* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: MY NAME IS SALMA
  • Availability : Available
  • Translators : SNEHAL JOSHI
  • ISBN : 9788184980370
  • Edition : 2
  • Publishing Year : AUGUST 2009
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 243
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
Quantity
Buying Options:
  • Print Books:
AS CONTEMPORARY AS TODAY`S HEADLINES, AS TIMELESS AS LOVE AND HATE - A YOUNG MUSLIM ASYLUM-SEEKER IN ENGLAND RUNS FROM A BROTHER WHO WANTS TO KILL HER TO SAVE THE FAMILY`S HONOUR WHEN SALMA BECOMES PREGNANT BEFORE MARRIAGE IN HER SMALL VILLAGE IN THE LEVANT, HER INNOCENT DAYS SWIMMING IN THE SPRING ARE GONE FOR EVER. SHE IS SWEPT INTO PRISON FOR HER OWN PROTECTION. TO THE SOUND OF HER SCREAMS, HER NEWBORN BABY DAUGHTER IS SNATCHED AWAY. IN THE MIDDLE OF THE MOST ENGLISH OF TOWNS, EXETER, SHE LEARNS GOOD MANNERS FROM HER LANDLADY, AND SETTLES DOWN WITH AN ENGLISHMAN. BUT DEEP IN HER HEART THE CRIES OF HER BABY DAUGHTER STILL ECHO. WHEN SHE CAN BEAR THEM NO LONGER, SHE GOES BACK TO HER VILLAGE TO FIND HER. IT IS A JOURNEY THAT WILL CHANGE EVERYTHING - AND NOTHING. SLIPPING BETWEEN THE OLIVE GROVES OF THE LEVANT AND THE RAIN-SLICKED PAVEMENTS OF EXETER, MY NAME IS SALMA IS A SEARING PORTRAYAL OF A WOMAN`S COURAGE IN TH_. FACE OF INSURMOUNTABLE ODDS.
आजच्या समकालीन वृतपत्रांच्या मथळ्यांसारखे, काळाचे बंधन नसलेल्या प्रेम आणि द्वेष ह्या भावनांसारखे... घराण्याचा मान आणि इभ्रतीसाठी तिला ठार मारायला निघालेल्या भावाच्या तावडीतून सुटून एक तरुण मुलगी इंग्लंडच्या आश्रयाला येते. जेव्हा सल्मा लग्नाआधी गरोदर राहते, त्या वेळी लेव्हांटमधील तिच्या त्या छोट्याशा खेड्यातील तिचं निर्व्याज आयुष्य, ओढ्यात पोहणं सारं कायमचं संपतं. तिच्या संरक्षणासाठी तिला तुरुंगात टाकलं जातं. ती किंचाळत असताना तिची नवीन जन्मलेली मुलगी तिच्यापासून हिरावून घेतली जाते. इंग्लिश शहरांच्या मध्यभागी असलेल्या एक्स्टर ह्या भागात ती येते. आपल्या घरमालकिणीकडून ती वागण्याबोलण्याच्या रितीभाती शिकते आणि नंतर एका इंग्लिश माणसाशी लग्न करून स्थिरस्थावर होते; परंतु तिच्या हृदयात खोलवर तिच्या छोट्या मुलीचं रडणं अजूनही घुमत असतं. जेव्हा हे सर्व सहन करणं तिला अशक्य होतं, तेव्हा ती तिला शोधण्यासाठी आपल्या खेड्यात परत जाते. हा प्रवास सर्वच बदलून टाकील... की काहीही होणार नाही. लेव्हांटच्या ऑलिव्हच्या झाडीतून आणि एक्स्टरमधील पावसानं भिजलेल्या फरसबंदीवरील एकूण हा प्रवास... पुढे येणा-या अनुल्लंघनीय अशा अडथळ्यांशी झुंजणा-या स्त्रीच्या असामान्य धैर्याचं ‘माय नेम इज सल्मा’ हे ज्वलंत शब्दचित्र आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES #FADIYAFAKIR #SNEHALJOSHI #MYNAMEISSALMA
Customer Reviews
  • Rating StarDAINIK NAVSHAKTI 25 -10 -2009

    दैनिक नवशक्ती २५.१०.२००९ अलीकडच्या काळात विविध भाषांतील साहित्य मराठीत मोठ्या प्रमाणावर अनुवादित झालं आहे. त्यातही इंग्रजीतील साहित्याचा वाटा मोठा आहे. मेहता पब्लिशिंग हाऊसने इंग्रजीतील गाजलेल्या, कादंबऱ्यांचा अनुवाद प्रकाशित करून मराठी वाचकांसाठी सहित्याचा मोठा खजिनाच उपलब्ध करून दिला आहे. प्रत्येक भाषेचं, त्या प्राताचं, तेथील लोकजीवनाचं आगळं सौंदर्य असतं. अनुवादित साहित्यामुळे रसिकांना या सौंदर्याचा मनमुराद आस्वाद घेता येतो. अलीकडच्या काळात इंग्रजीतील अनेक गाजलेली पुस्तकं अनुवादित झाली. त्यामुळे मराठी वाचकांसाठी मोठा नजराणाच लाभला आहे. अलीकडेच मेहता पब्लिशिंग हाऊसने अशीच काही उत्तमोत्तम अनुवादित पुस्तकं बाजारात आणून या खजिन्यात भर घातली आहे. ‘माय नेम इज सल्मा’ ही एका स्त्रीच्या आयुष्याची ही कहाणी अंतर्मुख करणारी आहे. फादिया फकीर लिखित या पुस्तकाचा अनुवाद स्नेहल जोशी यांनी केला आहे. विवाहापूर्वी गर्भवती राहिलेल्या सल्मा नावाच्या तरुणीची ही करुण कहाणी आहे. खेड्यात राहणाऱ्या सल्माचं आयुष्य एखाद्या खळाळत्या झऱ्यासारखं निव्र्याज, निखळ आहे. पण एका प्रसंगाने तिचं आयुष्य बदलतं. सल्मा एका बाळाला जन्म देते. ती किंचाळत, ओरडत असताना तिची नवजात मुलगी तिच्यापासून हिरावून घेतली जाते. घराण्याची इभ्रत, इज्जत अबाधित राखण्यासाठी सल्माचा भाऊ तिला ठार मारायला निघतो. भावाच्या तावडीतून सुटून सल्मा थेट इंग्लंड गाठते. इंग्लंडमध्ये एक्सटर भागात राहात असताना आपल्या घरमालकिणीकडून ती वागण्याबोलण्याच्या रीतीभाती शिकते आणि पुढे एका इंग्रज माणसाशी लग्न करून स्थिरस्थावर होते. तथापि, तिच्या हृदयात आपल्या मुलीचं रडणं खोलवर रुजलेलं असतं. सल्मामधील आईला ते सतत साद घालत असतं. आपल्या मुलीचा शोध घेण्याचा ती प्रयत्न करते. त्यामध्ये ती यशस्वी होते का? तिची मुलगी तिला भेटते का? या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी माय नेम इज सल्मा वाचायला हवं. २४० पृष्ठसंख्या असणाNया या पुस्तकाची किंमत २०० रुपये आहे. ‘माय नेम इज सल्मा’ ही फादिया यांची तिसरी कादंबरी असून आतापर्यंत ती सोळा राष्ट्रांमध्ये प्रकाशित झाली तर १३ भाषांमध्ये तिचे अनुवाद झाले. लेखिकेची शैली कायम ठेवत स्नेहल जोशी यांनी तिचा मराठी अनुवाद केला आहे. मुखपृष्ठाच्या मांडणीपासूनच हे पुस्तक वाचकाला खिळवून ठेवतं. ...Read more

  • Rating StarTARUN BHARAT AKSHARYATRA 1-08-2010

    सुखाच्या संधीतही दु:स्वप्नात गुरफटलेली माता डॉ. शैलजा यादवाड प्रेमाला असलेली मनाई, त्यातून प्रतिष्ठेला गेलेला तडा आणि त्यासाठी हद्दपार केलेल्या मुलीचा वनवास म्हणजेच ‘‘माय नेम इज सल्मा...’’ ही कादंबरी. फादिया फकीर यांनी ही कादंबरी लिहिली आहे. स्वतं्र वृत्तीच्या अभ्यासक व मानवी हक्कांच्या रक्षणकत्र्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फादिया फकीर एक जॉर्डेनियन ब्रिटिश लेखिका आहेत. १९९० साली प्रकाशित झालेल्या ‘निसानित’ या त्यांच्या पहिल्या कादंबरीचा अरेबिक भाषेत अनुवाद झाला आहे. १९९६ साली प्रकाशित झालेल्या ‘‘पिलर्स ऑफ सॉल्ट’’ या त्यांच्या दुसऱ्या कादंबरीचा जर्मन, डच आणि डॅनिश या भाषांमध्ये अनुवाद झाला आहे. त्यांनी काही लघुकथा आणि नाटकेही लिहिली आहेत. फादिया फकीर यांची ही तिसरी कादंबरी. एकूण सोळा राष्ट्रांमध्ये प्रकाशित झाली असून या कादंबरीचा तेरा भाषांमध्ये अनुवाद झाला आहे. गार्नेट प्रकाशन संस्थेकडून प्रकाशित होणाऱ्या ‘अरब विमेन रायटर्स’ मालिकेच्या त्या ज्येष्ठ संपादिका होत्या. त्या कार्याबद्दल त्यांना १९९५ मध्ये ‘न्यू व्हेंचर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जेव्हा सल्मा लग्नाआधी गरोदर राहते, त्यावेळी छोट्याशा खेड्यातलं तिचं निव्र्याज आयुष्य कायमचं संपतं. ती किंचाळत असताना तिची नवजात मुलगी तिच्यापासून हिरावून घेतली जाते. घराण्याचा मान आणि इभ्रतीसाठी ठार मारायला निघालेल्या भावाच्या तावडीतून सुटून सल्मा इंग्लंडच्या आश्रयाला येते. इंग्लंडमध्ये एक्स्टर भागात राहताना आपल्या घरमालकिणीकडून ती वागण्याबोलण्याच्या रीतीभाती शिकते आणि नंतर एका इंग्लिश माणसाशी लग्न करून स्थिरस्थावर होते. परंतु तिच्या हृदयात खोलवर तिच्या छोट्या मुलीचं रडणं अजूनही घुमत असतं. सल्माचा हा सर्व प्रवास अत्यंत खडतर आहे. अनेक टक्केटोणपे खात ती थोडी स्थिर होण्याचा प्रयत्न करते आहे. परंतु दु:खद भूतकाळ शेवटपर्यंत तिचा पिच्छा सोडत नाही. स्वत:ला एक मुलगा झाला तरी दुरावलेल्या मुलीला ती विसरू शकत नाही. कादंबरीचे कथानक भूतकाळ आणि वर्तमानकाळ या दोन्हीतून समांतर पुढे सरकते आहे. एक-दोन परिच्छेद भूतकाळातील नंतर पुन्हा एक दोन परिच्छेद वर्तमानातील त्यामुळे सुरुवातीला कथानकामध्ये थोडा विस्कळीतपणा जाणवतो. भाषाही थोडी रटाळच वाटते. चटकन मनाची पकड घेणारी नाही वाटत. मात्र तिचे दु:ख नायिकेचे, अंत:करणाला भिडणारे आहे. आत्मकथनात्मक शैलीचा उपयोग केला गेला आहे. नायिका सल्मा एक मेंढपाळीण. वर्षा ऋतूत हिमा खेड्यात उंट, घोडे, गाई, कुत्री, मांजरं यांच्या बरोबर फुलपाखरं आणि मधमाशांचीही झुंबड उडायची. वसंत ऋतू म्हणजे साखरपुड्यांचा हंगाम. लग्न मात्र पिकं हातात आल्यावरच. अशाच लग्नाळू तरुणींच्या तांड्यातील एक सल्मा. हमदान तिचा प्रियकर. लग्नासाठीच आलेले गरोदरपण. गर्भ पाडण्यासाठी झालेला प्रयत्नही विफलच. त्यामुळे ओढावलेला गाव सोडायचा. प्रसंग जीव वाचवण्यासाठी हे सर्व अपरिहार्यच होते. स्वत:च्या संरक्षणासाठी सल्माला हिमा खेड्यानजीकच्या इस्लाह तुरुंगाचा आधार घ्यावा लागतो आणि सुरू होते तिच्या आयुष्याची परवड. मुलीला जन्म दिल्यानंतर तुरुंगाचा त्याग. बरोबर फक्त आईचं पत्र आणि मुलीच्या लैलाच्या केसांचा झुबका घेऊन पुढील वाटचाल सुरु. एक दिवस बातमी येते की सल्माचा भाऊ महमूद तिचा शोध घेत आहे. तिला मारण्यासाठी, त्यामुळे स्वत:चा जीव वाचविण्यासाठी सिस्टर अ‍ॅशरबरोबर तिचे ब्रिटनला प्रयाण. सल्मा इब्राहिमचे सॅली अ‍ॅशरमध्ये रूपांतर. इंग्लंडच्या एक्स्टर भागात लिझकडे राहायला आल्यानंतर पुन्हा सर्वांची नव्याने सुरुवात. अनेक अडचणी, अगदी भाषेपासून ते जात पात यापर्यंत. उपजीविकेसाठी उपसलेले काबाडकष्ट. जॉनशी झालेली ओळख व नंतर ओळखीचे विवाहात रूपांतर. जॉनच्या मिठीत सल्मा सर्व विसरण्याचा, विस्मृतीत जाण्याचा आणि नवीन बीजाला शोधण्याचा प्रयत्न करत राहिली. इम्रानचा जन्म झाला. जॉनने तिच्यासाठी मुस्लीम धर्म स्वीकारला. परंतु सल्मा खरोखरच सुखी झाली? ती आपला भूतकाळ विसरली? पहिले प्रेम आणि लग्नाआधी जन्म दिलेल्या मुलीला विसरू शकली? कधीच नाही. तिला सतत वाटत राहायचं. आपली मुलगी संकटात आहे. तिला शोधले पाहिजे. तिची मदत केली पाहिजे. परंतु ते आता कधी शक्य होणार नव्हते. कारण लैलाच्या उनाड मामाने महमूदने तिला लाँगवेलमध्ये फेकले होते. जशी आई तशी मुलगी असे तो म्हणाला होता. तिच्या वडिलांनी आणि तिचे अवशेष जमातीच्या इच्छेविरुद्ध दफनभूमीत पुरले होते. शेवटपर्यंत सल्मा द्विधा मन:स्थितीत जगत राहिली, तिचे मन तिला म्हणत राही, ‘ह्या दु:स्वप्नामुळे तू आपल्या सर्वांच्या आयुष्याचा नाश करत आहेस. तुला सुखाची संधी मिळाली आहे आणि तू काय करतेस? तू ते सर्व दूर सारत आहेस.’ हे सर्व तिला कळत होते पण वळत नव्हते. एकच कल्पनेने रंगवलेले चित्र सतत तिच्या म:पटलावर कोरले गेले होते. ते म्हणजे ‘एका रात्री एका माणसाला त्यानं एखादी गोष्ट करू नये म्हणून विनवत होती. तो तरुण मनुष्य म्हणत होता, ते त्याचं कर्तव्य आहे. त्याला मानानं जगायचं आहे. अपकीर्तीचा डाग हा फक्त रक्ताने धुतला जातो. ‘मला सोड, बुद्धिभ्रष्ट म्हातारे, मला सोड!’ तो माणूस ओरडला, मला वाटतं की माझ्या आईला हे म्हणताना मी ऐकले ‘तुला सर्व शेत देते. माझी सर्व मालमत्ता देते. तिच्या अंगावर तिचे पिते मूल आहे. मी तुझ्या पाया पडते...’ ही आहे सल्माची करुण कहाणी. ...Read more

  • Rating StarSUNDAY, GAOKARI 30-5-2010

    मानवी हक्कांच्या रक्षणकत्र्या जागतिक स्तरावर ज्या अभ्यासक ओळखल्या जातात त्यातील एक महत्त्वाचे नाव फादिया फकिर हे होय. त्यांच्या माय नेम इज सल्मा या पुस्तकाचा स्नेहल जोशी यांनी मराठी अनुवाद केला आहे. लग्नाआधी गरोदर राहिलेली सल्मा एका मुलीला जन्म देते.ती मुलगी घराण्याची इभ्रत, मान या नावाखाली तिचा भाऊ ठार मारायला निघतो. त्याच्या तावडीतून निघून सल्मा इंग्लंडला जाते. काम करते. तिथल्या घरमालकिणीकडून रीतभात शिकते. आणि एका इंग्रज व्यक्तीशी लग्न करते. स्थिरस्थावर होते. मात्र तिच्या हृदयात लग्नापूर्वीच्या त्या लहानग्या मुलीचा जगण्यासाठीचा आक्रोश सतत ऐकू येत राहतो. त्याचीच ही विस्तृत अशी कहाणी आहे. अत्यंत हृदयद्रावक अशी कथा आहे. वाचकाला सैरभैर करून सोडते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more