्या मुक्त संचारात नरिमन हाऊस आणि सीएसटी येथेही त्यांनी बेबंद नरसंहार केला. हे सर्व वाचताना दु:ख आणि वैफल्याने मन विषण्ण होते. परंतु या भीतिदायक काळातही सामान्य मुंबईकरांनी दाखवलेले धैर्य आणि विविध सुरक्षा दलांतील अधिकारी आणि जवानांनी दाखवलेली कर्तव्यनिष्ठा यांनी मन उचंबळून येते. ‘ये है बम्बई मेरी जान...’ या जुन्या गाण्याची आठवण येते. धडाडीचे कार्यक्षम सर्वोच्च पोलिस अधिकारी ‘ज्युलिओ रिबेरो’ यांनी देशाच्या ढिसाळ सुरक्षाव्यवस्थेची केलेली चिरफाड काळजी निर्माण करते. अर्थात ते यावर उपायही सुचवतात. पण ते अंमलात कसे येणार हा वेगळा प्रश्न आहे. ....असे हल्ले भारताला आणखी काही काळ तरी सोसावे लागणार आहेत, याची कारणमीमांसा ज्येष्ठ पत्रकार हरिंदर बावेजा यांनी केली आहे.

No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHY&TRUESTORIES #26-11 #MUMBAIATTACK #MUKUNDNATU #HARVINDERBAWEJA #TERRORISTATTACK
Customer Reviews
  • Rating Starदेव कामत

    कराचीहून सागर मार्गाने आलेले दहशतवादी, साठ तास देशाच्या आर्थिक राजधानीत रक्तरंजित थैमान घालतात; त्याची ही प्रत्यक्षदर्शी कहाणी. परदेशी पर्यटक, श्रीमंत मंडळी यांची गर्दी असलेल्या कुलाब्यातील लिओपोल्ड कॅफे, ते हॉटेल ताज आणि हॉटेल ट्रायडेंट–ओबेरॉय पर्यंच्या मुक्त संचारात नरिमन हाऊस आणि सीएसटी येथेही त्यांनी बेबंद नरसंहार केला. हे सर्व वाचताना दु:ख आणि वैफल्याने मन विषण्ण होते. परंतु या भीतिदायक काळातही सामान्य मुंबईकरांनी दाखवलेले धैर्य आणि विविध सुरक्षा दलांतील अधिकारी आणि जवानांनी दाखवलेली कर्तव्यनिष्ठा यांनी मन उचंबळून येते. ‘ये है बम्बई मेरी जान...’ या जुन्या गाण्याची आठवण येते. धडाडीचे कार्यक्षम सर्वोच्च पोलिस अधिकारी ‘ज्युलिओ रिबेरो’ यांनी देशाच्या ढिसाळ सुरक्षाव्यवस्थेची केलेली चिरफाड काळजी निर्माण करते. अर्थात ते यावर उपायही सुचवतात. पण ते अंमलात कसे येणार हा वेगळा प्रश्न आहे. ....असे हल्ले भारताला आणखी काही काळ तरी सोसावे लागणार आहेत, याची कारणमीमांसा ज्येष्ठ पत्रकार हरिंदर बावेजा यांनी केली आहे. २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस (बोरीबंदर स्टेशन), कामा हॉस्पिटल, द न्यू ताजमहाल हॉटेल, लिओपोल्ड कॅफे, ट्रायडंट हॉटेल, ओबेरॉय हॉटेल, नरिमन हाऊस वगैरे स्थळांवर दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी हल्ला चढवून अंदाधुंद गोळीबार केला, हाताँब फेकले. बऱ्याच निरपराध नागरिकांचा त्यात नाहक बळी गेला. लाल किल्ला आणि संसदभवन यावर पूर्वी झालेल्या अतिरेक्यांच्या हल्ल्यापेक्षा व्याप्ती आणि तीव्रता या बाबतीत मुंबईतील हा हल्ला अधिक मुंबईतील हा हल्ला अधिक प्राणघातक आणि भयावह होता. या हल्ल्याचे नियोजन अधिक काटेकोर होते. या हल्ल्यासाठी बत्तीस अतिरेक्यांना पाकिस्तानमध्ये वर्षभर प्रशिक्षण देण्यात आले होते आण त्यापैकी दहा जणांना कराचीहून समुद्र मार्गे पाठवण्यात आले. गुजरातमधील पोरबंदर येथे या अतिरेक्यांनी एमव्ही कुबेर ही मासेमारी बोट हस्तगत करून मुंबई गाठली. एका डिंगीतून मुंबईत गेट वे ऑफ इंडियावर उतरून आपल्या ५ टीम केल्या आणि वेगवेगळ्या पूर्व नियोजित ठिकाणी जाऊन बाँबस्फोट आणि गोळीबार करून साठ तास मुंबईला वेठीला धरले. प्रारंभी पोलिसांनी या अतिरेक्यांना तोंड दिले. कामा हॉस्पिटलजवळ हेमंत करकरे (एटीएस प्रमुख), अशोक कामठे, विजय साळस्कर वगैरे पोलीस अधिकारी जबरदस्त जखमी झाले. नंतर राष्ट्रीय सुरक्षा दलाचे जवान अतिरेक्यांशी मुकाबला करण्यासाठी पुढे आले. तीन दिवसात या दलाचे १८ जवान बळी पडले. दहा पैकी नऊ अतिरेक्यांना ठार मारण्यात आले. दहावा अतिरेकी कसाब याला जिवंत पकडण्यात आले. या हल्ल्याविषयी वेगवेगळ्या पत्रकारांना लिहायला सांगून, त्याचे संकलन करण्याचे महिला पत्रकार हरिंदर बावेजा यांनी ठरवले. ‘तहेलका’ या वृत्त–नियतकालिकाच्या न्यूज अँड इन्व्हेस्टिगेशन्स विभागाच्या त्या संपादिका आहेत. ‘कारगिल–एक अकथित कथा’ या त्यांच्या पुस्तकाचा चांगला बोलबाला झाला आहे. २६/११ मुंबईवरील हल्ला या पुस्तकात या हल्ल्यातील प्रमुख स्थळी घडलेल्या घटनांचे नाट्य शब्दांच्या माध्यमातून उभे करणाऱ्या लेखांचा समावेश आहे. त्या त्या स्थळी प्रत्यक्ष हल्ल्याच्या वेळी हजर असणारे आणि वृत्तांकन करणारे हे पत्रकार लेखक असल्याने, संबंधितांच्या मुलाखती घेऊन आपल्या समोर घडलेल्या घटनांच्या चित्रणात तपशीलवार भर घातलेली असल्याने हे पुस्तक विश्वासार्ह दस्ताऐवजाच्या दर्जाला पात्र झाले आहे. वृत्तवाहिन्यांना शोधक कंटेन्ट पुरवणाऱ्या ‘तहेलका’ या संस्थेद्वारे अनेक सनसनाटी प्रकरणांना वाचा फोडणारे आणि सध्या आजतक या वृत्तवाहिनीत कार्यरत असणारे पत्रकार आशिष खेतान यांचे या पुस्तकात हॉटेल ताजमधील अंधारयात्रा (४० पृष्ठे) हॉटेल ओबेरायमधील धुमश्चक्री (२० पृष्ठे), कराची ते मुंबई क्रौर्याचा प्रवास (५० पृष्ठे) असे तीन लेख आहेत. दृश्य एक, दृश्य दोन अशा नाट्यपूर्ण शैलीत त्यांनी विविध घटना शब्दबद्ध केल्या आहेत. दहशतवादी आणि सूत्रधार यांच्यातील महत्त्वाची संभाषणेही त्यात समाविष्ट केली आहेत. ताजमधील कर्मचाऱ्यांना शौर्याचीही साक्षेपाने नोंद केली आहे. ‘मार्कोसनी चेंबर्समधील सुमारे दोनशे जणांचे प्राण वाचवले’ (७१), ‘हॉटेलमध्ये खासदार असल्याचे कळल्यानंतर त्या खासदाराला ओलीस धरा किंवा ठार मारा असा आदेश या घटना टीव्हीवरून पाहणाऱ्या या हल्ल्याच्या पाकिस्तानमधील सूत्रधारांनी दिला.’ (६८) या सारखे तपशील या हल्ल्याचे गांभीर्य आणि संबंधित व्यक्तींचे मनोधैर्य प्रकट करतात. आशिष खेतान यांच्या या तीन लेखांनी पुस्तकाची निम्मी पृष्ठे व्यापलेली आहेत. कराची ते मुंबई प्रवासाचे तारीख - वेळेनुसार पुनर्रचित केलेले नाट्य अतिरेक्यांच्या चौकशी करणाऱ्या पोलिसांच्या मुलाखतीतून एटीएसच्या कार्यालयातील नोंदीवरून, आंतरराष्ट्रीय फोनवरील संभाषणातून, कसाबच्या कबुलीजबाबातून आपल्यापुढे उभे राहते. अतिरेक्यांनी वापरलेल्या बोटीचे तपशीलही त्यांनी एखाद्या बेस्टसेलर पाश्चात्य थ्रिलरच्या शैलीत दिले आहेत. सीएनएन-आयबीएनचे प्रमुख वार्ताहार जॉर्ज कोशी यांच्या लेखात बोरीबंदर स्थानकावरील हल्ल्याची हकीकत आली आहे. कसाब आणि इस्माईल हे अतिरेकी गोळ्यांचा वर्षाव करून प्रवाशांना मारत होते. तेथून ते चालत आझाद मैदानापर्यंत गेले. आलब्लेस हॉस्पिटलच्या मागाच्या दाराशी पोचले. दिसेल त्याच्यावर गोळ्या झाडत पुढे जात राहिले. मेट्रोजवळ त्यांनी पोलीस निरीक्षक साळसकर यांच्यावर गोळी झाडली. त्यांचे प्रेत गाडीतून बाहेर फेकून अतिरेकी पोलीस जीपमधून पळाले. इस्माइल ड्रायव्हिंग करीत होता. विधानभवनाकडे त्याने पोलीस जीप नेली. पोलिसांनी तिचा मागचा टायर गोळीने टिपला. गाडी वळवताना कलंडली इस्माईलने धाक दाखवून तेथे असणाऱ्या शरण यांच्या स्कोडा गाडीची किल्ली मिळवली. इस्माईलने ती चौपाटीकडे नेली. पोलिसांनी उभ्या असलेल्या अडथळ्याशी गाडी न थांबल्याने गोळ्या झाडल्या. ईस्माइल मेला एके-४७ घेतलेला कसाब मेल्याचे सोंग करून रस्त्यावर पडला. तुकाराम ओंबळेंनी कसाब हालचाल करतोय हे बघून त्याला मिठी मारली. कसाबने गोळ्या झाडल्या. इतरांनी कसाबला धरून ठेवले. कसाब जिवंत हाती लागला. सलाम... मुंबई (बाची करकेरिया), भयानक वास्तव (ज्युलिओ रिबेरो), दहशतवादाचे उगम स्थान (हरिंहर बावेजा) वगैरे लेखही मुंबईच्या नागरिकांच्या मनोधैर्यावर प्रकाश टाकतात. सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटीही लक्षात आणून देतात. मुंबई हल्ल्यावरच्या या पुस्तकाने अतिरेक्यांच्या कारवायांचा बंदोबस्त करण्यासाठी सुरक्षायंत्रणांची सिद्धता आणखी कडक हवी हे लक्षात येते. संबंधित यंत्रणांनी त्याबाबत आपल्या कार्यप्रणालीत सुधारणा करायला हवी. ...Read more

  • Rating StarDAINIK AIKYA 20-03-2011

    २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस (बोरीबंदर स्टेशन), कामा हॉस्पिटल, द न्यू ताजमहाल हॉटेल, लिओपोल्ड कॅफे, ट्रायडंट हॉटेल, ओबेरॉय हॉटेल, नरिमन हाऊस वगैरे स्थळांवर दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी हल्ला चढवून अंदाधुंद गोळीबार केला, हाताँब फेकले. बऱ्याच निरपराध नागरिकांचा त्यात नाहक बळी गेला. लाल किल्ला आणि संसदभवन यावर पूर्वी झालेल्या अतिरेक्यांच्या हल्ल्यापेक्षा व्याप्ती आणि तीव्रता या बाबतीत मुंबईतील हा हल्ला अधिक मुंबईतील हा हल्ला अधिक प्राणघातक आणि भयावह होता. या हल्ल्याचे नियोजन अधिक काटेकोर होते. या हल्ल्यासाठी बत्तीस अतिरेक्यांना पाकिस्तानमध्ये वर्षभर प्रशिक्षण देण्यात आले होते आण त्यापैकी दहा जणांना कराचीहून समुद्र मार्गे पाठवण्यात आले. गुजरातमधील पोरबंदर येथे या अतिरेक्यांनी एमव्ही कुबेर ही मासेमारी बोट हस्तगत करून मुंबई गाठली. एका डिंगीतून मुंबईत गेट वे ऑफ इंडियावर उतरून आपल्या ५ टीम केल्या आणि वेगवेगळ्या पूर्व नियोजित ठिकाणी जाऊन बाँबस्फोट आणि गोळीबार करून साठ तास मुंबईला वेठीला धरले. प्रारंभी पोलिसांनी या अतिरेक्यांना तोंड दिले. कामा हॉस्पिटलजवळ हेमंत करकरे (एटीएस प्रमुख), अशोक कामठे, विजय साळस्कर वगैरे पोलीस अधिकारी जबरदस्त जखमी झाले. नंतर राष्ट्रीय सुरक्षा दलाचे जवान अतिरेक्यांशी मुकाबला करण्यासाठी पुढे आले. तीन दिवसात या दलाचे १८ जवान बळी पडले. दहा पैकी नऊ अतिरेक्यांना ठार मारण्यात आले. दहावा अतिरेकी कसाब याला जिवंत पकडण्यात आले. या हल्ल्याविषयी वेगवेगळ्या पत्रकारांना लिहायला सांगून, त्याचे संकलन करण्याचे महिला पत्रकार हरिंदर बावेजा यांनी ठरवले. ‘तहेलका’ या वृत्त–नियतकालिकाच्या न्यूज अँड इन्व्हेस्टिगेशन्स विभागाच्या त्या संपादिका आहेत. ‘कारगिल–एक अकथित कथा’ या त्यांच्या पुस्तकाचा चांगला बोलबाला झाला आहे. २६/११ मुंबईवरील हल्ला या पुस्तकात या हल्ल्यातील प्रमुख स्थळी घडलेल्या घटनांचे नाट्य शब्दांच्या माध्यमातून उभे करणाऱ्या लेखांचा समावेश आहे. त्या त्या स्थळी प्रत्यक्ष हल्ल्याच्या वेळी हजर असणारे आणि वृत्तांकन करणारे हे पत्रकार लेखक असल्याने, संबंधितांच्या मुलाखती घेऊन आपल्या समोर घडलेल्या घटनांच्या चित्रणात तपशीलवार भर घातलेली असल्याने हे पुस्तक विश्वासार्ह दस्ताऐवजाच्या दर्जाला पात्र झाले आहे. वृत्तवाहिन्यांना शोधक कंटेन्ट पुरवणाऱ्या ‘तहेलका’ या संस्थेद्वारे अनेक सनसनाटी प्रकरणांना वाचा फोडणारे आणि सध्या आजतक या वृत्तवाहिनीत कार्यरत असणारे पत्रकार आशिष खेतान यांचे या पुस्तकात हॉटेल ताजमधील अंधारयात्रा (४० पृष्ठे) हॉटेल ओबेरायमधील धुमश्चक्री (२० पृष्ठे), कराची ते मुंबई क्रौर्याचा प्रवास (५० पृष्ठे) असे तीन लेख आहेत. दृश्य एक, दृश्य दोन अशा नाट्यपूर्ण शैलीत त्यांनी विविध घटना शब्दबद्ध केल्या आहेत. दहशतवादी आणि सूत्रधार यांच्यातील महत्त्वाची संभाषणेही त्यात समाविष्ट केली आहेत. ताजमधील कर्मचाऱ्यांना शौर्याचीही साक्षेपाने नोंद केली आहे. ‘मार्कोसनी चेंबर्समधील सुमारे दोनशे जणांचे प्राण वाचवले’ (७१), ‘हॉटेलमध्ये खासदार असल्याचे कळल्यानंतर त्या खासदाराला ओलीस धरा किंवा ठार मारा असा आदेश या घटना टीव्हीवरून पाहणाऱ्या या हल्ल्याच्या पाकिस्तानमधील सूत्रधारांनी दिला.’ (६८) या सारखे तपशील या हल्ल्याचे गांभीर्य आणि संबंधित व्यक्तींचे मनोधैर्य प्रकट करतात. आशिष खेतान यांच्या या तीन लेखांनी पुस्तकाची निम्मी पृष्ठे व्यापलेली आहेत. कराची ते मुंबई प्रवासाचे तारीख - वेळेनुसार पुनर्रचित केलेले नाट्य अतिरेक्यांच्या चौकशी करणाऱ्या पोलिसांच्या मुलाखतीतून एटीएसच्या कार्यालयातील नोंदीवरून, आंतरराष्ट्रीय फोनवरील संभाषणातून, कसाबच्या कबुलीजबाबातून आपल्यापुढे उभे राहते. अतिरेक्यांनी वापरलेल्या बोटीचे तपशीलही त्यांनी एखाद्या बेस्टसेलर पाश्चात्य थ्रिलरच्या शैलीत दिले आहेत. सीएनएन-आयबीएनचे प्रमुख वार्ताहार जॉर्ज कोशी यांच्या लेखात बोरीबंदर स्थानकावरील हल्ल्याची हकीकत आली आहे. कसाब आणि इस्माईल हे अतिरेकी गोळ्यांचा वर्षाव करून प्रवाशांना मारत होते. तेथून ते चालत आझाद मैदानापर्यंत गेले. आलब्लेस हॉस्पिटलच्या मागाच्या दाराशी पोचले. दिसेल त्याच्यावर गोळ्या झाडत पुढे जात राहिले. मेट्रोजवळ त्यांनी पोलीस निरीक्षक साळसकर यांच्यावर गोळी झाडली. त्यांचे प्रेत गाडीतून बाहेर फेकून अतिरेकी पोलीस जीपमधून पळाले. इस्माइल ड्रायव्हिंग करीत होता. विधानभवनाकडे त्याने पोलीस जीप नेली. पोलिसांनी तिचा मागचा टायर गोळीने टिपला. गाडी वळवताना कलंडली इस्माईलने धाक दाखवून तेथे असणाऱ्या शरण यांच्या स्कोडा गाडीची किल्ली मिळवली. इस्माईलने ती चौपाटीकडे नेली. पोलिसांनी उभ्या असलेल्या अडथळ्याशी गाडी न थांबल्याने गोळ्या झाडल्या. ईस्माइल मेला एके-४७ घेतलेला कसाब मेल्याचे सोंग करून रस्त्यावर पडला. तुकाराम ओंबळेंनी कसाब हालचाल करतोय हे बघून त्याला मिठी मारली. कसाबने गोळ्या झाडल्या. इतरांनी कसाबला धरून ठेवले. कसाब जिवंत हाती लागला. सलाम... मुंबई (बाची करकेरिया), भयानक वास्तव (ज्युलिओ रिबेरो), दहशतवादाचे उगम स्थान (हरिंहर बावेजा) वगैरे लेखही मुंबईच्या नागरिकांच्या मनोधैर्यावर प्रकाश टाकतात. सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटीही लक्षात आणून देतात. मुंबई हल्ल्यावरच्या या पुस्तकाने अतिरेक्यांच्या कारवायांचा बंदोबस्त करण्यासाठी सुरक्षायंत्रणांची सिद्धता आणखी कडक हवी हे लक्षात येते. संबंधित यंत्रणांनी त्याबाबत आपल्या कार्यप्रणालीत सुधारणा करायला हवी. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

A-AMITABHCHA
A-AMITABHCHA by G.B. DESHMUKH Rating Star
प्रा. डॉ . वैशाली रवी देशमुख, अमरावती

वाचनाचे फायदे सांगताना प्रसिद्ध इंग्रजी लेखक फ्रान्सिस बेकन म्हणतो `रीडिंग मेकेथ अ फुल मॅन`. वाचनामुळे माणूस परिपूर्ण होतो. क्वचित एखादं असं पुस्तक हाती येतं जे वाचल्यानंतर ह्या परिपूर्णतेची , आत्यंतिक समाधानाची जाणीव होते . नुकतंच जी. बी. देशुख यांचं `अ- अमिताभचा` हे पुस्तक हाती पडलं एका बैठकीत ते वाचून संपवलं आणि काहीतरी माहितीपर तरीही दर्जेदार आणि साहित्यिक मूल्य असणारं पुस्तक वाचण्याचा आनंद प्राप्त झाला. सीमा आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात काम करून निवृत्त झालेल्या जीबी देशमुखांनी २०२० मध्ये अमिताभ बच्चनच्या कारकिर्दीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त त्यांच्या विविध ५० सिनेमातील भूमिकांचे विश्लेषण करणारे साप्ताहिक सदर दैनिक सकाळ मध्ये प्रकाशित केले. कोरोना काळात लिहिलेल्या या लेखमालेला त्यावेळी प्रचंड प्रतिसाद मिळाला. केवळ ज्येष्ठच नाही तर तरुण वाचकांनीही या लेखमालिकेला पसंतीची पावती दिली. २०२२ मध्ये मेहता पब्लिकेशनने अमिताभ बच्चनच्या एकूण ६२ सिनेमांवर आधारित लेख `अ अमिताभचा` या पुस्तक रूपाने प्रकाशित केले. १९६९ पासून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीला पाच दशकांपेक्षा अधिक काळ लोटला तरीही त्याचे सिनेरसिकांच्या भावविश्वावर असलेले अधिराज्य कायम आहे. ती जादू कमी ओसरण्याचं नावच घेत नाही तर ती दिवसेंदिवस वाढत आहे . किरकोळ शरीरयष्टी, भरमसाठ उंची आणि सौंदर्याच्या साचेबंद व्याख्येत न बसणारा चेहरा असलेला अमिताभ आणि त्याला मिळालेली अफाट लोकप्रियता याची सांगड घालणे सर्वसामान्य व्यक्तीच्या आकलनापलीकडचे आहे. अमिताभ बच्चनचे प्रचंड चाहते असलेले जी . बी देशमुख यांच्यासाठी `अ` हा अमिताभचाच आहे. परंतु केवळ एक चाहते म्हणून त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं नाही तर अमिताभ बच्चनचे जे गारुड कित्येक दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर आहे त्यामागची नेमकी कारणे कोणती असू शकतात हे अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने शोधण्याचा प्रयत्न त्यांनी या पुस्तकात केलेला आहे. एक रसिक, चोखंदळ प्रेक्षक, अभ्यासक आणि समीक्षक म्हणून या पुस्तकात लेखक आपल्या समोर येतात. `बेमिसाल` पासून `झुंड` या चित्रपटा पर्यंत अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीतील उत्तमोत्तम ६२ सिनेमांचा लेखकांनी या पुस्तकात परामर्ष घेतलेला आहे. या चित्रपटांमधील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित सर्व बाबींचे अत्यंत अभ्यास पूर्वक रसग्रहण केलेले आहे. `अमिताभ बच्चन चांगला कलाकार आहे` किंवा `अमुक अमुक चित्रपट चांगला आहे` असं जेव्हा एखादा सर्वसामान्य प्रेक्षक म्हणतो त्यावेळेस हे आवडणं किंवा चांगलं असणं नेमकं का आहे याची उत्तरं देण्याचा प्रयत्न लेखकाने प्रत्येक लेखात केलेला आहे. प्रत्येक चित्रपटातील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित हायलाइट्स जसे की, एखादा उत्कट प्रसंग, गाणे, नृत्य, मारामारीचे दृश्य यावर लेखकाने प्रकाश टाकलेला आहे. आपण जर तो चित्रपट पाहिला असेल तर लेखकाने वर्णन केलेले प्रसंग जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहतात आणि बघितला नसेल तर तो चित्रपट आपण पाहिलाच पाहिजे अशी तीव्र इच्छा मनात निर्माण होते. उदाहरणार्थ, शोले या चित्रपटातील रसग्रहणात ,चेहऱ्यावरचे रेषाही ढळू न देता अमिताभने फेकलेले वन लाइनर्स, बुद्धीची चमक दाखवणारे शांतपणे केलेले विनोद, हळुवार प्रेमासाठी त्याचं आतल्या आत झुरणं , मित्राच्या मांडीवर प्राणत्यागाचे उत्कट दृश्य, आणि पिढ्यानपिढ्या लक्षात राहिलेला मावशी लीला मिश्रा सोबतचा विनोदी संवाद यांचे परिणामकारक वर्णन करून त्यांनी अमिताभची उत्तुंग अभिनय क्षमता उलगडून दाखवली आहे. या पुस्तकाला वाचनीय बनवणारा एक घटक म्हणजे लेखकाने वापरलेली भाषा. अत्यंत साध्या, सोप्या आणि अनुभवातून आलेल्या शब्दातून लेखकाने अमिताभ बच्चन भूमिकांचा उत्तरोत्तर चढत जाणारा आलेख शब्दांकित केला आहे. लेखकाच्या भाषा प्रभुत्वाचे साक्ष देणारी अनेक वाक्य पुस्तकांमध्ये जागजागी आढळतात. एका ठिकाणी ते लिहितात, `अमिताभने सिनेमातील विनोदाची सूत्र हाती घेतली तेव्हापासून विनोदी कलाकारांवर जणू बेकारीचं संकट कोसळलं होतं. प्रेक्षकांना दिलेल्या मनोरंजनाच्या वचनाशी `नमक हलाली` करणाऱ्या प्रकाश मेहरा आणि अमिताभ या जोडीने प्रेक्षकांना `और हम नाचे बिन घुंगरू के` असा आनंद दिला होता. असेच एक सुंदर वाक्य- `अमिताभचा उंट मनोरंजनाचा अख्खा तंबू व्यापून बसला होता`. लेखकाच्या ओघवत्या आणि मनाला भिडणाऱ्या भाषा शैलीचं एक उदाहरण मिली चित्रपटाच्या रसग्रहणातील या परिषदेतून दिसून येत: "शेखरच्या मनावर चढलेली उदासीची पुटं अमिताभच्या कसदार अभिनयामुळे आपल्याला अस्वस्थ,उदास करून सोडतात. दारूच्या नशेतील अमिताभचं एक दृश्य मस्त जमलं होतं . मोबाईल, टीव्ही इत्यादी आधुनिक साधनं व्यवहारात येण्याच्या आधीचा तो काळ होता. मिली आजारामुळे घरात बंदिस्त झाल्यानंतर त्या दोघात नोकराच्या माध्यमातून जो पत्र व्यवहार होतो तो आजच्या मोबाईल चॅटिंग पेक्षाही प्रभावी वाटतो. रोज मिलीला वरच्या मजल्यावरून खालच्या मजल्यावर गुलदस्ता पाठवणारा अमिताभ एका चिठ्ठीत लिहितो `जो गुलदस्ता बनके खुद आ जाऊ तो कहा रखुं . ` हे रोमँटिसिझम खूप वरच्या स्तराचं होतं. अमर्याद दुःखाची वीण घट्ट करत जाताना किशोर कुमारच्या दर्दभऱ्या स्वरात `बडी सुनी, सुनी है जिंदगी ये जिंदगी` आणि `आये तुम याद मुझे गाने लगी हर धडकन` ही दोन गाणी वातावरण औदासिन्यानं भरून टाकतात. मनाचा चांगला पण लहानपणी आई वडिलांच्या बाबतीत घडलेल्या घटनेने आणि लोकांनी त्याकरिता डिवचल्यानं कच खाल्लेला, प्रेमाची आस लागलेला एक तरुण अमिताभने लाजवाब रंगवला होता. या पुस्तकाच्या रंजकतेत भर टाकणारा आणखी एक घटक म्हणजे लेखकाचे आत्मचरित्रात्मक निवेदन. प्रत्येक चित्रपटाच्या बाबतीत तो चित्रपट त्यांनी केव्हा पाहिला, कुणाबरोबर पाहिला,त्यावेळी ते किती वर्षांचे होते आणि त्या चित्रपटाचा त्यांच्या भावविश्वावर कसा परिणाम झाला याचा उल्लेख जागजागी केलेला आहे. लेखकाच्या पिढीतील वाचकांना यातून पुनः प्रत्ययाचा आनंद मिळतो. आणि आजच्या पिढीतील इतर वाचकांसाठीही ही बाब रंजक ठरते. पुस्तकाच्या मलपृष्ठावर लेखक म्हणतात, `1973 साली आम्ही पाचवीत असताना आम्हाला प्रथमच हिंदी सिनेमातील नायकाची `ये पोलीस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नही`, अशी आगळीवेगळी मिजास पडद्यावर बघायला मिळाली आणि आता निवृत्तीला आलो तर हाच अद्भुत माणूस आम्हाला `पिंक` या महिलाप्रधान सिनेमात `ना का मतलब सिर्फ ना होता है`, असं ठणकावतो, `बदला` ह्या रहस्यपटात तितक्याच जोरकसपणे `सबका सच अलग अलग होता है ,` असं तत्वज्ञान मांडतो आणि अगदी अलीकडच्या `झुंड` मध्ये झोपडपट्टीतील धटिंगण मुलांच्या घोळक्याला `झुंड नाही, टीम... `म्हणायची शिकवण देतो तेव्हा आजही त्याचं म्हणणं आमच्या हृदयात थेट उतरतं .` पुस्तक वाचत असताना लेखकाच्या अफाट निरीक्षणशक्तीचे आणि अभ्यासू वृत्तीचे दर्शन घडते . विविध दिग्दर्शकांनी अमिताभच्या अभिनयक्षमतेचा केलेला वापर , अमिताभच्या डोळ्यातून सशक्तपणे व्यक्त झालेले हृदयस्पर्शी भाव, वेगवेगळ्या चित्रपटात त्याने केलेला लाथेचा उपयोग, त्याची वैशिष्ट्यपूर्ण नृत्य, आणि भारदस्त आवाजातील संवाद आणि गाणी यांचं वर्णन वाचत असताना लेखकाची संशोधक वृत्ती तर जाणवतेच परंतु आपणही हे चित्रपट पाहून हा रसास्वाद घ्यायलाच हवा ही इच्छा वाचकांच्या मनात प्रकर्षाने निर्माण होते.यातच या पुस्तकाचे फार मोठे यश सामावले आहे हे नक्की! ...Read more

SAAD GHALATO KALAHARI
SAAD GHALATO KALAHARI by MARK & DELIA OWENS Rating Star
मोहन देशपांडे नागपुर

cry of kalahari ह्या पुस्तके अनुवाद हिंदी सर्वोत्तम (RD) मध्ये कित्येक वर्षापूर्वी वाचले होते. माझ्याजवळ, जपून ठेवलेल्या पुस्तकामधे ते पुस्तक गहाळ झाले. मग 4 वर्षापूर्वी हे पुस्तक मिळाले व विकत घेतले. ते अनेक वेळा वाचून काढले, तरी प्रत्येकवेळी वेगळा नंद होतो. ती तुमची रसाळ भाषेची किमया. ह्या मुळेच Deceiption valley एकदा तरी बघता यावी ही इच्छा तुमचे अभिनंदन व धन्यवाद... ...Read more